Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४ ]
श्री
शके १६२० ज्येष्ठ शु॥ १३
सिका
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २४ बहुधान्यनाम संवत्सरे ज्येष्ठ शु॥ १३ त्रयोदशी भृगुवासरें क्षत्रियकुलावतंस श्रीराजारामछत्रपति स्वामी यांणीं :-
राजश्री खंडो बल्लाळ व महादाजी चिम-
मोरेश्वर निळकंठ नाजी व रुद्राजी शामजी प्रभुसरदेशमुख
मुख्य प्रधान. मामले मुर्तजाबाद ऊर्फ चेऊळ यासि
( सिका नाहीं ) वृत्तिपत्र लेहून दिल्हें ऐसी जे :-
तुह्मी स्वामींच्या राज्यांतील पुरातन सेवक. सेवा एकनिष्ठपणें करीत आला व करीत आहांत, रायगडप्रांतीं तांब्रांचे उलबण जाहालें; तेसमयीं स्वामी स्वार होऊन कर्नाटक प्रांती गेले. त्याप्रसंगी खंडो बल्लाळ स्वामीच्या पायांपाशी एकनिष्ठता धरून स्वामींस संतोषी केलें. याजकरितां तुह्मांवरी स्वामी कृपाळू होऊन मामले मैजून मुस्तफाबाद उर्फ दाभोळ येथील देशमुखींचे वतन अमानत होतें. त्यास, तुह्मांपासून सेरणी दाभोळी करी लाहारी २०,००० वीस हजार घेऊन देशमुखीचें वतन अकरामरहामत करून दिल्हें. कांहीं दिवस तुह्मी वतनाचा उपभोग करीत होता. नंतर सातारा बाजीचा प्रसंग विज्वर जाहाला. तेप्रसंगी राजश्री गणोजी शिर्के व रामोजी शिर्के यांणीं विनंति केली कीं, दाभोळचे देशमुखीचे वतनाचा फर्मान पूर्वी अमलशाह पादषाह यांणीं आपले वडिलांस परंपरा वतन करून दिल्हें. ते जप्त जालें; त्याची हाली कृपा करून मोकळीक होऊन आमचे आह्मांकडे चालविलें पाहिजे. यावरून स्वामी संकटांत निरुपाय जाणून, तुह्मांकडून तें वतन देविलें, सबब, हाली महाराज कृपाळू होऊन मोबादला मूर्तजाबादचें वतन तुह्मांस देऊन चालविलें. त्याची सनद देण्याविसी विनंति केल्यावरून ही सनद तुह्मांस दिल्ही असे. तरी तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनीं वतनाचा अनभव करीत जाणें. जाणिजे. छ० ११ जिल्हेज, मु॥ तिसा तिसैन. बहुत काय लिहिणे ? मोर्तब.
वार. सुरुसुदबार. सा। सरकार, सा। पत्रीं.
बार. बार. बार. बार.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७४
श्री १६२१ वैशाख शुध्द ६
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २५ प्रमाथीनाम संवत्सरे वैशाख शुध शष्ठी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी राजश्री अनाजी जनार्दन देशाधिकारी प्रा। वाई यासि आज्ञा केली ऐसे जे सदानद गोसावी याचे शिष्य आनंदगिरी गोसावी यास मौजे इडमिडे प्रा। मजकूर हा गाऊ यास इनाम आहे तेथील तुह्मी शंभर रुपयेपावेतों वसूल घेतला पुढेही उपद्रव देता राहत नाही ह्मणोन कळो आले तरी मौजे मा।र गोसावी यास इनाम दिल्हा असता तुह्मा वसूल घ्यावया व उपद्रव द्यावया काय गरज आहे याउपरी तर्ही ऐसी गोष्टी न करणे इतकीयाउपरी तुह्मी त्या गावास वसुलाविषी व हरएकविषी तगादा लाविता ऐसा हुजूर बोभाट आलीया तुमचा मुलाहिजा होणार नाही जाणिजे निदेश समक्ष
रुजू सुरनिवीस
सुरु सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३ ] श्री शके १६१६ आश्विन वद्य १३
श्रीमत् क्षत्रियकुलावतंस महाराज राजश्री छत्रपति स्वामीचे सेवेसीः-- सेवक निळकंठ बल्लाळ कृतानेक, विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीकरून ता। छ २६ सफर पावेतों सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विनंतिः स्वामीनें आठशे रुपयांकरितां माणकोजी हुकेवारदार पाठविला. त्यासी येथें ठेवून घेऊन पैकियाची जितकी तरतूद मात्र करावयाची तितकी केली. परंतु, कांहीं साध्य झालें नाही. श्रम केले तितकेहि निर्फळ झाले. मुलकामुळें टकापैका यावा, तरी वरघांटचा अंमलच चालिला नाही. कोंकणचे चौथाईचे दहा हजार रुपये ऐवज होतो तो पहिलेच वसूल होऊन गेला. पुढें सरदारीस व गडकिल्याचे बेगमीस ऐवज नाही. त्यांतहि आह्मी या प्रांते येतांच श्रम करून जो ऐवज साहस करून मिळाला तो सेवेसी पाविला. सांप्रत कोंकणांत फिसाहस जालियामुळें कोंकणांतील प्रसंग विस्कळिल जाला. स्वारीसिकारी करावी, तरी तोहि प्रसंग नाहीं. मुलूख वैरान. हे रीतीचें वर्तमान आहे. तें पूर्वीहि सविस्तरेंकरून सेवेसी लिहिलेंच आहे. माणकोजीस बहुत दिवस जाले, राहवितां मये, याकरितां यत्नप्रेत्न करून बरोबरी माणकोजी हुकेबारदार ऐवज पाठविला असे. बितपशील रुपये.
