Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

शुद्ध ९ मंगळवारी राजश्री जानोजी निंबाळकर श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांच्या घरास लग्नास आले. त्यास सामोरे खासा, नाना व भाऊ पुढें गेले होते.

शुद्ध १० बुधवार. सटवोजी जाधव याचें दुसरें लग्न जालें. चिखलीस जालें. देवजी ताकपीर यांची लेक केली असे. १

ह्माकोजी पाटील झांबरे याची लेक लखमोजी सोनवणियाचे लेकास दिल्ही.

शुद्ध ११ गुरुवारीं रोजगुदस्ता देव्हाराघरचा देव मोरया थोरला होता त्याची खेळ पडली असे. आंत लहान नरमद्या होता.

शुद्ध १३ मंदवार. राजश्री पंतप्रधान यांचे दुसरे पुत्र माधवराऊ यांचे लग्नाची देवकप्रतिष्ठा दोप्रहरा खाशा नानानीं केली.

शुद्ध १४ रविवारीं राजश्री माधवराऊ श्रीमंताचे पुत्र याचें लग्न दिवा साडेपंधरा दिवस आल्यावरी लागलें. राजश्री शिवाजीपंत हुजूरपागेचा कारकून याची कन्या केली. विष्णुपंताच्या वाडियांत लग्न लागलें असीउंबरीचे पागेवर शिवजीपंत असतात. गराडियांत राहत असतात. यासीं सोयरीक केली. पहिले, नरजोशियाची नात लालपाणीहून आणिली होती. ती मुळाची ह्मणून बाष्कीळ निघाली. यामुळें फिरावली. तिच्या मायबापाचें समाधान देऊन घेऊन करून वाटे लाविलें.

शुद्ध १४ रविवारीं श्रीमंताचेथें लग्नास श्रीधरणीधर देव आले. नदीपलीकडे राहिले.

शुद्ध १५ सोमवार सटवोजी जाधव पेशवियाचेथें लग्नास आले.

मार्गेश्वर वद्य १ मंगळवारीं महादाजी शंकर याचे वडील पुत्र दादोबा, चिमणाजी नारायण सचीव याचे बंधू, वारले असेत.

वद्य ४ बुधवार, पेशवे वानवडीचे मुक्कामीहून थेवरास श्रीच्या दर्शनास जाऊन आले. भाऊ वाघोलीस जाऊन दुखवटा जाधवास देऊन आले. दिनकरपंत व बाबा सरनाईक व गोविंदपंत तुटकणें व बापूजी आनंदराऊ हे येऊन गांवांतील वाडे, नाईकवाडे वगैरे मोजून याद लेहून घेऊन गेले. ब्राह्मणास द्यावयास.

वद्य ५ गुरुवासर. रामाजीपंत अकळुजेहून पसरीस गेले होते ते घरास आले. त्याणी सांगितलें की शिवभट दिवटे पसरीस आपले घरीं दुखणिया पडोन वद्य ४ बुधवारीं वारले.

वद्य ११ बुधवार, आळंदीची यात्रा. पेशवे वानवाडीचे मुक्कामीहून यात्रेस जाऊन देवदर्शन घेऊन माघारे आले असेत.

वद्य १२ गुरुवारीं देवहि आळंदीचे यात्रेस आले.

कार्तिक वद्य १४ मंदवार, अमवाश्याहि रोजमजकुरींच आली.

मार्गेश्वर मास.

मार्गेश्वर शुद्ध १ रविवारी रात्रीं पेशवे वानवडीचे मुक्कामीहून रात्रीं पुणियास घरास आले, लग्नाकरितां.

शुद्ध ४ बुधवारी प्रहररात्री उमाबाई दाभाडियास, पुणियांत नुढगेमोडीपाशीं डेरे देऊन राहिली होती, तेथें वारली. सेनापति जवळ होते. १

पुणियांतच दहन केलें असे. दुसरे रोजी दाभाडे अवघीं तळेगांवास गेलीं.

शुद्ध ६ सह ७ मंदवासर, चंपाषष्ठी.

शुद्ध ७ शुक्रवारी पर्वतीच्या तळियापासून श्रीमंतांनी कुच करून वानवडीवर जाऊन राहिले. रोजमजकुरीं सटवाजी जाधवराऊ याची बायको लाडूबाई, आंगरियाची लेक, वाघोलीस दुखण्या पडोन वारली. लाडूबाई देशमुख दोन तीन रोज आगोधर परामृषास गेली होती, ती तेथें असतांच, ती वारली असे. संध्याकाळचा चार घटका दिवस राहिला ते समयीं वारली.

