Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
तेव्हां रामाजी महादेव व मोरोजी शिंदे येऊन हपशी याचे लष्कर थळास होते तेथें लढाई होऊन उदेरकरांचा मोड होऊन पळून गेले. किहीमास दुसरी चौकी होती तेथें जाऊन उंदेरकरांचे आठ असामी मारले गेले. शके १६७६ चे माघ मासानंतर श्रीमंताकडून पत्र आलें की, निजामअल्ली मोंगल याजवर स्वारी आहे याजकरितां लष्करसुध्दां पुण्यास यावें. तिकडे गेल्यानंतर, उंदेरीकर हपशी यांनी लष्कर पाठवून फाल्गुनमासी सास्वण, आवास, सातीरंजे व भाल या गावांतील ब्राह्मण व बायका धरून नेउन अटकेंत घातली. हें समजल्यावरून सरखेल यानी महादाजी रघुनाथ व तुकोजी आंग्रे याजबरोबर लष्कर देऊन सांगितलें की उंदेरीवर चढाई करून ब्राह्मण व बायका सोडून आणाव्या. त्याप्रमाणें त्यांनीं ब्राह्मण व बायका सोडून आणिल्या. ही गोष्ट १६८० च्या ज्येष्ठमासीं झाली. हा सर्व मजकूर पेशवे यांस लिहून कळविल्यावर श्रीमंत पेशवे यांनी राजपुरीवर चढाई केली. तेव्हां मानाजी आंग्रे हेही लष्करसुध्दां गेले, आणि तेथें आजारी झाले. सबब तेथून निघून कुलाब्यास श्रावणमासी आले. नंतर भाद्रपदमासीं शके १६८० त मृत्यु पावले. मानाजी यांस पुत्र १४ चवदा. त्यांची नावें :- दहा औरस व चार खर्च, एकूण चवदा. १ महिमानजी, २ राघोजी, ३ चिमाजी, ४ हिरोजी, ५ धोंडजी, ६ तुकोजी, ७ कृष्णाजी, ८ रामाजी, ९ तुळाजी , १० सुभानजी. एकूण दहा. राघोजी आंग्रे यांचा अम्मल शके १६८० पासून १७१५ चे चैत्रमासपर्यंत. त्यांनी आपले भाऊबंदांस एकविचारें ठेविलें. उंदेरीकर हपशी जेव्हां तेव्हा प्रांत प्रांतांत दंगा करून मुलखाची खराबी करी. यास्तव पूर्वी कैलासवासी आंग्रे यांनी पेशवे यांस विदित केलें होतें तें स्मरण मनांत धरून किल्ले उंदेरी येथें आले. तेव्हां तेथे सिद्दी जोहार फकीर महंमद याचा अम्मल होता. श्रीमंत पेशवे हे लष्कर घेऊन व बरोबर सरखेल यांस घेऊन उंदेरीस गेले. तेथें उभयतांची लढाई होऊन पेशवे यांनी उंदेरी काबीज केली, शके १६८० माघमास. तेथील मामलत नारो त्रिंबक यास सांगितली. राघोजी आंग्रे सरखेल हे राजासनीं बसल्यावर चार पुंड होते त्यांचा बंदोबस्त करून, जागोजाग रयत पळून गेली होती त्यांस कौल देऊन गांवचे गांवी आणून वसाहत केली. दर्यामध्यें सावकार लोकांपासून खंडण्या घेण्याची वहिवाट होती त्याप्रमाणें घेत होते. उंदेरी पेशवे यांजकडे गेली. पूर्वीप्रमाणें दुतर्फा वहिवाट चालत असे. चेंऊल शहर दंग्यानें मोडून उद्ध्वस्त होऊन जंगलादाखल जाहालें होतें, ते शके १६९२ सालीं कौल देऊन बसविलें. प्रांतांत कोणाचे वैर नाहींसें होऊन सुदामत राज्य केलें. शके १७१५ चे चैत्र मासीं राघोजी आंग्रे यांस देवाज्ञा जाली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
