Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
वद्य ६ शुक्रवारी चिंचोली ता। पाटस येथील पांढर पीर शेख सल्ला याच्या दरगियास नेऊन साक्ष पुसिली कीं, बहिरजी खोरा चौगुली यासी गुणनवरे मौजे मा।र हे चौगुलकीचे भांडण भांडतात, याची साक्ष सत्य असेल ती सांगणे. सर्वानीं पृथकाकारें सांगितले की, गुणनवरे थळकरी, खोरे चौगुले, खरे. ऐसी साक्ष बदली असे. गुणनवरे याणीं कागद एक काढिला. तो बहुता दिवसांचा, गैरसाल. कुलकर्णी याचे दस्तूर खरे न जालें. तेव्हां हा कागद कोणापाशीं होता ह्मणून पुसतां त्याणी सांगितले की, माणकोजी गौळियाचे दोनशें रुपये आह्मापाहून घेऊन दिल्हा तेव्हां माणकोजीस पंचवीस रुपये मसाला करून आणावयास बहिरजी सोरटे पाठविले. त्याणी मसाला घेऊन आणिला. त्याजला पुरशीस करतां त्याणे सांगितले की, आपण तगलुपी कागद करून दिल्हा, कागद शेण लावून भिजवून दाखविला कीं, याप्रा। केला. लेहविला कोणापासून ? तेव्हां त्याणें सांगितले की, रामदासीबावा याचेथें प्रल्हादपंत ह्मणून ब्राह्मण होता त्याजपासून लेहविला. तो पंधराक रोज जाले वारला. ऐसें सांगितलियावरी माणकोजीस बेडी घालून ठेविला. कागदामुळे व पांढरीच्या साक्षीमुळे, गुणनवरे खोटे जाले, खोरे खरे जाले असेत. १
आषाढ वद्य ६ शुक्रवार. रोजमजकुरीं गोविंदराऊ बिन्न अडवोजी ना। वरळेकडील याजला तीन घटका रात्र उरली तेसमयीं पुत्र जाला. दिवस उगवून मंदवार.
वद्य ९ सोमवारीं बकाजी माळी लडकज यापासून हाती लेक धरवून नागेश्याची क्रिया घेतली कीं, फसलियामुळे मागें सुभानजी ढोलियापासून घेतेसमयीं खर्च लागला, तो दगड माळियापासून कांहीं घेतला नाहीं. घेतला असिला तरी आपल्यास श्री खता दाखवील. जरी ख़ता जाली तरी दगड माळियास निम्मे फसला द्यावा. न जाली तरी फसलियासी समंध नाहीं ऐशी. क्रिया घेतली असे. १
वद्य ९ मंगळवार. रतनगज हत्ती पेशवियाचा. फत्तेसिंगबावाबरोबर बीजगज हत्ती सवाई होता. जायाप्पाने आणून दिल्हा होता. त्याची याची लढाई पेशवियानीं तीनेकवार जाले, लाविली. रतनगजानें शिकस्त खादली होती तो आजि वारला असे. रुजूं. दुसरा हत्ती एर्हवीच होता तो वारला. रतनगज आहे. १
वद्य १० बुधवार चिंचोली ता। पाटस येथील गुणनवरे खोटे जाले. खोरे खरे जाले. चौ। गुणनवरियानीं येजितखेत दिल्हे असे.
वद्य १३ मंदवारीं, रामचंद्रबाबा पंढरपूर करून पुणियास आले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
रोजमजकुरी देशमुख व बहिरोबा वाघोलीस सटवोजी जाधव याची आई मोहीबाई इचा तेरावा दिवस ह्मणून वस्त्र बांधावयास गेलीं. दुसरे रोजी आली असेत. १
शुद्ध ११ बुधवारी पेशवे श्री विठाईस दर्शनास गेले होते. १
शुद्ध १३ शुक्रवारी यमाजी माळी ढोल्या वरचेवर साजापेजा मळियांत काम करितां वारला असे. १
शुद्ध १४ मंदवारीं श्रीमंत भाऊची बसती बोर घोडी उगेंच वारली असे. रोजमजकुरीं दो अडचा प्रहरा दिवसा वळवाचा पाऊस मोठा पडिला. नागझरीस पाणी आलें. रंगारी वाहून मेला. १
आषाढ वद्य १ सोमवासर.
