Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

 [२९८]                                                                       श्री.                                                            १० नोव्हेंबर १७४२.

सहस्रायु चिरंजीव तुळाजी आंगरे यासी आज्ञा केली ऐसीजे :-
तुह्मीं धावडशीस दर्शनास यावयासी आणि पार्थिवलिंग करावयासी गांठ पडली. देवानें प्रसाद दिला तोच प्रसाद तुह्मास ताईत भरावयासी दिल्हा. तुह्मी लि॥ जें, आह्मीं तुमचे पदरचे, सर्व वडील कुळदैवत तुह्मी. तर सभ्यानें जो माझे हृदयीं भालें मारिले ते देवानें तत्क्षणी कां दिलें, ह्मणून तुह्मीं तख्तीं बैसलेत ! तो शापदग्ध माझे श्रापानें मेला ! तो दंश त्याचा ! तें देवानें मोठेसें माझें उरावरील शैल्य काढिलें ! मजला उभे उरावरी मजला त्याणें लाथ मारिली होती ! मी या राज्यांतून काळें तोंड करून जावें ! श्रीनें कांहीं दृष्टांत दाखविला ! तूं जाऊं नको. तुझें पारपत्य करीन. तें पारपत्य केलें. तूं तख्ती बैसलास. मजसीं बरेंपण केलियासी सुदामाची गत होईल. वैरपण केलियासी रावणाची गत होईल. ऐसें असोन इतका परिहार कशास लि॥? व्याजाचे माझे तीन लाख रु॥ जाहले. आपले पूर्वज नरकांतून काढणें असेल तर रु॥ देऊन उतराई होणें. अशी वासना धरली तर राज्यापासून तुह्मांस यश येईल व तारवें भरली येतील. आह्मांस तर उणें नाहीं. आह्मीं देवाचे भीकमागेच आहों ! गोठण्याचें काम जवळचे जवळ तुह्मीं पाहिलेच आहे. असें असोन आह्मांस रागेजोन रुसोन पत्र पाठविलें. तर लोक लाखानलाख रु॥ आपले पदरचे देऊन आह्मांस संतुष्ट करितात ! आह्मीं तर तुमचे पूर्वज नरकांतून काढितों ! तुमचे पूर्वज इच्छितात जें, आमचे वौशीं कोणी तरी देवाचें कर्ज देऊन बावाचा आशीर्वाद घेऊं. ऐसें इच्छितात. इलाची पाठविली ते कामाची नसे. शेरभर फोडल्या तर पावशेर निघतना ! वरकड जिन्नस पाठविला तो लि॥ प्रा॥ तीन मण उणा भरला ! बजिन्नस पैक्यांत धरणें. गोठणेकर यांसी वेठ धावडशीची पडत्ये तर वेठ-बेगारीचा उपद्रव एकंदर गोठण्यास न देणें. डोरले, महाळुंगे येथें पूर्णगडचा हवलदार उपद्रव देतो. तर त्यासी ताकीद करून उपद्रव साठवलीकडील व पूर्णगडाकडील लागों न देणें. जाणिजे. तारवें जर तुमचीं भरिलीं, स्वारीहून फत्ते करून आलीं, तर मजला माझे पैक्यांत नगदी रु.॥ १५,००० व पालखी आह्मांस न्यावयासी पाठवणें. ह्मणजे आह्मीं तुमचे भेटीस येऊन तुमचे मस्तकीं हात ठेऊन पोक्ता आशीर्वाद देतों व सरंजामही ठीक करून देतों. कळलें पाहिजे. राज्यादिकामध्ये तुमची कीर्त नांव होई ऐसें करून. येणेंकडून राजा संतुष्ट होईल. इतका आप्तपण दाखवून पत्रीं परिहार लि॥, तर मागें माणसें पाठविलीं तेव्हां परत माणसें अपमान करून रिकामीं पाठविलीं तेव्हां विवेक करावा होता ! बरें जाहली गोष्ट येत नाहीं. आतां तर पूर्वजांस उद्धरणें ! बहुत काय लिहिणें हे आज्ञा. दोघे भाऊ एकत्र जाहल्यानें पाल, राजमाची, शत्रू हातास येतील. घेतलीं स्थळें हातास येतील. मानाजीनें क्रिया केली जे, जर मी तुळाजीशीं दोन भाव धरीन तर क्रिया आमचे पायाची केलीन. ऐसा तो मनाचा मोकळा जाहला. तर तुह्मीं मन मोकळें करून एकरूप होणें.

