Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४०
श्रीगजानन १७११ फाल्गुन वद्य ८
रु
पो छ २५ रजब तिसैन.
श्रीमंत राजश्री नाना साहेब स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक विश्वासराव आपाजी, दि।। देवराव महादेव, कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता। छ २१ माहे जमादिलोखर मु।। दौंड स्वामींचे कृपेकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. कृपा करून छ ७ जमादिलाखरचें पत्र पो तें पावलें. सेवकास सनाथ केलें तेणेंकरून आनंद जाला. यानंतरी येथील वर्तमान छ १८ तारखेस नवाब अकबरआलीखान यांची पत्रें व अखबार घेऊन येक नाजर मोहबत आबजू कासीहून आला व बकसीनवाब मुंत्पाददौला त्यांचा पुत्र मुबारकदौला ऐसे उभयतां हिंदुस्थानांतून आले. त्यांणीं तिकडील अखबार आणिली आहे. त्यांत वर्तमान तरीः राजश्री पाटीलबावाचा मुलगा श्रीमथुरेवर आहे. इकडून सरकारची पत्रें व स्वामीची पत्रें गेली कीं, त्रिवर्ग सरदारांनीं येकचित्तानें असून मसलत करावी, द्वैत नसावे; व हिम्मतबहाद्दर यास सरफराज ठेवावें. त्यावरून पाटीलबावा बोलिले कीं, आह्मीं श्रीमंतांचे आज्ञेशिवाय नाहीं, परंतु नवाब आलीबहाद्दर ऐकत नाहींत, त्यास आमचा उपाय काय. हिमतबहाद्दर येक दिवस आपला गळा कापून घेत होता. तेव्हां आलीबहाद्दरबावास खबर जाली. त्यावरून तेथें गेले, आणि मारनिलेचे हातची सुरी घेतली. बहुत खातरखा केली. खर्चाची तकलीफ होती. यावरून, कांहीं खर्चास व वस्त्रें त्यांचे जनान्यास नक्ती त्यावरून, कांहीं पशमीना शालजोड्या वगैरे जिनस किनखाप पा दिल्हे. आणि आलीबाहाद्दरबावा, पाटीलबावांचे गुरुबंधु तेथे आहेत, त्यांचे डे-यास गेले होते. त्यास, त्यांजला हें वर्तमान साकल्य सांगितलें कीं, बावा ऐकत नाहींत, आणि हिंमतबहादर आज आपला गळा कापून घेत होते, त्यास आमचा उपाय नाहीं, बावाचा निग्रह भारी त्यास काय करावें, त्यावरून फिकीर. बावा स्वार होऊन पाटीलबावांचे डे-यास गेले आणि सांगितलें कीं आलीबहादरबावा तेथें आले आहेत, तरी आपणही चालावें. त्यावरून पाटीलबावा व राणेखानभाई स्वार होऊन गेले. उभयेतांच्या भेटी परमलोभानें जाल्या. बहुत लोभाची बोलणीं झालीं. मग पाटीलबावांनी बावांस हातीं भरून आपले डे-यास नेलें, परम शिष्टाचार केला. वस्त्रें वगैरे जवाहीर अकराखोन तयार करून हाती घोडे दोन ऐसे आणिलें. परंतु बावांनीं कांही घेतलें नाहीं. आतर, पानदान मात्र घेतलें, आणि स्वार होऊन आपले डे-यास दाखल जाले, वरकड तुभाभाई फिरंगी याचे नवे पलटणें याची तयारी जाली आहे. त्यावरून बावास त्याची कवायत दाखवायास बोलाविले. त्यावरून सुभेदारांस बोलाऊं पों कीं, पलटणें पाहावयास आपणही चालावें. त्यास सुभेदारांनीं निरोप सांगोन पों कीं, आमचे येथें लोकांचा गवगवा बहुत जाला आहे, यास्तव येणें होत नाहीं, आपण जाऊन पाहावीं. ऐसें सांगून पो. आणि आपले लोकांस सांगोन पों कीं, तुह्मी येऊन हांगामा करणें. त्यावरून लोकांनी येऊन हांगामा केला. पाटीलबावा पलटणाची तयारी पाहून बहून खुशवक्ती जाली. मग स्वार होऊन डेरेदाखल जाले. रा। कासीबा होळकर दिल्लीस गेले आहेत. मुलाजमतीस शाहानिजामुद्दीन यांणीं येऊन अर्ज केला कीं, मुलाजमतीस चालावें. त्यावरून बोलिले कीं, रो पाटीलबावाप्रों आमचा मान व त्या सिरस्त्याप्रों खीलत वगैरे द्यावें, तरी येऊं, नाहीं तर सांप्रत येत नाहीं. त्यावरून शहाजीनें विनंति केली कीं आज्ञेसिवाय मी नाहीं, परंतु हुजुरांत सांप्रत खर्चाची तकलिफ बहुत आहे, यास्तव लाच्यारगी आहे, नाहीं तरी गुंता नाहीं. मग कासीबांनीं सुभेदारांस पत्रें पो कीं, मुलाजमतीचा प्रकार याप्रमाणें आहे. त्यावरून सुभेदारांनीं लिहून पों कीं, तूर्त मुलाजमतीस न जावें, पुढें आह्मी लिहून पा। तेव्हां जावें. त्यावरून महकूफ राहिलें. दिल्लीहून खोजे जादे जैपुरास गेले होते. तेथून जोतपुरास गेले. शहरापासून येक कोस बाग आहे. तेथें मुकाम करून आहेत. राज्यांनीं सिष्टाचार मात्र केला. परंतु मुलाजमत अद्याप जाली नाहीं. राजे बिजेसिंग यांचा दिवाण आहे. त्याणें कांहीं वर्तमान जैपूरकरास लियों. त्यावरून दिवाणावर इतराज बहुत आहेत. जैपूरवालेही आपले फौजेची तयारी करून आहेत. जोतपूरवाल्याकडीलही फौज रवाना कुमकेस जाली आहे. दिल्लीत डाके नित्य पडतात- शहरांत बंदोबस्त चांगला नाहीं. पातशाई सलातीन आहे. त्यांस उपोषणें पडतात. वस्त्रें नाहींत. रात्रौ सीतानें हैराण, तेव्हां पातशाहांनी कांहीं रजया खरीद करून पा। दिल्या. याप्रों दिल्लीचें वर्तमान लिं आहे. त्याप्रों पाटीलबावाचे वगैरे लस्करांत नित्य चो-या