Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
हीं सर्व संकटें टळलीं व लोकांना जें नवीनच वळण लागलें त्याचें सर्व ' श्रेय औरंगजेबाच्या महत्वाकांक्षेसच दिलें पाहिजे. औरंगजेबानें महाराष्ट्रांतील लोकांचें अंतःकरणरूप पाणी अगदीं खेलपर्यंत ढवळून त्यास चेतना आणली, व वीस वर्षे चाललेल्या लढाईपासून त्यांना जें तीव्र शिक्षण मिळालें, "त्यायोगानें त्यांच्या पुढा-यांच्या राष्ट्रीय व स्वदेशनिष्ठ उपजत बुद्धी एकवट होऊन पुढच्या तीन पिढ्यांत त्यांना हिंदुस्थानच्या दूरदूरच्या भागाचें स्वामित्वही प्राप्त झालें. या बाबतींत वरील स्वातंत्र्याच्या युद्धापासून पुष्कळ फायदा झाला. तसा फायदा शिवाजीनें सुरू करून आपल्या विविधरूप कारकीर्दीभर चालविलेल्या लढाईपासूनही झाला नाहीं. असल्या भयंकर शत्रूशीं चाललेल्या या महायुद्धांत केवळ पुंड व लुटारू लोकांस यशःप्राप्ति होताना. धडाडीचें शौर्य, उदात्त सहनशीलता, राज्यकार्यकौशल्य, प्रत्येक निराशेबरोबर जास्त जास्त वाढणारी उमेद, कधींही न ढळणारा विश्वास, व्यक्ति, स्थल, काल इत्यादिकावर अवलंबून नसणारी आपल्या परमसाध्याचे ठायीं भक्ति, समान संकटाच्या वेळची बंधुता, सर्वांच्या कल्याणाकरितां झीज --- व स्वार्थत्याग करणें याची चाड, आपण धरलेला पक्ष हा अ --- धर्माचा पक्ष म्हणून अखेरीस जय मिळालाच पाहिजे, अशी --- इत्यादि देशांतल्या थोरथोर मनुष्यांच्या अंगांतील सद्ग---- शक्तीच्यायोगानें --सिद्धीस आले ती शक्ति फार उदात्त व --- असली पाहिजे. या पिढींतील स्वदेशभक्त लोक आपल्यावर आले--- संकटापासून देशाची सुटका करण्यास याच सद्गुणानें समर्थ झाले. हिंदुस्थानांतील दुस-या कोणत्याही ज्ञातींतील लोक या आलेल्या संकटाचा नुसता प्रतिबंध करण्याससुद्धां समर्थ झाले नाहींत. मग सुटकेची गोष्ट लांबच. हे सद्गुण शिकाविण्याची पाठशाला व तीव्र परंतु पथ्यकर शासनपद्धति, या दृष्टीनें पाहिलें तर हा स्वातंत्र्य-युद्धाचा काल मराठ्यांच्या इतिहासांत अत्यंत घडामोडींचा होऊन गेला असेंच नेहमीं मानलें जाईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर लवकरच त्याचा मुलगा अझिमशहा यानें झुलपिकारखान यांच्या सल्ल्यावरून शाहूची सुटका केली, व त्यास मराठ्यांनीं आपला राजा कबूल केल्यास शाहूच्या आजानें विजापुरकरांकडून जिंकून घेतलेला “ स्वराज्य " नांवाचा प्रदेश त्याला देऊन भीमा व गोदावरी यांच्यामधील जहागिरीही देऊं असें वचन दिलें. मराठे सरदारांनीं “ शाहू आपला राजा " असें कबूल केलें व त्याला इ० स० १७०८ सालीं सातारा मुक्कामीं राज्याभिषेक केला. पुढें थोड्या वर्षांच्या आंतच शाहू महाराष्ट्राचा पूर्ण मालक झाला. फक्त कोल्हापूरप्रांत मात्र राजारामाच्या मुलाकडेच राहिला. दक्षिणेंतील मोंगलाच्या सुभेदारानें सहा परगण्यावरील चौथाईचा व सरदेशमुखीचा शाहूचा हक्क कबूल केला, व पुढील दहा वर्षांत बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि खंडेराव दाभाडे-सणें चौथाई, सरदेशमुखी व स्वराज्य याबद्दलच्या योग्य सनदाही करून घे--पल्या
येणेंप्रमाणें या वीस वर्षेपर्यंत चाललेल्या ' स्वातंत्र्याच्या युद्धा-- शेवट गोड झाला. या युद्धापासून जीं फळें मिळालीं त्यांवरून पाहिलें-- असें दिसतें कीं, हीं वीस वर्षे ह्मणने मराठ्यांच्या इतिहासातील अति--- कीर्तिकर काळ होय. शिवाजीची गोष्ट निराळी. मोंगलांच्या एकंद-- सैन्याशीं शिवाजीस कधींही युद्ध करावें लागलें नाहीं. वास्तविक मोंगलांचा सरदार जयसिंग यानें जेव्हां त्यास अगदीं पेंचांत आणिलें तेव्हां स्वार्थत्याग करून शिवाजी खरोखर त्यांना शरणच गेला. शिवाय दक्षिणेंतील दोन राजांचा त्याला चांगला पाठिंबा असून मोंगलांना त्रास देण्यास त्यांचा त्याला उपयोग होई. इतकें असून लढाई करावयाची तीही डोंगिरी किल्ल्यांचा आश्रय धरून करावयाची. या सर्व गोष्टींत वरील स्वातंत्र्याचें युद्ध करून ज्या स्वदेशभक्तांनीं जय मिळविला, त्यांना कोणत्याही प्रकारें अनुकूल स्थिति नव्हती. शिवाजीचा स्वभाव व त्याचे पराक्रम यांच्यामध्यें कांहीं दैविक शक्ति असून, त्याच्या देशबांधवापैकीं एकाच्या हातूनही त्यास प्रतिबंध करितां आला नाहीं. असा एकादा पुढारीसुद्धां, वरील स्वदेशभक्तांना मिळाला नाहीं. मोंगलांच्या एकंदर सैन्याशीं त्यांना झुंझावें लागलें. त्या प्रबळ सैन्याचें अधिपत्य खुद्द , औरंगजेब बादशहाकडे. हिंदुस्थानांतील संपत्तीचीं साधनेंही त्याच्याच ताब्यांत. संभाजीच्या अति क्रूर व गैरशिस्त वर्तनामुळें त्यांच्यांतील अतिशय अनुभविक पुढारी मारले जाऊन त्याच्या अव्यवस्थेमुळें किल्ल्यांचीसुद्धां चांगली तयारी नव्हती. त्यांचा राजा मोंगलांच्या अटकेंत असून, स्वदेशांतून हाकलल्यामुळें परदेशांत जाऊन त्यांना आश्रय शोधावा लागला. वसूल नाहीं, सैन्य नाहीं, किल्ले नाहींत व द्रव्य मिळविण्याचें