                                                                                                                                                                                                                  

 [२९७]                                                                       श्री.                                                            १० नोव्हेंबर १७४२.

श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे कृतानेक विज्ञापना ता॥ कार्तिक बहुल दशमी सौम्यवासर पावेतों वडिलांचे आशीर्वादें अपत्याचें वर्तमान यथास्थित आहे. विशेष आशीर्वादपत्र पाठविलें. प्रविष्टकाळी मस्तकी वंदून लेखनार्थश्रवणें समाधान जाहालें. पत्रीं कितेक बुध्दिवादाचा अर्थ व कैलासवासी वडिलांच्या कर्जाच्या परिहाराचा अर्थ विशदें लिहिला. ऐशास, अपत्यास वडिलांहीं बुद्धिवाद सांगोन वर्तवावें हें उचितच आहे. वडिलीं, बावा ! तुमचे चरण सन्निध काय ह्मणून केले कीं पुढें आपले वंशास व राज्यास आशीर्वाद देऊन कल्याण करावें. तो अर्थ बावा ! तुह्मीं एकीकडेस ठेवून, आह्मांवरी अवकृपा करून, चित्तांत विपर्यास आणून, विषादाची वृद्धीच केली. पर्जन्यकाळीं व्रतस्थ होतेस तेसमयीं वडिलांचे सेवेसी वस्त्रें, पत्रें देऊन जोडेकरी पाठविले होते. त्यांचा धि:कार करून वस्त्रें फिरोन पाठविलीं. तेव्हां अपत्यास अपूर्व भासलें. किंनिमित्त ? इतका क्रोध करावयास कारण काय ? हा सर्व मामला बावा ! तुमचे अशीर्वादाचा. ऐसें असोन आपले मामलियावरी अवकृपा केली तरी यामध्यें आमचें काय जातें? शेवटीं बोल लागतां, बावा ! तुह्मा वडिलांसच लागेल. ये गोष्टींचा विवेक वडिलांहीं बरासा चित्तांत आणून कर्तव्य विचार तो करावा. वरकड कर्जाचा अर्थ लिहिला. तरी प्रस्तुत येथील प्रसंग आहे हा सर्व वडिलांस विदित आहे. हल्लीं आरमार स्वारीस रवाना केलें आहे. वडिलांचे आशीर्वादेंकरून प्राप्त झाल्यास सर्व आहे हें वडिलांचेच आहे ऐसें चित्तांत आणावें. आह्मांस वडिलांचे पायांविना दुसरें दैवत नाहीं. वडिलीं कृपा करून अपत्याचा लौकिक उत्तम प्रकारें वृद्धीतें पावे ते गोष्टी करावी. जिनसाविशीं आज्ञापिलें त्यावरून जिनसा पाठविल्या आहेत. त्याची पुरवणी निराळी आहे. प्रविष्ट जालियाचें प्रत्योत्तर पाठविलें पाहिजे. येविशीं विस्तार ल्याहावा तरी स्वामी वडील आहेत. सेवेसी श्रृत जालें पाहिजे. हे विनंति. हे विज्ञापना.

                                                                                                                                                                                                                  

 [२९६]                                                                       श्री.                                                            १२ फेब्रुवारी १७४२.

