Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[४२०]                                                                       श्री.                                                                  २१ जानेवारी १७५३.

पो पोष्य वद्य १० शके १६७४.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेवी दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी विश्वनाथराऊ बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावले. प॥ जमाबंद वगैरे दोन माहाल यांजकडे मोगलाई अमलाची रसद येणें. त्यांपैकीं हुंडी व हरसोल सातारे नि॥ भिकाजी कृष्ण यांजकडे पौष शुध्द प्रतिपदेचा हप्ता येणें. त्याची हुंडी दत्ताजी नाईक कान्हेरे यांजवर पाठविली ती पावली. त्याप्रमाणें ऐवज सरकारांत घेऊन कमावीसदारांचे नावें सरकारचे जाब आलाहिदा पाठविले आहेत, त्याजवरून कळेल. र॥ छ १५ रबिलावल सु॥ सलास खमसैन मया व अलफ प॥ हरसूल सातारे नि॥ भिकाजी कृष्ण यांजकडे माघ शुध्द प्रतिपदेचा हप्ता रुपये ७९६ सातशें शाहाण्णव येणें ते पाठवून द्यावे. र॥ छ मजकूर. बहुत काय लिहिणें हे विनंति.

[४१९]                                                                       श्री.                                                                  १७५२.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेवी दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि. खान मुरादखानाजवळ बोलिले की, फिरंगी आदिकरून बहुतकरून आह्मांस अनुकूल आहेत.आपली अनुज्ञा जाली ह्मणजे सर्व गोष्टी आमच्या पूर्ववत्प्रमाणें होऊन येतात. त्यास हा मजकूर मुरादखान जीवनरायाजवळ बोलिले. त्यांनी विदित केला. व आणखी बोलिले कीं, खानाजवळ आपला इतबार होत नाहीं. सेवेसीही राहावें याअन्वयें कितेक कारणें आहेत. त्यास भेटीस येतों ह्मटलें. परंतु फिरंगी आदिकरून कितेक खानाकडे ममतेंत आले कैसे व नवाबाचें येणें अवरंगाबादेस होत नाहीं, तेव्हां खान एकाएकी उठोन नवाबाकडे जाणार नाहींत, ऐसे कितीक प्रकारें आमचेही चित्तांत संशय वाटले. यास्तव गोष्टीचा शोध करून लिहिणें ह्मणोन तुह्मास लेहून पाठविलें, परंतु इतक्या गोष्टी प्रमाण ऐसें खान बोलले. इतका इतबार खानाचा मुरादखानाचे ठायी काय ह्मणोन ? ऐशियास आह्मास सर्व लबाडी भासली. त्यास आपण खानास पुसोन लिहून पाठविणें. सर्वही खानास अनुकूल होऊन खानाचे मनोभीष्ट सिध्दीस जात असेल तर आह्मास संतोष आहे. ++++ खानास सूचना करणें. त्यास न पाठवि+++++ इतबारी लवकरच पाठवीत आहोत. त्याजबरोबर कितेक सांगोन पाठवायाचें तें पाठवूं. सर्व शोध करून लेहून पाठवणें. बहुत काय लिहिणे हे विनंति.

[४१७]                                                                       श्री.                                                                  

विनंति. दिल्ली दोन दिवस पाऊस पडला. एक दिवस गारा अधशेराची (एक) प्रमाणें पडला. तेणेंकरून नावेवरी माणसें होती ती कुली मेली व जनावरें मेली. पाणी काशीत गंगेस उराइतकें आले. आश्चर्य जालें. कोइलेकडे नानकपंथी शिष्य उठला. त्याणें दिल्लीवर चाल केली आहे. त्याजपाशी फौज मोठी आहे. काशीत सुभयता जाली. रोकडी आहे. पुढें पहावें. राजश्री कृष्णाजी नाईक याचा लेक नारोबा नाईक तिकडे येणार. त्याजबरोबरी वर्षासनाचा हिशेब व कबजा पाठवितों. सरकारांत आमचे रुपये बाराशें निघतील. परभूंनीं प्रायश्चित्तें घेतली, त्याचे रुपये राजश्री बाबा आले ह्मणजे देऊन कबजे पाठवितों,. रामकृष्ण दीक्षित गोडसे यांची कबुली पाठविली. घेणें. हे विनंति.