गोविंदरायाचा वाडा मचाळियाबरोबर, त्यापैकीं, बाबास दिल्हा तो त्याणीं मोरभट शाळिग्राम यास दिल्हा.

कार्तिक शुद्ध ८ मंदवार. राजश्री तान्हाजीपंत हवालदार बायको घेऊन रोजमजकुरी रात्रीस महायात्रेस गेले. सकाळ उठोन मंदवार.

कार्तिक शुद्ध ९ रविवारी राजश्री पंतप्रधान वानवडीचे मुक्कामीहून वाघोलीस राजश्री सटवोजी जाधवराऊ याची स्त्री वारली ह्मणोन जाऊन माघारें आले.

कार्तिक शुद्ध ११ मंगळवारी अकळुजेहून राजश्री अमृतराऊ निंबाळकर याचें पत्र मातुश्री लाडूबाईस आलें कीं, मिठोजीबाबा घाटगे यास छ ४ मोहरमी बुधवारी देवआज्ञा कडेगांवीं जाली. त्याची स्त्री सती निघावयाचा विचार आहे. तर सौ। शाहाबाईस त्याचे भेटीकरितां पाठवून देणे. ह्मणून कागद आला. गराडियाच्या गोसावियांनी सांगितलें कीं, पाठवूं नका. त्याजवरून राहिली. रामाजी शिवदेव पाठविले असेत.

कार्तिक शुद्ध १३ गुरुवासर. गांवांतील गल्ल्या थोर केल्या. पुढें वाढविली होती तीं पाडलीं असेत. १

शुद्ध १४ शुक्रवासर. पेशवियाच्या वाडियापुढें पूर्वेकडे ब्राह्मणांचीं घरें होतीं तीं काहडणार. ताकीद केली असे. १

शुद्ध १५ मंदवार, वितिपात. पर्वतीस पेशवियानीं काल्हवडी व गोर्हे सोडिले. गोदानें केली.

कार्तिक वद्य १ रविवारी अवशीचे सा घटका रात्रीस शेकोजी जगथाप याणें आपले हातें येजिदखत राणोजी बिन्न महिमाजी जगथाप याचे पदरीं घातलें.

                                                                                   लेखांक १७०

                                                                                      श्री सदानंद कृष्णातीर                                                     १६२० भाद्रपद वद्य १०

                                                                                                          170

श्री सकलगुणपरिपूर्ण इश्वरी आधिष्ठान श्री भुवानगिरी गोसावी स्थल श्री आदिमुहुर्ती मौजे निंब प्रा। वाई स्वामीचे सेवेसी

विनंति शिष्यवर्ग बावाजी बिन सुर्याजी देसाई ता। कुडाळ सु॥ मया अलफ शके १६२० प्रमादिनाम संवछरे भाद्रपद कृष्ण पक्ष दशमी गुरुवारे ते दिनी वतन गुरुदक्षणापत्र सेवेसी लेहून दिल्हे की आपली वासनी अतर निष्टे नेकी सेवा करावी त्यास आपले शक्ती सेवा करितो परतु नैवेद्य पाहिजे त्यास आपले मनापासून गुरुदक्षणेस आपण आपले इनाम मौजे आखोड ता। कल आहे त्यापैकी जमीन बिघे 68१० दाहा बिघे साहाटकाचे चावर पैकी स्वामीस दहा बिघे दिल्हे पाटस्थल आहे त्यास सुखरूप शिष्यपरपरेने कीर्दी करून खाणे आपण तुह्मास गुरुदक्षणेस दिल्हे आहे त्यास कोणी हिकहरकती करणार नाही आपले वौशीचे कोन्ही इष्केल करील त्यास श्रीगुरुचे पायाची आण जाणिजे हे विनती छ २२ माहे रबिलावल

                                                                          गोही

तुलाजी मोर्‍ये पा।                               बनोजी तैगल                          मौजे चिखली                         प्रा। कर्‍हाड
प्रभावली                                           सा। निंब पा। वाई                     रायाजी पा।                           भिमाजी भा-
                                                                                                   सावत                                  स्कर कुलकर्णी
                                                                                                                 (निशाणी नांगर)                                                   

                                                                   

वद्य ७ शुक्रवारीं श्रीमंत भाऊ मुहूर्तेकरून डेरियास नेहमीं गेले. पहांटे गेले. दिवस उगवून शुक्रवार.

