Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

प्रतापराव गुजर हाही एक घोडेस्वारांचा सेनापति होता. बागलाणांतील मोंगल फौजेचा व पन्हाळखोरींतील विजापूर सैन्याचा पराभव करण्याचें फार जोखमीचें काम शिवाजीनें याचेकडे सोंपविलें होतें. यानेंही ही कामगिरी आपल्या धन्याच्या मर्जीप्रमाणें बजाविली. शिवाजीनें मोंगल बादशहाशीं तह करून औरंगाबाद येथें जी मराठी फौज ठेविली होती त्यावरील मुख्य सरदार प्रतापरावच होता. विजापूरच्या सैन्याचा याणें नेटानें पाठलाग केला नाहीं म्हणून शिवाजीनें यास टपका दिला. ही गोष्ट प्रतापरावाच्या मनास फार झोंबली. विनापूरच्या सैन्याची व त्याची जेव्हां पुन: गांठ पडली तेव्हां तो त्या फौजेवर तुटून पडला. विजापूरच्या सैन्याचा यावेळी पूर्ण मोड झाला खरा, पण या कामीं प्रतापरावास तानाजी मालुसरे, बाजी फसलकर, सूर्याजी काकडे वगैरे लोकांप्रमाणें स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.

खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले, संताजी घोरपडे, धनाजी जाधव वगैरे शूर पुरुष यावेळीं नुकते कोठें समरांगणावर येऊं लागले होते. शिवाजीच्या पश्चात् यांची खरी योग्यता दिसून आली. यापैकी पहिल्या जोडीनें व-हाडांत मराठ्यांची सत्ता कायमपणें स्थापली. दुस-या जोडीनें अवरंगजेबास पादाक्रांत करून महाराष्ट्रास स्वतंत्र करण्याकरतां चालविलेल्या युद्धाचा शेवट गोड केला.

ह्या अशा लोकांच्या बलाची व अकलेची जोडगण होती ह्मणूनच शिवाजीस स्वराज्याची स्थापना करण्याचें कामीं मदत झाली. संकटकाळीं यापैकीं एकही वीर स्वकर्तव्यास विसरला नाहीं. एकही निमकहराम बनला नाहीं किंवा शत्रुपक्षास जाऊन मिळाला नाहीं. कित्येकांनी तर ' आपल्या कर्तव्यास आपण जागलों. ' असें म्हणून ऐन विजयाचे प्रसंगी मोठ्या आनंदानें आपले प्राण सोडले. ह्या स्वार्थत्यागांच्या गोष्टीवरून वरील लोकांची महती तर दिसून येतेच, पण त्याबरोबरच शिवाजीवरील त्यांचें विलक्षण प्रेम व ज्या सहत्कार्यासाठी ते झटत होते त्याची खरी योग्यताही दिसून येणारी आहे. इतक्या लोकांच्या श्रमानें ज्या राज्याची स्थापना झाली त्याची मर्यादा देणें अत्यंत जरूर आहे. १६७४ त शिवाजीस जेव्हां ज्याभिषेक झाला त्यावेळी स्वराज्याची मर्यादा बरीच वाढली होती. शहानीची पुणें प्रांतांतील जहागीर म्हणजे पुणें, सुपे, इंदापूर, बारामती हे परगणे, मावळचा सर्व भाग, वांई, सातारा, क-हाडपर्यंत सातार जिल्ह्याची पश्चिमेकडील सर्व बाजू, कोल्हापूरचा पश्चिम भाग, उत्तर दक्षिण कोंकणपट्टी व त्यांतील सर्व किल्ले, बागलाण, वेलोर, वेदनूर, म्हैसूर व कर्नाटकांतील ठाणीं इतक्या प्रदेशाचा त्यावेळी स्वराज्यांत अंर्तभाव होत होता. हा सर्व प्रांत शिवाजीच्या पश्चात् थोडक्याच दिवसांत मोंगलांनी पुनः काबीज केला. शिवाजीनें पुढच्या पिढीकरतां पैसा किंवा प्रदेश कायमपणें मिळवून ठेवला नाहीं. त्यानें जी संपत्ति मिळविली तिचें मोल कधींच करतां यावयाचें नाहीं. त्यानें महाराष्ट्रीयांत एकी करून त्यांच्या अंगीं एक प्रकारचा विलक्षण जोम आणला. त्यांच्या अंगीं असलेल्या गुणांची व शौर्याची त्यांस पूर्ण ओळख करून दिली. मुसलमानांचा पराभव करणें शक्य आहे हें त्यांच्या प्रत्ययास आणून दिल्हें. मराठ्यांत हा जो नवीन हिय्या उत्पन्न झाला त्यामुळेंच पुढें अवरंगजेबाशीं १६८५ पासून १७०७ पर्यंत सतत बावीस वर्षे टक्कर देऊन त्यांस स्वराज्याचे संरक्षण करतां आलें. शिवाजीच्या हाताखाली मराठ्यांच्या पुढा-यांस युद्धशिक्षण मिळालें नसतें तर अवरंगजेबाच्या तडाख्यांतून स्वराज्याची सुटका झाली नसती. शिवाजीच्या कारकीर्दीत सरासरी १०० लोक तयार झाले. प्रत्यक्ष समरांगणावर मिळालेल्या अनुभवानें हे लोक युद्धकलेंत अगदीं निष्णात झाले होते. राज्यनौका कशी हाकावी ही कलाही त्यांस पूर्ण अवगत झाली होती. असे १०० लोक जेव्हां तयार झाले तेव्हां त्यांचें अनुकरण करण्यास अर्थातच नवीन पिढी पुढें सरसावली. लोकांत नवीन तेज झळकूं लागलें. मुसलमानांस हाकून लावणें ह्मणजे यकश्चित् काम असें प्रत्येकास वाटूं लागलें. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, मोरोपंत पिंगळे वगैरे लोकांप्रमाणें स्वदेशसेवेंत आपले प्राण अर्पण करण्यास लाखो लोक तयार झाले. शिवाजी व त्यास सहायभूत झालेल्या लोकांनी घालून दिलेल्या अनुकरणीय कित्त्याचाच हा सर्व परिणाम नव्हे काय? हा परिणाम वाचकांस बरोबर कळावा म्हणूनच शिवाजीच्या चरित्राबरोबर त्याच्या साहाय्यकारी मंडळीचींही चरित्रें आह्मीं थोडक्यांत दिलीं. गुलामगिरींत दिवस गेल्यामुळें हताश झालेल्या महाराष्ट्रीयांत स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा यांचा अभिमान उत्पन्न करावा एवढ्याकरतांच शिवाजीचा अवतार होता. शिवाजीनें मिळविलेली संपत्ति व प्रांत संभाजीनें घालविले. पण शिवाजीनें लोकांत जें नवीन पाणी उत्पन्न केलें, त्याचे तेज बिलकुल कमी झालें नाहीं. जसजशीं नवीन संकटे येऊ लागलीं, तसतसा लोकांचा जोम अधिकच वाढत गेला. त्यांची शक्ति दुणावली. जयसिंग व दिल्लीरखान ह्यांच्या लहानशा फौजेपुढें शिवाजीस शस्त्र ठेऊन दिल्लीस जाणें भाग पडलें. पण शिवाजीनंतरच्या पिढीस खुद्द अवरंगजेब बादशहाच्या नायकत्वाखालीं तयार झालेल्या सेनासमुद्राशीं झुंजावयाचें होतें. तथापि ही नवी पिढी डगमगली नाहीं. अवरंगजेबास ते बिलकुल शरण गेले नाहींत. थोडा वेळ दक्षिणेकडे माघार खाऊन त्यांनीं पुनः त्याजवर चाल केली व त्याजपासून त्यांनी आपलें नुकसान सव्याज भरून घेतलें.