श्रीमंत भाऊ वाघोलीस सट- लडकज माळी, बाकाजी व लख-
वोजी जाधवाकडे आईच्या दुख- माजी फसला, शेताबद्दल भांडतात.
वटियाबद्दल जाऊन आले. त्याची साक्ष श्रीनागोबापाशीं घेतली.
पांढरीची.
वद्य ३ सह ४ बुधवार पेशवे व महादोबा थेवरास श्रीच्या दर्शनास जाऊन आले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
१ जेष्ठ वद्य ५ बुधवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान श्रीरंगपट्टणची स्वारी करून रोज मजकुरीं पुणियास आले.
१ जेष्ठ शु॥ ११ सोमवारीं सूर्योदयीं राजश्री शिदोजी नरसिंगराऊ देशमुख लग्न करून घरास आले.
१ जेष्ठ वद्य १३ शुक्रवारी शिवराम गोसावियास एकाएकी दुखणें न होतां देवआज्ञा जाली.
१ जेष्ठ वद्य १४ सह अमावास्या ते दिवशीं मंदवारीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान याणीं राजश्री फत्तेसिंगबावाजवळील हत्ती रतनगज याशीं, व जायापा शिंदे यानी श्रीमंतास हत्ती दिल्हा होता त्याशीं जुंज लाविलें. त्यांत जायापाकडील हत्तीनें रतनगजास खरडून काहाडिलें. रतनगज हत्ती खराब.
१ चैत्र वद्य २ गुरुवार, ३ शुक्रवार, मातुश्री राधाबाई, श्रीमंत बाळाजी पंडित प्रधान यांची आजी, यांजला देवआज्ञा जाली.
आषाढ मास.
शुद्ध १० मंगळवारी अवशीचे बारा घटका तेरा पळें रात्र जाली तेसमयीं अनुराधा नक्षत्र. कल्याणबावाचे दुसरे बायकोस पुत्र जाला. जन्मनांव नारायण. प्रसूत चिंचवडीं जाली असे. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६९
श्री १६२० भाद्रपद शुध्द १५
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २५ बहुधान्य सवत्सरे भाद्रपद शुध पौर्णिमा भृगुवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपती याणी कारकुनानी व लोकानी सुभे लष्कर व किलेहाय यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे सा। निंब प्रा। मा।र हा गाऊ सदानद गोसावी यास इनाम आहे तेथे तुह्मी येता जाता धामधुम करिता रयतेस उपसर्ग देता ह्मणोन कळो आले तरी गोसावी यास इनाम गाव दिल्हा असता तेथे तुह्मास उपद्रव द्यावया काय यगरज आहे याउपर तरी त्या गावाचे वाटे नव जाणे घासदाणीयाविसी व हरएक विसी उपसर्ग न देणे ताकीद असे लेखनालकार
सुरुनिवीस
सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
स्मरण सन हजार ११६३
श्री.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
भाद्रपद वद्य १३ गुरुवारी सव्वा दोप्रहरा दिवसा सौ। गोदूबाई प्रसूत जाली. पुत्र जाला. सुदीन होता.
आश्विन शुद्ध रुजू. भाद्रपद वद्य ५ गुरुवारीं गाजदीखान लश्करांतून शहर अवरंगाबादेंत रोजमजकूरी जाऊन दाखल जाले.
आश्विन शुद्ध ९ चंद्रवारीं नवाब गाजदीखान यास शहर अवरंगाबाद येथें विषबाधा होऊन देवआज्ञा जाली.
