Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[२७०]                                                                       श्री.                                                                          ५ जून १७३५.                     
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल चरणांवरी मस्तक ठेऊन दंडवत् विनंति. उपरी येथील कुशल तागाईत ज्येष्ठ बहुल दशमी गुरुवारपावेतों स्वामीच्या आशीर्वादेंकरून सुखरूप असो. यानंतर आशीर्वादपत्रिका पाठविली, पावोन बहुत कांहीं संतोष जाहला. पत्रीं लिहिलें की पत्राचा अन्यय सर्वही चित्तांत आणून उत्तर पाठविलें ह्मणजे हळूहळू दर्शनास येऊन. ऐशास आपण येऊन, दर्शनाचा लाभ देऊन, आमचा सांभाळ करावा, हें आपणास उचित आहे. तेथें आह्मीं विस्तार लिहावा काय असे ? आपण आह्मांस वडील. पूज्य. सर्वमान अभिमान आमचा आपणास लागला आहे. आजीकालींच आह्मी लिहितों असें नाहीं. वडिलांपासून हें घर स्वामीचें. आह्मी, आह्मीं स्वामीची सेवा करावी, याउपरि सर्व गोष्टी एकीकडेस ठेऊन, हळूहळू येऊन, दर्शन देऊन. सवेंच फिरोन रवानगी करून वरकड तीन गांव गोवळकोटासंनिध श्रीस पूर्वापार इनामत आहेत. त्यास हालीं शामलाकडून करार होत नाहीं, त्यास शासनाक्रांत करावें, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, राजपुरीस दबावानें लिहून पाठवून करार करून घ्यावे ह्मणून लिहिलें. तरी श्रीच्या कार्यास सेवकांपासून सहसा अंतर होणार नाहीं. शासनाचा अर्थ लिहिला तरी प्रस्तुत चातुर्मास प्रजन्याचा प्रसंग आहे. त्याचा विचार आमचें चित्तीं बहुत दिवस आहे. कालवशेंकरून घडोन आला नाहीं; परंतु याउपरि याणें मर्यादा सोडिली आहे. त्याचा योग सहजेंच घडोन येत आहे. तोही प्रसंग शीघ्रकालेंकरून घडोन यावा असाच आपला आशीर्वाद आहे. वरकड त्यास लेहून पाठवावें ह्मणोन लिहिले. त्यावरून आह्मीं त्यास लेहून पाठवितों. इतक्यांत आपणही अती सत्वर निघोन येथें यावें तों त्याचाही जाब येईल. त्यासारिखा आपल्या विचारें त्याचा पुढें विचार करून आपण दर्शनास आले पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दिल्हा पाहिजे हे विज्ञापना.

                                                                                                                                                                                          270

[२६९]                                                                       श्री.                                                                        १८ नोव्हेंबर १७३३.                        
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप स्वामीचे सेवेसी.
सेवक संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार कृतानेक साष्टांग दंडवत प्रणाम विनंति तागाईत कार्तिक शुध्द नवमी रविवारपावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून वर्तमान कुशल असे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. सारांश राजश्री अंताजी शिवदेव यांणी डोरले व माहळुंगे यावरी रोखा करून एकशें तेतीस रुपये वसूल घेतला. त्याचा मुबदला करून ऐवज आणवावा ह्मणोन आज्ञापिलें. ऐशास, स्वामीचें आज्ञेपरतें थोर आहे ऐसें नाहीं. मुबदला करावयास उशीर काय आहे ? परंतु अंताजी शिवदेव जमावानसीं मांचालास विशाळगडचे परिघास आहेत. त्यास, आह्मांकडील मुलुक न्यूनव्यवस्था आहे, त्याचा उछेद करावा हे गोष्टी सर्वांच्या चित्तांत. आमच्या मुलकाचें सर्वांस वैशम्य. तदनुरूप लष्करचे सरदार मनस्वी चर्चाही खालीं उतरावच्या करितात. असें असतां मोबदला करावा तेव्हां येखादे फंद करावयास चुकणार नाहींत. यानिमित्य सध्यां इकडून चर्चा करितां येत नाही. तरी स्वामींनींच राजश्री श्रीनिवास पंडित प्रतिनिधी यांस लिहून, रुपये नेले आहेत. त्यांचा निर्वाह करविला पाहिजे. मांचालास लष्कर नसतें ह्मणजे आज्ञेप्रमाणें मोबदला अलबता केला जाता. वरकड अनुष्ठानास तीळ दोन खंडीपावेतों विकत मिळवून घ्यावयाची आज्ञा. आज्ञेप्रमाणें त्रिंबक कृष्ण यांजपासून रुपये घेऊन तीळ करेदी करून देऊन. विदित जाहलें पाहिजे. बहुत काय लिहिणें कृपा वर्धमान करावी हे विनंति.

