Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ३५८

श्री १७९३ वैशाख सुमारे.


पुरवणी सेवेसी विज्ञापना
x + + घडवाव्या. त्या आह्मांपासून जाल्या नाहींत. त्याचीं कारणें तशीच पडलीं. सांगतां येत नाहीं. त्यास, आतां श्रीमंत राजश्री नाना यांणीं तह संबंधी बोलणें ऐकोन घेऊन तहावरील गोष्ट पाडित असल्यास, मीच पुणियासी येतों. याचसंबंधें आह्मीं टिपूस लेहून पाठवून, लाख दोन लाख रूपयांचें जवाहीर नजर करावयासीं घेऊन येतों. आमचें बोलणें सर्व ऐकून घेऊन, जेणेंकरून टिपूची दौलत राही अशी एखादी तोड काढून समेटांत आणावें. असें बहुत तपसीलें विनंती करावयासीं सांगितली. आणि आपल्यास येणेविशीं श्रीमंतांनी आज्ञा केल्यास, टिपूकडून जवाहीर नजरेचें आणावयाचें, त्यास वाटेनें सांडणीस्वार निभावले पाहिजेत. त्याविसीं श्रीमंतांचीं पत्रें राजश्री तात्या यांसी व राजश्री भाऊ यांसीं असावा. नाहीं तरी, मध्येंच लुटले जातील, असें सांगितलें. त्याजवरून सेवेसीं विनंती लिहिली आहे. सेवकास बदरीजमानखान वस्त्रें देत होता. घेतलीं नाहींत. तेव्हां एक घोडा लहानसा द्यावयासीं लागला, तोहि मीं घेतला नव्हता. मी निघोन पुढें सात आठ कोश आलों. तेथें मागाहून माणसाजवळ देऊन मजकडे पाठविला. तत्रापि मी घेत नव्हतों, माणूस माघार घेऊन जाईना. तेव्हां तो घोडा मी बरोबर घेऊन आलों आहे. बदरीजमानखान बहुत बोलणीं बोलला आहे. सेवेसी आल्यावरी समक्ष विनंती करीन. करवीरास आलों, तों महाराज श्रीकृष्णास्नानास कन्यागत आहे ह्मणून गेले. पांच सात रोजीं येतील. आले ह्मणजे येथील गुंता उरकोन सेवेसीं येतों. बदरीजमानखान याचे बोलण्याचा भावआतुरपणा बहुत दिसतो. कसेंहि करावे आणि तह होय अशी गोष्ट व्हावी असें बोलणें आहे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना. *

