Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[४३७]                                                                        श्री.                                                               २३ जून १७५४. 

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. पा जैनाबाद नि रामाजी केशव यांजकडे सालमजकूरचे रसदेचा ऐवज रुपये १०५००० एक लक्ष पांच हजार येणें. येविषयीं मशारनिलेस आलाहिदा पत्र पाठविलें आहे. तरी तुह्मी त्यास ताकीद करून श्रावणमासचे दक्षणेकारणें ऐवज येऊन पोहोचे ते गोष्ट करावी. रा छ १ रमजान. सु सन खमस खमसैन मया व अलफ. सत्वर पाठवावा. हे विनंति.

असल पत्र, अजुर्दार काशीद जोडी दिल्लीस श्रीमंत दादाकडे रवाना केली, त्याजबरोबर रामाजी केशव याजकडे पाठविलें. छ १० माहे रमजान आषाढ शुध्द १४ बुधवार शके १६७६, भाव नाम संवत्सरे, सन ११६४.

[४३६]                                                                    श्रीलक्ष्मीकांत.                                                       ३ जून १७५४. 

पौ ज्येष्ठ वद्य १३ मंगळवार
शके १६७६
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव बाबा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. बंगालियांतील सरकारच्या हुंडया तुमच्या जागेच्या वेदमूर्ति राजश्री शिवभट साठे यांणी पाठविल्या आहेत. त्याऐवजी राजश्री येसाजी नाईक गडकरी यांसी दहा हजार रुपयांच्या हुंडया दिल्या आहेत. त्यास मशारनिले ज्यास ऐवज देवितील त्यास दिल्हा पाहिजे. रा छ ११ माहे शाबान. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

श्री                        *                                                                                                                                                लेखन सीमा.
श्री शाहूराज 
पदांभोजभ्रम -
रायितचेतस:
बिंबात्मजस्य
मुद्रेयं राघवस्य
विराजते.



 

[४३४]                                                                        श्री.                                                         

सेवेसी साष्टांग नमस्कार. विनंति उपरि. श्रीमंत राजश्री नानासाहेबांचे डेरे मौजे सांगवी येथें जाले. डेरियासी दाखल प्रहर दिवसास जाले. भेटीस जाणें तरी जरूर आहे. येविशीं आज्ञा काय ते करावी. त्याप्रमाणें वर्तणूक करूं. बहुत काय लिहिणें हे विनंति.



[४३५]                                                                        श्री.                                                            २८ मे १७५४.

पौ ज्येष्ठ शु. ७ शके १६७६.

वेदमूर्ति राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक बाबूराव बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय स्वानंदलेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. स्वामीकारणें पोहे पक्के 248 3 पांच शेर व डाळें 248 4 येणेप्रमाणें जिन्नस पा। आहे. घेऊन पावल्याचें उत्तर पा। पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असों दीजे. हे विनंति.