२०५ ऐन रुपये
१०४ मोहरा ८ दर १३
९१ सोने वजन तोळे ।१ दर १३ प्रमण
------------
४००.
एकूण चारशे रुपये पाठविले असेती. त्याची सनद सादर करावया आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय. हें विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २ ] श्री. शके १५९६ ज्येष्ठ वद्य १
स्वस्तिश्री राज्याभिषेक १ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ वद्य प्रतिपदा भानुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति स्वामी यांणीं, राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री बाळाज़ी आवजी प्रभुचिटनीस यासी आज्ञा केली ऐसी जे :-
तुह्मी स्वामीसेवा बहुत निष्ठेनीं करून श्रमसाहास फार केले. राज्यवृद्धीचे कामीं आला. यावरून तुह्मांवर कृपाळू होऊन अष्टप्रधानांतील पद द्यावें, असें गनी आणिलें असतां, तुह्मीं विनंति केली कीं, आपणांकडे चिटणीसीचा दरख चालत आहे. हा अक्षयी वतनी वंशपरंपरेनें सन्निध व सर्व राज्यांतील चालवावा व कारखानिसी व जमेनिसी दोन धंदे राज्यांतील आपले निसबतीस दिल्हे ते अक्षयी असावे. याजवरूनु कृपा करून चिटनीसीसन्निधानची व सर्व राज्यांतील वतनीकरार करून दिल्ही. कारखानी व जमेनिसी राज्यांतील तुह्मांकडे दिल्ही असे. स्वामीचे वंशीचा कोण्ही अन्यथा करणार नाही. तरी लिहिलेप्रमाणें सदरहू प्रयोजनाचे व्यापाराची सेवा तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें करूनु सुखरूप अनभवणें. जाणिजे. छ० बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
फाल्गुन शुद्ध १५ पूर्णिमा शनवारी हुताशनी जाली असे. रविवारचा ठराव होता हुताशनीचा.