होतात. घोडीं, उंटें नेतात. सावकाराचें दुकान फोडितात. ऐसी प्रकार आहे. वरकड, येथील वर्तमानः हुताशनीचा समारंभ वा। ५ पंचमीस राजश्री बळवंतरावजी यांणीं रंगाची तयारी करून कुसुंबी रंग व केशराचा व फुलांचा वगैरे गुलाल सर्व साहित्य घेऊन सर्व मंडळी सुधा शाहाजादे यांचे हुजूर दिवानखासांत समारंभ च्यार घटका नाचरंग जाला, बहुत संतोष जाले. मग नबाब अकबरआलीखान याजकडे दोन घटको नाचरंग होऊन, सांईकालीं आपले घरास आले. सेवेसी श्रुत व्हावें, जालें वर्तमान तें सेवकानें लिहिलें आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ केला पो हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३९
श्रीगणपती १७११ फाल्गुन शुद्ध १०
राजश्री गोविंद रघुनाथ जोशी स्वामी गोसावी यासीः-
सेवक परशराम रामचंद्र नमस्कार विनंती उपरी, रा। शामजी विठ्ठल कुलकर्णी मौजे चिकुर्डे, का। कोडोली, याणीं विदित केलें कीं, आमचा व आमचे पुतणे बापूजीवाजी याचा वाट गिविसी पेशजी कजिया होता. त्याचा निवाडा वालव्याचें थलीं होऊन परस्परें समजपत्रें व निवाडपत्र जालें आहे. त्याप्रमाणें बापू जिवाजी आमचा फडशा करीत नाहीत. येविशीं ताकीद जाली पाहिजे. ह्मणोन, त्याजवरून, हें पत्र लि।। असे. तर, तुह्मीं येविसीचें मनास आणोन, निवाडपत्राप्रों वाजवी फडशा बापू जिवाजी करीत नसल्यास निक्षूण ताकीद करून निकाल करवणें. तेथे न ऐकत, तर हुजूर पाठवून देणें. जाणिजे. छ ९ जमादिलाखर, सु।। तिसैन मया व अलफ. हे विनंती. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३८
श्रीगजानन
पो छ २५ रजब, तिसैन. १७११ फाल्गुन शुद्ध ६
रु.
श्रीमंत राजश्री-नानासाहेब स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक विश्वासराव आपाजी, दि।। देवराव महादेव कृतानिक सां।। नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान ता छ ५ माहे जमादिलाखर मु।। गारदौंड स्वामींचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं कृपा करून छ १५ जमादिलावलचें पत्र पा। सेवकास सनाथ केलें. तेणेंकरून अत्यानंद जाला. यानंतरीं येथील वर्तमान, रो लाला फत्तेचंद तेथून आज्ञा घेऊन निघाले ते येथें छ २० तारखेस पावले. त्रितीय प्रहरीं मिर्जा मुजफरबक्त शाहाजादे यांचे मुलाजमतीस राजश्री बळवंत रावजी, लालमुनशी वगैरे सर्व मंडळी गेलों. मुलाजमत जाली. खैर आफीयत मिजाज खुसीचें वर्तमान श्रीमंतांचें व स्वामीचें पुसिलें. नंतर लालानीं वर्तमान मुफसल हिंदुस्थानचें वगैरे निवेदन केलें. दोन घटका दिवानखान्यांत होते. मग, नबाब अकबर आलीखान यांची भेटी जाली. परस्परें खैरआफीयतचें बोलणें जालें. च्यार घटका बसून सायंकाळीं आपले घरास आले. दुसरे दिवशीं छ २१ तारखेस लालफित्तेचंदजीस बोलाविलें. मग मा।रनिले नबाब यांसीं हजर जाले. वर्तमान पुसिलें कीं, आतां आह्मांस श्रीमंत बंदोबस्त करून रवाना कधीं करितात? हिंदुस्थानचा रंग दिवसोदिवस बिघडत चालिला. मुलकाची खराबी होत आहे. दंगा मिटत नाहीं. यैसा जाला आहे. त्यास, आह्मी येथें उगेंच बसलों आहों. तरी कांहीं काम आम्हांकडून घ्यावें. म्हणजे आह्मांत कांहीं माणुसकी आहे किंवा नाहीं हें ध्यानास येईल. इसमालबेग कोठील कोण ऐसें असतां पन्नास हजार फौज बाळगून कजागी करितों. त्यापक्षीं आमचे पदरीं तरी नांव आहे. तरी आपला उपराळा मात्र असावा. मग चिंता नाहीं. खातरसा हिंदुस्थानचा बंदोबस्त आपले प्रतापानें करूं, व राजे रजवाडे इसमालबेग हे सर्व आमचे संधानांत आहेत. ऐसें विस्तारें बोलणें जालें. परंतु त्यांतील मुख्य भावगर्भ हा कीं, आमचे खर्चाची वोढ, यास्तव सत्वर बंदोबस्त करून रवाना करावें. दिल्लीहून खोजेजादा निघोन जैपुरास नेला. त्यास रजवाडे व उदेपूरवाले यांचें येक संधान होऊन, खोजेजादे यांस सन्मान करून ठेविलें आहे; व गाजुदीखान शाहाकडून फौज घेऊन बिकानेरावर आला आहे. त्यास राज्याकडील वकील गेले आहेत कीं, तुम्ही येऊन सामील व्हावें. खोजेजादे येथें आले आहेत. त्यास यांजला मुखतयार करून विजारतचा कारभार आपण करावा, हें एक राजकारण नवें निघाले आहे. त्यास या प्रसंगी आह्मीं गेलों तरी हा बखेडा कांहीं होऊं पावणार नाहीं. आपले प्रतापानें दिल्ली, दक्षणहिंदुस्थान एक होईल. याप्रमाणें भाषण जालें. मग लालांनी आज्ञेप्रमाणें उत्तरें चांगली केलीं कीं, उतावळी न करावी. काम मोठे आहे. यास्तव सोईनें सर्व मर्जीनरूप होईल. याप्रमाणें त्यास नवाबांनी जे समयीं धडपसरचे मुकामीहून कुच जालें, त्या समई लालाफत्तेचंद यांजपाशीं सात दफांची यादी लिहून दिल्ही होती कीं, श्रीमंत कैलासवासी भाऊसाहेबांनीं जुवांबक्तशहाजादे यास वलीअहद करून बसविले होते व तोच इरादा धरून आह्मी आपलेपाशीं आलों आहों. ऐसी खर्चाची तकलीफ व शाहाजादे यांचें लग्नसंबंधी वगैरे सात कलमें लेहून दिल्हीं होतीं. त्यांचें उत्तर काय करून आला ह्मणून पुशिलें. त्यास, लालांनीं आज्ञेप्रमाणें साकल्य सरकारचा उपर राखून, त्यांची मर्जी संतोष वाटे ऐसीं उत्तरें केलीं. तीं लालाफत्तेचंद समक्ष पायापासी विनंति करितील, त्यावरून ध्यानारूढ होईल. सेवेसी श्रुत व्हावें. मी गरीब निराश्रित आहें. माझी शरम स्वामीचे चरणास असे. बहूत काय लिहो ? कृपा लोभाची वृद्धि असावी हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३७
