Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४४. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. राजश्री फतेसिंगराव यांचें राजकारण सरदारांकडे होतें. त्याप्रों। अमलांत येईना, सबब राजश्री गोविंदराव गाईकवाड यांस पदाचीं वस्त्रें द्यावीं, ऐसें सरदारांस येथून लिहिलें; त्यावरून सरदारांनीं गोविंदराव यांस सेनाखासखेल पदाचीं वस्त्रें दिल्हीं. मशारनिलेपासीं तीन चार हजार फौज होती. आणखीं सहा सात हजार फौज आपली देऊन दहा हजार फौजेनिसीं मशारनिले यांची रवानगी महीपार आमदाबादेकडे केली. फतेसिंग यांजकडील सर्व मुलकाची जप्ती करविली. देशांतील लोक त्यांजकडे आहेत. त्यांचे घरीं तसदी देण्यास सरकारआज्ञा जाली. जालें वर्तमान नवाबबहादुर यास समजावें ह्मणोन लिहिलें असे. र॥ छ ४ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४३. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाबबहादुर यांसी दोस्ती जाली. सलामसलत एक. तेव्हां पैहाम इकडील मजकूर समजावा ह्मणोन तपसीलें लिहिण्यांत येतो. तिकडील अर्थ समजत नाहीं. त्यास, ऐसें नसावें. तुह्मीं नवाबबहादुर यांस पुसोन वरचेवर लिहित जावें. र।। छ ४ जमादिलाखर हे विनंति.
* पटवर्धन मंडळी सोडून घ्यावयाविसीं पूर्वीं विस्तरें लिहिलेंच आहे, त्याप्रों। जरूर घडावें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४२. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. गणेशपंत बेहेरे सुरतप्रांतीं होते. गाडरकडून दोन पलटणें सुरतेस येण्यास निघालीं. वाटेंतून जातांना गणेशपंतास, त्यांस फासला थोडा राहिला. हेही सावधच होते. रात्रौ त्या पलटणांनीं दुसरे मार्गें येऊन शपखून घातला. गणेशपंत फौजेसह सांभाळून निघाले. कांहीं बुणगे गेले. प्रातःकालीं गणेशपंत याणीं त्यांजवर जाऊन एक लढाई दिल्ही. पलटणें सुरतेस गेली. गाडर बारा पिराचे घांटावरून सुरतेस येणार. मातबर जमाव येईल ह्मणोन गणेशपंत फौजेसह हातगडच्या बारीवर येऊन राहिले. येणेंप्रमाणें वर्तमान आलें. रा। छ ४ ज॥खर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४१. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. त्या प्रांतीं चंदन बहुत तोफा व चांगलें उंच मिळतात. त्यास, गुलाबी व कृष्णागर व मलयागीर व साधा ऐसे सरस पक्के पांच मण सरकारांत व खासगत ऐसा खरेदी करून पाठवावा. व किंमतही लेहून पाठवावी. लिहिल्याप्रमाणें जरूर खरीदी करावी. व कुंकुमागरही ऐसें चांगलें जरूर मेळऊन पाठवावें. पूर्वीं धातुमूर्तिविसीं लिहिलें आहे. त्यास, महादेवाची व विष्णुची मुहूर्त फार चांगली मिळवून पाठवावी. पर्वतीस रुप्याची मुहूर्त महादेवाची आहे, त्याप्रों। मिळाल्यास देवालयांत ठेवण्यास उपयोगीं पडेल. चांगली मात्र असावी. येवढी मोठी न मिळाली तर लहान घ्यावी. पैका देविला जाईल. रा। छ ४ जमादिलाखर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४०. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. बेलापुरापुढें कोंकणांत इंग्रज चालून आले. त्यांसीं व सरकारांतून बाजीपंत फौजसह गेले यांसी लढाई जाली. पांच, सा सें होते, पो। तीनसें इंग्रज मारून त्यांच्या पांच तोफा सोडऊन आणिल्या, हा त॥ पेशजीं लिहिलाच आहे. त्या उपरी, बेलापुरास जाऊन बेलापूर घ्यावें, तों साष्टीहून कांहीं जमीयत कल्याणास आलें, हे बातमी कळली. त्याजवरून बाजीपंत फौजसह बेलापुराहून कल्याणास आले. दुसरे दिवसीं मोर्चे देऊन कल्याणास वेढा घातला. पुढें हल्ला करावी, ऐसा सिधांत जाला; तों करनेल गाडर यांजकडून दोन पलटणें सुरतेस आलीं, तेथून तसेंच साष्टीस उतरून जहाजावरून दोन प्रहरीं रात्रीं कल्याणासमीप बाग आहे तेथें येऊन उतरले. रात्रीं कुमक दोन पलटणें आलीं, हें बाजीपंत यांस समजलें नाहीं. यांणीं हल्ल्याचा निश्चय केला होता, त्याप्रों। चार घटका पिछली रात्र आहे तों तयार होऊन हल्ल्यास चालिले. वाटेंत पलटणाची गांठ पडली. तेथें चार घटका लढाई जाली. उपरांत बाजीपंत त्यांस सहा कोसाचा फासला सोडून राहिले. कल्याणांतील इंग्रज व गाडराकडून कुमक दोन पलटणें आली, ते येकत्र जाले. जमाव भारी जाला. तेथून चालून आले. इकडील फौजांनीं तोंड न देतां सरून माघें आले. दुसरे दिवसीं इकडील लोकांनीं एक नाल्याचे ढांसण चांगलें धरून उभे राहिले. इंग्रज नाल्यांत चालून आले. तेथे लढाई फार चांगली जाली. इकडील लोक अरबा पीऊन आंत धसले. हातघाईची लढाई जाली. बेत-हा इंग्रजी लोकांस मार दिल्हा. दोन तीनसें माणूस ठार मारलें. सें दोनसें जखमी जालें. इकडील चाळीस पंनास ठार व जखमी जालें. कांहीं घोडीं पडलीं. आश्रा चांगला होता ह्मणोन फार माणूस इकडील जाया जालें नाहीं. इंग्रजानीं खूब लढाई दिल्ही. गाडराकडून दोन पलटणें आलीं त्यांतील दोघेही सरदार ठार जाले. ममईकर जनरल यांचा जावाई सरदार होता, त्यांचे पोटांत गोळी लागली. फार जेर. वरकड दहा पंधरा मातबर जमातदारच पडले. तेव्हां सरदाराखेरीज त्यांचे लोकांनीं धीर धरवेना. प्रातःकालींच कूच करून माघारे कल्याणास गेले. फौजाही पाठीमाघें गेल्या. कोकणच्या दोन लढाईंत इंग्रज फारच नसीयत पावले. हालीं इकडून राजश्री संक्राजी घोरपडे व भवानी सिवराम यांची रवानगी फौजसह कोंकणांत जाली. बरसातीचे दिवस समीप राहिले. कोकणांत पाऊस लागल्यावर घोड्याचा उपाय नाहीं. महिना पंधरा दिवस पाऊस नाहीं तोंपर्यंत फौजा आहेत; पुढें गाडद पाठवण्याची तर्तूद होत आहे. र॥ छ ४ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३९. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सां. नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें. विशेष. राजश्री माहादजी शिंदे यांजकडून नवाबबहादर यांस थैलीपत्र आलें तें पेशजीं रवाना केलें. तें पावल्यानंतर नवाबबहादर यांचें कूच चेनापटणचे सुमारें जालें असेल. कदाचित् नसले जालीया याउपरी त-ही जलदीनें इंग्रजाचे जिल्ह्यांत जाणें होऊन, करारप्रमाणें त्यांस ताण बसवून, तंबी अमलांत यावी. मसलत मोठी. त्यास, किरकोळी दिकती व कल्पनेखालीं दिवस गेले. संपूर्ण आलमांत जालें कीं, श्रीमंत रावपंतप्रधान व नवावबहादुर यांची दोस्ती होऊन टोपीकरास सजा करावी, ऐसा नक्ष्या ठरला. हा लौकीक. त्यांत सरकारच्या सरदारासीं व फौजेसीं लढाई इंग्रजाची शुरूं जाली. नवाबबहादर यांचा सर्व सरंजाम तयार असतां ढील निघण्यास होती, येणेंकडून लौकिकांत नीट दिसत नाहीं. या सर्व गोष्टी नवाबबहादर यांचे ध्यानांत आहेत. तुह्मीही सुचवून, केले मसलतीस सत्वर निघणें होय तें करावें. र॥ छ ४ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३८. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराववतात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो। हरी बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें. विशेष. अलीकडे तुमचें पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास, वरचेवर लिहित असावें. राजश्री पाटीलबावा यांजकडून नवाबबहादूर यांस थैलीपत्र आलें तें दर्शनीच रवाना जालें. पावून नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टणाकडे रुखे जालें असेल. नसलें जाली, आदियाप जलदी व्हावी. नाहीं तरी जाहिराण्यांत नीट दिसत नाहीं. हे सर्व मरातब व दरजे नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहेत. इकडून ल्याहावें ऐसें नाहीं. गुजराथेकडील व कोकणचें व कितूर व येसाजी सिंदे कुल इकडील, श्रीमंत राजश्री नानांनीं लिहिलें त्याजवरून कळेल. सारांष नबाबसाहेब यांचें कूच जलद व्हावें; जालें असलिया फारच चांगलें.