सत्यमिथ्य न कळे. शामराय बहुतसा स्नेह करितात. ममतेच्या गोष्टी बोलतात. नम्र बहुत आहेत. कृष्णराव पुण्यांतच आहेत. यादवरावही तेथेंच आहेत. यानंतर राधाबाई पेशवी व काशीबाई जोशांची वारली. हें वर्तमान पूर्वीं दोन पत्रीं लिहिलें आहे. पावलें असेल. न कळे. बाबा फाठक सावखेडपात आतुर संन्यास घेऊन समाप्त झाले, हेंही पूर्वीं लिहिलें आहे. वरकड वर्तमान सर्व यथास्थित असे. कृष्णाजी नाईकांचे पुत्राचे कार्यास कासीद अर्जुदार पुण्यास वडिलांनीं पाठविला होता, त्यास आह्मीं येथें रुपये ४ चार खर्चास दिले आहेत. तेथें घ्यावे. पूर्वीं लिहिलेंच आहे. राजश्री बापूजीपंतांचे भांडयाचे रुपये एकशेंसाडेपंधरा आपणाकडे आहेत. तेथे देऊन लेहून पाठवावें. आजकाल हुंडणावळीचा भाव आटेनें सात आठ यापावेतों आहे. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार. तीर्थस्वरूप बाबा वडिलांचे सेवेसी. अपत्यें गोविंद दीक्षित, रामचंद्र उभयतांचे साष्टांग नमस्कार. लिखितार्थ परिसीजे. बाजीचे साष्टांग नमस्कार. महादेव सोमण याचे साष्टांग नमस्कार. वेदमूर्ति आत्माराम जोशी याप्रति गोविंद दीक्षित नमस्कार. उपरि तुमचीं पत्रें तुमचे घरीं पावतीं केलीं पाहिजे. कळलें पाहिजे. वेदमूर्ति केशवभट यांप्रति नमस्कार. वेदमूर्ति बाळंभट शौचे यांप्रति नमस्कार. येणाराबरोबर सविस्तर लिहिणें. राजश्री बापूजी महादेव यांप्रति नमस्कार. उपरि तीर्थरूपांचे पत्रावरून सविस्तर कळेल. तुमचे भांडियाचे रुपये ११५॥ एकशेंसाडेपंधरा सरकारांत आहे ते घ्यावे. वरकड तुह्मीं कार्तिकपत्रीं सविस्तर लिहिलें कळोन समाधान जालें. याचप्रकारें सविस्तारें लिहीत जावें. राजश्री बाबूराव सुखरूप आहेत. चिंता न करावी. यानंतर चिरंजीव मथीस रजोदर्शन ज्येष्ठांत जालें. कळलें पाहिजे. लोभ असों दीजे. हे नमस्कार. सेवेसी भिकाजी महादेव साष्टांग नमस्कार. श्रीमंत उभयतां दीक्षित स्वामीचे सेवेसी. सेवक भिकाजी महादेव साष्टांग नमस्कार. विनंति. राजश्री गोविंद दीक्षितांचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक करितों. हे विज्ञप्ति. राजश्री गोविंदपंत वागदे यांप्रति आशीर्वाद. तुमचीं पत्रें पावतीं केलीं.