श्री १७११ माघ वद्य ७
पो छ २५ जमादिलाखर तिसैन
रु
सेवेसी श्रीराम सदाशिव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ता। छ २१ जमादिलावल, मु लष्कर गंगातीर नजिक कोसभर प्रांत तेलंग, यथास्थित असों, विशेष. राजश्री रघोजी भोसले याजकडील दिनचर्याः छ १ रबिलाखर प्रातःकालीं स्नान देवपूजा करून, च्यार घडी बाईकडे दरबार करून, प्रहर दिवसा स्वारी सकरदरियास गेली. तेथें डेरेराहुट्या पाहून आले. सायंकाळपासून दोन प्रहर रात्र पावेतों दरबार जाला. शिलेदार लोकांस वगैरे दोन दोन रोजमरे खर्चास देविले, व गंगातीरीं धर्मादावबद्दल दहा हजार रुपयांच्या अधेल्या पावल्या करावयास सांगितलें, गंगातीरी व मार्गी जातांना माहागाई बहुत आहे ह्मणून रस्त यावयास याचा मुलूक आहे तेथ पावेतों कमाविसदार यास ताकीद करविली कीं, जागा जागा परगणियांत वाणीउदमी असतील त्यांस सांगून गल्ला भरून लष्करचे मार्गी आणीत जावा. ह्मणून सांगाविलें. छ २ रोज प्रातःकालीं स्नान देवपूजा करून, भवानी काळो वे भवानीपंत मुनसी यांस बोलाऊन, दोन घडी खलबत करून, झाडून कमाविसदार मंडळी बोलाऊन त्यांजकडे बाक्या येणें त्या ऐवज लोकांस वराता करून देविल्या. छ ४ रोज प्रातःकालीं स्नान देवपूजा करून, आईकडें प्रहरभर खलबत केलें. जाधवांनीं तलबेकरितां अडविले होतें, त्यांचा जाबसाल चाघे मानकरी याजवर टाकली आहे. चौघांनी सांगावें तें उभयतां ऐकावें, असे केलें आहे. परंतु, हे चौघांचें ऐकतील हेंहि प्रमाण नाहीं. छ ५ रोज प्रातःकालीं हजामत करून माहादाजी लष्करी यांसी चार घडी खलबत केलें. स्नान देवपूजा करून, प्रहरभर बाळाबाई यांचे वोसरीवर बसून, पागेची घोडींशिंगरें आणून पाहिली. छ ६ रोज प्रातःकालीं माहादाजी लष्करी यासी दोन घडी खलबत करून स्नान देवपूजा केली. बाईकडे च्यार घडी जाऊन यशवंतराव नाईक रुसला होता त्यास, वेंकोजी भोसले पाठवून, त्यास समजावून आणविलें. छ ८ रोज मंदवार प्रातःकालीं स्नान देवपूजा करून, बाईकडे जाऊन, भवानीकाळोस बोलाऊन, दोन घडी खलबत जालें. तिसरे प्रहरीं स्वारी तयार करऊन पांढरा पोशाख करून, चौकडा मोत्यांची कंठी घालून, घोड्यावर स्वार होऊन पश्चिमेचे शुक्रवार-दरवाजानें निघोन, दक्षणेस सकरदरियाचे बागाजवळ डेरे दिल्हे, तेथें डेरे-दाखल, मागील दोन घडी दिवस राहतां, जाले. चिमाबाई वगैरे यांची स्वारी च्यार घडी रात्रीस डे-यास गेली. छ १० रोज प्रातःकाळीं स्नानदेवपूजा करून, भवानी काळोयासी च्यार घडीं खलबत केलें. प्रहर दिवसा स्वारीं निघून, सिताबर्डीजवळ संगमावर माहादेवाचें देवालय बांधितात तें पाहून, फुटाळ्या तळ्यावर जाऊन, घडीभर बसून, तळ्यांत मणूष घालून, पाणी किती आहे म्हणून पाहिले. तिसरे प्रहरीं सकरदरियास लक्ष्मीनारायणाचें दर्शणास गेले, छ ११ रोज कूच करविलें. पांच कोस मौजे पाचेगांव येथील मु।। करविला. डेरे व लष्कर वगैरे झाडून गेले. माघून स्वारी जावी, तों पिराजी जाधव याणें तलबेकरितां पेशजी स्वारी सिताबर्डीजवळ प्रहर रात्रपर्यंत अडविली होती, तेव्हां लटकी तोडजोड करून दिल्ही, त्याचा कज्या चुकला नाहीं, तेव्हां त्यांणीं आणखी सांगून पाठविलें कीं, माझे तलबेचा फडशा जाला नाहीं आणि स्वारी जाती हें ठीक नाहीं, तलब द्यावी तेव्हां जावें हें उत्तम आहे, नाहीं तरी स्वारी मागें कोणासी बोलावें, माझी तलब तो लक्ष सव्वालक्ष रुपये येणें, स्वारी गेल्यास मी येथें नागपूरचे वाणी बकाल व सावकार धरून दोन लक्ष रुपये वसूल करीन. या प्रमाणें जाधवाणीं सांगून पाठविलें. तेव्हां स्वारी जाणें राहिली. पुढील मु।। झाडून लष्कर गेलें. या मुकामीं खासे सडे व मुदसदी व बायकाच्या पालख्या मात्र होत्या. ते दिवशीं मु।। जाला. अवघी रात्रभर तळावर जागाजामा खलबत-या ठिकाणीं दोन घडी, येथून दुसरे ठिकाणीं दोन घडी या प्रमाणें-अवघ्या तळावर खलबत जालें. राहुटी, कनात, चांदणी कांहींच नाहीं. उघडे होते. सकरदरियाचे बागांतून भोजन