Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

ईश्वराशीं मनुष्याच्यासंबंधाच्या या कल्पनेचा असा परिणाम झाला कीं, ईश्वर व ईश्वराविषयीं ज्ञान संपादन करण्यास भक्तीसारखें दुसरें साधन नाहीं असें सिद्ध होऊन, वैष्णव पंथांतील लोकांची, भक्ति हीच धर्माची मुख्य बाब होऊन बसली. महिपतीनें लिहिलेलीं सर्व चरित्रें पाहिलीं तर बाह्यपूजा व त्यांतील सर्व विधि उपचार, यात्रा, तीर्थस्नान, नम्रपणा धरणें, उपास करणें, विद्यार्जन, चिंतन, ध्यान, या सर्व साधनांपेक्षां भक्ति व भाव या साधनांचें महत्व जास्त आहे असें सांगितलें नाही, असें एकही चरित्र सांपडावयाचें नाहीं. वरील साधनांचा संबंध शरीर किंवा मन यांशींच फक्त असतो; पण आत्म्यानें आपली सेवा करावी अशी ईश्वराची इच्छा असते. भोजन करणें, पाणी पिणें, झोंप घेणें इत्यादि गोष्टी जशा आह्मीं त्याविषयीं श्रम न घेतां व काळजी न बाळगतां करतों, तसेच हे सर्व विधिउपचार इत्यादि बाह्य प्रकार आपणास सहन करितां येतात. त्यांचा आत्म्याशीं ..कांहीं संबंध नाहीं. आपल्या सर्वांगास आंत बाहेर व्यापून टाकणा-या ईश्वराच्या अस्तित्वरूपी समुद्रांत जेव्हां आपली सर्व इंद्रियें स्नान करितात तेंच श्रेष्ठ तीर्थस्नान. ईश्वराच्या इच्छेचे आह्मीं बंदे चाकर ; आह्मी सर्वस्वी ईश्वराचे स्वाधीन ; आमचें स्वतःचें कांहीं नाहीं; असा जो आमचा स्वार्थत्याग हाच आमचा यज्ञयाग वे हीच आमची दानदेणगी. ईश्वरापुढें आत्मा नम्र करणें हाच नम्रपणा व त्याच्या वैभवाचें होईल तितकें कीर्तन करणें हेंच त्याचें चिंतन. ज्ञानार्जन, योगशक्ति, शारीरिक संपत्ति, धनदौलत, मुलेंबाळें, जमीनजुमला, यांची जन्मगरणापासून मुक्तीचीसुद्धां-इतकी मातबरी नाहीं. ईश्वरावर व मनुष्यप्राण्यादिकरून सर्व सृष्टवस्तूंवर दृढ प्रेम असणें हेंच इष्ट आहे. नामदेव एकदा एका झाडाची साल काढीत असतां कु-हाडीचा घाव जेथें झाला होता त्या जाग्यांतून रक्त आलें असें त्यास वाटून ते मोठ्यानें ओरडला. आणि घाव मारला तेव्हां झाडास कसें वाटलें असावें ते समजावें, ह्मणून त्यानें आपल्याच अंगावर कु-हाड मारून घेतली. शेखमहमदास त्याच्या बापानें खाटिकाचा धंदा सुरू करण्यास पाठविलें, तेव्हां जनावरांस मारतांना किती वेदना होतात हें समजावे ह्मणून त्यानें सुरीनें आपले बोट कापलें. तेव्हां त्यास तें दुःख कळून त्यानें खाटिकाचा धंदा सोडून दिला, व पोटाची खळगी भरण्याकरिता ज्य! जगांत दुस-यास इतकें दुःख द्यावें लागतें, त्या जगापासून अलिप्त राहिला. तुकारामास शेतांत पाखरें राखण्यास पाठविलें, तेव्हां त्यास पाहून पांखरें उडून गेलीं. तुकारामास वाटलें की आपणास पाहून पांखरें ज्याअर्थी उडून गेलीं, त्याअर्थी आपल्याच अंगांत कांहीं दोष असावा. या संतांच्या वेळेस जे लोक नव्हते त्यांना हा मनाचा थोरपणा व सर्वाशी स्वार्थत्याग खरासुद्धां वाटणार नाहीं. पण ही गोष्ट खरी आहे याबद्दल कांहीच शंका नाहीं व या नमुन्यावरूनच पारमार्थिक श्रेष्ठत्वाची राष्ट्रीय उदात्त कल्पना बनून गेली होती याबद्दलही शंका नाही. आमच्या सध्याच्या कालांत, इतका नम्रपणा, इतका स्वार्थत्याग उपयोगी नाहीं, इतकी कंवर ढिली होणें, इतकें सोशिक होणें इष्ट नाहीं-हें कदाचित् खरें असूं शकेल; पण साधुसंतांस होऊन आज दोनशें वर्षांवर अधिक वर्षे होऊन गेलीं, तेव्हां त्यांची हकीकत लिहितांना आमच्या गरजांचें व आमच्या इच्छित वस्तूंचें घोडें पुढें ढकलणें प्रशस्त नाहीं.