बाकी रुपये 433 2 सरकारांत दाखल. हिशेब वडिलांस कळावा ह्मणून लिहिला असे. अर्धे भादव्यापासून नवें साल लागलें. पानास निरख पांच पावणेपांच साडेचार उत्तम मालाचा आहे. नीरस माल तीन साडेतीन असा आहे. खुडतात. निळव्याचीं ठिकीं थोडीं बहुत आहेत. ते विकरी लागली आहे. गिराईक उदमी तों कोणी नाहीं. येवनाचे सरकारांत हातींस घेतात. पैका देतात. खोट नाहीं. सेवटीं पाहावें. प्रस्तुतकाळीं कोणाचा उपद्रव जाजती नाहीं. सुरळीत चालतें. घरकर्त्याचे संसारिकाचे आपले आज्ञेप्रमाणेंच वर्तणूक करितों. राजश्री भिकाजीपंत मामाकडील हा काळपावेतों कराराप्रमाणें ऐवज येतो. सोळाशें रुपये गोविंदपंत परगणांपैकीं घालून बसला आहे. प्रस्तुत तो येथें नाहीं. वऱ्हाडांत आहे. यानंतर वे॥ शिवभट साठे बंगालीयास गेले. काशीस येतील. गांठ पडली तर सात आठ शत रुपये त्यांजकडे आपला ऐवज आहे. व राजश्री बापूजीपंतांचे रुपये ६५ इतके उगऊन घ्यावे. यानंतर शिवभट साठे यांची स्त्री शांत जाली. त्यांची मातुश्री कालच वऱ्हाडांतून आली. राजश्री रघोजी भोसले यांनीं आह्मांस पागोटें व शेला असा पाठविला आहे. कळलें पाहिजे. यानंतर भाद्रपद शुध्द द्वितीयेस वेदमूर्ति दीक्षित व नारायण जोशी व भिकाजी नाईक स्वार होऊन पुण्यास गेले. तेथें पावलियाचें पत्र आलें होतें. भेटी होऊन बोलीचें वर्तमान आलें नाहीं. राजश्री राजी केशवही तेथें गेले आहेत. त्यांचे मामलतीचे साहित्येविषयीं उभयतांस सांगितलें आहे. काय होऊन येईल तें लेहून पाठवूं. जालनापूरची मामलत शामजीपंत टकले यांजकडेच राहिली. अद्याप कोणी नवे जुने जाले नाहींत. वऱ्हाडांतील सरदेशमुखी हरी दामोदर यांणीं केली ह्मणून वर्तमान आहे, वऱ्हाडचा सुभा मुरादखान जाला. दिवाणगिरी मजलीसरायांनीं केली. आठा लक्षांचा ईजारा केला आहे. अद्याप गेले नाहींत. जाणार. कळावें ह्मणून लिहिलें असे. शहरांत अवघें सभ्य माणूस मातबरींत नसीरजंग आहे. वडिलासीं इतका स्नेह; परंतु आपले येपाणी नहर येत होता. त्यास रामदासपंतानें ज्यांस ज्यांस पाणी दिल्हें होतें, त्याचे अवघे नहर फोडिले. त्याजबराबर हाही फोडिला. दोन चार वेळ सांगविलें, व आह्मीं एक वेळ भेटीस गेलों, तेव्हां समक्ष हटकिलें. उगाच राहिला. आज्ञा देतों. नाहीं देत हें कांहीं न बोले. परोक्ष शामराय विसाजी यांजपाशीं बोलिला कीं, दीक्षितांचें मज बहुत अगत्य. मजला परंतु दर्गाहकुलीखान, शाहानवाजखान यांचेही नहर फोडिली. त्यांची परवाणगी जाली नाहीं. याची परवाणगी दिल्यास बरें दिसत नाहीं, असें शामराय सांगत होते.

मोठमोठयांचीं घरें फोडतात. दरवडे पडतात. कांहीं नीत राहिली नाहीं. शहरांत असा उपद्रव कधीं ऐकला नव्हता. कालच कुसाजी गोविंद याची भिंत फोडली. दोन दोन भाले उंच शिडया आणून लाविल्या. माडीवर भोंक पाडिलें. इतक्यांत जागे जाले. गलबला होतांच पळाले. शिडया तशाच राहिल्या. शासन नाहीं. साताऱ्यांतही गलबला फार आहे. आह्मीं आपलेकडून सावधता बहुत करितों. चार प्यादे, दोन महार व आणखी गांवचे जागले, अशी गस्त दोन वेळ रात्रीस देववीत असतो. आपले हवेलींत, मागें जागला आहे व पुढें वेसकर एक व माडीवर पाळीप्रमाणें जागावें, असा नियम केला आहे. वडिलांचें पुण्य समर्थ आहे. कांहीं चिंता नाहीं. यंदां पावसानें अतिशय केला. गांवकुसूं चहोंकडे पडिलें. उपाय नाहीं. दसरा जालियावर गांवकुसासही काम लावूं. शहरांतही भिंती व घरें असंख्य पडिली. पावसाकरितां एकेक जागां खरीपच पेरलें नाहीं व रबीची पेरणी अद्याप नाहीं. वरचेवर शिंपितों. वाफसे मोडतात. कायगांवीं अशी गति आहे. कायगांवीं आश्विन शुध्द प्रतिपदेपासून पेरणीस प्रारंभ होणार होता. शिंपलें नाहीं तर होईल. सजगुरे दाहा बारा ठिकीं रानांत होतीं ते केवळ गेलीं. जाले तर खंडी सव्वा खंडी सजगुरे होणार. ते लोक ह्मणाले कीं, आज्ञा कराल तर मोडून दुसवटा करूं, मग मोडायाची आज्ञा दिल्ही. जोंधळयाचें पेव सां वर्षांचें होतें तें काढिलें. दाण्यास वास फार लागला. मधील दाणे तीन सव्वा विकतात. बहुतसे कोणी घेत नाहीं. जितके विकतील तितके विकोत. चोखट दाणे शहरांत पावणेपाचांनीं पल्ला आहे. गहूं साडेसा पावणेसात, हरभरे सात, तूप अर्धपाव अगळें दीड शेर, तेल साडेपांच शेर असा आजकाल आहे. यानंतर सातारियाचें कामकाज निवळ चालतें. गत वर्षाचा आकार चवदा हजार एकशेंतीन कुलमालबरगुजार, अंबराईसमेत चौथाई, सरदेशमुखी, हवालदार व शिवाय वगैरे जमाव आकारली. जमा कुलबाब कुलकानू :-
433 1

