Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८४.
१७०१ फाल्गुन शु. ८ श्री. १४ मार्च १७८०.
राजश्री कृष्णराव व गोविंदराव गणेशपंत स्वामींसः-
विनंति उपरी. तुह्मीं दोन चिट्या पाठविल्या, त्या पावोन लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. करार करून घेऊन आलों. एक येथें जाला. एक तोडून सांगावें तर शब्द ठेवाल. याजकरितां दम धरून, पत्र सांगितलेप्रमाणें लिहिलें आहे. तिकडील वर्तमान कसें काय कळत नाहीं. कालदेश पाहून आज्ञा करावी. मिरजकरांविशीं रजबदल केली. उत्तर स्पष्ट जालें कीं, त्यांचा दारमदार होऊन चार महिने जाले. वरकड तेथील रीत-भाषण-कर्तुत्व याचे प्रकार लिहिले तें सर्व कळलें. त्यास, तेथून याद आली त्याप्रमाणें तहनामा पाठविला असतां, सरकारनुकसानीचा मसुदा करून पाठविला, तोच मान्य करणें प्राप्त. कारण, मसलत आरंभिली आणि आतां नाहीं ह्मणणें ठीक नाहीं. येविसीं अलाहिदा लिहिलें आहे. त्याप्रमाणें बोलोन सरकारचे तहनाम्याप्रमाणें त्यांचे कागदपत्र उगऊन घेणें. पुढील सालचे ऐवजाची रजबदल करणें जाल्यास उत्तम. न जाल्यास पंधराचा निकाल करून पक्का घेणें. मिरजकरांविशीं तर सख्त रजबदल करावी. तहनामा करार जालेला फिरऊन मर्जीप्रमाणें दुसरा करून पा।, त्यापेक्षां मिरजकर वगैरे यांची गोष्ट अधिक नाहीं. त्यांणीं ऐकावी. नरसिंगराव व तुह्मीं मिळोन, हें काम जरूर जरूर करणें. शेवटपर्यंत वोढिलें तर तहनाम्याप्रमाणें निकाल करून येणें. पाडाव ठेविले असतां कांहीं प्राप्त व्हावयाचें नाहीं. जीव घेतील तर घेऊत. परंतु एवढी तहाची गोष्ट जाली असतां त्यांणीं वोढूं नये. आमचे मर्जीचें काम आहे. खामखा करावें. नाहीं तर लिहिल्याप्रमाणें निकाल पाडून यावें. खंडणीचे निरखाची याद पाठविली. त्यास, सर्व प्रकारें वयात जाली असतां नाणें शिरस्तेप्रमाणें घ्यावें, ठीक नाहीं. नख्तच रुपये द्यावे असें बोलावें. देतील. वोढूंच लागले तर निरखाप्रमाणें कबूल करावें. दोन खुलासे लिहिले आहेत. हे आमचे मतें करून घ्यावेंच घ्यावें. नच होय तर तहनामा पाठविल आहे. याप्रमाणें निकाल पक्का करून घेऊन येणें. *सारांश, मिरजकर वगैरे मंडळी एक साल सोडले, त्याचे मसुद्याप्रमाणें करारनामा पत्रें पाठविलीं, त्यापक्षीं हें बोलून त्यांची चिठ्ठी माघारी देऊन सोडवावें. नच सोडतील तर जीव त्यांचे तेथें राहतील. त्यांत फायदाही नाहीं. आणि ऐकिलें तर आमची गोष्ट बहादरानें ऐकिली असें होईल. तोडावयाचें याच कामाकरतां नाहीं. कराराप्रमाणें लौकर करून यावें. हे विनंति.
पै।। छ ७ रबिलावल सन समानीन फा॥ मास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ १९ रबिलावल, लेखांक ८३. १७०१ फाल्गुन शु ३.
सन समानीन. श्रीशंकर. ९ मार्च १७८०.
चिरंजीव राजश्री तात्या यांसी प्रति आपाजी रघुनाथ आसीर्वाद उपरी.
