Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

ऐसा तिचार केला. चव्हाणाचे विद्यमाने महाराजाकडे कारकून जाऊन हें विशमतेचें वर्तमान सांगितले, आणि तेथें चव्हाणांनी आंगेज केला. त्यावरून महाराजांनी हा मजकूर आरंभिला, व शिदोजीबावाचे कारभारी यासी महाराजांनी बोलाऊन नेऊन आज्ञा केली जे, येसाजी थोरात याची दौलत तुह्मी अनभविता, त्याचे मुलास खावयासि अन्न नाहीं, व त्याची घोडीपिडी त्याचे हवाली नाहीत, तुह्मी अवघी घेतली ऐशी बेमानी केली हे महाराजास मानत नाहीं, तरी याजउपरी त्याची पागा वगैरे जें बिछात असेल ती त्या मुलाचे हवाली करणें, त्यांची दौलत ते करतील, तुह्मांस त्याचे दौलतीस समंध नाहीं. ऐशे सांगितलेवर, शिदोजीबावा याजपाशीं कारभारी यांनीं आज्ञेप्रमाणें सांगितलेवर, बावांनीं फिरोन बापूजीपंतास पाठविलें जें, त्यांची घोडी त्यांजपाशीच आहेत, आमचा तालुका कांही नाहीं, खर्च मात्र आपण चालवितों, आणि शिकारोखा त्यांचेच नांवचा करतो, हिशेबकितेबही त्यांचेच कारकून करतात, आपण या गोष्टीस अलिप्त आहों, कोणी सांगितलें या गोष्टी बातील आहे, ऐसे सांगणें, त्यांची सरदारी महाराजांनी आपले गळी घातली, त्याजपासोन त्यांचा मनसबा आजिपावेतों राखिला, त्याजमुळें कर्ज आपले माथा भारी जाहलें, ऐसें असोन महाराज ऐसें ह्मणतात, यावरून हे गोष्टी अपूर्व आहे. ऐसें सांगितलेप्रमाणें फिरोन महाराजापाशी सांगितलेवर, हे गोष्टी तुह्मी ह्मणता तरी शिदबांनी येथे यावें आणि बोलतां याप्रमाणें आपनाशीं बोलावें ह्मणून बोलिलेवर, बापूजीपंत येऊन सांगताच शिदोजीबावा पांच सात लोकांनिशी सदरेस गेले. तेथें बोली घातली. यांनी जो मजकूर होता तो सांगितला ! परंतु महाराजाचे चित्तास ते गोष्टी नये. मग नजर एक प्रकारची धरून त्याची पागा आणवणें ह्मणून बोलिलेवर, यानें महाराजास सांगितलें कीं, महाराज ! त्यांची पागा त्यांजपाशीच आहे, त्यांस बोलाऊन आज्ञा करावी, ते आपली पागा वगैरे जें कांही असेल तें घेऊन येतील, आमचा आडथळा कांही नाहीं. ऐसें ह्मणतांच उदाजी थोरात यासी महाराज यांनी सांगितलें कीं, तुह्मी आपली पागा घेऊन येणें. ऐसे बोलोन आपले हुजरे बराबर दिले. त्यांनी जाऊन आपली पागा, जैशी तालुकांती होती तैशी, आपली घेऊन येऊन जवळ उतरले. निशाण नगारा वगैरे जे काय बिछात होती ती अवघी घेऊन आलेवर, शिदोजीबावास बोलों लागले जे, याजउपरी तुह्मीं या मुलाचे ताबिजातीस राहणें, आणि याची बंदोबस्ती चव्हाणाशीं सांगितली आहे ते करितील. ऐसे बोलताच शिदोजी बाबांनी उत्तर दिल्हे जें महाराज ! हे गोष्टी आपणास होणें नाहीं, त्या मुलाचा तालुका होता तो गुदरला, आपण चाकरी करीत नाहीं, लोकांची देणीघेणीं व कर्जे भारी जाहलें, हें महाराजांनी त्यांचे त्याजकडोन वारवावें आणि आपणास निरोप दिल्हा ह्मणजे जाऊं ऐसें बोलतांच महाराजांस विषाद येऊन बोलों लागले जे, जाखलेचें ठाणे आमचे येणें त्याचा जामीन देणें आणि तुह्मी निरोप घेऊन जाणें. ऐसा पेंच घातला. तेव्हा जामीन कोणी द्यावा त्याचे नांव घेतांच न घेऊं ह्मणत. चव्हाणांचे नाव घ्यावें, त्यास जामीन द्यावें, ऐसे महाराजांचे मानस.