[२६८]                                                                       श्री.                                                                        १३ आगस्ट १७३१.                        
श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्ये संभाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेवून दंडवत विनंति उपरि येथील कुशल तागाईत श्रावण वदि अष्टमी भृगुवारपावेतों आपले आशीर्वादें संतोषरूप आहों. विशेष. स्वामीकडील बहुत दिवस आशीर्वादपत्र येऊन अपत्यांचा सांभाळ होत नाहीं. ऐसें नसावें. सर्वदा आशीर्वादपत्री दर्शन देऊन परामृष करणार आपण वडील आहांत. आपले भेटीस बहुत दिवस जाहले. एक वेळ दर्शन व्हावें हें मानस फार आहे. तरी लक्ष कामें टाकून एक वेळ भेटीचा लाभ दिला पाहिजे. भेटी होईल तो आमचा सुदिन असे. खाशांमागें सर्वांविशी आपण आह्मांस वडील मायबाप. तेथें दुसरा अर्थ काय आहे ? स्वामीनीं वडीलपणें येऊन परामृष करावा. बुध्दिवाद आज्ञा कराव्या. आपण वडील आहांत. बहुत लिहावें तरी स्वामी अभिज्ञ आहेत. कृपा वर्धमान करावी हे विनंति.

                               
                                                                                                                                       265

[२६७]                                                                       श्री.                                                                        १५ मे १७३१.                         
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूपबावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार चरणावर मस्तक ठेवून दंडवत विनंति उपरि येथील क्षेम तागाईत वैशाख शुध्द पंचमी मंदवारपर्यंत स्वामीचे कृपेकरून सुखरूप असों. यानंतर बहुत दिवस क्रमले. परंतु आशीर्वादपत्र पाठवून परामर्ष न केला, त्यावरून चित्तांस संतोष वाटत नाहीं. याउपरी येणारांसमवेत आशीर्वादपत्रिका पाठवून सांभाळ केला पाहिजे विशेष. चिरंजीव तुळाजी आंगरे यांची सोईरीक, आपण तद्देशीं पाहिली असेल, ह्मणून वर्तमान ऐकीवेंत असें. तरी आपण सोईरीक उत्तम नवरीही पाहोन ठेविलीच असेल, अथवा पाहिली नसली तरी चिरंजीवायोग्य सोईरीक नेमस्त करून, नवरी पाहोन, तिचा बाप बरा नामांकित पिढिजादा ऐसा, बरा, स्वामींच्याही विचारें योग्य, ऐसी निश्चयता करून लेख पाठविला ह्मणजे त्याचा विचार करून, स्वामीस लिहून पाठवून. उपरांत घटवटणा होऊन येईल. स्वामीचें आगमन येप्रांतीं कधीं होईल, याचा भावार्थ लिहिला पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असों दिला पाहिजे. हे विनंति.

                               
                                                                                                                                       265

[२६६]                                                                       श्री.                                                            १४ जानेवारी १७३१.                          
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे कृतानेक साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरि येथील कुशल पौष बहुल तृतिया गुरुवासर पावेतों स्वामीच्या आशीर्वादेकरून सुखरूप असो विशेष. स्वामीनीं आशीर्वाद पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ कळों आला. सारांश, कृष्णंभटाचे देशमुखीचा अर्थ आज्ञापिला तो कळला. हाच वृत्तांत दत्ताजी कनोजे यांजबरोबर स्वामीनीं पत्रांरूढ करून मुखताही सांगोन पाठविलें होते. त्याचें उत्तर मशारनिल्ले याजबराबरी लिहून पाठविलेंच असें, त्यावरून विदित होईल. वरकड परभू व बाजी सांठा यांणी दुर्बुध्दी तुमचेवरी धरिली आहे. कोणाचे हातून खाऊं जेवूं नको, उदक न घेणें, ह्मणोन आज्ञा. तरी दुर्बुध्दी धरून काय होणें ? ज्याचें जसें आचरण असेल तसें ते फल पावतील. जेवणखाणास आह्मी कोणाचे घरी जात नाही. गांव सौभाग्यवतीस इनाम करून देणें ऐसें आपण लिहिलें, तरी हा दंडक तीर्थरूपापासून चालत आला आहे की काय ? यददाचलती श्रेष्ठ या न्यायें वर्तत असों. आपलें वेगळे, सौभाग्यवतीचें वेगळें, ऐसें होत गेले ह्मणजे तीर्थरूपांनी बंद करून दिल्हा आहे तो राहिला कोठें ? त्यांणी अढळ पाया घालून दिल्हा आहे. त्याप्रमाणें राहाटी झाल्यानें मामल्याचा अबरू राहतो. अन्यथा, आहे विचार तो स्वामीस अविदित आहे, ऐसें नाहीं. संक्रमणाचा तीळगूळ पाठविला तो अत्यादरें करून भक्षिला. विदित जाहलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.