[४१८]                                                                       श्री.                                                                  

विनंति उपरि. वसडांतून शिवभट साठे व रघूजी भोसले व कृष्णभट पाटणेकर यांची पत्रें आली आहेत. विशेष कांही नाहीं. बांदे घेतले. पुढें माहोराकडे गेले ह्मणोन लिहिलें आहे. ऐवज कांही थोडा बहुत हातास यावयाचा आहे. ह्मणून कृष्णभटांनीं लिहिलें आहे. कळलें पाहिजे. हे विनंति.

[४१६]                                                                       श्री.                                                                   १७५२.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणोन स्वकीयें लिहीत असिले पाहिजे. विशेष. आशीर्वादपत्र श्रावण शुध्द १४ पाठविलें तें श्रावण बहुल तृतीयेस पावलें. अबदुलरजाखान याचे पुत्रास दरगाकूलीखांनी यांणी आपले घरी बोलाऊन गोष्टमात आह्मांसमक्ष केली. दरगाकूलीखांनी आपणांस लिहिलें आहे त्याजवरून कळेल, ह्मणोन लि॥ तें कळलें. दरगाकूलीखां एकवचनी, प्रमाणीक आहेत. जें बोलतील त्याप्रों करितील. तदनुरूपच रफीक अबदुलरजाखानाचे पुत्रास केलें. उत्तम आहे. त्याचे पत्राचें उत्तर पाठविलें असे. तें त्यास देणें. फेरोजंग नर्मदातीरांस आलें ह्मणोन लिहिलें तें कळावें. अबदुलरजाखानाचें पुत्राची अर्जी फेरोजंगास पाठवून देणें. त्याजकडे पाठवून सलाबतजंगांनी थोरले नवाबाच्या बाईकांस भागानगरास बोलाविलें तिकडे जातील. पकारनामक व सकारनामक तेथे येतात. ते गोष्टी सलाबतजंगाचे पक्षाच्या सांगतील तर त्या मान्य न कराव्या. राजश्री मल्हारबांनी जो पक्ष धरिला तोच आपण बळवावा. आह्मांसही त्याजकडे पत्रें पाठवावी लागतील, तसें आमच्याविशी त्यास लेहून पत्र येथें पाठवावे ह्मणोन लिहिलें तें कळलें. आह्मी जो पक्ष धरिला तोच धरिला, त्यास अन्यथा करीत नाहीं. सकारनामक व नकारनामक मोह घालतील. तो कबूल करीत नाहीं. सरदारांनी आमच्या लिहिल्यावरून फेरोजंगास आणिलें तेंच सिध्दीस नेणें उचित जाणतों. आपलेविशी सरदारांस पत्र पाठविले असे. बहुत काय लिहिणें. हे विनंति.



[४१५]                                                                       श्री.                                                        १८ डिसेंबर १७५२.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी कृष्णाजी रघुनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल मार्गेश्वर वदि १२ मुक्काम लष्कर श्रीमंत, नजीक यादगिरी, जाणोन स्वामीनीं आपले कुशल लेखन निरोपीत असावें. यानंतर येथील वर्तमान तर :- नवाब सलाबतजंग याचा करार कीं, उभयतां मिळोन कर्नाटक प्रांतांत जावें ऐसा होता. हालीं मोगल कलबुर्गियास आहेत. शिपायांचा दंगा फार. लोकांचाही फितूर आहे. सर्वांचे मतें फिरंगी नसावे. मोठा राडा पडला आहे. मोगल तो येतां दिसत नाहीं; परंतु श्रीमंतांचा आग्रह कीं, दोन महिने स्वारी कर्नाटकप्रांतांत करावी, थोडाबहुत ऐवज शह देऊन घ्यावा आणि पुणियास यावें. यावर काय होईल तें न कळे. आमचें वर्तमान तर चंदावरास रवाना केलें. आजच स्वार होऊन जातों. पुढें जें होईल तें सेवेसी लिहितों. बहुत काय लिहिणें. हे विज्ञप्ति.