करून येत होते. दोन दिवस बायका देखील पालख्यामधेंच बसून राहिल्या. छ १२ रोजीं जाधव तो कांहीं ऐकेना. याचें मानस चाळीस पन्नास हजार रुपये द्यावे. तेही चिठी-वरात द्यावी. जाधव तो एक रुपया सोडूं ना ह्मणेत. तव्हां, त्याजवर लटकाच दाब टाकून, हल्ला करून लुटून घेतों ह्मणून गारदी व शंभर दोनशें लोक पाठविले. हल्ला जाऊन उभी राहिली. त्यांणीं सांगून पाठविलें, हल्ला पाठवा, लुटून घ्या, आह्मी सिद्धच आहोंत, पाणिपतावर बुडालों अथवा बादामीवर मेलों म्हणूं, जिवावरच उदार जालोंत, परंतु तलब सोडणार नाहीं. याप्रमाणें सांगून पाठवीत. तेव्हां सायंकाळीं जाधवास अठ्ठावीस हजार रुपये नख्त देऊन, बाकी ऐवजाची निशा दोन महिण्याचे कराराणें महमद अमीखा पठाण शिवणीकर यांची दिल्ही. तेव्हां रात्रीं कूच केलें. प्रहर रात्रीस नगारा, निशाण, जरीपटका पुढें लाऊन दोन प्रहर रात्रीस स्वारी निघून पांचगांवचे मुकामास गेली. समागमें पन्नाससाठ राऊत होते. रात्रीं काशीकर सावकार आला. त्याची भेट जाली. शंभर मोहरा नजर ठेवल्या. जाधवाचे तलबेकरितां दोन दिवस घोळ पडला. झाडून लष्कर कूच करून पुढील मुकामीं गेले. खासे सडे उघडे होते. लाख रुपये देण्याचा मजकूर बहुतसा नाहीं. कारभारी-मुत्सद्दी यांजमध्यें कोणी भारी माणूस तोडजोड करून उलगडा पडेल असा नाहीं चाट्या-शिंप्या प्रमाणे मुछद्दी आहेत. छ. १३ रोज साता केसांचें कुच केलें, भोजन जाल्यावर प्रहर दिवसा घोड्यावर बसून, पेशजीं मुधोजी भोसले व साबाजी भोसले यांची लढाई जडली ते जागा मुकामापासून दोन कोस होती तेथें जाऊन पाहात होते. जिकडून तोफा लावल्या तिकडे त्यांचे लोक हुजरे होते. चौंहूकडे रण पाहून घोड्यावर उभे घडीभर होते. जागा बहूत यशस्वी आहे, ह्मणून बोलले. तेथून सायंकाळी स्वारी मगरधोकड्याचे मुकामास डे-यास आली. छ १४ रोज कूच नवा कोसांचें जालें. प्रहर दिवसा स्वारी निघोन, मार्गात मौजे चणवड व शिरसी येथील पागा व गाईचें खिलार पाहिलें. सायंकाळीं स्वारी गिरडचे मुकाम डे-यास आली. छ १५ रोज पंधरा कोसांचें कुच जालें. प्रहर दिवसा गिरडचा पीर डोंगरावर आहे त्याचे दर्शनास गेले. तेथून स्वारी निघोन सायंकाळीं शेगांवचे मुकामास आले. पंधरा कोस मजल भारी जाली ह्मणोन छ १६ रोजीं मु।। केला. छ १७ रोज प्रातः काळीं कुच जालें. रव पडली जैराम व बाजीराव पाटणकर यांणी तलबेकरितां येऊन अडविलें. तेव्हां स्वारी मागील मुकामींच राहिली. निमे लष्कर दहा कोस पुढें भाद्याचे मुकामास आलें. पाटणकर यांणीं अडविल्यामुळें तीन रोज स्वारी तेथेंच होती. पाटणकराकडे यांचें कर्ज होतें. ते तलबेंत वजा करून, त्याचा रोखा त्यास देऊन आणखी नवहजार रुपये नख्त दिल्हे. तेव्हां तेथून कूच करून भाद्याचे मुकामास आले. छ २१ रोज कूच करून सात कोस चंद्रपुरास तिसरे प्रहरीं आले. सायंकाळी माहाकाळी देवीचे दर्शणास स्वारी गेली. छ २२ रोज प्रहर दिवसा स्वारी शहरांत गेली. शहरचे दरवाज्यांत एक हल्या व बकरें मारिलें. किल्ला झाडून फिरून पाहिला. तेथून माहादजी गुजर याचें घरीं भोजनास गेले. तिसरे प्रहरी शिकारीस गेले. वाघरा वगैरे लाऊन पाहिल्या. शिकार कांहीं मिळाली नाहीं. दोन घडी रात्रीस डे-यास आले. छ २३ रोज प्रातःकालीं स्नान करून स्वारी निघोन शहराबाहेरून शहरास प्रदक्षणा केली. पहिले रघोजी भोसले याणें चंद्रपूर घेतलें तेव्हां गांवकुसास व दरवाज्यास जागाजागा तोफांचे गोळे लागले आहेत. ते झाडून जागाजागा उभे राहून पाहिले. तिसरे प्रहरीं शिकारीस गेले. तेथें पांचसात तितर मात्र मिळाले. सायंकाळीं डे-यास आले, चंद्रपुरास बहुता दिवसा स्वारी आली ह्मणोन तीन चार मुकाम करून शहर व किल्ला पाहिला. छ २६ रोजीं चंद्रपुराहून कूच जालें. नगारा, निशाण, जरीपटका, परसोजी भोसले याजबरोबर पुढें लाऊन स्वारी माघून दोन घडी दिवस राहतां मु।। आली. नगारा, निशाण,जरीपटका, स्वारीबा ठेवीत नाहींत. लोकांचे मुजरे घ्यावयाचा बहुत त्रास येतो. मागून स्वारीबराबर दीडशें दोनशे लोक असतात. कोणे दिवशी चाळीस पन्नास असतात. छ २८ रोज कूच दहा कोसांचें जालें. झाडीमुळें दिवसा मार्गात स्वारीस चालावयास रवेची वगैरे बहुत दाटी होती. स्वारी लौकर चालत नाहीं. झाडी बहुत, मार्ग लहाण, याकरितां मागील प्रहररात्रीस स्वारी सर्वांची निघून पुढें गेली. दोन प्रहरां मार्गात प्रणितो नदींत भोयाकडून मासे धरावले. तें जाळें तुटलें, मर्जी बहूत दिक्क जाली. जरीपटका, निशाण वगैरे मागून भवानी काळो घेऊन आले. छ २९ रोज कूच होऊन, स्वारी निघून मार्गात शिरपुरचा किल्ला पाहिला. तेथील दरवाज्यांत एक हल्या मारविला. छ १ जमा दिलावल च्यार