आश्विन शुद्ध ८ रविवारीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांच्या व राजश्री मल्हारजी होळकर व जायाजी शिंदे यांच्या भेटी राक्षसभुवनाजवळ जाल्या.
आश्विन वद्य १० बुधवारी राजश्री विश्वासराव व राजश्री माधव, प्रधानपंताचे पुत्र, व राजश्री त्रिंबकराऊ विश्वनाथ ऐसे रोज मजकूरी लश्करांतून फिरोन येथें आले.
छ १२ मोहरमीं मोगलाजवळ श्रीमंत गेले. मोंगलानें सल्ल्यावर घालविलें. भेटी होणार.
छ मोहरमीं श्रीमंताची व मोंगलाची भेट जाली. सल्ला जाला. मोंगलानें ज्याप्रा। गाजदीखानानें मुलूक दिल्हा होता, त्याप्रमाणें करार करून, श्रीमंतास दिल्हा. अशी खबर छ आली. श्रीमंताचा प्रताप विशेष जाला.
कार्तिक वद्य ९ सह १० बुधवारी राजश्री नारो आप्पाजी लश्करास गेले होते ते रोजमजकुरीं आले, पुणियास. १
राजश्री महादोबा बाबा व धोंडोबा आप्पा व नाना व राजश्री मल्हारजी होळकर व जायाजी शिंदे ऐसे हुमणाबादेहून श्रीमंताचा निरोप घेऊन निघाले ते आपलाल्या गांवास आले. मार्गेश्वर शुद्ध (कोरी जागा) खंडेराऊ होळकर यानीं वाटेना जातां गांव लुटले व पैका गांवगन्ना घेतला.
छ रबिलावल पुस शुद्ध ३ रविवारी खबर आली की, नाशकी विनायक दीक्षित यास देवआज्ञा जाली. मार्गेश्वर वद्य १४ त्रियोदशीस नाशकास गेले. चतोर्दशीस वारले.
छ २ रबिलावल पुस शुद्ध ४ सोमवारीं यादोभट ढेकणे यास देवआज्ञा जाली.
छ ३ रबिलावल पुस शुद्ध ६ बुधवारी संक्रांतीस राजश्री जायाजी शिंदे पुणियास आले. त्यांजला सामोरे राजश्री विश्वासराव व माधवराऊ, श्रीमंताचे पुत्र, गेले होते.
छ रबिलावल पुस शुद्ध ९ मंदवारीं राजश्री मल्हारजी होळकर राजश्री विश्वासराऊ यांचे भेटीस आले. विश्वासराऊहि पुढें सामोरे गेले होते.
छ रबिलावल पुश ३ सोमवारी जायाजी शिंदे पुणियाहून सकाळचे निरोप घेऊन गेले.
छ रबिलावल पुश वद्य ४ मंगळवारी राजश्री मल्हारजी होळकर पुणियाहून निरोप घेऊन गेले.
