Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५०४] श्री. १४ फेब्रुवारी १७६०.
श्रियासह चिरंजीव राजश्री गोविंद दीक्षित यांप्रती वासुदेव दीक्षित अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता माघ वद्य १३ गुरुवार प्रात:काळ चार घटका दिवस मुक्काम अमदानगर क्षेम असो. विशेष. मोंगलांचा व यांचा सला जाहला. पंचेचाळीस लक्षांची जहागीर, व दोन शहरें व अशेर व दौलताबाद ऐसे किल्ले दोन, बऱ्हाणपूर व औरंगाबाद ऐशीं शहरें, येणेंप्रमाणें ठहराव होऊन सनदा येथें आल्या. आज रात्रौ रा गोपाळराऊ गोविंद फौजेनिशीं दौलताबादेस स्वार होऊन येतील. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.*
[५०५] श्रीरामजी. ६ जुलै १७६०.
पो श्रावण शुध्द १ सोमवार.
विद्यार्थी तुको कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार वद्य १२ पावेतों सुखरूप असो. खासा स्वारी कर्नाटकास भाद्रपदमासीं जाणार हे वार्ता आहे. हिंदुस्थानाकडील पहिलें वर्तमान होतें कीं : जाटाची खंडणी होते; सांप्रत नजीबखान याजपासून निघोन गेला. जाटही बांधले. हें वर्तमान आहे. पुढें पहावें काय होईल. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ करावा. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५०३] श्री. ६ फेब्रुवारी १७६०.
पो माघ वद्य ६ गुरुवार
प्रात:काळ (शके १६८१)
सहस्रायु चिरंजीव विजयीभव रा गोविंद दीक्षित यांप्रती वासुदेव दीक्षित आशीर्वाद उपरि येथील कुशल ता माघ वद्य ५ जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. भौमवारीं दोनप्रहरा रात्रीं सांडणीस्वार दोघे श्रीमंत भाऊच्या लष्करांतून आले. त्यामध्यें वर्तमान आलें कीं रविवारीं मोंगलाशीं लढाई जाली. पिछाडीस तोंड लावलें. चार हजार फौज मोंगलाची लुटून घेतली. सूर्याराव मोगलाकडील कामास आला व हत्ती दहा बारा मोंगलाचे घेतले. एक मोगल जखमी, एक धरला आला आहे. चार हजार फौज मोगलाची बुडाली. आतां आणीक वर्तमान तपशीलवार येईल तें लिहून पाठवूं व यांनीं आराबा पिऊन गेले. श्रीमंत राजश्री दादाचे चिलखतावर तीर लागला; थोडासा. व विश्वासरावांनींही तिरंदाजी बहुत उत्तम केली. त्रिवर्ग हत्तीवर स्वार होते. पत्र वाचून सत्वर साताऱ्यास पाठवावें व तोफांचे बैल धरून यांनीं सोडून आणिले व निजामअल्लीखाच्या जवळ जाऊन पोहोंचले. त्याची यांची नजरानजर जाली. महातांनीं ह्मटलें कीं, आज्ञा कराल तर हत्ती नेऊन निजामअल्लीच्या हत्तीशीं भिडवितों. परंतु यांनींच क्षमा केली. युध्द तलवार व तीराचें जालें. तोफखाना कांहीं सुटला नाहीं. मातबर युध्द तलवारेचेंच झालें. युध्द मोठें जाले. यांचा जय बहुत प्रकारें जाला, तो सविस्तर लिहूं. बहुत काय लिहिणें, हे आशीर्वाद.*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५०२] श्री. २० जानेवारी १७६०.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री राघो बापूजी गोसावी यांसी :-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु सितैन मया व अलफ. मौजे माळविहिरें, पा पैठण येथील मोंगलाई अमलाची जप्ती वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित याजकडे सांगितली आहे. तरी तुह्मीं मौजे मजकूर दखलगिरी न करणें. जाणिजे. छ १ जमादिलाखर. आज्ञा प्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५०१] श्री. १ सप्टेंबर १७५९.