त्यावरून त्यांनीं उत्तर दिलें कीं, ज्यांत तुमचें समाधान, टेंकडया आमच्याही काय कामाच्या. तेव्हां आठ किल्ले निकामी होते ते सोडिले. हर्ष व चौंडस, रामसेज व आणखी असे चार पांच किल्ले ठेविले; व दौलताबादसरकारचे पांच परगणे सोडिले. वस्त्रें देऊन निरोप दिला. इतक्यानें हे कृतकृत्य होऊन शहरास आले. स्नेह जाला. राघोबा व होळकर तेथून कुच करून हिंदुस्थानास गेले. पृथ्वीपतीकडील बोलावणें आलें कीं, कोटि रुपये देतों, सत्वर येणें. व वजिराकडीलही याचप्रकारें, कोट रुपये देतों, आह्मांकडे येणें. त्यास हे पृथ्वीपतीकडेच जाणार. पहावें. सांप्रत वदंता शहरांत उठली कीं, होळकरास दोन घाव लागले आहेत. कोण पाटलाची बायको लेकानें घरांत घातली ह्मणोन त्यानें मारिलें अशी बोली. व दुसरें, कोणी शिपाई रोजमुरा मागत होता त्यास शिव्या दिल्या, यास्तव त्याणें मारिलें. परंतु वांचला आहे. सत्यमिथ्य न कळे. वदंता शहरांत दाट, त्यावरून लिहिलें असे. यानंतर नसिरजंगाशीं व पेशव्यांशीं बाह्यात्कारें तों स्नेहच आहे, अंतस्थ कांहीं कळत नाहीं. प्रस्तुत बिघाडाची कांहीं शहरांत गडबड दिसत नाहीं. स्तिमितसें जालें आहे. आतां इतकें बोलतात कीं, जानोजी फौज ठेवितों. आपले देशांत जितके पेशव्यांकडे चाकर राहावयास शिपाई जात होते त्यां वर्जिले, अशी बोली आहे. पेशवे दसरा जालियावर बाहीर निघणार. जयाजी शिंदा पुण्यांतच होता. सांप्रत त्यास निरोप दिल्हा. वस्त्रें, कडीं देऊन सन्मानपुरस्पर करून आज्ञा दिली. तो चांभारगोंद्यांत आहे. कोणेकडे जाणार तथ्य नाहीं. एक बोली कीं, विश्वासरायास बराबर देऊन गुजराथेकडे पाठवावें. दुसरी बोली, हिंदुस्थानास दादाकडे रवाना करावें. दादाबराबर पंचविसहजार फौज नेविली. नालबंदी दिल्ही. जाईल. प्रस्तुत कांहीं बिघाडाचा प्रसंग नाहीं. यवनास भक्षायास नाहीं ! फौज नाहीं ! बिघाड कशाच्या बळें करावा ? असें तर दिसून येतें. यावर नकळे. प्रस्तुत शहरांत चोरांचा बहुतच उपद्रव जाला आहे.