*र॥ छ ४ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३७. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो। कृष्णराव बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें. विशेष. राजश्री पाटीलबावा यांजकडील पत्रें नवाबबहादर व राजश्री नरसिंगराव व त्रिंबकराव यांस आलीं ते पेशजीं पाठविलीं. पावून नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टण जिल्हियांत जालें असेल. नसलें जालिया आतां त-ही जलद जाणें घडावें. सरंजामी सर्व तयार असतां निघणें होत नाहीं याजकरितां जाहिराणा नीट दिसत नाहीं. हे सर्व दरजे नवाबबहादूर यांचे दिलनिसीन आहेतच. ल्याहावें ऐसें काय आहे ? इकडील सर्व वर्तमान राजश्री नाना यांणीं लिहिलें आहे त्यावरून कळेल. सारांष, नवाबबहादूर यांचे जाणें लौकर होऊन तुह्मी कार्यभाग उरकोन सत्वर यावें.
र॥ छ ४ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
राजश्री गणेशपंत स्वामींचे सेवेसीं सां॥ नमस्कार. राजश्री तात्यांनीं दोन वेळ राजश्री नानांस तुमची तारीफ लिहिली. तुह्मीही तसेंच आहांत. सारांष. करारप्रों। सर्व घडवून लौकर यावें. लोभ कीजे हे विनंति.
स्वामींचे सेवेसीं गोविंद भगवंत सां॥ नमस्कार. ममता करीत जावी हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३६. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. गुजराथप्रांतीं सरदारासीं व करनेल गाडर इंग्रज यासीं लढाई शुरूं आहे. पांच चार लढाया जाल्या. त्यांत इंग्रजाची सिकस्तच होत गेली. या फौजापुढें आपला तग निघत नाहीं, ऐसें पुर्तेपणें समजोन माघारें सुरतेस जावें, हा मनसबा गाडर यांणी करून कूच केलें. नर्मदातीरास बावापिराचे घांटी आले. पाठीवर सरकारच्या फौजा आहेतच. नित्य घेराघेरी करितात. नदी उतरतेसमयीं गलबल करून घालवितील या विचारांत गाडर येऊन पैलतीरीं मुकाम करून आहे. नदी उतरण्याचे तजविजीत आहे. छ २१ माहे जमादिलावलपावेतों मुकाम तेथेंच होता. येणेंप्रमाणें बातमी आली. नवाबबहादर यांस सांगावें. र॥ छ ४ जमादिलाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३५. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री येसाजी शिंदे व सटवोजी भोंसले व मानाजी फांकडे त्यांस कितूरकर देसाई ऐसे मिळोन माघें सरकार तालुकियास बहुत इजा दिल्ही. हलींही हांगामा मांडला. ऐसें जाणून त्यांचे तंबीस राजश्री परशरामपंत यांची रवानगी केली. मसारनिले यांणीं जाऊन त्यांस तंबी करून त्यांजकडील गुमट व सिरवल हीं ठाणीं मातबर होतीं ते घेतलीं. पुढें सामान गडाकडे गेलें तों तेथें बातनी जाली कीं:–कितूरकर कांहीं जमावानसीं गोकाकेस आला. तेच समयीं परशरामपंत यांणीं धौस पाठविली. फौज जाऊन गोकाकेस वेढा घातला. कितूरकर आंतच आहे हें कळतांच खासाही फौजसह गेले. मोर्चे देऊन बंदी केली. तमाम नाके धरले. तेव्हां देसाई लाचार होऊन मी भेटीस येतों ऐसा पैगाम करून भेटीस आला. हालीं परशरामपंतापासीं आहे. त्याजकडील पेशकशात माघील येणें व सरकार तालुका दाबक याचा जाबसाल होत आहे. फौज गोकाकेकडे जातांच इकडे सटवोजी भोंसले व फांकडे यांणीं हांगामा आणखीं शुरूं केला. त्यांचे पारपत्यास चार हजार फौज पाठविली तेव्हां निघोन गेले. सदरहूप्रों। वर्तमान आहे. तुह्मी नवाबबहादर यांस सांगावें.
र॥ छ ४ जमादिलाखर हे विनंति.