Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४६२] श्री. १ सप्टेंबर १७५५.
पौ श्रावण वद्य १०
शके १६७७ युवा नामसंवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे. विशेष-सैद-लष्करखान यांचे मजकुराचीं पत्रें नवाब सलाबतजंग यांस व मुसा बूसी व शहानवाजखान यांस पाठविलीं होतीं त्यांचीं उत्तरें आलीं; त्यांच्या नकला पाठविल्या आहेत त्या पाहाव्या व खानास दाखवाव्या; उत्तर कोणे प्रकारें पाठवावें हें पुसून लिहून पाठवावें; व खानास पत्र पाठविलें आहे तें प्रविष्ट करावें; खानाचे साहित्याविषयीं मुसा बूसीस पत्रें पाठवावीं तेथें सर्व त्यांस अनुकूल आहेत; ह्मणून लिहिलें. ऐशियास, खानाविशीं मनापासून अंतस्तें सर्व प्रकारें साहित्यपत्रें व बोलणें होत आहे. परंतु सांप्रत तेथील पत्रें आलीं तीं पाठविलीं आहेत. पुढें ज्याप्रकारें तुह्मीं तजवीज योजून ल्याहाल त्याप्रकारें लिहून पाठवूं. चित्तशुध्द व सत्यभाषण तेथें याविशीं नाहींचसें दिसतें. परशरामपंतहि नीट नाहींत ह्मणून लिहिलें तेंहि यथार्थच आहे. परंतु सांप्रत परशराम महादेवहि हुजूर येत आहेत. सांप्रतचा फिरंगियांचा भाव खराखुरा कसा खानाविशीं आहे तें सर्व शोध करून लिहावें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४६१] श्री. ३१ जुलै १७५५.
पौ श्रावण वद्य ८
शके १६७७
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव बावा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक जानोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. गोविंद सुंदर देशपांडे कानगोद पा बाळापूर यांणीं जिवंत असतां आपले लेकीस चोळीलुगडयास सालीना तीनशें टके पा मजकूरचे लवाजिमापैकीं लेकीस लेहून दिल्हे. त्याचा पुत्र चालवीत नाहीं. त्याची ताकीद करून देशपांडे याचे लवाजिमापैकीं सदर्हू टके चालवावें. ह्मणोन लिहिलें. त्यावरून स्वामीच्या लिहिल्याप्रमाणें राजश्री कृष्णाजी गोविंद यांस ताकीद केली आहे. आपल्या लिहिल्याप्रमाणें बंदोबस्त करून देतील. रा छ २१ माहे शौवाल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४६०] श्री. २६ जुलै १७५५.
पौ भाद्रपद वद्य ११ बुधवार
शके १६७७ युवनाम.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित पाटणकर स्वामीचे सेवेसी :-
चरणरज शिवभट साठे शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि. राजश्री शिवाजी दादाजी बाळापूरकर यास रुपये आठीचे २०००० वीस हजार देऊन आमचा रोखा त्याजवळ एक रुपया व्याजाचा असे. तो पाहोन वसूल घालून रु वीस हजार देणें. रु वेदशास्त्रसंपन्न रा बाळकृष्ण दीक्षित यांस रु दसमासी श्रीमंतांनीं पावते केले ते तुह्मांकडे रवाना केलेच असतील. कदाचित् आठ चार रोज त्याकडून लागले तरी तुह्मीं आपल्यापासून रुपये देऊन रोखेयाजवरी वसूल घालणें. आपण मकसुदाबाजेस नबाब महाबतजंग यांजवळ आषाढ शुध्द १० स आलों. भेटी जाहाली. आठ पंधरा रोजांत मामलतहि होईल. मित्ती आषाढ वदि ३. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४५९] श्रीशंकर.
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षितबावा स्वामीचे सेवेसी.
चरणरज मेघ:शाम कृष्ण चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल पौष शुध्द १४ पावेतों मुक्काम पुणें सुखरूप असों. विशेष. बहुत दिवस जाले स्वामीकडून आशीर्वाद पत्र येऊन सांभाळ होत नाहीं. तरी ऐसें न करावें. निरंतरी आशीर्वाद पत्र पाठवून सेवकाचा परामृश करीत असावें. यानंतर इकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री पंतप्रधान फौजसहवर्तमान कादवा संगमावरी आहेत. राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जयाजी शिंदे ऐसे उभयतां श्रीमंत राजश्री विश्वासरावजीचे भेटीस पुणियासी आले आहेत. राजश्री महादाजी अंबाजी लष्करांतून सासवडास आले असत. सेवेसी कळावें ह्मणून विनंति लिहिली आहे. बहुत काय लिहिणें हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४५८] श्री. २३ जून १७५५.