[४३३]                                                                        श्री.                                                          ३० सप्टंबर १७५३.

तीर्थरूप दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम आश्विन शुध्द ४ रविवार पावेतों वडिलांचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. वडिलांचें आशीर्वादपत्र श्रावण वद्य ९ गुरुवारचें आलें तें आश्विन शुध्द ३ शनवारी पावलें. वर्तमान कळोन बहुत समाधान जालें. व पूर्वी दोन चार पत्रें पावली. या प्रांतीचें वर्तमान राजश्री पेशवे पुण्यांत आहेत. श्रावण मासी धर्म बहुत केला. सोळा लक्ष रुपये वाटिले.ऐशी सहस्त्र ब्राह्मण समुदाय मिळाला. पर्वतीत तीन दिवस दक्षिणा दिल्ही. आणखी एक अपूर्व गोष्टी जाली. एक गृहस्थ सातारेकडचा, त्यास पोटशूळाची व्यथा बहुत होती, ह्मणून कोल्हापुरास लक्ष्मीजवळ सेवेस गेला. तेथें स्वप्न जालें कीं, पुण्यास जाऊन पेशव्यांचें तीर्थ घेणें ह्मणजे तुझा रोग दूर होईल. त्यावरून तो गृहस्थ पुण्यास येऊन पूजासमयीं भेट घेतली. महालक्ष्मीचा चमत्कार सांगितला. ते गोष्टी त्यानी विनोदावर नेली. मग तो गृहस्थ आठ दिवस राहिला; तों पेशव्यांसच स्वप्न जालें कीं, त्या गृहस्थास तीर्थ देणें, अनमान न करणें. तेव्हा यानें गृहस्थास बोलावून पाठवून तीर्थ दिल्हें. तीर्थ घेतांच पोटशूळाची व्यथा दूर जाली. नारायणभट थत्ते त्या प्रसंगी तेथें होते त्यांनी सांगितलें. कळावें ह्मणोन लिहिलें असे. यानंतर मागील दिवसांत जनचर्चा दाट होती की, मोगल पेशव्यांशी बिघाड करितो. जानोजी निंबाळकर हणमंतराय निंबाळकर व रामचंद्र जाधवराव, या त्रिवर्गाकरवून फौज ठेविली आहे. ते फौज ठेवितात. दसरा जालियावर फौज घेऊन यावें. रघोजी भोसले याचा वकील व दमाजी गायकवाड व मल्हार होळकर व जयाजी शिंदे यांचे वकील आले. अंतस्थें सर्व फितव्यांत आहेत. बिघाड निश्चयें होतो. नानाप्रकारच्या गप्पा उठतात. हें वर्तमान वडिलांस एक दों पत्री लिहिलेंच आहे. कळलें असेल. थाळनेरांत राजश्री राघोबादादा व मल्हारजी होळकर होते. त्यांजकडे यवनानें आपला भला माणूस सैफुल्लाखान व मल्हारपंत किंभुवने, दोनशे स्वार, दोनचार हत्ती अशी थाटणी करून पाठविलें. बराबर परशरामपंत वकील व मनोहर बगाजी हेही पाठविले. लोकांत गप्प कीं, मल्हारजीस आणावयास गेले. त्यास हे तेथें जाऊन दादाची व मल्हारजीची भेट घेतली. ह्मणों लागले की, तुमचा आमचा स्नेह जाला. ते समयीं जो करार जाला त्याप्रमाणें तुह्मी चालावें. त्या कराराशिवाय दौलताबाद सरकारचे परगणे माणिकपुज, राजदेहर, वेताळवाडी, चाळिसगांव व आणखी एक असे पांच परगणें घांटाखाली खानदेशचे ह्मणोन जप्त ठेविले ते व किल्ले, नाशिक प्रांत वगैरे दहा बारा घेतले ते, असे सोडावे ह्मणजे तुमचा आमचा अकृत्रिम स्नेह.