एसाजी याने पुंडावा करून तीन वर्षे अंमल चालविला. नंतर एसाजी याचा बचाव होईना. मानाजी यास पेशव्यांचा आश्रय मिळाला हे पाहून एसाजी चेंऊलास अशाम मशीदींत जाऊन राहिला. नंतर तेथून निघून पेण येथें गढीत जाऊन राहिला व प्रांतांत बंडावा करून वसूल घेऊं लागला. ते समयीं मानाजी आंग्रे यांणी फौज पाठवून, गढी काबीज करून, एसाजीस धरून, महाल पोयनाड येथें आणून, शेख हवालदार यास हुकूम केला कीं, एसाजीचे दोन्ही डोळे काढावे. नंतर तसे आंधळे १६५९ चे ज्येष्ठमासी अलीबागेस आणून नेमणूक करून ठेविले. धोंडाजी आंग्रे हा मानाजीजवळ राहिला. किल्ले उंदेरेकीर हपशी याचा चौथाईविषयी कलह होत असे. या कारणामुळें शिद्दी बिलाल व मानाजी आंग्रे यांचा तह होऊन प्रांताकडे पुन: दावा सांगू नये असा करार होऊन तर्फ मांडवे गांव राजपुरीकडेस तोडून दिलें; आणि ऐन तेपें झिराड व परभूर दुतर्फा चालत आल्याप्रमाणें चालावें असें केलें. मानाजी आंग्रे यांही आरमार घेऊन दर्यामध्यें सावकार लोकांजवळून खंडणी घ्यावी, दर्म्यान जाऊं येऊं नये असा बंदोबस्त केला. फिरंगी रेवदंडा यांनी मसलत करून आंग्रे यांचा खासगत गांव खांजव तर्फ ब्राह्मणगांव रात्रीस मारावयास आले. परंतु सरखेल यास पूर्वी समजल्यावरून त्यांणीहि लोक नेउन ठेविले होते. तेव्हां उभयतांची लढाई होऊन फिरंगी यांचा पराभव झाला. व फिरंगी यास काढीत काढीत रेवदंडेचे किल्ल्यांत घालविलें. नंतर मानाजी आंग्रे यांनी शहर व कोट काबीज केला. आणि मोर्चा बांधून किल्ल्यावर फार मार चालविला. तेव्हां किल्ल्यांतील लोकांचा नाइलाज होऊन कोंडून राहिले. तेव्हां ही खबर वसईस गेली. तेव्हा कप्तान सोन्हा येऊन मानाजी आंग्रे यांशी तह करून शहर कोटांतून मोर्चे उठविले. नंतर शके १६६० चे आश्विन महिन्यांत आंग्रे कुलाब्यांत गेले. पुढें संभाजी आंग्रे हे विजयदुर्गाहून आरमारसुध्दां कुलाब्यास साखरेस उतरले. तेव्हा मानाजी व संभाजी यांची लढाई झाली. त्यांत संभाजीचा जोर पाहून मानाजीनें श्रीमंत पेशवे यांस पत्र लिहून चिमणाजीअप्पा व नानासाहेब यांस आपले मदतीनें फौजेसुध्दां बोलाविले. त्याप्रमाणें ते येऊन उभयता भावाची समजूत केली. तेसमयीं पेशवे यांस मानाजीनें किल्ले नजर दिले ते :- पाली, मीरगड व उरण. नंतर उभयबंधूस महाराज शाहूराजे यांचे भेटीस घेऊन गेले. शके १६६२ त आंग्रे यांची ठाणी थळ व नवगांव येथे होती. या मोर्च्यावर उंदेरीकर हपशी यांचे लोक उतरून लढाई केली. त्यांत हपशांचा मोड झाला. ही लढाई शके १६६२ चे भाद्रपदमासीं झाली. नंतर किल्ले माहुली येथून मोरोजी शिंदे हिंमत पेशवे हे लष्कर घेऊन आले. किल्ले उंदेरीतून अंताजीराव घाटगे दिवासा हपशी हे लष्कर घेऊन थळास उतरले, आणि तेथील गडी घेऊन हिराकोट काबीज करावा असा बेत केला. इतक्यांत मानाजी आंग्रे याची लढाई झाली, आणि सरखेल यांच्या पायास बंदुकीची गोळी लागली. त्यांनी पेशवे सरकारास लिहून पाठविलें कीं आपली मदत असावी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
त्यांत हपशी व आंग्रे यांची लढाई शके १६५३ साली जाली. नंतर चिमणाजी बल्लाळ पेशवे राजपुरीवर गेले, तेव्हां सेखोजी आंग्रे हेही लष्कर घेऊन गेले होते. इकडे तानुद्दीन अल्लीखान याचा बेटा गाजीखान व उदेरीकर हपशी यांनी मुलखांत फार दंगा केला. ही बातमी आंग्रे यास लागताच पेशवे व आंग्रे तिकडून फौजसुध्दां चेंऊलास येऊन मोंगलांवर चढाई केली. उभयतांची लढाई होऊन आंग्रे यांनी जबर पोंचवून गाजीखान मोंगल यांस धरून कैद केला; आणि किल्ला राजकोट आंग्रे व पेशवे यांची दरोबस्त फोडून काढिला. मोंगल यास सोडून देऊन