Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७६
श्री तालीक
राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। महादजी शिंदे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. रघुनाथसिंग चौधरी पो देवास याजकडे पोमा।चे चौधरातीचें कामकाज सुदामतपासून चालत आहे. याचे भाऊबंद हक्कदस्तूर हिंशाप्रमाणें घेत गेले. ऐसें असतां, कृष्णसिंग पेशजी पुण्यास येऊन आपले परी सरकारांत विनंति करून, हुजरे देवाशास आणोन दंगा केला. त्यावरी रा।। सदाशिव दिनकर लष्करांतून गेले. त्यांणीं हा मजकूर समजोन देवाशाहून हुजरे माघारे नेले. हें वर्तमान मा।रनिलेनीं सविस्तर सांगितलेंच असेल. रघुनाथसिंग यांचा काळ जाहाला. त्याचा पुत्र खुमानसिंग हालीं भोगवट्याप्रों वहिवाट करीतच आहे. कृष्णसिंग पुन्हां सरकारांत गैरवाका समजावितो म्हणोन हें किलें. त्यावरून आपणास लिहिलें आहे. तरी रघुनाथसिंगाची वहिवाट बहूत दिवस चालत आली आहे. त्याप्रमाणें चालवावी. कृष्णसिंग गैरवाका समजावील. त्यास ताकीद जाहाली पाहिजे. रा। छ २ रमजान, बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे, हे विनंति. मोर्तब असे. शिका.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७५
श्री. १७१४ अखेर
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री आबा स्वामींचे सेवेसीं:-
पो बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री बापूभट घारपुरे यांणीं श्री हरीहरेश्वर महादेव याचें नवीन देवालय जनस्थानीं बांधिलें आहे. त्यास देवाचे पूजा नैवेद्य व नंदादीप वगैरे खर्चास कुलबाब व कुलकानू कमाल आकाराचा गांव च्यारसें रुपयांचा नुतन इनाम पा। नासीक अगर पा। वणदिंडोरी या माहालांत श्रीमंतांनीं देविला आहे. त्याची सनद अलाहिदा तुमचे नावें आहे. त्यास, सनदेप्रमाणें गांव भटजीचे दुमाला लौकर करावा आणि लेहून पाठवावें. त्याप्रमाणें इनामपत्रें करून देवऊं. पत्र पावतांच आधीं हें काम करावें. कमाल* आकार याप्रमाणेंच हाल वसूल व खटपट केलीयास शें पन्नास रुपये अधिक होत असेहि गांव असतात. या रीतीचा पाहून लौकर नेऊन द्यावा. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७४
पु।। २
राजश्री नाना गोसावी यांसीः-
* साहेब किल्यांस आले तेव्हांही त्यास कांहीं सख्ती पोंहचली नाहीं, व आपणाकडूनहि पोंहचत नाहीं, याजवरून दोरी सईल पड़ली ? हे जात बेइमान. यांचा इश्वास धरूं नये. मागेंपासोन लबाड्या करीत आले. तें विदितच आहेत. त्याचे निसबतीचें माणूस आहे तें चाकरीचुकरी सांगितली तरी मानीत नाहीं. हें राजश्री सदाशिवपंत दादास निवेदन केलेंच आहे. आह्मी वारंवार आपणास लिहावें तरी ठीक दिसत नाहीं. सूचनार्थ लिहिलें आहे. कळेल त्याप्रों बंदोबस्त करावा. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ करीत असलें पाहिजे. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक. ३७३
श्री १७१४ अखेर.