वद्य ९ रविवार सह १० पेशवे, दुर्जनसिंगाचे हवेलीस, समशेरबहादूर याच्या सासर्याचेथें, वस्त्रें घ्यावयास आले. महादोबाहि जातां जातां गोविंदरायाच्या घरास आले. लक्षमीबाईस पैठणी, लुगडें चोळी दिल्हीं. आबा देशपांडियाचे पछमेस वाडा नवा गोविंदरायाचा आहे. त्यापैकी पंचाळे राहतात ते जागा टाकून, वरकड जागा महादोबां दिल्हा. आधले रोजीं रावजी माणकेश्वर महादोबांनीं गोविंदरायाचेथें पाठविले होते. एकबोटियानी सल्ला देऊन कागदपत्र दिल्हा ह्मणून ऐकिलें. सदरहूप्रा। जालें असे. १

वद्य १ ४ सह ३० अमावाशा शुक्रवार ग्रहण सूर्य. संध्याकाळीं ग्रहस्त जाला. अंधार पडला. शेवट उजेडलें. महापर्व पडले. पेशवियांनी पुण्याचे संगमीं डेरे देऊन दानधर्म फार केला. हस्ती दान दिल्हे. दोन घोडे व गोदानें दिल्हीं. यमधर्म वगैरे दानें केली. त्यांच्या आरशेमहालास मोहोळ लागले होतें. आसपास घुबड बसत होतें. त्याचेंहि विधान केलें.

कार्तिकमास.

कार्तिक शुद्ध १ मंदवार. दिपवाळी ग्रहणाची कर.
शुद्ध २ रविवार. यंत्रद्वितिया. पाऊस रात्रीं फार पडला.
शुद्ध ३ सोमवार. उत्तम मुहूर्त.

शुद्ध ६ गुरुवार पेशवियाचेथें वाडियांत कांहीं शांत केली. पेशवे पासणियासहि गेले होते. पंकेश्वराचें दर्शन प्रथमच त्यांनी घेतलें असे. पांच रुपये वाहिले असेत. १

शुद्ध ५ रविवारी रामाजी शिवदेव मोरेश्वरास देशमुखानी कामाकाजास पाठविले ह्मणून गेले असेत.

दादोबा प्रतिनिधीची एक स्त्री सती निघाली असे.

शुद्ध ७ मंगळवार. शंभुसिंग जाधवराव श्रीमंताचे भेटीस आले.

शुद्ध १४ मंगळवार. उमाबाई व सेनापति तळेगांवाहून पुणियास पेशवियाकडे आलीं असेत. १

शुद्ध १५ बुधवार. अहळाची पांढर पीर शेख सल्लाच्या दरगियांत घातली.

आश्विनमास.

शुद्ध ३ रविवारी जगोबास त्रिंबकभट र्धा। घेऊन गोविंदरायाकडे गेले. ते व त्यांचे बंधू ऐसे कितेक भाषण सवरसाचें केलें.

शुद्ध ४ सोमवारी गोविंदरायानीं एकबोटियास बोलावून कर्हेपठारची सनद दिल्ही. वंशपरंपरेची ह्मणून ऐकतों. तिघांच्या नांवे हेंहि ऐकतों. वकिली सांगणार हेहि ऐकिलें. अगोधरीच राजकारण होतें.

शुद्ध ७ गुरुवार सह ८.
शुद्ध ८ सह ९ शुक्रवार, पारणें.
शुद्ध ९ सह १० मंदवार, दसरा. रात्रौ पेशवे मुहूर्तेकरून पर्वतीजवळ जाऊन डेरे देऊन राहिले.

शुद्ध १२ मंगळवार सुभानजी फुगा भोंसरीकर ढाळ घेतलाला होता आणि वारला. त्या अगोधर शितोजी लांडगा चौ, चार पांच रोज अधिक उणें जालें, मेला असे.