कोणतेंही साधन नाहीं, अशी स्थिति असतांही त्यांनीं नवें लप्कर जमा केलें, शत्रूपासून किल्ले परत घेतले व ---- जिंकण्याची एक नवीनच पद्धत काढली. तिच्यायोगानें त्यांना--- य मिळालें एवढेंच नव्हे, तर महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेशांत---- व सरदेशमुखी हेही हक्क मिळाले. ही लढाई करण्याची नवीन ---- न ती अमलांत आणणा-या लोकापैकीं राजाराम, प्रल्हाद निराजी,----ना घोरपडे इत्यादि पुष्कळ लोक हा झगडा चालू असतांच मृत्यु -----वले, पण त्यांची जागा ज्यांनीं घेतली, त्यानींही कळकळीनें काम करून शेवटीं यश संपादन केलें. औरंगजेबानें महाराष्ट्रावर स्वारी करून ही लढाई जशी जोरानें चालविली तशी चालविली नसती तर तंजावर येथील छोटेखानी संस्थानासारखेंच एक संस्थान पश्चिम महाराष्ट्रांतही स्थापलें गेलें असतें व त्या संस्थानचा राजा ह्मणने आपल्या पदरच्या बड्या सरदारांपैकीं एक सरदार आहे असें मानण्यास त्यास फावलें असतें. शिवाजीनें उत्पन्न केलेला हुरूप पुढच्याच पिढीला नष्टंप्राय होऊन गेला असता. एकोप्यानें न राहतां फूट करून राहण्याची जी प्रवृत्ति नेहमीं जोरांत आहे, तीच चालू राहून.मराठी राष्ट्राची रचना अशक्य झाली असती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
इ. स. १७०० मध्यें मराठ्यांच्या संरक्षणाचे कामीं ज्यांचा विशेष उपयोग झाला, ते किल्ले जमीनदोस्त करण्याचा औरंगजेबानें निश्चय केला. याकरतां तयार केलेल्या सैन्याचें आधिपत्य स्वतःकडे घेऊन झुलपिकारखानानें राजारामाच्या सैन्याशीं मैदानावर सामना द्यावा असा त्याला हुकूम दिला. याप्रमाणें किल्ल्यामागून किल्ले काबीज करून त्यानें अखेरीस साता-यास वेढा दिला. प्रयागजी प्रभूनें पुष्कळ वेळ मोठ्या शौर्यानें किल्लयाचें रक्षण केलें, पण शेवटीं किल्ला औरंगजेबाचे हातीं आला. याच सुमारास सिंहगड मुक्कामीं राजाराम मरण पावला व शाहू अजून मोंगलाच्या छावणींत अटकेंत असल्याकारणानें राजारामाचा वडील मुलगा दहा वर्षांचा होता त्यास गादीवर बसवून रामचंद्रपंत पूर्वीप्रमाणें राज्याची व्यवस्था पाहूं लागले. धनाजीस कर्नाटकांतून परत बोलाविलें व त्याच्या आणि रामचंद्रपंताच्या देखरेखीखालीं मराठे सरदार पूर्वीसारखेच नेटानें लढाई चालवून सर्व मुलखांतून चौथाई, सरदेशमुखी व घासदाणासुद्धां वसूल करीत. इकडे बादशहाही हट्टास पेटला व त्यानें सुरूं केलेलें युद्ध तसेंच चालू ठेवून चार वर्षांत छापे घालून किल्ल्यामागून किल्ले घेतले. परंतु औरंगजेबानें धरलेला हा मार्ग त्यास हितावह नसून उलट जाचकच झाला. किल्ल्यांतून बाहेर पडल्यावर मराठे सर्व देशभर पसरले. खानदेश, व-हाड व गुजराथ या प्रांतांवर त्यांनी स्वारी केली. एक टोळी तर नमदा उतरून माळव्यांत शिरली व तेथेंच तिनें आपलें कायमचें ठाणें दिलें. सरतेशेवटीं इ. स. १७०५ मध्यें औरंगजेबाच्या लष्करी व मुलकी सल्लामसलतगारांनीं, मराठ्यांबरोबर तह करावा, अशी त्याला सल्ला दिली. त्यानें बादशहाचें मन थोडेसें वळलें, व महाराष्ट्रांतील सहा सुम्यांतील सरदेशमुखीचा हक्क मराठ्यांनीं घेऊन त्याबद्दल महाराष्ट्रांत व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी त्यांचेवर असावी अशा शर्तीवर त्यांच्याशीं बादशहा तह करण्यास कबूल झाला. आपल्या पदरच्या शिंदे व जाधव या मराठे घराण्यांतील दोन मुलींशीं बादशहानें शाहूराजाचें लग्न करून त्याला अक्कलकोट, इंदापूरनिवासें व बारामती या जहागिरी अंदण दिल्या. परंतु मराठ्यांनीं आपल्या मागण्या वाढविल्यामुळें हें तहाचें बोलणें तसेंच तहकूब राहिलें. मोंगलांनीं लढाईचें काम जेमतेम चालूं ठेविलें. पण मराठ्यांनीं पिमळा परत आपल्या स्वाधीन करून घेऊन, आपला राजा शिवाजी व त्याची आई ताराबाई यांचे राहण्याचें ठिकाण केलें. पावनगड, वसंतगड, सिंहगड, राजगड व सातारा हे किल्ले मोंगलांकडून परत घेतले व पुढें (इ. स. १७०७) धनाजीनें पुणें व चाकण हीही घेतलीं. याप्रमाणें औरंगजेबाचे सर्व बेत फसले, तेव्हां मराठेमंडळांत फाटाफूट करण्याच्या इच्छेनें शाहूच्या हातून स्वतःचे सहीचें एक पत्र मराठे ---नरांस, त्यांचे आपण राजे या नात्यानें, लिहविलें. त्यांत मरा...नीं बादशहास शरण यावें असा उपदेश केला होता. हा बादश---चा अगदीं शेवटचा, निरुपाय होऊन केलेला प्रयत्न, पण त्याचासुद्धां कांहीं उपयोग झाला नाहीं. औरंगजेब जिवंत असेपर्यंत शाहूच्या सुटकेविषयीं कांहींच प्रयत्न झाला नाहीं. पण त्यानें लावलेलें तहाचें बोलणें, व त्याच्या सांगण्यावरून शाहूनें लिहिलेलीं पत्रें, यांवरून असें दिसतें कीं, आज वीस वर्षेपर्यंत मराठ्यांविरुद्ध युद्ध चालविलें, ही आपण अनर्थकारक चूक केली अशी बादशहाची खात्री झाली. त्याचें भव्य सैन्य निरुपयोगी झालें, पुष्कळ ठार झालें; त्याचा स्वतःचा तंबू लुटून नेला. खुद्द बादशहाही पकडला जाण्याच्या अगदीं बेतांत होता. तेव्हां अहमदनगर येथें मरतेवेळीं “आपला जन्म फुकट गेला '' असे जे बादशहानें उद्गार काढले ते निष्कारण नव्हते. बिचारा बादशहा ! सर्व आशा व महत्वाकांक्षा यांच्या चुराड्याखालीं खंगलेला-अखेरीस इहलोक सोडून चालता झाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