विज्ञापना ऐसीजे. कलकत्याहून सात आठ पलटणें तेलंगी, त्याजमध्यें दाहा बारा गोरे कर्ते होते. त्यास सांगितले कीं, तुह्मी खुसंगीच्या मागे चेनापटणास जावें. तेव्हां ते निघून दोनचार मजली आले. मागाहून हुकूम आला जेः तिकडून न जावें. जलमार्गे जावें. तेव्हां गोरे होते त्यांनीं तेलंगे वेषधारी होते त्यांस सांगितलें, हुकूम याप्रमाणें आला आहे. तेव्हां हिंदू होते त्याणीं साफ सांगितलें की, याचा निभाव हिंदु धर्माचा जलमार्गे आच्यार होणार नाहीं. तेव्हां गोरे यांणीं कलकत्यास लिहून पाठविलें. त्याचें उत्तर आलें कीं हिंदु आहेत त्यांचें पारपत्य करणें. हें वर्तमान हिंदू लोकांस समजलें. तेव्हां एका करून गोरे वगैरे होते त्यांची त्यांचीच बनली. तेव्हां गोरे वगैरे माणूस पांचसातशें माणूस ठार झालें. कांहीं गोरे पळून कलकत्यास गेले. हिंदुमाणूस राहिलें तेंहि अफरातफरा जाहलें. गंजम शहर समुद्राचें तिरीं आहे तेथें एके दिवसी लाल मत्स्य मोठा निघाला. तें वर्तमान तेथें साहेब होता त्यास कळलें. त्याणीं किताबत काढून पाहिली. तेथें निघालें कीं आमके दिवशी समुद्राचें पाणी येऊन शहर बुडेल ! तेव्हां ताकीद करून शहर वोस केलें. कोणी राहिले त्यास पाणी येऊन शहर वाहून गेलें. म्हणोन वर्तमान समजलें. खरें लटकें देव जाणे ! हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७२
श्री १७१४ अखेर
विज्ञापना. मीर अबदुल कासम याचे रवानगीचे वेळेस मषीरुलमुलूक यांणीं गोविंदराव उभयतां यांस बोलाऊन मजकूर सांगितला कीं: मीर साहेब यांजला रवाना करीत आहोंत. त्यास, त्याचे चित्तांत अंदेशे कित्तेक आले आहेत. रा। तात्या येथें आहेत. त्यांचा यांचा बहुतसा परिचय नाहीं. यास्तव तुह्मीं त्यांची खातरजमा करावी. रा। तात्यास पत्रें लिहून द्यावीं. पुणेयास मदारुळमाहाम यांचीं पत्रें आणवावीं कीं मीरसाहेब यांसीं दुसरा अर्थ नाहीं. रा। तात्यांही दुसरा अर्थ न धरावा. आपल्या सल्लेस जी गोष्ट येईल त्यांचा इतल्ला यांजला करीत जावा. यांजला प्रसंगोचित मा।र चांगला आढळून येईल तो येऊन अर्ज करितील. लिहिणार शाहाणे, बोलणार चांगले आहेत. याप्रो पत्र आणवितों ह्मणोन त्यांची खातरजमा करावी. ह्मणोन सांगून, बाहादूर उभयतां गोविंदराव, मीर अबदुल कासम यांचे घरीं आले, त्यासीं बोलणीं बहुत जालीं. त्यांची खातरजमा केली. पत्रें देतों व स्वामीचीं पत्रें पुणेंयाहून आणवून देतों, ह्मणून बोलले. कर्नाटकप्रांतींच्या यादी निवडून काढिल्या आहेत. त्या रा। रायांस बोलाऊन वाचून दाखविल्या. त्यांची फारशी करून मीर साहेबांबरोबर दिल्या. इतकें बोलणें होऊन चंपी कलवंतीण तेथें आली होती, ते गोविंदराव भगवंत यांजपाशी बोलत होतीं कीं, रंभाजी बाजी याजला आशु-याकरितां येथें बोलाऊन घ्यावें. त्यास बाहादूर यास चंपीनें व गोविंदराव भगवंत यांणीं मा।र पुसोन घेतला. त्यास हुजुरांत अर्ज करून सांगू म्हणोन बाहादूर यांणीं उत्तर केलें. उपरांत बाहादूर उठोन गेले, मीरसाहेब यांणीं उभयतां गोविंदराव यांची ज्याफत केली.
गोविंदरावकृष्ण गोविंदराव भगवंत
१ शिरपेंच १ पागोटें
५ शालजोडी किनखाप १ शालजोडी
जामेवार काशीचा १ किनखाप
दुपट्टा, पागोटें, विजार २ जामेवार शेले.