                               
                                                                                                                                       265

[२६५]                                                                       श्री.                                                              ८ जानेवारी १७३१.                             

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरि तागाईत पौष शुद्ध द्वादसी भृगुवासर पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. स्वामीनीं आशीर्वादपत्र राजश्री दत्ताजी कनोजे यांजबरोबरी पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवणें बहुत समाधान जाहालें. सारांश मशारनिल्ले याणीं आमचा हुकूम पाळून वर्तणूक केली, यास्तव यांचा घात जाहला. आपणाजवळ आले. याचें समाधान करून तुमचे भेटीस पाठविले असेत. यास सर्व जाणतात. रोजगारही मिळतील. परंतु तुमचे सेवक दुसरी यांजकडेस जावे, उचित नव्हे. ह्मणोन कितेक विषादेंकरून आज्ञा केली ते संपूर्ण कळली. ऐशास मशारनिल्ले त्याणीं आमचा हुकूम पाळला ह्मणोन श्रम भोगावा ऐसे नव्हते. परंतु भोगानरूप जो प्रसंग जाहाला त्यास इलाज नाही. जें होणें जाणें तें ईश्वरीच्छेनुरूप होतें. प्रस्तुत यांस येथें ठेऊन घ्यावे तरी तीर्थरूप राजश्री सखोजी बावा याणीं निरोप देऊन स्वामीकडेस पाठविले असतां आह्मी ठेवावें हे गोष्ट तूर्त अनुचित व यांसही प्रशस्त नाही. या निमित्य मशारनिल्लेस निरोप देऊन स्वामीचे सेवेसी पाठविले असेत. पुढें तीर्थरूपांची आमची भेट जाहल्यानंतर जो विचार करणें तो करून. स्वामींनीं तो सर्व प्रकारें यांचा अभिमान धरिलाच आहे. जे गोष्टीचें आह्मांस अगत्य, तेंच स्वामीनीं मनावरी धरिले असतां आह्मी तपसिलें स्वामीस लिहून पाठवावी ऐसें नाही. वरकड कृष्णंभट देसाई याचा अभिमान धरावा ह्मणोन आज्ञापिलें. तरी जे स्वामींनीं अगत्य धरून तीर्थरूपांजवळून व आह्मांकरवी उदक घालविलें आहे त्यास अन्यथा आहे ऐसें तो नाहीं. त्यांचे त्यांहीच अन्यथा केलें तरीच नकळे. दुसरी गोष्ट ढोरें डोरले महाळुंगे यास ठेविली होतीं. परंतु तो जागा ढोरांस मानत नाही. याबद्दल विलवडें वाटुळ या गांवी ठेविणार. त्यास गांवकरांस ताकीद करून कांही उपसर्ग न लागो, ऐसे ताकीदपत्र गांवकरांस घ्यावे म्हणोन स्वामीनीं लिहिलें. त्यांवरून गांवकरांस ताकीदपत्र दिले असे. ढोरें हरदू गांवी जेथें अनुकूल पडेल तेथें ठेवावी. याविशी आपले माणसांस आज्ञा करावी. विदित जाहलें पाहिजे, बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान करावी. हे विनंति.

                               
                                                                                                                                       265

[२६३]                                                                       श्री.                                                                 

पुरवणी श्रीमत् सकल तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
विनंति. आफोडकरांचे गांवाविशीं स्वामीनीं आज्ञापत्रीं आज्ञा केली. ऐशास त्यांची कोड वतनी आहे, ती त्यास देऊन ह्मणोन स्वामीचे दर्शनास आलों. ते समयीं मान्य केलें त्याप्रों। सातारियाचे मुक्कामीं पत्रें करून दिल्ही आहेत, त्याप्रमाणें चालेल. कळलें पहिजे. कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.