वद्य ६ गुरुवारीं शमशेरबहादुर याचें लग्न जालें. निंबगिरीच्या किल्लेदाराची लेक केली. किल्लेदारास दुर्जनसिंगाचे हवेलींत जानोसा दिल्ही होता. १

वद्य ३ गुरुवारीं पेशवे यांची वारी जायाजी शिंदे याचेथें जाऊन वस्त्रें व कडी घेऊन आली. समुदायसुधां जाऊन वस्त्र घेतली असेत. रामाजी रंगनाथ गु॥ त॥ निरथडीयास माळवियांत देवआज्ञा जाली.

वद्य ४ शुक्रवार पेशवे थेवरास श्रीचिंतामणीच्या दर्शनास गेले. संध्याकाळीं आले.

वद्य ५ मंदवार तिसरा. श्रीमहादोबाची यात्रा थेऊरची.

वद्य ८ मंगळवार गोकुळअष्टमी. पेशवे महादोबाचेथें, त्याचा पुतण्या नानास शूळवेथा जाली होती ह्मणून, परामृषास गेले होते. लाडूबाई जाधवीणीचेथें लग्नाची वस्त्रें घ्यावयास गेली.

वद्य ११ सह १२ मंदवार वितिपात.

वद्य १४ सोमवार जायाजी शिंदे निरोप घेऊन गेले.
भाद्रपद मास (शुद्धपक्ष ).
भाद्रपद शुद्ध १ बुधवार. पेशवियांचा उछाह गणपतीचा आरंभ.

शुद्ध २ गुरुवारी किन्हईस दादोबा प्रतिनिधी वारले. मधली बायको सती निघाली. माहोलीस दहन जालें. त्याजला एकाएकीं वाखा जाला. रगत वोकले. दो ती रोजांत वारले.

शुद्ध ३ शुक्रवार. श्रीदेव मोरेश्वरास यात्रेस गेले. वृद्धी श्रीस आली. विश्वंभरबावाची सून प्रसूत जाली. पांचा रोज, मोरेश्वरींच प्रसूत जाली. श्रीस देवपूजा करितां आली नाहीं. १

शुद्ध ४ मंदवार. रामाजी शिवदेव याजला देशमुखाचेथें गिरमाजीपंत जाऊन, त्याचें बोलावणें पाठवून नेऊन, तरफेस व यात्रेस पाठवावें, आह्मीं कलह करीत नाहीं, ह्मणून बाईपाशीं सांगितले. त्याणीं रामाजीपंतास मोरेश्वरास जावयास सांगितले. दुसरे रोजीं रविवारीं गेले. रोजमजकुरी खबर आली की, सातारियापाशीं किन्हईंत दादोबा प्रतिनिधी होते त्याजला एकाएकी वाखा जाला. रगत वोकले. सोमवारी मंगळवारीं वाखा जाला. गुरुवारीं वारले. त्याजवर त्याचें मूल होतें तेंहि
आठपंधरा रोजां तेच रीतीनें वारलें.

शुद्ध ७ रविवारी धोंडोबा पुरंधरे याणीं बोलावून नेऊन आपलें घरगतें वर्तमान सांगितलें. भाऊ पर्वतीस जाऊन रमणियाचा वोढा बांधला. ब्राह्मणास दक्षणा द्यावयाकारणें.

शुद्ध ८ सोमवारी पुणियांत ब्राह्मणास दक्षणा द्यावयाचा आरंभ केला. पांचा ठायीं दक्षणा द्यावयास द्वारें केली. जागाजागा चौक्या ठेविल्या. आणि दक्षणा फार फार दिल्या. बारा तेरा लाख रुपये वांटिले. खबूतरखानियांत भिकारभणंग यांस देकार महादाजी गोविंद याजकडून देविला. अठरापगड जातींतून जो घ्यावयास गेला त्याजला देकार दिल्हा. रमणियांत रात्री दिवट्या लाविल्या. ब्राह्मणावर उजेड पाडिला. दुसरे दिवशीं मंगळवारी रात्रीं अडीच प्रहर रात्र जाली तेसमयीं ब्राह्मण सरले. मग सुटले. गांवपावेतों. वाटेनें दुरस्ता हिलाल लाविले. त्या उजेडें ब्राह्मण गांवांत आले. चौदा प्रहर दक्षणा वांटिली. मोठा धर्म जाला. पन्नास साठी हजार ब्राह्मण हलला. सत्तर हजारपर्यंत गणती आली. नाना धर्मात्मा थोर ! ऐसा कोणी जाला नाहींसा दिसतें. १

शुद्ध ९ मंगळवारीं ब्राह्मणास दक्षणा अडीच प्रहर रात्र होईतोंपर्यंत देतच होते. मग ब्राह्मण सरले. मग उठले. १

शुद्ध १३ मंदवार शनिप्रदोष. क्षत्रोजी व शेकोजी ना। अंबेलकर यांची मनसुबी नारो आप्पाजीकडे पाडली होती. त्यास सेखोजीनें बाबाकडे सांगून हुजूर श्रीमंताचे मनसुबी करावीसी जाली.

