Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्रावण मास.
शुद्ध ४ मंगळवार श्रीमंत राजश्री भाऊ व पुरंधरे घोडियाचे रथांत बैसोन धांवतच जाऊन थेऊरच्या देवाचें दर्शन घेऊन ताबडतोब बराबर आले.
शुद्ध ६ गुरुवारी दोप्रहरापासून श्रीमंतानी दक्षणा द्यावयासी प्रारंभ केला.
शुद्ध ८ मंदवारी संध्याकाळीं ब्राह्मण देकार घ्यावयाकरितां रमणियांत कोंडले होते. ते देकार देऊन संध्याकाळीं सोडलें. दोन चार ब्राह्मण जाया जाले. वारले. दक्षणा यंदा गु॥पेक्षां नेमस्त दिल्ही. ब्राह्मण पासष्ठहजारपर्यंत अवघे जाले असतील. आठ लक्ष रुपये लागले असतील.
शुद्ध १० सोमवारीं मल्हारपंत पुरंधरे पुणेकर वारले. बायको सती निघाली. पोटीं पुत्र नाहीं. महादेबाबानीं तीन रोज सुतक धरलें. ते पांच धरीत होते. ह्मणून ते पिंपळेकराच्या घरांतील ह्मणवितात. पिंपळेकर नव्हे ह्मणतात.
शुद्ध १४ सह पूर्णिमा शुक्रवारीं रामाजीपंत एकबोटे याची श्रावणी जाली.
वद्य ३ सोमवार श्रीमंत राजश्री पंतप्रधान थेऊरास गेले.
वद्य ४ मंगळवार श्रीमंत भाऊ मागोन गेले. व चतोर्थीउद्यापन श्रीमंतांनी केलें.
वद्य ५ बुधवारीं भाऊ सडे येऊन, येथें भोजन करून, मागतीं माघारें थेवरास गेले.
वद्य ६. गुरुवारीं श्रीमंत थेवरास गेले होते, ते भोजन करून थेवरींहून पुणियास आले.
वद्य १२ बुधवारी राजश्री शिदोजी नरसिंगराऊ देशमुख यांची स्त्री अकळुजेहून आली. त्याजबरोबर अमृतराऊ नाइक निंबाळकर याणीं हत्ती व घोडी ऐशीं आपण ह्मणोन पाठविलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७१
श्री १६२० आश्विन शुध्द १३
सदानंदस्वामी
राजश्री सुभेदार व कारकून सरदेशमुखी प्रा। वाई गोसावियासि
अखंडितळक्षमी अलकृत राजमान्य स्नो। हिंदुराउ घोरपडे दंडवत तिसा तिसैन अलफ मौजे इटमडे सा। नीब हा गाव गोसावियास इनाम आहे तेथील सरदेसमुखीचा दाहिजा ऐवजे जो आकार होईह तो त्याचे दुमाले करणे उपद्रव एकंदर न देणे जाणिजे छ ११ रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शुद्ध ५ मंगळवार. खंड माळी लडकज याजला शिवा माळी याणें फसलियाचें येजितखत लेहून दिल्हें. त्याजवर पांढरीची साक्ष घातली असे. १
शुद्ध ६ बुधवार वितिपात. श्रीमंत राजश्री बाळाजी बाजीराऊ प्रधान याणीं पर्वतीस सुवर्णतुळा केली. सात हजार मोहरा वजन जालें. याशिवाय आणीख सहा लोह सुवर्णाची झाली. याजवर लोखंडाची, त्याजवर काशाची, त्याजवर शिशाची, त्याजवर नारळाची, त्याजवर चंदनाची, त्याजवर भाताची येणेंप्रो। सात केल्या. तळवटीं घरें बांधली आहेत. तेथें केल्या असेत.
शुद्ध ७ गुरुवार. दिल्लीहून राजेश्री राघोपंतदादाचे कागद श्रीमंतास आले की, अहमदशाहा कैद करून, अलमगीर पातशाहा नवे बसविले. ह्मणून खुश खबर आली. ह्मणोन श्रीमंतानी खुशालीच्या तोफा केल्या, व लोकांनीं नजरा केल्या श्रीमंतास.