छ रबिलावल पुश वद्य ७ गुरुवारी राजश्री जगन्नाथपंतास तिसरा पुत्र प्रातःकाळीं जाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
छ १४ सवाल, श्रावण शुद्ध १६ गुरुवारी राजश्री पंतप्रधान रोजमजकुरीं वानवडीहून कुच करून जाऊन कवडीच्या वाकाणी जाऊन राहिले. लोणीच्या गांवकरीस ओढियाच्या पाणियावर राहिले. शेणवारी जेजुरीस जाऊन, रविवारी मोरगांवास जाऊन, मुक्कामास लोणस तसेच आले. रविवारींच राजश्री महादोबाबाबा, लोणीहून कुच करून दिवसाच सासवडास गेले. सोमवारी लोणीचे मुक्कामी श्रीमंतानीं थेऊरचे कुलकर्णी विठोबा व खंडो गोविंद याजला कागद करून दिल्हा की, सरकारांत तुमचें निम्में कुळकर्ण महादाजी नारायण यांजपासून खरीदखत करून घेतलें होते, तेंहि माघारें दिल्हें. खरीदखताप्रा। पैका राजश्री नारोपंत नाना याजकडे द्यावयास सांगितला आणि विठोबास व खंडो गोविंद यास दोघास दोन तिवटें दिल्हीं. १
श्रावण वद्य ५ मंगळवारी लोणीहून श्रीमंत कुच करून, नांदूर खामगांव येथें जाऊन, मुक्काम केला. तेच दिवशीं सैदलष्करखान व जानोजी निंबाळकर ऐसे येवतावर आले. दुसरे दिवशीं षष्ठी बुधवार ह्मणोन श्रीमंतांची व त्याची भेट जालो नाहीं. भुलेश्वरास श्रीमंत जाऊन मात्र माघारे आले. गुरुवारी सप्तमीस वाटेनें चालतां त्यांच्या भेटी घेऊन मुक्कामास पाटसच्या तळ्यावर गेले. रविवारी राजश्री महादोबाबाबा सासवडास गेले ते समयी शिक्केकट्यार राजश्री शामराऊ बाबा याचे हवाली करून गेले. मंगळवारी राजश्री शामराऊबाबा पुणीं येऊं लागले. तेसमयीं शिक्केकट्यार राजश्री नारोपंत नाना याचे हवालीं करून पुणियास आले.
श्रावण वद्य ७ बुधवारीं दोन तीन घटका रात्र अवशीची जाली होती ते समयीं राजश्री महादोबाबाबा याची स्त्री धाकटी सौ। रमाबाई यास देवआज्ञा सासवडीं जाली. १
श्रावण वद्य ८ शुक्रवारीं आनंदराऊ मोकाशी याजला देवआज्ञा जाली. गुरुवारची पहाटेची सात आठ घटका रात्र होती तेसमयीं वारले, परंतु सकाळ उठोन शुक्रवारी दहन केलें.
भाद्रपद शुद्ध ६ बुधवारी कोनेर त्रिंबक एकबोटे याची स्त्री सौ। आनंदीबाई ईस देवआज्ञा जाली. प्रातःकाळचा पांच सहा घटका दिवस आला होता तेसमयीं.
त्रिंबक गोपाळ याजला चिंचवडी देवआज्ञा जाली. भाद्रपद शुद्ध ( कोरी जागा ) जाली. बरें कांहीं दिवस वाटत नव्हतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
छ १ सवाल, श्रावण शुद्ध २ शुक्रवारीं, राजश्री त्रिंबक सदाशिव पुरंधरे राजश्री गोविंदराऊ शितोळे देशमुख यांच्या घरास आले की, मौजे गराडें, ता। कर्हेपठार, येथील निम्मे पाटिलकी वडीलपण श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांनी खुषखरीदी घेतली आहे. त्यास, ते सांप्रत्य आपल्यावर मेहरबान होऊन आपल्यास दिल्ही आहे, व पत्रहि दिल्हें आहे. तर तुह्मीं आपलें पत्र गांवकरियांस देणें की, श्रीमंतांनीं पाटिलकी, निम्मे मौज मजकूरची, त्रिंबक सदाशिव व महादाजी अंबाजी पुरंधरे याजला दिल्ही आहे. तर तुह्मीं याचे आज्ञेंत वर्तणें. ह्मणून पत्र दिल्हें. त्याजवर त्रिंबक सदाशिव गराडियास गेले. त्याजबरोबर लक्षुमण चिंतामणहि गेले. गांवकरियांचे हत्ती याजला द्यावयास दुसरे रोजी मंदवारीं प्रातःकाळीं दो घटका दिवसांत मुहूर्त होता.
श्रावण शुद्ध ४ रविवारी, मु॥ पुणें.