श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन कृतानेक विज्ञापना. येथील कुशल तागाईत माघ बहुल चतुर्थी भृगुवासर पावेतों स्वामीचे कृपेकरून अपत्यांचें वर्तमान यथास्थित आहे. विशेष. अंताजीपंत, खंडोजी बराबरी स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें. प्रविष्ट होऊन मस्तकीं वंदिलें व सविस्तर राजश्री अंताजी नारायण याणींही निवेदन केलें त्यावरून कळों आलें. व आपण पत्रलेख केला कीं, तुमचें वडिलाचे वेळचे रुपये एकूण साठ हजार येणें आहेत. ह्मणून कितेक विशदें लिहून पाठविलें त्यावरून कळों आलें. ऐशास स्वामीचें कर्ज आह्मीं वारून देऊन वडिलांस निर्मुक्त करावें हें आह्मांस उचित आहे. परंतु प्रस्तुत प्रसंग आह्मांवरी ओढीचा पडला असतां स्वामींनी आमचें हरएक पदार्थें अनुकूलता करून देऊन मनसबा चालवावा, हे बावा ! तुह्मांस अगत्य असावें. बरें ! उरफाटें अपत्यांस शब्द लावून लिहिलें तरी अपत्य कांहीं स्वामींचे सेवेसीं चुकणार नाहीं. सर्वस्व आहे हें बावाचें आहे. तेथें कांहीं विनाभाव किमपी नाहीं. आह्मीं स्वामींचा आशीर्वाद घेऊन पुढें मनसबा चालवावयास उमेदवार आहों. तरी स्वामींनीं कृपादृष्टि करून संपूर्ण आशीर्वाद देऊन अभिमानपुरस्कर चालवून पुढें आमचे हातून सेवा घ्यावी. वरकड कर्जाचा परिहार करून वारावें हें श्रेयस्कर आहे. प्रस्तुत अनुकूल वारावयास जाहलें नाहीं. स्वामीचें आशीर्वादेकरून कर्जाचा निशा करून देऊन. यास अंतर होणार नाहीं. तपशिलें अर्थ लिहून पाठविलें आहे ह्मणोन स्वामींनी चित्तांत विशमता न मानावी. आह्मांस वडिलपणें बुद्धनीत सांगोन वडिलांचे नांव रक्षे आणि आमचा लौकिक उत्तम होई तो अर्थ संपादून अपत्यांस दिला पाहिजे. आह्मांस स्वामींचे पायांवांचून दुसरें दैवत नाहीं. सविस्तर अर्थ मुखजबानी अंताजीपंत, खंडोजी, सांगतां सेवेसी श्रुत होईल. विदित जाहलें पाहिजे. हे विज्ञापना.

                                                                                                                                                                                                                  

 [२९५]                                                                       श्री.                                                           

पुरवणी श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-

विज्ञापना. उपरि. नारो गोविंद साखळकर खोत मौजे डोळे यांसी. दामो पुरुषोत्तम मौजे मजकूर याणें भुताचें तुफान नसतां लिगाड लावून विशालगडीहून तगादा करिविला आहे. त्यांजविशीं आज्ञा केली. त्यावरून हरदूजणांस हुजूर आणविले आहे. मनास आणून दामो पुरुषोत्तम यांचें पारपत्य केलें नाहीं. अनंतप्रभू कानडा याणें गोठणें येथील खाजणाकरितां कटकट करितो त्यांजविशी आज्ञापिलें. त्यावरून अनंतप्रभू यास ताकीद केली आहे. फिरोन मौजे मजकुरी याणें कटकट केली तरी मुलाहिजा होणार नाहीं. असें त्यास ताकीदपत्र पाठविलें आहे व डोळेकर हुजूर आणविले आहेत. यथान्याय पारपत्य करून स्वामीची आज्ञा ते प्रमाण. आपले आज्ञेस अंतर पडणार नाहीं. विदित जालें पाहिजे. बहुत लिहावें तो स्वामी वडील आहेत. कृपा केली पाहिजे हे विज्ञापना.
                                             