पत्रांक ३५७

श्रीव्यंकटेश प्रा. १७१३


शेवेसी सां नमस्कार विनंती ऐसी जे. स्वामींनीं दोन नकला व एक पुरवणी कित्ता खास दस्तूरची चिठी पाठविली ती पाऊन भाव समजला. स्वामीनी लिहिलें तें सर्व यथार्थ आहे. मीहि स्वामींच्या आज्ञेप्रमाणेंच वर्तणूक करितों. स्वामीकडे जाऊन आलों याच तर्कावर कयास बांधून रास्ते यांस लिहिलें असतील, इतकाच अर्थ, आपण चित्तांत संदेह आणूं नये. वरीष बारा जाल्यासहि लेख किंवा उच्चारांत गोष्टी येणार नाहीं. आदिपश्चात सर्व ध्यानांत धरून कोण्या रीतीनें आज्ञा कशी कशी जाहली आहे त्याच बेतानें कार्यास प्रवर्तलों आहें. इकडीलविशीं जशी पाहिजेल तशी खातीरजमा असली पाहिजे. पेशजी दुर्गचें टिप्पण करून पाठविलें आहे, म्हणोन सेवेसीं विनंती लिहिली होती. त्यास, एक वेळ तेथपर्यंत माणूस जाऊन वाटा चालत नाहींत. दुर्गाभोंवताले स्वार फिरत आहेत आणि दुर्गचें संधानहि भाऊकडे लागलें आहे. अशांत, आपण गेलें असतां पत्र पुढें रवाना होणार नाहीं, म्हणोन माघारा आलों. त्यानंतर सर्वेच त्या बा। जोडी करून देऊन तेथें एक दोन पत्ते पूर्वील वळखीचे बोलेनें संधान होतें तें सांगून, मुख्य कोठें आहे तेथेंच रवाना केलें आहे. माणून येथून गेला तो शाहाणा आणि इतबारी, यांत गुंता नाहीं. दोन रोज अधिक उणें, उत्तर घेऊन येईल. कामकाज बनून येणें तेथील आस्था प्रमाण. राजश्री आपाजीराम संधानाकरितां आला आहे ह्मणोन येथें आल्यावर ऐकिलें, हेंहि खरें. पूर्वी कराडीं असतांना पळून सावनुरास आला आहे, ऐसें ऐकिलें होतें. येथें आल्यावर व स्वामीच्या लिहिल्यावरून संधानास आला आहे, असें समजलें. पूर्वीपासून त्याचें लक्ष्य स्वामीच्याठाई नीट आहे आणि माझे सर्व ठाईहि विश्वास आहे. त्याजकडे कोणासहि पाठविल्यानें आम्हांकडे वळेल. यांत गुंता नाहीं. परंतु मुख्य बडबड्या व भोळा. चित्तांत गोष्टी राहत नाहींत. कागदींपत्रीं जाबसाल लाविल्यास, आपल्या महत्त्वाकरितां पत्रें दाखवायास देखील अंदेशा करणार नव्हे. तो साधक नव्हे. सिद्ध पुरुष आहे. तेव्हां इकडील अडचणी त्याचे ध्यानांत कोठून भरणार? याजकरितां कागदीपत्रीं संधान नीट पडणार नाहीं. त्याकडेहि कोणसा आप्त पाहून निरोपानेंच स्थूलमानेकडून तेथीलहि भाव घेतों, मुख्य मूळापासून काम होऊन आल्यास सर्वोपरी चांगले. त्याच प्रयत्नांत आणखी एकदोन संधानें आहेत. एक वेळ हरप्रयत्नें श्रीमंतांनीं आपणांस सांगितल्यावर शेवकहि हंडी तो उतरून देतों. पेस्तर सिद्धीस नेणें स्वामीकडे. आमचे चुलते ती।। रा। लक्ष्मणराव व रामराव ह्मणोन, बाहादराच्या सैन्यांस स्वामी होते त्या वेळेस त्यांची भेटी स्वामीस करविली होती. आणि त्यांचे प्रयोजनास स्वामी अनकूल जाले होतेत. बहुतकरून स्मरणांत असेल, ती।। लक्ष्मणराव तो त्यांजकडेच आहेत. ती।। रामरावकाका हे मात्र घरांस आले होते ते आजपर्यंत घरींच होते. सांप्रत आमच्या भेटीकरितां आणि एकदोन मुलीहि पाहून आहेत. ते येथेंच आहेत. त्यांसींहि वरचेवर बोलण्यांत येत जातें. पुर्ते पक्केंपणे निखालसता आमची जाली म्हणजे त्यांची रवानगी मुख्यापर्यंत करून बनल्यास हुजुरांत राहून कामकाज करून वरचेवर पाठवणेस येईल; आणि योग्यताहि आहे. चित्तावर घेतल्यास सर्वहि करितील. हें जाणून त्यांची रवानगी करावी ह्मणतों. पुर्ते समर्पक दिसल्याप्रमाणें करीन. कोण्हेविशींहि इकडील चिंता आपण करू नये. आपल्या वाटेस येई तोच प्रकार इकडून घडेल. पत्र पाहून विसर्जन करावें. लोभ करावा हे विनंती. ती।। रा। रामरावकाका यांणीं स्वामीस पत्रें लि।। आहेत. विदित होईल. हे विनंती.

