Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२४. १७०२ वैशाख व।। ३.
सन इहिदे समानीन. श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. गुजराथचें वर्तमान तपसीलें पेशजीं नवाबबहादर यांचे आंचीवर लिहिलें त्यावरून कळलें असेल. अलीकडील मजकूर तरी, इंग्रजांचे लोकांस सरकारफौजापुढें दम निघेना. उंटे, बैल लुटले गेले. सबब हाटून बडोद्यास गेले. फौजाही पाठीवर आहेत. त्याउपरी कांहीं पलटणेंसहीत इंग्रज कही भरावयास आले. तेथें सरकार फौजेनें गांठ घातली. तेथें लढाई जाली. पलटणें हाटऊन कही लुटली. कांहीं छकडेही आणले. बडोद्यास दाणा चारा मिळत नाहीं. सबब तेथून कूच करून भडोचास जाणार; तेथून सुरतेच्या आस-यास जावें ऐसें आहे. गाडर याणीं भडोचकरास रसद पाठवून देण्याविसीं लिहिलें. त्याचें उत्तर भडोचकरांनीं लिहिलें कीं, रसद तुह्मांस पोंहचणार नाहीं, तुह्मींच निघोन येणें. त्यावरून गाडर जाणार. फौजाही लागून आहेतच. होईल तें मागाहून लिहिण्यांत येईल. र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२३. १७०२ वैशाख व।। ३.
सन इहिदे समानीन. श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. भोंसले यांची फौज बंगाल्याकडे गेली. त्यास, कटकपावेतों दोन महिन्यांची वाट; तोंपावेतों तालुका यांचाच. हालीं पत्रें आलीं कीं, फौजा बंगाल्याचे सरहदेस गेल्या; लौकरच त्यांचीं मकानें व जागे यास इजा होईल. ऐसीं पत्रें आलीं. र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२२. १७०२ वैशाख व।। ३.
सन इहिदे समानीन. श्री. २१ मे १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. सरकारची व नवाबबहादर यांची दोस्ती जाली. इंग्रजांचें पारपत्य करावें ऐसें ठरलें. तरफैन सलाहखेरीज सलूख सहसा न करावा ऐसें जालें. त्याप्रमाणें सरकारच्या फौजा व सरदार जाऊन आज तीन महिने लढाई बेजरब शुरू आहे. बहादराचें निघणें होत नाहीं. मसलत मोठी असें असतां लिहिण्याखालीं दिवस गेले. राव सिंदे यांचें पत्र इतके दिवस वाटेच्या खलशामुळें न आलें. ह्मणोन मसलतीस दिवस घालवावे हें काय ? पत्र आघेंमाघें येतेंच आहे. याप्रमाणें घडत नाहीं. जाण्यास दिवसगत लागली याजमुळें लोक तर्क करतात कीं, नवाबबहादर निघत नाहींत, गुजराथेंत फौजा गेल्या यांचें कसें होतें आहे हें पहातात. ऐसियास, स्नेह दोस्ती जाली तेथें हें नसावें. सरकारच्या फौजांनीं इंग्रज तंग केले आहेत, नीटच आहे. अगर काय? इकडे अथवा नवाबबहादराकडे लढाई आहे त्यांत कमपेश जालें तरी त्याजवर नजर असावी कीं काय ? जे मसलत केली ते केली. त्यांचें कसें होतें या पाहण्यानें लोकांस तमाषविनी दिसते. मसलत एक, तेव्हां सर्वांनीं त्यास झोंबून ज्याबज्या ताण द्यावे हीच चाल असावी. पहावें तसें करावें हें कायमीस नसावें. सर्व परजे नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहेत. ल्याहावें ऐसें नाहीं. तुह्मींही बोलावें. रा।। छ १६ जमादिलावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२१. १७०२ वैशाख व।। ३.