राजश्री यशवंतराऊ याजसीं बळवंतराऊ गणपत यासी पालखी
दि॥ राजश्री महादोबा पुरंधरे दिल्ही. संध्याकाळच्या दोन
याजली किल्ले पुरंधरचे सबनि- घटकांत मुहूर्त होता. १
शीचीं व मुतालकीची वस्त्रें दिल्हीं. बाबूराऊ राम फडणीस यासीहि
पहिलेच महादाजी अंबाजी पुरंधरे पालखी दिल्ही. १
यास सबनिशी दिल्ही तिची माधवराऊ विश्वनाथ पेठे यासी-
मुतालकी यास होती. रुसवियामुळें हि पालखी दिल्ही. तेच
घरी होते ते गडास पाठविले. समयीं. १
छ ५ सवाल, श्रावण शुद्ध षष्ठी मंगळवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी बाजीराऊ प्रधान यानीं खबूतरखानियांत ब्राह्मणांस कोंडून दक्षणा दिल्ही. ब्राह्मणहि दक्षणेस विशेष जाले. व दक्षणाहि विशेष दिल्ही. या मागें इतके ब्राह्मण जमाहि जाले नव्हते. व इतकी विशेष दक्षणाहि दिल्ही नव्हती. यंदा मोठा धर्म केला. सुवर्ण, हस्तिरथदान व दक्षणा मिळोन सातेक लक्ष रुपये लागले असतील.
छ ७ सवाल, श्रावण शुद्ध ८ गुरुवारीं राजश्री बाळाजी पंडित प्रधान व राजश्री भाऊ ऐसे गारपिराजवळ डेरे देऊन राहिले होते. तेथून कुच करून वानवडीवर जाऊन राहिले. व राजश्री महोदाजीपंत बाबा पुरंधरे हेहि गांवांत आपले घरीं होते तेहि रोज मजकुरीं वानवडीस जाऊन राहिले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
छ १० रमजान आषाढ शुद्ध एकादशीसह द्वादशी मंदवारीं दो प्रहरा दिवसा राजश्री भाऊ सासवडास राजश्री महादोबा बाबास आणावयास शुक्रवारी गेले होते ते ते दिवशी तेथें राहून आजी मंदवारी दोप्रहरा महादोबास घेऊन आले. श्रीमंत राजश्री नाना त्रिंबकराऊ विश्वनाथ याचे वाडियांत मोहूर्तेकरून राहिले आहेत. त्यांची भेटघेऊन, मग महादोबा आपल्या घरास गेले. त्याजवरी मग राजश्री नाना व भाऊ ऐसे विठ्ठलवाडीस गेले. विठ्ठलवाडीहून माघारे आल्यावरी बाबास बोलावूं पा।. बाबा नानाकडे गेले होते.
छ ११ रमजान आषाढ शुद्ध १२ रविवारीं.
श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित राजश्री धोंडोबा व नाना व
प्रधान, राजश्री त्रिंबकराव विश्व- निळो महादेव पुरंधरे ऐसे सासव-
नाथ याचे घरीं प्रस्थान करून डीहून येथें आले असेत. १
राहिले होते. ते रोजमजकुरीं पर्व-
तीस जाऊन परभारे डेरियास गार-
पीरा जवळ गेले. दोप्रहरा
दिवसा. १
छ आषाढ वद्य २ गुरूवारी आवशीच्या आठ घटका रात्रीं राजश्री निळो महादेव पुरंधरे याजला पुणें देशचे मुतालकीचीं वस्त्रें दिल्हीं. राजश्री श्रीपतराऊ बापोजी याजपाशीं शिक्के कट्यार होती ते त्याजपासून आणून निळो महादेव याचे हवालीं केली असे. १
आषाढ वद्य ६ मंगळवार राजश्री शामराऊ बाबा याजला श्रीमंतांनी पालखी दिल्ही. दोन वस्त्रें दिल्हीं. १
आषाढ वद्य ८ गुरुवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान, थेवरास सुवर्णाचा रथ हत्तीचा केला होता, त्याचें दान करावयास गेले. दुसरे दिवशीं शुक्रवारीं अधिवासन केलें. तिसरे दिवशीं मंदवारी एकादशीस दान केलें. लाखा सव्वा लाखो रु॥ सोनें होते. ते वेळेस विठोबा कुलकर्णी मौजे मजकूर याचें कुलकर्ण निम्में मागें सरकारांत घेतलें होतें, त्याची परवानगी सोडोन द्यावयाची जाली आहे. खरीदखतांत पैका असेल तो माघारा घेऊन, मग सोडावें. दुसरे दिवशीं सखारामपंतास पालखी दिल्ही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
अधिक वद्य १३ रविवारींच दादंभट्ट धर्माधिकारी यास पाटशीं देवआज्ञा जाली. बायको अगर लेक कोण्ही जवळ नव्हती. दोप्रहरा दिवसा जाली. धाकटा लेक जयराम जवळ होता.