पत्रांक ३५६

श्री १७१२ भाद्रपद शुद्ध २


श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः--

विनंति सेवक जनार्दन सिवराम कृतानेक सां नमस्कार विज्ञापना ता। भाद्रपद शुद्ध २ पावेतों स्वामीचे कृपेंकरून सेवकांचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमानें: आषाढ वा। सप्तमीस सरकारची जोडी रवाना जाहली, तें पाऊन सकल वर्तमानें ध्यानारूढ जाहली असतील. अस्विनीस्थ नृपाचें वर्तमान दोन तीन पत्रीं तपासलें लिहिलें तें ध्यानांत असेलच, विद्यमानी गौनर होरन बहादर यांनीं आरणीचे दत्तपुत्र श्रीनिवासराव यांस अधिकारावरीं स्थापिलें, आस्विनीस्थ नृपासी व आहालेकारासी आणि आत्रीस्थासी फारच वैमनस्क येऊन पडलें आहे. यासमई जे यांनीं केलें तें केलें, तीन अधिकार उभयेता बधूंसच आहेत. दुयेम गौनर कासमेजर यांचें कांहीं चालत नाहीं, खामाखाये आस्विनीस्थ दत्तपुत्रासच स्थापावें ह्मणून फार आग्रहांत आहेत. त्यास निमित्य व येक आसरा नबाबसालाचा धरून हें काम करावें, ह्मणून आह्मांस बोलाऊन सांगितलें जें: याविषईचें अगत्य श्रीमंतांस असावें. त्यांनीं उपेक्षा केल्याकरितां ज्याच्या मनांस जैसें आलें तैसें करितात. याकरितां याविषयींचा बंदोबस्त करावा. मसविद्याप्रमाणें पत्रें आल्यास, श्रीदयेनें न्यायमार्गच केला जाईल. त्यास, तीन पत्रें यावीं. श्रीमंत महाराज शाहूराजे यांचे पत्र यावें. जे, पूर्वी आह्मी सराचे बेलड केमळ यांस चंदावराविषयी लिहिलें होतें. त्यांनीं दरजबाब पाठविले नाहींत. आह्मी ऐकिलें होतें जेः इंग्रेज लोक न्याये पंचायतीकडून काम पाहतात. ह्मणून ऐकत होतों. विद्यमानीं बहूतच अविहित आमलेंत आणिलें आहे. तें काय ह्मणजे, तुलजाजीराजे यासी संतती नाहीं. तेव्हां आमच्या दायेजाचे मुलास दत्त घेतले तें किंनिमित्य? म्हणजे अस्सल कौमेचा यास अधिकार, पण इतरांस नाहीं. प्रतापसिंग राजे यांनीं येक कलवातणीस ठेविलें होतें. ते न व्हता, व्यंकणा म्हणणारासी तीसी संमध पडला. ऐसें असतां, तिला येक लेक जाहाला. त्यासमई प्रतापसिंगराजे म्हणाले जे, हा मूल मजसारिखा नाहीं, व्यंकणा सारिखा आहे. ऐसें म्हणून तिजला इतराजीखाले ठेऊन, त्या मुलास नजरबंद ठेविलें होतें. ऐशा मुलास तुलजाजी याचा भाऊ म्हणून, त्याला पट बांधिलें आहे, म्हणून ऐकिलें. त्यावरून हे न्यायेरीती कोणती ? दत्तपुत्र घेतला त्यास सोडून देऊन, गैरवारसास आमचे घर देणें फार अनुचित. तुम्हांस व आम्हांस स्नेहभाव विशेष आहे. तनमुळें लिहिलें जातें जें, आमचे घर काहाडून ऐशीया कंचिनीच्या मुलास देणें अविहित. मुख्य आमच्या कौमांत पुत्र नसल्यास दत्तपुत्रच अधिकारी, ऐसें आहे. यांत