Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ३६६

श्री १७१३ पौष वद्य ११

दंडवत विनंति. आपण वेदमूर्त राजश्री नारायण भट बावा दीक्षित यांबरोबर आशीर्वादपत्र पाठविलें, तें पावोन समाधान जाहालें. पत्र लिहिले कीं, दो लग्नाचा उपाघेपणाचा विषये राहिला आहे, तो नारायणभट बावास देणें. ह्मणून लिहिलें, त्यावरून आह्मीं त्याचा फडशा केला. आपण रविसंक्रमणाचे तिल शर्करायुक्त पाठविले ते पावले. स्वीकार केला. वारंवार आशीर्वादपत्र पाठऊन परामृश करीत असावें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों दिला पाहिजे. हे विनंति.
पौ। पौष वद्य ११, विरोधकृत,

  [ ४७ ]                                       श्री.                                                    १६९५.

राजश्री पंत अमात्य स्वामीचे सेवेसीः-

1 सकळगुणालकरण अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य स्नेहाकित सताजी घोरपडे सेनापती जप्तनमुलूक दंडवत विनंति, येथील कुशल तो। प्रताप स्वामीचा जाणऊन स्वानंदवैभवलेखन केलें पाहिजे विशेष स्वामीनी राजश्री सेखोजी बरगे व बाजी शिंदे याजबरोबरी कितेक बुद्धिवाद सागोन पाठविला की - आपली भेट घेतली नाही परस्पर निघोन गेलेत ह्मणून शब्द लाविला ऐसियास, स्वामीची आमची क्रिया ऐसी नाहीं जे स्वामीसी द्वैतभाव धरावा. आह्मीं त्याप्रातें असतां दहाविसांचे साक्षीनसी ऐकिलें कीं सताजी घोरपडे यास त्याप्रांतें ठेवून राजश्री धनाजी जाधवराऊ यांस पाठवून देणें. ह्मणवून पत्रे राजश्रीस लिहिलीं. त्यावरूनच द्वैतप्रकार दिसून आला . स्वामीचे आज्ञेवितरिक्त आह्मीं कांहींच नव्हतों. विश्वासाची जाती ह्मणावी तरी स्वामीचे आमचे शफत तुळशीबेलाचे श्रीवरील आहे. स्वामीचे मांडीवरी आह्मी उसें ठेवून निजावें, आमचे मांडीवरी स्वामींनीं ठेवावें, शरीर मात्र भिन्न, आत्मा एक, ऐसें असतां ही गोष्ट द्वैताची होऊन आली. ह्मणूनच वीतरागें येणें जालें. गत वर्षापासून श्रमाची जाती ह्मणावी तर कागदीं लिहितां पुरवत नाहीं. बरे । जे गोष्टी जाहाली ते जाहाली. याउपरि त-ही राज्यांत डोहणा न होय तो पदार्थ केला पाहिजे द्वैतभाव दिसोन आला होता ह्मणऊनच येणें जाहालें होतें. त्यास, राजश्री सेखोजी बरगे व बाजी शिंदे यांजपाशीं स्वमुखें सागितलें कीं, आपण कांहीं संताजीस ठेवून घेऊन धनाजी जाधवराऊ यास पाठविणें. ऐसें लिहिलें नाहीं. ह्मणऊन शफतपूर्वक सांगितलें. त्यावरून बाजी शिंद्याचे साक्षीनसी मशारनईलेनीं आह्मांस सांगितलें. वरकडहि कितेक भावार्थ व मानाजी मो-यांचें वर्तमान व आणिखी स्नेहाची उत्तरें सांगोन पाठविली. त्यावरून द्वैताची गोष्टी होती ते स्वामीचेच वचनावरून दूर केली. आह्मीं लोकांचे बळें द्वैत धरिलें होतें. तें आह्मापासूनच अंतर पडलें. आपणहि त्या गोष्टीचा कांहीं मनांत विकल्प धरिला न पाहिजे. आणखी स्वामींनीं एक शब्द लाविला की, राजश्री छत्रपति स्वामीची भेटी जाहाली ते समयीं बहुमान जाहाला, तेव्हां आमचा मान काढिला नाहीं. ह्मणऊन शब्द लाविला. ऐसियासी, राजश्री छत्रपति स्वामींची व आमची जीं वचनें स्वामीचे सीहुरसीचीं जाहालीं. काय काय चाकरी केली असेल ते एक श्री जाणें. कोणे गोष्टीस अंतर पडिलें नाहीं. आम्ही ऐसे सेवक नव्हे जे, स्वामीचें स्मरण न करितां आधीं आपला बहुमान घेऊन याचा पर्याय कागदी काय ह्मणऊन लिहावा ? भेटी अंतीं कळों येईल " तुह्मीं आपलें स्मरण राजश्रीपाशी घेतलें नाही परंतु अल्लीमर्दाखान घेतला ह्मणऊन ऐकिलें विजयी वस्त्रें पाठविलीं " ह्मणऊन लिहिलें त्यावरून अपूर्व वाटलें । स्वामी वडील. हें यश येतें तें स्वामींचेच पुण्येकडून येतें आमचा अभिमान सर्व गोष्टीचा स्वामीस पूर्वीपासूनहि आह्मांस स्वामीनेंच गौरविलें तेथें वस्त्राचेंच कार्य ह्मणऊन आह्मीं ल्याहावें ? पूर्वीपासूनहि आह्मांस स्वामीनेंच गौरविलें तेथें वस्त्राचेंच कार्य ह्मणऊन आह्मीं ल्याहावें? पूर्वीपासून अगीकार आमचा स्वामींनी केला आणि बंधू ह्मणविलें. तोच सिद्धी पाविला पाहिजे वरकड बिस्तारे ल्याहावें तरी लिहिजेसारखा पदार्थ नाहीं राजश्री सेखोजी बरगे व बाजी शिदे मुखवचनें सांगतील तीं वचने आमचीच ऐसे जाणून, श्रीशिवनाथ देव कृष्णेपाशीं आहे, तेथें आपण आले पाहिजे आह्मीं येऊन स्वामीची आमची भेटी होऊन श्रीचे व कृष्णेचे साक्षीनसी बेल तुळशी होतील. मग जो विचार करणें तो केला जाईल स्वामीवितरिक्त आह्मी काही नाहीं. जैसी पूर्वी आज्ञेप्रमाणेंच वर्तणूक केली तैसीच करू कळले पाहिजे.
श्रीराजारामचरणीं                                                                                                            विलसति
तत्पर । संताजी                                                                                                              लेखनविधि
घोरपडे निरंतर.