पोटास नेमणूक करून दिली. तेव्हांपासून या प्रांती पातशाही अंमल नाहींसा झाला. शके १६५५ साली आंग्य्रांचा अंमल चांगला झाला असतां सेखोजी आंग्रे मृत्यु पावले. नंतर त्यांचे बंधुंपैकी सुवर्णदुर्गास तुळाजी आंग्रे अंमल करू लागले. इकडे चौघे बंधू कुलाबा येथें राहिले. चौघे बंधूंत कलह माजला. तेव्हां मानाजी आंग्रे हे पळून रेवदंडेकर फिरंगी गोरे सोज कपतान यांच्या आश्रयानें येऊन राहिले. येथेंही फितूर करून किल्ला काबीज करावा असा मनसोबा केला. हा फिरंगी यास समजल्यावर मानाजी यास धरून कैद करावा असा बेत केला. इतक्यांत मानाजी हे पळून चेंऊल येथें आशाम नांवाची मशीद आहे त्यांत राहिले. इकडे फिरंगी यानें लष्कर घेऊन मानाजींवर चढाई केली. उभयतांचे लढाईत मानाजी आंग्रे यांचा मोड जाला. फिरंगी यानें मशीद घेतली. मानाजी हे ब्राह्मणगांवास गेले. तेथें पुन: मसलत करून लोक जमवून कुलाब्यास संभाजी आंग्रे यांजवर चढाई केली व संभाजीचा पराभव केला आणि किल्ला आपले ताब्यांत घेतला. संभाजी सुवर्णदुर्गास शके १६५७ साली पळून गेले. इकडे मानाजी आंग्रे यास राज्याभिषेक होऊन त्यांनी शके १६५७ पासून शके १६८० पर्यंत अम्मल केला. पुढें मानाजी, येसाजी व धोंडजी असे त्रिवर्ग बंधू कुलाब्यास असतां शके मजकुरी जंजिऱ्याहून हपशी शिद्दी सात व त्यांचा सरदार कोण नाईक परवारी आरमार फौजेसुध्दां रेवस बंदरी येऊन तेथून सागरगड किल्ला घेऊं लागले. परंतु शिद्दी सात फार झाल्यावर बचाव होणार नाही असें समजून, श्रीमंत पेशवे यांस पत्र लिहून मदत आणविली. तेव्हां कामारलें तर्फ श्रीगांव येथें उभयपक्षांची लढाई झाली. सात शिद्दी यांची फौज ११००० अकरा हजार होती. ती मारिली गेली. शिद्दी सात यास चिमणाजी बल्लाळ पेशवे यांनी सांगून पाठविलें की तुह्मी निघून जावें. परंतु तें तो कांही ऐकेना. तो ह्मणे की राज्य घेईन नाही तर मरून जाईन. असा त्यानें नेम केला होता. कोण नाईक परवारी होता तोहि मारला गेला. एकटा शिद्दी सात मात्र राहिला. त्यास सांगून पाठविलें, तरी तो ऐकेना. तेव्हा मानाजी आंग्रे हे फारच चांगले शिपाई होते, त्यांची व ह्याची लढाई होऊन, मानाजी यांणी शिद्दी सात याचें शीर उडविलें. हें यश घेऊन कुलाब्यास आले. नंतर मानाजी व एसाजी आंग्रे यांचा तंटा लागला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
त्यांत हपशी व आंग्रे यांची लढाई शके १६५३ साली जाली. नंतर चिमणाजी बल्लाळ पेशवे राजपुरीवर गेले, तेव्हां सेखोजी आंग्रे हेही लष्कर घेऊन गेले होते. इकडे तानुद्दीन अल्लीखान याचा बेटा गाजीखान व उदेरीकर हपशी यांनी मुलखांत फार दंगा केला. ही बातमी आंग्रे यास लागताच पेशवे व आंग्रे तिकडून फौजसुध्दां चेंऊलास येऊन मोंगलांवर चढाई केली. उभयतांची लढाई होऊन आंग्रे यांनी जबर पोंचवून गाजीखान मोंगल यांस धरून कैद केला; आणि किल्ला राजकोट आंग्रे व पेशवे यांची दरोबस्त फोडून काढिला. मोंगल यास सोडून देऊन पोटास नेमणूक करून दिली. तेव्हांपासून या प्रांती पातशाही अंमल नाहींसा झाला. शके १६५५ साली आंग्य्रांचा अंमल चांगला झाला असतां सेखोजी आंग्रे मृत्यु पावले. नंतर त्यांचे बंधुंपैकी सुवर्णदुर्गास तुळाजी