Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३४. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: -
विनंति उपरी. नवाबबहादूर यांस थैलीपत्र इकडून पाठविलें याचा त॥ तुह्मांस समजावा याजकरितां मसुदा पाठविला आहे, त्याजवरून कळेल. थैलीपत्र नवाबबहादर यांस पोंहचावून जाब घेऊन पाठवावा. र॥ छ ४ जमादिलाखर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १३३. १७०२ वैशाख वद्य ४.
सन इहिदे समानीन श्री. २२ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां।। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून लिहित जावें. विशेष. तुह्मी छ २६ माहे रबिलाखरचें पत्र पाठविलें तें पावून सर्व मजकूर समजला. राजश्री नानांचे पत्रावरून सविस्तर वरचेवर समजतें. नवाबबहादर यांची स्वारीस जाण्याची सर्व तयारी आहे. राजश्री पाटीलबाबा यांचें निभावणीचें पत्र येतांच आमची रवानगी करून नवाबसाहेब योजिले मसलतीस जातात ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, राजश्री पाटीलबावा यांजकडे पत्राविशीं राजश्री नानांनीं फार वेळ लिहिलें. परंतु मार्ग गुजराथचे घांटाचा नीट नाहीं. कासीद जासूद मारले जातात. कांहीं लुटले जातात. पत्रें येत नाहींत. याजकरितां दिवसगत लागली. हालीं राजश्री पाटीलबावा यांचें थैलीपत्र आलें तें पाठविलें आहे. नवाबबहादर यांस देऊन याउपरी चेनापट्टणाकडे जाणें लौकर व्हावें. तुह्मी कार्यभाग उगवून सत्वर यावें. दिवस नाहक गेले. आतां त-ही असें न व्हावें. इकडील सर्व राजश्री नानांचे पत्रावरून कळेल. *र॥ छ १७ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १३२. १७०२ वैशाख व॥ ४.
सन इहिदे समानीन श्री. २२ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बलाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मी छ २६ माहे रबिलाखरचीं पत्रें पाठविलीं तें पावून वर्तमान कळलें. राव शिंदे यांजकडील निभावणीचें पत्र आल्याखेरीज यांचे निघण्यास गुंता ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, सरकारची व नवाबबहादूर यांची दोस्ती होऊन इंग्रजाचें परिपत्य करावें हे गोष्ट लहान नाहीं. सलाहमसलत तरफैनची एक. असा स्नेह व दोस्ती माघें कैलासवासी यांचे कारकीर्दीस जाली नाहीं. तो योग हालीं घडला. असें असतां पत्रासाठींच मसलत तटून रहाणें हें काय ? व बाजारू खबरा ऐकून कसें होतें याची प्रतीक्ष्या पहाणें, हें असें दोस्तीस लाजम नाहीं. लौकिकांस दिसतें कीं, कसें होतें हें पाहून मग करणें तें करावें. यास्तव ही गोष्ट नसावी. इकडून शिंदे यांस पत्राविशीं फार वेळ लिहिलें. परंतु, वाटेच्या नादुरुस्तीमुळें दिवसगत लागले. हालीं शिंदे यांजकडून पत्र आलें तें थैली पाठविलें आहे. नवाबबहादर यांस देऊन याउपरी नेमले मसलतीवर अतित्वरेनें होय ते गोष्ट घडावी. तुह्मीं मिरजकर वगैरे कामें करून यावें. कितेक इकडील श्रीमंत राजश्री नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल. रवाना छ १७ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
राजश्री गणेशपंत स्वामी सां।। नमस्कार विनंति उपरी लिहिलें परिसिजे, लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १३१. १७०२ वैशाख वद्य ४.