[२६४]                                         श्री.     

पुरवणी श्रीमत् सकलतीर्थस्वरूप
विनंति उपरी.

अर्ज्या दिवट्या याचे बायकोविशीं
लिहिलें, ऐशास ते पहिलीच र॥ केली
आहे. पावली असेल.

प्रसाद पेढे पाठविले ते प्र॥ जाहले.
श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेशी.
कावजी कदम याणें साठ रुपये देऊन
बटीक घेतली होती. ते चिरंजीव
संभाजी आंगरे याणें नेली आहे. ते
पाठवून द्यावयाविशीं एक दोन वेळां
पत्रीं आज्ञा केली. त्यावरून
तहकियात करितां आणली, ऐसा
शोध लागला नाहीं. शोध
लागलियावर पाठऊन देऊन.
बहुत काय लेहूं ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे हे विनंति.

                                                           

[२६२]                                                                       श्री.                                                                 

पुरवणी श्रीमत्सकल तीर्थास्पदीभूत श्री परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी.

विनंति उपरी. पूर्णगडचें देवळ सिद्ध
जाहालें. माघमासीं लिंगस्थापना
करावयास मुहूर्त आहे. ऐशास आपणा-
कडून भला माणूस पाठवून श्रय घ्यावें
ह्मणोन लिहिलें. ऐशास जो स्वामीकडून
या कार्यास पूर्णगडास जाईल तो
आमचाच आहे. दुस-याचें प्रयोजन नाहीं.
जयगडीहून सामान पाठवावें ह्मणोन
लिहिलें त्याजवरून :-

261

येणेंप्रमाणें देविलें आहे. होन्यावरून
पूर्णगडास पावून देतील. शाकभाजी 
पूर्णगडीहून देविली आहे. स्वामीनें
कार्य संपादून श्रय घ्यावें.
सकलाद पाठवावयाविशीं आज्ञा केली.
त्यास सकलादेच्या यत्नांत बहुतकरून
आहों. स्वामीस पाठवावया योग्य
मिळाल्यावरी पाठऊन देऊन अंतर
होणार नाही. 

कुडती एक व पट्टेदार सुशीथान
एक पाठवावें ह्मणोन आज्ञा.
आज्ञेप्रमाणें सुशी एक थान पाठविलें आहे.
कुडती सिध्द करविली आहे तयार
जाहल्यावरी मागाहून पाठऊन देऊन.

धावडशीस जिन्नस पाठवावा ह्मणोन
आज्ञा. ऐशास खजूर, खारका हा
जिन्नस नाहीं. साकर वजन 262
अडीच मण पाठविली आहे. प्रविष्ठ
होईल.

येणेप्रमाणें विदित जाहाले पाहिजे. बागलाचे महाजनकीचीं पत्रें करून द्यावीं ह्मणोन स्वामीनीं आज्ञा केली. ऐशास येविषयींचें उत्तर पूर्वीचे स्वामीचे सेवेसी लेहून पाठविलें आहे. बहुत काय लिहूं ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.

[२६१]                                                                       श्री.                                                                 

पुरवणी श्रीसच्चिदानंदकंद परमहंस भृगुनंदनस्वरूपेभ्यो स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरी स्वामीनीं पवळी पाठविलीं ती लिहिलेप्रमाणें प्रविष्ट जालीं. त्याची किंमत रुपये १२५ सवाशे लि॥ त्याप्रमाणें मान्य करून सदरहू सवाशे रुपये व पांचशे पाठवितों ह्मणोन स्वामीस लि॥ होतें ते, एकूण सवासाहाशे जाले. त्यापैकीं तीनशे बारा रु॥ येथें रामजीजवळी देऊन र॥ केले असेत. राहिले ३१३ तीनशे तेरा हे सुवर्णदुर्गाहून पत्रदर्शनीं देणें ह्मणोन लिहून तेथून देविले ते स्वामीस पावतील. याप्रों। रवानगी केली असे. याखेरीज तीन माळा उंच मोठ्या आहेत ह्मणोन लिहिलें तरी त्या तिन्ही माळा त्याची किंमत लेहून पाठऊन दिल्ह्या पाहिजेत. त्याचें द्रव्य दोहप्तें पाठऊन देऊन स्वामीनीं जायफळ, जायपत्री, लवंगा व तेलाविशीं लेख केला, त्यास सुवासिक तेल तो सिद्ध नव्हतें या निमित्य पाठविलें नाहीं. वरकड लवंगा वजन 261 1 व जायफळ 261 1 व जायपत्री 261 2 याप्रमाणें पाठविले असे. अंगिकार केला पाहिजे. श्रीसंनिध तुमचा नंदादीप लाविला ह्मणोन आज्ञा, तरी हे गोष्टी स्वामीनीं बहुत उत्तम केली. बहुत समाधान पावलों. तुजला आणखी उदंड आहेत ह्मणोन लि॥. आह्मास आहेत खरेच. परंतु वरकड आहेत ते आहेत व स्वामीही आहेत याचेही साक्षी स्वामी नसतील काय ? बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.