पत्रांक ३६५

श्री ( नकल ) १७१३ आश्विन शुद्ध १


राजश्री बळवंतराव महादेव का।दार पा। आमझरें गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। माहादजी शिंदे दंडवत. सु।। इसन्ने तिसैन मया अल्लफ. बद्दल देणें विनायक माहादेव व नारो कृष्ण कारकून नि।। बक्षी. यांसीं वेतन जातीस व मुदबखचे रोजमुरे व शागिर्दपेशा वगैरे बाबत. ता। सन इहिदे तिसैन अखेर साल बा। करार चिठ्या ए।।
८२८० वेतन व शागिर्द पेशा वगैरे दरसाल रुमा१८२० प्रा।हिद छ १७ सफर सन सबां ता। सन इहिदे तिसैन अखेर साल माहे ५४६१८ आकार रु।।८२८०
२१४॥ मुदबख बा। वगैरे सालिना ७०२ रु।। प्रा। हि।। छ ९ जाखर सन इहिदे ता। छ १७ सवाल येकंदर साल माहे ३८२०
४३९। दफ्तरखर्च नि।। बक्षी खा।। कागद व समया
११७ खा।। उंटनफर १ एकूण रु।।
१६४९।।। चंदी व लागवड घोड्यास व उंटास इ।। सन तिसैन ता। सन इहिदे तिसेन दुसनला रु।।
१४६। सारवान व मसालची यांचे हिशेबाबद्दल रु।।
१४३। खा। तेल दीपास व मशालेस.
--------
१०९९०