आषाढ शुद्ध ७ बुधवारीं राजश्री विसोबा याची स्त्री आवडी इजला रोज मजकुरीं संध्याकाळचा चार घटका दिवसा देवआज्ञा जाली. विसोबा वैद्य याचें बुडालें. १
आषाढ शुद्ध १० गुरुवारीं अवशीची अकरा घटका रात्र जालीं होती तेसमयीं राजश्री बाळाजी पंडित प्रधान हे मोहुर्तेकरून स्वारीस जावया निघोन, राजश्री त्रिंबकराऊ विश्वनाथ याचे घरीं बारावे घटकेस येऊन राहिले. घरींहून निघाले तेसमयीं मोहूर्त चांगला जाला. दिवस उगवून शुक्रवारीं राजश्री भाऊ, दादा व रामचंद्रबावा सासवडास राजश्रीं बाबाचे समजावीसीस गेले. महादोबांनीं च्यार हजार फौज ठेवावी, सुरत आटावीशींत पांच लाखाचा मुलूख वसुली सरंजाम द्यावा, महपिलीकडे साडेती लाखांचा द्यावा, पुणेदेशची मुतालकी महादोबाच्या पुत्रास द्यावी पुरंधर देखील, महादोबास पहिले चाळसा हजाराचा सरंजाम माळवियांत वगैरे दिल्हा आहे, आणीख साठ हजारांचा सरंजाम देशीं व गंगाथडीस द्यावा, सदाशिव त्र्यंबक यास हुजूरची राजश्रीपाशील मुतालकी आहे त्याजलाही कांहीं सरंजाम द्यावा, धोंडो मल्हार याजला कांहीं सरंजाम द्यावा, ऐशी बोली आहे. करारमदार जाले आहेत. परंतु घडोन येईल ते खरें. १
राजश्री मल्हारजी होळकर व जायाजी शिंदे दोन वरसें माळवियांत गेले. अटकेपलीकडून पठाण दिल्लीवर येणार होता, याजकरितां पातशाहानें कुमकेस बोलाविलें. गेले. पठाण दिल्लीवर आला नाहीं. मीर मनूपासून पैका घेऊन गेला. माघारा मल्हारबा पातशहाच्या बोलें गेले. ह्मणून ते मेहेरबान होऊन आपले पातशाहींत दरोबस्त चौथाई दिल्हे. अगरें अजमिर दोन सुभे दिल्हे. आठ लाख रुपये रोख दिल्हे. सत्रा लाखांची वरात दक्षण सुभियावर दिल्ही. दक्षणेंत गाजुद्दीखान सुभा मल्हारबा घेऊन आले. त्याणें बर्हाणपुरसुद्धां आपले तर्फेनें व जुन्नर सरकार, संगमनेर सरकार, दर्गानाशिक दिल्हे आहे. याजकरितां पेशवे सलाबतजंगावर जाणार. त्याचा पराभव करणार. गाजुद्दीखानाची स्थापना करणार. याजकरितां बाहेर प्रस्थान निघालें. यांचें नशीब अधिक आहे. करित तें होतें. पुढें काय होऊन येईल तें पहावें. यांचा प्रताप मोठा चालिलो आहे ! १