धर्मोजी वाळके यांशी व रामजी वाळके याशीं दिघीच्या पाटिलकीचा काजिया होता. सालगुदस्ता बापूजीपंती नियम केला. रामजी लटका जाला होता तो राजश्री पंताकडे जाऊन होळी अमानत करून आला होता. त्यास राजश्री बापुजीपंत अवरंगाबादेपावेतो पेशविया बरोबर गेले होते. त्याणीं विनंति करून आपल्या नांवें पेशवियाचे पत्र घेतलें कीं, तुह्मीं इनसाफ केला आहे तो बराच केला आहे. धर्मोजीची पोळी अमानत केली होती ती मोकळी केली. त्याची त्याजकडून लावणें. निवड पत्राप्रा। सुरळीत चालवणें. ऐसें घेऊन आले. रथोजी वाळकियास बोलावून आणून आणीख साडेसातशें रु॥ नजर घेऊन पागोटें बांधोन पोळी लावावयाची आज्ञा दिल्ही. रामजीची बायको आणिली. रामजी हजीर नव्हता तिजला दोनशें रु॥ गुन्हेगारी खंडली आहे. तिचा तगादा लावून निशा करून घेतली असे. १
खडकीच्या कुलकर्णाचा टुल्लू व कानडे यांचा काजिया होता तो गुदस्ता बापूजीपंती विल्हें लाविला. कानडे खरे जाले. परंतु टुल्लू मागती पेशवियापाशीं जाऊन राजकारण करून कुलकर्ण अमानत केलें. गुमास्ता दिवाणांतून पाठविला. त्याचीही बापूजीपंतीं वाळकियाच्या कामाबरोबर रदबदली करून कानडियाच्या हातें कुलकर्ण घेणें ह्मणून गांवास पत्र आणिलें, गुमास्तियास उठोन येणें ह्मणून, ऐशी दोन्ही पत्रें आणिलीं. कानडियास कुलकर्ण चालवावयास आज्ञा केली असे. १
फाल्गुन वद्य १ रविवारी पेशवियाकडील बातमीचे कागद आले. नासरजंगानें सल्ला केला. जाहगीर यास दिल्ही. हांडे व खरगोणप्रांत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७३
श्री १६२१ वैशाख शुध्द ६
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २५ प्रमाथीनाम संवत्सरे वैशाख शुध शष्ठी भोमवासरे क्षत्रिय कुलावतस श्री राजाराम छत्रपती याणी समस्त- राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य हुकमतपन्हा यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे प्रा। वाई हा गाव सदाशिव गोसावी याचे सिष आनदगिरी यास इनाम आहे तेथे तुह्मी धामधुम करून से दोनसे रुपयेपावेतो उसूल घेतला पुन्हा आणखी उपद्रव देतच आहा ह्मणौन हे वर्तमान विदित जाले तरी गोसावीयाच्या इनामगावास उपद्रव द्यावा हे कोण गोष्ट आहे याउपरि तर्ही गोसावीयाच्या गावास एक जरा उपद्रव ने दणे महालच्या कारकुनास ताकीद करून हाल खुर्द वर्तवणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
वद्य ५ सोमवारीं श्रीमंत भाऊ मुहूर्तेकरून पाहटे सा सात घटका अगर तीन चार घटका रात्र असेल तेव्हां लश्करांत मुंढवियास गेले. तेच दिवशीं संध्याकाळचा च्यार घटका दिवस उरला तेव्हां शिदोजी नरसिंगराऊ लश्करास गेले. बहिरजी शितोळा बा। होता. ढलाईतही होते.
वद्य ७ बुधवारी मल्हारपंत आबा मजुमदाराकडील सुभानजी बावकरच्या घरावर येऊन बाईस व लक्ष्मणबावास बोलावून नेले. मोकाशाही आणले होते. वर्तमान मनास आणिलें. जागा मोजिली. गेले.
वद्य ८ गुरुवारी नारो आप्पाजी मुहुर्तेकरून श्रीमंताकडे लश्करास जात होते. त्याचा चुलतचुलता पाडळीस वारला. सुतक पडिलें ह्मणून राहिले. कोनेर त्र्यंबक याच मुहूर्ते गेले.
वद्य ८ शुक्रवारी लाडूबाई जानबा भुलबास लक्ष्मणबावास घेऊन, मुंढवियाच्या मुक्कामास जाऊन, शिदोजी नरसिंगराऊ याचा निरोप घेऊन, रात्रीं घरास आली. दहा हजार करार केले. वसूल मुजरा घ्यावा. बाकीची वाट करावी. जगोबाचा पाववायाचा करार मदार गुदस्ता केला आहे. त्याप्रा। चालवावें, ऐशी आज्ञा केली. कावडीचा कागद कानेरेपंतीं घेतला आहे तो माघारा द्यावा ऐसें केलें. कावडी सोडावी त्याणीं, ऐसें जालें असे.
वद्य ९ मंदवारीं श्रीमंत सासवडास गेले. तेथून जेजुरी, मोरगांव, कुरकुंब करून येणार.
वद्य १० रविवारीं श्रीमंताचें लश्कर व डेरे कूच करून पुणियावरी गेले. बा। जिवाजीपंत आण्णा आहेत.
अश्विन १ वद्य ९ सोमवारी पहाटेस बापूजी श्रीपत यांस देवआज्ञा जाली. त्याची धाकटी स्त्री गौबाईनें बराबर सहगमन केलें असे.