पैकीं आदा, पातशाई माहाल पौ मा आपाजीराम फडणीस रु।। ५५ ००. बाकी देणें रु।। ५४९० पैकी पा। बडोदे वगैरे माहाल येथील सन सलास तिसेनचे रबीचे ऐवजीं वरात लाऊन दिल्ही रु।। २७४०. बाकी देणें ते २७५० रु।। एकूण दोन हजार सातशें पंनास रु।। तुह्मांकडून देविले असेत. तरी पा।मा।र येथील पेस्तर साल सन सलास तिसैनचे रबीचे ऐवजीं सदरहु सत्तावीसशें पंनास रु।। जेष्ठ शु।। १५ पौर्णिमा शके १७१५ पंधराचे मित्तीस मा।रिनल्हेस उज्जन चलणी आदा करून कबज घेणें. जाणिजे. छ २९ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति, मोर्तबसूद.

पत्रांक ३६४
श्री १७१३ श्रावण वद्य ८

श्रीमंत महाराज राजश्री नाना साहेब स्वामीचे शेवेसीं:-
आज्ञाधारक शामराव बल्लाळ कृतानेक सा। नमस्कार विज्ञापना ता। छ२१ जिल्हेज सोमवार दोन प्रहर दिवस महाराजाचे कृपावलोकनेंकरून मुकाम वरुड नजीक वाफगांव मंडळीसहवर्तमान येथास्थित असे. विशेष. दत्तु खिजमतगार याणें मल्हारजीस तयार करून रातोरात काढून न्यावें हा विचार पका जाला. ही बातमी रा। भगवंतराव बल्लाळ दिवाण मा।निल याणें जलदी करून सिबंदीचे लोक ममतेचे दत्तूकडे पाठवून, दत्तूस हस्तगत केलें. हा मजकूर मल्हारजीस कळतांच त्यांणी दत्तूची कुमक केली. ह्मणोन सिध्याहातीं मल्हारजीसही धक्के मारून वाड्यांत अटकाऊन भोंवताली चवकी बसविली. खूनकरी दत्तु व खासा मल्हारजी कैद केला आहे. त्यास महाराजांनीं, मतकर होळकरांचा मामा वाकडू पा। सेवसी आलाच आहे, त्याची खातर रक्षावी, हा प्रसंग उपयोगींची आहे. तीर्थस्वरूप राजश्री नारायणराव व सखारामपंत यांजकडे रातोरात दत्तुखिजमतगारास कैद केल्याचें वर्तमान लिहिलें आहे. त्याणीं श्रुत केले असेल. पक्की बातमी भगवंतराव यांजकडे सूत्र आहे, तिकडून आली. महाराजांचे पायांचे प्रतापें जें होणें तें होत आहे. उत्तराची आज्ञा व्हावी. बहुत काय लिहिणें ? कृपा करावी. हे विनंति.

पत्रांक ३६३

श्री. १७१३ श्रावण वद्य २


राजश्री तुकोजी होळकर गोसावी यांसीः-
छ सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव नारायण प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. राजे माणिकपाल संस्थान करोली मंडरावल यांजकडे सरकारचा सालाबंदी ऐवज येणें. त्यापैकीं बाकी बहुत राहिली आहे. त्यास, तुह्मीं फौज पाठवून, संस्थानिकास जरब देऊन, ऐवज बाकी सुद्धां महिपतराव कृष्ण व रा। रामचंद्र महादेव यांचे विद्यमानें वसुलांत येऊन, पुढील सरकारचे सालाबादी ऐवजास नेहमीं गांव लाऊन देवावा, याविशीं पेशजी तुह्मांस लिहिलें असतां, अद्याप बंदोबस्त यथास्थित जाहला नाहीं, ह्मणोन हुजूर विदित जालें, त्याजवरून हे पत्र लिहिलें असे. तरी तुह्मीं संस्थानमजकुरीं फौज पाठऊन, संस्थानिकास जरब देऊन, सालमजकूरपर्यंत मागील बाकीसुद्धा ऐवज मा।र निलेकडे वसूल होय तें करणें, व पुढें सरकारचे ऐवजास गांव नेहमीं लावऊन देवऊन, अमल सुरळित चाले तें करणें. जाणिजे. छ १४ जिल्हेज, सु।। इसन्ने तिसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. मोर्तब असे.

