Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[५५६]                                                                        श्री.                                                                    ३ सप्टेंबर १७४८    

यादी कलमें कांही जाबसाल जाहले कांही बाकी राहिले आहेत.

१.  सरकारचे रुपये निशा पडल्यावर दुसरीं कांहीं कलमें काढूं नयेत. निरोपच द्यावा. कलम १
१. कैलासवासी तीर्थरूपाचे वेळेस व आमचे हातचे कर्जदार कोणास रुपये पावले कोणास पावले नाहींत. त्यांचा गवगवा तगादा होऊं देऊं नये. फजिती सर्वांनीं दरबारीं केल्यास आब राहणार नाहीं. येविशीं सरकारांतून सांगितलें पाहिजे. निर्विघ्न आपले प्रांतांत जाहल्यावर आपल्यावर तजविजीनें जे मार्ग निघतील. कलम १
१.  मोंगल येईल, वराड देवगडाकडे, तर येऊन द्यावा. हें साहित्य निर्विघ्न करावें. त्याचा आमचा हर्षामर्ष न वाढावा तें करावें. गु तह केला मोंगलानें प्रों चालावें. कलम १
१. भेटी जालियावर आठापंधरा दिवसांत निरोप द्यावा. कलम १.
१. वीस हजार पंचवीस हजार फौज जमा झाली हें कोणीकडे मुलुखगिरीस जाईल तरच अखेर सालीं आब राहील. परभारें समजावीस फिटली पाहिजे. याजकरिता भेट जालियावर फौजेस निरोप द्यावा. कलम १
१  बंगालियाच्या ऐवजास खळखळ पडली आहे. त्यास सुदामत प्रों ताकिदी द्याव्या. सुभ्यास व निखालस श्रीमंत दादासाहेब मकसुदाबादेस न जात, आमचा रु॥ न बुडे, तें करावें. ते दादासाहेबांसही पत्रें हिंदुस्थानांस पाठवून द्यावीं व आह्मांजवळही पत्रें त्यास द्यावी, जे मकसुदाबादेस सुभ्याकडे खळखळ न होय. ऐसें निखालस करून घ्यावें. कलम १.
१.  सावकार सरकारचा ऐवज देतील. वाजवी आहे तो त्यास सरकारचें पत्र आपण सावकारास जे निशा करतील त्यांस द्यावें. जे रुपये देणें. सरकारतर्फेनें राजश्री सेनासाहेब सुभ्याचे मामलतींत घालमेल करणार नाहीं, ऐसें पत्र. कलम १
१.  कोणी भाऊबंद वगैरे याचा कोणी मजकूर करतील ते चित्तावर घेऊं नये. मागें श्रीकृष्णातीरीं सांगितलें आहे. साहेबीं त्याच्या प्रा निविष्ट सांगावें. त्यांचें कांहीएक चित्तावर घेऊं नये. कलम १
१.  दरबार आहे. कोणी कांही लिहितो. बाहेरचे लटकें एखादें जोडितो. सबब जे त्याचे रुपये मागितले न दिले. सरकारचे नुकसानाची एखादी रदबदल करून पांच रुपये घेतो आणि काम करून द्या ह्मणतो. न मानिलें तर भलतेंच नाना प्रकार विकल्प घालितात. त्याचा शोध बरा घेऊन खरें लटकें पहात जाणें. कलम १
१. गढे प्रांतीचे मा नि चे आलीकडील पहिले प्रा ताकिदी द्याव्या. कलम १
१  गु॥चे रुपये छत्तीसगडचे आह्मांकडे वसूल नाहींत तें कलम १ 
सिबंदी जाऊन बाकी राहील ते हल्लीं ऐवजीं मास द्यावें. कलम १
---  
१२  

 [५५५]                                                                        श्री.                                                  ३ सप्टेंबर १७४८                                                            

यादी करारनामा बनाम कोनेर पंडित :-

 

[५५४]                                                                        श्री.  
                                                            