तेसमयीं घोडा व बिछात होती ती कर्जदारास व लोकांस देऊं लागली. मग तेसमयीं सर्वांनी विचार केला कीं, या नायकीस आव शिदोजी थोरात यांनी घालावा, लोकांचा दिलासा करून कर्जदारांचा हवाला घ्यावा, आणि हे नायकी थोर आहे, बुडवूं नये. ऐवे समस्तांनी शिदोजीबावास सांगून उभे केले. तेव्हा यांनीं गोडाबाईपाशीं जाऊन अवघे लोकांची व कर्जदारांची निशा केली. त्यावर गोडाबाईनें अग्नप्रवेश केला. पुढें येसबाची नायकी गळा पडली. मूल लहान, तेव्हां महाराजांपासोन पूर्ववत् सरंजाम करार करून मुलाचे नावें सनदा करून घेतल्या, व शिरपाव मुलास देवविला. शिक्का रोखा येसबाचे भावाचे नांवें चालवून तमाम नायकीचा बंदोबस्त केला. तेव्हां कर्ज भारी जाहले; आणि चव्हाणाशीं दावा जबरदस्त; लोक भारी ठेवावे लागले याजमुळें कर्जाशी समंध पडला. तंव पुढें कोल्हापूरचा वेढा उठून माघारा गेला. मग आपले बापानीं फौज भारी ठेऊन सातारेपावेतों धामधूम आरंभिली. आष्टेचे ठाणेस येऊन वेढा घातला. तेव्हां श्रीमंत राजश्री बाबामंत्री यांचा जिल्हा होता. धामधूम जाहली. मग महाराजांनी राव प्रतिनिधीस जिल्हा सांगितला. इसलामपुरी बापूजी रायाजी भारी जमावानिशीं ठेविलें, व अष्टेंत अण्णापा मामा ठेविले. ऐशी बंदोबस्ती करून राव प्रतिनिधी इसलामपुराहून माघारा गेले. तव प्रजन्यकाळ आला. शिदोजीबावा पनाळियास होते. तें ठाणें पावसाळयामुळें न सोसे. मग महाराजापाशीं जाखले ह्मणून एक दिवशीं हे स्वारीस गेले ते संध पाहून, चव्हाणांनी जाखलीस येऊन, पागा तेथें होती ती ६५ घोडीं घेऊन गेले. हे स्वारीहून माघारे आलेवर, चव्हाणाशी कजिया युध्दाचा करावा ऐसें केलें. तेव्हां लोक भारी आणखी ठेवावे लागले. त्यामुळे आणखी कर्ज भारी जाहलें. मग महाराजांनी विठोजी चव्हाणाशी सांगून घोडी नेहली व देवविली; उभयतां भांडू नयें ऐसें केलें. परंतु किलाफ जबरदस्त! येसबाची क्रिया जाहली तेव्हा बारावे दिवशी कावळा पिंड न शिवे. तेसमयीं आपले तीर्थरूप यांनी चव्हाणाशी दावा राखितों ह्मणून बोलताच कावळा पिंड शिवला. ते ईर धरून विरोध राखितच गेले. प्रजन्यकाळ जाहलेवर संभाजी माहाराज यांनी पनाळेहून उतरून चिकोडीपाशीं जाऊन फौज जमा करूं लागले. जाखलेस खासा महाराज येऊन शिदोजीबावास जमावसहित बराबर घेऊन गेले. व विठोजी चव्हाणही बराबर होते. पुढें पिराजी घोरपडे कितेक काटक ठेवून येऊन भेटलेवर शिदोजी घोरपडेही येऊन भेटले. जमाव भारी जाहला. इलाचीबेग हुकेरी कडून पिराजी घोरपडे याचे विद्यमानें भेटले. पुढें कूच करून लष्कर नागपूरनजीक कंकणवाडीस मुक्कामास गेले. ते वख्ता त्या मोकामावर येसबाचे मातोश्रीस भर भरून सांगितलें की, तुझी मुले नेणती, शिदोजी थोरात याचें पळणे भारी पडलें, पुढें घोडीपिढीं अवघी घेऊन तुमचें काहींच नाहीसें करतील, तरी तुह्मी महाराजाकडे जाऊन संधान विठोजी चव्हाण याचे विद्यमानें करून आपली नायकी सचंतर करावी.