[२६०]                                                                       श्री.                                                                 १७३३.

पुरवणी तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
कृतानेक साष्टांग दंडवत. प्रा। विनंति उपरी शितोळे पुणेकर याजकडील शरीरसंबंध तीर्थरूप कैलासवासी वर्तमान असतां योजिला होता. त्यास निश्चय होऊन कार्यसिध्दि व्हावी तो प्रसंग तैसाच राहिला. त्या अलीकडेस उरकावें तों येथेंच योजून आलें ह्मणून त्या शरीरसंबंधाचा विचार मनास आणिला नाहीं. प्रस्तुत राजश्री बाजीराऊ पंडीत प्रधान यांही राजश्री रघुनाथजीसमागमें सांगोन पाठविलें कीं, हा शरीरसंबंध योग्य आहे. आमचे मतें टाकूं नये. त्याजवरून अवश्यमेव करावा ऐसा निश्चय मनें केला. ह्मणोन निश्चय करावयानिमित्य पंडित मा। निले यांसी लेहून पाठविलें आहे. निश्चय होऊन लेहून आल्यावरी मागणीचाही विचार करून आपणांस कळावें ह्मणोन लिहिलें असे. व चिरंजीव संभाजी आंगरे यांसी घोंगडि याजकडील शरीरसंबंध केला होता त्याचा विचार जाहला तो स्वामीस विदित आहे. ऐशास प्रतापजी अवघड राऊ देशमुख साळोखे प्रा। चांडवळ याजकडून ब्राह्मण पत्रें घेऊन आला. मनास आणितां यथायोग्य ह्मणून कबूल करून लेहून पाठविलें आहे. त्याचें उत्तर त्याजकडून आल्यावरी कोणी भले लोक पाठवून लग्ननिश्चय करून साखरविडे वांटले जातील. हें सविस्तर वृत्त आपणास निवेदन व्हावें ह्मणोन लिहिलें असे. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ निरंतर अभिवृद्धि केली पाहिजे. हे विनंति.

[ह्या पत्राच्या पाठीवर ब्रह्मेंद्रस्वामींनीं स्वत: उत्तर लिहिलें आहे तें येणेंप्रमाणे:-]

भक्त मजकडेस दावी. मी दोनी हात वोढवी. रेटून सेवितां फेडी. अखेरशी तुझा पुण्याच्या पाशीं ऐसेंच घडेल.

सवाई जयसिंगाशी याशी आज्ञा :- तुह्मी पत्र पाठविलें तें प्र॥ होऊन संतोष जाहाला. नारायणाबराबरी पाठविले तें येणेंप्र॥ प्रविष्ट जाहालें :-

रजई पिवळी दमासाची, अस्तर
लाल ताफतेयाचे, आंत कापूस
घालून, फीत हिरवे, पाठविलेत
ते पावले.
दुलई किमकाफी, लाल अस्तर,
पिवळा ताका चिनाई फेरवान्
हिरवी.


बाबा ! दुलई पाठविलीत ते पाण्यांत घातल्यास मज योग्य नव्हे. बाबा धाकली घेतोस आणि कांठ मज देतोस ! एवढी तातड कशास केली ? उत्तमसें एक थान आणावें होतें, आंत दमासी पिवळेचें आस्तर घालावें होतें, व एक सकलाद उंचशी, ऐसे पाठवून देणें, चिनी साखर तूट आठ शेर, खडेसाखर तीन शेर तूट आली. कलयुगीं शाप थोर आहे. शितोळे यांचे शरीरसंबंधाविशी तुह्मी बाजीवर घातलें आहे. मजवरच घातलें असतें तरी तेथवर जाऊन त्याजला मी पदर पसरतो.