शुद्ध ११ रविवार. श्रीमंतानी लालपळता सुवर्णाच्या करून दान केले. पर्वतीस केले असे.
आषाढ वद्य.
वद्य ४ रविवार श्रीमंत राजश्री पंतप्रधान श्री थेऊर चिंतामणीच्या दर्शनास गेले.
कोंडोपंत एकबोटे यांणीं नीळा तट्टू लक्षुमणास बसावयासीं दिल्हा होता. त्यास पाऊस लागला याजकरितां कोंडोपंताचे पागेंत बांधावयासी रामाजीपंतीं माणसाबरोबर पाठवून पागेंत बांधला. मग दोप्रहरां कोंडोपंतीं तट्टू माणसाबरोबर पाठवून दिल्हा. त्यावर रामाजीपंत तट्टू घेऊन गेले. कोंडोपंताचे दरवाजियापाशीं होते. मग कारकून बोलावूं आला कीं, तुह्मास कोंडोपंतीं बोलाविलें. मग रामाजीपंत त्याजपाशीं गेले. कोंडोपंत बोलले कीं, आह्मीं तट्टू ब्राह्मणास दिल्हा आहे. माघारा घेत नाहीं. तेव्हां रामाजीपंत ह्मणाला कीं, ब्राह्मणास दिल्हा ह्मणतां तेव्हां आह्मांस लागत नाही. तेव्हां सोडून दिल्हा. उभयतांहि आटपलें नाहीं. कोंडोपंत बोलले कीं, आमच्या तट्टावर एका हजाराची असामी मिळविली व श्रीमंताशीं बळख केली आहे, जी मिळविलें तें द्या. तेव्हां रामाजीपंती ह्मटलें कीं, तुह्मी आमच्या बापाच्या घोडियावर बसला व बेरगियाची मुजमूहि त्यांनी लाविली, त्यामुळें तुमचें रूप जालें, तुह्मी जें मिळविलें आहे तें देणें, मम आह्मीं देऊं. त्यावर बोलले कीं, तुह्मांस वाडियासीं संबंध काय आहे ? ऐशी बोलीचाली झाली. तट्टू मोकळा सोडिलो. पागेंत बांधों दिल्ही नाहीं.
वद्य ८ गुरुवारीं राजश्री आप्पाजी जाधवराऊ याणीं जेष्ठ मासीं तिसरें लग्न केलें. त्या बायकोस न्हाण आलें. तिचें वोटभरण रोजमजकुरीं केलें. याजकरितां मातुश्री लाडूबाई व बहिरोबा वाघोलीस गेले. रोजमजकुरींच रामाजी शिवदेव याजला श्रीमंतानीं वाडा दिल्हा. तेथें मलकाप्पा कानडा राहत होता तो घर टाकून गेला होता. त्या घराचें कुटुंब सरकारचा कारकून व प्यादे येऊन काहाडून घरांत किरकोळ लांकडे व रिकामे बुधले, वगैरे अबदागिराची दांडी, व माचवे, व पलंगाचे वह्या ऐसें होतें. ते सरकारांत राजश्री जिवाजीपंत आण्णा यानीं नेलें. आणि घर रामाजीपंताचे हवाला केलें.
वद्य ११ रविवार बापोजी बिन तिमाजी पा। मोकदम, मौजे कोलवडी, यास रोजमजकुरी कोलवडीस देवआज्ञा जाली.