आपल्या चित्तास वित्यास भासल्यानें, आपण अपरोक्षी आमच्या शास्त्रप्रकारें न्यायेरीतीनें आमच्या दायेजाचा मूल तुलजाराजे यांनी पोसणा घेतला. त्यासच आमचे घरीं ठेविजेसें केलें पाहिजे, येखादे आपले चित्तीं असेल कीं सराचे बेलड केला त्याप्रमाणें केलें. हे मनांत असेल तरी, हें वर्तमान समग्र आमचे स्नेहांत लाट कारणवालिस यांस विनंति लिहून त्याचा हुकुम घेऊन आमचे मुलास आमचे घरीं ठेविलें पाहिजे. आमचे मुलास आमचें घरीं ठेविनास गेल्यानें तुमच्या व आमच्या स्नेह्याचीं अभिवृद्धि कसी होईल ? आह्मीही हे अर्थ आवघे सूचना केली आहे. कंपणीची आमची दोस्ती आहे. त्यापक्षी आपले चित्तीं ही स्नेह्याभिवृद्धि करावी म्हणून असेलच. परंतु इतरता येणार नाहीं; व जेणें कडून हरदो तर्फेची खुषी होऊन दोस्ती राहील तेच आपण करितील, हे आमच्या चित्तांत खातरजमा असे. दोस्तीचे ठाई ज्यादा कलमी कायेद्याप्रमाणें महाराज राजे यांचे मोहरेनिशी येक पत्र यावें. तैसेच सरकारचे पत्रांत ल्याहावें जेः महाराजांनीं लिहिल्याप्रमाणें तुम्ही आमलांत आणावें. येणेकडून खुषी होऊन दोस्ती राहात आहे. जेणेकडून आमचे राजेयाचे घरचा बंदोबस्त होऊन संतोष होतील तें करावें. यावरी ऐसें सरकारचें पत्र मर्जीस आल्यास सरकारचे तर्फेने जे ल्याहावयाचे भाव ल्याहावे. तिसरें, आपलें खास पत्र यावें जे, येथील कितेकबाबती राजेयांनीं व श्रीमंतांनीं तुम्हांस लिहिले आहेत. त्याप्रमाणें संवस्थानचा बंदोबस्त करून उत्तरें लवकर पाठवावीं. येणेंकडून सकल लोकांस संमत व खुषी होत आहे. जेणेकडून न्यायेप्रकारें कोणी शब्द ठेविनासारिखें आम्ही लिहिल्याप्रमाणें अमलात आणावें. सर्व जाणत्यास विशेष काय लिहिणें असे. ऐशीं तीन पत्रें आणवावीं म्हणून सांगितलें; व मसविदाही त्यांनींच ठराऊन दिल्हा. त्याप्रमाणें सेवेसी विनंति लिहिली आहे. तरी याविषयींची तजवीज करितां लिहिल्याप्रमाणें पत्रें यावीं. येणेंकडून सरकारास कीर्ति येत आहे. दुसरे संवस्थानचा अभिमानही प्रसिद्ध होऊन दाब राहत आहे. नूतन स्थापना जाहाल्यासीवाय सरकारचे लक्षांत येत नाहींत. अधिकारस्थ विप्रास आकाश दीड बोट आहे. कोणासही खातरेंत आणीत नाहींत. आपले ठिकाणीं जसी सरकारची मोहर आहे तद्वत पंतप्रधानाची मोहर केली. असो. आपले घरांत कांहीं करोत. परंतु सरकारची बरोबरी व सरकारासी स्पर्धा केल्यानें कल्याण कैसे होतें, राजपत्न्या वगैरे सर्वत्रांस बेदिल केलें आहे. हें समग्र तपसील तपसिलें सरकारचे जोडीबराबरी सेवेसी लिहिले आहेत. त्यावरून ध्यानास आलें असेल. यांची उत्तरे लवकर यावीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक ३५५