बाळाजी आवजी हा हबशाच्या पदरीं नोकरीस असलेल्या एका सरदाराचा वंशज होता. स्वतःचा जीव बचावण्याकरतां बाळाजी विश्वनाथाप्रमाणें ह्यासही आपले मुळचें गांव सोडून द्यावें लागलें होतें. १६४८ त शिवाजीनें याची हुशारी पाहून यांस आपला मुख्य चिटणीस केलें. याचा मुलगा व नातू यांणींही राजारामाचे कारकीर्दीत मोठमाठालीं कामे केलीं आहेत. चिटणीसांची ह्मणून जी बखर प्रसिद्ध आहे, ती यांच्याच घराण्यापैकीं एकानें लिहिली आहे.

मावळे सरदारांपैकीं येसाजी कंक हा मावळे लोकांच्या पायदळ पलटणींचा मुख्य अधिकारी होता. शिवाजीच्या कारकीर्दीच्या सुरवातीस मुलूख काबीज करण्याच्या कामी याचा फारच उपयोग झाला. हा व तानाजी नेहमी शिवाजीबरोबर असत. शिवाजीनें जेव्हां अफझुलखानास मारलें व शाईस्तेखानाच्या वाड्यांत शिरून जेव्हां शिवानीनें त्याच्यावर हल्ला केला, तेव्हां हे दोघेही शिवाजीबरोबर होते. शिवाजी दिल्लीस गेला तेव्हांही यांणी त्याची पाठ सोडली नाहीं.

तानाजी मालुसरे व त्याचा भाऊ सूर्याजी यांणी सिंहगड घेण्याच्या कामीं विलक्षण शौर्य दाखविलें आहे. जीवाची पर्वा न करतां हे दोन बंधू बेधडक सिंहगडच्या तटावर चढले व त्यांणी किल्ला सर केला. गड मिळाला पण तानाजी सिंह पडला. महाराष्ट्र कवीनीं याची कीर्ति वर्णिल्यामुळें या बंधुद्वयाची नांवें अजरामर झाली आहेत.

बाजी फसलकर देशमूख हा कोंकणांत सावतांशीं लढत असतां मेला. फिरंगोजी नरसाळा हा चाकणचा किल्लेदार होता. १६०४ त त्याणें तो किल्ला शिवाजीच्या स्वाधीन केला. जे लोक प्रथम शत्रू असून पुढें शिवाजीचे परममित्र झाले त्यांपैकींच बाजी फसलकर हा एक होता. मोंगलांनी चाकण पुनः घेतलें तेव्हां ते बाजी फसलकरास नोकरीस बोलवूं लागले. पण फसलकर त्यांच्या थापेस भुलला नाहीं. त्याणें शिवाजीच्या सैन्यांत नोकरी धरली.

संभाजी कावजी आणि रघुनाथपंत हे जावळीवर हल्ला करण्यांत प्रमुख होते. याच हल्लयांत चंद्रराव मोरे मारला गेला. येसाजी कंक जसा पायदळाचा मुख्य होता तसा नेताजी पाळकर हा घोडेस्वारांचा मुख्य सरदार होता. शिवाजीच्या सर्व सरदारांत हा फार धाडशी व बाणेदार होता. अहमदनगर, जालना, औरंगाबादेपर्यंत पूर्वेकडील सर्व प्रदेश याणें लुटून फस्त केला होता. कोठेंही संकटाची वेळ आली की, तेथें ही स्वारी दत्त असेच.

दत्ताजी गोपीनाथ हा मंत्री असून शिवाय वाकनीशीचें काम करीत होता. शिवाजीच्या खाजगीची सर्व व्यवस्था याचेकडेच असे. यासच । शिवाजीनें अफझुलखानाकडे वकीलीस पाठविलें. होतें. त्यावेळी यानें शिवाजीची फार महत्वाची कामगिरी बजाविली. मराठ्यांच्या इतिहासांत पुढें प्रसिद्धीस आलेला सखारामबापू बोकील हा या दत्ताजी गोपीनाथाचाच वंशज होय.

राघोजी सोमनाथाकडे व-हाड प्रांतांतील मुलूखगिरीचें काम होतें. कोंकणांतील लढाईवरही ते केव्हां केव्हां जाई. राघोजीचा बाप सोमनाथ हा डबीर असून परराष्ट्राशीं स्वराज्याचे हिताहितसंबंध पाहण्याचें कामही याजकडेच होतें. सोमनाथ मेल्यावर ही दोनही कामें शिवाजीनें जनार्दनपंत हणमंते यास सांगितली.
नीराजी रावजी हा न्यायाधीश होता व याचा मुलगा प्रल्हाद हा गोवळकोंड्याच्या दरबारीं शिवानीचा वकील होता. राजारामाच्या कारकीर्दीत प्रल्हादरावानें जिंजीस वेढा पडला असतां जिंजीचा बचाव फार उत्तम रीतीनें केला, म्हणून राजारामानें त्यास पंतप्रतिनिधि केलें.
जे प्रभू वीर व मुत्सुद्दी त्या काळीं उदयास आले त्यांत मुरारजी रावजी, बाजी प्रभू व बाळाजी आवजी ही त्रैमूर्तीच फार प्रसिद्ध आहे.