561मा अनाम जमीदार परगणें माहीम सुभा प्रांत वसई यांसी :-
बाळाजी बाजीराऊ प्रधान सु इसन्ने अर्बैन अलफ. शंकराजी केशव व धोंडो केशव व बाळाजी केशव व केसो महादेव व महादजी केशव यांचे पुत्र गोत्र अत्री सूत्र आश्वलायन उपनाम फडके पुरातन वतनदार उपाध्ये मौजे कुरघें ता पावस सुभा प्रांत राजापूर हालीं वास्तव्य कसबे पुणें प्रा मजकूर हे वसई प्रांतें हा मुलूख फिरंगियांकडे होता त्यास वसई प्रांतें मुलूक सर करावयास मशारनिलेस मसलतेस रवाना केलें. त्यांणीं ते प्रांतें फौजसुध्दां जाऊन श्रमसाहस बहुत केले. व शंकराजी केशव यांचे बंधू महादाजी केशव कसबे माहीमचे कोटास सन समान सलासीन मया अलफ मध्यें मोर्चे दिल्हे होते तेसमयीं युध्दप्रसंगांत स्वामिकार्यी कामास आले. व शंकराजी केशव याणीं जीवादारभ्य श्रमसाहस करून कितेक कामेंकाजें करून सेवाधर्म संपादिला. याजकरितां मशारनिले यांचे चालवणें आवश्यक जाणून, याजवरी कृपाळू होऊन, नूतन वतन प्रा मजकूर येथील देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण देखील जकायत व बंदरें व देहहायेचें वतन करार करून दिल्हें असे. देहे बितपशिल:-

कित्ता देहे. कित्ता देहे. कित्ता देहे.
१ कसबे माहीम. १ मौजे केळवें. १ मौजे उसरणी
१ मौजे मथाणें. १ मौजे भादवें. १ मौजे चवाळें.
१ मौजे टेंभी. १ मौजे सरवली.  १ मौजे माकणें. 
१ मौजे सफाळें. १ मौजे कांबेरभुरें.  १ मौजे धामणगाव. 
१ मौजे कमारें. १ मौजे कांदरवण.  १ मौजे नवाळी. 
१ मौजे झांजिवली. १ मौजे मांडे.  १ मौजे खारेकुरण. 
१ मौजे कपासें. १ मौजे दासगांव  १ मौजे मतोडें. 
१ मौजे वरखुंटी. १ मौजे टोकराळें  १ मौजे पाली. 
१ मौजे गावनें. १ मौजे अंबडी.  १ मौजे नंदोडे. 
१ मौजे हेबघर. १ मौजे करवाळें.  १ मौजे खटाळी. 
१ मौजे सावरें. १ मौजे मोहाळें.  १ मौजे खोडावें. 
१ मौजे काळहाव. १ मौजे वाघुलसार.  १ मौजे नवघरखुर्द. 
१ मौजे दातिवरें. १ मौजे अकळी.  १ मौजे कोळगांव. 
१ मौजे शिरंटे १ मौजे भुताळें.  १ मौजे मायखोप. 
१ मौजे उंबरवली. १ मौजे येडवण.  १ मौजे कोरें. 
१ मौजे अगरवाडी. १ मौजे डोंगरें  १ मौजे बंधाटे. 
१ मौजे विराथन खुर्द. १ मौजे वाकसई.  १ मौजे दहीसार. 
१ मौजे जलसार.  १ मौजे तिघरें.  १ मौजे नागावें. 
१ मौजे दहीवाले.  १ मौजे माकुणसार.  १ मोजे वेडी. 
१ मौजे तांदूळवाडी.  १ मौजे मुंजुरली.  १ मोजे वीराथन बुद्रुक. 
१ मौजे खडकवली.  १ मौजे वाढीव.  १ मौजे नवघर बुद्रुक. 
१ मौजे दापोली.  १ मौजे पेणंद.  १ मौजे उचकोळी. 
१ मौजे पंचाळें.  १ मौजे कळठण.  १ मोजें उंबरपाडा. 
१ मौजे मोरेकुरण.  १ मौजे शिरगांव.  १ मौजे चापडिवाहदर्यागर्ख. 
१ मौजे कांबळगांव.  १ मौजे विळगी.  १ मौजे शहापूर. 
१ मौजे रोठें.  १ घनसार.  १ मौजे बऱ्हाणपूर. 
१ मौजे पालघर.  १ मौजे मारवली.  १ मौजे महापूर. 
१ मौजे वितूर.  १ मौजे सलवाले दर्यागर्ख.  १ मौजे खरपुसी. 
--------------- --------------- ---------------
२८  २८  २८  