पवार, चवाण, थोरात व आठवले यांनी या अडपझडप लहान मोठ्या चालवलेल्या युद्धांत पुष्कळ जय मिळविल्यामुळें जिंजी येथील दरबाराकडून त्यांचा पुष्कळ मान झाला. इ. सन १६९३ त औरंगजेबास भीमा नदीवर आपल्या छावणाना तळ देणें अवश्य वाटल्यावरून त्यानें तिकडे मोर्चा फिरविला व आपल्या पुत्रास व मुख्य प्रधान असुदखान यांस जिंजीवर पाठविले
इ. सन १६९४ सालीं संताजी घोरपडे याचे हाताखालीं, मराठ्यांनीं औरंगजेबाच्या छावणीच्या उत्तरेकडील मुलूख लुटला, व रामचंद्रपंतांनीं पश्चिमेस सोलापुरापर्यंत लढाई चालविली. इ. सन १६९५ त परसोजी भोंसले व हैबतराव निंबाळकर यांना, दिल्लीहून येणा-या बादशहाच्या पलटणींना त्रास देत रहावें ह्मणून व-हाड व गंगथडी या प्रांतांतच सोडून संताजीनें आपण स्वतः कर्नाटकापर्यंत चाल करून वेढा घातलेल्या लोकांवर हल्ला केला आणि त्यांस पिटाळून लाविलें, व धनाजीनें एका बाजूनें छापा घालून त्यांचा पक्काच पराभव करून टाकला. अशा रीतीनें, धनाजीनें संभाजीस मदत केली. याप्रमाणें वेढा घालणारे लोक पुरतेपणीं लाचार होऊन, बादशहाचा कारभारी व संताजी यांच्यामध्यें तह झाला. या तहाच्यायोगानें कांहीं अटीवर मोंगलाच्या सैन्यास परत जाऊं दिलें. परंतु औरंगजेबासे हें आपल्या कारभा-यानचें करणें पसंत न पडून त्यानें आपल्या मुलास परत बोलाविलें व झुलपिकारखानास त्याच्या हाताखालीं दुसरें सैन्य देऊन लढाईवर पाठविलें. त्यानें तरी वेढ्याचें काम ताबडतोब सुरू केलें नाहीं. इतक्यांत संताजी तूर्त काळजींतून मुक्त झाला व विजापुराजवळ बादशहाच्या छावणीच्या आसपास फिरता राहून त्यानें दोडेरीजवळ काशीमखानाचा मोड केला.
हिम्मतखान नामक दुसरा एक सरदार असाच फशीं पडून त्याचा पराभव झाला. शेवटीं इ. स. १६९७ त वेढ्याचें काम जास्त नेटानें चालून, वर सांगितल्याप्रमाणें राजाराम तेथून पळून गेल्यावर ते किल्ला इ. स. १६९८ त मोंगलांनीं घेतला. पुढें लवकरच राजाराम साता-यास जाऊन रामचंद्रपंतास मिळाला, व परसू भोंसले, हैबतराव निंबाळकर, नेमानी शिंदे, आठवले, समशेरबहाद्दर, हे गराठे सरदार आपस्या देशाला परत आले. मराठ्यांच्या ठाण्यांचे रक्षण करण्याकरितां धनाजी जाधव यास दक्षिणेंत ठेविलें होतें, तरी लढाईचें मुख्य ठिकाण कर्नाटक व द्रवीडदेश बदलून महाराष्ट्रच झालें. समुद्रकिना-यावरील जे किल्ले होते त्यांनीं इमान राखून मराठ्यांचा पक्षच उचलला व कानोजी आंग्रे याचे हाताखालीं मराठ्यांनी त्रावणकोरपासून तहत मुंबईपर्यंत लुटालूट चालवून समुद्रांतील पुष्कळ माल पकडून नेला. सावंतांनींही इमान राखिलें.
इ. स. १६९९ मध्यें आपलें सर्व सैन्य घेऊन राजाराम खानदेश, गंगथडी, व-हाड आणि बागलाण या प्रांतांत शिरून त्यानें चौथाई व सरदेशमुखी वसूल केली व साता-यास परत येतेवेळीं, दाभाड्यास बागलाणमध्यें, शिंद्यास खानदेशांत, भोंसल्यास व-हाडांत व निंबाळकर यास गंगथडीमध्यें ठेविलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
प्रभुजातीच्या सरदारांपैकी दोघांचीं नांवें सांगण्याजोगीं आहेत. पहिला खंडो बल्लाळ चिटणीस-शिवाजीचा मुख्य चिटणीस बाळाजी आवजी याचा मुलगा. त्याच्या बापास व चुलत्यास संभाजानें जरी निर्दयपणानें ठार मारिलें होतें, तरी पण खंडोपंतानें एकनिष्ठपणानें चाकरी करून पोर्तुगीज ( फिरंगी ) लोकांबरोबर झालेल्या लढाईत त्यानें तरवार गाजविली. सबब संभाजीची त्यावर मर्जी असे. संभाजीच्या मरणानंतर तो राजारामाबरोबर जिंजीस गेला. ही सर्व मंडळी वेष पालटून जात असतां बल्लारीजवळ मोंगल सुभेदारानें त्यांना ओळखून तो त्यांना पकडण्याच्या बेतांत होता. इतक्यांत खंडो बल्लाळानें जिवाची पर्वा न करतां आपण मागें राहून आपल्या सोबत्यांस पुढें पाठवून दिलें. त्या सुभेदारानें खंडो। बल्लाळ यास पकडून त्याचे हाल हाल केले, तरी पण त्याची स्वामिनिष्ठा यत्किंचित्ही ढळली नाहीं. पुढें थोड्या वेळानंतर त्यानें जिंजींतून राजारामाची सुरक्षितपणें सुटका होण्याचा सुयोग जुळवून आणला. मोंगलांचे सैन्यांत कांहीं मराठे सरदार होते. खंडो बल्लाळानें आपलें कोंकणांतील वतन त्या सरदारांचे सर्वस्वी स्वाधीन करून त्यांशीं स्नेहभाव संपादिला व वरील सुयोग जुळवून आणला. शाहूराजे साता-यास येऊन सिंहासनारूढ झाले तोंपर्यंत खंडो बल्लाळ जिवंत होते. या युद्धांत विजयश्री मिळविलेला दुसरा प्रभु सरदार प्रयागजी होय. ओरंगजेब बादशहानें स्वतः सैन्य घेऊन साता-यास पुष्कळ महिनेपर्यंत वेढा दिला होता. तेव्हां प्रयागजीनें मोठ्या शौर्यानें त्या शहरचें रक्षण केले.