श्री १७१२ आषाढ वद्य.

राजश्री आपाजीराव स्वामीचे सेवेसीः-
विनंति उपरी. इसमालबेग नारनोळावर होता. तेथे त्याचीं पलटणें फुटोन आपलेकडे संधान लाविलें; व मारवाडी यांजकडेही संधान लागलें. तेव्हां फक्त मोगली फौज मात्र च्यार हजार पर्यंत राहिली. तेव्हां तेथून कूच करून जैपूरप्रांतीं चालला. नंतर आपले फौजेनें निकड केली. तेव्हां पुढें निभाव न होय तेव्हां पाटण परगण्यांत लहान किला आहे, तेथें इसमाल्या व मारवाडी यांनी मुकाम केला. नंतर जेष्ठ शुद्ध दशमी व एकादशीस दोन लढाया जाल्या. त्याजकडील माणूस जखमी व ठार फार जालें. आपले कडील ही थोडे बहूत जाया जाले. सारांश तूर्त आपली फौजेची जरब त्यांजवर चांगली आहे. राजश्री बापूजी होळकर व कासिबा होळकर पुढें फौजसुद्धां आहेत. हालीं राजश्री आलीबहादर यांजकडील फौज दोन हजार राजश्री सदाशिवपंत यांचे चिरंजीव बलवंतराव याजबराबर देऊन रवानगी केली. सारांश तिघांही सरदारांचे चित्त शुद्ध नाहीं; आणि मसलत तरी उभी राहिली आहे, म्हणोन लिं तें व फडणिसीचे कान् कायद्याचें बोलणें होऊन यादी ठरल्या आहेत, त्याजवर मखलाशा होऊन खाशाचा करार करून द्यावयाचा आहे, तो जाला म्हणजे सेवेसी तपसीलवार लिहून पाठवू म्हणोन; व तुमचें राहणें तूर्त च्यार महिने जालें, पुढें येणें कधीं घडेल पहावें, म्हणोन; लिहिलें ते सविस्तर कळलें. त्यास, सांप्रत इस्मालबेगाचाही मोड जाल्याचीं पत्रें आलीं आहेत. त्यावरून पाटीलबावा यांची निष्ठा श्रीमंतांचे पायासी आहे त्यापेक्षां अशाच गोष्टी घडतील. संतोष जाला. पुढें होईल तें ल्याहावें. फडणिसीचे कायद्याचे यादीवर करार होणें. त्यास, तुह्मांस जाऊन किती दिवस जाले, तेव्हांपासून करार होतच आहे. आणि पाटीलबोवाचा व आमचा भाऊपणा. त्यापक्षीं इतके दिवस लागूं नयेत. करार जालेच असतील. लिहून पाठवावे. तुह्मांस पाटील बावांनीं ठेऊन घेतलें म्हणोन, त्यास कांहीं कामाकाजाचे दिवस असतील म्हणून राहविलें असेल. उत्तम आहे.

पत्रांक ३५४

श्री १७१२ वैशाग्व शुद्ध ९


श्रीमंत राजश्री बाबासाहेब साहेबाचे सेवेसीः-

आज्ञाधारक अंबाजी इंगळे रामराम विज्ञापना येथील क्षेम ता छ ८ माहे शाबान येथें महाराजाचे कृपेकडून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. राजश्री जगोवा बापू आह्मांस येथे ठेवून गेले. लोकांची निते धरणी. लोकांचें मनांत कज्या करावा हे मानस पाहून, येथेंच च्यार रोज राहावें हे सांगोन, मथुरेस जावयास गेले. सरकार-किफायतीची गोष्ट सांगितल्यास लोकांस वाईट दिसती. त्यास धण्याची आज्ञा आली तर च्यार रोज मेवाडांतून कामकाज करून येईन. येथें रिकामे बसोन काय करावयाचें आहे ? त्यापेक्षां मेवाडाचें कामकाज आटोपोन धण्याचे पायाकडेस येईल. त्यास मेवाडांत जावयाची आज्ञा जाहाली पाहिजे. * बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक ३५३

श्री. १७१२ चैत्र शुद्ध ३

रु.

पो छ १५ रजब तिसैन.