                                                                                                                                                                                                                  265

त्याचें स्मरण आतां करावें ऐसें नाहीं. ब्राह्मणाविना दत्त बोलिलों नाहीं. हें तों यथार्थच असे. तथापि, ज्याचें त्याणेंच दत्त दिल्यास प्रत्यवाय काय असे ? देवाचा रुका ठेविल्यास अकल्याणावह ह्मणून :- तरी यांत संशय काय ? स्वामींनीं श्रमें करून अर्जिलें द्रव्य आणि सत्कर्मीं व्यय केला हें तों विश्वतोमुखें कळलेंच असे. आह्मीं देणें आहे तें ना असें ह्मणत नाहीं. उभयतां चिरंजिवांचें स्वामीचे आशीर्वादेंकरून उत्तरोत्तर कल्याण जाहल्यास कर्जाचा विषय थोडकाच असे. स्वामीचे कृपेनें कर्जाचाही परिहार होईल. राहतें ऐसें नाहीं. चार दिवस मागें पुढें इतकाच अर्थ. हत्तीमुळें स्थळत्याग झाला :- तर दुष्टासी प्रसंग पडिलियास विचारें वर्तावें हे गोष्ट तो उचित असे. बापूजीचे महाजनकीचे कुलाबास लिहिलें होतें ह्मणोन आज्ञापिलें:- तर चिरंजीव स्वामीचे आज्ञे वेगळे आहेत ऐसें नाहींत. जें कार्य जे समयीं होणें तेच समयीं होतें. स्वामीच्या चित्तांत जो अर्थ आला आहे तो घडणें तेव्हां घडेल. बजूबाई राजूबाई यांच्या वोटया होनानें भरल्या तें वृत्त तुह्मांस न कळे ह्मणोन :- तरी आह्मीं न पाहिलें; परंतु स्वामीच्या मुखें तों यापूर्वीं ऐकिलें असतां आह्मांस न कळे ऐसें नाहीं. देवाचा रुका ठेविल्यास वेल वाढणार नाहीं ह्मणोन आज्ञा :- तर बावा ! पादा पादा स्वामींनीं ऐसा आशीर्वाद न द्यावा. स्वामीचे आशीर्वादाचा खांद्या दोन आहेत. त्यांचा विस्तार, पल्लव, शाखा होऊन हें अर्जिलें आहे, याचें संरक्षण होय ऐसा स्वामींनीं पूर्ण आशीर्वाद द्यावा हे गोष्ट स्वामीस उचित आहे. आजसारखा आशीर्वाद दिल्यास तुमचे ऋणानुबंधी तुह्मांस स्वर्गलोकीं हंसतील ! सारांश, अर्थ, हा मनसबा अवघा स्वामीचा आहे. तेथें विस्तार काय लिहावा ? स्वामी सर्वज्ञ आहेत. मुख्य गोष्ट, मजपासून अंतर पडलें ऐसें आपले चित्तांत आलें असलें तर स्वामीनें येऊन, दर्शनाचा लाभ देऊन, बोल लावणें तो लावावा, तो शिरसा असे. कागदींपत्रीं कोप न करावा. बहुत काय लिहिणें. कृपा असो दीजे हे विज्ञापना.

कैलासवासी असतां बावांचें येणें कुलाबास जालें होतें. तेव्हां कर्जाची चर्चा निघाली होती. तेव्हां बावा बोलिलें कीं, आपण चिरंजीव राजश्री जैसिंगास पैके देतों, तुह्मांजवळ मागत नाहीं; त्याजवर खाशांही उत्तर केलें जें, तुमचा टका श्रीचें शिवस्व आहे, तें आपण न ठेवूं ह्मणवून शपथ केला खराच. हे द्रव्याची चर्चा. उपदेश व्यर्थ दिल्याचें उत्तर कीं- बावांनीं मजविशीं काय अर्थ किंवा माझी निष्ठा अथवा आचरण काय चित्तांत आणून मस्तकीं हात ठेविला हें न कळे; मजला सामर्थ्य ऐसें नव्हतें. जे स्वामींनीं कृपाळू होऊन सनाथ करावें. ऐसे ह्मणावें तथापि स्वामींनींच कृपा केली असतां, आतां स्वामी व्यर्थ उपदेश दिल्हा ऐसें चित्तांत कां आणितात ? देणें घेणें ह्मणावें तरी मी त्यांस काय द्यावें ? जें आहे हें त्यांचेंच आहे; इत्यादिक नम्रतेच्या गोष्टी बोलिलों होतों. तो अर्थ त्या पाजीनें एकीकडे ठेवून विपरीतार्थे स्वामीचे सेवेसीं निवेदिलें. बरें ! ते गोष्टीचें काय असे ? तोही येईलच. त्याजवळ मनास आणून, तो येऊन आपण रागास आल्याचा तपशील सांगत होता. त्यास उत्तर लिहिलेप्रमाणें केलें. तेव्हां मजजवळ दहापांच भले माणूस मजालशीस होते. त्याजवर सत्व टाकून मोझा करून, त्या लबाडानें मनस्वी लबाडी जाऊन सांगितली. तेंच स्वामींनीं प्राण मानून शब्द लावून लिहिलें. तर आह्मीं तो बोलिलों नसतां स्वामींनीं बोल लाविला तर स्वामींचा शब्द सूक्त अथवा असूक्त असिला तरी मजला श्रेयस्करच असे. इतकेंच कीं, स्वामींनी ध्यानीं पाहावें होतें कीं, ऐसें भाषण घडेल कीं न घडेल. बाकाजी नाईक यांस कुलाबा नेविलें. तर आह्मीं आलियावर अवघा यख्तियार त्याजवरच टाकिला असतां त्यांस दर्शनाची उत्कंठा होऊन, दर्शनास गेले, फिरोन येथून लिहून व सांगोन पाठविलें; त्यांस आपणांजवळ आणविलें; सर्व कारभार त्यांचेच हातें घेत असतो; कारभार करून नांवरूप करून घ्यावें ऐसें नाहीं; नांवरूप जें होणें तें स्वामीचे पुण्यें व कैलासवासी यांचे प्रतापें होऊन दिगांतीं कीर्ति धन्याची गेली; चिरंजीवाच्या आग्रहास्तव शिक्के करावयाचें मान्य केलें. वरकड पांच हजार रुपये न विचारितां नेल्याचा वृत्तांत:- तर त्यांचा तुमचा ऋणानुबंध अपूर्व नव्हता. संकटास्तव ऐवज नेवावा लागला.