पत्रांक ३६२


श्री व्यंकटेश प्रा।. १७१३ श्रावण वद्य २
पो छ १४ जिल्हेज

इसने तिसैन
स्वामीचे शेवेसीं. विनंती. भुजंगराव अण्णाजी कृतानेक सां। नमस्कार विनंती येथील कुशल तागायत आषाढ वद्य ७ पावेतों स्वामीच्या कृपावलोकनें करून यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमान लिहून लाखोटा बागेवाडीकर सुभेदार यांच्या विद्यमानें पाठविला होता. शेवेसीं प्रविष्ट होऊन मजकूर विदित जाहला असेल. आज पावेतों त्रिवर्गाचें शैन्य पटणासमीप होतें. सांप्रत पर्जन्यकाळ आला याजकरितां, उभयतांनीं कार्याकारण पायचे लोक फिरंगीयाचे हमराहा करून; फौज घेऊन, माघारे चित्रदुर्ग व गुती या पट्टीस छावणीस येणार. टिपूसो आजपावेतों किल्ल्यांत होता. तो, किल्याबाहेर उभयकावेरीमध्यें दोन पेठा आहेत, त्या दरम्यान येऊन उतरला आहे. तहाचें बोलणेंहि लाविलें आहे, ह्मणे, या प्रकारें कोणी कोणी तिकडून आलेले गृहस्थ तहकीक वर्तमान ह्मणोन सांगतात. परंतु लष्करची व मुख्यमुख्य स्थलची बातमी पुण्यास येऊन परभारें स्वामीस विदीत होत असेल. त्यांत लिहिलें येईल तें खरें. येथें ऐकिलेलें शेवेसीं विनंती लिहिली आहे. मुख्यापर्यत आह्मांकडूनही तीन प्रतीचीं पत्रें व माणसें गेलीं आहेत. त्यांतून एकहिपुनरागम नाहीं. तात्या साहेब ! पूर्वी कोण्ही एक्या पादशहाने कृपावंत होऊन एक्या ग्रहस्थास समुद्राच्या लाटा मोजून आणणें बद्दल शेवा सांगितली, ह्मणो। याचा अन्वयें माझ्या उमेदीसही शेवा योजून मुख्य स्थळाहून प्राप्त जाहली. तेव्हां दैवाची परिक्षा समजावी. आतांचा प्रसंग पाहतां, आमच्या हातून कार्य सिद्धी घडून स्वामीची व यजमानाची कृपा संपादणे उघड दिसत आहे. त्यांतहि श्रीहरीच्या चित्तीं काय आहे नकळे! कोणत्याहि जातींत एकवेळ जिवाहून अधिक चाकरी करून पुत्रपौत्रास अन्नास ठिकाण करितात. अस्मा दिकांच्या जातीस वारंवार बशर्त चाकरीवर कृपा व्हावी ऐसें ठरले. असो ! योजिल्या प्रमाणें सरकारचाकरी घडल्यास सत्वरींच स्वामीचे पाय पाहतों. नाहींपक्षीं कृपेची वृद्धी असावी. अंवदा कनोंटकांत फौजा गेल्यामुळें श्रीमंतांच्या नावाप्रमाणें कार्य तो सिद्धीस गेलें, व बहुत लोक, गतराज्य व ग्राम व उद्योगागत व नूतन संपादन श्रीमंतांस कल्याण चिंतून खुशाल आहेत. आह्मींहि त्याहून अधिक चित्तांत आनंद मानून, रात्रंदिवस स्वामींच्या पायांचें स्मरण करीत, या ग्रामांत कुटुंबसुद्धां आनंदेंकडून आहों. स्वामीची कुपादृष्टि पूर्ण असावी. मीहि एक वचनाचा दास स्वामीचा आहें. विसरूं नये, ही विनंती उभयतांसहि मिळून आहे. लोभ करावा. हे विनंती.

पत्रांक ३६१

श्री व्यकटेश प्रा।. १५१२ ज्येष्ठ वद्य १०
पो छ २१ जिल्काद, इसने तिसैन.