एकूण देहे ८४ चवऱ्यांशीं जिरायत व बागायत व घरपट्टी व ठाण व मोहतर्फा व ताड व माड व भंडारथळ देखील खुमार व कोळी व मच्छीमार व तरीउतार वगैरे व जराईब व पट्टीबाब व कमावीस व जकायती व बंदरजलमार्ग व उभामार्ग व मीठमार्ग व थळभरीत व थळमोड व सिंगसिंगोटी व रेंदे व गादिया देखील कुलबाब कुलकानू सरकारी जमाबंदी होईल त्याजवरी हक्क रयत निसबत बितपशिल करार करून दिल्हा असे :-सरकारी जमाबंदी करार

एकूण कलमें तेवीस सदरहूप्रमाणें सालमजकुरापासून देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी प॥ मजकूर यांस प॥ मजकुरीं करार करून दिल्हीं असेत. तरी तुह्मी देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी यांचा हक्क व लवाजिमे व इनाम गांव व आगरवाडिया व मानपान, ठिळा, विडा देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी प॥ मजकूर यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें चालवीत जाणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रती लेहून घेऊन असल पत्र देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी प॥ मजकूर याजवळ भोगवटियास परतोन देणें. जाणिजे. छ १५ सवाल.

[५५३]                                                                        श्री.                                                               

राजश्री वासुदेव दीक्षित गोसावी यांसी :-
561अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. राजश्री हरबाजी महादेव वानवळे यांचे मारफातीनें कर्ज यादो नाईक तांबोळे यांजकडे आहे, तें घ्यावयास बिला हरकत करता, ह्मणून विदित जालें. त्याजवरून तुह्मांस लिहिलें असे. तरी तांबोळे मजकुरास ताकीद करून ऐवज वसुलात ये ते गोष्ट करावी. छ २९ जिल्काद. हे विनंति. मोर्तब सूद.

श्री म्हाळसाकांत चरणीं तत्पर
खंडोजी सुत मल्हारजी होळकर.

[५५२]                                                                        श्री.                                                               

वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल म्हणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. कृपा करून पत्र देविलें तें सुसमयीं प्रविष्ट होऊन बहुत संतोष जाला. श्रीयात्रेशीं जाणें, साहित्यपत्राविशीं लिहिलें, त्याजवरून पत्रें पाठविलीं आहेत. पावतील. राजश्री दिनानाथजीविशीं लिहिलें. त्यास, आपणहि लिहिलें आणि यांचा अगत्यवाद सर्वांसही आहे. पुढें त्या प्रांतास गेलियावर बोलाविलें आहे. प्रस्तुत आपण समागमें न्यावयाविशीं बोलाविलें, त्यावरून त्यांची रवानगी केली. बळवंतसिंग याचा मजकूर लिहिला. त्यास साकल्य अर्थ पंत म॥ निलेशीं समक्ष बोललों. निवेदन करतील, त्याजवरून ध्यानास येईल. बहुत काय लिहिणें. हे विनंति. मोर्तब सूद.