आमच्या साधुसंतांचे आचारविचार व संभाषण यांची दिशा काय असे वे मुसलमानी धर्मासारख्या युद्धप्रवृत्त धर्माशीं गांठ पडून आलेल्या संकटांशी त्यांनी कशी टक्कर दिली व अखेरीस कसे विजयी झाले हें पाहणें मोठें चित्तवेधक आहे. नामदेव, एकनाथ, रामदाम इत्यादिकांच्या चरित्रांत तर अशा गोष्टींची रेलचेल आहे. विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट ही की पुष्कळ मुसलमान लोकांनी हिंदुधर्म स्वीकारिला व त्यायोगें ते इतके प्रसिद्धीस आले कीं त्यावेळच्या ग्रंथकर्त्यांनी हिंदुसंतांच्याप्रमाणें या गहमदीय संतांचेंसुद्धां साहाय्य घेतलें आहे. महगदीय संतमंडळींचा सन्मान करून त्यावेळच्या आमच्या हिंदू लोकांनीं जो मनाचा थोरपणा दर्शविला, त्याचीं उदाहरणें शेखमहमद व कबीर हीं होत. त्याचप्रमाणें तुकाराम व एकनाथ यांच्यावर मुसलमानाशी संघट्टनाचा इतका परिणाम झाला की या संतांनीं उर्दू भाषेंत कविता केल्या. त्या कवितेंतील थोर तत्वें अगदीं कट्टया मुसलमानांनासुद्धां अग्राह्य नाहींत. रामदासाचा शिष्य उद्धव बेदर मुकामीं संकटांत सांपडला, तेव्हां समर्थानींही तसेंच केलें. बेदरच्या बादशाहाना नोकर दामाजीपंत याची सर्वास माहिती आहेच. दुष्काळ पडला तेव्हां सरकारचें धान्य त्यानें गरीब लोकांस वांटून टाकलें. या अपराधाबद्दल त्यास शिक्षा करण्याची वेळ आली तेव्हा त्या धान्याची एकंदर किंमत राजाच्या खजिन्यांत चमत्कारिक रीतीनें जमा होऊन बिचा-या दामाजीची सुटका झाली. परधर्मी राजाशीं चाललेल्या झगड्यांत साधुसंतांसच अखेर जय मिळाला व त्यांची सरशी झाली. ही त्यांची सरशी, युद्धानें किंवा विरोधानें नव्हे, तर ईश्वरावर सर्वस्वी हवाला ठेविल्यानें झाली. मुसलमानांचा अल्ला काय व हिंदु लोकांचा राम काय. दोन्ही देव एकच. कोणी दुस-या देवाचा द्वेष करूं नये, अशा त-हेनें समेट होण्याकडे प्रवृत्ति होऊं लागून, शिवाजी रंगभूमीवर आला, तेव्हां तर हें समेट बहुतेक पूर्ण झालेंच होतें. तरी पण मुसलमानी धर्मवेड अगदींच शांत नसून त्यास मधून मधून उकळी फुटत असे.

तथापि आमच्या देशांतील सुधारणेच्छु साधुसंत व युरोपांतील तत्कालीन प्राँटेस्टंट सुधारक यांच्यामध्यें एका गोष्टींत भेद दिसून येतो. वेदकालापासून अलीकडे पाहिलें तर आर्य लोकांचे देव ह्मणजे त्यांच्या अंगीं प्रीति, तेज, माधुर्य, प्रकाश इत्यादि गुण कल्पीत असत. वरुणरुद्रासारखे दरारा उत्पन्न करणारे व मन गांगरून सोडणारेही देव होते, नव्हते असें नाहीं. परंतु साधारणपणें ईश्वराच्या अंगच्या उत्तम गुणाचें ध्यान व चिंतन करण्याकडेच लोकांची प्रवृत्ति असे. शेमिटिक ( Shemitic ) लोकांची कल्पना मात्र निराळी. ईश्वर अतिशय दूर आहे. त्याचें रूप फार उग्र आहे. त्याचें वैभव पाहणें झाल्यास ते एकाएकीं दिसायचें नाहीं. दिसले तरी अंधुक दिसायचें. मनुष्यांनीं पाप केल्यास त्यांस कडक शिक्षा करणारा, शाबासकीपेक्षां शिक्षा देण्याकडेच त्याचा जास्त कल. एखादे वेळेस शाबासकी दिलीच तर भक्तास नेहमीं घाबरून सोडून थरथर कांपावयास लावणारा-अशी कल्पना सर्व शेमिटिक धर्माच्या मूलांत होतीच. परंतु ख्रिस्ती धर्मानें ही कल्पना बाजूस सारण्याचा प्रयत्न करून या मोठ्या खाडीस पूल बांधण्याचें थोडें तरी श्रेय घेतलें. त्या धर्माप्रमाणें ईश्वरानें मनुष्याच्या मांसमय देहांत