शुद्ध १४ रविवार कुलधर्म. श्रीमंतानीं, सुवर्णधेनू करून तिचें गोदान करणार, त्याचें अधिवसन पर्वतीस देवदेवेश्वराजवळ केले. दुसरे रोजीं गोदान तेथेंच जाऊन केलें असे. या दानास [ पुढें जागा कोरी.]

शुद्ध १५ सोमवार श्रीमंतानी पर्वतीस देवदेवेश्वरापाशीं सुवर्णगोदान दिल्हें असे. १

शुद्ध ४ गुरुवार. ईद रमजान. कुतबा काजीच पढले, वारले, पीर जाले. सैद नाईबीशीं व खातिबीशी भांडतात. मागें त्याणीं अमानतपत्र आणिलें होतें, दिकतीचें. परंतु श्रीमंतानीं काजीसच कुतबा पढावयास सांगितला असे. पुढें मनसुबी करणार. सैदांनीं निमाज वरल्या दरगायांतच केली. समशेरबहादूर नेला होता.

शुद्ध ५ शुक्रवारीं श्रावणी केली. पुढें पूर्णमेस श्रवण नक्षत्रीं करावी, परंतु सिंहसंक्रांत ते दिवशीं निघते, याजकरितां हस्त नक्षत्र आजी पंचमीस, ह्मणून आजीच श्रावणी केली. नदीस जागा पाणी आलें ह्मणून नाहीं. याजकरितां बाबूजी आनंदराऊ कमाविसदार याचेथेंच श्रावणी केली असे. शिवरामभट शाळेग्राम याणीं यंदा नव्या मुंजी ज्या मुलाच्या जाल्या आहेत त्यांची श्रावणी करितां येत नाहीं, ह्मणून राहिली असे. वेजूरयेदियांची श्रावणी यंदा राहिलीसें दिसतें.

शुद्ध ६ मंदवारीं श्रीमंतानी दक्षणा ब्राह्मणास द्यावी. त्यास पाऊस उघडला नाही. दुसरे शिरवळापाशीं व भीमेवर ब्राह्मण आले आहेत. पाऊसामुळें आवरें नदियानीं केली. एक एक नाव. ब्राह्मण झाडून उतरूं पावले नाहीत. याजकारितां दक्षणा दिधली नाहीं. ब्राह्मण आलियावर देणार.

रोज मजकुरीं शिराळशेटीचा दिवस. उभयतां देशमुखास दौलतरावबावाच्या मुलाचें सुतक होतें. परंतु शिराळशेटी घालून नदीस पोंचविले. विशेष समारंभ केला नाहीं. वाजंत्री लावून नदीस नेऊन
टाकिले असेत. १