शेवेसीं श्रीराम सदासीव कृतानेक सां नमस्कार विज्ञापना छ १ रजब येथास्थित असो. विशेष. राजश्री सेनासाहेबसुभा याचें छ ४ जमादिलासरीं गंगेहून कूच होऊन छ ५ रोजी नकलपल्लीचे मुकामीं नागपूरची डाक आली भवानी नागनाथ मुनसीस फाल्गुन शु।। ३ देवाज्ञा जाल्याचें वर्तमान आलें. मुनशीविशीं सर्वास हळहळ वाटली. गुंडो शंकर कारकून पेशजी आडंपल्लीकडे पाठविला आहे. वेंकटराव गोड्याचे गांव तेलंग प्रांतीचे लुटितो. वस्ती होऊं देत नाहीं. गुंडो शंकर याणें त्यांजकडील एक ठाणें घेतलें, व लष्कर मार्गात जातां येतां रवेहून येक दोन घोडीं नेलीं, म्हणून सिरपुरचे मुकामींहून गुंडो शंकरास कुमक किसनसिंगास पाठविलें होतें. तेव्हां वेंकटराव गोड गुंडो शंकरास भेटला. छ १२ रोज चंद्रपुरास मुकाम आला. तेथे आठनव मुकाम जाले. हुताशनी करून चिमाबाई व वेंकाजी भोंसले राजेश्वरास गेले होते. ते छ २० रोजीं चंद्रपुरास आल्यावर, छ २१ रोजीं कूच करून, छ २५ रोज भृगुवार तिसरे प्रहरीं नागपुरास वाड्यांत दाखल जाले. देवघरापुढें दोन घडी बसले, रयत व कमावीसदार व राजाराम मुकुंद, बंगाल्याचे सुभे यांणीं वगैरे नजरा केल्या. चिमाबाई येतांच बाहेर शंकरदरियाजवळ खंडोजी भोंसले याजविशीं बहुत रडली. शहरांत येतांच वाड्यांत जावें ते गेले नाहींत. मागती बाळाबाई यांचे वाड्यांत जाऊन बसले. तेव्हां सर्वांणी जाऊन समजाऊन आणिलें. बाईस वारंवार दुःख बहुत आठवतें. मुनशीचें वर्तमान ऐकून खाशास मुछद्यांस सर्वांस वाईट वाटलें. हुताशनी चंद्रपुरावर केली. तेथें नाचरंग कांहीं केला नाहीं. याप्रों खंडोजी भोंसले याचे वाईट कोणासच वाटलें नाहीं. त्याचें स्मरण खाशास किंवा मुछद्यांस कोणासच होत नाहीं. असा बंदोबस्त येकच कट करून कृत्रिम करून अनर्थ केला. छ २७ रोज प्रातःकाळीं स्नान करून स्वारी मुनसीचे घरास गेली. त्याचे चिरजिवाचें समाधान करून, दोन घडी बसून, राजाराम मुकुंद, बंगाल्याचे सुभे यांचे घरास गेले. त्यांचे बंधूस बंगाल्यांत देवआज्ञा जाली. त्याची स्त्री सती गेली. राजाराम मुकुंद याचें समाधान करून आले. छ २८ रोज प्रातःकाळीं स्नान करून, प्रहर दिवसां स्वारी फुटल्या तळ्यास गेली. तळें पाहिलें. तेथें नवा बाग केला आहे, तो पाहिला. च्यार घडी निद्रा केली. बागांतील केळें आणून पठाण वगैरे लोकांस वाटलीं. साईकाळीं स्वारी आल्यावर स्नान करून, सोमवारचें भोजन केलें. छ २९ रोज प्रातःकाळीं स्नान करून, सवत्सरप्रतिपदेचें निशाण जरीपटक्याची पूजा केली. मुछदमंडळी वगैरे झाडून आले. देवप्रतिष्ठा जाली. श्रीरामनवमीचा उत्सव आहे. पूजाअर्ती जाल्यावर चार घडीं दरबार जाला. बंगाल्यांतील सावकार आला आहे. त्याणें हत्ती नग दोन नजर केले. येक मोठा व येक लाहाण आहे. महिपत दिनकर यास छत्तीसगडास जावयास मुहुर्तेकडून राहुटी बाहेर द्यावयास सांगितलें. आठाचौरोजांनीं जातील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक ३५२

हु. १७१२


रफआत व अवालिपनाह तुजारत व मआलिदस्तगाह अजम बेल चियोर जुजेवासदे करवाल सकट तारबंदर गोंवा महफुंज बाशद. अजितर्फ महाराज गिरानी जिजाऊसाहेब बअदज दुवा आंकी. बहुत रोज गुजरले असतां, अजम विजरई यांकडील व आरपुअतपनाहकडील खत यखलास नमतम रसूल होऊन, शादमानी रुएदाद न जाहली. बईसबब कलमीं केलें. जातें जे, साहेबीं अजम विजरई यास भाई म्हणविलें, विजरई लोक सखुनास गुंतावयाचे नव्हेत. असें असतां सखुनास गुंतोन, साहेबांस तुम्हीं व त्यांणीं कलमी करून पाठविलें. त्यावरून साहेबांचा जजीरा साहेबाचेकडे आहे, ऐसें दिलामध्यें जाणोन तुमच्या यकसखुनावरी व कलमी केल्यावरी साहेब बेफिकीर आहेत. साहेबीं भाई म्हणविलें. आणि कार्यास बहुत रोज गुजरले. ल्याहाजा पैदरपै कलमीं करावें लागतें. ये बाबेचा सर्व प्रकारें अभिमान व इरे विजरई यांणीं व तुम्ही खातरेमध्यें आणोन, मुंबईकराकडे खत पत्रें कलमीं करून, हुजरे पाठविले आहेत. सारांश, सरकारचा जजीरा सरकारांत ताबीन होऊन साहेबाजवळ वचन गुंतलें आहे त्या क्रियेस मुक्त होऊन, यकसुखनीपणाची नेकी व खुबी सर्व टोपीकरांत जाहेरीस येई, तें करणें वाजीब व लाजीम आहे. वरकड आज्ञेप्रमाणें चिरंजीव राजश्री यशवंतराव शिंदे सुभेदार कलमीं करितां मालुम होईल. जिआदा++++++? लेखनसीमा,