प्रवेश करून जीसस स्राईस्टचें रूप घेतलें आणि सर्व मानव जातीच्या हिताकरितां आपण हाल सोसून त्यांच्या पापाचें प्रायश्चित्त आपणच घेतलें. ग्रीस, रोम किंवा हिंदुस्थानांतील आर्यधर्मास असला प्रकार करणें कधींच अवश्य वाटलें नाहीं. आमचा देव ह्मणने आह्मीं त्यास मायबाप, बंधुराय, जिवाचा सखा असें मानीत आहोंत. न्यायाधीश, शास्ता किंवा सत्ताधीश असें केव्हांही मानीत नाहीं. तो न्याय करीत नाहीं, किंवा त्याची सत्ता नाहीं ह्मणून नव्हे, तर न्याय देतांना, अधिकार गाजवितांना, शिक्षा देतांना त्याच्या ठिकाणी आईबापांचें प्रेम असतें. मुलानें अपराध करून त्यास पश्चात्ताप झाला तर आईबाप जसे त्यास पोटाशीं धरण्यास नेहमीं तत्पर असतात, तसा ईश्वर आहे ह्मणून, साधुसंतांच्या उपदेशांत व चरित्रांत दयाळु परमेश्वराचें हें स्वरूप जसें ठळक रीतीनें रेखिलें आहें, तितकें एककल्ली धर्मनिष्ठ ब्राह्मणांच्या कल्पनेवरून दिसत नाही. आपणास ईश्वर दिसतो, त्याचें बोलणें आह्मीं ऐकिलें, त्याच्याशी आपण बोललों, त्याची आपली नेहमीं भेट होतें, असें हे साधुसंत खात्रीपूर्वक सांगतात. ईश्वर कोणाशीं बोलला नाहीं असें ते केव्हां केव्हां त्याचें वर्णन करतात हे खरें; परंतु साधारणपणें पाहिलें तर आह्मांस जसें दृश्य वस्तूंच्या अस्तित्वाचें ज्ञान झालें ह्मणजे आनंद होतो तसें । ईश्वराच्या भेटीपासून त्यांना आनंद होई असें दिसे. योगी व वेदान्ती लोक, समाधी लावली ह्मणने ईश्वराशीं आपलें तादात्म्य होते असें ह्मणतात; परंतु नामदेव, तुकाराम, एकनाथ, ज्ञानदेव यांना ही ईश्वराची महत्प्रयासानें झालेली क्षणिक भेट पसंत न पडून ईश्वर आपणाजवळ सदासर्वदा असावा असें त्यांना वाटे व अशा दररोजच्या भेटींत त्यांना जो आनंद होई, ते आनंद योग्याच्या व वेदान्त्याच्या ब्रह्मानंदपापेक्षां जास्त आहे असें ते ह्मणत. या संतांनीं जे चमत्कार केले त्यावर आमचा विश्वास असो वा नसो; पण वरील बाबतींत त्यांनीं केलेल्या विधानांवर मात्र आम्हीं विश्वास ठेविला पाहिजे. ख्रिस्तधर्माच्या देशांत जीसस खाईस्टच्या जन्ममृत्यूबद्दल जितका प्रेमभाव व आनंद वाटत आहे, तितकाच किंबहुना जास्त आनंद व प्रेमभाव अंत:करणांत साक्षात् ईश्वराचें दररोज दर्शन झाल्यापासून होत आहे. हेंच, हेच आमच्या संतमंडळीचें वैभव काय तें हेंच, व सर्व उच्चनीच लोक, स्त्रिया व पुरुष, आजन्म शांति देणारी ही अमूल्य वस्तु आपल्याजवळ सांठवीत आहेत.

प्राचीन संस्कृतभाषेचें महत्व जास्त, की प्राकृत भाषेचें महत्व जास्त, अशासंबंधानें प्रस्तुतकालीं जो कलह माजून राहिला आहे, तो आज कालचा नसून फार पुरातनचा आहे. त्यांतील मुद्यांचा निकाल प्राकृत भाषांच्यातर्फे मागेंच लागला आहे, व पंडित व प्राचीनवस्तुसंशोधक यांचे म्हणणें कितीही विरुद्ध असो, या प्रश्नास एकच उत्तर आहे, व तें त्या साधुसंतांनीं संस्कृतभाषेस आपल्या आरंभिलेल्या कार्यास निरुपयोगी ह्मणून बाजूस सारून मातृभाषेची वाढ व सुधारणा करण्यांत त्यांनीं आपले सर्व श्रम खर्ची घातले, त्याचवेळेस दिलें आहे. हिंदुस्थानांत अर्वाचीन प्राकृतभाषांची वाढ साधुसंताच्या श्रमानेंच झाली, आणि ज्या भागांत सुधारणा करण्याकडे लोकांचा विशेष कल होता, त्याच भागांत प्राकृत वाङ्मयाची ही वाढ मोठ्या सपाट्यानें झाली असें खुशाल म्हणतां येईल.