आंग्रे अंमल करू लागले. इकडे चौघे बंधू कुलाबा येथें राहिले. चौघे बंधूंत कलह माजला. तेव्हां मानाजी आंग्रे हे पळून रेवदंडेकर फिरंगी गोरे सोज कपतान यांच्या आश्रयानें येऊन राहिले. येथेंही फितूर करून किल्ला काबीज करावा असा मनसोबा केला. हा फिरंगी यास समजल्यावर मानाजी यास धरून कैद करावा असा बेत केला. इतक्यांत मानाजी हे पळून चेंऊल येथें आशाम नांवाची मशीद आहे त्यांत राहिले. इकडे फिरंगी यानें लष्कर घेऊन मानाजींवर चढाई केली. उभयतांचे लढाईत मानाजी आंग्रे यांचा मोड जाला. फिरंगी यानें मशीद घेतली. मानाजी हे ब्राह्मणगांवास गेले. तेथें पुन: मसलत करून लोक जमवून कुलाब्यास संभाजी आंग्रे यांजवर चढाई केली व संभाजीचा पराभव केला आणि किल्ला आपले ताब्यांत घेतला. संभाजी सुवर्णदुर्गास शके १६५७ साली पळून गेले. इकडे मानाजी आंग्रे यास राज्याभिषेक होऊन त्यांनी शके १६५७ पासून शके १६८० पर्यंत अम्मल केला. पुढें मानाजी, येसाजी व धोंडजी असे त्रिवर्ग बंधू कुलाब्यास असतां शके मजकुरी जंजिऱ्याहून हपशी शिद्दी सात व त्यांचा सरदार कोण नाईक परवारी आरमार फौजेसुध्दां रेवस बंदरी येऊन तेथून सागरगड किल्ला घेऊं लागले. परंतु शिद्दी सात फार झाल्यावर बचाव होणार नाही असें समजून, श्रीमंत पेशवे यांस पत्र लिहून मदत आणविली. तेव्हां कामारलें तर्फ श्रीगांव येथें उभयपक्षांची लढाई झाली. सात शिद्दी यांची फौज ११००० अकरा हजार होती. ती मारिली गेली. शिद्दी सात यास चिमणाजी बल्लाळ पेशवे यांनी सांगून पाठविलें की तुह्मी निघून जावें. परंतु तें तो कांही ऐकेना. तो ह्मणे की राज्य घेईन नाही तर मरून जाईन. असा त्यानें नेम केला होता. कोण नाईक परवारी होता तोहि मारला गेला. एकटा शिद्दी सात मात्र राहिला. त्यास सांगून पाठविलें, तरी तो ऐकेना. तेव्हा मानाजी आंग्रे हे फारच चांगले शिपाई होते, त्यांची व ह्याची लढाई होऊन, मानाजी यांणी शिद्दी सात याचें शीर उडविलें. हें यश घेऊन कुलाब्यास आले. नंतर मानाजी व एसाजी आंग्रे यांचा तंटा लागला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
पैकी आंग्रे यांचे मूळपुरुषानें महाराज छत्रपति यांची सेवा करून राज्य मिळविलें. आंग्रे यांचें उपनांव शंकपाळ आंगरवाडी येथील रहाणारे सबब आंग्रे अशी ह्मणण्याची वहिवाट पडली आहे. यांचा मूळपुरुष सेखोजी आंग्रे संकपाळ. याचा पुत्र तुकोजी व तुकोजीचा कान्होजी. ह्यांनी राज्य केलें त्याचा तपशील येणेप्रमाणें. कुलाबा येथें महाराज छत्रपति यांचे तर्फेचे अंमलदार माणकोजी सूर्यवंशी, उदाजी पडवळ व सुभानजी खराडे असे तीन असामी निघून प्रबळगडास गेले. आणि तिकडे भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे असे दोन असामी कुलाबा खांदेरी येथें अंमल करीत असतां याकुदखान हबशी जंजिरेकर राजापुराहून आरमार व जमावाचे लोक घेऊन कुलाब्याचे लष्करास वेढा देऊन राहिले. नंतर अल्लीबाग आगापैकी सातहजार माड तोडून काढिले व सात माड मात्र राखून ठेविले, व तेथें पांचसहा महिने राहून निघून गेला, शके १६२०. भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे या उभयतांचा आपसांत काही तंटा जाला. तेव्हा