Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[५१६]                                                                     श्री.                                                            ११ मार्च १७६०.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी –
चरणरज बापूजी महादेव भट सा नमस्कार विनंति येथील क्षेम चैत्र वदि ११ गुरुवार पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून श्रीत आनंदरूप असो. स्वामीचे आशीर्वादपत्र सांप्रती आलें नाहीं. तरी कृपा करून पाठविलें पाहिजे. तेणेंकरून संतोष होईल. तिकडे श्रीमंतांशी व यवनाशी युध्द लागलें. त्याचा परिणाम कसा लागेल तें न कळें. सख्य जालें असेल तरी स्वामी र॥ बाबास लिहितीलच. विशेष. हस्तनापुरास गिलजी, पठाण, अबदाली आले. ते जयनगरा अलीकडे पंधरा कोसांवर आहेत. हरिभक्तांच्या फौजा पंधरा सोळा कोसांवर सडे आहेत. दत्तोजी शिंदे दिल्लीवर युध्दीं पडले. बाकी पळोन सर्व गेले. बुणगे लुटले गेले. राजश्री मल्हारराव सुभेदार वृध्द जाले. घोडयावर बसून युध्द करावयासी सामर्थ्य नाहीं. राजी जनकोजी शिंदे जखमी. दंडावर गोळीची जखम आहे. जेव्हां भरेल तेव्हां खरी. युध्द कोणी करावें ? हरिभक्तांचें सत्व गेलें. काळ फिरलासा दिसतें. परंतु अबदाली गरमीचे दिवसांत रहात नाहीं. रोहिला गंगेचे उत्तर पारीचा त्याणें अबदालीस आणिलें. तीन क्रोडी रुपये देऊ केलें. अबदाली मागतों. रोहिलेयानें उत्तर दिले :- मजपाशी कांही नाहीं. तुह्मी गेलेत तरी मी मेला जातों. अयोध्येस ताधारियापासून क्रोडी घेणें. जाटापासून क्रोडी घेणें. माधोसिंगापासून क्रोडी घेणें. तरीच धन मिळेल. अबदालीस एक कवडीही मिळाली नाहीं. कळलें पाहिजे. सर्व वर्तमान राजश्री बाळकृष्ण दीक्षितांनी लिहिलें असेल. त्याजवरून निवेदन होईल. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना.

[५१५]                                                                     श्री.                                                              १५ फेब्रूआरी १७६१.

तीर्थस्वरूप राजश्री दादा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक सा नमस्कार विनंति येथील क्षेम ता माघ शुध्द एकादशी रविवारपरियंत वडिलांचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों. यानंतर नवाब काशीहून कुच करून शुक्रवारीं गेला. एक लक्ष रुपये राजाचे दिल्हे. बाकी ऐवज देणें आहे तोही जीवनपुरास गेला ह्मणजे पांचपरियंत द्यावेसें केलें आहे. बाकी तेथून पुढें जाईल तेव्हां द्यावयाचा करार आहे. राजाही शुक्रवारीं तिसरा प्रहरा पारीं लष्करसमेत आला आहे. कळलें पाहिजे. दिल्लीकडील वर्तमान आह्मांस जें कळलें तें पूर्वीं लिहिलेंच आहे. वडिलांस कांहीं अधिकोत्तर कळलें असलें तर लिहिलें पाहिजे. वरकड वर्तमान वो रा गंगाधरभट पुराणिक सांगतां कळों येईल. बहुत काय लिहिणें हे नमस्कार.

[५१३]                                                                     श्री.                                                              

विज्ञापना ऐसीजे राजश्री आत्माराम नाइकीं सांगोन पाठविलें कीं युध्द मोठें जालें उपर श्रीमंत भाऊ उभयता निघोन दिल्लीस दाखल जाले. ऐसें वर्तमान सांगोन पाठविलें तें स्वामीस कळावें ह्मणून लि असें. आपणही तेथें कांहीं अधिकोत्तर ऐकिलें असिलें तर ल्याहावें, अनमान करावा. हे विनंति. धोंड जोशी यासी का ३५०० साडे तीन हजार पौष वद्य १० दशमीच्या मित्तीनें देऊन चिट्टी लध्धूची पाठविली आहे. ते घेणें आणि रुपये जमा करणें. हे विनंति.