मुरारजी बाजी हा पंढरपूरचा किल्लेदार होता. दिलरखानानें जेव्हां पंढरपुरास वेढा घातला, तेव्हा या वीरानें मोठ्या शौर्यानें स्वत : चा प्राण खर्ची घालून त्या शहराचें संरक्षण केलें. बाजी प्रभू हा प्रथम शिवाजीच्या शत्रूच्यापक्षाकडील होता; पण पुढें ते शिवाजीचा फार विश्वासू नोकर बनला. आपला हातावर तुरी देऊन शिवाजी पन्हाळा सोडून रायगडास गेला हें वर्तमान समजतांच, शिवाजीस धरण्यास आलेल्या विजापूरच्या सरदारानें शिवाजीचा पाठलाग आरंभिला. मोंगलांच्या तडाक्यांतून सुटून शिवाजी रायगडास सुरक्षित कसा पोंचतो अशी प्रत्येकास भीति वाटूं लागली. प्रसंग फार कठीण आला, पण अशावेळीं बाजी प्रभूनें बाजू राखली. शिवाजी महाराज रायगडास सुखरूप जाऊन पोंचल्याच्या तोफा ऐकूं येईपर्यंत मुसलमान फौजेचा रस्ता बंद करावयाचा असा मनाचा पक्का निर्धार करून हा शूर वीर रस्त्यावरील एका अवघड खिंडीच्या तोंडाशी फक्त १००० लोकांनिशी उभा राहिला. विजापूर सरदाराच्या अवाढव्य सैन्यानें आपली होती नव्हती तेवढी अक्कल खर्च केली, पण या बहादरानें त्यास एक पाउलही पुढें टाकूं दिलें नाहीं. किती तरी जखमा लागल्यामुळें हा वीर रक्तानें अगदी न्हाऊन गेला होता. ह्यांच्या अंगीं उभा रहाण्याचीही ताकद राहिली नव्हती. तरीही रांगण्यावरील तोफ ऐकेपर्यंत त्याणें रणांगण सोडलें नाहीं. शेवटची तोफ ऐकली तेव्हां या वीरानें आपला प्राण सोडली. कायही स्वामिभक्ति आणि काय हा स्वदेशाभिमान. अशीं नररत्नें शिवानीच्या साहाय्यास नसतीं तर शिवाजीच्या हातून काय झालें असतें ? ग्रीसच्या इतिहासांत झर्झीजच्या सेनासागरापुढें ३०० स्पार्टन लोकांनी थर्मापायलीच्या खिंडीत दाखविलेला पराक्रम वाचून थक्क होणारे लोक या बाजी प्रभूस लीओनि:डमची योग्यता देतात यांत नवल नाहीं.

मोरोपंत पिंगळे तर शिवाजीचा उजवा हातच होता. उत्तर कोकणांत व बागलाणांत शिवाजीची सत्ता यानेंच वाढविली. ही महत्वाची कामगिरी बजाविल्याबद्दल शिवाजीनें त्यांस पेशवाईची वस्त्रें दिलीं. किल्ले बांधण्याच्या व सैन्य तयार करण्याच्या कामांत तो फार निष्णात होता. मोरोपंताचा बाप कर्नाटकांत शहाजीकडे नोकरीस होता. कांहीं दिवस बापाजवळ राहून मोरोपंताने कर्नाटकप्रांत सोडला व स्वदेशी येऊन त्याणें १६५३ त शिवाजीच्या सैन्यांत नोकरी धरली. यावेळीं त्याचे वय फारच लहान होतें. मोरोपंताच्या पूर्वी पेशवाईचें काम शामराजपंत पहात होता. त्याच्या हातून कोंकणप्रांतांत शिद्दी व सावंत यांणीं माजविलेला पुंडावा मोडवेना. तेव्हां त्या कामगारीवर शिवाजीनें मोरोपंतास पाठविलें. मोरोपंतानें ही कामगिरी उत्तम प्रकारे फत्ते केली. त्यावेळच्या बहुतेक सर्व लढायांत मोरोपंत हजर असे. शिवाजीच्या पाठीमागें मोरोपंत फार दिवस जगला नाहीं. बाळाजी विश्वनाथास शाहूमहाराजांकडून १७१४ त पेशवाईची वस्त्रें मिळेपर्यंत ' पेशवाई' मोरोपंताच्या घराण्यांत अव्याहत चालली होती. मोरोपंत हा राजकीय बाबतींत शिवाजीचा मुख्य सल्लागार असून शिवाय त्यावेळचा प्रसिद्ध सेनानीही होता. याच्याइतका हुशार व निस्सीम राजभक्त निदान त्यावेळच्या लोकांत तरी सांपडणार नाही.

आबाजी सोनदेवहीं हणमंते व पिंगळे यांच्याच तोडीचा माणूस होता. आपल्याच प्रदेशांत न घुटमळतां परमुलखांत बेशक शिरून कल्याणावर प्रथम याणेंच स्वारी केली. कल्याण वरचेवर मोंगल घेत, पण आबाजी सोनदेव यांच्या कोकणसुम्यांतील आघाडीचें ठाणें नेहमी हेंच असे मोरोपंताप्रमाणें आबाजी सोनदेवही किल्ले बांधण्याच्या कामांत मोठा कुशल होता. शिवानी दिल्लीस गेला तेव्हां मागें राज्यकारभाराचे कामीं जिजाबाईस सल्लामसलत देण्यास शिवाजीनें आबाजी सोनदेव व मोरोपंत यांसच सांगितलें होते. आबाजीस प्रथमतः मुझुमदारी च्या जागेवर नेमिलें. पुढें शिवाजीस जेव्हां राज्याभिषेक झाला तेव्हां आबाजीच्या मुलास अष्टप्रधानांपैकी अमात्याची जागा मिळाली.

राघोबल्लाळ अत्र्यानें शिंद्याबरोबर झालेल्या लढायांत बरीच कीर्ति मिळविली होती. चंद्रराव मो-याचा पराभव करण्याच्या कामांत हाच पुढारी होता. याचें शौर्य पाहून आपल्या पठाण पलटणीच्या आधिपत्याचा पहिला मान शिवाजीनें यासच दिला होता.
अण्णाजी दत्तोही यावेळीं फारच प्रसिद्धीस आला होता. हा प्रथमतः पंतसचिव व नंतर सुरनीस झाला. पनाळा व रायगड घेण्याच्या कामीं याणें फार मेहनत घेतली, कोंकणप्रांतांतील लढायांतही हा होता. कर्नाटकावर पहिली स्वारी याणेंच केली, व त्याचवेळी त्याणें हुबळी शहर लुटलें. कोंकणच्या उत्तरपट्टीची व्यवस्था आबाजी सोनदेव व मोरोपंत पहात. तळकोंकणची व्यवस्था अण्णाजीदत्तोकडे होती. शिवाजी दिल्लीस गेल्यावर मागें ज्या लोकांवर आपल्या राज्याचें रक्षण करण्याचें काम त्याणें सोंपविलें होते त्या लोकापैकींच अण्णाजीदत्तो हा एक होता.