---------- ----------
६ ५
येणें प्रो देऊन रुकसत केलें. त्यास, जाहाला मा।र तो लिहिला आहे. उभयतां काय लिहिणार ते लिहोत. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७१
श्री. १७१४ माघ शुद्ध १३
विनंती विज्ञापना ऐसिजे. नवाबांनी हिशबाचे प्रकर्णी मुनीरुलमुलूख बाहादूर व राजे चंदूलाल यांसीं पेशजीं बोलणें केलें होतें. त्याजवरून कारभारी व मुत्सद्दी यांणीं हिशेब तयार करून दाखविले. ते प्रत्ययास न येतां उत्तरें होत गेलीं. यास्तव राजाजीनीं आपले खाविंदाचे मर्जीचा खुलासा माहालांतून व शिकंदरयारजंग व शिकंदरकुलीखां याजकडून घेऊन कृपा संपादावी, याजकरितां कांही ऐवज नजर प्रमाणें कबूल केला होता. त्या ऐवजाची तर्तूद होऊन प्रविष्ट जाला नाहीं. यास्तव नबाबाकडील बोलणार निरंतर उभयतां कारभारी यांजकडे येऊन बोलणें करीत होतें. परंतु जाबसाल उगवण्यांत आला नाहीं. जाणोन छ ४ रोज गुरुवारी प्रथम प्रहर रात्र गुदरल्यावर, नवाबांनीं चोपदारासमागमें मुलूखमनसूफ व राजाजी यांजकडे ऐवज प्रकर्णी निरोप निकडीचा सांगून पाठविला. त्याजवरून राजे चंदुलाल आपले जागां बहुत विचारांत राहून, मीरआजमदअल्लीखां यांस बोलाऊं पाठविलें. मशारनिले, आलियानंतर दरबारास जाब सांगून, आपण व राजे गोविंदबक्ष व खानमजकूर यांची बोलणीं खिलवतींत अडीच प्रहर रात्रपर्यंत जाहालीं. छ ५ रोज शुक्रवारीं राजाजी दरबारास मुनीरुलमुलूखबहादुर यांचे जाण्यापूर्वी भोजनाचा गुंता उरकून, प्रथम प्रहराचे अमलांत मुत्सद्यांसहित खिलवतीचे दिवाणखान्यांत जाऊन बैसले. उपरांतिक दोन घटिकांचे अवकाशानें मुलूखमवसूफ येऊन पोंचले. उभयतां कारभारी दरबारास आल्याचें वर्तमान समजल्यानंतर, नवाब नवेदमहालांत बरामद जाहले. तेथें शामतजंग व हाफजयारजंग व शिकंदरकुलीखां व आसदयारजंग व अकबरयारजंग व मयाराम व मिर्धेताहरअल्लीखां यांस बोलाऊन घेतलें. त्यांचा सलाम मजुरा जाहाल्यावर किताबा पाहात बैसले. मीरदेतोहरअल्ली समागमें शुका लेहून कारभारी यांजकडे पाठविला. तो उभयतांनी पाहून, त्याचें प्रत्योत्तर लेहून दिल्हें. दोन प्रहर दोन घटकापर्यंत तीन वेळां नवाबाकडून शुके मिध्यें व आसीकबराबर आले ते पाहून त्या......तर, राजे चंदुलाल यांणीं पाठविली. मर्जीप्रमाणें जाबसाल उगऊन आले नाहींत. याजमुळें दरबारास जाब न सांगतां निद्रा केली, कारभारी खिलवतीचे दिवाणखान्यांत बसून राहिले. तीन प्रहरांनंतर जागृत होऊन कारभारी याजकडे निरोप व शुक मिर्धेताहरअल्ली असीकसमागमें पाठवीत गेले. त्याचीं उत्तरें व हिशेबाच्या फर्दा वरचेवर खाविंदांचे आज्ञेअन्वयें तयार करून राजे चंदूलाल पाठवीत होते. एक प्रहर दोन घटका रात्रपर्यंत बैठक होऊन परस्परें शुके येत गेले. नवाबाचे मनोदयारूप अमलांत न आलें, रात्र फार जाहली यास्तव दरबारास जाब बोलून जनान्याचा बंदोबस्त जाहला. कारभारी व मुत्सद्दी आपलाले मकानास गेले. राजाजी हवेलीस येऊन पोंचतांच, मीरअजमदअल्लीखां इंग्रेजांचे कोटीस जाऊन, त्यासीं बोलणें करून आले होते. त्यांजला बोलाऊन घेऊन