[५५१]                                                                        श्री.                                                               

वेदमूर्ति राजश्री वासुदेवभट दीक्षित यांचे सेवेसी :-
561अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. मौजे जांबगाडदीचा मोकादमीचा आहे. याजविशीं पूर्वी लिहिलेंच होते. ऐशियासी मौजे मजकुरास कौलपत्र देऊन अबादी करविली आहे. त्यास, कौल करार राहिल्यानें तुमच्याहि कार्याचीच आहे. यास्तव हें पत्र लिहिलें असे. तरी कौलाप्रमाणें रयतीपासून तफरीकबरहुकूम गुदस्ताप्रमाणें वसूल घ्यावा. कौलास अंतर जालिया रत रहाणार नाहीं, हें तुह्मीहि जाणतच आहां. आबादी राहिलिया तुमच्याहि कार्याचीच आहे. आमचा वतीन गाऊ त्याची आबादी राखावी, कौल पाळावा, यांत उत्तम आहे. आह्मांसी स्नेह धरलिया कार्याचा आहे, वाया जाणार नाहीं. गुदस्ताप्रमाणें मौजे मजकूरचा वसूल घेऊन आबादी राहे तें करावें. छ २३ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विनंति. मोर्तबसूद.

श्रीह्माळसाकांत
चरणी तत्पर । खंडोजी
सुत मल्हारजी होळकर.


[५४९]                                                                        श्री.                                                               

वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित यांसी :-
सेवक दत्ताजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान कळलें. आह्मीं आज घांट उतरून आलों. श्रीगंगा टोक्यावर उतरूं. आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. रा छ २१ माहे जिल्हेज. बहुत काय लिहिणें. हे विनंति.



[५५०]                                                                        श्री.                                                               

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
आज्ञाधारक मल्हारजी होळकर कृतानेक दंडवत विज्ञापना येथील कुशल तागाइत आश्विन वद्य नवमी मु॥ पुणे स्वामीच्या आशीर्वादेकरून यथास्थित असो. विशेष. कृपा करून पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन संतोष जाहाला. पत्रार्थ ध्यानास आला. रुपयांविशीं लिहिलें. ऐशास, स्वामीच्या लिहिण्यापूर्वीच बुंधेलखंड प्रांतांतून राजश्री गोविंद बल्लाळ यांजकडून हुंडी आमच्या ऐवजी श्रीची करवून आपणाकडे रवाना करविली. ऐसें असतां, अद्यापि रुपये न पावले. प्रस्तुत राजश्री गोविंद बल्लाळ यांसि पत्र लि॥ आहे. बहुधा मागें ऐवज त्यांनी पाविला असला तरी उत्तमच जालें. नाहीं तरी, हाली पत्र पाठविलें आहे तें त्यांसी पावावें. रुपये पावते करतील. येणेप्रमाणें ऐवज तुह्माकडे मशारनिलेच्या मारफातीनें पाठविला रुपये :-

१७२३५   कर्ज देविले ते.
  ५०००   घाट बांधावयासी.
-------------
२२२३५

बावीसहजार दोनशे पसतीस पाठविले आहेत. मशारनिले पावते करतील. आपल्या लिहिल्यापूर्वीच अगोदर रुपयांची रवानगी स्वत:कडे केली आहे ते घेऊन उत्तर पाठविलें पाहिजे. सेवेसी विदित होय. हे विज्ञापना. मोर्तबसूद.



[५४७]                                                                        श्री.                                                               

स्वामीचे सेवेसी विज्ञापना. पुण्याच्याचें वर्तमान येथें विशकळित ऐकतों. येथें बहुतशी गडबड जहाली आहे. त्यास, स्वामीचे येथें तथ्य वर्तमान आलें असेल तर या पत्रामागें लेहून पाठवणें. यानंतर चिरंजीव स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जाले ते सोमवारी दीड प्रहरा रात्रीस फडणिसापाशी पावले. कळावे, बहुत काय लिहिणें, कृपा केली पाहिजे.