पो भाद्रपद वद्य ११
शके १६८१.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. श्रीकाशींमध्यें ब्राह्मणांचीं वर्षासनें आहेत तीं पावलीं नाहींत ह्मणोन बोभाट आला आहे. ऐशास, वर्षासनाचा ऐवज राजश्री गोविंद बल्लाळ यांजकडून पावला नाहीं ह्मणोन न पावलीं, किंवा त्यांकडून ऐवज पावोन तुह्मांकडोन न पावलीं, कीं अंबष्टांचा व वरकड ब्राह्मणांचा कजिया आहे यामुळें न पावलीं, हें सविस्तर कळावें लागतें. तरी लेहून पाठवावें. कदाचित् त्यांच्या कजियामुळें अडथळा केला असिला तरी धर्माचा विषय आहे त्यास अडथळा न करावा; वर्षासनें द्यावीं; ऐसें तुह्मीं वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित यांस लेहून पाठवून सत्वर उत्तर आणवावें. जाणिजे. छ ८ मोहरम. बहुत काय लिहिणें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५००] श्री. १४ जुलै १७५९.
पो॥ आषाढ वद्य १४ शनवार
शके १६८१ प्रमाथी नाम संवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. पूर्वीं परभू यांणीं आपणांस गोत्रें लावावीं येविशीं पत्रें काशीस पाठविलीं होतीं. त्यास तीं पत्रें कैलासवासी दीक्षितबावा यांचे हातास आली होतीं ह्मणोन ऐकिलें होतें. त्यावरून आपणास तेथून ती पत्रें आणवावीं ह्मणोन सांगितलें होतें. आपण श्रीस पत्रें लेहून तीं पत्रें आणवितों ह्मणोन सांगितलें. त्यास, श्रीचे पत्राचें उत्तरहि आलें असेल. पत्रें आलीं असलीं तरी तींच पत्रें पाठवावीं अथवा पत्रें दीक्षितबावाजवळ आलीं नसलीं तरी उत्तर काय आलें असेल तें लिहावें. त्यासारिखें येथें परभांजवळ पत्राचा शोध केला जाईल. पत्रें परभांजवळ न रहावीं याकरितां शोध करून आणावीं लागतात. रा आषाढ वद्य पंचमी. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९९] श्री. १२ एप्रिल १७५९.
पो॥ चैत्र शुध्द ७ शुक्रवार
शके १६८१ प्रमाथीनाम.
तीर्थरूप राजश्री दादा स्वामी वडिलाचे सेवेसी :-
अपत्ये बालकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता चैत्र वद्य ६ सोमवार जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. यानंतर वडिलीं हिशेब व पत्र पूर्वीं पाठविलें व वे॥ नारायणभट थत्ते यांजबराबरी पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळूं आलें. यात्रा यंदा हुताशनीकारणें प्रयागीहून श्रीस आली. यात्रेकरी यांसी येवर्षीं प्रयागवळ यानीं हकीमाशीं मिळून बहुत दु:ख दिलें. स्वारीस रुपये पन्नास घेतले. येथें गंगापुत्र काय घेतील हें पहावें. पुढें गया होणेंच आहे. याउपरि यात्रेकरियांत मातबर ह्मणायापैकीं रा पंतसचिव यांची स्त्री भवानीबाई व ग्वालेरीचे सुभेदार रा गोविंद शामराज यांचे भाऊ रा रामचंद्र शामराज व रा दादो मल्हार वाघोलीकर कुलकर्णी ऐसे आले आहेत. आणखी यात्रा पांच सात हजार आहे. कंगालहि बहुत आहे. दशाश्वमेधी छत्रांत पांचशें पात्र होत आहे. पहिले तीन शतें होत हालीं पांच शतें होतें. अद्याप गया जाहाली नाहीं. अडथळयामुळें फार करून येत नाहींत. आणखी कांहीं अधिक होतीलच. कळलें पाहिजे. दिल्लींत शिंदे व अंताजी माणकेश्वर यांची फौज आहे. ज्या स्थळीं भांडत होते तेथील मामलत जाहाली. हें सर्व वर्तमान परपस्परें तिकडे आलेंच असेल. येथील अधिकारी आपले स्थळीं आहे. सार्वभौमाचा पुत्र इंद्रप्रस्थीहून निघोन अयोध्येवाले याचे घरास गेला. तेथें सन्मान होऊन बिदा जाहाली, ते श्रीवरून पूर्वेस पट्टण्यासमीप गेला आहे. अद्याप स्तब्धच आहे. पुढें जो विचार होऊन येईल तदनरूप लेहून पाठवूं. कळलें पाहिजे. विशेष. रा गोपाळराव बर्वे यांचे बंधू रा कृष्णराव यांची स्त्री शांत जाहाली. त्यास काशींत वैजनाथ व्यास याची कन्या दिल्ही. काशींत धारण :- तांदूळ पंधरा शेरापासून पंचवीस शेर आहेत. तूप दर रु २॥। प्रमाणें आहे. गहूं नवे रु पासऱ्या व चणे सात पासऱ्या व जव सवा मण प्रमाणें आहे. तेल रु आठ शेर प्रा आहे. इंद्रप्रस्थाहून हरिभक्त व वजीर ऐसे येतील, हें आजच वर्तमान बोलतेत. कळावें. ह्या प्रांतीं धूमधाम होईल असें दिसतें. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९८] श्री. १२ आक्टोबर १७५७.