[४१४]                                                                       श्री.                                                        १७ डिसेंबर १७५२.

पै॥ मार्गशीर्ष व॥ १० शनवार
शके १६७४ अंगिरानामसंवत्सरे.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी रघुनाथ बाजीराव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त॥ छ ९ सफर पावेतों स्वामीचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष आह्मी बालाघाट उतरून खालीं एक फरदापूरचे घाटांनी अमदाबादेस जाणार. त्यास औरंगाबादच्या सामारें चार पांच कोस आल्यावर आपण यावें व लाख दोन लाख त॥ ऐवज असावा. तरी आपण कर्ज मिळऊन तरतूद करून ठेवावी. व्याज भारी न पडे. हलके व्याजानें ऐवज तरतूद करून अगत्यरूप ठेविली पाहिजे. ते आपल्यावर व्याज पाहून ऐवज सरकारांत घेतला जाईल. तूर्त जसे मिळाले तसे पाहून ठेवावे. आह्मी आपलेपाशीं लवकरच येतों. तरतूद मात्र जरूर जरूर करून ठेवावी. येथे रोजमऱ्यासदेखील ऐवज नाहीं. मुलूख आपला सुटेल. हजारों पंच पडतात. अमदाबादेस गेलियावरी ऐवज मोबदला करून, तूर्त तरतूद करून ठेवावी. हे विनंति. किरकोळ जिन्नस खरेदी करावयास वगैरे कितेक कामास लेंबेकर धुराज पाठविले आहेत. तरी यांस दहा हजार रुपये तूर्त द्यावे. ज्या मितीस पावतील त्या मित्तीस देखत देऊं. यावेळेस रुपये जरूर पाहिजेत. जरूर जरूर जाणून लिहिलें आहे. छ १० सफर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.



[४१३]                                                                       श्री.                                                        ३० डिसेंबर १७५२.

श्रीसर्वउपमायोग्यवेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक मुकुंदराव विश्वनाथ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम त॥ मार्गेश्वर वद्य दशमीपावेतों सुखरूप व आपले शुभचिंतनांत आहोंत. विशेष. एक संवत्सर जाला,आपण सैन्यांत आहां व आपण कधींही पत्रद्वारें परामर्ष न केला. हें आपणांस उचित नव्हे. श्रावणमासीं भागानगरीं माधोराव सैहदलष्करखांचे समागमें येऊन भेटले होते. त्यांच्या सांगितल्यावरून कळूं आलें कीं, दीक्षितस्वामी तुमचें स्मरण करीत होते व कितीएक कृपावचनें बोलिले. हे ऐकून चित्तास बहुत समाधान जालें कीं, बाह्यात्कारें स्मरण करीत नाहीं; परंतु अंतस्थें चित्तापासून दया आहे. ऐशीच सदैव कृपा असूं देणें. विशेष. कार्तिकमासीं राजश्री प्रधानपंताची भेटी जाली. कितीएक कार्यांस नवाबाचे सैन्यांत जाणें अगत्य आहे. परंतु श्रीमंतांहीं बहुत कृपा करून आज्ञा केली कीं, इतकें त्वरेनें जायाचें काय कार्य आहे, येथेंच असा. यास्तव एक मासपर्यंत येथें राहून, यांची मर्जी रक्षून आज्ञा घेतली. नवाबास आमचेविषयीं बहुत सांगितलें. ईश्वरइच्छेनें सत्वरच अनुभवास येईल. जागिरीची जफ्ती उठवायाविषयीं पत्रें दिधलीं. जफ्तीमध्यें कितेक पैका गेला हे सविस्तर लिहून आणवा, आह्मीं आपल्यापासून देऊं. ऐसें प्रधानपंत बोलिले. वस्त्रें दिधलीं. इ० इ० इ०. हे विनंति.

[४१२]                                                                       श्री.                                                          डिसेंबर १७५२.