सन इहिदे समानीन श्री. २२ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:--
पोष्य आनंदराव नरसिंव्ह कृतानेक सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल वैशाख वदि ४ पावेतों यथास्थित जाणून स्वकुशललेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. आपण कृपा करून पत्रें पाठविलीं तीं पावून सविस्तर अर्थ कळूं आले. राजश्री महादजी शिंदे यांजकडील निभावणीचे पत्राविसी श्रीमंत राजश्री नाना यांस सांगून सांडणी स्वार व जासूद वे अजूरदार वरचेवर रवाना करविले. मार्गाच्या आनसंकटांमुळें उपाय चालेना. परवां आपणांकडून सांडणीस्वार पत्रें घेऊन आले ते समयीं दरबारांत आह्मी होतों. पत्रें पावून सिंदे यांजकडील पत्र अद्यापि आलें नाहीं याजमुळें मसलत तटली आहे ह्मणून, येविसींचें बोलणें परस्परें होत असतां शिंदे यांजकडून निभावणीचें पत्र थैलीसुद्धां व राजश्री त्रिंबकराव व तीर्थरूप नरसिंगरावदादा यांस पत्रें आलीं. त्यावरून बहुत संतोष जाहला. त्यावर श्रीमंत राजश्री नाना यांचें व आमचें बोलणें होऊन, हजरत नवाब साहेब यांस व आपणांस हें वर्तमान कळावें ह्मणोन हजुरास अर्जी व तीर्थरूप वडिलांस पत्र व राजश्री गणपतरावदादा यांस, श्रीमंत राजश्री आण्णा सो। रास्ते यांचें पत्र, येणेंप्रमाणें पत्रें वद्य प्रतिपदेस येथून आंचीवरून रवाना केलीं आहेत. पावून वर्तमान कळेल. आपलीं पत्रें परवां आलीं, त्याची उत्तरें श्रीमंत राजश्री नानांनीं लेहून शिंदे यांजकडील निभवणीचें पत्र वगैरे हालीं सांडणीस्वारांबरोबर रवाना केलीं आहेत. पोंहचून सर्व अर्थ ध्यानांत येतील. राजश्री गणपतरावदादा बहुत लायक ह्मणोन यांच्या सुस्वभावाचा विस्तार आपण लिहिला. अशास, श्रीमंत राजश्री रास्ते यांचे संग्रहीं गृहस्थ उत्तमच आहेत. यांत गणपतरावदादा यांचे ठाईं योग्यता विशेष, हें जाणूनच प्रस्तुतही आपणासमागमें श्रीमंतांनीं रवाना केलें. मुख्य गोष्टी आपण थोर, आपल्या थोरवी प्रों। सर्वांचा सांभाळ करणार. वे॥ राजश्री गोविंदभटजी तात्या यांनीं आपल्या पत्राचें उत्तर दिल्हें तें पाठविलें आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १३०. १७०२ वैशाख व॥ ३.
सन इहिदे समानीन श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :-
विनंति उपरी. बाजीराव बर्वे यांचा मजकूर लिहिला तो समजला. करारनाम्यांत कलम असतां दोस्तीवर नजर राखून त्यास साफ निरोप दिल्हा. यावरून बहुतेक कामाची खातरजमा जाली.कलम १ विसाजीपंत वकील यांची पत्रें चेनापटणाहून यांस येतात कीं, स्वारी येती; ह्मणोन या प्रांतीं गडबड भारी जाली ऐसी येतात ह्मणोन लिहिलें. त्यास, इतकें जालें असतां सुस्तीखालीं दिवस जातात हें ठीक नाहीं. याउपरी त-ही जलदी व्हावी. नाहीं तरी कांहींच काम नाहीं. कलम १
नवाबबहादर वद्य त्रयोदसीस निघणार तोही मुहूर्त राहिला. हें ठीक न जालें. या उपरी तरी जलदी व्हावी. दिवस व्यर्थ गेले. हे सालची सीमाही जाली, आतां दिवस घालवूं नयेत ह्मणजे केले मसलतीचें सार्थक. कलम १
हाती बदामीस पोंहचल्याचें वर्तमान आलें ह्मणोन लिहिलें तें कळलें. कलम १
नवाबबहादर यांस थैलीपत्र आंचीवर पाठविलें तें पावलें असेल. कलम १
फतेसिंगराव गाई(क)वाड यांचा मजकूर लिहिला. त्यांस, त्यांचें राजकारण आहेच, परंतु इंग्रजांकडून निघोन येत नाहींत, त्यांस मिळोन आहेत. तेव्हां प्रमाण कशावरून मानावें ? गोविंदराव गाईकवाड सरदारापासीं आहेतच, त्यांस पद देऊन सर्फराजी होईल. फतेसिंग यांजवळ देशची फौज आहे. लोकांचीं घरें जप्त होतील. इतके दिवस त्यांची वाट पाहिली. याउपरी समजोन होणें तें होईल. कलम १
एकूण कलमें सुमार सहा. र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १२९. १७०२ वैशाख व॥ ३.