स्वामीचे शेवेसीं. विनंती पोष्य भुजंगराव अण्णाजी सां। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ज्येष्ट वदि १० पावेतों स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. अलीकडे स्वामीकडून कृपापत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. येणेंकरून चित्त सापेक्षित आहे. तर, सदैव कृपापत्र पाठऊन सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. इकडील वर्तमान पेशजी स्वामीकडून माणसें आलीं होतीं त्याजबा। विस्तारें लि।। आहे. विदित जाहलें असेल. बागडकोटेस तीर्थरूप आनंदराव आहेत. त्यांचें पत्र आलें होतें. त्यांत दक्षिणेकडील वर्तमान होतें जेः टिपूसो नागमंगळावर होता. त्यास साहा कोसांचे अंतरानें इंग्रज व मोगल उतरले होते. यांजवर छापा घालावा म्हणून तयार होऊन येत असेतां, उभयतांस वर्तमान कळून, हुषारीने बुनगें माघें देऊन, पुढे सडे होते. यांची त्यांची गांठ पडून दोन प्रहरपर्यंत गोळागोळीने लढाई जाहली. उभयपक्षीं लोक फार जाया जाले. टिपूसो सवेंच निघून पटणास दाखल जाहला. त्यानंतर, हेहि जाऊन लागलीच कावेरी पार होऊन शहर गंजम येथें उतरले आहेत, ह्मणोन वर्तमान. आणि कोणी कोणी म्हणतात जे, पटणास मोर्चे लाविले आहेत ह्मणोन, पटण घेतलें, टिपूसो सडे पळून गेला ह्मणोन. असें तिकडे अनाहूत जालें आहे. ह्मणोन वर्तमान ऐकिलें ते शेवेसीं लि।। आहे. यांत खरेंलटकें स्वामीस पुण्याहून बातनीचें वर्तमान येत असेल त्या अन्वयें पाहावें. एकूण तूर्तच्या प्रसंगीं तिकडील तों असे आहे. हेंच शाश्वत राहोन परिणामी भटी नीट उतरली पाहिजे. राजकारण कोण्या थरास जाते पाहावें. स्वामीस सैन्याहून व पुण्याहून तहकीक वर्तमान येत असेल. तपशीलवार लिहून पाठवावें, व इकडूनहि माणसें गेलीं आहेत. अद्यापि फिरलीं नाहींत. येतांच तहकीक वर्तमान कळेल. त्याप्रों शेवेसी विनंती लिहीन. अवंदा नवरा व नवरी दोन्हीं चित्ताप्रमाणें मिळालीं नाहींत. याजकरितां लग्नें राहिलीं. पुढें ऋणानुबंध सर्वाविशीं स्वामीचे पाय आधारभूत आहेत. विशेष लिहिल्या उपरोध दिसेल. क्रिया केवळ उत्तम. सर्वज्ञाप्रति बहुत काय लिहिंणे ? लोभ असो दीजे हे विनंती.

  [ ४६ ]                                       श्री.                                                      ८ जानेवारी १६९४.

अखंडितलक्ष्मीअलंकृत राज्यमान्य राजश्री रामचंद्र नीलकंठ देशकुळकर्णी ता। अजिरें गोसावी यांसीः-