रोजमजकुरीं मौजे वानवडी ता। हवेली पाटील, चौगुले यांच्या शिराळशेटीची कटकट जाली. कुसाजी जांबूळकर याचा वडील पुतण्या चौगुलकी करितो. शिराळशेटी घालीत आले आहेत. त्याजला संभाजी माळी जांबुळकर व सुभानजी हे कटकटीस आरंभले आहेत. द्वाही देणार ह्मणून अबाजीपंत कुलकर्णी याणीं सुभानजीस सांगितल्या च्यार गोष्टी विचाराच्या. तेव्हां त्यानीं कबूल केलें कीं, तूर्त आह्मीं कजिया करीत नाही, परंतु पुढें आमचें त्याचें मनास आणा. ऐसें कबूल केले. मागती मंदवारीं बदलला कीं, आह्मीं आडवें येऊं. त्याजवरून कुसाजीचा भाऊ येथें आला. त्याजपाशीं जमीदारीचे कागद पांढरीस मोकदमाच्या नांवें दिल्हे कीं, याचा शिराळशेटी चालत आला आहे, तैसा चालों देणे. ज्यास भांडणें असेल त्याणें येथें यावें, मनास आणिलें जाईल. ते कागद दाखविले. आपण अवघे घरास गेले. शिराळशेटी नवा ह्मणून सांगितलें. संभानें पोर आपला पाठविला. तो जाऊन वेशीपाशीं शिराळशेटी काठीने पाडिला. रामोजी जगथाप याणें शिदोजीचा शिराळशेटी उजवीकडे असतो तो आपल्या हाते आपल्या डावीकडे केला. चौगुलियाचा पडिला. पाटिलाचेंहि उजवे डावें जालें. याजमुळें तेथेंच शिराळशेटी ठेविले. येथें माळी बोभाट घेऊन उभयतां आले. संभाजी ह्मणों लागला की, आह्मीं कजिया करणार होतों. तुमचा कागद आला. मग आह्मीं घरास गेलों. पोरास कागदाचा विचार ठावका नव्हता. त्याणें शिराळशेटी पाडिला. पोरासोरी जाली. म्या आपल्या पोरास काठी मारिली कीं, तू कां आडवा जालास ? कुसाजीस सांगितले कीं, तुह्मी आपला शिराळशेटी न्या. परंतु हे नेईनात. वेशींतच ठेविला. ऐसें त्याणें सांगितले. कुसाजीच्यांनी सांगितलें कीं, याणीं पाडिला, मग आह्मीं उगेंच काशियास न्यावा ऐसें सांगितलें. ऐशियास, संभाजी माळी जिवाजीपंताचा सरिक, त्याजपावेतों हा लांबवील, याजकरितां बाळकृष्णपंतास माळियाचें वर्तमान सांगितले. त्याणीं प्यादा बा। दिल्हा कीं, शिराळशेटी नदींत टाका आणि हुजूर या. ऐसें दुसरे रोजी जालें असे. १

वद्य १४ रविवारी माणकोजी गौळी चिंचोलकर याणें सयाजी गुणनवरियास चौगुलकीचा लटका कागद करून दिल्हा होता, ह्मणून त्याचा उजवा हात, व सयाजीनें लटका कागद त्याजपासून घेऊन लटकें भांडण भांडला ह्मणून त्याचा उजवा हात, ऐसे तोडले. दोघांचे. गुण नवरियास गुन्हेगारी ऐन आठशें पन्नास खंडली होती ते काशियास पाहिजे ? होतच तोडावे ऐसें ह्मणून हात तोडिले असेत.

वद्य ३० सोमवार देशमुखाचा शिक्का, गुणनवरियाने खेरियास येजितखत लेहून दिल्हें, त्याजवरून करून दिल्हा. शाहीहि कल्याणबावाच्या हातची लि। असे. नकल असे. १

गुणनवरियास साडेआठशें रु॥ गुन्हेगारी खंडली होती ते सोडिली. कतबा फाडिला. हातच तोडिला. पाहिले पन्नास रु॥ घेतले तेवढेच पाडले. खोरियास अडीचशें हरकी खंडली होती ते भाऊस थोडी वाटली, ह्मणून आणीख दीडशें, येणेंप्रमाणें चारशें करार करून कतबा घेतला. अडीचाश्याचा माघारा दिल्हा असे. १

श्रावणमास.

श्रावण शुद्ध १ मंगळवारीं सुलतानजी शिरोळा भांबवडियांत पाहटे वारला. त्याचा घात जाला. त्याचा धाकटा भाऊ गोविंदराऊ शिरोळा यास वेडसरावर घातलें. तोहि कोठें उपाय करावयास दोन अडीच महिने गेला आहे. बंधू मेला. दोन तीन महिने निजेला होता. हगवणहि शेवटीं लागली. वारला. सारांश भांबवडियाची पाटीलकी त्याजला धारजिणी जाली नाहीं. ऐसें घडोन आलें असे. १

शुद्ध २ बुधवारी दौलतराऊ शितोळे देशमूव याचा पुत्र, पहिले बायकोचा, तिसरा, तुकोजीबावा, यास मध्यरात्र उलटलियावरी पुणियांत देवआज्ञा जाली. दिवस उगवून बुधवारी दहनास संगमास नेला. पाऊस पडतच होता. आमदाबाजेकडे लश्करास राजश्री रघुनाथपंतदादाबरोबर बापासमागमें चाकरीस गेले होते. लश्करांतच दुखणे जालें. खंग लागली होती. तिणेंच उठोन वारला असे. त्याजला एक पुत्र चौ पांचा वरसांचा आहे.