पो आषाढ शुध्द १५
सोमवार शके १६७७.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रदान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. जीवनराव केशव यां समागमें खानांनीं सांगून पाठविलें आहे कीं, मुसा बुसी आदिकरून सर्वहि तेथील अमीर आमची आरजो करितात, कारभार करावा ह्मणून इच्छितात, एक आपली मर्जी असल्यास हें कार्य करूं, त्यास हैदरजंग व मुसा बुसी यांस पत्रें पाठवावीं कीं खानास वकील मुतलकी व कारभार सांगावा. ऐशास, जीवनराव परशराम महादेव यांचे निसबतीचे, शहानवाजखानांशीं केवळ ममतेंत यांशीं खान ह्या गोष्टी कशा बोलतील ? हा संदेह प्राप्त जाला. यास्तव आपणास लिहिलें असें. तर खानाशीं हा मजकूर तजविजीनें करून, या गोष्टीचा शोध बारकाईनें घ्यावा व लेहून पाठवावें. तेणेंप्रमाणें येथें करणें तें केलें जाईल. तहकीक सर्व अर्थ जरूर लिहून पाठवावे. बहुत काय लिहिणें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४५७] श्री. १२ जुलै १७५५.
पौ आषाढ शुध्द ११ शनवार
शके १६७७ युवा नाम.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि अजुरदाराबरोबर ज्येष्ठ वद्य १३ व चतुर्दशी ऐशीं दो दिवशींचीं दोन पत्रें पाठविलीं तीं आषाढ शुध्द तृतीयेस पावलीं. लिहिला मजकूर सविस्तर कळूं आला. खान मुरादखानाजवळ बोलिले कीं, फिरंगी आदिकरून बहुतकरून आह्मांस अनुकूल आहेत. आपली अनुज्ञा जाली ह्मणजे सर्व गोष्टी आमच्या पूर्ववत्प्रमाणें होऊन येतात. ऐसें बोलले. त्यास हा मजकूर मुरादखान जीवनरायाजवळ बोलले. त्याणीं विदित केला. व आणखी बोलले कीं, खानाजवळ आपली गुदरानी होत नाहीं, सेवेसीही रहावें या अन्वयें कितेक विनंति करणें आहे, त्यास भेटीस येतों. ह्मणोन त्यांस न यावें ऐसें ह्मणतां नये ह्मणून सुखरूप येणें ऐसें पत्र मुरादखानास पाठविलें होतें. परंतु फिरंगी आदिकरून कितेक खानाकडे ममतेंत आले कसे ? व नवाबाचें येणें अवरंगाबादेस होत नाहीं, तेव्हां खान एकाएकी उठोन नवाबाकडे जाणार नाहींत, असे कितेक प्रकारें आमचेहि चित्तास संशय वाटेल. ह्मणून ये गोष्टीचा शोध करून लिहिणें ह्मणून तुह्मांस लिहून पाठविलें; परंतु इतक्याहि गोष्टी प्रमाण, ऐसें खान बोलले, असें स्पष्ट लिहिलें नाहीं. परंतु इतका इतबार खानाचा मुरादखानाचे ठायीं नाहीं आणि ते प्रमाणिक नव्हेत. जीवनराव सर्व प्रकारें अप्रमाणिक. ये गोष्टीचा विचार सालस मातबर असतील त्याचे मारफातीनें व्हावा, सरकारचा मातबर इतबारी यावा आह्मीं त्यांचें व खानाचें बोलणें होऊन निश्चयांत गोष्ट आणूं, पुढेंमागें सालस मातबरानें मारफातीचें जाली ती बरी, असें कितेक विशदें लिहिलें. त्याजवरून हा मजकूर असेल असा भाव काढावा लागतो. तर मागती शोध करून यथास्थित खानास पुसोन लिहून पा. सर्वहि खानास अनुकूल होऊन खानाचे मनोभीष्ट सिध्दीस जात असेल तर आह्मांस संतोषच आहे. तुह्मी लिहिल्यावरून जीवनरायास सांगोन मुरादखानास लिहविलें कीं प्रस्तुत भेटीस न येणें, पुढें बोलावूं तेव्हां येणें ऐसें लिहिलें असें. शहरचे कामकाजास सरकारचा इतबारी लवकरच पाठविणार आहों. त्याजबरोबरही कितेक सांगोन पाठविणें तें पाठवूं. छ ३ सवाल हे विनंति.*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४५५] श्री. २३ जून १७५५.