1 सेवक त्रिंबकजी कानोजी सरदेसाई व कानोजीराऊ सरमोकदम देसाई व रवळोजी कानोजी देसाई व येळोजी तातोजी देसाई व रामजी विठोजी देसाई ता। अजिरें दंडवत विनंति सु।। अर्बा तिसैन अलफ. ता। मजकूर येथील देशकुळकरण देहें ९७ हे पूर्वी सिद्धाचे होतें. त्याची सेवा विठ शेणवी याचे वडिलांनी बहुता प्रकारें केली यावरून सिद्धांनीं कृपाळू होऊन यांचे वडिलासीं देशकुळकरण मिरास दिल्हेवरी त्याचे वडील देशकुळकरण ता। मजकुरींचे पुरातन वतनदार होऊन पीढ दर पीढ मिरासभोग करित आले पूर्वी याचे वडिलांचे वेळीं आपणास तगादा लागलें पाहून, मळ शेणवी याचे वडील सुखवस्ती आगंतुक होता यापासून कर्जपैकीं घेऊन कर्ज फिटेपावेतो देशकुळकरण मिरासपैकी तिसरे तकसीम गहाण ठेविले पैका पावलेवरी सदरहू तकसीम सोडून देणे त्यांसी तेहि बहुत दिवस तिसरा वाटा खात आले गहाण ठेविलेपैकीं एकासी तीन चार हिस्से पावून गेले त्यास वतनाशी सबध नाही मळशेणवीचे वडील तिसरे वाटा खातां, मिराशीमधे व्याप करून, वृत्तिसबंधे साजीस करून, महजर सनदपत्र काही करविलें असतां, स्वगोत्री ऐसेहि इलाखा लावूं लागले ऐशियांस, मळ शेणवी काही विठ शेणवीचे अउलियादिमधील नव्हे त्याणें जें काय आपले स्वार्थामुळें महजर सनदपत्र केले असेल ते कुली बातील आहेती. विठ शेणवीचे वडील वृत्तिभोग करित आले. त्याचे पीढनपीढ विठ शेणवीपावेतो चालिले विठ शेणव्यास मिराशीमुळें दगा करून जिवे मारिले मृत्यु पावला विठ शेणवीचे पीढनपीढ संतति फार वाढली नाही एकाचें पोटीं एक ऐसेची होत आले त्यावरी हा मृत्यु पावला याचे पोटी लेकरू जाहले नाहीं निपुत्रिक जाहला पुढे मिराशीस खावंद कोणी नाहीसे जाले. निपुत्रिकाचे मिरास ते दिवाणाचे त्यावरी महाराज साहेबासी हें वर्तमान विदित जाहालेवरी साहेबीं मेहेरबान होऊन तुह्मांस ता। मजकुरींचे देशकुळकरण शेरणी माथा ठेऊन अजराम-हामत करून दिल्हें असे देशकुळकरण ता। मजकूर देहे ९७ सत्त्याण्णव लेकराचे लेंकरी वशपरपरा भोग करून सुखरुप असणे विठ शेणवियाचे कोण्ही गोत्रज अगर वंशज कोण्ही नाही, हें सत्य असें देशकुळकरणाचे हक्क लाजिमा, पानमान, इनामती व इसाफती व बाजेकानूनाती देशकुळकरणाचें असेल ते आपले चालवून घेणे. हे गोष्टीस आह्मापासून अन्तर पडणार नाही आपले वृत्ति बराबरी चालविण्यास अतर होईल तरी यास आपले वडिलांचे इमान असे छ २१ जमादिलोवल.                                                                                                                   

 लेष-
       न आल-
      कार ll.