वद्य १४ गुरुवार. राजश्री रामचंद्रबावा लश्कराहून देऊसेस गेले. तेथून पंढरीस यात्रेस गेले. तेथें गोपाळराऊ, जिवाजीपंताचे पुतणे, यासीं चाकरानफरी कटकट जाली. त्यास, गोपाळराऊ याणीं बावाचे माणसास व त्यास शिव्यागाळी दिल्ही. त्यामुळें बावास राग येऊन गोपाळरायासी माणसें लावून पंढरीस मारलें, ह्मणोन वर्तमान आलें. त्यास आजी रामचंद्रबावा पुणियासी आपल्या घरास आले. रोजमजकुरी रात्रौ घटका सुमार १७ मधें श्रीमंत राजश्री सदाशिवपंतभाऊ नाशीक त्र्यंबकास गेले होते ते घरास दाखल जाले. तेच दिवशीं बापोजी पा। कोलवडकर याचा लेक पिराजी एकच होता तो वारला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
आषाढ मास.
शुद्ध २ मंदवारीं शिदोजीबावा शितोळे यास एकाएकीं वाखा होऊन वरचेवर वारले. सटवोजी परमळराऊ याचे घरीं बिर्हाड होतें. तेथें रोजमजकुरींच खबर आली की, अहमदशाहा पातशाहा पळून गेला. त्याचें लश्कर आवघें राजश्री रघुनाथपंतदादांनी लुटलें अशी खबर आली. मणचरचे मनसुबीचा सिद्धांत केला. निम्में वडीलपण सरकारचे देहूडीस घेतलें होतें त्याप्रों। करार . बाकी निम्मे राहिली त्यामध्यें निम्मे गंगाजी व संताजी होडा याजकडे व बाकी निम्मे येसाजी व सयाजी थोरात घावटे याजकडे. नांगर सरकारचा सरकारच्या नांवें खालें ल्याहावा. होळीची पोळी सरकारची, त्यामागें होडियाची. थोरातास समंध नाही. याप्रा। सिद्धांत जाला. कागद होणें असे. १
आषाढ मास.
शुद्ध ३ रविवारी राजश्री रघुनाथ बाजीराऊ याणीं अहमदशाहा पातशाहा दिल्लीहून बारा कोसांवर आले होते ते लुटले. आणि कबिलासुद्धां धरिले. ह्मणून वर्तमान आलें. राजश्री सदाशिवपंत भाऊ श्री त्रिंबकास सिंहस्थाचे स्नानास गेले रोजमजकूरी.
शुद्ध ४ सोमवारी खंड माळी बिन्न ठक माळी व बाळा माळी बिन्न ++ व रघतमाळी बिन्न +++ लडकज यांचे व शिवा माळी व लखबा माळी बिन्न दगडू माळी लडकजियांचे भांडण थळें फसलाकास रुके + बारा याचें भांडण होतें. शिवा माळी व लखमा माळी व खंड माळी वगैरे यांस ह्मणत कीं, मिरास पुरातन आहे, निम्मे तुमची व निम्मे आमची. खंड माळी वगैरे ह्मणत कीं, मुळची मिरास नव्हे, सोमवार पेठेच्या मुबदला आह्मास व वडिलास दिलें आहे. त्याची मनसुबी साल गु॥ बापूजी आनंदराऊ कमाविसदार क॥ पुणें याजपाशीं पडली होती. तेव्हां शिवा माळी व लखमा माळी खोटे होऊन येजितखत लेहून दिल्हीं. परंतु त्याचा संवशय तुटेना. ह्मणून श्रीमंत राजश्री पंतप्रधान याजपाशी फिर्याद गेला. तो साडेतीन महिने लश्कराबरोबर हिंडला. शेवटीं पुणियास आलियावर राजश्री नारो आप्पाजी याजला मनसुबीची चौकशी करावयास सांगितली. त्याणीं चौकशी मनास आणिली. तो पहिली मनसुबी ठीक आहे, ऐसें जाणून शिवा माळी व लखमा माळी यांस पेचिलें. त्यावरून त्याणीं कबूल करून यजितखत खंड माळी वगैरे यांस दिल्हे. दिवाणांत काईम कतबा लिहून दिल्हें. आषाढ शुद्ध १ शुक्रवारीं याप्रा। जालें असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
वद्य १० गुरुवार. रंगराऊ आपल्या मुलीच्या लग्नास ह्मणोन लश्कराहून कुच करोन मुक्कामास आले. तेथें रात्रीं जाटाचा छापा आला. तेथें मारले. बरोबर, कारकून वगैरे मारलीं, ह्मणोन खबर आली.