कांहीं मुसलमानांवरही या नवीन विचारांचा परिणाम घडला. दर्यासुरुंग नांवाचा एक मुसलमानच शिवाजीच्या आरमाराचा मुख्य सरदार होता. यानें मोंगलाच्या शिद्दी तांडेलास अगदी जेरीस आणलें. इब्राहिमखान नांवाच्या एका मुसलमानाकडेच शिवाजीनें पठाण सैन्याचें अधिपतित्व दिलें होतें. विजापूर व गोवळकोंडा येथील दरबारांनी कमी केलेल्या मोंगल शिपायांस शिवाजी आपल्या नोकरीस ठेवी. अशा शिपायांची शिवाजीनें एक निराळीच पलटण बनविली होती.

शिवाजीच्या हाताखालीं ब्राह्मण, प्रभू, मराठे व मावळे किती होते; परस्पराशी त्यांचें काय प्रमाण होतें वगैरे गोष्टींची माहिती ग्रांट साहेबांनीं आपल्या इतिहासांत दिली आहे. ग्रांटडफ साहेब ह्मणतात कीं शिवाजीच्या सैन्यांत प्रमुख प्रमुख २० ब्राह्मण होते, ४ प्रभू होते व मराठे व मावळे सरदार १२ होते. मोंगलांच्या व विजापूर बादशहाच्या पदरींही १४ मराठे सरदार होते. ब्राह्मण मंडळींपैकी पंडितराव व न्यायाधीश हे दोन अधिकारी खेरीजकरून बाकी सर्वांस मुलकी दिवाणी कामें करून वेळ पडल्यास शिपाईबाणीचाही पोशाख चढवावा लागे. ही दोन्हीं कामे त्यांणीं फार उत्तम रीतीनें बनावलीं. ग्रांड डफनें दिलेले आंकडे बखरींत दिलेल्या आंकड्याशीं जुळत नाहींत, तथापि निरनिराळ्या जातींतील वर दाखविलेले प्रमाणांत त्यामुळें कांहीं अंतर होत नाहीं चिटणवीस यांच्या बखरींत. शिवाजीच्या हाताखालीं ब्राह्मण व प्रभू सरदार ५० व मावळे आणि मराठे सरदार ४० होते असे लिहिलें आहे. पण बखरीच्या शेवटी त्याणें जी यादी दिली आहे तींत ४५ ब्राह्मण व ७५ मावळे आणि मराठे लोकांची नावे आढळतात, ठोकळ मानानें पाहिलें तर सर्व जातींतील मिळून सरासरी १०० लोक शिवानीच्या कारकीर्दीत उदयास आले. मोंगलांस पादाक्रांत करून रायगड येथे स्थापलेल्या नवीन हिंदूपदपादशाहीचे खरे आधारस्तंभ हेच होते. या सर्व लोकांची चरित्रें आमच्या लहानशा इतिहासांत देणें अशक्य आहे. कारण तसें केलें तर ग्रंथ फार वाढेल. करितां ज्या लोकांनीं आपली नांवें प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या हृदयपटलावर कोरली आहेत, ज्यांच्या कीर्तीचे पोवाडे महाराष्ट्रांतील कवीनीं गाइले आहेत, ज्यांचीं अलौकिक कृत्यें बखरकारानीं बखरींत गोवून अक्षय्य करून टाकलीं आहेत अशा वेचक वेचक नरवीरांचींच चरित्रें आह्मीं लिहिणार आहोंत. यावरून इतरांची योग्यता आह्मीं कमी समजतों असें नाही. त्याणींही आपआपल्यापरी मोठीं शूर कृत्यें करून स्वदेशाच्या मुक्ततेस हातभार लाविला आहे.

ब्राह्मण मंडळींत हणमंते त्या वेळी फार नांवानलेले होते. दादोजीकोंडदेवाकडे जशी शाहानीच्या पुणें प्रांताची व्यवस्था होती, तशीच कर्नाटक प्रांताची व्यवस्था नारोपंत हणमंते यांजकडे होती. नारोपंताप्रमाणें त्याचे मुलगे रघुनाथपंत व जनार्दनपंतही फार हुशार होते. शिवाजीचा भाऊ व्यंकोजी यास तंजावर प्रांतीं एक नवीन राज्य स्थापण्यास विशेषतः रघुनाथपंतानेंच मदत केली. पुढें व्यंकोजीचें व त्याचें जेव्हां जुळेनासें झालें, तेव्हां त्याणें जिंजीचा किल्ला स्वाधीन करून घेऊन अर्काट, वेलोर व म्हैसूर प्रांतांतील कांही भाग यावर आपला अम्मल चालू केला. यांच्याच सांगण्यावरून शिवाजीनें कर्नाटकावर स्वारी केली. या स्वारीच्या वेळीं रघुनाथपंतानें आपल्या ताब्यांतील सर्व ठाणीं शिवाजीच्या हवालीं केलीं. संभाजीस कैद करून अवरंगजेब जेव्हां एकामागून एक मराठ्यांचे किल्ले घेऊं लागला, तेव्हां मराठ्यांस दक्षिणेंत पळ काढावा लागला अशा ऐन अडचणीचे प्रसंगी त्यांस दक्षिणेंतील या ठाण्यांचा त्यांस फार उपयोग झाला. कांहीं काळ तर त्यांणीं जिंजीकिल्याच्या मजबूत तटबंदीच्या आश्रयाखालींच काढला. अवरंगजेबाची खोड मोडण्याची त्यांची तयारी येथेंच झाली. येथूनच एकदिलानें व एकजुटीनें पुनः स्वदेशीं जाऊन त्यांनीं अवरंगजेबाचें पूर्ण पारिपत्य केलें. रघुनाथपंताचा भाऊ जनार्दनपंत हा तर खुद्द शिवाजीच्या सैन्यांतच होता. मोगलांशीं यांचे अनेक युद्धप्रसंग झाले आहेत. अशा प्रकारचे हे हणमंते बापलेक स्वामीकार्यास फार उपयोगीं पडले. यांच्यासारखे शूर आणि मुत्सद्दी पुरुष जगांत फार विरळा सांपडतील.