सन इहिदे समानीन. श्री. २१ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. शिंदे यांजकडील निभावणीचें पत्र आल्याचें वर्तमान नवाबबहादर यांस व आपणांस कळलें, याजकरितां छ १४ रोजीं राजश्री गणपतराव केशव यांचे नांवें पत्र व नवाबबहादर यांसीं अर्जी आनंदराव यांची आंचींवरून रवाना केलीं, ती पावून समाचार कळेल. हालीं शिंदे यांजकडील निभावणीचें पत्र व आपल्याकडून पत्र आल्याचीं उत्तरें सरकारचे सांडणीस्वाराबराबर रवाना करविलीं आहेत, पोंहचतील. त्याअन्वयें नवाबबहादर यांस सांगून सर्व कामेंकाजें उरकून सत्वर यावें. निरंतर पत्रीं सानंदवीत जावें. रवाना छ १६ जमादिलावल बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२०. १७०२ वैशाख व।। १.
सन इहिदे समानीन. श्री. १९ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णरावजी तात्या यांसीं:-
प्रती गोविंदभट निदसुरे. आशीर्वाद विनंतिः- येथील कुशल तागाईत छ १४ जमादिलावलपावेतों वर्तमान यथास्थित जाणून स्वकीये कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आपणांकडून पत्रें येऊन बहुत दिवस वर्तमान कळत नव्हतें. त्यास, हालीं सांडणीस्वार जोडीसमागमें छ १३ माहे मजकुरीं पत्र आलें. तेणेंकरून बहुत संतोष जाहला. असेंच सदैव पत्र पाठवून कुशलार्थ वरचेवर लिहीत असावें, तेणेंकरून समाधान होत जाईल. यानंतर इकडील सविस्तर वृत्त श्रीमंतांचे पत्रीं लिहिलें आहे, त्याजवरून सर्व कळों येईल. आपले घरचे पत्रें होतीं तीं सातारियास पाठविलीं आहेत. सरकारकार्य करून लवकर यावें. भेट होईल तो सुदीन. बहुत काय लिहिणें? लोभ करावा हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ११९.
१७०२ वैशाख शु॥ १२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. सरकारच्या फौजा सरदार व इंग्रज यांची लढाई गुजराथप्रांतीं शुरू जाली त्याचा ता। पेशजीं लिहिला आहे. त्याउपरी अलीकडील मजकूर तरीः- सरकारच्या फौजावर शबखून घालावा हा इरादा इंग्रजांनीं करून, रात्रौ पोख्त सरंजामानसीं चालून आले. हे बातमी अगाव थोडीसी राजश्री रावसिंदे यांस समजली होती. हेही तयार होऊन, गोटा बाहेर येऊन, मोकाबिल्यास उभे राहिले. तरफेन तोफांची मारगिरी जाली. शेवटीं इकडील लोकांनीं आगळीक करून आंत धसले. हत्यार चालिलें. दोहींकडील सें दिडसें लोक जखमी व ठार जाले. इंग्रजांकडील सरदार करनेल गाडर यांचा भाचा व तोफखान्याचा दारोगा व एक कोशलदार ऐसे तिघे ठार जाले. लढाई मोठी जाली. सेवटीं इंग्रजांनीं सांभाळोन निघोन आपले गोटांत गेले. फौजा पाठीवर होत्याच. त्यानंतर दुसरे दिवशीं सरदारांनीं उजनीकडून पेंढारी आणविले होते ते, बारा पंधरा हजारानसी येऊन दाखल जाले. त्यांस पोशाग वगैरे बहुमान करून इंग्रजाभोंवतें नेहमीं घेराघेरी करावयाचें काम सांगितलें. त्याप्रो। पेंढारी यांणीं नित्य तलावा करून, कहींचे बैल व उंटे, घोडीं, दोनचार वेळ वळून आणिलीं. बडोद्याहून रसद येत