येथील क्षेम ता। फाल्गुन शुद्ध ३ मुक्काम पुणें सुखरूप जाणोन स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. विशेषः–तुमचीं दोन पत्रें आलीं. सविस्तर वर्तमान कळों आलें. असेंच निरंतर पत्रद्वारें लेखन करावें. तेणेंकरून समाधान होईल. राजश्री आनंदराव यांचे पत्रांत पत्र, रा। गणेशपंत यांसी सातारां द्यावें ह्मणोन, पा।, तें पत्र त्यांणीं दिल्हें. तें सातारा घरीं प्रविष्ट केलें. तुह्मांकडील पत्रें सरकारांस येतात व आह्मांस येतात, तें वर्तमान सातारां घरीं लिहीत असतों. राजश्री आनंदराव ही सविस्तर सांगतात. त्यावरून चिंता वाटत नाहीं. सरकारांत पत्रें व तहनामे आले ते प्रविष्ट जाले. आमचें पत्र आह्मांस यजमानांनीं बलाऊन दिल्हें. वरचेवरी स्मरण देऊन करारनामे व पत्रें पा। आहेत. आठचौ रोजीं तुह्मांस प्रविष्ट होतील. त्यावरून सर्व धानास येईल. प्रसंगीं राजश्री गोविंदभट तात्याही साहित्य चांगलें करितात. त्यांचे कामाचें स्मरण असावें. राजश्री नरसिंगरावजींस ही सांगावें कीं, त्यांचे कार्याचें अगत्य असावें. येविसीं राजश्री आनंदरावही लिहितील. भटजीस पत्र आपण लि॥ होतें, तें प्रविष्ट करून उत्तर पाठविलें आहे. शिवरात्रीस घरास जावयाकरितां आपण लि॥. त्यास, जावयाचेंच होतेंच. परंतु, शरीरीं सावकास नवतें. केसतूड जालें, त्याणें उपद्रव बहुत जाला. घोडीवर बसतां न ये. यामुळें जाणें जालें नाहीं. परंतु, तेथें उस्छाह वर्शाप्रमाणें यथासांग केला. किमपि उणें कांहीं नसे. काल आपलें पत्र आह्मांस व राजश्री भटजींस आलें, तें पावलें. त्यांचे त्यांस प्रविष्ट केलें. वरकड वर्तमान यथास्थित असे. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८२.
१७०१ फाल्गुन शु. ३. श्री. ९ मार्च १७८०.
याद फेरिस्त कागद रवाना पट्टणास. सु।। समानीन छ २ रबिलावल.
८ | राजश्री नानांचीं कृष्णराव नारायण यांस |
१ चिकटबंद २ ए॥ | |
५ बंद | |
२ वर्ख | |
----- | |
८ | |
२ | गोविंदराव नारायण यांस नानांचीं पत्रें |
१ बंद | |
१ पुरवणी | |
--- | |
२ | |
१ | नरसिंगराव वकील यांस नानांचें |
---- | |
११ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८१.
१७०१ माघ व॥ ३० श्री. ६ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. तालुके नरगुंद बहुतां दिवसांचे संस्थान. हालीं त्यास नवाबबहादूर यांजकडील अमीलांनीं दाट उपसर्ग केला आहे. तालुका घेऊन पुढें सख्ती करणार ह्मणोन कळलें. त्यावरून लिहिलें असे. तरी तुह्मीं नवाबबहादर यांसीं बोलून, अमीलांस ताकीद होऊन उपसर्ग मना होय, तो अर्थ करवावा. र॥ छ २९, सफर. हे विनंती.
पो। छ १, रबिलावल, सनसमानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८०.
१७०१ माघ वद्य ॥ ३० श्री. ६ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: -
विनंति उपरी. येथें कलकत्त्याहून बातमी आली की, तेथून दाहा पलटणें रवाना जालीं. पैकीं सहा श्रीकासीस आलीं. मागाहून च्यार येत आहेत. तीं आलियानंतर खुसकीचे मार्गें सुरतेस जाणार. याप्रमाणें नवाबसाहेब यांणीं सांगितलें. तिकडे ही बातमी आलीच असेल, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, ही बातमी दोन महिने सरकारांत आली. परंतु पलटणें येण्याची उमेद दिसत नाहीं. तथापि त्या रुखावर हिंदुस्थानांत सरदार व फौजा नेहमीं ठेविल्या आहेत. राजश्री शिवाजी विठ्ठल व खंडेराव त्रिंबक पोंवार, बळवंतराव धोंडदेव व बाळाजी गोविंद बुंदेले, शिवाय सिंदे, होळकर यांचे एक एक सरदार, ऐसी कुलजमीयेत पंचवीस हजार नेहमीं ठेविली आहे. त्याची चिंता नाहीं. दुसरें, भोंसले फौजसह बंगाल्यांत येतात, हें ही वर्तमान त्यांस गेलें. त्यावरून पलटणें तमाम माहालचीं घाबरेपणें जमा करावयास लागले. तेव्हां हीं फलटणें हिंदुस्थानांतून येतात ऐसें नाहीं. आल्यास त्यांचे तंबीपुर्ती फौजही आहे. सर्व वर्तमान, नवाबांस इकडील फौज त्या तोंडावर किती आहे हें परस्परें कळतच असेल. तुह्मींही सांगावें. *र॥ छ २९, सफर. हे विनंति. चौहूंकडून इंग्रजास ताण बसला ह्मणजे आपलेंच संभाळावयास लागतील. हे विनंति.