कान्होजी आंग्रे यांनीं कपट करून गुजर मशारनिले यास धरून अटकेंत घातलें, आणि राज्य मुखत्यारीनें चालविलें. छत्रपती यांजकडून अंमल शके १६०२ पासून शके १६२२ पर्यंत होता. आंग्रे यांनी बहुत पराक्रम केला. खांदेरी व कुलाबा या दोन किल्ल्यांस जमाबंदी प्रांतमजकूरचा निमे वसूल होत असे. व निमे सागरगड, राजकोट मोंगल यांजकडे. उंदेरी किल्ल्याकडे कांही नव्हता. फिरंगी रेवदंडा, मोंगल व हपशी यांचा एक विचार होऊन आंग्रे याजबरोबर रोज लढाई होऊन एकमेकांची क्षिती होत असे. ममतमजखान दिवाण यांची व कोन्होजी आंग्रे यांची चुरस लागली. प्रांतांत दंगा जाला. तेव्हा रयत जागोजाग पळून गेली. आंग्रे याजवर पोहोंचून सागरगड काबीज करून निषाण चढविलें. हें कृत्य शके १६३० सन समान मया व अलफ सालीं घेऊन प्रांतमजकुरी जमाबंदी करून दोन तक्षिमा आंग्रे यांजकडे व एक तक्षिम राजकोट मोंगल यांजकडे तहनामा होऊन चाललें. इतक्यांत शिद्दी अबदुल रहमान हपशी उंदेरीकर यांनी जमावाचे लोक घेऊन फिरंगी अंतोन ज्याकर्दीन गोव्याहून सामील करून आंग्रे याजबरोबर लढाई केली आणि प्रांत वैराण केला. चेंऊल गांवांत हपशी येऊन कांही देवळेव घरे जाळलीं. त्यावेळेस आंग्रे यांचा कांही उपाय चालेनासा झाला. सबब बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची मदत मागून शके १६३५ त बंदोबस्त केला. उंदेरीकडे दोन तेपें झाराड व परभूर दुतर्फा केले. कुलाबा, सागरगड, खांदेरी निमे प्रांत अगर राजकोट मोंगल चवथाई असा तह होऊन सुदामत चालत असे. कान्होजी आंग्रे कुलाबा येथें असतां त्यांस ६ पुत्र झालें. ते येणेंप्रमाणें :- १ सेखोजी, २ संभाजी, ३ तुळाजी, ४ मानाजी, ५ येसाजी, ६ धोंडजी. येणेप्रमाणें सहा पुत्र असतां कान्होजी शके १६५१ त वारले. पुढें सेखोजी आंग्रे यांचा अंमल चालला. यांचा अंमल शके १६५५ पर्यंत होता.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
शके १६१० त संभाजीचा पराभव झाला. तेव्हांपासून चेंऊल प्रांतीं पातशाही अंमलाची पैवस्ती जाली. राजकोट, सागरगड व अमिनाबाद ऊर्फ पाली या किल्ल्यांजवळ पातशाही अमलाची पैवस्ती जाली. कुलाबा, खांदेरी व उंदेरी किल्ल्यांवर महाराज छत्रपति तर्फेचे अंमलदार होते. माणकोजी सूर्यवंशी, सुभानजी खराडे व उदाजी पडवळ प्रबळगडास गेले. भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे कुलाबा, खांदेरी येथेंच राहिले. पातशहाच्या व महाराजांच्या तर्फेनें कलह होऊन दुतर्फा जमाबंदी होत असे. सुदामती चालत नसे. पातशहाकडून प्रांताची कमावीस व्हावयाकरितां मुलाणा हुसेन सेकिन दिवट प्रगणे यशवी उपनांव हासवारण वाईथ त्याचा बेटा शेख महंमद यास अंमलदारी होऊन, हुजरून मामतमतखान दिवाण असें पद देऊन चेंऊल सुभेयाची कमावीस करण्यास शके १६११ चे सालीं पाठविला. राजकोट, सागरगड व अमिनाबाद ऊर्फ पाली तीन किल्ले पातशाही व कुलाबा खांदेरी येथे भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे, असे असतां ममतमतखान दिवाण याची व उभयतांची लढाई जाली. शके १६१३ चे सालीं एकमेकांचे शिपाई फिरूं देत नसत. तेसमयीं तहनामा जाला. निमेनिम प्रांत वाटणी जाली. किल्ले उंदेरी याकुतखान याजकडे जमा