पौ ज्येष्ठ वद्य ५ शनवार
शके १६७७.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी आपणाकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर मुसाबुसीबासालत जग एक कसें ? मराठे कोणेकडे ? हें वर्तमान जरूर तहकीक ल्याहावें. छ १२ रमजान. हे विनंति.
[४५६] श्री. १६ जुलै १७५५.
पौ ६ माहे शवल.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री रामाजी केशव का दार
पा जैनाबाद गोसावी यांसी :-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु सीत खमसैन मया व अलफ. तुह्मांकडे सालमजकूरचे रसदेचा ऐवज रुपये १०५००० येक लक्ष पांच हजार येणें. त्यास सरकारांत ऐवजाचें प्रयोजन आहे. दक्षणेस श्रावणमासाचे ऐवज पाहिजे. तर पत्र पावतांच ऐवज जलदीनें येऊन पोहोंचे ते गोष्ट करणें. दिरंग न लावणें. जाणिजे. छ २२ रमजान आज्ञा प्रमाण. याखेरीज मंड्या व पातशाही बाग व जकात वगैरे येथील सालमजकूरची रसद घ्यावी लागते. तोहि ऐवज पाठवून देणें. जाणिजे. छ मा आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४५४] श्री. ८ जून १७५५.
पौ आषाढ वद्य १ शके १६७७
युवनाम संवत्सरे
तीर्थस्वरूप राजश्री दादा स्वामी वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता अधिक वद्य १४ जाणून स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. यानंतर तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कांहीं कळत नाहीं. तरी सविस्तर वर्तमान लिहिलें पाहिजे. विशेष.हुंडी तुह्मांवरी केली एक येथें राखिलें. माधवराव कृष्ण वावडे देशमुख का भिंगार याचे मित्ति अधिक ज्येष्ठ वद्य षष्ठी शुक्रवारपासून दिवस एकाहत्तर उपरनामें धनीजोग रुपये रोकडे सुलाखी अवरंगशाहीची हुंडी तुह्मांवरी केली आहे. रु २९१० अक्षरीं एकोणतीसशें दहा रुपयांची केली आहे. तरी मुदतीस रुपये धणीजोग याची ठावठिकाणा चौकशी करून रुपये देणें. विशेष. इकडील वर्तमान तरी पातशाहा पाणिपतावरी गेले होते ते फत्ते करून हस्तनापुरास आले. जाटाची बोली लागली आहे. वीस लाख रु ते देत आहेत. हे अधिक मागतात. मामलत ठहरली नाहीं. परंतु ठहरेल. श्रीमंत रा रघुनाथपंत दादा व मल्हारबा ऐसे ग्वालेर प्रांतें आहेत. याचें वर्तमान पूर्वील पत्रीं लिहिलें आहे. त्यावरून श्रुत होईल. आयुध्येवाला आपले जागांच आहे. कारभार पूर्वीलप्रमाणेंच आहे. काशीचा अधिकारी राजा बळवंतसिंग याचे कन्येचें लग्न ज्येष्ठमासीं आहे. साहित्य होत आलें आहे आणि होतही आहे. मुलुकांतही महामारीचा उपद्रव मोठासा आहे. इकडे यंदां जरी आली आहे. शहरांत मनुष्य मात्र दुखण्यानें पडलें आहे. मरतातही बहुत. लोकांनीं दुर्गेला नवस केले आहेत. बागेंत जाऊन समाराधना करावी. पांचा सात दिवस निजतात आणि बरे होतात. दहाविसांत एखादा ज्याचा आयुर्दाव पुरला तो जातो. येरीतीचें वर्तमान आहे. धारण तरी तांदूळ चवदा शेरपासून अठरा शेरपावेतों आहेत. गहूं पांच सव्वापांच पासऱ्या, हरभरे सत्तावीस शेर, जव मणभर, तेल सा शेर, तूप साडेतीन शेर. याप्रों धारण आहे. कळलें पाहिजे. कडू तेल दोन शेर याप्रों आहे. व शिवरामपंताचा लेंक गेला. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार. चिरंजीव त्रिवर्गास आशीर्वाद. राजश्री भिकाजी महादेव यास आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