वैशाख वद्य १२ मंदवार आत्मारामपंत ढेरे यासी बरें वाटत नव्हतें. त्यास देवआज्ञा जाली.
वद्य १३ रविवार. लवळियावर बाळकृष्णपंतांनीं इनामतिजाईचा रोखा करून, वरात बोरगांवास पाठवून, कुसापा शितोळे व नागोजी शितोळे व येस माळी यासी मार दिल्हा व डोईवर धोंडे देऊन वसूल रु॥ १००० घेतले. पोतें दाखल केलें. बा। काशीराम.
वद्य १४ सोमवार. चिंचवडीहून खबर आली की, त्रिंबकराम धर्माधिकारी याची बायको वेंकू गरवार होती ही कोनी निघाली. पांचवे रोजीं वाखा जाला. सात रोजीं पाहटे वारली. त्यास त्रिंबकराव व नरसिंहभट्ट चिंचवडास आजी गेले.
वद्य १४ सोमवार. मातुश्री लाडूबाई व जगन्नाथपंत काळेवाडीस गेले होते ते आले. ज्या कार्यास गेले तेथें शेत व वाडा मोडून राणोजीबावाचे स्वाधीन केला. त्याची अलाहिदा यादी असे.
जेष्ठमास.
शुद्ध १ बुधवार. यशवंतराऊ दाभाडे सेनापति लष्करांत होते. तेथें त्यामुळें जेर होऊन त्यास देवआज्ञा जाली, ह्मणोन वर्तमान आलें. त्यास आजचा दिवस पांचवा. स्वारी करनाटेहून आले. मिरजेपाशीं जवळपास वारले.
शुद्ध १४ सोमवार. श्रीमंत राजश्री बाळाजी बाजीराऊ प्रधान व राजश्री भाऊ करनाटकाची स्वारी करून गजखिंड व मिरज घेऊन, महाराज राजश्री संभाजी राजे यांची भेटी घेऊन, जेजूरी, थेऊर करून, पर्वतीस जाऊन, तेथें दहा घटका रात्र टाळून, अकरावे घटकेस घरास दाखल जाले. रोजमजकुरींच अवशीचे प्रहररात्रीं राजश्री आयाबा मजमदार याची कन्या, केसोपंतमामाची सून, इजला देवआज्ञा जाली, आयाबाचेथें.
स्मरण शके १६७६ भावनामसंवत्सरे,
जेष्ठमास.
शुध १४ सह १५ भोमवार, अव्वल तारीख छ १२ साबान, सन ११६४, मुहूर सेन खमस खमसैन मया व अलफ.
वद्य १ बुधवारी संतबा देशमूख याची मूल सुप्याचे काटेदेशमुख पदमसिंग यास दिल्ही. रात्रीं घटी १४ लग्न लागलें असे. १
वद्य ४ मंदवार. पेशवे थेवरास चिंतामणीच्या दर्शनास गेले होते.
जेष्ठ वद्य ३० गुरुवारी निळो शंकर ढेरे यास रोजमजकुरीं प्रातःकाळीं देवआज्ञा जाली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
वद्य १४ शुक्रवार.
वद्य ३० मंदवार.
शके १६७६ भावनामसंवछरे
चैत्रमास.
शुद्ध १ रविवार पूर्णमा. रोटीस देशमुख जत्रेस गेले आहेत. धोंडी शेट्या याजकडे कर्ज चिंतामणभट्ट उपाध्ये याचें कर्ज होतें, ह्मणून त्याचे लेक घरीं बैसविले होते. रात्री त्याचा लेक मल्हारी उपाधियाचे घरीं मारला. मढें त्याचेथें दुपारपावेतों पाडलें होतें. त्या मुलाची बायको सती निघों लागली. मग उचलोन नेला. दहन केलें. सती निघाली.