कोस मौजे मेटंपल्लीचा मु।। जाला. छ ३ रोज सात कोस मौजे नंकलपल्लीचा मा जाला. छ ४ रोज पांच कोस कोटेपल्लीस मु।। जाला. छ ५ रोज गुरुवारीं पहिले प्रहर दिवसा स्वारी गंगेस आली. येथें चिनुरावर मोगलांकडील फौज दोन हजार पावेतों आहे. राजा रड्डी भेटीस आला होता. स्वारी येतांच त्याची भेट उभाउभी जाली. उभयतां क्षौर केलीं. तीर्थ उपास करून छ ६ रोजीं श्राद्ध केलें. छ १० रोजीं प्रहर दिवसा स्वारी सर्वांची, मु।। पासून काळेश्वर च्यार कोस आहे, तेथें प्रणितेचा संगम जाला आहे, तेथें स्वारी गेली. काळेश्वराचें दर्शण करून सायंकाळीं आले. छ ११ रोज तिसरे प्रहरीं राज्या-रड्डी डे-यास आला होता. च्यार घडी बसून गेला. छ १३ रोज स्वारी सर्वांची चिमाबाई वगैरे सुध्धां काळेश्वरास गेली. गंगादक्षणतीरीं मांडव घातले. वेंकाबाशास्त्री सोमयाग करितात. शास्त्रीबावांनी खाशांस विचारिलें कीं, याग करावा असें चित्तांत बहूत आहे, परंतु साहित्य कांहीं अनुकूल नाहीं. त्याजवरून खाशांनी सांगितलें, साहित्य काय पाहिजे तें देवितों. छ १४ रोज यज्ञास आरंभ केला. छ १६ रोज प्रहर दिवसा स्वारी, चिन्नूरचे किल्लयाजवळ अगस्तेश्वर महादेव आहे, त्याचे दर्शनास गेले. दर्शण करून किल्ला पहावा, अशी मर्जी होती. दोन प्रहर जाले, उशीर लागेल, पुढें एकादे दिवसा पाहूं ह्मणाले. भोयकिल्ला आहे, लहाण आहे, त्याचें लष्कर पायदळ दोन हजार पावेतों आहे, तें बाहेर किल्याच्या जवळच उतरलें आहे. यज्ञमंडप ठेंगणे घातले. त्यास तिसरे प्रहरीं, आहोती टाकते वेळेस, मांडवास आग लागली. त्याचे शांतीच्या आहोती टाकल्या. छ १७ रोजी तीन पशू, छ १८ रोजीं एक पशू, ऐसे च्यार पशू मारले. यज्ञमंडपांत शुद्रांणीं जाऊ नये, पाहूं नये. खासे नित्य जाऊन कुंडाजवळ बसत होते. आहोती टाकते वेळेस ब्राह्मणासी बोलावें. हे आहूत कोणती, कशाची ह्मणून पुसावें. होमाचे वगैरे ब्राह्मणांचे चाळीस पन्नास पात्रांचें स्वयंपाकाचें साहित्य नित्य कोठींतून पाठवीत होते. छ १९ रोजी यज्ञ समाप्त जाला. शास्त्रीबावा व आणखी ब्राह्मण खाशाजवळ बहूत स्तुती करीत होते:- महाराज ! यज्ञ बहूत चांगला झाला. हत्ती, नगारा, गारदी, तोफा, बंदुखा वगैरे बाराची शिलक समारंभ चांगला जाला. कृतायुगीं विश्वामित्राणीं यज्ञ केला होता, त्याप्रमाणेंच हा यज्ञ जाला. अशी बहुत स्तुती केली. परंतु हत्तीतोफा फुकटच्या होत्याच. वरकड, आणखी काही यज्ञसंबंधें धर्म किंवा ब्राह्मण-भोजन-संतर्पण केले नाहीं. होमाचे सोळा ब्राह्मण व आणखी पंचवीस तीस ऐशा पन्नास ब्राह्मणांस एक-एक रुपया दक्षणा दिल्ही. मुछद्दी, मानकरी, शिलेदार वगैरे याणीं यज्ञापुढें, कोणी मोहोर, कोणी दाहा रुपये, पांच रुपये ठेवले, ह्मणून, मराठे मानकरी वगैरे सर्वास मेजवानी शास्त्रीबावाकडून करविली. साहित्य कोठींतून पाठवून दिल्हें. नांव मात्र शास्त्रीबावाचें. ब्राह्मणांस व लोकांस बहूत भ्रम होता कीं, यज्ञास साहित्य लागेल तें देवितों ह्मणून खासे बोललेत. कनिष्टपक्षीं च्यार पांच हजार रुपये लागतील, असें सर्वांचें मानस. परंतु कांहींच न केलें, अजमासें च्यार पांचशे रुपये लागले असतील. गंगेस आल्यापासून दीडशें दोनशें गोदानें दिल्हीं व अन्नछत्र घातलें. नित्य दोनशें तीनशें च्यारशें ब्राह्मण जेवितात. बंदोबस्त चांगला नाहीं. तिनशें पात्राचा स्वयंपाक करवितात, तेथें पांचशें ब्राह्मण येतात. तेव्हां, ब्राह्मण उपाशीं उठतात. कोठाळे-कारभारी लबाडी करितात. त्याची चौकशी नाहीं. भूरदक्षणा ब्राह्मणास एकादों दिवशीं देणार व गजदान देणेंत आहेत. छ २० रोज राजारड्डी मोगलाकडील याची मेजवानी, मुदबखचें साहित्य व बकरीं, आली होतीं. ते निमें मानकरी वगैरे लोकांस वांटून देविली. महागाई, आठ दहा शेरांची घारण आहे. समागमें फौज एक हजार व तोफा लहाण अच्छेर गोळ्याच्या च्यार आहेत, व बाणाचे उंट दाहा, व गारद दोनशें आहेत. समागमें यात्रा नागपुराकडील वगैरे दोन हजार आली आहे. येथे शिवरात्र करून, आमावाशा जाल्यावर, चिमाबाई वगैरे वेंकोजी भोंसले एथून च्यार मजलीं राजेश्वरास जाणार. व रघोजी भोसले कूच करून शिरपुरास अथवा चंद्रपुरास जाऊन राहाणार. चिमाबाई राजेश्वराहून आल्यावर, हुताशनी चंद्रपुरीं करून संवत्सरप्रतिपदेस नागपुरास जावें असा मजकूर आहे. राजश्री भवानी काळो याणीं येथें लक्ष-होम केला. वोझ्याचे छकडे व कारखाने वगैरे काल पुढें नागपुरास लावले. स्वारीबार लौकर चालत नाहींत व तेथें माहागाई आहे, याजमुळें पाठविले. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३६
श्री १७११ माघ शुद्ध ११
सा।. नमस्कार विज्ञापना ता।.