हत्तीविशीं बहुत कांहीं अर्ज केला. परंतु हत्ती महाराजांनी दिला नाहीं. मग तेथें खट्टे होऊन हत्ती महाराजांस देऊन, निरोप घेऊन, अष्टेस आलेवर, विठोजी चव्हाण गोटखिंडींत महाराजांनी कांही सरंजाम देऊन ठेविले होते ते अष्टेस येऊन, येसबांनी व चव्हाणांनी मनसबा केला जे, याउपरी या राज्यांत राहूं नये, संभाजी महाराज यांचे चाकर व्हावें. ऐसा विचार करून पन्हाळियासी महाराजांकडे राजकारण आपा प्रतिनिधी याचे विद्यमानें केलेवरी, प्रतिनिधी अष्टेस येऊन येसबाव व विठोजी चव्हाण यासी घेऊन गेले. महाराजांचे दर्शन जाहलें. येसबास सेना खासखील किताब देऊन, नवा लक्षांची दौलत विजापूर प्रांतें दिली. विठोजी चव्हाण यासी पन्हाळेपासोन सातारेपावेतों सरंजाम दिला. आपले बाप शिदोजी थोरात पुन्हा येळावींत येऊन राहिले. पूर्ववत् सरंजाम करार महाराजांनीं करून दिला. ऐसे एक वरीस होते. येसबा विजापूर प्रांती गेले. विठोज चव्हाण पन्हाळेस राहिले. सातारेपावेतों ढोणा जाहला. तेव्हा थोरले पंतप्रधान दिल्लीहून सातारेस आलेवर, महाराजांनी दक्षण प्रांती मोहीम सांगितली. हें वर्तमान ऐकून येसबा अष्टेस आले. तंव पुढें, रावप्रधान फौजा घेऊन दुसरे रोजी अष्टेस गांठ घालावी या विचारें निघोन आले. हें वर्तमान येसबास कळतांच रातोरात ठाणेंत कांही लोक ठेऊन पन्हाळेस मुलोंमाणसें घेऊन गेले. आपले तीर्थरूप दुसरे दिवशीं फौज अष्टेस दाखल जाहलेवर येळावीहून निघोन पन्हाळेस गेले. आपण व आपले भाऊ लहान होतो. निघोन जावयासी फुरसत नाहीं. मग भिलवडींत आमचे मातोश्रीस ठेविलें. तेथें लपोन होतों. तेव्हां लष्कर अवघें जमा अष्टेवर जाहालें. थोरले पंतप्रधान व पंत मंत्री ऐसे हेही मानोन आलेवर, कोणी चहाडी करोन आपले मातोश्रीस व आपणास भिलवडीहून लष्करास धरून आणून राजश्री पिलाजी जाधव यांचे स्वाधीन केलें. त्यांनी कैदेतच ठेविलें. तेथून लष्कर जाऊन कोल्हापुरास वेढा घातला. एक रोज पन्हाळेवर चालोन येत असतां येसबाचे फौजेस गांठ पडली, युध्द जाहालें, येसबास भाला लागला, तेंच जखमेनें मृत्यु पावले. आपले तीर्थरूप आपले जमावानिशी जवळच होते. येसबाचे पोटीं संतान नाहीं. धाकटे भाऊ चौघे होते. ती लहान मुलें. त्यांची मातोश्री सईजी आवा होती. नायकीस आव पडे ऐसे कोणी नव्हते. आणि विठोजी चव्हाण यांसी दावा लागला असे, ऐसी संध पडली. येसबाची बायको गोडाबाई होती, तिनें सहगमन केलें.