वद्य ३ सह ४ बुधवारीं श्रीमंतांचे पत्र त्याचे मातुश्रीस आलें कीं, कृष्णराऊ महादेव यास देवआज्ञा जाली. अतिसाराची वेथा जाली. आठेक रोज निजेले होते. तुळा केली. उपाय केले. गुण न आला. वारले. त्याचा दाहावा रोज. रोजमजकूर सांडणीबा। पत्र आलें असे. १
वद्य ५ गुरुवारी जिवाजीपंताच्या माणसानें न्हावियाचे घरीं महादा पोर याशीं रिकामीच कटकट केली असे. १
वद्य ६ शुक्रवार जिवाजीपंत आपले भावजयीस पंढरीस वाटे लावावयास वानवडीस गेले असेत. १
वैशाखमास.
शुद्ध २ बुधवारीं सटवोजी पाटील खांदप लोहगांवकर आपले गांवी आला. मरणें मेला असे.
१
शुद्ध ३ गुरुवासर गंगाजीपंत वाघोलकर भालवडीस वारले.
शुद्ध ४ शुक्रवारीं वढूंकर महार गांवांहून आला की, बाल्हाजी पाटील भोंडवा पेशवियाच्या लष्करांत चाकरीस गेला होता, तो वारलियाची खबर आली, ह्मणून सांगावयास आला होता.
वद्य ५ चिंचवडीहून कागद आला कीं, कोंडभट्ट र्धा। याचे पुत्र कुसंभट्ट धर्माधिकारी यासी देवआज्ञा जाली ह्मणोन बाजी कोन्हेर याचे घरीं ही खबर आली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
फाल्गुनमास.
शुद्ध ७ बुधवार. दारकू सोनार यास देवआज्ञा जाली.
शुद्ध १० रविवारी खतरोजी जगथाप मौजे अंबोले ता। कर्हेपठार याजला शेखोजी जगथाप यानें येजितखत लेहून दिल्हें आहे. त्याजवरी सांडसच्या पाटलाच्या गोह्या तान्हाजीपंत हवालदार याचे घरीं घातल्या. पाटलास वस्त्रें दिल्हीं.
शुद्ध १२ बुधवारी माधवराऊ भोसले याजला जोगवडीं तो कर्हेपठार येथील पा।कीचें पागोटें, शिरपाव देऊन, होळीस पोळी लावायास जोगवडीस गुरुवारी गेला. गुजाईचें येजितखत घेतलें.
शुद्ध १३ गुरुवारी झाडून पुणेंदेशच्या खंडणिया पुणियांत होऊन पाटलास होळीकरितां निरोप दिल्हा.
शुद्ध १४ सह १५ होळी शुक्रवार.
वद्य १ मंदवारीं. सातारियांत श्रीमंताचें व राजश्री महादोबाचें व गोविंदराऊ चिटनीस याचे व नारबा व दत्ताजीपंत यांची घरें आग लागेन जळालीं ह्मणून खबर आली.
वद्य ३ सोमवारी पाहटेचे प्रहर रात्री महादेवभट्ट ढेरे यास देवआज्ञा आली. अतिसाराची वेथा जाली होती. तेच वेथेनें वारले. सकाळ उठोन मंगळवार.
वद्य ७ शुक्रवार. मातुश्री सखूबाई देशमुख याजला शरीरीं सावकाश वाटत नाही ह्मणोन किरकोळ कलशदानें दिल्हीं.
वद्य ८ मंदवारी मातुश्री सखूबाईनीं ह्मसदान गोविंदभट्ट कोकणस्त यास दिल्हें.
वद्य १२ बुधवारी कर्यात मावळच्या खंडणिया जाल्या.
वद्य १३ गुरुवारी खंडोजी होळकर, फाल्गुन वद्य एकादशीचें, मानेस गोळी लागली, ठार जाला, ह्मणोन खबर आली. कुंभेरीवर मोर्चे दिल्हे तेथें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
माघमास.
शुद्ध १ गुरुवारी वितिपात, अठेताळीस घटका. ते दिवशीं नाना पुरंधरे यांची सून पलशीअळकुटीस वारली.