सन इहिदे समानीन श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाबबहादर यांची सर्व तयारी जाली आहे. एक रावसिंदे यांचें निभावणीचें पत्र येण्याचा गुंता, सुतरस्वार व जासुदजोडी एक वरचेवर गुजराथप्रांतीं पाठवून पत्र सत्वर ये, तो प्रकार करावा. विनापत्र आल्यासिवाय नवाबबहादर यांचे निघण्याचा योग होत नाहीं. पत्र येतांच आपण स्वार होऊन आमची रवानगी ते समयीं करणार ह्मणोन दर पत्रीं लिहिलें. ऐसीयास, इतके दिवस पत्राविशीं राव सिंदे यांस फार वेळ लिहिण्यांत आलें. परंतु वाटेच्या खलेलामुळें पत्रें येऊं न पावलीं; यांस उपाय नाहीं. नवाबबहादर यांची नजर मसलतीवर असोन त्याणीं कूच करून जावयाचें होतें. पत्र येताच रवाना करून देतों तें न जालें. मसलतीस फार लांबण पडली. हालीं राव सिंदे यांचें पत्र आलें ते थैलीच पाठविली आहे. नवाबबहादर यांस प्रविष्ट करावी. याउपरी नवाबबहादर याणीं इंग्रजांवर लौकर जावें. तुह्मी करारप्रमाणें कार्यभाग उरकोन सत्वर यावें, मिरजकर मंडळीस बराबर घेऊन यावें.
र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर लेखांक १२८. १७०२ वैशाख वद्य ३.
सन इहिदे समानीन श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाब निजामअलीखानबहादर यांजपासीं चेनापट्टणकर कुमशेलवाले आहेत त्यांणीं नवाबबहादर यांस पत्र लिहिलें होतें. त्याचा जाब नवाबबहादर यांणीं साफ दिल्हा आणि आह्मांस सांगितलें कीं, निजामअली यांस मदारुलमाहाम यांणीं लेहून त्यास निरोप देत ऐसें करवावें, ह्मणोन लिहिलें. त्यास, इंग्रज मकरी, चहूंकडून राजकारणें लावावयास चुकणार नाहींत. नवाबबहादर यांणीं साफ उत्तर दिल्हें, ठीक केलें. इकडून नवाब निजामअलीखां यांसही कुमशेलवाले यांस रुकसत करणें, ऐसें लिहिण्यांत येईल. र॥ छ।। १६ जमादिलावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर लेखांक १२७. १७०२ वैशाख व॥ ३.