[५१४]                                                                     श्री.                                                              १३ फेब्रूआरी १७६१.

पो चैत्र शुध्द ७ मंगळवार.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेवबावा दीक्षित स्वामीचे सेवेसी –
सेवक जानोजी भोसले सेनासाहेबसुभा दंडवत विज्ञापना येथील कुशल ता छ ७ माहे रजबपर्यंत मुक्काम करंडी सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. यानंतर स्वामीचे भेटीची बहुत अपेक्षा आहे. यास्तव आपणाकडे पत्रें लेहून जासूदजोडी पाठविली आहे. ऐशीयासी, उदयिक मंगळवारीं आमच्या मुक्काम दुधनातीरीं करंडीवर आहे. तेथून दरमजल सत्वरच वराड प्रांतीं जाणें आहे. येविशींचा अर्थ सेवेसी लिहिला आहे. तरी स्वामींहीं करून सत्वर भेटीस आलें पाहिजे. येतेसमयीं राजश्री शामराव विश्वनाथ यासमागमें घेऊन यावें. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति.

[५१२]                                                                     श्री.                                                              २७ जानेवारी १७६१.

पो फाल्गुन वद्य १३ शुक्रवार
शके १६८२, हा ग्वालदास कृपाराम.

श्रियासह चिरंजीव राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीवाराणशीहून बालकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता माघ वद्य ८ बुधवार जाणून स्वकीय लेखन करीत जाणें. विशेष. इकडील वर्तमान तरी आह्मीं समस्त सुखरूप असो. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊ सरदार व फौजेसहवर्तमान पाणिपतावरी होते. अबदालीची फौजहि आसपास जवळ ती चौ कोशांचे अंतरें होती. त्यासी, पौष शुध्द ८ स युध्द उभयतांमध्यें भारी झालें. प्रात:काळपासून संध्याकाळपर्यंत युध्द झालें. उभयपक्षीं लोक बहुत पडिले. शेवट श्रीमंतांचा मोड झाला. तमाम सैन्य जें राहिलें तें पळालें. बुणगे लुटलें. ऐशी खबर लखनऊस आली. लखनऊस खुशाली झाली. लखनऊचें लिहिलें येथील अधिकारी यासी आलें कीं बरगी सर्व मारिले गेले, कांहीं पळाले. ऐसी खबर आदितवारीं पंचमीस सहा घटिका रात्रीस कळली. त्या उपरांतिक सोमवारीचे पहाटेचे सहा घटका रात्रीस आह्मांस खबर मुख्यानें दिली कीं, रात्रीची खबर खरी आहे, तुह्मीं सावध राहणें. तेच समयीं आह्मीं दोघी बायका घेऊन व रा बापूजीपंत व भिऊबाई व केशव दि पाटणकर व त्याची स्त्री ऐशीं तेच वेळेस गंगापार होऊन रामनगरास गेलों. दिवस उगवल्या सोमवार. तेथें सोम मंगळ दोन दिवस होतों. तेथूनही पुढें आणखी स्थलीं जाणार आहों. जेथें राहूं तेथून पत्र लेहून पाठवूं. घरीं एक ह्मातारी व अंतोबा, दोघे ब्राह्मण मात्र रक्षण ठेविले आहेत. याप्रकारीचे वर्तमान जाहलें. हरिभक्त शिकस्त खाऊन पळाले. परंतु कोणाची काय गत झाली ? पळाले कोण ? पडले कोण ? हे कांहीं खबर नाहीं. मोड होऊन पळाले ही खबर सत्य आहे. बरगे पळाले हें सत्य. ऐसें दुसरेंही वर्तमान. कालीं मंगळवारीं काशीकर ब्राह्मण लष्करांत होते ते सर्व बंद धरून पठाणानें नेला होता त्यास नवाबानें सोडविले. त्यापैकीं बाळंभट साने व वैष्णव एक ऐसे दोघे रा नरशिंगराव हरकारे याचे बिराडीं दोघे आले. त्यांनींही पत्र ऐसेंच लिहिलें होतें. तेव्हां हें वर्तमान खरेंसें झालें. परंतु युध्दांत कोण पडिले? य राहिले कोण ? हें कांहीं वर्तमान नाहीं. जहालें वर्तमान तुह्मांस कळलें पाहिजे यास्तव लिहिलें असे. तुह्मांसही परभारें वर्तमान कळेल. बहुत काय लिहिणें हे आशीर्वाद. याउपरि हुंडी न करणें. घरीं कोणीं नाहींत. हुंडी माघारी येईल ऐसा साफ जबाब सांगणें.