गोविंदबक्षसहित त्रिवर्गाची खिलबत अडीच प्रहर रात्र पावेतों जाहली. उपरांतीक खानमवसुफास निरोप देऊन, उभयतां बंधूनीं भोजन करून, निद्रा केली. छ ६ राज मंदवारीं प्रथम प्रहरांत कारभारी व मुत्सद्दी यांनीं नित्यनेम उरकून दरबारास जाऊन, दिवाणखान्यांत बैसले. नवाब नवेद माहालांत जनान्याचे बंदोबस्तानें किताब पाहत होते. छ मजकुरीं कारभारी यांजकडे निरोप कांहींएक सांगून पाठविला नाहीं. अडीच प्रहराचे सुमारास दरबारास जाब बोलून निद्रा केली. मंडळी आपाआपले मकानास गेली. अमजदअल्लीखा प्रातःकाळीं रसल साहेब यांजकडे जाऊन त्यासीं राजे-मनसुफांचे सांगितल्याप्रमाणें बोलणें करून मशारनिलेनीं नानकराम याचे बागांत येण्याचा निश्चय ठराऊन आले. याची इतल्ला राजे-मोइनास केली. त्याजवरून बागांतील हवेलींत फर्शाची तयारी करवून, तीन प्रहरी उभयतां बंधू व अमजद-अल्लीखां पालखीचे स्वार होऊन गेले. नंतर एक घटकेचे आवकाशानें सावितजंग-बाहदूर व छोटे रसलसाहेब व कनिष्ट बंधू ऐसे त्रिवर्ग घोड्याचे स्वारीनें हवा खावयाचे निमित्यें निघून नानकराम याचे बागांत येऊन पोंहचले. चंदूलाल व गोविंदबक्ष उभयतां बागांतील दरवाजियाबाहेर येऊन घेऊन गेले. प्रथम बागाची सहल व मकानाची हौजकारंजी इत्यादिक तयारी पाहून, क्षेम कुशलतेची भाषणें जाहलीं. तदुत्तर, खिलवतीचे पकांनीं उभयतां राजाची व इंग्रज व खानमजकूर ऐसे बसून, दोन घटिका रात्रपर्यंत बोलणें जालें. त्या बैठकींत राजे मवसुफांनीं आपले खाविंदाचे मर्जीचा व दिवाणाचे वर्तणुकीचा वगैरे मजकूर तपशिलें समजाऊन बहुतच उदाशीची बोलणीं केलीं त्याजवरून मेस्तर रसल साहेब यांणी उभयतां बंधूंची खातरजमा फारच करून, अखेरीस वचनप्रमाण जाहलें, उपरांतिक राजेमोईन आपले जागां संतोष होऊन, ज्याफतीबद्दल फर्दू लिहून दिल्हा. आतर पानदान, फुलांचे हार व तरमेवा व खुष्कमेव्याचे खोन व आंब्याच्या डोल्या दिल्या. त्या घेऊन, इंग्रज बहादुर स्वार होऊन, कोठीचे मकानास गेले, तदुत्तर, चंदूलाल व गोविंदबक्ष यांणीं संध्या करून च्यार घटिका रात्रीं मकानास जाले. सारांश, नवाबाचें बोलणें कीं, हिशेबीं बाकी पस्तीस लक्ष आहे. ती व शेरणीबाबद रकम मीरमरहूम गेल्यापासून आजपर्यंत सरकार दाखल करावी. त्यास, येविसीं राजाजीचें बोलणें कीं तालुकियांत आमदानी कमी, याजमुळें शेरणीचा ऐवज वसुलांत आला नाहीं. माहालीं बाक्या येणें आहेत. तो रुपया निकड करून घेतला असतां, तालुकियाची लावणी न होतां उज्याड होतात. श्रीमंत महाराज यांचे सरकारांतुन कौल मनस्वी देऊन रयतीस तगाई देतात, यांजकरितां तमाम तालुकियांतील असाम्या उठोन श्रीमंतांच्या राज्यांत गेल्या आहेत व जातात. यास्तव ऐवज उगवून येत नाहीं म्हणोन. त्यास हें बोलणें नबाबाचे ध्यानास न येतां ऐवज मागण्याची निकड असे. आंख क्रोडीवरता आहे. व ज्याफतीबद्दल फर्द रसलसाहेब यांस दहा हजार रुपयांचा लेहून दिल्हा. ऐसें ऐकतों म्हणोन राजश्री त्र्यंबकपंत निसबत रायराया व अंबादासपंत यांणीं समजाविले व आणखी एक दोन जागां मातबर ग्रहस्थांचे मुखें बोलण्यात आलें. त्याजवरून शेवेसी विनंती लिहिली आहे. याउपरी जाबसाल निश्चयांत येऊन पक्केपणीं समजेल त्याची विनंती लिहीन. सेवेसी श्रुत व्हावें. रा। छ ११ माहे जमादिखर. लोभ असावा. हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७०