कार्तिक शुद्ध ५ शुक्रवारी पहाटेस आप्पाजी मल्हार धडफळे याची मातुश्री भिऊबाई यांस देवआज्ञा जाली व तेच दिवशीं तीन घटका दिवस आला होता तेव्हां सौ। वेणूबाई, रा। मोरोपंत आपाची वडील कन्या, ईसही देवाआज्ञा जाली. येथें मोरोपंताच्याच घरीं म्रुत्य पावली असे. १
कार्तिक शुद्ध १२ शुक्रवारी दोन अडीच प्रहरें रात्रीं पुरंधरींहून राजश्री श्रीपतराऊ बापूजी व रा। शामराऊ बाबा निघोन येथें पुणियास कार्तिक शुद्ध १३ शनवारीं प्रातःकाळीं दोन घटका दिवस आला तों आले. त्यांच्या वाडियांत श्रीमंत राजश्री सदाशिवपंतभाऊ येऊन त्यांस घेऊन आपल्या वाडियांत गेले. पूर्ववतप्रों। त्यांचा त्यांजकडे सुभियाचा धंदा करार होऊन वस्त्रें एक तिवट व एक पासोडी पैठणी दिल्ही असे. १
पौष शुद्ध १३ मंगळवारी सायंकाळच्या दोन घटका दिवसा मोरो विश्वनाथ धडफळे यास देवआज्ञा जाली असे पुण्यामधे. १
राजश्री बाळाजी बाजीराऊ व बापूजीपंत शिरवळचे मुक्कामीहून राजश्रीचा निरोप घेऊन फाल्गुन शुद्ध नवमी रविवारी पुणियास आले.
फाल्गुन शुद्ध १४ शुक्रवारी बापूजीपंत पुरंधरास माचीस आपल्या घरास गेले. उमाबाई दाभाडी शिरवळीहून निरोप घेऊन पुणियास आली. नानांनी मेजवानी केली. पूर्णमेस तळेगांवास गेली. सेनापति राजश्रीकडे शिरवळीहून गेले. संतबा व गोविंदराऊ देशमूख नारो अनंत धडफळे हेहि शिरवळीहून पुढें राजश्री बरोबर गेले आहेत. सदरहूजण पूर्णमेस गांबास आले असेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
वद्य १० गुरुवारीं श्री ज्ञानेश्वराच्या देवळांत अवशीचे सा घटका रात्रीं वीज शिरली. धुपारती करून एक गुरव व एक ब्राह्मण व एक विधवा बायको ऐशीं समाधीपाशी गेली होती तेव्हां वीज शिरली. यामुळें बायकोचे मांडीस धक्का लागला, परंतु वांचली आहे. गुरवाच्या उरावर धबका बसला. त्याच्या गळ्याची कंठी तुटली. परंतु तो बोलत चालत होता. वांचेसा होता. ब्राह्मणास पुरती जरब बसली. तो पडला. मंडपांत आणिला तों वारला. देवळांतील विठोबारखमाईवरील वस्त्रें हरपाळलीं. आणि वीज देवळांतून वरती गेली देवळास चीर पडली. बाहेर शिखरापाशीं ज्या वाटेनें निघाली तेथें एक वीटच उडोन गेली. तीच वीज चोपाळियावर पडली. चोपाळा भंगला. चिरा पडिला. ये जातीचें वर्तमान जालें असे. कोण्ही सांगितली कीं दारावाटेनेंच वीज माघारी गेली. मग शिखरास लागोन चोपाळियावर पडली.
वद्य ११ शुक्रवार तारा थोर एक पडिला. लोकांनीं देखिला.
वद्य ११ सह १२ मंदवारी दोप्रहरा दिवसा अनमानें सौ। ठमाबाईस पुत्र जाला. पुणियांत त्यांचे घरीं प्रसूत जाली. खंडेराऊ जाधव वगैरे याणी दोन सूर्य पुणियांत सकाळचे देखिले.
वद्य १३ सोमवारीं चौदावे रोज बळवंतराऊ याजकडील पत्रें श्रीमंतास आलीं कीं, कडपाचा पठाण बाहेर आला होता त्याशीं जुंझ जालें. मोडून मारून टाकला. कडपें घेतलें. फत्ते जाली. ऐशी पत्रें आलीं.
आश्विन मास, शके १६७९, सन ११६७.
आश्विन शुद्ध १० मंदवार विजयादशमी पेशवे उजेडासारखे शिलंगणास गेले होते. येतेसमयीं वायबार सुटले. तेव्हां हत्तीवरल्या निशाणदारास पायास गोळी लागली व आणीखही एकादोघांस गोळ्या लागल्या. गोपाळराऊ गेविंद यास चौघडेनौबत दिल्ही व मल्हारराव रास्ते यासही चौघडे दिल्हे.