येसबास निरोप दिला, आणि आपले जागा विचार केला जे, सकाळीं फौजा येऊन गांठतील. या जागा राहिलियानें अब्रू राहणार नाहीं. मग गांवास आगी घालोन रातोरात मुलेंमाणसें व जमाव आपला घेऊन पन्हाळेस गेले. तेथें माचीस जाऊन राहिलेवर महाराजांचें लष्कर इसलामपुराहून कूच होऊन खेडपुणदीवर मुक्काम जाहला, येळावीस ठाणें पाठविलें. आणि महाराज फिरोन माघारे साताऱ्याकडे गेलेवर संभाजी महाराज यांनीं मनसुबा आरंभिला. आपला जमाव पिराजी घोरपडे व शिदोजी घोरपडे व शिंदे, नरगुंदे अवघे जमाव करीत चालले. आपले तीर्थरूप बरोबर होते. भारी जमाव करून, महाराजांनीं तोरगलाहून कूच दरकूच करून येऊन, अष्टेचे ठाणेस वेढा घातला. तेव्हां येसबा येऊन भेटले. आणि ठाणें पंधरा दिवसांनीं घ्यावें, ऐसा करार केला. लष्कर कूच होऊन शिराळेस गेलें. तेथें सूर्याजी थोरात, आपले चुलते होते. तेंही ठाणें घेऊन, त्यास कैद करून, वडगांवास जाऊन वेढा घालून बैसले. येसबास कैदेंत ठेविलें होते, ते शिराळेचे तळावरूनच रात्रीं निघोन इसलामपुरास आले. तेथें राजश्री बाळाजी विश्वनाथ होते, त्यांची भेटी जहालियावरआपला जमाव अवघा अष्टेंतच होता. सडे राहिले. आणि सातारेस महाराजस्वामीस विनंतिपत्र लिहिलें कीं, वडगांव घेतांच अष्टेस महाराज येऊन बैसतील, एसमयीं उपराळा केलियानें हा मुलूख महाराजांचा राहतो, व आपली अब्रू राहती. ऐशीं पत्रें पाठविलीं. तंव महाराजांनीं राजश्री रावप्रतिनिधीस रवाना केलें, व फत्तेसिंगबावा भोसले तुळजापुराजवळ भारी फौजेनिशीं होते, त्यास हुजरे पाठऊन आणिलें, उभयतांची भेटी मौजे बुरलीवर जाहली. येसबाही प्रतिनिधीस भेटलेवर तेच रोजीं फौजा चालून वडगांवावर गेल्या. युध्द बरेंच जाहलें. संभाजी महाराजांचा मोड जाहला. तेव्हां अवघें लष्कर लुटलें, व कितेक सरदार धरून आणले. व महाराजांची मातुश्री सांपडली. सडे महाराज पन्हाळेस निघोन गेले. आपले तीर्थरूपही पळोन पन्हाळेस गेले. रावप्रतिनिधी व फत्तेसिंगबावा फत्ते करून २७ हत्ती सांपडले ते घेऊन, अष्टेस मुक्कामास आले. येसबास हत्ती तखताचा गजराज सांपडला होता तो तैसाच अष्टेंत राहिला. दुसरे रोजी येसबास अष्टेंत ठेऊन, प्रतिनिधी व फत्तेसिंगबावा सातारेस महाराजांचे दर्शनास गेलेवरी, महिना दीड महिना जाहला. तंव हत्तीचा मजकूर महाराजांपाशी जाहला. तेव्हां हत्ती घेऊन दर्शनास येणें ह्मणून महाराजांनी हुजरे पाठविलेवर येसबा साताऱ्यासी गेले. महाराजांचे दर्शन जाहलें.