तोरणा किल्ला घेऊन व रायगडावर शिबंदी वगैरे ठेऊन महाराष्ट्र राज्यरूपी इमारतीच्या पायाचा दगड शिवाजीच्या हातून बसते न बसतो इतक्यांत दादोजी कोंडदेव वारला. जवळ जवळ दहा वर्षे शहाजीच्या जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेवाने पाहिली. इतक्या अवधींत त्याच्या हाताखाली बरेच लोक कारकुनीच्या कामांत तरबेज झाले. जसजसें स्वराज्य वाढत गेलें, तसतसा शिवाजीस या लोकांचा फार उपयोग झाला. आबाजी सोनदेव, रघुनाथ बल्लाळ, शामराजपंत मोरोपंत पिंगळ्यांचे वडील वगैरे मंडळीस मुलकी व लष्करी शिक्षण दादोजीनेंच दिलें होतें; हे लोक शिवाजीस नेहमीं प्रोत्साहन देत. यांचा तसाच अण्णाजी दत्तो, निराजी पंडित, रघोनी सोमनाथ, दत्तानी गोपीनाथ, रघुनाथपंत आणि गंगाजी मंगाजी वगैरे लोकांचा स्वराज्य स्थापण्याच्या कामीं शिवाजीस फार उपयोग झाला. स्वदेशाची यवनांच्या त्रासापासून सुटका करण्याची जी नवीन चळवळ महाराष्ट्रांत सुरु झाली होती त्या चळवळींत एखादी युक्ति अगर कल्पना सुचवावयाची झाली तर हेच लोक सुचवीत. ह्यांनी सांगितलेली कामगिरी धड्या छातीनें व बाहुबळानें तंतोतंत बजावण्याचें काम शिवाजीने बाळपणचे मित्र येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी फसलकर वगैरे मावळे बहादरांनी उचललें होतें. या मावळे बहादरांच्या पाठीस पाठ देण्यास फिरंगोजी नरसाळा, संभाजी कावजी, माणकोजी दहातोंडे, गोमाजीनाईक, नेताजी पाळकर, सूर्याजी मालुसरे. हिरोनी फर्जंद, देवजी गाढवे वगैरे मावळे मंडळी एका पायावर तयार होतीच; शिवाय या मंडळीस महाडचे मुरारबाजी प्रभू, हिरडे मावळांतील बानी प्रभू व हवसाणचे बाळाजी आवजी चिटणवीस वगैरे प्रमुख प्रमुख प्रभू येऊन मिळाले. मुरारप्रभू व बाजीप्रभू हे प्रथमतः मोंगलांकडे चाकरीम होते; पण शिवानीनें त्यांचें शौर्य पाहून त्यांस आपल्या सैन्यांत जागा दिल्या. शिवाजीच्या अंगी असा कांहीं विलक्षण गुण होता कीं, त्याच्या शत्रू सही त्याच्याशीं सख्य करून, इमानेंइतबारें त्याची नोकरी करावी असें वाटे. आरंभीं शिवाजीस मुख्यतः ब्राह्मण, प्रभू व मावळे लोकांची मदत होती. विजापूर आणि अहमदनगर या दोन दरबारच्या पदरी नोकरीस असलेल्या मुख्य मुख्य मराठे सरदारांनीं यावेळीं त्यास बिलकुल मदत केली नाहीं इतकेंच नव्हे, तर उलट त्याचा पायमोड करण्याची त्यांनी होईल तितकी खटपट केली, यामुळें निरुपाय होऊन त्यांच्यावरही शिवाजीस शस्त्र धरावें लागलें. या मराठे मंडळींत बाजी मोहिते ह्मणून शहाजीचा एक नातेवाईक होता. शिवाजीस सुपें घ्यावयाचे वेळीं त्याच्यावरही छापा घालून, त्यास कैद करून कर्नाटकांत पाठवावे लागलें.

मुधोळच्या बाजी घोरपड्यानें तर, नीचपणाची कमालच केली. विजापूर दरबारच्या चिथवणीवरून, त्यानें शहाजीस गुप्तपणें धरण्याचा घाट घातला. या कृत्याबद्दल शिवाजीनें त्यास भयंकर प्रायश्चित भोगावयास लावलें. जावळीच्या मो-यांनी शिवाजीचा खून करण्याकरतां विजापुरदरबारनें पाठविलेल्या एका पाजी ब्राह्मणास आपल्या प्रांतांत आश्रय दिला ही गोष्ट शिवाजीस कळली तेव्हां स्वतःचा जीव बचावण्याकरतां मो-यांस जमीनदोस्त करणें त्यास भाग पडलें. मो-यांचा सूड उगविण्याच्याकामीं शिवाजीस कुमार्ग स्वीकारावा लागला; पण याबद्दल शिवाजीस जबाबदार धरतां येत नाहीं. नीच' मनुष्यास योग्य शासन देण्यास प्रसंगी तसेच उपाय योजावे लागतात. कांट्यानेंच कांटा काढला पाहिजे. वाडीचे सावंत, कोंकणचे दळवी व शृंगारपुरचे शिरके आणि सुरवे वगैरे लोकांनीं, शिवाजीनें आरंभिलेल्या महत्कार्यात बरेच अडथळे आणले,यामुळें त्यांसही पादाक्रांत करून कह्यांत ठेवणें शिवाजीस भाग पडलें. फलटणचे निंबाळकर, ह्मसवडचे माने, झुंजारराव घाटगे वगैरे बडीबडी मराठे मंडळी, स्वदेशाची मुक्तता करण्यासाठीं सज्ज झालेल्या शिवाजीप्रभृति नवीन पक्षाशीं विजापूरच्या वतीनें सारखी लढत होती. या गोष्टींवरून असें सिद्ध होतें की, शिवाजीने अस्तित्वांत आणलेल्या या नवीन राष्ट्रीय चळवळीचा सर्व जोर कायतो मध्यम दर्जाच्या लोकांवरच अवलंबून होता. जुन्यानुन्या मराठे जाहागीरदारांनीं प्रारंभीं तरी या चळवळीस बिलकुल मदत केली नाहीं. जसा शिवाजीस जय येऊं लागला, तशी या जुन्या मराठे जहागीरदारांच्या घराण्यांतील तरुणबांड मंडळी शिवाजीस येऊन मिळाली. प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, शिदोजी निंबाळकर, संभाजी मोरे, सूर्यराव काकडे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, परसोजी रूपाजी भोंसले, नेमाजी शिंदे वगैरे मंडळी शिवाजीच्या कारकीर्दीच्या शेवटीं शेवटीं फार प्रसिद्धीस आली. ही नवीन राष्ट्रीय चळवळ सिद्धीस जाण्यास अशा थोर थोर मंडळीनीं जेव्हां कंबर बांधलीं, तेव्हां इतर सर्व दर्जाचे लहानथोर लोक तिच्याकरतां स्वत : च्या प्राणाचे बळी देण्यास तयार झाले; पण ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, महाराष्ट्राची सुटका करण्याच्या कामास, ज्यांस आह्मीं सूढ समजतों, अशा लोकांनीच प्रथम सुरुवात केली. त्यांणीं आरंभिलेल्या कार्यात त्यांस यश येणार, अशीं चिन्हें जेव्हां सर्वत्र दिसूं लागली तेव्हांच समाजाचे पुढारी ह्मणविणारे लोक त्यांस जाऊन मिळाले.