[५११]                                                                     श्री.                                                              २४ जानेवारी १७६१.

पो फाल्गुन शुध्द १
शके १६८२.

चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीवाराणशीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद येथील क्षेम ता माघ वद्य ५ जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. सांप्रत तुह्मांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी येणारा मनुष्यासमागमें आपलें वर्तमान लिहीत जाणें. विशेष. इकडील वर्तमान तरी आह्मीं समस्त सुखरूप असों. राजकीय वर्तमान तरी श्रीमंत राजश्री भाऊ व सरदार व फौजेसहवर्तमान पाणिपतावर आहेत. अबदाली व रोहिला व नवाब सुज्यावतदौले ऐसे श्रीमंताच्या लष्करासमीपच आहेत. दो चौ कोशांच्या अंतरेंच आहेत. परस्परें लढाई रोजीचे रोज होतच आहे. मातबर जुंझें दोन चार जाहालीं. हरिभक्तांकडील लोक थोडकेसे पडले. परंतु अविंधाकडील मनुष्य बहुत पडिलें. दोन्हीं दळें कायम आहेत. लढाई संपली आहे. आणखी कितीक दिवस पुरवेल हें कांहीं कळत नाहीं. मुलूख सत्यानाशास मिळाला. दोन्ही फौजा भारी बैसल्या आहेत. इतक्यांस अन्न, पाणी, दाणा, वैरण मिळाली पाहिजे. परस्परें नाश होत आहे. ईश्वर काळरूपी जाहाला आहे. परिणाम काय होईल हें कळेना. अविंध महा खोटा आहे. श्रीविश्वेश्वर लज्जा रक्षील तरी रक्षील ऐसें आहे. सर्व जन भयाभीत आहे. भगवंतास सर्व जनांची चिंता असेलच. बरें ! पुढें जें होईल तें लेहून पाठवूं. तुह्मांकडे वर्तमान परभारें येतच असेल कळलें पाहिजे. यंदा इकडे अन्न स्वस्त आहे. धारणपूर्ववत्प्रमाणेंच आहे. कळलें पाहिजे. तुह्मी आपणाकडील वर्तमान वरीचेवरी लिहित जावें, व दक्षणेकडीलही वर्तमान लिहिलें पाहिजे. विशेष. राजश्री गोपाळराव गणेश बर्वे यांजला श्रीमंतांनीं आज्ञा केली कीं आपली फौज घेऊन, गंगापार जाऊन, नवाबाच्या मुलखांत धामधूम करणें. ऐशी ताकीद निकडीची आली. तेव्हां आपली फौज घेऊन, गंगापार जाऊन, दोन गांव एक फुलपुरा व दुसरा नवाबगंज ऐशीं दोनीं गांवें जाळून पोळून लुटून पस्त केलीं. इतकियांत नवाबाची फौज होती ते आली. त्याशीं याशीं गांठ पडली. गोपाळराव याजला जमीदार बळभद्र वगैरे सामील होते. तेव्हां युध्द जाहालें तेव्हां बळभद्र पळोन गेला. रा गोपाळराव आपले फौजेसमेत पळाले ते चारी लोक चहूंकडे जाहाले. ज्यास जिकडे वाट मिळाली तिकडे पळाला. खासा गोपाळराव पाचा साता स्वारांनशीं पळोन विंध्यवासनीवरून आपले स्थळास-कुरहाजाहानाबादेस- पावले. फौजही मागोमाग सर्व आली. कांहीं धक्का न लागतां सुखरूप आपले स्थळास गेले. कळलें पाहिजे. व रा गोविंद बल्लाळ बुंधेले यांजलाही याचप्रमाणें बोलावून नेऊन आज्ञा केली. तेहि अंतर्वेदींत दिल्लीसमीप उतरून, पांच सात गांव लुटून, जाळून पोळून टाकून, एके दिवशीं जो गांव लुटला त्याच स्थळावरी मोकाम जाहाला. पोटापाण्याचे तजविजीस लागले. तों इतकियांत अबदालीचे फौजेनें गाठ घातली. एकाएकीं येऊन पडले. तेव्हां पंताचा पुत्र रा बळवंतराव कांहीं स्वार घेऊन पळोन दिल्लीस गेला. गोविंदपंतही पळत होते तों गोळी लागोन घोडयावरून पडिले. अविंधाचे हस्तगत जाहाले. त्यांनी नाश केला. मोठा माणूस होता. गेला. मग पुत्र पळोन गेला होता त्याशी मागती आज्ञा केली कीं, बाप पडिला आणि तूं काय ह्मणून बसतोस ? तरी याच घडीस कुच करून जाणें. कांहीं मदतीस फौज देऊन रवाना केलें. ते तैसेच उतरले आहेत. तुह्मांसही वर्तमान कळलेंच असेल. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.