होती ते दरोबस्त लुटली. पुढें पकी बंदी केली. माणूस जाउं येउं न पावे, ऐसें जालें. तेणेंकरून इंग्रज तंग जाले. उपाये नाहीं. गिराणी बहुत जाली. तेव्हां, मनसब्यांत आले. कही बंद झाली जाणोन, कहीचा बंदोबस्त करून, दोन तीन पलटणें बराबर देऊन, कही पाठविली. त्यास पेंढारी बराबर जमोन समय पाहोन होतेच, त्यांणीं पाटिलबावा यांस इशारा केला कीं, आज कही पलटणासुद्धां भरावयास आले. यास्तव, अशांत कांहीं फौज यावी. त्यावरून, पाटिलबावा यांणी पांच चार हजार फौज व धारराव सिंदे पाठविले. यांणीं पलटणासी गांठ घातली. इकडे लढाई शुरू जाली. तिकडे पेंढारी यांणीं कही लुटली. लढाईही मातबर जाली. धारराव सिंदे यांचा बसता घोडा पडला. लोकही कांहीं ठार जखमी जाले. पलटणांतील इंग्रजी लोकही फार मारले गेले, इंग्रज खटे होऊन कही गमाऊन माघारे गेले. त्यानंतर दातकसाळीस येऊन दुसरे दिवशीं इंग्रज तीन कोस चालून आले. सरदारांनीं आपली जागा सोडून कोसपावेतों अंगांवर घेतलें. तेथून फौजा उलटून माघें इंग्रजांचा तळ व बुणगें होतें तेथें गलबल केली. इंग्रज सडे राहिले. निभाव होईना ऐसें जाणून, माघारे हाटून बडोद्याचे आस-यास गेले. फौजाही सभोंवत्या लागून गेल्या. नित्य घेराघेरी करितच आहेत. कही बाहेर निघों देत नाहींत; बंदी केली आहे. बडोद्यांतही पाणी, गल्ला, व चारा कमीच आहे. थोडेच दिवसांत आयास येतील. बडोदें जवळ होते ह्मणोन गेले. नाहीं तरी तळेगांवचीच गत होण्याची संधी होती. बरें! ईश्वरइच्छेनें घडेल तें दृष्टीस पडेल. अशांत नवाबबहादुर यांजकडून चेनापट्टणाकडे ताण बसता, ह्मणजे मोठी निकड इंग्रजास बसती. याउपरी तरी त्वरा व्हावी. दोन तीन वेळां लढाईंत मिळून हजार उंट व हजार घोडे पाडाव आणिले. सात आठशें माणूस इंग्रजांचें ठार मारिलें, इंग्रजांवर जरब बसवून उभयतां सरदारांनीं त्यांस पेंचांत आणिलें आहे. सुरतेकडे गणेशपंत बेहेरे फौजसुद्धां आहेत, त्यांणीं वरकड ठाणीं तो सरकारचीं बसविलींच होतीं. उरपाडचें राहिलें होतें तें हल्ला करून घेऊन, तीनसें माणूस इंग्रजाचें ठार मारिलें.
र॥ छ १० जमादिलावल हे विनंति.
पो। छ २६ जमादिलावल, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ११८.
१७०२ वैशाख शु॥ १२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरीः- राजश्री परशरामभाऊ फौजेसह करवीरचे मोहिमे आहेत. राजश्री येसाजी सिंदे यांजकडील गुमटास मोर्चे लाविले होते. तें ठाणें हल्ला करून घेतलें. आंतील कांहीं लोक मारले गेले, कांहीं पळोन गेले. तेथें ठाणें काईम करून, सिरवळास मोर्चे दिल्हे. दों ती दिवसांत सिरवळ घेतलें. एसाजी सिंदे करविरांतच आहे. याप्रमाणें वर्तमान आहे. तुह्मीं नवाबबहादर यांस सांगावें. कित्तुरकरांनीं सरकारांतील तालुक्यांत उपद्रव मनस्वी केले, याकरितां त्यांचे पारपत्यासही भाऊ जातील. रा॥छ १० जमादिलावल हे विनंति. पो। छ २६ जमा॥वल, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ११७.