नवती. चोरून मुलूख मारून होता. मामतमतखान दिवाण याचा अंमल शके १६११ पासून शके १६३० पर्यंत. याचे पुत्र दोन :- १ तानुद्दीन अल्लीखान, २ सरफरद्दीखान वाकनवीस. सदफरदीखान वाकनवीस याचा अंमल शके १६३१ पासून १६४० पर्यंत. तानुद्दीन अल्लीखान याचा अंमल १६४१ पासून १६४७ पर्यंत. यास पुत्र गाजीखान ह्मणून एकच होता. गाजीखान साहेब याचा अंमल शके १६४८ पासून शके १६५३ पर्यंत. हे चेंऊल सुभे, किल्ले सागरगड, राजकोट, अमिनाबाद येथें अंमल करीत असत. कुलाबा खांदेरी येथें भिवजी गुर्जर व कन्होजी आंग्रे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
परंपरेनें लढाई होऊन प्राप्तव्य कांही नाहीं. तेसमयीं हबशी राजपुरीहून फौज घेऊन खांदेरीनजीक खडप होता तेथें शके १६०१ सन समानीन व अलफ वैशाखमासीं किल्ला बांधावयास आरंभ केला व त्याला उंदेरी असें नांव ठेविलें. हबशी याणें उंदेरी किल्ल्यावर फौज ठेविली आणि रात्रीं सदरहू प्रांतांत उतरून गांवें मारावी, घरें लुटावी व माणसें जिवें घ्यावी, ह्याप्रमाणें क्रम ठेविला. फिरंगी यांनी रेवदंडा येथे रयतेस धरून नेऊन ठेवावें, देवळें व मशिदी मोडून टाकाव्या. शिवाजी राजानें तह करण्याविषयी बहुत प्रयत्न केला; परंतु तह होईना. देशास फार उपद्रव जाला. किल्लेकोट असतां प्रांतांचा बंदोबस्त होईना. अलीबागेजवळ नऊघर येथें समुद्रकिनाऱ्याजवळ खडक होता तेथें शके १६०२ सन इहिदे समानीन सालीं किल्ला बांधून जंजिरे कुलाबा असें नांव ठेविलें. तेच साली छत्रपतीस देवाज्ञा जाली. त्याचे पुत्र दोन :- १ संभाजी. २ राजाराम. संभाजी राजा याचा अंमल शके १६०२ पासून शके १६१० एकूण नऊ वर्षे. सागरगड, खांदेरी व कुलाबा ह्या दोन गढ्या व प्रांतीं जमाबंदी चालत असतां, चेंऊल गांवांत खासगी अल्ली मुसलमान रहात होता. त्याची हवेली निवारशी होती. सबब संभाजीनें दोन बुरूज बांधिले. त्यास राजकोट नांव दिलें, शके १६०४. संभाजी राजे राज्य करीत असतां हबशी फौज घेऊन आरमारसुध्दां पालवचे खाडीत आला. तेथून रात्रीचे समयी छापा घालून चेंऊलचीं घरें दग्ध केली. मालमत्ता लुटून नेली. शके १६०७ यावर्षी संभाजी राजाच्या तर्फेनें सागरगड, राजकोट, खांदेरी व कुलाबा येथें अंमलदार होते ते :- सूर्यवंशी मराठे माणकोजी यांची नेमणूक खांदेरी येथें तीन वर्षें, उदाजी पडवळ यांची नेमणूक सागरगड येथें चार वर्षें, सुभानजी खराडे यांची नेमणूक राजकोट येथें सहा वर्षे, भिवजी गुजर यांची नेमणूक कुलाबा सहा वर्षें. संभाजी राजा रायगड येथें राज्य करीत असतां कान्होजी आंग्रे फिरतें आरमार घेऊन समुद्रामध्यें सदरहू लोकांचा परामृश घेत असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
मूळगांव चेऊल पाखाड्या १६. | |
१. पाखाडी प्रथम | २. पाखाडी अंबेपरी. |
३. पाखाडी मोखवा | ४. पाखाडी इसवी. |
५. पाखाडी दांडे. | ६. पाखाडी वेळावी. |
७. पाखाडी भोरशी. | ८. पाखाडी कुडाळ. |
९. पाखाडी उसवी. | १०. पाखाडी दाखर्वा. |
११. पाखाडी पेठ. | १२. पाखाडी वैजाली. |
१३.पाखाडी झिराळी | १४. पाखाडी कोपरी. |
१५. पाखाडी. | १६. पाखाडी कसबा. |