जिजाबाईनें शाबासकी दिली की, केलेल्या सर्व श्रमाचें सार्थक झाले असें त्यास वाटे व नवीन स्वा-या, शिकारी करण्यास त्यास अधिक हुरूप येई. जिनाबाईनें मांडीवर घेऊन पाजलेल्या गोड उपदेशामृतामुळेंच तो इतका धार्मिक बनला होता. जिजाबाईनें पाजलेल्या बाळकडूनेंच स्वकर्तव्याची त्यास पूर्ण ओळख करून दिली होती. जिजाबाई शिवाजीकडून नेहमीं भारतरामायणांतील युद्धकथा ऐकवीत असे. शहाजी मेला तेव्हां जिजाबाईनें सती जाण्याची तयारी केली. पण शिवाजीनें तिची अतिशय विनवणीकरून तिचा तो बेत फिरविला. शिवानी दिल्लीस गेला तेव्हां मागें जिजाबाईकडेच त्याणें सर्व राज्यकारभार सोंपविला होता. कोणत्याहि अवघड कामगिरीवर जावयाचें असलें ह्मणने शिवानी प्रथम जिजाबाईचा आशीर्वाद घेई. जिजाबाईही ‘ परमेश्वर तुझा पाठीराखा आहे, तो तुला यश देईल' असा त्यास धीर देऊन त्यास त्या कामगिरीवर जाण्यास निरोप देई. आई ज्याप्रमाणें मुलाच्या कोमल अंतःकरणावर उपदेशाचा ठसा उमटवील, त्याप्रमाणें मुलें बरीं वाईट निपजतात असा साधारण सिद्धांत आहे. आईनें दिलेल्या शिक्षणामुळेंच नेपोलियनादि नररत्नें वैभवास चढली. शिवाजी जो इतका उदयास आला त्यास कारण तरी बहुतांशीं त्याची आई जिजाबाईच होय. शिवाजीच्या आंगीं जें जें अलौकिक गुण होते, ते ते प्रायः त्यास जिजाबाईपासून प्राप्त झाले होते. जिजाबाईसारखी आई शिवाजीस मिळाली नसती, तर शिवाजीचें नांव आन पृथ्वीवर दुमदुमलें नसते.

जिजाबाईप्रमाणेंच दादोजीकोंडदेवाच्या शिक्षणाचाही शिवाजीच्या एकंदर अयुष्यक्रमावर बराच परिणाम घडला. दादोजीकोंडदेव हा पुणेप्रांतातील माळथान गांवीं जन्मला होता. त्याणें बरेच ठिकाणीं नोकरी केली असून यावेळीं हा पुणें प्रांतातील शहाजीच्या जहागिरीची व्यवस्था पहात होता. शहाजी कर्नाटकप्रांतीं असल्यानें शिवाजीच्या शिक्षणावर नजर ठेवण्याचें काम दादोजीकोंडदेवाचेंच शिरावर पडले. शहाजी हजर असता तर त्याणें जितक्या प्रेमानें व कळकळीनें शिवाजीस शिकविलें असतें तितक्या किंबहुना त्याहूनही कांकणभर जास्त कळकळीनें व प्रेमानें दादोजी कोंडदेवानें शिवानीच्या शिक्षणाबद्दल काळजी घेतली. दादोजीकोंडदेवाच्या तालमींत शिवाजी तयार झाला होता, म्हणूनच महाराष्ट्राची मुक्तता करण्याचें काम त्याचे हातून पार पडण्यास मोठी मदत झाली. दादोजी कोंडदेव मोठा विचारी चौकस व जपून वागणारा होता. शिवाजीचा उनाडपणा त्यास बिनकुल आवडत नसे. तथापि त्याचे शिवाजीवरील प्रेम काडी इतकेंही कमी झालें नाहीं. पुढें पुढें तर त्यास असें वाटू लागलें की सामान्य मनुष्यास लागणा-या कसानें शिवाजीची परिक्षा करतां कामानये. तरुण शिवानीच्या मनांत ने विचार, व ज्या कल्पना रात्रंदिवस घोळत होत्या, ते विचार व त्या कल्पना यद्यपि सिद्धीस गेल्या नाहींत, तरी त्या सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करणें कांहीं कमी यशस्कर नाहीं अशी दादोजीची हळूहळू खात्री होत चालली. दादोजीसारख्या शिक्षकाचा वचक नसता, तर शिवाजीचा उच्छृंखलपणा बेताल झाला असता. दादोजी कोंडदेवानें जरूर तेवढी राजनीति व युद्धनीति ही शिवाजीस शिकविली होती. भिकार रेम्याडोक्या मावब्यांना व मराठ्यांना शूर लढवय्ये कसे बनवावेत व त्यांवर आपली छाप कशी ठेवावी वगैरे अमेलिक कलाही शिवानीस दादोनीकडूनच । मिळाल्या होत्या. राज्यकारभारांत तर दादोजीचा हात धरणारा कोणीच नव्हता. शहाजीच्या जहागिरीची देखरेख दादोजी कोंडदेवाकडे येण्यापूर्वी तींत फारच अव्यवस्था होती. दुष्काळामुळें लोक अन्नास महाग झाले होते. जहागिरीच्या सरहद्दीवर मोंगलांचे व विनापूर बादशहांचे तंटे सारखे सुरू असल्यानें बहुतेक मुलूख उजाड झाला होता. लांडग्यांच्या व चोरट्यांच्या त्रासामुळें शेतीभाती करणें अत्यंत कठीण झालें होतें. प्रत्यक्ष पुणेंही ओसाड पडलें होतें. दादोजीकडे व्यवस्था येतांच त्यानें ही सर्व बंडाळी एकदम मोडली. बक्षिसें वगैरे लावून सर्व लांडगे मारविले. चोरट्यांचा बीमोड करून टाकला. यामुळें जहागिरींतील सर्व खर्च भागून हळूहळूशिल्लक पडूं लागली. जसजशी शिल्लक वाढत गेली तसतसें दादोजीनें सैन्य वादविलें. नवीन बारगीर ठेविले. किल्यांची डागडुजी केली व त्यांच्या संरक्षणार्थ शिबंदी ठेवली. याप्रमाणें जहागिरींत सर्वत्र शांतता होऊन लोकांच्या प्राणाचें व वित्ताचें योग्य संरक्षण होऊन गेल्यानें पुणें, सुपें, बारामती इंदापूर व मावळ वगैरे जहारींतील सर्व परगण्यांतील लोक आनंदाने नादू लागले. बागायताचें पीक अधीक होउं लागले. फळ झाडाची लागवड वाढली. शिवापूर येथें आज मितीस आढळणाच्या बागा दादोजी कोंडदेवाचे वेळींच तयार झालेल्या आहेत. या बागा पाहिल्या ह्मणने दादोजी कोंडदेवाच्या शहाणपणाची बरोबर साक्ष पटते. दादोजीचा अमल फारच करडा होता. त्यास एक वेळ आपल्या धन्याच्या ह्मणने शहानीच्या बागेंतील एक आंबा तोडावा अशी इच्छा झाली. त्याबरोबर धन्याच्या परवानगी वांचून त्याच्या बागेंतील आंबा तोडण्यास सरसावलेला आपला उजवा हात एकदम तोडून टाकण्यास त्याणें जवळ असलेल्या लोकांस फर्माविले. जवळच्या लोकांनी त्याचें एकलें नाही. त्यास चार गोष्टी सांगून त्यांणीं त्याच्या हाताचे संरक्षण केलें. पण हा पापी हात लोकांस नेहमीं दिसावा ह्मणून त्या हातांत तो अस्तनी घालीनासा झाला. पुढें शहाजीच्या सांगण्यावरून त्याणें हा वेडेपणा सोडला. शहाजी, मालोजी प्रमाणें शिवाजीस एक मोठा बलाढ्य मराठा सरदार करावा एवढीच दादोजीची इच्छा होती. प्रमुख मराठे सरदारांत एकी करून मोंगलाच्या त्रासांतून स्वदेशास सोडवावें ही कल्पना शिवाजीप्रमाणें त्यावेळी दादोजीच्या मनांत आली नव्हती. पण हें महत् कार्य शेवटास नेण्यासारखी शिवाजीच्या अंगीं योग्यता आहे अशी जेव्हां त्याची खात्री झाली, तेव्हां त्यानें आपला आग्रह सोडला व शेवटीं ‘ आरंभलेल्या सत्कार्यात तुला जय येवो।' असा शिवाजीस आशीर्वाद देऊन त्यानें आपला देह ठेविला. जमीन महसूलाच्या, तसेंच राज्यव्यवस्थेच्या बाबींत शिवाजीनें दादोजीचेंच वळण उचललें होतें. फार काय, आमच्या या उल्लू शिवाजीम दादोजीसारखा धूर्त वाटाड्या मिळाला नसता तर शिवाजीच्या हातून स्वराज्यवृक्षाची लागण कदाचित् झाली नसती; निदान त्या राज्यवृक्षास इतका चिरस्थायीपणा तर खास आला नसता.