पो आश्विन शुध्द १ गुरुवार
शके १६७९.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी विश्वासराव बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. रा. बळवंतराव गणपत यांस गतवर्षी फौजसुध्दां कर्नाटकप्रांतीं छावणीस ठेविले आहेत. त्यास, कडप्याचे पठाण याजकडे खंडणीच्या बोलीचालीस मातबर माणूस पाठविला असतां लाख रुपयाशिवाय जाजती कबूल न करी. तेव्हां कडप्यास मोर्चे दिल्हे. खासा पठाण सुधोटास होता तेथून धावून आला. ती कोसांवर जुंझ फारच जालें. खासा पठाण ठार जाला, व दोन तीनशे पठाण कामास आले. कडप्याचें ठाणें घेतलें. हें संतोषाचें वर्तमान आपल्यास कळावें, यास्तव लिहिलें असे. रा छ २७ मोहरम. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९७] श्री. २४ सप्टेंबर १७५७.
पौ अधिक वद्य ४
शनवार शके १६७९.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. यानंतर राजश्री बगाजी यादव पुत्राचे दु:खामुळें फार यागी जाहाले असत. तरी तुह्मी त्याचें समाधान हरप्रकारें करून यागीपणा त्याचा दूर होऊन, ते येथें येत ते गोष्ट करावी. पहिले या मजकुराचें पत्र व मशारनिलेचें पत्र पाठविलें त्याचें उत्तरही आलें नाहीं. तर जरूर एक वेळ बगाजीपंतास येथवर येत तें हर तजविजेनें करावें. छ. ९ मोहरम. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९६] श्री. २२ सप्टेंबर १७५७.
सेवेसी विनंति. येथील वर्तमान तर : शिराळियाचा घाट चढलियावर श्रीमंतांचें पत्र नवाबास व मजला आलें कीं, नवाबाचा व आमचा स्नेह ऐसें असतां आह्मांस इतल्ला न देतां शहरास यावें उचित नाहीं, त्यांचे साहित्यास सावनुरावरी चुकलो नाहीं, पुढें स्नेह रक्षतील तर चुकणार नाहीं, नवाबानी शहरास न यावें, आह्मी लिहूं तेव्हां यावें, अशाहिमध्यें उतावळी करून येतील तर स्नेह राहणार नाहीं, परिच्छिन्न समजावें, तुह्मीहि याप्रमाणें परिच्छिन्न सांगणें. ह्मणून लिहिलें. त्यास, नवाबास पत्रें पावतीं करून श्रीमंतांचे आज्ञेप्रमाणें जाबसाल केला. त्यास नवाबानीं उत्तर केलें कीं :- आह्मांस या दिवसांत यावयाची दरकार नव्हती, परंतु श्रीमंतास पूर्वी सविस्तर लिहिलेच होतें; नवाब सलाबतजंग व बसालतजंग यांची पत्रें दररोज येत चाललीं; त्यावरून इभराइमखान गाडदी यास तीन हजार गाडदी, हजार स्वार, बारा तोफा, लाख रुपये दरमहाचे चाकर ठेवून व आपली फौज बरतर्फ केली होती ते सही करून, पांच हजार फौज, पांच हजार गाडदी, वगैरे वरकंदाज, तीस चाळीस तोफा घेऊन, चौ लाखाचे पेचांत येऊन, येथवर आलों; आतां पुढें न यावें तर लौकिक रहात नाहीं; आह्मी आलिया श्रीमंतांशी दुसरा अर्थ आपला नाहीं; ह्या गोष्टींत स्नेहाभिवृध्दी होईल. तें केलें जाईल. ऐसे कितेकप्रकारें बोलिले. तेणेप्रमाणें श्रीमंतांस