प्रातःकाळ पावेतों स्वामींचे कृपावलोकनेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. राजश्री अलिबहादरबाबाकडून सरकारच्या लखोट्याची थैली एक आली. येतांच डाकेबराबर सेवेसी रवानगी केली असे. थैली पावल्यानंतरी सरकारचे लखोटे जे असतील ते सबनीस हुजूर प्रविष्ट करतील. इस्मालवेग पळोन जैपुरास गेला. तेथें राज्यांनी घरास येऊन, बहुता प्रकारें खातरजमा करून, येक हाती व तरवार व +++ घेऊन सन्मान केला. याप्रों जैपूरचे पत्रें आलीं त्यावरून सेवेसी विनंति लिहिली असे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३५
श्रीगजानन १७११ माघ शुद्ध ११
रु
श्रीमंत राजश्री नानासाहेब स्वामीचे सेवेसी-
विनंति सेवक विश्वासराव आपाजी दि।। देवराव महादेव, कृतानेक सा। नमस्कार, विज्ञापना येथील वर्तमान ता। छ १२ * माहे माघ शु।। ११ पावेतों स्वामीचें कृपेंकरून शेवकाचे येथास्थित असे विशेष, छ २४ रबिलासरचे पत्र नवाब अकबर अल्लीखान याचें दिल्लीहून आलीं. त्यांतील घरु मा।र लि. हिला होता तो कांहीं समजल्यांत आला नाहीं. परंतु राजश्री पाटील बावांचें लस्करचें वर्तमान कीं इकडून सरकारची पत्रें व श्रीमंत स्वामीची पत्रें गेलीं त्याजवरून त्रिवर्ग सरदारांसी परस्परें रसायेण होऊन सुभेदार पाटीलबावांचे येथें मेजवानीस गेले होते, परंतु हिमत बहादर याजबा। मनांत शुधता नाहीं. बाह्य मात्र रक्षितात. जैपुरवाले राजे यांचे वकील राजश्री सुभेदार यांचे लस्करांत आहेत. याचे मार्फतीनें सलुखाचा पैगाम लागला आहे. मिर्जा इसमायलबेग खांकानोडचे प्रांतांतच आहे. दोन्हीकडे सूत्र रक्षन आहे. जेपूरवाले यांणीं लाख रुपये खर्चास पो आहेत. परंतु बशर्थ मा।रनिलेचीं कुटुंबें शहरांत दाखल व्हावी, तेव्हां ऐवज सावकारानें द्यावा, ऐसा करार आहे. त्याजवरून राज्याचा पाटील बावांचा तह ठरणार तेव्हां कुटुंबें तेथें पो ठीक नाहीं. यास्तव तेथें वमयकुटुंबसुधां तेथेंच आहेत. तह जाल्यानंतरी पुढें काय ठरेल तें पाहावें. यानंतरी छ ४ तारखेस हैदराबादेहून रो। गणपतराव वकील याचा जासूद यामार्गे गेला. त्याणें जबानी वर्तमान सांगितलें कीं नबाब स्वारीस शहराबाहेर निघाले होते. ते समई कोठून पत्र आलें नाहीं, परंतु, हतीवर स्वार नवाब होते, त्यास लाखोटा आपले हातें फोडून पाहिला, आणि आपले जेबांत ठेविला. मग मशरूनमुलुक यांजकडे क्रोधानें अवलोकन केलें, आणि स्वारी ते क्षणीं शहरांत दाखल जाली, उपरांतीक बंदोबस्त खासपागास व फौजेस ताकीद जाली कीं, जमा व्हावें. येसी आज्ञा होऊन डेरे बारादारीवर जाले आहेत. जासूद संक्रांतीस तेथून निघाला. मग डेरेदाखल कधीं जाले असेल तें न कळे. रुख कोणीकडे जावयाचा, हें समजलें नाहीं. हैदरखानाकडील ही वकील तेथून बारा कोसावर आला होता. कांहीं टिक्याचा सरंजाम बराबर आहे. दोन हाती, कांहीं जवाहीर, घोडे वगैरे आणिलें आहे. कांहीं फौज कुमकेस फिरंग्याकडे रवाना करावयास मागणार, ह्मणून ऐकिलें, वरकड, येथील वर्तमान तरी दोहों दिवसांआड शहाजादे स्वारीस निघतात. बागांत सहल चार घटका करून हवेलीदाखल होतात. समागमें रो बळवंतरावजी वगैरे मंडळी जात असते. नबाब अकबरअलीखान स्वामीचा स्तव बहुत करीत असतात की, श्रम बहुत जाला होता, परंतु आमचा गौर ऐसा केला कीं, खुशवक्ती त्याची कोठवर सांगावी, व बंदोबस्तही खातरखा आमचे स्वामी करितील ह्मणून नित्यशाह बोलण्यांत येतें. सेवेसी श्रुत व्हावें. आढळलें वर्तमान तें सेवकानें लिहिलें आहे. पत्राचे उत्तरीं सनाथ करणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें? लोभ केला पो. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४३ ] श्री. १३ मे १६९२.