ज्या लोकांची चरित्रें लिहिण्याचे आह्मी योनिलें आहे, त्या सर्वांत जिजाबाईस मुख्य स्थान दिलें पाहिजे. फार प्राचीन कालापासून महाराष्ट्रांत प्रसिद्ध असलेल्या यादवे घराण्यांत जिजाबाईचा जन्म झाला असून तिचा बाप त्यावेळचा एक मोठा मानी मराठा सरदार होता. जिजाबाईच्या लग्नाची हकीगत फार मौजेची आहे. ह्या हकीगतीवरून त्या वेळच्या लोकांचा मानी आणि करारी स्वभाव पूर्णपणें व्यक्त होतो. एकेवेळीं मालोजीचा मुलगा शहाजी व जिजाबाई हीं दोन लहान मुलें गमतीने खेळत होतीं. त्यांच्या त्या खेळाचें कौतुक पहात असतां जिजाबाईचा बाप जाधवराव मालोजीस सहजगत्या ह्मणाला ‘ पहा हा जोडा किती नामी दिसतो.' मालोजीनें ही गोष्ट लक्षांत ठेऊन जिजाबाईस मागणी घातली. मालोजीसारख्या कमी दर्ज्याच्या मराठ्याच्या मुलास आपली मुलगी द्यावी ही गोष्ट जाधवराव यास न रुचून त्यानें जिजाबाईस शहानीस देण्याचें नाकारलें. मालोजीस हा अपमान अगदी सहन झाला नाहीं. जाधवरावाच्या बळाबळाचा विचार न करतां जाधवरावाचा गर्वपरिहार करण्याच्या उद्योगास तो लागला व शेवटीं जाधवरावासही त्याणें आपलें वचन खरें करण्यास लावलें. केवढें हें धैर्य आणि काय हा स्वाभिमान ! जाधवराव जसा आपला संबंध देवगिरीच्या यादव राजघराण्याशी जोडी, तसा शहाजीही उदेपूरच्या रजपूत राजघराण्याशीं आपला संबंध जोडित असे. जिजाबाई थार कुलांत उत्पन्न झाली होती व तिचा शरीरसंबंधही थोर घराण्याशी झाला होता. पण एवढ्याच गोष्टीवर तिची थोरवी अवलंबून नव्हती. तिच्या थोर पणास तिच्या आंगचे गुणच कारण होते. ती यःकश्चित् कुलांत उपजती तरीही तिचे अलौकिक गुण झांकतेना. मालोजीनें केलेला पाणउतार जाधवरावाच्या मनांत एकसारखा डांचत होता. त्या वेळेपासून भोसल्याचा तो नेहमीं हेवा करी. पुढें काही दिवसांनी अहमदनगर व दौलताबाद या दोन दरबारांतील सर्व कर्तुमकर्तु' शक्ति जेव्हां शहाजीच्या हातीं आली, तेव्हां तर जाधवरावाच्या हृदयांत फार दिवस धुमसत असलेला हा मत्सराग्नि अधिकच भडकला. मोंगलास मिळून त्याणें शहाजीस अहमदनगरच्या बचावाचें काम सोडून देण्यास भाग पडलें शहाजीनें निरुपायानें आपली बायको जिजाबाई इला तिच्या बापाच्या कैदेंत एकटी सोडून विजापूरची वाट धरली, पण जाधवरावानें त्याचा पाठलाग करण्याचें सोडलें नाही. जिजाबाईवर तर हें एक मोठें संकट येऊन गुदरलें. त्या वेळीं तिला दुसरा कोणाचाही आसरा नव्हता. त्यामुळें स्वतःच्या हिमतीवरच तिला दिवस काढावे लागले. असे दिवस काढीत असतां पारतंत्र्यामुळें होणा-या अपमानांचा तिला पूर्ण अनुभव आला. त्यातून याचवेळीं ती शिवनेर येथें बाळंत झाली व तिच्या पोटीं शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या बाळ शिवाजीच्या जिवावर जिजाबाई आपली सर्व दुःखें विसरली. ज्या देवी भवानीनें ऐन आणीबाणीचे वेळीं तिच्या व तिच्या लहान अर्भकाच्या प्राणाचें संरक्षण केलें, त्या देवी भवानीवर पूर्ण विश्वास ठेऊन तिनें शिवाजीस लहानाचा मोठा केला. पुढें काहीं दिवसांनी शहानीस विचारून जिजाबाई पुण्यास जाऊन राहिली. दादोजी कोंडदेव या वेळी शहाजीच्या पुणें प्रांतांतील जहागिरीची व्यवस्था पहात होता. पुण्याच्या आसपासच्या डोंगराळ व पहाडी प्रदेशांत शिवाजीचा लहानपणाचा बहुतेक काळ गेला असल्यानें, शिवाजी मोठा काटक, सोशिक व धाडशी झाला होता. शिवाय जिजाबाईनेंही दिवसकाळ जाणून त्यास अशाच प्रकारचें शिक्षण दिलें होतें. शिवाजीचें जिजाबाईवर अतोनात प्रेम असे. त्याचा बाप शहानी विजापूर तंजावराकडे असल्यामुळें जिजाबाईचाच त्याम नेहमीं सहवास असे. प्रत्येक गोष्टींत तो जिजाबाईची सल्ला घेई.