हेच, ब्राह्मण, मराठे व प्रभु जातींतील मुख्य स्वदेशभक्त सरदार होते. आपणांवर आलेल्या आपत्तीस न जुमानतां राष्ट्रीय स्वातंत्र्याकरितां अखेरपर्यंत लढण्याचा त्यांचा निश्चय होता. आणि महाराष्ट्रांत राहून आत्मसंरक्षणाची चांगली तयारी करण्यास त्यास ---' - सत मिळेना ह्मणून त्यांनी दक्षिणेचा रस्ता धरला व जिंजींत जाऊन हेले.—हिले. तेथें राजारामानें अष्टप्रधान नेमिले, व तो दरबारही भरवूं लागला. उत्तम कामगिरी बजावणा-या लोकांस इनाम व जहागिरी देई-जणूं आपण आपल्या देशाचे अजून मालकच आहोंत असें त्यास वाटें-व मोंगल सैन्याशीं जास्त नेटानें झुंजण्यास आपल्या सेनापतीस आज्ञा करी. त्यांनीं आपलें सैन्य जमवून दक्षिणेंतील सहा सुभ्यांतच नव्हे तर मोंगल राज्याच्या अति प्राचीन प्रांतांतसुद्धां चौथाई व सरदेशमुखीचा हक्क मागण्याकरितां आपल्या सरदारांस योग्य अधिकार देऊन पाठवीत असे. तेव्हां लवकरच औरंगजेबास असें दिसून आलें कीं, मराठे सरदारांनीं धरून ठेवलेलें हे महाबलाढ्य ठिकाण पक्कें जमीनदोस्त केल्याशिवाय महाराष्ट्रांत आपण पुष्कळ मुलूख मिळविला तरी कांहींही उपयोग होणें नाही. ह्मणून औरंगजेबाने आपल्या दक्षिणेंत विजयी झालेल्या, झुलफिकारखान नामक सरदारास जिंजीस वेढा घालण्याचा हुकूम दिला व त्यानें इ० स० १६९१ त वेढा दिला. पण हा किल्ला इतका मजबूत होता, व वेढा घालणा-या मोंगल सैन्यास त्रास देण्याचें काम संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांचेकडे असून त्यांनीं आपलें काम इतक्या उत्तम रीतीनें केलें कीं, इ० स० १६९८ पर्यंत झुलाफिकारखानास किल्ला सर करितां आला नाहीं. व शेवटीं किल्ला सर केला तेव्हां राजाराम व त्याचे लोक हे तेथून पळून गेले असेंच त्याला आढळून आलें. मराठ्यांना या वेळेस विश्रांतीची फार गरज होती. ती विश्रांति त्यांना या सात वर्षांच्या अवधींत मिळाली व मोंगलांचें व आपलें सामर्थ्य सारखेंच आहे असेंही त्यानां कळून आलें. औरंगजेबच्या सैन्यानें जो दरारा उत्पन्न केला तो आतां पार नाहींसा झाला व मराठा सैन्याची एक तुकडी एकीकडे वेढ्यापासून जिंजीचें संरक्षण करीत आहे तों दुसरीकडे धनाजी जाधव व संताजी घोरपडे महाराष्ट्रांत परत येऊन, शिवानीच्या वेळचें शिलेदार, बारगीर इत्यादि कसलेल्या घोडेस्वारांना त्यांनीं आपल्या पक्षात आणून मिळविलें. घासदाणा वसूल करुन त्यांतून या बिनपगारी व आपखुषीनें चाकरी करणा-या घोडेस्वारांचा खर्च चालत असे. इ. सन १६९१ तच मराठ्यांच्या टोळ्यांनी नाशिक, बीड व बेदर हीं शहरें लुटिलीं. इ. सन १६९२ ते रामचंद्रपंत विशाळगड येथून ठाणें उठवून साता-यात जाऊन राहिले व घाटमाथ्यावरील मुलुखावर त्यांनीं अम्मल सुरू केला व सैन्याच्या टोळ्या पाठवून ठिकठिकाणीं किल्ल्यांतील मोंगल पटणीचा ते पराभव करीत. याप्रमाणें वाई, रायगड, पन्हाळा व मिरज येथील किल्ले मिळाले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
याप्रमाणें मह्मराष्ट्रांत राहून मोंगल बादशहास शरण न गेलेला मराठी राज्याचा मुख्य. प्रतिनिधि काय तो. हाच होता. आणखी एका ब्राह्मण पुढा-याचें नांव सांगितलें पाहिजे. तो शंकरानी मल्हार होय. त्याला संभाजीनें सचिवाची जागा दिली होती. इतर पुढा-यांबरोबर तो जिंजीस गेला व तेथें काही दिवस राहून काशीस गेला. शाहू गादीवर बसल्यानंतर सय्यद व मराठे यांच्या मध्यें तह जुळवून आणून शाहू राजाची एक विशेष कामगिरी त्याने बजाविली. वरील आणीबाणीच्या प्रसंगी नावारूपास आलेल्या ब्राह्मणपुढा-यांमध्यें, किन्हईचें कुलकर्णी व साता-या निल्ह्यांतील औंध येथील पंतप्रतिनिधि घराण्याचे पूर्वज, परशुराम त्र्यंबक, व भोर येथील पंत सचिव घराण्याचे पूर्वज शंकरानी नारायण, यांचीही गणना होते. मराठे पुढा-यांमध्यें संताजी घोरपडे, व धनाजी जाधव हेच मुख्य व यांच्यावरच जबाबदारी जास्त होती. हंबीरराव मोहिते याचे हाताखाली हे सरदार असून इ. स. १६७४ सालीं पन्हाळ्याजवळ लढाई झाली त्यांत जवळ जवळ पराभव झाला होता, तरी या सरदारांनी लगट करून जय मिळविला, यामुळें ते जास्त प्रसिद्धीस आले. तीस वर्षेपर्यंत मराठ्यांची शौर्याबद्दलची कीर्ति कायम । राखून ते मोंगल