पत्रांक ३५१

श्री. १७१२


सेवेसी विज्ञापना ऐसीजे. इकडील वर्तमान तरीः टिपूनें कोयेमुदुराजवळ छावणी केली. आयाज वगैरे नायेमार झाडींत आहेत. परंतु नायेमाराचे लोक फार जाया केले. त्याचा चिलर उपद्रव आहे. परंतु बाहेर येऊं सकत नाहींत. कित्येक आनंतशयेनच्या सरहदेस गेले ह्मणावयाचें वर्तमान टिपूनें ऐकून पहिलेपासून त्या स्थलावरी दांतच आहे. याविषयीं कांहीं हो, तें स्थल घ्यावें ह्मणून तजवीज करून फौजेची तयारी आहेच, त्यांतही मुलकांतील फौज जमा करीत आहेत. अनंतशयेनचे सरहदेस लागून फौज उतरविली आहे. हें वर्तमान तेथील राज्यास कळून, तेही आपली फौज घेऊन आपले सरहदेंत उतरले आहेत. हामेशा इंग्रेजी येक पटालबार रानांत होतीच. मध्यें गडबड जाहली, ते वेळेस दोन हजार बार आणखी पाठविला. तीन हजार बार मध्यें दोनी फौजेच्या उतरलेत. हें वर्तमान आत्रीस्थ गौरनरांनी ऐकून आपले हुशारींत लागलेत; आणि टिपूस पत्रें लिहिलींत कीं: तुह्मीं आमचे जमीदाराबराबरीं द्वेष वाढवून त्याचें मकान घ्यावयाची तजवीज केलियावरून पाहतां आह्मांसीच विरुद्ध करावें ह्मणून दिसोन येतें. तुमच्या आमच्या करारांत तें स्थल दाखल आहे ऐसें असतां, घडीघडी उपद्वयाप करणें युक्त नव्हे. जर करावें म्हणूनच असल्यास आह्मांस ल्याहावें. आम्हीही त्याचे कुमकेस सिद्ध आहों. यावरी जें युक्त दिसेल तैसें उत्तर पाठवणें. त्याप्रमाणें आह्मी अमलांत आणूं. याप्रमाणें पत्र गेलें आहे. याचे उत्तराची मार्गप्रतिक्षा करतात. दुसरे आपले तयारींत दारूगोळे वगैरेच्या सरंजामांत आहेत. यावरी जैसें होईल तैसें सेवेसी लिहिजेल. भटाचे घरचें वृत्त. अवघी बचबच आहे. मित्रही कामांत फिरतात. परंतु त्याचीही निभावणुकेची खातरजमा होत नाहीं. ऐसें काम बिघडलें. सेंजणास वसूलबाकीस गतवर्षीचे वसूल देणें. तेव्हां हाल विद्येमानची गती काय ? असो. सर्वत्र हेंच म्हणतात जे, पुन्हां जेनपद स्वेताकांत होईल. ईश्वरें क्षेम करावें. श्रेष्ट स्थलचे नृपास पैत्यभ्रमाचा उपद्रव फार जाहला होता. सबब पांच महिने काम आप्तर जाहलें. त्या समई लोकलाजें येतों म्हणून लिहिलें होतें. त्यास, तेथील लोकांनी उत्तर पाठविलें कीं, तुम्ही येक वर्षी तेथें असणें. ऐसीं पत्रें रवाना जाहली. इतकियांत केमल निघोन गेला. तदनंतर पत्रें येऊन पावलीं. त्यांवरून पाहतां नूतन यावयासी च्यार दिवस लागतील, ऐसें दिसतें, यावरी च्यार महिने जाहाजें यावयाचा हंगाम राहिला. यावरी पाहावें. जैसें मागाहून वर्तमान येईल तैसें सरकारचे जोडी बराबरी तपासिलें लिहिजेल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