पातशाही अंमलदार फत्तेखान जाल्यावर हैदरखान याचा अम्मल किल्ले खेडदुर्ग ऊर्फ सागरगड येथें असतां फिरंगी कप्तान सोज पुर्तकाल याणें पातशाहा याजकडे जाऊन फार खुशामत केली; आणि वखारीस जागा गाईच्या एका कातड्याभर मागितली. पातशहानें मेहेरबानी करून चेंऊलच्या सोळा पाखाड्यांपैकीं १ दांडे, २ दाखड, ३ मुरूड एकूण तीन पाखाड्या पालवापासून कारलईच्या खाडीपर्यंत बक्षीस दिल्या. फिरंगी कप्तान सोज याणें किल्ला बांधावयास प्रारंभ केला, शके १४८०. फिरंगी यानें आपली मदत हैदरखान यास देऊन पोवार व पहाणें या उभयतांस लढाई करून जिवें मारिलें, व मराठ्यांचा पराभव केला. फिरंगी व पातशाही एक विचारानें होते. पातशाही अंमल १५४८ पर्यंत होता. १५४८ त मलिकंवर मरण पावला. देशावर मराठे लोकांचा उदय झाला. शिवाजीराजे भोसले यांणी पुंडावे करून मुलूख काबीज केला. शिवाजीराजांनी चेंऊल प्रांतावर अंमल केला. तो प्रांत खेडदुर्ग ऊर्फ सागरगडाला दिला. खेडदुर्ग नांव फिरवून सागरगड असें नांव शिवाजी यांही ठेविलें. सदरहू किल्ल्यावर शिवबंदी ठेवून जमाबंदी करीत असतां फिरंगी अंतोन दिसोझा कप्तान रेवदंडा येथें अंमल करीत होता. फिरंगी व राजा शिवाजी यांची लढाई झाली. जंजिरे राजपुरीकरांशीहीं लढाई होत होती. उभयपक्षीं लढाई होऊन प्रांतास फार उपद्रव होऊं लागला. हें छत्रपति यांही मनांत आणून राजपुरी व रेवदंडा ही दोन्ही ठाणीं काबीज करावी असें मनांत आणिलें, परंतु हस्तगत होतना. याजकरितां शिवबंदी ठेवण्यास दुसऱ्या जागा किल्ले बांधून वसाहत करण्यास आरंभ केला. मुकाम टवस येथें शके १५८० त मनरंजन कोट बांधिला. मुकाम मांडवे येथें श्रीवर्धन शके १५८१ त बांधिला. एकूण दोन किल्ले बांधून, तेथें शिवबंदी ठेवून फिरंगी यांचा वसई येथें जाण्याचा मार्ग बंद करण्याचा यत्न केला; परंतु तो सफळ झाला नाही. फिरंगी फार प्रबळ जाले असें पाहून छत्रपतींनीं चांगलीशी खडकाळ जागा समुद्रामध्यें पाहून तेथें किल्ला बांधावयास आरंभ केला. शके १६०० भाद्रपद मासीं गौरीचे मुळावर सन तिस्सा सबाईन व अलफ या सासी किल्ला बांधून त्यास लढाईचे फार उपयोगी असल्या कारणानें खांदेरी असें नांव ठेविलें. खेसगड, मांडवेगड, खांदेरी व सागरगड या किल्ल्यावर फौज ठेविली. समुद्रामध्यें गलबतें व आरमार ठेवून फिरंगी लोकांबरोबर लढाया केल्या.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६८] चेंऊलची बखर.
चेंऊलचें पूर्वींचें नांव चंपावती होतें. त्यांत हंसध्वज नांवाचा क्षत्रिय राजा राज्य करीत होता. क्षत्रिय राजा चेंऊल राज्य करीत असतां चंपावतीचें चेंऊल नांव पडलें. चेऊल राजा राज्य करीत असतां रणजितसिंग नांवाचा रजपूत येऊन त्यानें चेंऊलाचा पराभव केला व आपला अंमल स्थापिला. रणजितसिंगाचा अंमल शालिवाहन शक १००० कालयुक्त नामसंवत्सरपर्यंत होता. त्याचे पुत्र दोन. आवासिंग याचें ठिकाण आवास येथें होतें. शहासिंग याचें ठिकाण सास्वण येथें होतें. ह्यांच्या अमदानींत दिल्लींत यवनांचें राज्य झालें. पुढें रामदेवराव दरणें याणें देवगड येथें रामदरणा नावाचा किल्ला बांधिला. दरणें याचा अंमल २०२ वर्षे चालला. यांच्या पदरीं १ डांगवी, २ बाजी पवार, ३ वीरा पहाणें. डांगवी खेडदुर्ग ऊर्फ सागरगड येथें बाजी पवार, चावरें येथें व वीरा पहाणें भोगनजीक बोरी पाटण येथें किल्ले बांधून होता. हे चार असामी मुलूख लुटून खंडणी घेत असत.