सैन्यांशीं एकसारखे झुंझले. राजाराम, प्रल्हाद निराजी इत्यादिकांबरोबर जरी ते जिंजीस गेले होते, तरी पण असें ठरलें होतें कीं, त्यांनीं परत महाराष्ट्रांत येऊन मोंगलांशीं सामना द्यावा व ते कर्नाटकावर चालून आल्यास किंवा त्यांनीं जिंजीवरहीं संकट आणल्यासं त्यांना प्रतिबंध करावा. व हाच मार्ग त्यांनीं स्वीकारिला होता. आतां ते लढत होते इतकेंच. त्यांच्याजवळ द्रव्य नसून ते जमा करण्याचीं साधनेंही त्यांच्याजवळ नव्हतीं. आपले स्वतःचे शिपाई, घोडेस्वार, दाणागोटा, दारुगोळा त्यांना आणावा लागून लढाईच्या खर्चाबद्दल लागणारा खजिनाही त्यांचा त्यांनाच मिळवावा लागे. म्हणून साहजिकच त्यांचे हातून पुष्कळ अत्याचार झाले. सर्व मोंगलं सैन्यांशीं लढून त्यांनी मोंगल छावणींत इतका दरारा उत्पन्न केला कीं, तें शतक संपण्याच्या आंतच मराठे लोक परत महाराष्ट्रांत येऊन त्यांनीं गुजराथ, माळवा, खानदेश, व-हाड, या प्रांतांवर स्वा-यादेखील केल्या आणि बादशहांच्या सैन्यास अगदीं जेरीस आणलें. या दोन सरदारांपैकी संताजी घोरपडा, हें 'स्वातंत्र्याचें युद्ध' संपण्याच्या आंतच, एका खाजगी वै-याकडून विश्वासघातानें मारला गेला. नंतर त्याच्या तीन भावांनीं आपल्या जोरावर लढाई चालवून, शेवटी गुत्ती व सूंद या लहानशा संस्थानांचें ते संस्थापक झाले. राहिलेला धनाजी मात्र, शाहू राजा आपल्या देशांत परत येऊन गादीवर बसेपर्यत जीवंत होता.
बाकी राहिलेल्या मराठे सरदारांत खंडेराव दाभाडे बरेच प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील तळेगांवचे पाटील असून शिवाजीच्या नोकरींत होते. राजारामाबरोबर जिंजीस गेलेल्या लोकांमध्यें हे होतेच, व महाराष्ट्राबाहेर गुजराथ व खानदेश या देशांत यांनींच प्रथम लदाई केली. त्यांचे एक मदतनीस, धार व देवास येथील पवार घराण्याचे मूळपुरुष, माळव्यांत शिरले. खंडेराव पुष्कळ वर्षे वांचले. दिल्लीच्या बादशहापासून शाहू महाराजाकरितां चौथाई व सरदेशमुखी यांच्या सनदा मिळविण्याकरितां थोरले बाजीरावसाहेब दिल्लीस गेले, तेव्हां त्यांचेबरोबर दाभाडे गेले होते. या युद्धांत कामगिरी बजाऊन प्रसिद्धीस आलेले दुसरे सरदार म्हटले म्हणजे, आठवले, सिधोजी नाईक निंबाळकर, परसोजी, भोसले ( नागपूरचे राजे यांचे पूर्वज ) व नेमानी शिंदे हे होत. त्याचप्रमाणें थोरात, घाटगे, थोके, महार्णव, पांढरे, काकडे, पाटणकर, बांगर, कद् आदिकरून पुष्कळ सरदार पुष्कळ वर्षे चाललेल्या या लढाईच् ! शिक्षणाने चांगले तयार झाले व त्यांनीं आपल्या देशाची उत्तम क'--• गिरी बजावली. राजारामाच्या मंत्रिमंडळानें या सरदारांना मोंगलाच्या ताब्यांतील मुलखांत चौथाई व सरदेशमुखी गोळा करण्याची परवानगी दिली. याप्रमाणें परसोजी भोंसल्यास गोंडवण व व-हाड प्रांतांत चौथाई वसूल करण्याची सनद दिली. निंबाळकरांकडे गंगथडी प्रदेश सोंपविला. दाभाड्यांचे स्वाधीन, गुजराथ व खानदेश हे प्रांत केले, व कित्येक सरदारांनीं, कर्नाटकांत व मोंगलाकडून नुकत्याच जिंकून घेतलेल्या प्रांतांत आपली ठाणीं दिलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
परंतु याप्रमाणें जरी महाराष्ट्र देशाच्या वैभवास मोठी ओंहटी लागली होती व पुढें चांगले दिवस येतील अशी आशा करण्यास कुठें कांहीं जागा नव्हती, तरी या प्राप्त झालेल्या संकटांनींच शिवाजीच्या तालमींत तयार झालेल्या देशाभिमान्यांच्या एका टोळीस, ते द्रव्यहीन व साहाय्यहीन होते तरी, आपलें गेलेलें राष्ट्रीय स्वातंत्र्य परत मिळविण्यास व औरंगजेबाचें अजस्त्र सैन्य हिंदुस्थानांत परत हुसकून लावण्यास तयार होण्याविषयीं जागृत केलें. शिवाजीचा धाकटा मुलगा राजाराम यास संभाजीनें रायगडीं अटकेंत ठेविलें होतें. संभाजी मेल्यानंतर रायगड मोंगलांच्या ताब्यांत जाण्याच्या आंत राजाराम किल्ल्यांतून पळाला व तोच या टोळीचा मुख्य नायक झाला. त्याचें वय यावेळेस सुमारें वीस वर्षांचें होतें, तरी पण बापाच्या अंगचे पुष्कळ अलौकिक गुणत्याचें धाडस व चातुर्य, दुर्गुणापासून परावृत्ति, शांत स्वभाव व औदार्य, यांहीपेक्षां श्रेष्ठ, आपल्या देशबांधवाचे ठिकाणीं आपल्याविषयी विश्वास उत्पन्न करण्याची त्याची