श्रीगणपती. १७२४ पौष शुद्ध १३
अजस्वारी राजश्री परशराम रामचंद्र ता। मोकदमानी, मौजे बोरगांव, प्रा। सिरालें सु।। सलाम तिसैन मया व अलफ.
राजश्री येशवंतराव जगजीवन नाडगौडा, पो मजकूर यांजकडे कर्जाऊ ऐवज येणें त्याचे रद कर्जास प्रों मकुरची नाडगौडीचा ऐवज लाऊन दिल्हा. त्याचें वसुलाचें काम राजश्री गोविंद रघुनाथ जोशी याजकडे सांगोन आलाहिदा सनद सादर जाहाली असतां, मौजे मजकूरचा हक्काइनामाचा वसूल सुरळीत देत नाहीं, ह्मणोन विदित जाहालें तर, सालाबादप्रमाणें हक्काचा व इनामाचा वसूल सुरळितपणें मशारनिल्हेकडे देणें. इनामाचा वाटेकरी यांस ताकीद करोन बाकी देवणें. फिरोन बोभाट येऊन देणें, जाणिजे. छ ११ जमादिलोवल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३६९
श्री. ( नकल ) १७१४ भाद्रपद वद्य ११
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री मोरोपंत स्वामीचे शेवेसीः-
पो बाळाजी जनार्दन सा नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार वाजपेययाजी यांचे वर्षासन रु।। एक हजार पो खटाव येथील देशमुखीचे ऐवजावर आहे. त्यास, सालगुदस्तां सन इसन्ने तिसैनचे वर्षासनाचे रु।। दीक्षितांस पावावे, ते पावले नाहींत. म्हणोन कळलें. त्यास, तुम्ही पौ मजकूर येथील देशमुखीचे हक्कापौ एक हजार रु।। वसूल करून सालगुदस्तां सन इसन्ने तिसैनचे वर्षासनाचे सदरर्हू रु।। दीक्षितांस पावते करून, त्यांची पावती घेऊन पाठवावी. कदाचित् सालगुदस्ताचा ऐवज फडतरे यांणीं नेला असल्यास, सालमजकुरीं देशमुखीचे ऐवजीं निकडीनें वसूल करून, दीक्षितांस पावते करावे. रा। छ २४ मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३६८
श्री १७१४ आषाढ वद्य १०
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेययाजी स्वामीचे सेवेसीं:--
विद्यार्थी बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. आपणाकडून ज्येष्ठ शुद्ध येकादशी व आषाढ शुद्ध चतुर्थीची पत्रें आलीं तीं पावलीं. लिहिला मजकूर कळला. राजश्री कृष्णराव अंबीकर यांचे पथक सातारीयांत चाकरीस आहे. त्यांतील स्वारांनी गुदस्ता श्रावणमासीं आमचे वाड्यांत येऊन रात्रौ मारामार केली. खिजमतगारास तोडलें व माहातास मारलें. अशी आगळीक केली. याचा जाबसाल त्याणीं करावा तो अद्याप केला नाहीं. येविसीचा विचार आपण केला पाहिजे. व आंबे याची डाली येक पाठविली आहे घ्यावी. म्हणेन लिहिलें. ऐशियास, आपलें पत्र आलें, त्यावरून राजश्री सदाशिवपंत अभ्यंकर यांस अंबीकरास ताकीद करून ज्यापासून आगळीक जाली असेल त्याजकडून आपणाकडील माणसाची समजूत करवावी ह्मणोन लिहिलें आहे. ते करवितील. आंबेयांची डाली एक पाठविली ती पावली. * रा।। छ २२ जिलकाद. लोभ असों दीजे. हे विनंति.