यूरोपामध्यें प्रोटेस्टंट सुधारकांनी दुसरा एक अति महत्वाचा फेरफार अमलांत आणिला. त्यांनी रोमनक्याथोलिक धर्मसंस्थांमध्यें मूर्तिपूजा व संतपूजा यांचा जो बडेजाव माजून राहिला होता, त्याविरुद्ध मोठा गवगवा केला. आमच्या इकडेही तसाच गवगवा झाला होता; परंतु प्रोटेस्टंट सुधारकांमध्यें विशेषेंकरून त्यांच्यापैकीं अति आग्रही लोकांमध्यें, मूर्तिभंजक पंथ जसा निघाला तसा इकडे निघाला नाहीं. महाराष्ट्रांतील साधुसंतांस व्यावहारिक व तात्विक दृष्ट्यासुद्धां अनेक देवांची पूजा आवडत नसे. प्रत्येकजण ईश्वरी अवताराच्या एका विवक्षित रूपास भजत असे. आणि त्यामुळें बाकीच्या देवांविषयी त्याची भक्ति नसे. उदाहरणार्थ, रामदास, राम या नांवानें ईश्वरास भजे. एकनाथ व जयरामस्वामी कृष्ण. म्हणून त्याची पूजा करीत. तुकाराम, चोखामेळा, नामदेव हे विठोबा म्हणून, नरहरी सोनार आणि नागनाथ शिव ह्मणून, जनार्दनस्वामी व नरसिंहसरस्वति दत्तात्रय ह्मणून, मोरया गोसावी व गणेश नागनाथ गणपति म्हणून, ईश्वराची आराधना करीत. त्याचप्रमाणें इतरत्र साधुलोकांची गोष्ट आहे. हे साधुसंत जेव्हां दुस-या देवालयांत जात, तेव्हां ते ज्या मूर्तीची पूजा करीत नसत, ती मूर्ति ते पहात नसत, म्हणुन ती मूर्ती त्यांचें आवडतें रूप धारण करून त्यास दर्शन देई, अशा अनेक चमत्कारिक गोष्टी या साधुसंतांच्या चरित्रांत लिहिल्या आहेत. या साधुसंतांपैकीं प्रत्येकजण, सत्ताधीश ईश्वर एक आहे, दुसरा कोणीही नाहीं असें मानित असे, व कोणासही ह्या सिद्धांताविषयीं शंका घेऊं देत नसत व वादविवादही करूं देत नसत. पण वर सांगितल्याप्रमाणें या देशांत मूर्तिभंग कधींही झाला नाहीं; तर आपण पुजीत असलेली ईश्वराचीं नानाविध रूपें हीं जाऊन शेवटीं एकच देवाधिदेव किंवा ब्रह्म आहे, असें ते मानीत. सर्व लोकांच्या मनाची अशी प्रवृत्ति 'फार जुनाट आहे. वेदकालामध्यें सुद्धां जरी इंद्र, वरुण, मरुत आणि रुद्र यांच्याकरितां केलेल्या यज्ञयागामध्यें ते त्यांची वेगवेगळी आराधना करीत, तरी ते सर्व एका श्रेष्ठ सृष्टिकर्त्याचीं निरनिराळीं रूपें आहेत असें मानीत असत. याच प्रवृत्तीवरून साधुसंतांस मूर्तिपूजेचें विशेष महत्व कां वाटत नसे तें सहज समजण्यासारखें आहे. हे साधुसंत लोक (मूर्तिपूजक, या शब्दाचा एक अर्थ आक्षेप घेण्याजोगा आहे व त्या अर्थानें ते ) मूर्तिपूजक होते असें ह्मणणें म्हणजे त्यांचे विचार व कल्पना यांचा पूर्ण विपर्यास करण्यासारखेंच होय. वैदिक कालांत तर मूर्ति किंवा पुतळा यांची कधींही पूजा करीत नसत. अवताराची कल्पना जेव्हां निघाली, तेव्हांच ही चाल प्रचारांत आली. आणि जैन व बौद्ध हे आपल्या साधुसंतांची पूजा करीत, त्यायोगें या चालीस विशेष जोर आला. शेवटीं शेवटीं येथील मूळचे रानटी लोक आर्यसमाजांत मिसळून त्यांची दगडधोंड्याचीं पूजासुद्धां इकडे सुरू झाली व या रानटी लोकांच्या देवांची गणना आर्य देवांच्या अवतारांत होऊं लागली. साधुसंत मात्र अशा अडाणी क्षुद्रकल्पनेस कधींही थारा देत नसत. मूर्तीचे ठिकाणी ईश्वरी गुण दिसेनात, तेव्हां ते मुर्तिं पूजेचा निषेध करूं लागले. तुकाराम, रामदासांनी तर या अडाणी मूळच्या लोकांच्या देवांची व त्यांच्या भयंकर पूजाहोमांची अगदी निर्भर्त्सना केली. भानुदासाच्या चरित्रांत एक गोष्ट आहे:--विद्यानगरचा राजा एका देवीची पूजा करीत असे. त्यास भानुदासानें सांगितलें कीं, आपली देवी पंढरपुरांत माझ्या देवाच्या सेवेंत असून झाडूचें काम करीत असते. तेव्हां राजा पंढरपुरास जाऊन पहातो तों खरोखरच तसा प्रकार त्याच्या दृष्टीस आला. दुस-या दोन संतांच्या चरित्रांत लिहिलें आहे :–कालीदेवीस मनुष्यांचे व जनावरांचे बळी देत असत. असला क्रूरपणाचा प्रकार टाकून दे म्हणून श्रीहरीचें नांव घेऊन संतांनीं जेव्हां तिचा निषेध करण्यास सुरवात केली, तेव्हां ती देवी भयानें गर्भगळीत होऊन तिनें असे बळी केव्हांही देऊं नयेत अशी सक्त ताकीद केली. तेव्हां मूर्तिपूजेचा उपयोग या साधुसंतांनीं भक्तिप्रसार करण्याच्या कामी कसा केला हें या गोष्टीवरून दिसून येईल व हा विशेष लक्ष्यांत ठेविला नाहीं तर असल्या महत्वाच्या कामांत या आमच्या धर्मशिक्षकांचा कोणता संबंध होता हें समजणार नाहीं.