हातोटी-राजारामाचे आंगी जन्मतःचे आले होते. शाहू औरंगजेबाचे अटकेंत होता. त्याचें आपण प्रतिनिधि आहोंत असें राजाराम आपणास ह्मणवून घेत असे. गादीला शाहूचा हक्क आपल्यापेक्षां जास्त असें समजून तो सिंहासनावर कधींही बसला नाहीं. शिवाजीच्या वेळच्या निराजी रावजी न्यायाधीशाचा मुलगा ‘प्रल्हाद निराजी, या प्रसंगी राजारामाचा मुख्य मसलतगार होता. संभाजीच्या कारकीर्दीत प्रल्हाद निराजी नोकरी कमी झाल्यामुळें घरींच असून, काय होईल तें डोळ्यांनीं पहावें, असा त्याचा क्रम होता. पण त्यावेळच्या मराठे लोकांत शहाणा काय तो तोच अशी त्याची ख्याति होती. ग्रांट डफ साहेब ब्राह्मण लोकांची स्तुति करण्यांत इतका चिकट ना? पण तोसुद्धां प्रहाद निराजी, अद्वितीय पुरुष होता, असें कबूल करतो. स्वहिताबद्दल त्याचा अगदीं निष्काळजीपणा संबंधानें हें ब्राह्मण मुत्सद्यांमध्यें खरोखर अश्रुतपूर्व उदाहरण होय. राजाराम व प्रल्हाद निराजी हे दोघेही, त्यांनीं हातीं घेतलेलें स्वराज्यसंरक्षणाचें महत्कुत्य अर्धेमुर्धे सिद्धीस जातें न जातें तोंच इहलोक सोडून गेले. तरी पण आपल्या देशावर ओढवलेल्या संकटांतून आपण पार पडून यशःप्राप्ति थोड्याच काळांत मिळणार, आणि केल्या श्रमाचें साफल्य होणार हें खास, अशी खात्री होऊन त्यांना समाधान वाटे. रघुनाथपंत हणमंते नांवाचा दुसरा एक स्वदेशाभिमानी होता. हा शहाजीच्या कर्नाटकांतील जहागीरीवर नेमलेल्या ब्राह्मण कारकुनाचा मुलगा होय. तो मुळींच स्वकार्यसाधु नसून स्वातंत्र्य प्रिय आहे अशी त्याची ख्याति असे. व्यंकोजी तंजावरमध्यें होता, त्यास व संभाजीस आपली स्थिति सुधारण्यास त्यानें पुष्कळ सांगून पाहिलें, परंतु व्यर्थ. शेवटीं जेव्हां वरील प्रसंग प्राप्त झाला, तेव्हां त्याला प्रल्हाद निराज़ीची मसलत पसंत पडली. तंजावर प्रांतांत शहाजीच्या जहागिरीत एक जिंजी नांवाचा किल्ला होता, तो त्यानें दुरुस्त करून राजाराम व त्याच्या पक्षाचे लोक तेथें येण्याची वाट पहात बसला. निळे मोरेश्वर - पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे चिरंजीव-- यांना, जिंजी किल्ला आपल्या ताब्यात घेऊन त्याची तटबंदी पुरी करण्याकरितां पुढें पाठविलें. महाराष्ट्रांत राहून गनीमी काव्याच्या पद्धतीनें लढाई चालूं ठेवावी म्हणून कित्येक लढवय्यांना हुकूम मिळाले. त्यापैकीं कांहीं ब्राह्मण होते. त्यांमध्यें अतिशय प्रसिद्ध म्हटले आणजे, रामचंद्रपंत अमात्य-कोल्हापूर संस्थानांतील हल्लीच्या पंतअमात्य घराण्याचे पूर्वन- हे होत. शिवाजीच्या वेळेस, मोरोपंत पिंगळ्याप्रमाणेंच, त्याचे मुख्य मंत्री व सेनापती आबाजी सोनदेव होते, यांचे रामचंद्रपंत चिरंजीव होत. या रामचंद्रपंतांवर सर्वाचा इतका दृढ विश्वास बसला होता कीं, प्रसंग पडेल तसें त्यानें वागावें.-त्याच्याविरुद्ध कोणीही जाऊं नये-इतका अधिकार त्याला दिला होता. खुद्द राजारामानें आपल्या पत्नीस त्याच्याच देखरेखीखालीं ठेविलें. तसेंच बहुतेक सर्व मराठे सरदारांनीं, दक्षिणचा रस्ता धरला तेव्हां, आपआपली कुटुंबें विशाळगड येथें त्याच्याच आश्रयास ठेविलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
संभाजीचा कलुषा नांवाचा एक प्यारा दोस्त होता. त्याच्या सल्लासंगतीने संभाजीला दारू पिण्याचें व बाहेरख्यालीचें अतोनात व्यसन लागून, ज्यायोगानें त्याचा शारीरिक तसाच मानसिक काटकपणा कमी झाला, भुतेंखेते, समंध, चेटकें इत्यादि वेडगळ कल्पनांचा तो केवळ दास बनून राहिला. संभाजीच्या कारकीर्दीचें सविस्तर वर्णन देण्यापासून कांहीही उपयोग होणें नाही. कारण, त्यानें महाराष्ट्रावर राज्य केलें असें कदापि म्हणता येणार नाहीं. अष्टप्रधान राज्यकारभारांतून वगळल्यासारखेच होते. अर्थात् त्यांच्यावरची जबाबदारीही नाहींशीं झाली. शिवाजीनें केलेली राज्यव्यवस्था व फौजेची व्येवस्था यांकडे दुर्लक्ष झालें. शिपाई लोकांना वेळच्या वेळेस पगार मिळेना. किल्ल्यांत शिबंदीचा व --------तोटा पडला. वसूलाचें काम मक्त्यानें देण्यांत आलें. याप्रम----चोहोंकडे अव्यवस्था झाली, व याच वेळेस औरंगजेब बादशहाची स्वारी सर्व त-हेचें हत्यारबंद असें तीन, लाख सैन्य बरोबर घेऊन दक्षिणेंत उतरली. मनांत इरादा हा कीं, दक्षिण हिंदुस्थानांतील हिंदू व मुसलमान राज्यें पुरती काबीज करून, जन्मभर चालविल्या उद्योगाचें एकदाचे सार्थक्य करावयाचें.. हें धाडसाचें कृत्य करण्याकरितां ..