पत्र बनाम श्रीमंत रघूजी भोसले :-
आशीर्वाद उपरि. आपण सुभे वऱ्हाडांत जफ्ती केली व खंडण्या मुकरर करीत आहांत. त्यास सुभे वऱ्हाडांत जागीर, कसबे माहोली व मौजे कापशी व मौजे ब्राह्मणवाडा परगणें दयापूर, व मौजे बोलाड परगणे मलकापूर ऐसे चार गांव श्रीमंतराव केशवरावजी हरकारे पातशाही यांची आहे. दिल्लीत पातशहाजवळ असतात. पुत्र त्यांचे राजश्री मुकुंदरावजी दक्षणचे सुभेदारापाशी असतात, हें तुह्मीं जाणतां त्यास, श्रीमंत पंतप्रधान पंतांही जफ्ती सुभे अवरंगाबाद व सुभे खान देशची केली; परंतु श्रीमंतराव केशवरावजी हरकारे यांचे जागिरीची केली नाही. ताकीदपत्रें, नांव ऐकतांच याप्रकारें करून दिधली कीं, श्रीमंतराव केशवरावजीचे जागिरीस जफ्ती करून जो ऐवज घेतला असेल तो फिरून दीजे, त्यांचे जागिरीस मुजरीम न होणे, त्यांचे चाललें अगत्य असे. हें सर्व आह्मां देखतां जालें. श्रीमंतराव केशवरावजी हरकारे यांची योग्यता याचप्रकारें आहे. तुह्मी श्रीमंत पंत प्रधानजीचे प्रमाणे ताकीदपत्रें करून दीजे. जो वसूल जागिरीपैकी घेतला असेल तो फिरून देवणें. पुढे मुजाहीम न होता तें करणें. व जमीदाराचे नांवें ताकीदपत्रें देणें की, पटिया घासदाणा वगैरे न करीत. श्रीमंतराव केशवरावजी हरकारें यांचे हातें कामें बहुत घेणें आहेत. आमचें लिहिणें सर्वप्रकारे मान्य करून पत्र पावतांच ताकीदपत्रें कळोन दिधली पाहिजेत. यासाठी वारंवार लिहिलें. हे गोष्ट करणें.

[४११]                                                                       श्री.                                                            ३० आक्टोबर १७५२.

पौ आश्विन वद्य ३० रविवार
शके १६७४. बराबर हरी व यमाजी
जासूद जमात भवानी नाईक

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असावें. विशेष. राजश्री रामाजी केशव यास, परगणे जैनाबाद व माजरोप या दोन्ही परगणियांची कमावीस सांगोन रसदेचा ऐवज पन्नास हजार रुपये व कर्जाचा ऐवज पन्नास हजार रुपये केले आहेत. त्याची बोलीचाली आपलेच मार्फतीनें करार जाली आहे. त्याप्रमाणें महालच्या सनदा व पन्नास हजार रुपयांचें खत ऐसें पाठविलें आहे.पावेल. रसदेचा ऐवज कराराप्रमाणें सरकारांत भरणा करावा कर्जाचा ऐवज कार्तिक शुध्द पूर्णिमेस द्यावयाचा करार आहे. तथाप आणखी आठ पंधरा दिवस लागले तरी लागोत. अखेर कार्तिकपावेतों भरणा करून द्यावा. सरकारामध्यें ऐवजाची गरज आहे. ऐवज क्षेपनिक्षेप देवावा. राजश्री रामाजी केशव ऐवज द्यावयाविशीं कांही अनमान करतील. त्यांस आपण सांगोन ऐवज खामखां देवावा. रा छ २२ जिल्हेज, सु॥ सलास खमसैन मया अलफ. हे विनंति.

[४१०]                                                                       श्री.                                                              १५ आक्टोबर १७५२.

पौ आश्विन शुध्द ८ रविवार
शके १६७४.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. पत्रें एक दोन येतां येतां याप्रमाणें येत गेली ह्मणून येथून यावयाविशीं लिहिलें नाहीं. तुह्मीही न आलां. त्यास भेटीचें प्रयोजन जरूर आहे. कित्येक मनसुबियाचा निर्गम केला पाहिजे. त्याजकरितां शहानवाजखान वगैरेंच्या आमच्या भेटी होणार. एक दोन रोज तेथें मुक्काम होतील. तर लवकर यावें. कर्ज पांचपावेतों जरूर मेळविले पाहिजे. हे विनंति.