प्राचीनकाळीं यूरोपांत सर्व पुस्तकें लाटिनभाषेंत लिहीत असत, म्हणून त्या भाषेस वर्चस्व प्राप्त होऊन लोकांना बरेच त्रासदायक झालें होतें. तसेंच प्राचीन पांडित्याच्या गुलामगिरीसही लोक कंटाळून गेले होते. युरोपांतील सुधारकांनी या त्रासदायक वर्चस्वापासून व दास्यापासून राष्ट्रीय बुद्धीची सुटका केली. हा या सुधारकांनीं मिळविलेला शाश्वत भय सर्व यूरोपचा इतिहास वाचणा-यांस माहीत आहेच. या सुधारकांच्या साहाय्यानें उच्चनीच लोकांस बायबल अगदीं सुगम झालें, तसें आजपर्यंत कधीं झालें नव्हतें व आजपर्यंत विद्यादानाचा अधिकार जो एकट्या धर्माधिका-याकडेच होता त्या अधिकारास अज्जी धक्का बसला. त्याचप्रमाणें हिंदुस्थानांतही स्थिति झाली. साधुसंतांनी जेव्हां आपल्या प्राकृत भाषेंत, लेखनद्वारें व कीर्तनद्वारे लोकांस उपदेश करण्यास सुरवात केली व सरसकट पुरुष व स्त्रिया, ब्राह्मण व शूद्र सर्व लोकांच्यापुढें आजपर्यंत गुप्त असलेलें ज्ञानभांडार जेव्हां धिटाईनें उघडें करून दाखविलें, तेव्हां प्राचीन संस्कृतभाषेंत निष्णात असलेल्या पंडितांना परमावधीचें आश्चर्य वाटलें. परंतु पूर्ण जय मिळावण्यास या साधुसंतांना बराच त्रास व पुष्कळ दुःखें भोगावीं लागलीं. मज्जाव केलेल्या या प्रांतांतून हिंडण्याचें प्रथम साहस ज्ञानदेवानें केलें व लवकरच एकनाथ, रामदास , नामदेव, तुकाराम, वामन पंडित, मुक्तेश्वर , श्रीधर, मोरोपंत इत्यादिकांनी त्याचें अनुकरण केलें. शेवटले चार गृहस्थ धर्मगुरुपेक्षां ग्रंथकर्ते व कवी या नात्यानेंच जास्त प्रसिद्ध आहेत, तरीपण त्यांच्या कवितास्फूर्तीचें मूल एकच.