तुह्मांस दुसरी देऊं ऐसें सांगून पाठविलें. मग आपले बाप बहुत अजूरदे होऊन तिघा भावांपाशीं व वडील बापही होते त्यांजपाशीं हा मजकूर सांगितला. तेव्हां त्यांनीं सांगितले कीं, तुह्मीं वडील भावाशीं अमर्यादा करावीशी नाहीं, तरवार आपले घरींच आहे, बाहीर कोठें गेली नाहीं, आह्मी भाऊ अवघे त्याचे मर्यादिंत आहों, तंव नायकीस आब आहे. नाहींतरी घरकलहानें अपाय होईल. ऐसें सांगितलेवर आपले बापांनीं गोष्टी मान्य केली. आणि बाहीर चाकरीस जाऊन सचंतर आपलें जितरब मिळविलें. सुभानजीबावा आष्टेंत नांदत असतां निधन पावलें. तेव्हां त्यांचे पुत्र यशवंतराव थोरात जवळ होते, त्यांनीं सर्व अंगेजणी नायकीची केली. कृष्णाजी बावास जवळ ठेवून घेतलें. सूर्याजी बावाही बाहेर पाटीलकी करावयास राहिले. फिरंगोजी थोरात बोरगांवीं राहिलें. आपले बापांनीं नारोपंत घोरपडे यांची चाकरी कबूल केली. त्यांनीं मिरज प्रांते सरंजाम दिला, आणि येळावी राहावयासी जागा दिल्हा. तेथें येऊन राहिले. शेंपन्नास प्यादे व तीस चाळीस राऊत करून आपलें पोट भरीत होते. येसबा अष्टेमध्यें होते. तेव्हां कऱ्हाडीं व मिरजेंत मोंगलांची ठाणीं होतीं. मुलुख गैरकबजी होता. पुढें येसबाचा व संभाजी महाराज यांचा बेबनाव जाहला. तेव्हां त्यांची चाकरी सोडून, महाराज छत्रपती सातारा होते त्यांस येऊन भेटले. आपले बापासही बरोबर येणें ह्मणून बहुतसा आग्रह केला, परंतु त्यांचे विचारास गोष्ट न आली. हे संभाजी महाराज यांचे राज्यांत घोरपडयांचे चाकर ह्मणून जैसे होते तैसेच राहिले. ऐसें वरीस एक होते. तंव पुढें थोरले पंतप्रधान यांनीं सैदाचा तह केला, तेव्हां भिवरेऐलकडील ठाणीं मोंगलाचीं उठविलीं. कऱ्हाडी पडदुलाखान होता त्याजवर महाराज स्वामी खासाच चालून आले, तों तो निघोन इसलामपुरास आला. कऱ्हाडीं ठाणें घातलें, आणि इसलामपुरास वेढा देऊन बैसलें. तेव्हां येसबा राजश्री स्वामीबरोबर होते. आपले बाप येळावींत होते. मोंगलाशीं सल्ला करून मिरजेस लाऊन दिला, आणि इसलामपुरीं ठाणें बैसविलें. तेसमयीं येसबास महाराजांनीं बोलाऊन सांगितलें कीं,तुमचे चुलते येळावींत आहेत, त्यांजपवेतों तुह्मीं जाऊन, त्यांस विचार सांगून, दर्शनास घेऊन येणें, सर्वप्रकारें त्यांचें चालवूं. ऐसें सांगून पाठविलें. ते येळावीस गेले, तीर्थरूपाची भेट घेतली, आणि महाराजांचे आज्ञेप्रमाणें अवघा मजकूर सांगितला; परंतु तीर्थरूप शिदोजीबावा यांचे विचारास ते गोष्टी न आली.