[५४८]                                                                        श्री.                                                               

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक जयाजी शिंदे कृतानेक साष्टांग विज्ञापना येथील कुशल स्वामींच्या आशीर्वादें ता छ १४ रबिलावेल जाणोन स्वकीय कुशल लेखनाज्ञा करीत असिलें पाहिजे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. तेथे जगसिंग खंगारोत कंबेवाला प्रांत जैनगर येथें इंमेवाल्यांच्या मोहरांचा मजकूर लिहिला, त्यावरून त्याशी पुरशिस केली. त्यांणीही पत्र आपणाकडील मनुष्याबरोबरी देऊन पाठविलें असें. त्यावरून साराच मजकूर स्वामीस विदित होईल. कळावे यास्तव सेवेसी लिहिलें आहे. जगतसिंग कंबेवाला ह्मणतो कीं, आपल्यास मोहरांचा कजिया ठावकाच नाहीं. ऐसें बोलला. विदित जालें पाहिजे. विशेष काय लिहिणें. लोभ असो दिल्हा पाहिजे. हे विनंति.

[५४६]                                                                        श्री.                                                               

चरणरज बापूजी महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ऐशीजे :-
माघ वद्य चतुर्दशीनंतर वर्तमान-अविंधाचे सैन्यांतील गोविंद नाईक व दयानाथ वकील जाटाचा व प्रतापनारायण यांस राजे यानें बलाविलें होतें. ते पहिलें दिवशी त्रयोदशीस गेले. मामलतीची बोली होती. राजा ह्मणतो कीं, गनीम येतील, मुलूख लुटतील, याचा जाब कोण करितो ? नवाब निघोन गेलियावरी म्या कोण्हास काय पुसावें ? इकडे गाजीपूरवाला पार चनाडीजवळ उतरून गेला. नवाबाच्या आज्ञेनें पुढें थोडी थोडी फौज उतरीतच आहे. आपण खासा जाणार नाहीं असे दिसतें. आणि मुलूख तरी लुटितेत. सैन्यांत चणे अठ्ठावीस शेर, गहूं पंचवीस शेर जबस सहा पासऱ्या. रुदोळीपासून शिखंडीपावेतों धान्य राजेयाचें व जमीनदारांचे बहुत आहे. पेवें काढून खुशाल खातात. आठ चार दिवस नवाबाचा मुक्काम येथेंच आहे. निजामनमुलुकाचा नातू व हरिभक्त या प्रांतास येणार ऐशी त्यासही वार्ता आहे. ऐसे वर्तमान तिसरा प्रहरपावेतों आहे. पुढें होईल तें लेहूं. विशेष. राजश्री बाबानीं दोनी पानदानें रुप्याची विकत घेतली. चांगली आहेत. बाबास आह्मीं विनंति केली आहे कीं, एक पानदान राजश्री दादा यांस पाठवणें. त्यांनी उत्तर दिल्हें कीं, पाठवा. रुपयांचे भारोभार घेतलें. चांगलें तऱ्हेदार आहे. वासुदेव भट खरा दशमीस येणार आहे. त्याजबराबरी पाठवून देऊं. कळलें पाहिजे. स्वामीनीं लिहिलें कीं, दोन परवाने, एक मीर बहीरास कोचकाचा व एक दस्तक नवाबाचे मार्गाचे मथुरापर्यंत, करून पाठवणें. त्यास, मी सैन्यांत नरशिंगरायाकडे जात होतों तों गोविंद नाईक सैन्यांत त्रयोदशीस जाऊं लागले. मी त्यांस वर्तमान सांगितलें. त्यास, त्यांनी बोलिले कीं, तुह्मी कशास येता, एक माणूस बरोबर देणें, दोनी परवाने घेऊन येतों. परवाने आलियावरी सेवेसी पाठवून देतों. विशेष. माघवद्य अमावस्या बुधवारीचें वर्तमान : राजे यांची मामलत नवाबाचें एकंदर चित्तास येत नाहीं. चनाडीजवळ सिंधोरा तेथून चार नावा येत होत्या. त्यावरी दहा मेले होते ते राजेयांचे लोकांनी गोळयांनी जिवेंच मारिलें, नावां घेतल्या. ते मुडदे नवाबाच्या देवडीवरी आणिले. तेसमयीं क्रोधें आवेश आला. परंतु उगाच राहिला. सहा सात हजार फौज निवडक चनाडीकडे पार उतरली. आणखीही वरचेवरी रात्रंदिवस उतरत आहे. राजेयासी नवाब एकंदर ठेवीत नाहीं, हा निश्चय सर्वांस कळला. पुढें काय होईल तें पहावें. गंगापुरची गढी पाडावयासी पांचसहाशें बेलदार लाविलें आहेत. पाडून खंदक बुजितात. ऐसें वर्तमान हा कालपर्यंत आहे. विशेष. दुर्गाघाटीचें काम, वरिले शिडी पहिलीच तेथपावेतों, फरश जाहाला आहे. दोन दिवस नवाबाचे सैन्याकरितां काम राहिलें. चुनाही नव्हता. आता चुना आणिला. बीजेपासून काम पुढें चालीस लावितों. आतां सत्वरीच तयारीस येईल. कळलें पाहिजे. नवाब राजेयाचे लोक जेथें जेथें लगले आहेत त्यांचा परामृष करील ऐसें दिसतें. पहिलवानशिंग, व सुंदरशा, व थोरला अला बिरदीखान यांची पत्रें राजास आली कीं, आह्मी तुझे सोबती नाहीं, आमच्या मुलकांत एकंदर तुह्मी न येणें, याल तरी लुटले जाल. राजा लतीफपुरी बाराशें स्वारानशीं आहे. याची फौज उतरत आहे. हा पुढें जाईल. जें होईल तें वरिचेवरी लेहून पाठवून देऊं. अलाकुलीखान व राजेंद्रगिरी चोचक पार गेले. नावा पाच सहा आहेत त्याजवरी जातात. कळले पाहिजें. आज माघ शुध्द १ गुरुवारीं वर्तमान : नवाबानें गोविंद नाईक यांसी राजेयाकडे पाठविलें. होईल तें लिहूं. गंगापूर पाडिलें नाहीं. भाईरामपंतांनीं सर्व कागदपत्र पाठविलें ह्मणून सांगितलें. स्वामीस पावलेच असतील. काचरिया पक्का 261 1 पाठविल्या घेणें. श्रृत जालें पाहिजे. हे विनंति.