आतां बायबलप्रमाणें वेदांचें व शास्त्रांचें प्राकृत भाषांतर झालें नाहीं ही गोष्ट खरी; पण असा फरक पडण्यास सबळ कारण आहे. बुद्धधर्मक्रान्ति झाल्यापासून वेद व शास्त्रें यांपेक्षां रामायण, महाभारत, भागवतपुराण व गीता यांच्या ठिकाणींच छोकांची आसक्ति जडली होती. हें या प्राकृत ग्रंथकर्त्यास माहीत होतें, व म्हणूनच त्यांनीं त्या ग्रंथांचें भाषांतर करून सर्व लोकांस ते ग्रंथ सुलभ करून टाकले. एकनाथ व तुकाराम हेच या रणांतील पुढारी व त्यांनाच ब्राह्मणद्वेषाग्नीचा सर्व ताप सोसावा लागला. युरोपांतल्याप्रमाणें त्यांचे ग्रंथ जाळून टाकिले नाहींत, तरी पण पाण्यांत फेंकून द्यावेत अशी आज्ञा झाली होती. अशी गोष्ट सांगतात कीं, जलदेवतांना त्यांचा होणारा नाश आवडला नाहीं, म्हणून ते ग्रंथ पाण्यांत न बुडतां वर जसेच्या तसेच कोरडे राहिले, आणि त्यांची पूर्वीपेक्षांही जास्त ख्याती झाली. वामन पंडित म्हणजे संस्कृत भाषेचें महान् पंडितच. आपल्यासारख्या पंडितास बोलण्यास किंवा लिहिण्यास प्राकृतभाषा नालायख असें त्यांस वाटे-पण जेव्हां रामदासांची व त्यांची संगति जडली, तेव्हां त्यांचे डोळे उघडले व वामनपंडितांस आपला मार्ग चुकीचा आहे असें दिसून आलें. तसेंच रामायणाचें भाषांतर करणारा साल्या रसाळ, त्यास आपल्या अगाध ज्ञानाचा भारी गर्व, पण त्याच्या इष्ट देवतेनें त्यास दृष्टांत दिला कीं, ‘तूं केलेला ग्रंथ नामदेव शिंप्याकडे पाठवून तपासून घे.' या दृष्टांतानें त्याच्या गर्वाचें खंडन झालें. ज्ञानदेवाकडूनही देवांनीं असाच एक चमत्कार घडवून आणला, तो असा. एका रेड्याकडून सर्व वेदांचें पाठांतर करविलें. पाहूं गेलें तर वेदाचा अर्थ समजल्याशिवाय सर्व वेद तोंडपाठ म्हणण्याची आपल्या अंगांत शक्ति आहे, अशी जे बढ़ाई मारतात, त्यांच्या मानसिक शक्तीचें हास्यकारक चित्र या गोष्टीवरून उत्तम दिसून येतें.

दुसरे, युरोपांतील सुधारकांस, मठस्थापना न आवडून पाद्री लोकांनी अविवाहित राहणें, सृष्टिनियमाविरुद्ध स्त्रियांनीं संसारापासून अलिप्त राहून संन्यास वेष घेऊन विरक्त होणें, हें पसंत नव्हतें. त्याचप्रमाणें आमच्या इकडेही सर्व साधुसंतानाही उपास करून देह कष्टविणें ; निरर्थक तप करणें व आजन्म यात्रा करीत राहणें पसंत नव्हतें. तसेंच योगसाधन केल्यापासून योगी लोकांस अद्भुत चमत्कार करण्याची शक्ति येते असें समजून ती शक्ति येण्याकरितां अति कडक नियम व व्रत करून शरीर झिजविणें हें सुद्धां त्यांना रुचेना. भक्ति व योग यामध्यें सुरू झालेली ही स्पर्धा इचें उत्तम उदाहरण म्हटलें ह्मणने गर्वानें फुगलेला चांगदेव व ज्ञानदेव यांची झालेली भेट होय. आपल्या अंगांतील योगशक्तीच्या जोरावर चांगदेव वाघावर बसून हातांत सर्पाचा चाबूक घेऊन आले, तेव्हां ज्ञानदेवानीं त्यास भिंतीवरून जाऊन लाजविलें. त्याचप्रमाणें ज्ञानदेव व नामदेव यांच्यांतील भेटीची हकीकत आहे. योगशक्तीच्यायोगानें ज्ञानदेव आकारानें लहान होऊन त्यांनीं एका खोल विहिरीचें पाणी पिऊन टाकलें. तेव्हां नामदेवानीं आपल्या शक्तीच्या जोरावर ती विहीर तुडुंब भरून टाकिली की सदासर्वदा जाणा-या येणा-यास तहान लागली असतां पोटभरे पर्यंत पाणी पिण्यास मिळावें. महाराष्ट्रांतील साधुसंतांच्या शिक्षणाचा हा जो विशेष भाग तो या गोष्टीवरून फार सुंदर रीतीनें खुलून दिसतो.