[४५३]                                                                        श्री.                                                                     

करीना जिवाजी बिन् शिदोजी थोरात यांनीं लिहून दिला करीना ऐसाजे. शिवाजी पाटील याचे पुत्र पांच जण, वडील सुभानजी थोरात, त्याचे पाठीचे कृष्णाजी थोरात, त्याचे पाठीचे सूर्याजी थोरात, त्याचे पाठीचे फिरंगोजी थोरात, त्याचे पाठीचे शिदोजी थोरात. ऐसे ५ जण भाऊ एकत्र मायबापदेखील असतां अवघे प्रबुध्द जाहले. बापाचे वेळेस नाचार होता, व दोनी वतनांचाही थाक नव्हता. तेव्हां शिवाजी पाटील यांनीं लेकांस सांगितलें कीं, तुह्मी शहाणे झाला व कर्ते पुरुषही झाला, याजउपरि आपलीं दोनी गांवचीं वतनें साधावीं. या गोष्टीची ईर घातलियावर, अवघे भावांनीं विचार केला कीं, वडिलांचें वतन आपले दाईज मानीत नाहींत, याचा विचार करावा तरी या गोष्टीस आधार पाहिजे व आपलेजवळ पुरतेपणीही पाहिजे. ऐसा विचार केला आणि दवलत एकत्र असतां मिळविली. ७५ घोडे घरचे झाले, व बैल शंभर, ह्मैशी पन्नास पाऊणशे, गाई तीन चारशें, व दाणादुणा व वस्तभाव मिळविली. दोन्ही गांवचीं वतनेंही साधिलीं. वडील भाऊ सुभानजी थोरात याचे आज्ञेंतच भाऊ राहिले. ऐसा कित्येक दिवस कालक्षेप जाहला. तव पुढें कितेक दिवशीं घरांत कटकट निर्माण जाहली, त्यामुळें अवघें भाऊ वेगळे बाहीर गेले. परंतु कोणासही घोडे अगर इतर कांहीं दिलें नाहीं, सडेच आपल्या बायका घेऊन निघाले. आणि बाहीर जाऊन, आपले पराक्रमें चौघानींही पोट भरून राहून, वडील भावाचे मर्यादेसही अंतर केलें नाहीं. वांटणीचा मजकूर कृष्णाजी बावांनीं सुभानजी बावास पुशिला. तेव्हां त्यांनीं निष्ठुर जाब दिला. पुढें कटकट वाढावी तरी सर्वांनीं विचार केला कीं , आह्मीं अवघियांनीं वडील भावाशीं कटकट करावी तरी अजीच नायिकी मोडती, जोंवर आह्मांस बाहीर आपले पराक्रमें मिळतें तोंवर मिळवितच असों; निदानी बिछात आमची पांचांची आहेच. ऐसा विचार करून वडील भावाशीं कटकट न केली. पुढें कितेक दिवशीं सुभानजी बावांनीं मनसबा केला कीं, आष्टेचें ठाणें घ्यावें आणि जागा बांधून राहावें. तेव्हां चौघाही भावांस बोलावून हा विचार पुशिला. तेव्हा त्यांनी त्यांची आज्ञा मानून त्यांजबरोबर जाऊन अष्टेचें ठाणें घेतलें. त्यावर वडील भाऊ राहिले व चौघा भावांचीं मुलें माणसेंही तेथें राहिलीं. हरकोठें पोट भरून मागती गांवांत येऊन राहत होते. कज्जा खोकलेस सामील होते. वडिलांची बहुतशी मर्यादा रक्षूनच होते. ऐसे कितेक दिवस जाहले. नंतर आपले बाप शिदोजी थोरात हे मिरजेस चाकरीस गेले. तेथें घोडा मिळऊन शिलेदाराची चाकरी करीत असतां, झुंज गनीमाशीं जाहलें. तेव्हां झुंजांत तरवार चोखट बापास सांपडली. एक दोन घोडेही जाहले. मग भावाचे भेटीस आले. भेटी जाहलेवर एक दिवशीं तरवार पहावयासी आणविली. तेव्हां ती तरवार चखोट पाहिली, आणि ठेऊन घेतली.