शुद्ध २ शुक्रवारी मुंजी लग्नें रोजमजकुरींच देवकप्रतिष्ठा करून लग्नें लागलीं. बि॥.
१ माधवराऊ विश्वनाथाच्या पुत्राचें.
१ गंगाधर बाजी देशपांडे यांच्या पुत्रांची.
१ जगन्नाथ अनंत व बहिरो कृष्ण यांच्या पुत्रांच्या.
१ राजश्री धोंडो मल्हार देशपांडे सासवडकर याच्या पुत्राची सासवडीं जाली.
--------
शुद्ध ४ रविवारी राजश्री सटवोजी जाधवराऊ याची स्त्री, सोदेवजी ताकपीर याची कन्या, चिखलीस रोजमजकुरी प्रातःकाळीं वारली.
शुद्ध ५ सोमवारी राजश्री नाना पुरंधरे याची सून पलशीअलकुटीस शांत जाली ह्मणोन सासवडीं खबर आली. मुंजीचा पळसुला मुंज्या, मुलाजवळून करविला. व गोपाळ माळीहि रोजमजकुरीं शांत जाले. रुजू. षष्ठी मंगळवारीं वारले.
शुद्ध ६ मंगळवार. रोजमजकुरीं गोपाळ माळियास देवआज्ञा जाली.
वद्य १ शुक्रवार, गणपतराव बहिरव सासवड़ी वारले.
वद्य २ मंदवारीं, पांडुरंगाच्या लग्नास चिंचवडोस आबा वगैरे अवघीं घरचीं गेली. व उदाजी शितोळे यानीं आपली लेक खंडोजी समशेर याच्या पुत्रास दिल्ही. लग्न अवसरीस केलें, रोजमजकुरीं.
वद्य ३ रविवारी पांडुरंगाचे लग्न चिंचवड़ीं दिवा विसा घटकाचें जालें. श्रीभास्करबावा देव याची कन्या केली. परशरामपंत कोठूरियाहून आले. त्यानींच देवकप्रतिष्ठा केली.
वद्य ९ सह १० मंदवारी खंडो विसाजी देशपांडे यांची कन्या शिवापुरी अत्र्यांचे घरीं दिल्ही होती. लग्नास आठ रोज जाले ते दिवशीं वारली. वेथा काय जाली ह्मणावी तर लग्नाअगोधर गोंवर निघाला होता. त्याचे वेथेनें वारली. रोजमजकुरींच रात्री चिंचवडीहून पांडुरंगाचे लग्न घरास आलें. रात्रीं जगोबाचेथें कल्याणीमुळें राहिले. पहाटेस आपल्या घरास नवरानवरी गेलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
पौषमास.
पौष शुद्ध २ बुधवारीं राजश्री फत्तेसिंग भोंसले पुणियास आले. त्यांजला सामोरे श्रीमंत वानवडीच्या तळ्यापलीकडे गेले होते. त्याजला घेऊन वाडियांत आले. तेच दिवशीं राजश्री जानोजी निंबाळकर यानीं श्रीमंतांस भेजमानी केली. तेथें पेशवे भोजनास गेले. फत्तेसिंगबावाहि भोजनास गेले. जानबानीं सर्वांस वस्त्रें दिल्हीं.
शुद्ध ६ मंगळवारीं श्रीमंतांनीं राजश्री जानोजी निबाळकर यासी मेजमानी केली.
शुद्ध ६ रविवार, वितिवात. ते दिवशीं रंगो बाबाजी देशपांडे यास संध्याकाळी देवआज्ञा जाली. पांच सा रोज बरें वाटत नव्हतें.
शुद्ध ७ सोमवार रंगो बाबाजी देशपांडे प्रा। पुणें याची स्त्री प्रसूत जाली. पुत्र जाला.
शुद्ध १० गुरुवारीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान सकाळच्या बारा तेरा घटका दिवस आल्यावरी मुहूर्तेकरून निघोन गारपिराजवळ गेले, डेरियास.