चव्हाणाचा दावा जबरदस्त लागला. आठा दिवसांत एक युध्द ठेविलेंच आहे. तीर्थरूपांनीं पैलकडील मुलखाची स्वारीमुळें खराबी केली. चव्हाणाची जबरदस्ती ऐलकडे पडली. आपले बापाचें व चव्हाणाचें हमेशा युध्द होत गेलें. तेव्हां निळकंठराव यांचे बाप व चुलते चव्हाणापाशीं होते तें स्वारीस येत. त्यांजबरोबर हेही येत असतां महाराजापाशीं कोणी सांगणारानें सांगितलें, येसाजी थोरात याचे भाऊ चव्हाणाबरोबर आहेत, नवा लक्षांची दौलत- विजापूरदेश- त्यांजकडे आहे, तरी स्वामींनीं मोजे बहें व मोजे काखें हे दोन्हीं गांव त्यांचे पाटिलकीचे अमानत करावे. ऐसें सांगितलें. हा मजकूर दरबारी जाहला. शिदोजीबावास कळलेवर दरबारास जाऊन, रावप्रतिनिधि यांचे विद्यमानें पांच सात हजार रुपये खर्च करून वतनें राखिलीं. महाराजापाशीं रावप्रतिनिधींनीं सांगितलें कीं, शिदोजी थोरात यांचे पाटिलकीचे दोन गांव आहेत, ते महाराजांचे राज्यांत खस्त मेहनत करतात, तरी त्यांचीं वतनें आहेत त्यास हरकत करूं नये. मौजे कारवें येथील पाटीलकी वाघ्या बजाजी पाटील यांसी खासा शिदोजी थोरात यांनीं मारून आपलें वतन साधिलें हें नेमस्त आहे, ऐसें सांगोन दरबार खर्च करणें तो करोन वतनास खलेल न होय तें केलें. वतनें सुदामत चालूं लागलीं व सुदामत वतनवादे चालूं देत नव्हते त्यास वाद घालून वतन आपलें सुदामत केलें. तेव्हां निमेचे भाऊ होळीस पोळी बांधो देईनात. दुराई दिल्ही. कितेक वर्षें अमानत राहिले. राव प्रतिनिधि जिल्हा काढून पंत मंत्री यांचे स्वाधीन जिल्हा केला. तेव्हां शिदोजीबावाचे स्वाधीन हा मुलूख अवघा गेला. मग दोन तीन हजार स्वार ठेऊन चव्हाणाशीं टक्कर देऊन संभाजी महाराज यांचा मुलूख सत्यानास केला. महाराज कृपाळू जाहले. तेसमयीं होळीचे पोळीचा मजकूर केला. तेव्हां वादी यासी बोलावून आणवून थळास जाणें ह्मणून महाराजांनीं सांगितलें. तेव्हां थळास राजी नाहींत. देशमुखीचे मुतालीक यांस महाराजांनीं त्याची मुनसफी सांगितली जे, इनसाफ करणें अगर वतनास खलेल न करणें. नंतर तुकाजी वादी यासी व शिदोजीबावा यासी बोलाऊन होळीची पोळी लाविली. तेव्हां दरबार खर्च चार पांच हजार रुपये पडले. ऐसे वतनसंबंधें दहा पंधरा हजार रुपये पडले व दौलतसंबंधींही कर्ज ४०।५० हजार रुपये आंगावर पडले. हीं दोन्ही कलमें आपली यावीं, दौलत त्यांजकडे राहिली त्याचा विभाग यावा व बहेची पाटीलकीची तक्षीम यावी, व शेताचें दिवाणचें खंड वारिलें तेंही यावें. सदरहू आपले कज्जे याप्रमाणें आहेत. येसाजी थोरात याजकडे कदबा लिहून दिला. करीना साक्ष मोझेनिशी परवून देऊं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