[४५२]                                                                        श्री.                                                                     १४ मे १७५५.

पौ ज्येष्ठ शुध्द ८ मंगळवार
शके १६७७ युवानाम.

तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्येसमान बाळकृष्ण दीक्षित सा नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. यानंतर वडिलांनी हरिदास कृपाराम याचे कोठेयांत पत्र पाठविलें तें पावलें + + + + + राजश्री रघुनाथपंत व राजश्री मल्हारजी होळकर ग्वालेरीकडे आले आहेत. वडिलांस कळतच आहे. बहुधा तिकडे येतील. रा जयाजी शिंदे मारवाडांतच आहेत. सार्वभौम हस्तनापुराबाहेर निघाले आहेत. बेखर्च आहे. पुढें होईल तें पहावें. काशींत सांप्रती चैन आहे. + + + + + बहुत काय लिहिणें हे नमस्कार. मित्ती अधिक ज्येष्ठ शुध्द ३ बुधवार.

[४५१]                                                                        श्री.                                                                    २३ फेब्रुवारी १७५५.

पौ फाल्गुन वद्य १ गुरुवार
शके १६७६ भासनामसंवत्सरे.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशललेखन करावें. यानंतर आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लेखनार्थ सविस्तर अर्थ अवगत जाहला. ऐशियास तुमची आमची भेट जाहली पाहिजे. याजकरितां भेटीस यावें. आह्मीं मजल दरमजल नगरचें सुमारें लौकरच येतों. येतेसमयीं खानाकडील मल्हारपंतही बरोबर घेऊन यावें. आपली आमची भेटीनंतर खानाकडील कामकाजाचा जाब ठहराविला जाईल. लौकर यावें. छ ११ जमादिलावल. हे विनंति.

[४५०]                                                                        श्री.                                                                     ७ जानेवारी १७५५.

पौ माघ शुध्द ३ बुधवार
शके १६७६. भावनामसंवत्सरे
तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी :-

अपत्यें बाळकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक सा॥ नमस्कार विनंति येथील क्षेम तागाईत पौष वद्य ११ भौमवार जाणून स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. यानंतर तुह्मांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सदैव आशीर्वादपत्र पाठवीत गेलें पाहिजे. विशेष. आपण येथून स्वार होऊन गेले त्यापासून आज तागाईत हिशेब तुमचा पाठविला आहे तो पहावा. हरिदास कृपाराम याची दुकानीची हुंडी चौत्तीस हजार व बनवारीदास हजारिया याचे दुकानीची रुपये सहा हजार येणेंप्रमाणें चाळिस हजार याच्या पाठविल्या, त्याचे रुपये पावले ह्मणून वर्तमान आलें. व हल्ली हुंडी पंधरा हजारांची मनसारामाचे हातींची शहरीं दुकान हरिश्चंद किसनचंद याचे दुकानीची पाठविली आहे. अवघे रुपये आठेचे. विशेष, मातुश्री राधाबाईंनीं दहा हजार रुपये आह्मांस येथें घराबद्दल देविले. त्यांस तों देवाज्ञा जाहली. आपण दुर्गाघांटास त्या ऐवजपैकीं खर्च करणें ह्मणून सांगितलें. त्यास रुपये ३१५० लागले. बाकी राहिले त्यास रो रघुनाथ बाजीराव यांनीं दिल्लीहून आह्मांवरी हुंडी दहा हजारांची केली आहे. आपणांस कळावें ह्मणून लिहिलें असे. विशेष. गतवर्षी शिवभट यांनी रु॥ दिल्हे. यंदां मकसुदाबादेंत रु॥ तों वसूल जाहले. हुंड्या अवरंगाबादेच्या तीन लक्ष पांचा हजारांच्या शिवभट यांच्या जोगच्या नागपुरास गेल्या. दुसऱ्या हुंडया कांहीं नागपुरास व कांहीं अवरंगाबादेस होतील. शिवभट तों नागपुरीं राहिले. शिवभटाचे तर्फेनें राजमाजीपंत व सिताराम न॥ मकसुदाबादेंत आहेत. शिवभट असता तरी ऐवज पावता होता. येथून आह्मीं पत्रें मकसुदाबादेस लिहिलीं आहेत. विशेष. शिवभट साठे यांजकडील ऐवज येथें येईल. त्यापैकीं येथें गवगव पडली तरी तुह्मावरी हुंड्या करून ऐवज द्यावा. येथून ऐवज मागेंपुढें पाठऊन देऊं. जरी सोय पडली तरी हुंडी करून तुह्मी दोन पत्रें दोघा काशीदांबरोबर पाठविलीं तीं पावलीं. लिहिला अर्थ कळूं आला. चाळिसा हजारांचा जाब पावलियाचा पा तो पावला. याजवरी तुमचा हिशेब काशीखातेपैकीं वडिलाकडे काय ? आणि शहरच्या खात्यांपैकीं आह्मांकडे काय? ऐसें इ॥ त॥ लेहून पाठविलें आहे. समजोन घ्यावें. ऐशीयास काशिताबो उत्तर पाठवावें. काशीदास रु॥ २ दोन द्यावे. आमचे नांवें ल्याहावे. जमा करून हुंड्या सकारून काशीदास सत्वर रवाना करावा. मनसारामाचे हातींची हुंडी आहे. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार.