[५१०]                                                                     श्री.                                                              ७ फेब्रूआरी १७६१.

पो फाल्गुन वद्य १३ शुक्रवार
शके १६८२, हा पीतांबरदास.

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांसी श्रीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता माघ शुध्द २ मंदवार जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. श्रीमंतांची फौज व खासे व सरदार सर्व दिल्लीपासून पश्चमेस पांच मजलीवरी पाणिपतावरी होते. अबदालीही फौजेसहवर्तमान त्याच स्थळीं होता. त्यास उभयता फौजेमध्यें लढाई मातबर जहाली. हरिभक्तांचा पराजय होऊन तमाम फौज पळाली. पौष शुध्द ८ स युध्द जाहालें. हें वर्तमान येथें आलें तेच क्षणी या शहरांत गडबड जहाली. आह्मीं माघ वद्य ६ स येथून कुटुंब घेऊन, पारीं दहा बारा कोसांवरी एकेकडे जाऊन राहिलों आहों. येथील ग्रामस्तांची क्रूर दृष्टि पाहून गेलों. पुढें दुसरें वर्तमान काय येतें त्याची मार्गदप्रतीक्षा करितों. जरी शुभिता पडिला तरी बरें ! नाहीं तरी येथूनही निघणें पडेल ! श्रीमंत पळाल्याउपरि आजीता कांहीं वर्तमान कळत नाहीं. त्यास, सांप्रत आजीचें वर्तमान आहे कीं गनीम सर्व एकत्र होऊन मथुरेवरी जमा जाहाले आहेत. ऐशी वार्ता आहे. परंतु ठीक वर्तमान नाहीं. हा काळ बहुत कठीण दिसतो. परिणाम काय होईल तो पहावा. या रीतीचें वर्तमान आहे. तुह्मांसही परभारा कळलेंच असेल. हे आशीर्वाद.

[५०९]                                                                     श्री.                                                              १८ जानेवारी १७६१.

पो माघ वद्य १३
शके १६८२

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीवाराणशीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता पौष शुध्द १३ रविवार जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. पश्चिमेकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री भाऊ फौजेसहवर्तमान दिल्लीपलीकडे पाणिपतावरी आहेत. अबदालीशीं व श्रीमंतांशीं चहू कोशांचा अंतराय आहे. तीन युध्दें मातबर जाहालीं. दोन्ही फौजा कायम आहेत. पठाणाकडील थोडेंबहुत माणूस मारिलें गेलें. पठाण आपलें स्थळ सोडून चार कोश मागें सरला. कांहींशी शिकस्त पठाणानें खाल्ली आहे. अबदालीचा कमजोर आहे. पुढें होतां होईल तें पहावें. मुलुखांत धामधूम बहुत आहे. काळ कांहीं बरा नाहीं. ईश्वर लज्जा राखील ते खरी. कळलें पाहिजे. या वर्षी पीकपाणी बरें आहे. रबी चांगलीच आहे. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.

[५०८]                                                                     श्री.                                                              ८ डिसेंबर १७६०.

पै॥ पौष शुध्द १० शके १६८२
विक्रमनामसंवत्सरे.