लिहोन पाठविलें. व नवाबाचेंही उत्तर घेऊन पाठविलें. त्याउपर श्रीमंत राजश्री विश्वासरावजीची आज्ञापत्रें आलीं. त्यावरून कितेक विनंति केली कीं, श्रीमंतांची खिलाफ मर्जी करून नवाब खमखा शहरास जातील तर गोष्ट दुराग्रहांत पडेल. त्यावरून विचारांत पडले आहेत. नवाब सलाबतजंग यांची तो पत्रें येतच आहेत. त्यास, शनै: शनै: जाफराबादपावेतों जाणार. तेथें जो विचार करणें तो करतील. ठहराव जालियावर सेवेसी लिहिले जाईल. हालीं शहरीहून पत्रें नवाबाकडे, श्रीमंतांचा नवाब सलाबतजंग यांचा दारमदार ठहरला, शहानवाजखानास दौलताबाद अंतूर दोनहि किल्ले व पांच लाखांची जहागीर दिल्ही, श्रीमंतांही जागीर वीस लाखांची दिल्ही, कज्जा वारला, ह्मणून आली आहेत. याउपर पहावें, काय विचार करतील. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९५] श्री. २२ सप्टेंबर १७५७.
पौ अधिक आश्विन शुध्द ११ शनवार,
शके १६७९, दोन प्रहर दिवस.
वेदशास्त्रसंपन्न श्रीमंत राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी शामजी गोविंद सा नमस्कार विनंति येथील कुशल ता छ ९ मोहरम मु उत्तरापेठ पा अंबडापूर दर लष्कर नवाब निजामुद्दौला बहादूर स्वामीचे आशीर्वादे यथास्थित जाणून स्वकीय लेखनाज्ञा करीत असिलें पाहिजे. यानंतर, कृपा करून पत्र आश्विन शुध्द ५ रविवारचें पाठविलें तें काली मुक्काम मजकुरी पावलें. सविस्तर कळों आलें. नवाब शहरास येतात. त्यास नवाबाची प्रकृत उग्र. महाराष्ट्राकडील स्थळांस उपद्रव मागाहून करीत आले आहेत ह्मणून ऐकतों. येथें आलियावर मुक्काम सातारियावर जाला, तर गांव लोकांस शिवारास उपसर्ग लागेल. तर याचा उपाय आजीपासून करणें. इदग्याकडेहि उतरावयास स्थळ आहे ह्मणून लिहिले. ऐशियास, नवाबाची प्रकृत ह्मणावी तर केवळ उग्र नाहीं, समंजस आहे. मागाहून येथवर आले. त्यास महाराष्ट्राचेंच स्थळ जाणून उपसर्ग देत आले ऐसें नाहीं. जेथें काही दोष असतो तेथेंच उपद्रव, यावनी सैन्य पत्रधारी आदिकरून अनिवार आहे त्यामुळें, सहजच होतो; परंतु हा विचार येथवरच जाला. याउपर येथून पुढें बंदोबस्तानेंच येतील. शहरास आलियावर सातारियास उपसर्ग, स्वामीचा सेवक याचे समागमें निरंतर असतां, कसा लागेल ? येविशीं सूचनाहि काय दरकार ? शहरानजीक आलियावर उतरावयाचा निश्चय दरसुलाकडे अथवा इदग्याकडे करून घेऊं. चिंता न करावी. श्रीमंतांशी यांशी विरुध्दाचा विचार नाहीं. सलाबतजंग याशी व श्रीमंतांशी दारमदारहि, राजाजी श्रीमंतांकडून आले होते त्यांणी केला, ह्मणून येथें वर्तमान नवाबास आलें. त्यावरून बहुत संतोषी जाले. कदाचित् जाला नसता तरी याचे चित्तांत आपले विद्यमानें सलूखच करावयाचा आहे. हरप्रकारें श्रीमंतांची मर्जी रक्षावी हेंच याचें मानस दिसतें. बहुत काय लिहिणें हे विनंति.