[४४९]                                                                        श्री.                                                                         १७५४.

शके १६७६.

वेदमूर्ति राज्यमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. खानांनीं भेटीस बोलाविलें होतें. नवाबापासून रुसकत होऊन आलों. नवाबाची मर्जी मिजाज विलक्षण जाली, याचें आमचें बनत नाहीं. आह्मांस दौलत नलगे, मक्केस जावें किंवा घरी बसून रहावें, या भावें आह्मीं नवाबास इस्ताफाही लेहून पाठविला ह्मणाले, उत्तर आलियावर सांगू बोलले. हें वर्तमान आपणांस कळवावें ह्मणाले ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास नवाब नासरजंग यांची मिजाज दाबआदाब भिन्न आहे. खानही पहिल्यापासून जाणतात. थोरले नवाबाची गोष्ट ह्मणावी तर त्यांनीं ऐकिलें देखिलें फार होतें. कोण्हा मनुष्याची कदर काय ? कोण मनुष्य कोण्या उपयोगाचे ? तें ते सर्व जाणत होते व कृपाही करून वाढवीत होते. त्यांची गोष्ट निराळी. हें तो गर्भांध आहेत. तथापि कालगतीवर दृष्टी देऊन खानांनीं आपले चित्तांतील आशय करीत असावें. येणेंकरून आपलें तेज राहून विचार स्वरूप अवकाशें होईल. केवळ एकाएकीं चढी घ्यावें, त्यांची मर्जी खप्पा करावी, त्यांणीं दूरदेशविचार चित्तांत आणावा, तर तेथील सार कळलाच आहे. यास्तव आमच्या विचारें तटीं न लावावें. वरकड खानासारिखें मनुष्य दिल्लीस गेले तरी जागा आहे. व हें तो घर त्यांचेंचअसें भाजीभाकर मिळेल तें देऊं. सारांश, तटीं न घ्यावें ह्मणून सांगावें. दौलत, ऐश्वर्य देणें ईश्वराचें आहे. केवल त्याच्या विलक्षण पदार्थावरी आपण संतोष पावावा असें नाहीं. प्रस्तुत तों ते तिकडे गुंतले आहेत. बादज-बदसात येतात किंवा चंदावर फुलचरीवाला यांणीं शौरवी केली तिकडेच गुंततात, कसें करितात तें कळेल. निरंतर वर्तमान लिहित जावें. आह्मांस सुचेल तें लिहीत जाऊं. खानास आपले जाणतों. ज्यांत त्यांची अब्रू तें करावयास अंतर करणार नाहींत. हें घर त्यांचे आहे. विस्तार काय लिहावा. सलोख्यानें नवाब याशीं राहणें. + + + + + +