बीं कसें बळावले ?
प्रकरण ४ थे.

गेल्या भागांत जी तोटक हकीगत दिली आहे, त्यावरून मराठ्यांची पांगलेली शक्ति एकत्र करून ज्या वीरनायकानें मराठी साम्राज्याची स्थापना केली, त्या वीरनायकाच्या आंगच्या अलौकिक गुणांची वाचकांस बरीच ओळख झाली असेल. शिवाजी महाराजांचा उदय झाला नसता तर मराठेशाई ' मुळी अस्तित्वांतच आली नसती असें कदाचित् आमच्या वाचकांस वाटेल, पण हा त्यांचा समज चुकीचा आहे. शिवाजीस सर्व बाजूने मदत मिळाली नसती तर त्याच्या एकट्याच्या हातून पारतंत्र्यापासून महाराष्ट्राची कधींच सुटका होतीना. जमीन बरोबर नसती तर त्याणें पेरलेलें बीं वाळून किंवा कुजून गेलें असतें. मोगल अमदानीचा कष्टमय अनुभव मिळूनही त्या वेळचे कर्तेलोक शिवाजीस मदत करण्यास राजीखुषीनें तयार झाले नसते तर शिवाजी सारख्या अचाट बुद्धीच्या मनुष्याचेही प्रयत्न निर्फल झाले असते. शिवानीच्या मनोवेधक चरित्रानें एतद्देशीय व परदेशीय सर्व इतिहासकारांस इतके अंध बनविलें आहे कीं, शिवाजीस सहायभूत झालेल्या लोकांचे त्यास बिलकुल महत्व वाटत नाहीं. तत्कालीन पुरुषांच्या अंगी अढळून येणारी शक्ति, बुद्धी आणि महत्वाकांक्षी शिवाजीच्या अंगी जरा विशेष प्रमाणानें विकास पावली होतीं. यावांचून शिवाजीच्या अंगी कांहीं विशेष नव्हतें. शिवाजीनें जें बीं रुझविलें त्यास पाणी घालून त्याची त्यावेळेच्या कर्यासवत्यो पुरुषानीं योग्य जोपासना केली नसती तर, महाराष्ट्रराज्यवृक्ष मुळींच बनला नसता, ही गोष्ट त्यांच्या अगदी लक्षांत येत नाहीं. त्यावेळच्या प्रसिद्ध पुरुषांची शिवाजीस किती मदत झालीं हें मोठ्या मोठ्या इतिहासकारांस जर कळत नाहीं तर आमच्या वाचकांस कसें कळावे ? पण शिवाजीच्या चरित्राची व त्याच्या वेळच्या परिस्थितीची बरोवर माहिती होण्यास ही गोष्ट कळणें अत्यंत जरूर असल्यामुळें, शिवाजीच्या वेळीं प्रसिद्धीस आलेल्या शूर शिपायांची मुत्सद्यांची व धर्मोपदेशकांची त्रोटक चरित्रें या भागांत देण्याचे आह्मीं योजिलें आहे. या पुरुषांचीं चरित्रें लिहिण्यास असावी अशी साधनें उपलब्ध नाहींत. जी थोडीबहुत माहिती मिळते तेवढ्यावरच हें काम करणें भाग पडत आहे. पण इलाज नाहीं.

स्वार्थास झुगारून देणारा जाज्वल्य धर्माभिमान, आरंभिलेल्या महत्कार्यात परमेश्वर आपला पाठीराखा आहे असा पूर्ण विश्वास असल्यानें उत्पन्न झालेलें विलक्षण धैर्य व धाडस, महाराष्ट्रीयांस बंधुप्रेमानें जखडून टाकून त्यांस विजयश्रीच्या गळ्यांतील ताईत बनविणारी अलौकिक शक्ति, त्यावेळच्या उणीवा तेव्हांच समजण्यासारखी दुर्मिळ कुशाग्र बुद्धि, कितीही संकटे आली तरी हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा कृतनिश्चय, यूरोपांतील किंवा हिंदुस्थानांतील कोणत्याही इतिहासप्रसिद्ध पुरुषांत आढळून न येणारें प्रसंगावधान व योजना, खरा खदेशाभिमान आणि सदयतेनें न्याय करण्याची इच्छा हे गुण शिवानीच्या अंगीं होते, ह्मणूनच ज्या सत्तेनें पुढें त्याचे सर्व हेतु सिद्धीस नेऊन दिगंत कीर्ति मिळविली व हिंदुस्थानच्या इतिहासांत मराठ्यांचे नांव अजरामर करून टाकलें, अशी सत्ता स्थापन करतां आली. मराठी साम्राज्याच्या संस्थापकाच्या स्वभावाचें आपण येथपर्यंत थोडक्यांत परीक्षण केलें. त्याच्या स्वभावाची आपणास बरीच ओळख झाली. आतां आपणास या वीरनायकाचें चरित्र बरोबर समजेल, व त्याचे हातून घडलेल्या कांहीं विवक्षित गोष्टींच्या योग्यायोग्यतेचा विचार करण्यास मुळींच अडचण पडणार नाहीं.