सन इहिदे समानीन श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. श्रीमंत रावपंतप्रधान यांची दौलत मोठी, सिपाई लोकांची विलायेत, येणेंकडून मजबूत. दुसरें, नवाबबहादूर यांची दौलत भारी, सरंजाम पोख्त, तर्तूद चांगली, आणि तरफैन दोस्ती जाली. तेव्हां वरकडाचीं स्वरूपें व तेज रहाणार नाहीं. उभयतां एक असतां इंग्रजास मोजितात ऐसें नाहीं. हें जाणून कितेक नाना प्रकारें खरें खोटें भासवून लटक्या कल्पना मनांत घालून दोदिल करावे, ऐसें करणार करितात. आणि पुढेंही यापरीस अधिकोत्तर उदेग करतील. येविशीं इकडील खंबीर पक्का आहे. नवाबबहादूर यांचीही कायेमी याचप्रमाणें असावी. कोणीही वेडें वांकडें समजाविलें तें न ऐकतां जें चित्तांत येईल तें इकडें लिहीत जावें. इकडून लिहिण्यांत येत जाईल. लटके संशय घालणार फार आहेत. त्यावर मदार ठेऊं नये. र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १२६.
१७०२ वैशाख व॥ ३. श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
पो। बाळाजी जनार्दन सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मी छ २४ व छ २६ माहे रबिलाखरचीं पत्रें आंचीवर व सुतरस्वाराबरोबर पाठविलीं, तें पावून कुल मजकूर समजला. त्याचीं उत्तरें व इकडील मजकूर अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिला आहे, त्याजवरून कळेल. र॥ छ १६ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.
पे॥ छ २ जमादिलाखर सन इहिदे समानीन
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १२५.
१७०२ वैशाख वद्य ३. श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरीः. परभारें इकडे मनस्वी बाधावाई खबरी आल्या कीं, सिंदे, होळकर यांणी श्रीमंताचें लक्ष सोडून तिकडे मिळाले. दुसरी खबर सिंदे यांस दगा जाला, ऐशा येतात; ह्मणोन लिहिलें. ऐसीयास बाजारू गप्पा मनस्वी. त्यास कोठें धरावयास जागा नाहीं. दौलतीचीं कामें कोठें बाजारू आवयांवर चालतात कीं काय ? याजवर जाऊं नये; आणि अशा गोष्टी ऐकाव्या तरी कशा बरें ? अशा खोट्या गोष्टी कोण्ही लिहिणार लिहित असेल, त्यास एकदोन खबरी लटक्या पडल्यावर त्याचें पारपत्य असावें कीं नाहीं ? उगेच मर्जी बेहरम करून लिहिण्यांत मसलतींत दोष किती पडतात, याचा विचार नवाबबहादर यांचे ध्यानांत असेलच. तुह्मींही समजोन सांगावें. नवाबबहादर यांची दोस्ती जाली. मसलत एक, तेव्हां होईल वर्तमान इकडून लिहिण्यांत येईल कीं नाहीं ? दादासाहेबांकडील मंडळी चिंतो विठ्ठल, सदाशिव रामचंद्र, सिंदे याजपासीं होते. त्यांचें राजकारण फितूर अढळतांच कैद करून किल्लोकिल्ल्यास पाठविलें; याजवरून कसें आहे हें समजावें. तिकडे मिळाले मग यास कां कैद दगा ह्मणावा, तरी इंग्रज हाटऊन तंग करून बडोद्यास घालविले. आह्मांसी नीट सिंदे नाहींत, याची परिक्षा त्यांचें पत्र नबाबबहादरास आहे, त्यावरून ध्यानांत येईल. सरकारचे आज्ञेखेरीज सिंदे आहेत कीं आज्ञेंत, याची परिक्षा पत्रांत असेल. सारांष, बाजारू गपा ऐकूं नयेत. कारण, इतका तपसील पारहेरा ल्याहावा लागतो. याउपरी तरी लबाड लिहिणार त्यास इतक्यावर कायेल करून,नवाबबहादर यांणीं फजित करावें. कांहीं तरी प्रमाण असावें. याचा बंदोबस्त व्हावा. होतें तें वर्तमान इकडून आनंदराव यांस सांगण्यांत येतें. मग ते काय लिहितात न कळे ? रा॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.
पो। छ २ जमादिलाखर, सन इहिदे समानीन.