दिल्लीच्या पादशहाला हे लोक मानीतनासे झाले. याजकरितां परसू भोंगळा कोळी कोळवण साष्टीकडे होता त्यास खबर पादशहाकडून जाहीर झाली. तेव्हा भोंगळा कोळी याचें चेंऊल प्रांती किहीमचे मैदानांत दरणें याचा पराभव केला. दरणें मारला गेला. भोंगळा यानें रजपूत राजा बिंब यास अंमल सांगितला. बिंब याचा अंमल शालिवाहन शक १२०५ तागाईत १२८० पर्यंत चालला. पुढें बिंब व भोंगळा यांची लढाई होऊन बिंब पाडाव झाला. भोंगळा कोळी याचा अंमल चेंऊल प्रांती शके १२८१ विकारी संवत्सर तागाईत शके १२९० पर्यंत दहा वर्षे होता. कोळी यानें चेंऊल शहरांत प्रळय मांडिला. हिंदूंची देवालयें भ्रष्ट केलीं. प्रजेस फार उपद्रव दिला. नंतर पादशहाकडून फत्तेखान याची रवानगी झाली. भोंगळा कोळी साष्टीस पळून गेला. चेंऊल प्रांताची जमाबंदी देहाय गावें तेपें :-
तेपे अष्टागर, गांव १५. | तेपे ब्राह्मण, गांव २६. |
तेपे मांडले, गांव ४७. | तेपे उमटे, गांव २०. |
तेपे पाल, गांव ४. | तेपे खंडाळें, गांव १९. |
तेपे परहुर, गांव १४. | तेपे झिराड, गांव ८. |
तेपे शिरगांव. | |
एकूण तेपे ९. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६७] श्री.
मुसवदा स ॥ उधोपंडत, किल्लेदार, दौलताबाद.-
सयेदजयेन आलादिन उर्फ खुब साहेब पीरजादे, फार थोर, उमदे, दौवलतदार होत्ये. पहिलेपासून दौलत होती. उपरि दौलत दुनिया सोडून दिधली आणि फकीर जालियावरी मक्केस गेले. फिरून आले. दौलताबादेमध्यें मोमीनपुराचे हमसाये दरगाबारा आमचा होता. वडिलाचे हातचा होता. त्यामध्यें जाऊन आपले दरग्यांत बसला. दिगर नुरा कोतवाल थोर चोर होता. पिरजादे याचा नवा मीर हमीद माणूस त्यास कोतवालानें आपलेसें करून भेद घेतला. ज्या कोथडीमध्यें माल होता ते कोथडी तहकीद करून माल कूल कोथडी फोडून, कोतवालानें चोरी करून, कूल मालमत्ता मोहरा व होन व जोहीर कबिलयाचे वगैरे माल नगद रुपये वीस हजार रुपयांचा माल २०००० विसाहजारांचा माल चोरून गदियांत कोतवालानें चोरून नेली. वगैरे माघ जिन्नस जरतारी वगैरे कबरस्थानावरी टाकले. नगद ऐवज घेऊन गेला. दिगर माजी किल्लेदार महेंदी अल्लीखान व चेला नसरत याच्या आसऱ्यामध्यें कोतवाल होता. किल्लेदार तगीर जाल्यावरी दुसरा किल्लेदार नबाब सलाबतजंग यांचेतर्फेनें सयदे शेरिफखान व आपाजीपंत दिवाण यांस किल्लेदारी जाली. नबाब सलाबतजंग व दिगर आमील याही परवाने पोंहचाविले कीं, पिरजादे यास दगा केला, कोतवालास धरून पिरजादे याची मालमत्ता देवणे. हें ऐकोन कोतवाल आमचे माणूस हमीद यासही सांगाते घेऊन पळोन गेला. हल्लीं आतां पेशवे नानासाहेब यांचा अम्मल जालियावरी किल्लेदाराशीं मिळोन बसला आहे. दिगर पेशवे याचें धर्मराज्यें इनसाफ आदल आहे. तरी चोरास धरून त्यापासून माल घेऊन जो ऐवज वसूल जालियावरी चौथाई तुह्मी घेणें. दुसरीं चौथाई पेशवे यासी देणें. बाकी ऐवज सयेदास देववणें. तुह्मांस मोठा सबब होईल. हें काम अगत्य करणें. अवरंगाबादचे लोक व दौलताबादचे लोक लहान थोर चोरास वाफिक आहे. हे गोष्ट तहकिक आहे. हें काम अगत्य करणें. हे अर्जदास्त लिहिली असे.