अवघियांची नावें जाहलियावर, शिदोजीबावा बराबर पांच सात माणूस बरेच होते त्यांणी अंगेजणी करून गोष्टी सांगितली की, महाराज ! चव्हाणाशीं जामीन होणे हें आपणास कधी बोलवणार नाहीं, याजउपरी आपली शंभर वर्षे पुरली, महाराजाचे चित्तास येईल तें करोत. ऐसे निष्ठुर बोलले. नंतर मग निकाल काढिला जे, हें कांही चव्हाणाचे विचारांत येत नाहींत, याजउपरि मजलसीत अतिशय कामाचा नव्हें, ऐसे मनात आणून मग बोलिले जे, तुमचा लेक वोलीस ठेवणें. तेव्हा बावाजी थोरात यासी वोलीस ठेविलें आणि पंधरा रोजांचा वायदा केला. तेव्हां मकाजी मुलिक तेथें होते त्यांचे हवाली बावाजी थोरात यांसी केलें. मग तोही भला माणूस जामीन होऊन कदबा दिल्हा आणि शिदोजी बावांनीं निरोप घेऊन गांवास आले. तव रजबदली लागली जे तुह्मीं सचंत्र चाकरीस राहणें. बहुत कांहीं समाधानाचीं उत्तरें बोलोन ठेवावें ऐसें योजिलें. मग समस्तांनीं सोबतीचे लोकांनीं विचार शिदोजी बावास सांगितला, याजउपरि येथें राहिल्यानें आपलें बरें नाहीं, घात होईल. ऐसें संमत दिलें. तेव्हां निष्ठुर सांगितलें जें, आपण महाराजाची चाकरी करीत नाहीं. ऐसें चार पांच रोज सांगतच असतां, शिदोजी घोरपडे व पिराजी घोरपडे, यांची कलागत वाढली. तेव्हां शिदोजी घोरपडे यांनीं शिदोजी बावांसी राजकारण लाविलें जे, तुह्मांस मुलुख देतों, सध्यां तुमचें कर्ज वारितों. ऐसें बोलोन ठीक करोन, आपले गोटापाशीं नेऊन याशीं उतरविलें. तंव पुढें चौ-रोजीं उभयतांचें झुंज जाहलें, तेव्हां आपले बाप शिदोजी बावा यांनीं जीवादारभ्य श्रम केले. पिराजी घोरपडे याचा मोड जाहला. पराभव ते पावले. महाराज व विठोजी चव्हाण मात्र राहिले. शिदोजी घोरपडे शेजारी येऊन राहिले. मग महाराजाचा व त्यांचा बनाव न बैसे. मग शिदोजी घोरपडे निघोन आपल्या देशास चालिले. आपले तीर्थरूपास बराबर चला, तुह्मांस कबूल केलें तें देऊं, ऐसें बोलतांच, लोकांनीं दंगा फारच केला जे, सध्या कर्ज वारावयासी देऊ केलें तें नाहीं आणि कर्नाटकास रिकामें यांजबराबर जावें यांत नफा नाहीं, हा विचार करोन, तेथोन निघोन चिकोडीस आले; तव राव प्रतिनिधि कर्नाटक प्रांतीं मुलुखगिरी जावयासी निघाले. ते पंचगंगेवर मुक्काम केला आणि शिदोजी बावाकडे पत्र पाठविलें जें, तुह्मीं आपले भाऊ आहा, आपण मुलुखगिरीस निघालों तुह्मीं बराबर असावें, तुमचें सर्व प्रकारें चालवावयासी अंतर होणार नाहीं. ऐशीं पत्रें व कारकून पाठविलेवर शिदोजी बावा जमावसुध्दां येऊन भेटी घेतली. आणि अष्टेचें ठाणें व सरंजाम द्यावा हा मुद्दा घातला. तेव्हां तो मुद्दा राव प्रतिनिधि यांनीं कबूल केला. अष्टेचें ठाणें दिल्हें. तेव्हां जाखलेमध्यें मुलें माणसें होतीं तीं आणून जाखलें त्यांचे हवाली करून, बावाजी थोरात यासी सोडवून आणविलें. रावप्रतिनिधि बराबर मुलुखगिरी करून माघारे आले. शिदोजीबावास निरोप दिल्हा. अष्टेत राहिले. ऐशीं पांच सात वर्षें प्रतिनिधीची चाकरी केली.