[५४४]                                                                    श्रीशंकर.                                                               

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक दयानाथ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता माघ शुध्द ७ सप्तमी सिरोंज जाणून स्वकीय कुशल लिहीत लेखकास आज्ञा करीत गेलें पाहिजे. विशेष. आह्मांस ठाकूर सूरजमल्लजी याणीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामी याजकडे पा असे. इ. इ.इ.

[५४५]                                                                     श्री.                                                                

विनंति. राजा कोतवाल याची अवकृपा आहे. भेटीस चार मास जात नाहीं. जाती फिरली आहे. कांही बाकी राहिली नाहीं. पुरती फजिती आहे ते लिहितां येत नाहीं. कळलें पाहिजे. कऱ्हाडे मराठयांचा द्वेष बहुत जाला. याचा परिणाम भगवान कसा लावील तें न कळें. सर्वा लोकांनी बदनाम केलें. चलनामुळें जालें. नारायणभट पटवर्धन शेजारी केशव दीक्षितांचा पुत्र याणें सोमपूर्वक आधान केलें. तेथें कोणी गेलें नाहीं. दोन चितपावन गेलें. तसेच रामचंद्र दीक्षित टकले यांणी सोमपूर्वक आधान घेतलें. त्रिलोचनी तेथेंही जातात. कलह लागला, हे तेथें ब्रह्मत्व आहे. निमित्त जात नाहीं. श्रावण शु॥ १० चे दिवशी यज्ञप्रारंभ आहे. घरी ब्राह्मणभोजन कांही चालतें. कळले पाहिजे. हे विनंति.