श्रियासह चिरंजीव राजश्री गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीवाराणशीहून बालकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि क्षेम ता मार्गेश्वर शुध्द १ जाणून स्वकीय लेखन करणें विशेष. तुह्मीं पूर्वीं पत्र तीर्थरूपांच्या वर्तमानाचें पाठविलें त्यापासून आजीतागायत पत्र पाठवीत नाहीं. यावरून अपूर्व आहे ! तरी आठ-पंधरा दिवसांचे अंतरें आपणाकडील वर्तमान तपशिलें लिहीत जावें. इकडील वर्तमान तरी : कालीं मार्गेश्वर वद्य चतुर्दशीचें पत्र पाठविलें आहे त्यावरून तपशीलवार वर्तमान कळूं येईल. सांप्रत श्रीमंत राजेश्री भाऊ व तथा राजश्री विश्वासराव फौजेसहवर्तमान इंद्रप्रस्थावरी आहेत. अबदाली व रोहिले व सुज्यावतदौले ऐसे एकत्र यमुनेचे दक्षणतीरीं आहेत. मातबर युध्द जाहालें. झटापटी होत आहेत. होईल तें वर्तमान लेहून पाठवून देऊं. तुह्मीं आपणाकडील वर्तमान वरीचेवरी लिहीत जावें. तिकडील संसाराचें ओझें तुह्मावरी पडिलें आहे. बहुत सावधपणें असावें. हे आशीर्वाद.

[५०७]                                                                     श्री.                                                              ७ डिसेंबर १७६०.

पौष वद्य ३ शुक्रवार
शके १६८२.

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता मार्गेश्वर कृष्ण चतुर्दशी जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. इकडील वर्तमान तरी दिल्लीस श्रीमंत राजश्री भाऊ व तथा रा विश्वासराव फौजेसहवर्तमान चार महिने प्रजन्यकाळ दिल्लीस होते. दसरा जालियावरी तेथून कूच करून पश्चमेस कुंजपुरा ठाणें होतें तेथें अबदालीचे लोक तिघे सरदार व स्वार चार हजार व प्यादे पांच सा हजार होते ते सर्व मारून फौज तेथील बुडविली. सरदार दोघे मारिले. व (एक) धरिला आहे. कांहीं खर्चासहि थोडें बहुत मिळालें. तेथें होते हें वर्तमान तुह्मासहि कळलेंच असेल. सांप्रत अबदाली यमुनेच्या उत्तरतीरी होता तो तेथून दक्षणातीरास आपण व रोहिला व सुजावतदौला ऐसे फौजेसहवर्तमान आले. हे वर्तमान श्रीमंतांस कळतांच तेचक्षणी कुंजपुरीहून स्वार होऊन अबदालीसमीप दो कोशांचे अंतरें येऊन राहिले. रोज त्यांशीं यांशीं झटापटी होती. शत्रू दमला आहे. हरिभक्तांच्या लष्करांत चवदा पंधरा शेर अन्न आहे. उभयता फौजा आपल्याल्या जागा कायम आहेत. परंतु मोगल अंतरीं भयाभीत आहे. अवघी फौज गोळा होऊन बैसला आहे. दाणा, पाणी, रसद बंद आहे. पुढें जे होईल तें लेहून पाठवूं. तिकडील श्रीमंताकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.

[५०६]                                                                     श्री.                                                              २६ नोव्हेंबर १७६०.

शके १६८२ विक्रमनाम,
कार्तिक वद्य ५ गुरुवार.

श्रीमंत राजश्री भाऊ स्वामीचे सेवेसी :-
सेवक मल्हार भिकाजी कृतानेक सा नमस्कार विनंति येथील कुशल कार्तिक वद्य ४ बुधवार जाणून सर्व यथास्थित असे. विशेष. आज्ञेप्रमाणें गाडल्यावर जिन्नस :-
506

येणेंप्रमाणें पाठविलें आहे. पावेल. पूर्वीं रुई घालून पोत पाठविलें होतें तें पोत फिरोन पाठवावें. यानंतर जोंधळ्याचे पेव धर्मशाळेतील सन ११६८ चे सा खंडी आठ मण पस्तीसा शेराचें काढिलें. पंचभाई यांजकडील रुपये आज्ञेप्रमाणें व्याजसुध्दां घेतले. वरकड वर्तमान यथास्थित असे. बहुत काय लिहिणें. हे विनंति.