शुद्ध १० सह ११ शुक्रवारी राजश्री चिमाजी आप्पाचें श्राद्ध भाऊनीं गारपिराजवळ डेरियांत केलें. ब्राह्मणभोजन गांवांत केलें.
शुद्ध १३ सोमवारीं राजश्री फत्तेसिंग भोंसले यासी मेजमानी राजश्री संतबानीं केली. वस्त्रें दिल्हीं. त्यावरी गोविंदरायाच्या घरास गेले. त्याणीं वस्त्रें दिल्हीं.
शुद्ध १४ मंगळवारीं जानोजी निंबाळकर कुच करून श्रीमंताजवळ मुंढवियापासी जाऊन राहिला.
शुद्ध १५ बुधवारी कासाराची घरें भटास नेमून दिल्हीं.
वद्य १ गुरुवार सह द्वितीया संक्रमण.
वद्य २ शुक्रवार सह तृतीया किंकरांत.
वद्य ४ मंदवार. श्रीमंत थेवरावर गेले.
वद्य ५ रविवार. महादोबा प्रस्थानें पोतनिसाचे घरीं राहिले. दुसरे दिवशीं हडपसरावर गेले. नांदुराहून सासवडास जाणार.
वद्य ६ सोमवार. महादोबा गेले.
वद्य ७ मंगळवार. थेवराहून कुच होऊन खांबगांवावर गेले.
वद्य ९ गुरुवार. गोविदराव देशमूख याजपासोन कोन्हेर त्रिंबकानीं वकिलीची सनद घेतली होती ते फिरोन आणोन फाडिली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
वद्य ३ बुधवारीं फुलगांवाकडे पाऊस फार पडला. गारा फार पडिल्या.
वद्य ४ गुरुवार रात्रीं पेशवियाचेथें साडे जाले.
वद्य ५ शुक्रवार. खबुतरखानियांत ब्राह्मणास देकार दिल्हा. पंचवीसपर्यंत दिल्ही. खासे द्यावयास गेले नव्हते. त्रिंबकराऊ, राघो शिवराम, वासदेव जोशी यांजकडून देविले. दुसरे दिवशीं अडचा प्रहरा ब्राह्मण सरलियावरी सुटले असेत. १
वद्य ७ रविवारी पेशवियास मांडवपरतणें केलें. अमृतराऊ नाईक निंबाळकर याजला देशमुखानीं मेजवानी केली असे. १
पेशवियाचे बागांत ब्राह्मणभोजन जालें असे.
वद्य ८ सोमवारींहि ब्राह्मणभोजन केलें असे. १
वद्य ९ मंगळवारी पेशवियांनी बागांत सारे मर्हाटे लोक शिलेदार यांजला जेऊं घातलें. रात्री दारू रणांत जाऊन उडविली. रोजमजकुरीं जानोजी निंबाळकर यांच्या राखीच्या लेकास संतूबाई राजश्रीची मानली कन्या दिल्ही. रात्री चौघटकांचे लग्न लागलें. मल्हारजी होळकर यांचे हवेलीमधें.
जानोजी निंबाळकर यास देशमुखानीं आहेर केला. बाबानीं.
वद्य १० बुधवार दसमास जेऊं घातले.
वद्य ११ गुरुवासर पेशवियानीं वाघावर हत्ती घातले. एक वाघ जीवेंच मारला गेला. बागांत शाग्रीतपेशीयांस जेऊं घातलें असे. १
वद्य १२ शुक्रवारी विठ्ठल गोपाळ अत्रे देवजीपंताचेथें राहिले होते. त्याजला दो ती रोजांत वेथा होऊन मृत्य पावले. अवशीचेच रात्री वारले. आजी पाहाटें दहन वोंकारापाशी केले. त्याचे स्त्रीनें सहगमन केलें. पेशवयाचेथें बागांत जिवाजीपंताकडील कारखानियाचे लोक जेऊं घातले असेत. १
वद्य १३ शनवार, शनिप्रदोष. पेशवियानीं गांवचें माणूस जेऊं घातलें असे. १