कान्होबा पाठकाविषयी एक आख्यायिका अशी आहे. कान्होबा । आपल्या मुलावर अतिशय प्रीति करीत असे. हें काशींतील एका ब्राह्मणास न आवडून त्यानें कान्होबाचा त्याबद्दल निषेध केला. तेव्हां कान्होबानें आपल्या मुलास उचलून जवळच्या विहिरींत टाकिलें; त्याचें त्याला कांहींच वाटले नाहीं. हें पाहून त्या ब्राह्मणास पराकाष्ठेचें आश्चर्य वाटलें. या उदाहरणावरून ब्रह्मचर्यव्रताचा पोकळपणा मात्र जास्त प्रत्ययास येतो. ब्रह्मचर्यव्रतापासून मनाची समता प्राप्त होत नाहीं व मुखदुःखाविषयी औदासिन्यही उत्पन्न होत नाहीं. एकनाथ तर सर्व जन्मभर आपल्या कुटुंबांतच राहिला. त्याचप्रमाणें तुकाराम व नामदेव यांनींही केले. त्यांच्या कमनशीबानें त्यांना त्यांच्या स्वभावास स्वभाव मिळणा-या बायका मिळाल्या नाहींत ही गोष्ट निराळी. तसेंच बोधलेबोवा, चोखामेळा, दामाजीपंत, भानुदास, दोन्ही साधु कुंभार, आणखी पुष्कळ इतर साधु लोक आपल्या कुटुंबांतच राहत होते. ज्ञानदेवाच्या बापानें आपल्या पत्नीच्या सम्मतिशिवाय संन्यास घेतला, म्हणून त्याचा गुरु रामानंद यानें त्यास घरी जाऊन पत्नीशीं आयुष्य घालविण्याची आज्ञा केली, व त्यानें तसें केलेंही. या सर्व गोष्टीवरून त्यावेळच्या साधुसंतांस गृहस्थाश्रमाची पवित्रता फार उत्तम तहेनें अवगत होती असें सिद्ध होतें. संसारत्याग केला म्हणजे मग जगांत काळजी किंवा दुःख कांहीं नाहीं असा जो सर्व लोकांचा गैरसमज होऊन गेला होता, त्यास चांगलें वळण लावण्यास या संतमंडळींनीं आपल्या हातून होतील तितके प्रयत्न केले. ( साध्वी स्त्रियांची ) संतिणींचीं चरित्रें तर याहूनही मनोरंजक आहेत. देवाच्या ठिकाणी त्यांची निष्ठा व दृढविश्वास असल्यामुळें देव त्यांना त्यांच्या दैनिक गृहकृत्यांतही हातभार लावी व त्यांच्या शंकेखोर भ्रतारास त्या बाहेर गेल्या तर कांहीं अंदेशा येईल म्हणून निरनिराळे वेष घेऊन देव त्यांच्याकडून त्यांच्या । घरींच इच्छेप्रमाणें सेवा करून घेई. अशा पुष्कळ गोष्टी या स्त्रियांच्या चरित्रांत सांगितल्या आहेत. आतां या गोष्टींत सांगितल्याप्रमाणें देवाचें येणें जाणें इतकें सवंगसुकाळ होणें चांगलें नाहीं हें खरें; पण त्या गोष्टींच्या मुळाशीं जें उच्च नीतितत्व आहे, त्यानें वरील दोषांचे चांगलेंच परिमार्जन होतें. विवाहित व गृहस्थाश्रमाचें पावित्र्य, या साधुसंतांनीं लोकांच्या नजरेस उत्तम त-हेनें आणून दिलें. पुरातन काळापासून चालत आलेल्या वैराग्यावर नीतितत्वाचा झालेला हा विजय कांहीं साधारण नव्हे.

तथापि अतिशय हृदयद्रावक उदाहरण म्हटलें ह्मणने पंढरपूर येथील देवळांत शिरल्याबद्दल चोखामेळा महार याचा झालेला छळ होय. असें अविचाराचें कृत्य कां केलेंस म्हणून त्यास लोकांनी विचारलें असतां तो ह्मणाला कीं मला देवानेंच देवळांत ढकलीत आणलें. मीं आपण होऊन काहीं आलों नाहीं. नंतर तो देवळांतील पुजा-यास उद्देशून बोलला “ भक्ति किंवा विश्वास जर नाहीं तर उच्च जातींमध्यें जन्म होऊन काय उपयोग? किंवा धर्मविधि आणि विद्वत्ता यांचा काय उपयोग ? मनुष्य नीच जातींतील असेना, त्याचें अंतःकरण जर खरें आहे, ईश्वरावर प्रीति आहे, सर्व प्राण्यांस आत्मवत् मानितो, आपल्या व दुस-याच्या मुलांमध्यें भेद करीत नाहीं आणि खरें बोलतो, तरच त्याची जाति पवित्र होय. ईश्वर त्यावर नेहमीं संतुष्ट असतो. मनुष्याचा ईश्वराचे ठायीं जर विश्वास आहे व मनुष्यमात्राविषयीं जर प्रीति आहे, तर त्याच्या जातिविषयीं विचार करूं नका. आपल्याठायीं प्रीति व भक्ति असावी अशी देवाची इच्छा आहे व म्हणुन तो त्यांच्या जातिविषयीं काळजी करीत नाहीं." या उदात्त ज्ञानोपदेशानें त्या हटवादी ब्राह्मणांवर कांहींच परिणाम झाला