मनसूरअल्लीखानासी व पातशाहासी युध्द लागलें आहे. यांस पातशाहानें करोड रुपये देऊं करून मदतीस बोलाविलें व मनसूरअल्लीखानांही करोड रुपये देऊं करून बोलाविलें. त्यास पातशाहाकडेच जातात. मागोन पंचवीस हजार फौज पेशव्यांनी नालबंदी देऊन राघोबाकडे रवाना केला आहे. जयाजी शिंदे यांस गुजराथेस, समागमें विश्वासराव यांस देऊन पाठविणार ह्मणोन वर्तमान आहे. तथ्य नाहीं. प्रस्तुत चांभारगोंद्यांत आहेत. आजपावेतों पुण्यांतच होते. तेथून आज्ञा दिधली. वस्त्रें, कडी देऊन निरोप दिला. पुढें कोणेकडे पाठवितील, हें तथ्य जालियावर लेहून पाठवूं. पेशवे पुण्यांतच आहेत. श्रावणमासी सोळा लक्ष रुपये धर्म केला. ऐंशी हजार ब्राह्मण मिळाले होते. तीन दिवसपावेतों दक्षिणा दिल्ही. मुठीनें, वोंजळीनें, चुकटीनें अशी दक्षिणा दिल्ही, मोजून दिल्हें नाहीं. कोणास पांच आले, कोणास पंधरा, पंचवीस, चाळीस, पन्नास, शंभर असेही आले. याप्रकारें जालें. आनंदरूप बसले आले. मोगल व जानोजी वगैरे यांची गलबल त्यांचे गणनेंतही येत नाहीं. असें आहे. यानंतर धाकोणीचा ऐवज आह्मीं घेतला नाहीं. आज्ञेप्रमाणें उभयतां वेदमूर्तीस निरोप सांगितला आहे. उत्तर काय होईल तें लेहूं. घरी सावध आहों. सांप्रत चोरांची गलबल उठली आहे. रात्रीस गस्त दोनदां फिरते. आपणाकडून सावधता आहे. गांवकुसूं पावसानें चोहोंकडे पडले आहे. दिवाळी जालियावर काम लावूं. वरकड गावचें कामकाज अद्याप निवळ चालतें. निळव्यांची विक्री लागली आहे. थोडीं बहुत ठिकी आहेत ते विकतात. पानें खुडतात. गतवर्षी बरगुजार पावणेपांच हजार आले. अवघा आकार चवदा हजारपावेतों आला. आंबराई व शिवाय सभेत सरदेशमुखी आला. कळावें ह्मणोन लिहिलें असे. सांप्रत दाणेभाव :- जोंधळे उत्तम पांच पावणेपांच, व गहूं साडेसा पावणेसात, व हरभरे सात, तूर्प अर्धपाव आगळे दीड शेर, तेल साडेपांच शेर याप्रमाणें आहे. कायगांवचे जुने दाणे सा वर्षांचे काढिले तेमधील चोरवट तीन सव्वा तीन रुपयांनी पल्ला कायगांवी विकतात. थोडे बहुत विकले. वास फार येतो, यास्तव कोणी घेत नाहींत. विकतील तसें विकूं. कळलें पाहिजे. सइद लष्करखानाचे भेटीस एकदां गेलों होतों. भेटी जाली.वडिलांचे वर्तमान पुशिलें. स्तवन वडिलांचे करीत होता. उत्थापन दिल्हें. परंतु, मोगल लोक कामापुरते आपले हवेलीत नहर येत होता तो फोडिला. त्याजकरितां अगोदरही हटकविलें होतें व आह्मी समक्ष सांगितलें. परंतु त्याच्यानें आज्ञा देवविली नाहीं. उगाच राहिला.परोक्ष ह्मणतो कीं, त्यांचें मजला बहुत अगत्य आहे, परंतु उपाय नाहीं. दरगाहकूलीखान, शहानवाजखान यांचे नहर बंद केले आहेत. यास्तव यांचा मोकळा करतां येत नाहीं. असें आहे. आह्मी त्याजवर त्याचे भेटीस गेलों नाहीं. आजकाल मुख्यत्व अवघें याजवरच आहे. सलाबतजंग नावांस पात्र आहेत. याप्रकारें जालें वर्तमान लिहिलें असे. यानंतर बाबा पाठक सावखेडयांत जाऊन, महिनाभर वास करून, अतुल सन्यास घेऊन समाप्त जाले. पूर्वी वडिलांस लिहिलेंच आहे. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार.