श्री नृहरिप्रीत्या मुद्रा नीराजि
जन्मन ll राजरामप्रतिनिधे. प्रल्हादस्य
विराजते
० ˜
श्री राजाराम नरपति
हर्षनिदान ll मोरेश्वरसुत
नीळकंठ मुख्य प्रधान
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १८, अंगिरा नाम संवस्तर, ज्येष्ठ शु ।। सप्तमी, गुरुवासर, क्षत्रियकुलावंतस श्री राजाराम छत्रपति यांणीं जाऊळकर व दरेकर व मावळे लोकानी व कासुर्डे व गोळे व समस्त लोकानी पदाती यांसीं आज्ञा केली ऐसी जे - पूर्वी केलासवासी स्वामीचे वेळेस तुह्मीं लोकीं कष्ट मेहनत करून थोर थोर कामे करून दिल्हीं आहेत. सांप्रत रायगड हस्तगत करून घेणें हें कार्य बहुतच थोर आहे. येविसीं राजश्री रामचंद्र पडित अमात्य यांणीं तुह्मास सागितलें आहे, त्यावरून तुम्हीं गड हस्तगत करून घ्यावयाच्या यत्नांत आहा. साप्रत स्वामीनी राजश्री आबाजी सोनदेव यांसीं पाठविले आहे रायगड हस्तगत करून घ्यावयाची आज्ञा त्यास केली आहे हे जाऊन राजकारण जें करावयाचें तसे करितील तरी तुह्मी कुल लोक अनुकूल होऊन रायगडाची हरी करणे सक्ती करून ते स्थळ हस्तगत करून फतेचें वर्तमान स्वामीस लिहिणें. ह्मणजे स्वामी तुमचें विशेष ऊर्जित करितील तुह्मांस देण्याघेण्याचा तहरह जो करणें तो मशारनिले करितील. त्यास गड हस्तगत झाला ह्मणजे स्वामी तेणेचप्रमाणें चालवितील आपले दिलासे असों देऊन एवढे कार्य अविलबेकरून स्वामीस संतोषी करणेविसी राजश्री रामचंद्रपंतास लिहिले आहे. तेही जे बेगमी करावयाची ती करितील. जाणिजे. निदेश समक्ष
मयादेयं
विराजते
रुजू
सुरु सुद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३४
श्री. १७११ पौष वद्य १२
रु.
विज्ञापना. रा। असाराम विनायक भडोचकर हे मातबर सावकार. घरचीं जाहाजें चिनाई व विलायतेस जातात. इंग्रेजांमध्ये यांचा उदीम विशेष. याजकडे पा। भडोच येथील जकात होती. ते सालमजकुरीं मा।रनिलेकडील (..) दूसरीयास सांगितली. त्याजवरून यांचें मन खरें होऊन जंबुसरास आले. आह्मी बहुत प्रकारें खातरजमा केली. त्याजवरून त्यांणी तेथें दुकान घातलें. म्हणाले, जो मी रुई खरेदी करीन ते जंबुसर अमोद येथें बंदरी आणोन भडोचेस न्यावयाचा नाहीं, परंतु कांहीं रयात असावी. आम्हीं सांगितलें, तुम्ही मातबर सावकार, भडोचेहून येथें आलां, त्यास कांहीं तुमचे आईंकों, तुम्हीं फार वोढूं नये, सर्वांबरोबर हिसेब करावे, मग रयात करणें ते तुमचे आमचे विचारें होईल, तुह्मांस खटें करणार नाहीं. त्याजवरून, त्याची खातरजमा जाहली. मी आंकलेश्वरीं आलों, तेव्हां पर्वाच्या दिवशीं भेटावयास आले. म्हणाले, पहिलें अंकलेश्वरी बंदर होतें, मोंगलानें जबरदस्तीनें पाडलें. याजकरितां आमचे चित्तांत येथें बंदर करून सुरत व मुंबई येथून माल आणून कत करावी, तेणेंकरून सरकार किफायत, तुम्ही ह्मणाल इंग्रेज कांहीं दिकत करितील, त्याजविसींची जिमा माझा मी बंदोबस्त करीन. तेव्हां मीं सांगितलें, तुह्मीं म्हणतां तें खरें, परंतु जकातीचा आकार होईल तो गाईकवाड घेतील, सरकारांत नफा नाहीं. आधीं भडोचकर माझ्या नांवें हाका मारितात, येथें बंदर जाहलें ह्मणजे पाटीलबावास पत्रें पाठवितील, तेथून सरकारांत पत्रें येतील, तेव्हां ताकीद येविसीं होईल, केला श्रम व्यर्थ, यास्तव सरकारांत विनंति लिहितों, आज्ञा जाहलियास गाइकवाड याचा बंदोबस्त होऊन सरकार किफायत जाहलियास करून त्यांणीं मान्य केलें. त्याजवरून शेवेसी मजकूर लि।। आहे. जर करावयाची मर्जी असल्यास सरकार किफायेत आहे. पाटीलबाबांनी लिहिले असतां मग सरकारांतून आइकों नये असें पक्कें असल्यास आज्ञा असावी. आंकलेश्वरीं असाराम विनायक यांणी सिकंच्या कापूस पिकावयाचा घातला. चोहींकडील कापूस येथें गाठोडीं बांधावयास येईल. सावकाराचें मानस भडोचे बंदरची कमती पडे असें करावें. जसी आज्ञा होईल त्याजप्रों करीन. मौजे संजोद पा। आंकलेश्वर व मौजे शंकरपूर भाटे प्रों भडोच याचे सिवेचा कजीया पडला आहे. याजकरितां ऐवज भडोचकराचा अटकाविला आहे. यास्तव त्यांणीं जंबूसरचे सावकाराचा पैका भडोचेस चाळिस हजार पावेतों अटकाविला. आमचीं माणसें त्या ऐवजासमागमें होतीं. कारणें, टकसाळेंत रयाल आणविलें. तें त्यांणीं अटकावून ठेवले, तेव्हां, असाराम विनायक यांणीं सांगितलें कीं, तुम्ही सावकारी माल अटकावितां हे चांगलें नाहीं. आंकलेश्वराहून कागद व कारकून गेला, त्याणें बहुत सांगितलें तेव्हां त्याणीं तर, ऐवज सोडून दिल्हा. परंतु त्याचें मानस आमचा कोणी अटकाऊन पैकेयाचा निकाल करून घ्यावा. मी आलों तों नर्मदा भडोचेजवळ उतरलों परंतु खबरदारीनें उतरलों. त्याजला ऐवजाविसीं निकड लागली आहे. आह्मीं त्याजला सांगोन पाठविलें, सनद आणून द्या, किंवा जमीन द्या, पैका घ्या. त्याचें म्हणणें पडतें, जमिनीचे आकारापुरता ऐवज ठेऊन बाकी द्यावा. त्यास, हे गोष्ट घडल्यास करितों, आज्ञा असावी. सरकारांतून पाटीलबावास निक्षूण पत्रें जाऊन, तेथून भडोचकरांस जरबेचीं पत्रें आलीं म्हणजे ठीक पडेल. वाजबीचें गैरवाजबी होतें, येवढें वाईट वाटतें. शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३३
श्री १७११ पौष वद्य १२.