 [२९४]                                                                       श्री.                                                            १ फेब्रुवारी १७३३.                                                       

श्रीमत् परमहंस परिव्राजकार्य भृगुनंदनस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मथुराबाई चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल माघ बहुल त्रयोदशी गुरुवार पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. स्वामींनी कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणगोचरें परम कांहीं आनंद जाहाला. तो श्री जाणें ! यानंतर नारायण हरकारा याजवळ आह्मीं बोलिलों कीं, गोसावी यांणीं दाटूनच आपणास उपदेश दिल्हा ह्मणोन; व बावांहीं उदक घालून जें होतं तें अवघेंच कैलासवासीयांस दिल्हें असतां, आतां पैके कशाचे मागतात; व आज्ञेवांचून रसाळगडाहून पांच हजार रुपये सातारचे मुक्कामीं नेल्याचा अर्थ; व प्याला एक घेतला होता त्याबद्दल रागास आल्याचा तपशील; व शिरा काढिल्या ते वेळेस भास्करराऊ असतां, बावा तुमचा रुका आपण ठेविणार नाहीं ह्मणोन शपथ केल्याचा भावार्थ, व द्रव्य मेळविलें तें श्रमें करून सार्थकीं व्यय केल्याचा पर्याय; व दत्त देता कार्यास न ये; व देवाचा रुका ठेविल्यास अकल्याणावह; व हत्तीमुळें कोंकण त्याग केलें; बापूजीचे महाजनकीचा मजकूर; व पूर्वी बजूबाई राजूबाई यांच्या वोटया होनानी भरिल्या होत्या हें वृत्त तुह्मांस अवगत असतां आपला अपमान केला ऐसें कितेक विस्तरेंकरून शब्द लावून आज्ञापिलें. तें अक्षरश: श्रवण होऊन त्याचें उत्तर ल्याहावयास स्वामीपुढें सामर्थ्य नाहीं. तथापि स्वामींनी आज्ञापिला अर्थ त्याचा जाबसाल न जाहाला तरी स्वामीस कोप येऊं शके, यास्तव, यथाज्ञानें लिहिलें तें तें स्वामींनीं कृपा करून श्रवण करावें. ऐसें जे- उपदेश न मागतां दिल्याचा अर्थ- स्वामीचे सेवेसी विदित जालें तें यथार्थच असे; परंतु येथें नारायण स्वामीकडून आला तेव्हां स्वामीच्या संतोषाचें वृत्त व आह्मांस काय ह्मणत होते ऐसें पुशिलें. त्याचें उत्तर त्यानें केलें जे- राजश्री सखोजी बाबा यांस व आपणांस गालिप्रदानें करीत होते. कारण काय तर पैके आपले देत नाहीं, व आपण हस्तक बाईस व्यर्थच दिल्हा व आपण कारभार करून येऊन बाकाजी नाईक यांस कुलाबा नेविलें, ऐशीं दोन चार निमित्तें ठेऊन कोपले होते, त्याचा तपशील सांगतां पुरवत नाहीं, ऐसें बोलिला. त्याजवर आपण इतकेंच बोलिलों कीं- बाबांनीं पैकेयास्तव कोपास यावें ऐसें नाहीं.