पौ आषाढ वद्य १४, परिधावी सां।.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३६७
श्री रामोजयति. १३१४ चैत्र शुद्ध १०
राजश्रियाविराजित राश्रमान्य राजश्री गणेशपंत दादा स्वामी वडिलांचे सेवेसीः--
पोष्य राघो आपाजी कृतानेक सां नमस्कार विनंती उपरी येतील कुशल जाणोन स्वकीये लिहित गेलें पाहिजे. विशेष. आह्मीं लष्करांत यजमानासमागमे गेलों होतों, त्यास रविवारीं सायंकाळीं नांदगांवास आलों. त्यास, आपले भेटीस सत्वरच येतों. पुणियाचे मुक्कामीं आपले व राजाचें बोलणें जाहलें. राजे तेच आपण आहेत. त्याजवरून आह्मांस राज्यांनीं माघारें रवाना केलें आहे. तर म्हसवड संबंधें पेशजीपासून बोलणें आहे. गुदस्तांहि बोलणें जाहलें त्याजप्रमाणें आपण निभावणी करून घेतली. बाकी बोलण्यापैकीं बाकी राहिली आहे, त्यास, भेटीनंतर फडशांत येईल, हाल्लींचेहि बोलणें आहे. त्यास, आल्यानंतर आपले विचारें होणें तें होईल. आम्हांस भाऊ आपण म्हणविल्याचा अभिमान सर्वप्रकारें आपणांसच आहे. तेथें लेहून कळवावें ऐसें नाहीं. म्हसवडाविषयीं आतां नवीन काहीं घालमेल न करावी. मुदाम यजमानांनीं आपलेकडे पाठविलें आहे. आणखी कितेक बोलणीं आहेत, समक्ष बोलणें होईल. येविषयीं राजश्री तात्या स्वामींसही विनंति करावी. आह्मी पदरचे आणि राज्याविषयीं सर्व प्रकारें अभिमान आपणास उभयतां आहे. त्यापेक्षां कोणताही अर्थ दुसरा नाहीं. वचनें दिल्हीं तीं रामबाण आहेत. आतांच येतों. परंतु स्वारीचेमुळें उष्णाचा उपद्रव जाहला. त्यास, प्रकृतीस ठीक नाहीं. कांहीं स्वस्थ जाहल्यावर लवकरच येतों. दादा ! भाऊ म्हणविल्याचा अर्थ आपण शेवटास न्यावा. काम काज होणें तीं होतील. राज्याचे अभिमानी आपण. त्यापेक्षां आह्मी ल्याहावें, ऐसें नाहीं. पत्राचें उत्तर द्यावें म्हणजे दोन रोज आज्ञेप्रमाणें राहुन येईन. नाहीं तर, तैसाच येतों. कळावें, बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती.
पैवस्ती छ ९ साबान ईसनै तीसेन.