विनंति सेवक गणेश हरी मुक्काम आंकलेश्वर कृतानेक सा नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ २५ रा।खर पावेतों स्वामीचे कृपावलोकनेंकरून शेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. फत्तेसिंगराव गायकवाड यास समाधान नव्हतें. त्यास पौष वा। ९ * नवमी मंदवारीं पहाटेच्या च्यार घटका रात्रीस देवाज्ञा जाली. भडोचकर सावकाराकडे बडोद्याहून बातमी आली. त्यांणीं आह्मांकडे सांगोन पाठविलें. त्यावरून आइकिलें, वर्तमान स्वामीस कळावें, याजकरितां वर्तमान आइकतांच काल संध्याकाळचे घटकेस सा घटिका दिवसास कागद लिहून जासूद जोडी पांचवे दिवशीं स्वामीकडे जाऊन पोंहचावें असा करार करून, रवाना केली आहे. परंतु, आमचा कारकून बडोद्यास आहे. त्याचे पत्र आलें नव्हतें. तें आज उद्यां येईल, तेव्हां सविस्तर लेहून पाठवीन ह्मणोन, त्या पत्रीं लि।। आहे. त्यास, त्याच दिवशीं संध्याकाळी आमचे कारकुनाचें पत्र व दुसरें अमोदकराचें पत्र ऐ।। दोन्ही वर्तमानाचीं येऊन पावलीं. तींच स्वामीकडे पाठविलीं आहेत. त्यावरून विदित होईल. ईश्वरीसत्ता प्रमाण! यास कोणाचा उपाय नाहीं. परंतु त्या प्रांतीं मवासास फत्तेसिंग याचा जबाब चांगला होता, त्याप्रमाणें नवा बसोन बंदोबस्त होई तों महीकाट्याचे वगैरे मवास उचल करितीलच. परंतु, सरकारची फौज या प्रांतीं आलियामुळें दबाबानें मवास उचल करूं पावणार नाहींत. परंतु, प्रसंगोपाद दंगा जाहल्यास इतक्या फौजेनें बंदोबस्त होणें जमीयेतीप्रमाणें होईल, याजकरितां भरणा पोख्त असावा. या प्रांतीं कांहीं सरंजाम आणि सरदार मर्द आणि मनसेबेयानें चाले असा असल्यास राजकारणाचे उपयोगी पडेल. मग, स्वामीची मर्जी. पुण्यांत फौज आहे तसी या प्रांतीं राहील. राजश्री रामचंद्र भास्कर याचीं पत्रें पुण्यास गेल्याचें वर्तमान आइकिलें. गेलीं असतील. मी आंकलेश्वरी प्रस्तुत आहें. वासद्याकडे जाणार. परंतु च्यार दिवस वाट पाहून मग जाईन. तिकडें पत्रें पाठविलीं आहेत. उत्तर येईल त्याजप्रों करीन. उरपाडेस कारकून पाठविला आहे. परंतु कमावीसदार याद द्यावयास अनमान करितो. तेव्हां निकड करणें प्राप्त. ते बोभाट लिहितील. यास्तव विनंति लि।। आहे. राजश्री असाराम विनायक मातबर सावकार भडोचकर यांणीं दुकान जंबुसरीं घातलें. त्याचा मजकूर आलाहिदा पुरवणींत लि।। आहे. त्यावरून विदित होईल. उत्तराची आशा जाहली पाहिजे. शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३२
श्री १७११ पौष वद्य ११
श्रीमंत राजश्री दादा स्वामीचे शेवेसी. विनंति विज्ञापना. बडोद्याहून च्यार घटका दिवसास नारोपंताची चिठी आली. सेनाखासखेल यास पौष वद्य नवमी मंदवारीं च्यार घटका रात्रीस देवाज्ञा जाहली. रविवारीं अग्निसंस्कार जाला. गुंता नाहीं. यामागें वर्तमानें येत तसें हें नाहीं. निश्चयरूप गोष्ट ईश्वरें घडविली. पुण्यास हें वर्तमान सा रोजांत जावें. पुण्यास ल्याहवयाचें काव्यांत वगैरे हुल्लड येकदां होईल त्यास मारवाडी सिंदी झाडून रवाना करावें. सरदार गेला. धनी नाहीं. फितूर माजलें. मानाजी गायकवाड यास आणावयास माणसें गेली, नारोपंताची चिटीच पाठविली आहे. रा। सोमवार पांच घटका दिवस चढतां जंबुसराहून रवाना केलें. कोणे वेळेस आपणाजवळ पावतील ती वेळ ल्याहावी. आपण च्यार रोज आंकलेश्वरापुढें जावयाचें करूं नये. सरंजाम जवळ असों द्यावा. सरदार गेल्यानें घालमेल होईल. शहरचा बंदोबस्त आहे; परंतु फितुर बहुत. सरकारांतून सरंजाम या प्रांत येतो तर चांगलें. हा प्रसंग आहे. पुण्यास सा रोजांनीं वर्तमान पोंचल्यास चांगलें. हे विनंति.