पत्रांक ३६०

श्रीव्यंकटेश प्रा।. १७१३ ज्येष्ठ


शेवेसीं सा नमस्कार विनंती ऐसीजे. ती।। रा। आनंदराव बागलकोटेस आले आहेत. म्हणोन ऐकिलें आणि आपणासहि पुणेहून कळून लिहिलें. त्यांनी आपल्या महत्वाकरितां बागलकोटेस राहून दक्षणेकडील बातनी पुण्यास रास्तेकडे लिहून पाठवीत असतात. त्यांत, मी पुणेस जात असतां मध्यें स्वामीकडूनच फिरोन आलों. त्याजवरून कयासानें लिहिलें असेल. आह्मीं तेथून आल्यावर कोणासहि भाषणांत आणिलें नाहीं. त्याचें लक्षणें नाहीं. ते संभूती उठऊन थोरथोरांमध्ये विक्षेप पाडावा हें पूर्वीपासून. त्यांत स्वामीची कृपा माझे ठाई आहे. त्यास, हरप्रकारें रास्तेस लिहून पाठऊन त्यांत व आपणांत पुन्हां विक्षेप पाडावा, त्यायोगें मी स्वामींच्या पायांपासून दूर व्हावें, ही कवायत पुष्कळ भरले आहे. सर्वहि स्वामींच्या ध्यानांत असों द्यावें. मी बहुत सावधगिरीनें वर्तणुक करितों. स्वामींचे बोलणें किंवा लेख प्राणहि गेल्यास इतरांच्या दृष्टीस अथवा कर्णास स्पर्श होणार नाहीं, ही खातरजमा असावी. यांचें निदर्शन दिवसें दिवस कार्यावर समजत जाईल. हें पत्र आपण मनन करून सर्वच विसर्जन करावें. टिपूसाचें वर्तमान बेंगळुरापलीकडे झाडींत मागडीचा किल्ला आहे. तेथें सरंजाम ठेऊन, आपण पुढें करेशाकरशांत, गीबिले शावंतगी म्हणोन पाहाडी लोक आहेत त्यांचे आसरियानें जबरदस्तीनें आहे. तूर्त मात्र, इकडील फौजा पटणपर्यंत जाऊन लूट करून घेऊन येतात. एंवदा प्रर्जन्यकाळीं कांहीं दम असल्यास उपद्वयाप करील. सोडणार नाहीं. केवळ तो यासमई बुडालासारिखा आहे. परंतु, परिणामास जी गोष्ट उतरेल ती खरी. अंतरंगचा भाव इंग्रजासीं स्नेह करून घेऊन, उपरांतीक इकडील समाचार घ्यावा, या याचनेत आहे. येविशीं इंग्रजांशी जाबसाल फरांसिसांचे विद्यमानें विलायतींत लिहून पाठविला आहे, ह्मणोन कोणी कोणी तिकडील पक्षाचे बोलतात. सर्व निदर्शनास येईल तें खरें. आम्हाकडूनहि माणूस गेला आहे. त्याचें काय उत्तर येतें तें पाहावें. आणि ती।। रामराव काकांसही रवाना करितों. कसें कसें उत्तर येत जाईल तें सेवेसी श्रुत करीत जाईन. एक वेळ स्वामीच्या विचारें पुन्हां त्याजकडील अनुसंधान लागावें, तेणेंकडून सेवकाची सेवा रुजू व्हावी, ही इच्छा आहे. परिपूर्ण करणार श्रीहरी आहे. हे विनंती.

पत्रांक ३५९

श्री १७१३ वैशाख वद्य १३


राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री हरी बल्लाळ स्वामी गोसावी यांसी:-
पोष्य माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुम्हीं पत्र छ ५ साबानचें पाठावलें तें छ १३ मिनहूस प्रविष्ट जाहलें. व दुसरें पत्र छ १० साबानचें पाठवलें तें छ १८ मिनहूस पावोन लेखनाभिप्राय अवगत जाहला. नवाबाची भेटी प्रथम दिवशीं जाहलियावर पत्र आलें त्याचें उत्तर पेशजींच रवाना जालें आहे. नवाबाशीं मसलतीचीं बोलणीं ठरावांत येऊन, तुम्हीं कूच करून सरकारचे फौजेंत कर्नूळचे मुकामीं दाखल जाला व नवाबाची फौज सामील जाल्यावर पुढें जावयाचा इरादा होईल. इंग्रजानें बेंगरूळचा किल्ला छ १५ रजबीं घेतला म्हणून किन्विस लिहून आलें त्याजवरून लिहिलें तें कळलें. इंग्रज श्रीरंगपट्टणकडे जाणार, मार्ग दुर्घट. तथापि बातमी येतच आहे तशी लिहिन म्हणून लिहिलें तें कळलें. व दुसरे पत्रीं मजकूर कीं, नबाबाची फौज चाळीस कोसाचे अंतरानें इंग्रजांजवळ जाऊन पोंचली. दरम्यान टिपू आहे ह्मणून अवघड. सरकारची फौज दहा हजार पुढें पाठवायची त्याची तयारी केली. त्यास नवाबाची फौज गेली त्याच मार्गे रवाना करितों, म्हणोन लिहिलें तें कळलें, टिपूस व इंग्रजाचे फौजेस आठ कोसांचें अंतर होतें. त्या पक्षीं मुकाबले झालेच असतील. बातमी येत जाईल तशी वरचेवर लिहून पाठवित जाणें, जाणिजे. छ १ रमजान सुहुरसन इहिदे तिसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. पे।। छ २७ रमजान, मु।। नजीक श्रीरंगपटण.