[४३२]                                                                        श्री.                                                           २३ सप्टेंबर १७५३.

तीर्थस्वरूप दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम आश्विन शुध्द द्वितीया शुक्रवार पावेतों वडिलांचे आशीर्वादें करून समस्त सुखरूप असों. विशेष. वडिलांचें आशीर्वादपत्र श्रावण शुध्द १ मंगळवारचें भाद्रपद वद्य ८ गुरुवारीं पावलें. व पूर्वी आणखी ज्येष्ठमासची पत्रें दोन तीन पावली. वर्तमान कळोन बहुत समाधान जालें. या प्रांतीचें वर्तमान यंदा पर्जन्य बहुत जाला, येणेंकरून खरीपें थोडी बहुत आली, रब्बीच्या पेरण्या आतां चाली लागल्या आहेत. कायगांवी कालचा मुहूर्त पेरायाचा होता. रानांत सजगुरे दहा ठिकीं होती ती मोडिली. दुसवटा पेरतील. सातारियांत खरीप थोडें बहुत आहे, पुढें रब्बी पेरतात. पानास निरख उत्तम साडेचार पावणेपांच आजकाल आहे. पानें खुडत असतात. काम कारभार सुरळीत चालतो. वेदमूर्ति हरि दीक्षित व नारायण जोशी व भिकाजी नाईक येथून भाद्रपद शुध्द द्वितीयेस स्वार होऊन पुण्यास गेले आहेत. तेथें पावल्याचें पत्र आले होतें. भटी गोष्टीं जालियावर पत्र आलें नाहीं. आलियावर लिहून पाठवूं. राजकीय वर्तमान; मागील महिन्यांत फार गलबला होता कीं सला बिघडतो. जानोजी निंबाळकर व हणमंतराव निंबाळकर व चंद्रसेनाचा लेख असे एकमत जाले. पंचवीस हजार फौज जथोंन व मोगल असे मिळोन पेशव्याशी बिघाड करावा. त्यांजकडील होळकर व सिंदे वगैरे अगदी फितव्यांत आहेत. अवघ्यांचे वकील आले आहेत. होळकराकडे मोंगलाकडून सैफुल्लाखान व मल्हारपंत किंभुवने असे गेले आहेत. होळकर इकडे येणार असें वर्तमान होतें. तें एक दोन पत्री वडिलांस लिहिलेंच आहे, त्यांवरून विदित जालें असेल. सांप्रतकाळी विशेष कांहीं गलबल दिसत नाहीं. सैफुल्लाखान व मल्हारपंत गेले होते त्यांचा मतलब, किल्ले होळकरानें दहा बारा घेतले होते, ते व घाटाखालें चार पांच परगणे, माणिकपूज, राजदेहर व वेताळवाडी व चाळीसगांव, दौलताबाद, सरकारचे जप्तींत होते ते सोडवावें. त्यास होळकरानें आठ किल्ले निकामीं टेकडया सोडिल्या, व दौलताबाद सरकारचे पांच परगणे खानदेशांत ह्मणून दबाविले होते ते सोडिले. कागदपत्र देऊन वाटें लाविलें, आणि राजश्री राघोबादादा यांस बराबर घेऊन हिंदोस्थानास कूच करून गेले.