पो। छ १९, रबिलावल, समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७९.
१७०१ माघ वद्य ३० श्री. ६ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. मिरजकर वगैरे मंडळीविशीं पेशजीं लिहिलें आहे त्याप्रमाणें नवाबबहादूर यांसीं बोलून, त्यांपासोन सावकारी चिटी घेतली ते माघारी देवऊन, त्यांस कांहीं न पडतां बराबर घेऊन यावें. नवाबबहादूर यांचे मर्जीप्र॥ सरकारांतून कामें जालीं. तेव्हां येविशीं त्याणीं वोढ धरूं नये व धरणार नाहींत. लिहिल्याप्र।। उलगडा करून त्यांस घेऊन यावें. येविशीं सरकारांत जरूर आहे. ही गोष्ट नवाबबहादर यांणीं जरूर ऐकावी. *र॥ छ २९, सफर. हे विनंति.
पे।। छ १९, रबिलावल, समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७८.
१७०१ माघ वद्य ३० श्री. ६ मार्च १७८०.
पै॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. इंग्रजासीं व फरासीसासीं विलायतेस बिघाड आहे. फरासीस इंग्रजावर गालब आहेत, ह्मणोन वर्तमान आहे. त्यास, नवाबबहादर यांजकडे बातमी कसी आहे ? फुलचरीकर वगैरे गोरोंदोर कोणे ठिकाणीं आहेत ? फरासीसाचीं विलायेतहून जाहाजें येणार तें कधीं येतात, याचा विच्यार कसा आहे, तो सर्व नवाबबहादूर यांस पुसोन ता। ल्याहावा. र।।. छ २९ सफर. हे विनंति.
पै॥ छ १९ रबिलावल, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७७.
१७०१ माघ वद्य ३० श्री. ६ मार्च १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी- नवाबबहादर यांची परवानगी घेऊन श्रीरंगस्वामीचे दर्शनास गेलों. नवाबाकडील मातबर बराबर होते. सर्व देवांचीं दर्शनें करविलीं. गोपुरें व देवालयांतील रचना, त्रिकाल पूजा व ब्राह्मणांची मर्यादा पाहिल्यावर, याप्रा। दुसरें स्थल नसेलसें वाटलें. दर्शनें करून, उपरांतिक तमाम कारखाने पाहिले, त्याचा तपसील फार विस्तारें लिहिला, तो सर्व समजला. ऐसीयास, देवब्राह्मणांची मर्यादा मोठी, हें उगेंच ऐकत होतों. हालीं सर्व तुह्मीं लिहिल्यावरून परम संतोष जाला. देवाब्राह्मणांची मर्यादा नवाबबहादर फार करितात, ह्मणोनच दिवसेंदिवस दौलतीस जिल्हे व रवनक आहे. याच योगेंकडून इंग्रज सिकस्त करून नवाबास यश येतें, यांत गुंता नाहीं. देवाब्राह्मणांचे आशीर्वादाचें फल असेंच आहे. वरकड कारखानेजात येथील काम ज्यारी आहे त्यास, मोठी दौलत आहे तेथें इतकी सावधगिरी पाहिजेच. नवाबबहादूर करितात, हें फार चांगलें आहे. *सर्व सरंजाम इंग्रजाचे लढाई कामावर नवाबबहादर यांणीं न्यावा. रा। छ २९ सफर. हे विनंति.
पो। छ १९ रबिलावल, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ १९ रबिलावल. लेखांक ७६. माघ व॥ ३०, १७०१.
सन समानीन. श्री. ६ मार्च १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या यांसः-
प्रति गोविंद भट निदसुरे आसीर्वाद विनंति. येथील कुशल त॥ छ २९ सफर पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण बहुतां दिवसीं कृपा करून पत्र पो।, तें पावोन परम संतोष जाहला. ऐसेंच सदोदित पत्रीं परामर्ष घेत असावें. या नंतर येथील वृत्त राजश्री आपाजीपंत सर्व लिहितील, त्याजवरून कळों येईल. आमचे कार्याचें स्मरण असेलच. आपण राजश्री नरसिंगरावजी यांजपासीं बोलून ठीक करून यावें. रावजींस आमचा आसीर्वाद सांगावा. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७५.