[ ४५ ]                                           श्री.                                                      ४ ऑगस्ट १६९३.
                                                ०     ˜
                                                 श्रीमच्छत्रपते शंभो
                                                 शासन शासत. सदा।
                                                अनंतसूनो रामस्य चिरं
                                                मुद्रा विराजते।।

अज् सरसुभा राजश्री रामाजी अनंत सरसुभेदार व कारकून सुभा प्रा। राजापूर ताहा कमावीसदार व कुळकर्णी व गांवकर व रयानीं मौजे त्रिंबक ता। साळशी सुहुरसन अर्बा तिसैन व अलफ. राजश्री छत्रपति स्वामीचें आज्ञापत्र, छ २९ साबान, पौ। छ २२ जिल्हेज, सादर जाहालें. तेथें आज्ञा कीं - ता। साळशी या माहालीची सरदेशमुखी पूर्वी अदलशाहानें जानतराव यासी वतन दिल्हें होतें परतु भोगवटा जाहाला नाहीं. वतन दिवाणांत अमानतच आहे हें वतन राजश्री रामचंद्र नीलकठ यास अजराम-हामत वतन करून दिल्हें असे. साळशी महालीच्या सरदेशमुखीचें वतन यांचे सांभाळीं करून यांस हक्कलवाजिमा इनाम मौजे चिदर व मौजे त्रिंबक देह २ दोन कुलबाब कुलकान् चालवावयाची आज्ञा केली असे. तरी येणेप्रा। हक्कलाजिमा इनाम यांस यांचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें चालवणें. ह्मणून आज्ञा त्यावरून मानिलेस ता। मा। रची सरदेशमुखी वतन स्वाधीन करून वतनास हक्कलवाजिमा व इनाम चिदर व मौजे त्रिंबक उबळ केलें आहे. तरी सदर्हू सरदेशमुखीच्या कार्यभागास मा। नुयाबी रा। अंताजी जनार्दन यास मुतालिकी देऊन पाठविले आहेत. याचे आज्ञेंत राहोन मौजे मजकूरचा वसूलवासूल कुलबाब कुलकानू समवेत मा। निलेकडे देत जाणे. छ २२ जिल्हेज मोर्तब सूद.
                                                                                                                                      विलसति 
                                                                                                                                      लेखनावधि
                                                                                                                                          मुद्रा.                            

पत्रांक ३५०

श्री १७१२


विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. ढोकलसिंग याजवर खंडेराव हरी यांणीं जरब दिल्यामुळें निघोन गेले, त्यास बुंदले यांच्या सरकारचा भाऊपणा, यास्तव च्यार रु।। त्याजकडून करार करून घेऊन त्याची जागा पर्णे त्याजकडे ठेवावी, यांत भाऊपणाही राहून कार्य होईल, त्याचे कबिले वगैरेस उपसर्ग खंडेराव हरी याजकडून न लागे तें करावें, म्हणोन लिं। तें सविस्तर कळलें, येसीयासी, आपलीं पत्रें पूर्वी येविसीं आल्यावरून राजश्री खंडेराव हरी यासी लेहून पाठविलें होतें. त्यावरून मा।रनिलेनीं खोणीकडे मातबर पाठवून, त्यास घेऊन येऊन, सरजेतसिंग व ढोकलसिंग याचा कलह भाऊपणाचा होता त्याचा ठराव, दोन हिसे ढोकलसिंग व एक हिसा सरजेतसिंग, या प्रों करून हिसेरसीद फौजखर्च दोघांकडून च्यार रु।। ठराऊन घ्यावे, असें ठरविलें आहे. ढोकलसिंग याचे कबिले वगैरेस उपसर्ग खंडेराव हरी याजकडून लागणार नाहीं. येथून लिहिण्यांत आलें आहे.