औरंगजेबास, एका बाजूस काबूल, कंदाहारपासून तो तहत दुस-या बाजूस. बंगालपर्यत जितके जास्त लोक व द्रव्य मिळेल तितकें पाहिजेच होतें. व या कामावर त्यानें आपल्या हुषार हिंदु व मुसलमान सरदारांची नेमणूक केली होती. याच सुमारास औरंगजेबाच्या पुत्रांपैकी एकजण संभाजीच्या आश्रयास येऊन राहिला होता. त्याच्या मदतीनें संभाजीस या नवीन उद्भवलेल्या संकटाचा प्रतिबंध करितां आला असता. पण संभाजीनें हीही संधी दवडली. त्याच्या पूर्वीच्या प्रधानमंडळानें, सध्यां ओढवलेलें संकट किती जबरदस्त आहे याची कल्पना संभाजीला यावी, म्हणून खटपट केली, पण तीसुद्धां त्याला आवडेना. औरंगजेबाच्या सैन्याने दक्षिणेंत आल्यापासून अवघ्या तीन वर्षांच्या अवधींतच विजापूर, ' व गोवळकोंडे ही दोन्हीही राज्यें हस्तगत केलीं व संभाजी अगदीं पेचांत सांपडून गरीब गाय झालेला, सहज पकडला जाऊन, शेवटीं अति क्रूरपणानें ठार मारला गेला. सर्व सपाट प्रदेश उध्वस्त होऊन, किल्ले तर एकामागून एक 'लढाई न करताच हस्तगत झाले. याचें मुख्य कारण म्हटलें तर त्यांचा बचाव करण्याकडे झालेलें दुर्लक्ष्य होय अखेरीस रायगडसुद्धां शत्रूचे हस्तगत होऊन, संभाजीची. बायको-- मुलगा यांस औरंगजेबच्या छावणींत नेण्यांत आलें. याप्रमाणें दक्षिणेंत येऊन पुरीं पांच वर्षे व्हावयाच्या आंतच, आजन्म मनांत खळ-- असलेला हा औरंगजेबाचा मनोरथ सिद्धीस गेला. नर्मदेपासून तों तुंगभद्रेपर्यंत सर्व देशे त्याच्या स्वाधीन झाला--जणूं शिवाजी व त्याचे बरोबर यश संपादन केलेले अनेक वीर जन्मास येऊन व्यर्थ ; आले तसे गेले. शहाजी व त्याच्या नंतर शिवानी, यांनी आज साठ वर्षा हून अधिक वर्षे ज्या महापुरापासून अविश्रांत मेहनत करून महाराष्ट्राचें संरक्षण केलें, तो महापूर आतां बांध फुटल्यामुळें सर्व देशभर पसरून, आपल्या मार्गात येतील त्यास आपल्याबरोबर वाहून नेऊं लागला. त्यास प्रतिबंध होण्याचें चिन्हच दिसेना. विजापूरकर व गोवळकोंडेकर दूरदेशीं ( दिल्लींत ) बंदिवास भोगीत राहिले. व संभाजीचा मुलगा अगदी बच्चा असून त्याससुद्धां बादशहानें आपल्या छावणींत राहण्यास नेलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
जिंजी.
प्रकरण ९ वें.
शिवाजीच्या अकालिक मृत्यूनें महाराष्ट्रावर जो दुर्धर प्रसंग लकरच ओढवला, तो मराठ्यांच्या इतिहासांतील दुसरा भयंकर प्रसंग होय. व त्या प्रसंगापासून जे अनर्थ झाले, त्यांची कल्पना खुद्द शिवाजीच्या वेळच्या लोकांपैकीं फारच थोड्यांस होती. पहिला दुर्धर प्रसंग म्हटला म्हणजे ज्यावेळेस राजा जयसिंग यास निमूटपणे शरण येण्याचे कबूल करून शिवाजी दिल्लीस गेला, व तेथें बादशहानें त्यासं कैदेंत घातलें त्यावेळचा होय. शिवाजीची कल्पना अचाट व संदी मोठी. म्हणून त्यास कैदेंतून आपली सुटका करून घेतां आली, इतकेंच नव्हे, । तर, शिवाजीचा पक्का मोड होईपर्यत, तो मोठा बलाढ्य आहे, त्यास कसेंबसें अजारून गोंजारूनच घेतलें पाहिजे, असें खुद्द औरंगजेब बादशहासही कबूल करावें लागलें. महाराष्ट्रासंबंधी औरंगजेबाचे काय काय बेत होते, ते शिवाजीस पक्कें माहीत; म्हणून त्याच्या आयुष्याची शेवटचीं बारा वर्षे, औरंगजेबाकडून येणारा हल्ला अंगावर घेऊन त्याचा प्रतिकार करण्यास पुरेइतकी आपल्या लोकांची तयारी करण्यांतच गेलीं. दक्षिणेंत विजापूरकर व गोवळकोंडेकर यांच्याशीं चाललेलीं अगदी हाडवैराचीं मांडणें विसरून, शत्रूवर हल्ला करणें झाल्यास किंवा शत्रूपासून आपला बचाव करणें झाल्यास ऐकमेकांनी एकमेकांस मदत करावी, अशा अर्थाचा तहनामा शिवाजीनें नपासून करून घेतला. या तहनाम्याच्या योगाने मोंगल सरदारांचें परतून लावण्याचें कामीं शिवाजीची त्यांना पुष्कळ मदत मिळून फायदा झाला. व त्यानें केलेली कामगिरी मनांत आणून # शिवाजीस खंडणी देण्याचेंही कबूल केलें. जणूकाय पुढें घड. घडणा-या गोष्टींचे पूर्वज्ञान त्यांस झाले होतें-नवीन मुलूख मिळवून व
पान फाटले आहे.