माघ व।। ३० १७०१. श्री. ६ मार्च १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: -
पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष तुह्मीं छ ३० माहे मोहरम व छ ६ माहे सफरचीं पत्रें पाठविलीं, तें पाऊन सर्व मजकूर समजला. नवाबबहादूर यांची इंग्रजावर जाण्याची सर्व तयारी मुस्तकीम, फौज व तोफखाना व सुतरनाला व घोड्याच्या तोफा व घोड्यावरील बाणदार, दर घोड्यास वर साहा बाणांची कैची व हातीं एक, येणेंप्रमाणें हजारों घोडे व बाणदार, स्वार व बार, भारी भारी तोफा व गरनळा जंगी सामान बेनिहात तर्तूद होऊन तयारींत आहेत. इंग्रजाकडील व वकिलाचे कागदपत्र रदबदलीचे येतात. परंतु श्रीमंतांकडील स्नेहाची अपेक्षा बहुत. स्वारी इंग्रजावर होणार तों अगोदरच इंग्रज व महमदअल्ली सर्द जाले. नमूद जाल्यावर नवाब इंग्रजास सजा चांगली करतील. प्रस्तुत आह्मांकरितां च्यार दिवस मुकाम आहेत. करारनामा व निभावणीचीं पत्रें सत्वर यावीं, ह्मणजे आह्मांस निरोप देऊन नवाब इंग्रजावर नमूद होतात. नवाब आह्मांस काईल करितात कीं, तुह्मांमुळें राहाणें जालें. त्यास, सांडणीस्वार पोहचल्यावर भारी मसलतीवर नजर देऊन, लिहिल्याअन्वयें पत्रें यावीं, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, नवाबबहादर यांणीं इंग्रजाचे तंबी करण्याचें सामान भारी केलें आहे. राजश्री माहादजी सिंदे यांणींही तोफा व बाण सुतारनाला हें सामान फार केलें आहे. फौजही कर्डीच जमा केली. नांवबिनांव असाम्या झाडून नेल्या आहेत. घोड्याच्या तोफा व घोड्यावरील बाण हे तर्तूद नवाबांनीं कल्पना काढून चांगली केली आहे. इकडील पत्राचा गुंता ह्मणोन नवाबबहादर शब्द लावितात. त्यास, प्रथम करारनामा पाठविला तो नवाबबहादूर यांचे यादीप्रमाणेंच पाठविला. त्यांत तकरार ह्मणोन दुसरा मसविदा पाठविला. तेव्हां कायेल तुह्मी कसे होतां ? असो. हालीं नवाबबहादर यांसीं पक्का सलुक जाला, याचा लौकिक ही जाला. इंग्रजाची मसलत तंबीची, याजवर नजर देऊन नवाबबहादुर यांणीं मसविदे पाठविले. त्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें छ माहे सफरीं रवाना केलीं, तें पावलीं असतील. इकडील कामें एकदोन जरूरीचीं होणें तें करून घ्यावीं. नवाबबहादरही करून देतील. त्यांचे मर्जीप्र॥ सरकारांतून जाल्यावर त्यांणीं सरकारची कामें करावीं आणि करतील. वरकड खंडणी वगैरे यख्त्यार त्यांजवर. त्यांस लाजम ते करतील. सारांश, इकडील कागदपत्राचा कोणताही गुंता राहिला नाहीं. राजश्री माहादजीराव सिंदे यांजकडील निभावणीचें पत्र येणें. त्यास, ते मोहिमेवर गुजराथ प्रांतीं गेले, ह्मणोन दिवसगत लागली आलियानंतर सत्वरचे रवाना होईल. यासाठींच न गुंतावें. याउपरीं लांबलांब मजलीनें नवाबबहादर यांणीं चेनापट्टणाकडे जाऊन, इंग्रज घाबरे करून, सिकस्त करावे. तरीच इतका सरंजाम केला याचे लौकिक. आणि सरंजामाप्रमाणें नवाब करतीलच. यासही दिवस विशेष नाहींत. जलदीस आतां किंमत आहे. तुह्मीं आपले गुंते उगऊन सत्वर यावें. *नवाबबहादर यांचे मसविद्याप्रा। करारनामा व पत्रें खातरजमेचीं पूर्वींच सांडणीस्वाराबराबर पाठविलीं. त्यांतच सविस्तर लिहिलें आहे कीं, पूर्वीं, नवाबबहादराकडूनच याद आली, त्याप्रा। करारनामा तुह्मांबरोबर पाठविला असतां, कलमें हातीं फिरऊन मसुदा पाठविला. त्याप्रा।। हालीं पाठविला. याचा यख्त्यार नबाबबहादरावरच देऊन लिहिलें आहे. त्यांचे थोरपणास उचित तें करतील. याउपर लौकर चेनापट्टणावर जाणें व्हावें. र।।. छ २९ सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
पै।। छ १९ रबिलावल.