 [२९३]                                                                       श्री.                                                                                                                 

तीर्थरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें विसाजीराम चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना. स्वामींनीं आज्ञापत्र पाठविलें. संतोष जाला. तापता निशाणास पाठवावा ह्मणोन लिहिलें. तरी दमासा तांबडा बाजारांत खरेदी करविला आहे. मागाहून पाठवून देतों. भेटीस येतील तेव्हां आज्ञेप्रमाणें अगत्याअगत्यच आणितों. स्वामीचें चरणरज येथें आहे. आज्ञेस चुकणार नाहीं. जें होणें जाणें तें स्वामींचे आशीर्वादें होईल. येणार जाले ह्मणजे अगोदर लिहून पाठवितों. हे विज्ञापना.

 [२९२]                                                                       श्री.                                                                                                                 

श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्येंसन संभाजी आंगरे चरणावर मस्तक ठेऊन दंडवत विनंति उपरि येतील कुशल तागाईत वैशाख शुध्द त्रयोदशीपर्यंत स्वामीचे कृपावलोकनें करून सुखरूप असों. यानंतर बहुता दिवशीं स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवणें संतोषाच्या कोटीच प्राप्त जाहल्या. याच न्यायें सर्वदां आशीर्वादपत्रिका पाठवून अपत्याचा सांभाळ करणार स्वामी थोर आहेत. विशेष मुतडीचे हाजनकी बापूजी बागुल यासी द्यावी, ह्मणून धावडसीस भेटीचे समयीं मागितली, आह्माजवळ मान्य केले, तीनशें रुपये दिल्हे ते घेतले, आणि आतां वाकडयाचे गोष्टी करतां आह्माशीं +++++++++ आहे. तेथून जें महाजनकीविशीं लिहिणें तें स्वामीस लिहिलें येईल. वरकड, मी चरणरज स्वामीचा आहे. स्वामीचे सेवेसी तत्पर आहे. आशीर्वाद पूर्ण असो द्यावा. हे विज्ञापना.


                                                                                                                                                              265

 [२९१]                                                                       श्री.                                                                                                                 

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल दंडवत विनंति उपरि येथील कुशल स्वामींच्या कृपावलोकनें सुखरूप असों. विशेष. सेवक राजदर्शनास आलों. येथें स्वामींनीं येऊन कितेक पदार्थें अपत्यांचें साहित्य करून गौरव करवावा हें आपल्या वडीलपणांस उचित होतें. परंतु तो विचार स्वामींनीं न केला. बरें ! श्रीइच्छेस उपाय नाहीं. प्रस्तुत आह्मांस येथें खर्चाची ओढी विशेष झाली आहे. आपणापाशीं उसनवार रुपये पांच हजार मागितले आहेत. तरी कृपाळू होऊन सदरहूप्रमाणें रुपये अगत्य जाणून पाठवून द्यावे. येथील प्रसंग उरकून पूर्वस्थानास पावतांच स्वामींचा टक्का प्रविष्ट करून देऊन. अंतर नव्हे. येथें अगत्य समजून रुपये पाठविले पाहिजे. समयोचित लिहिलें आहे. आपल्या वडीलपणांस योग्यता असेल तें करावें. वरकड पुरल्या सकलाद सुसीविसीं लिहिलें, तरी ते गोष्टीचा विशेष काय आहे ? आपणांकडून पुन्हा माणसें येतील त्यांजबरोबर पाठवून देतों. तपसील लिहावें तरी वडिलांस पाल्हाळ लिहावा. यामध्ये उत्तम विचार नाहीं. ह्मणून अल्पामध्यें लिहिलें आहे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ विशेष केला पाहिजे. हे विनंति.


                                                                                                                                                              270