नवीन स्नेह संपादून दक्षिणहिंदुस्थानांत कावेरी नदीच्या प्रदेशांत आत्मसंरक्षणासाठी एक नवीनच स्थल त्यानें तयार ठेविलें, अशासाठीं कीं, त्याठिकाणी संकटसमयी आपणास आश्रयास जातां यावें. तसेंच सह्याद्रीच्या घाटावरील सर्व डोंगरी किल्यांची डागडुजी करून ते दुरुस्त ठेविले. शिवाजीची लढाऊ गलबतें व त्यावरील नायक हे आत्मसंरक्षणाचें त्याचें दुसरें साधन होतें. यांहीपेक्षां, शिवाजी जेथें जाईल तेथें त्याच्या पाठोपाठ जाण्यास, पुष्कळ शिक्षण देऊन तयार केलेले लोक, तसेंच शिवाजीच्या ठिकाणीं दृढ प्रेम ठेऊन, त्याचे मनांतील हेतु काय आहेत ते अगोदरच बिनचूक समजून ते कसे तडीस न्यावेत हें जाणणारे त्याचे नोकरचाकर, सर्व जातीमध्यें त्यानें जागृत केलेली स्वातंत्र्याची चाड व त्यांच्या ठिकाणीं उत्पन्न केलेला इमानीपणा–हेंच शिवाजीच्या शक्तीचे मुख्य आधार होत, व ही शक्ति सर्वांत श्रेष्ठ आहे असें त्याचे मित्रच नव्हेत तर शत्रूदेखीलं कबूल करीत. शिवाजीस मृत्यूनें अकस्मात् व अकालींच गांठल्यामुळे आपल्या पश्चात् राज्यांचा वारसा कोणाकडे जावयाचा र। योग्य व्यक्स्था करण्यास त्यासं सवड मिळाली नाहीं. त्याचा व मुलगा संभाजी अत्यंत दुर्वर्तनी होता. शिवाजीच्या आज्ञा मोडून तो मोंगल सरदारांच्या आश्रयास जाऊन राहिला होता. मोंगल छवणींतून परत आल्यावर रायगड येथील प्रधानमंडळानें संभाजीस पन्हाळा किंल्ल्यावर मोठ्या बंदोबस्तानें अटकेंत ठेविलें. शिवाजीनें आरंभिलेलें कार्य तसेच पुढें चालविण्यास संभाजी हा दुष्ट स्वभावामुळें व वाईट वागणुकीमुळें अगदीच नालायख आहे असें त्या प्रधानमंडळीस समजून आले, व त्यांनी संभाजीस बाजूस ठेऊन, शिवाजीचा धाकटा मुलगा राजाराम यासं गादीवर बसविण्याचा बेत केली; परंतु या प्रधानमंडळानें उतावीळपणा केला. सैन्यांतील लोकांस आपल्या कटांत घेतले नाहीं, ही त्यांनीं मोठी चूक केली. ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. सेनापती हंबीरराव मोहिते त्यांच्या मसलतींत नव्हता, ह्मणूनच हा त्यांचा सर्व बेत फसला. शिपाई लोकांच्या साहाय्याने संभाजी पन्हाळा किल्लयांतून निसटला, व रायगड येथींल प्रधानमंडळाच्या प्रतिबंधास न जुमानतां त्यानें गादी बळकाविली. गादीवर बसल्यानंतर जीं त्यानें अनन्वित कृत्यें केलीं, त्यावरून भावी संकटप्रसंगीं लोकांचा पुढारी होण्यास तो अगदींच अयोग्य होता असें दिसून आलें. त्यानें आपल्या सावत्र मातुश्रीस उपासमार करून ठार मारलें. पूर्वीचे पेशवे, सचिव व सुमंत यांस बंदींत टाकिलें व शिवाजीच्या वेळच्या जुन्या चिटणीसास ठार केलें. हीं त्याचीं क्रूर कर्मे त्याच्या सर्व कारकीर्दीभर चालू राहून, त्याच्या बापाच्या वेळेस मोठ्या हुद्यास चढलेल्या सर्व लोकांची त्याच्यावरील प्रीति नाहींशी झाली. संभाजी जात्या फार शुर, तेव्हां एखादे वेळेस लोकांस असें वाटे कीं, संभाजी कितीही क्रूर असला तरी आसपासच्या राष्ट्रांशी चाललेल्या लढायांत मराठ्यांची इभ्रत व त्यांचें वजन कायम राखील; परंतु ही त्यांची आशा केव्हांही फलद्रूप झाली नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
याप्रमाणें धर्मसंबंधी चळवळीच्या मुख्य मुख्य भागाचें विवेचन आह्मीं केलें आहे. ही चळवळ पंधराव्या शतकांत ज्ञानदेवाचा जन्म झाल्यापासून तों गेल्या शतकाच्या अखेरपर्येत सारखी चालू राहून पारमार्थिक सद्गगुणांची हळू हळू वाढ झाली. या देशच्या प्राकृत भाषेंत एक बहुमोल वाङ्मय या चळवळीमुळेंच आह्मांस उपलब्ध झालें. ज्ञातिजन्य श्रेष्ठत्वाच्या वेडगळ कल्पनेचा जोरही या चळवळीनेंच कमी झाला. शूद्रवर्गाला पारमार्थिक शिक्षण देऊन, त्यांचें समाजामध्यें महत्व वाढवून ब्राह्मणांच्या तोडीस या चळवळीनेंच आणून बसविलें. कुटुंबसंबंधास पावित्र्य प्राप्त होऊन स्त्रियांची योग्यता वाढली. राष्ट्राची बंधुप्रीति वाढवून, परस्परांनीं सहनशील होऊन जूट कायम राखणेस लोकांना शिकविलें. या चळवळीनेंच मुसलमानांशीं समेट करण्याच्या कल्पनेचा उपक्रम करून कांहीं अंशीं ती कल्पना अमलांतही आणली. विधि व उपचार, ज्ञानार्जन व चिंतन, यात्रा, उपोषणें यापेक्षां ईश्वरावर दृढ प्रेम व विश्वास ठेऊन त्याचें भजन करण्याचें महत्व जास्त, असें सिद्ध केलें. अनेक देवमतापासून होणा-या अत्याचाराचा ओघ कमी केला.
या सर्व त-हांनीं राष्ट्रास आचारशक्ति व विचारशक्ति यांमध्यें श्रेष्ठत्व आणून देण्यास या चळवळीचाच उपयोग झाला. व परधर्मी सत्तेच्या ठिकाणीं एक जुटीची एतद्देशीय सत्ता पुन: प्रस्थापित करण्याच्या महत् कृत्यांत पुढारीपणा घेण्यास महाराष्ट्र देशाची चांगली तयारी करून दिली. तशी तयारी हिंदुस्थानांतील दुस-या कोणत्याही देशाची झाली नाहीं. महाराष्ट्रधर्माचीं मुख्य मुख्य तत्वें आह्मांस हींच दिसतात, व समर्थ रामदास साधूंनी शिवाजीचा पुत्र संभाजी यास, बापाचें अनुकरण करून, सोशिक व उदार, पारमार्थिक पण मूर्तिपूजेविरुद्ध नसणारा असा हा आपला धर्म, त्याचा प्रसार करण्याचा उपदेश केला तेव्हां समर्थांच्या मनांत हींच तत्वें वास करीत होतीं.