१७०२ वैशाख शुद्ध १२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरीः- खुलग्याची लढाई जाली. तमाशा पहावयास नवाबबहादूर यांणीं बोलाविलें. कितेक मजकूर गुजराथ प्रांतींचा वगैरे विचारिला. येथें चर्चा गुजराथची व फितुरी याची मनस्वी उठती. याजकरितां वरचेवर पत्रें येत असावीं. राजश्री बाजीराव बर्वे यांस नवाबबहादर यांणीं निरोप दिल्हा, येथून जावें ह्मणोन साफ सांगितलें, ह्मणोन लिहिलें. ऐसियास, पेशजीं तुह्मांकडील पत्रांचे जाब व इकडील मजकूर सर्व लिहून रवाना केले ते पावले असतील. हालीं गुजराथेकडील व कोकणचे व फितूरीयाचे अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिलें त्यावरून कळेल. सरकार व शेहर आहे तेथें मनस्वी गपा उठतच आहे. हे चाल सर्वां ठिकाणीं. परंतु, त्याजवर काय मदार आहे? येथून लिहिण्यांत येईल तें खरें. जनाच्या मुखास हात कोठवर लावावा ? हालीं येथून विस्तारें लिहिलें त्यावरून कळेल. बाजीराव यास निरोप दिल्हा, योग्य केलें. नवाबबहादर यांची व सरकारची दोस्ती जाली. दुसरा प्रकार राहिला नाहीं. तेव्हां इकडील मुखालीफ तो नवाबाचा. तेव्हां समजोन त्यास नवाबांनीं निरोप दिल्हा, फार उत्तम केलें. बाजीरावांनी सरकारचा विरोध असेल, तेथें जाऊं नये, असा बंदोबस्त करून घेतलाच असेल. रा। छ १० जमादिलावल हे विनंति.
पो। छ २६ जमादिलावल सेन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ११६.
१७०२ वैशाख शुद्ध १२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरीः- राजश्री सदाशिव रामचंद्र वगैरे शागीर्द मंडळी दादासाहेबांकडील, पाटीलबावा यांजपासीं होते, त्यांणीं कांहीं फितूर केला, ते कागदपत्र पाटीलबावा यांस सांपडले, त्यावरून सर्वांस कैद करून, बेड्या घालून पायागडास रवाना केले. सदाशिव रामचंद्र यांस कैद करून उजनीस पाठविलें. यांत राजश्री चिंतो विठ्ठल नव्हते. ह्मणोन राहिले. दो चों रोजांनीं चिंतोपंत तयार होऊन इंग्रजाकडे जावें या मनसब्यानें निघोन गेले. ते वाटेंत तकव्याचे राऊतास सांपडले त्यांणीं धरून आणलें. तेव्हां त्यांसही कैद करून उजनीस रवाना केले. याप्रमाणें तिकडील ग्रंथ जाला. लबाड, क्रियानष्ट, यांचा कोठें परिणाम लागतो? शेवटीं होण्याचें तें जालें. फजीत पडले. तसेंच पुण्यांतील फितुरी झाडून धरून कांहीं किल्ल्यावर घातले. कांहीं द्रव्यहारण करून आपापले घरीं पुणियांतच चौकींत ठेविले. ऐकूण पका बंदोबस्त केला. हें सर्व वर्तमान तुह्मीं नवाबबहादर यांस सांगावें. पकी दोस्ती जाली तेव्हां तर्फेंन वर्तमान कळत असावें. सबब लिहिलें असे. रा।। छ १० जमादिलावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ११५.
१७०२ वैशाख शु।।१२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. सरकारांतून ममईची बंदी करवून खुसकींतून गल्ला वगैरे कांहीं जिन्नस जाऊं न पावे ऐसें केलें. यामुळें ममईस गल्ल्याची बहुत महर्गता जाली. त्यावरून इंग्रजाकडील पांचसातसें माणूस व कांहीं पांच चार तोफा ऐसे बेलापुरास येऊन गला भरला. बेलापूर जागा काईम करोन तालुकियांत शोखी करूं लागले. हें वर्तमान येतांच येथून कांहीं स्वार व गाडद रवाना केली. मागाहून राजश्री बाजीपंत व राजश्री सखारामपंत पानसी ऐसे सरंजामसहित रवाना केले. यांची त्यांची लढाई जाली. सहा घटकापावेतों दुतर्फा तोफांची मारगिरी होत होती. उपरांत इकडून बाणांची मारगिरी करून लोकांनीं नीट चालून घेतले. इंग्रज सिकस्त केले. चारसें माणूस कापून काहडले. पांच जरबा होत्या त्या लुटून आणिल्या. वरक [ड] दारुगोळी तोटे सर्व लुटून घेतलें. येणेंप्रमाणें बातमी आली. बेलापूरही दो चौ रोजांत घेण्यांत येईल. वर्तमान नवाबबहादूर यांस सांगावें. * र॥ छ १० जमादिलावल हे विनंति.
पै॥ छ २६ जमादिलावल, सन समानीन.