शुद्ध १२ सह १३ सोमवारी रात्रीं पेशवियाचे डेरे बाहेर जाले. पाहटेची साघटका रात्र उरली ते समयीं श्रीमंत स्वार होऊन डेरियास गेले. पालखीत बसोन गेले.
वद्य ३ मंदवारी शिदोजी नसिंगराऊ देशमुख याची कलावंतीण श्रीमंतांनीं ढलाईत देऊन गंगेपलीकडे लावून दिल्ही.
वद्य ४ रविवार. थोरले श्रीमंत थेवरास गेले. भाऊ घरीं राहिले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
सेवेसी विनंति. येथून कागद घेऊन गेला त्या कार्याचा मनसबा काय करावा तो लेहून पाठवणें. अबल कागद ज्याची नकल येथें आणिली होती तो आपले दृष्टीनें पाहून ठेवणें. सदाशिव केशव राघोपंताकडील त्याजला घोडियाचें सांगितलें आहे तो घरास आला तर ठीक करून ठेवणें हे विनंति.
आषाढ मास शके १६७९.
आषाढ शुद्ध १० सोमवारीं अडचा प्रहरा जगन्नाथपंत आबाची लेक तुकी वारली. तिचें दहन करून मल्हारी घरास आला. आणि संध्याकाळचा सा घटका दिवस राहिला ते समयीं सावडावयासी गेला तों रामाजी नाईक भिडेहि वारले. त्याचेंहि दहन जालें ह्मणोन सांगितलें. वेथा पहिलीच जाली होती. तेच वेथेनें वारले.
शुद्ध १२ बुधवारीं तिसर्या प्रहरा राजश्री शामराऊबाबा बाई देशांत श्रीमंतांनीं पा। होते ते पुणियास आले. श्रीमंताची भेट घेतली. सौ। जिजाबाईस श्रीमंतानी मेजवानी बहुत आदरें केली. वस्त्रें भूषणें हत्ती घोडे रुप्याची अंबारी वगैरे दिल्ही.
शुद्ध १४ शुक्रवारी सोभाग्यादिसंपन्न जिजाबाई संभाजी राजियाची राणी पुणियासी आली होती ते रोजमजकुरीं गेली. त्याजला घालवीत राजश्री सदाशिवपंतभाऊ गेले होते.
शुद्ध रुजू. वद्य १ शनिवारी बखाजी नाईक जाचला यासी देवआज्ञा जाली. साजापेजा असतां एकाएकींच वारला.
वद्य ४ मंगळवारी अंबाडचा देशमूख सैद ह्मणून मुसलमान होत, लचांडखोर होता. तगलुफी शिक्के देखील करीत होता. त्याची गर्दन मारली. माणकोजी बाणराऊ सुतार ह्मणून लचांडखोर होता त्याजला मार ( पुढें गहाळ. )
अधिक आश्विन, शके १६७९.
वद्य ३ सह ४ शुक्रवार. श्रीमंत थेवरास चिंतामणीच्या दर्शनास गेले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
सहस्रायु चिरंजीव विजयीभव राजमान्य राजश्री जगोबा व रा। रा। नाना यासी.
प्रति मोरो विश्वनाथ आशिर्वाद उपरि येथील वर्तमान भाद्रपद शुद्ध ३ मंगळवारपावेतों यथास्थित असे. विशेष. गकारपूर्वक आपले यजमान त्यांचे पित्रव्य सकारपूर्वक हे मोरगांवास उदईक येथून स्वार होऊन जाताती. ऐसियासी, हे तेथें गेले ह्मणजे हे व एकबोटे ऐसे एकत्र होऊन बखेडियास मिळतील, ऐसा अर्थ जाणोन हा कागद तुह्मांस लिहिला असे. तरी तुह्मापाशीं काकाजी विनायकाचा कागद दिधला आहे तो तांतडीनें त्याजपाशीं देऊन लोकेषणा होये ते गोष्टी न करणें. तुह्मीहि सुज्ञ आहां. आपल्या कागदाचा भार जाय तो अर्थ न करणें. आपला दस्तऐवज दुसर्याच्या हाती पडोन आपल्यास मूर्खत्व नये ते करणें. व तुह्मीहि हरएकविशीं धीर धरून, जें कर्म करणे तें भार रोखोन करणें. फार विस्तारें ल्याहावें तरी शहाणे आहा. या दिवसानें दिवस उगवला ऐसें नाहीं. बहुत काय लिहिणें ? लोभ असो देणें. हा आशिर्वाद.