नाहीं. उलट त्यांनी तेथील मुसलमान कामगाराकडे फिर्याद दिली व त्यानें बायबलांतील “पायलेट " प्रमाणें चोखामेळ्यास त्याच्या मुसक्या आंवळून त्यास बैलाकडून ओढीत न्यावें व अशा रीतीनें त्याचें हालहाल करून त्यास मारून टाकावे अशी शिक्षा दिली. पण देवानें मोठ्या चमत्कारिक रीतीनें त्यास संकटांतून सोडविलें व जुलमी लोकांची निराशा केली. कारण ते बैल जाग्यावरून अगदीं हालेनात. ह्याचसंबंधानें बहिरामभटाची गोष्टसुद्धां मजेशीर आहे. शास्त्री असून ब्राह्मणधर्मात त्यास शांति मिळेना, ह्मणून त्यानें मुसलमानीं धर्म स्वीकारला, कीं एकेश्वरी मतानें तरी आपल्या अंतःकरणाचें समाधान होईल. पण इच्छिलेली शांति मिळत नाहीं ह्मणून पुन्हा ब्राह्मण धर्मांत आला. तेव्हां ब्राह्मण व मुसलमान दोघेही या धर्मपालटाबद्दल त्यास दोष देऊं लागले, परंतु आपण हिंदुही नाहीं अथवा मुसलमानही नाहीं असें तो म्हणूं लागला. बहिरामभटानें ब्राह्मणांस असा सवाल केला कीं, मी मुसलमान झालों आहें, माझा सुंता केला आहे, मला ब्राह्मण ह्मणायचें असेल तर खुशाल ह्मणा, व मुसलमानांस म्हणाला, माझ्या कानांस भोंकें आहेत तीं बुजवा. (ह्मणजे आपण हिंदु आहोंत मुसलमान नव्हे असें तो ह्मणाला.) हिंदुधर्म स्वीकारलेले महंमदी लोक, शेख महमद याचे अनुयायी या नांवानें प्रसिद्ध असलेले, रमजानउपोषणव्रतें व एकादशीउपोषणव्रतें अद्याप पावेतों. पाळीत आहेत व मक्केस तसेंच पंढरपुरास यात्रे करतां जात आहेत. कबीर, नानक, व माणिकप्रभू यांच्यासारखे महाप्रसिद्ध साधु लोक आहेत, त्यांस हिंदु लोक आपले व मुसलमान लोक आपले असें मानतात व दोघेही त्या साधूंना भजतात. या साधूंच्या चरित्रांवरून मनुष्याच्या पारमार्थिक स्वभावाची कल्पना फार उदात्त झाली आहे, तसेंच जातिभेदाची गांठही फार सैल झालेली आहे, हें स्पष्टपणें दाखविण्यास वरील उदाहरणें बस्स आहेत.

या उदात्त शिक्षणाचा परिणाम पाहूं गेलें तर असा दिसून येतो कीं, त्यायोगानें धर्मसंबंधी बाबतींत ज्ञातिमहत्वास मुळींच थारा मिळाला नाहीं. फक्त सामाजिक गोष्टींत मात्र तिचें महत्व राहिलें आहे व तेंही फारच कमी आहे. दक्षिणहिंदुस्थानांतील ब्राह्मण, त्यांचे जातिसंबंधानें चमत्कारिक गैरसमज--ब्राह्मण जाणाच्या मार्गावरून चांडाळ गेला तर, त्याची सावली पडली तरी देखील, तो रस्ता अपवित्र होतो म्हणून त्याच्या सावलीचा देखील कंटाळा करणें- याची व दक्षिणमहाराष्ट्रांतील लोकांचा या सर्व गोष्टींत दिसून येत असलेला उदासीनपणा याची तुलना करून पाहिली तर हें सहज दिसून येतें. हें औदासिन्य, प्रतिवार्षिक वारक-याच्या मेळ्यांत आणि शेवटच्या दिवशीं होणा-या गोपाळकाल्याचे वेळीं जो सर्वास एकसारखा आनंद होतो त्यांत विशेष दिसून येतें. पुजारी ह्मणने ईश्वर व मनुष्य यांच्यामधील मोक्षप्राप्ति करून देणारें अवश्य साधन आहे, ब्राह्मणजातीचें वरिष्ठत्व ईश्वरनिर्मितच आहे, त्यांची बाकीच्या जातींनीं सेवा व पूजा केली पाहिजे, इत्यादि विचार यूरोपांतल्याप्रमाणेंच हिंदुस्थानच्या या भागांतसुद्धां बाजूस पडले. आणि सर्व दर्जाच्या स्त्रीपुरुषांस असें वाटूं लागलें कीं,हीन कुलांत जन्म झाला तरी ईश्वरावर दृढभक्ति व प्रीति असली ह्मणने मोक्ष मिळण्यास कांहींही अडचण नाहीं.

वर ह्मटल्याप्रमाणें त्यांच्यौपकीं जवळ जवळ निम्मेशिम्मे ब्राह्मणांशिवाय इतर जातींतील होते. कांहीं कांहीं तर खरोखरच हलक्या जातींतील होते. ब्राह्मणसुधारकापैकीं पुष्कळांच्या वंशपरंपरागत शुद्धत्वास कलंक लागून त्यायोगें ते कोणताही कृत्रिम निर्बेध नको असें ह्मणण्यास तयार झाले. ज्ञानदेव, त्यांचे बंधु व बहीण मुक्ताबाई यांचा जन्म त्यांचा बाप विरक्त होऊन संन्यासी झाल्यावर झाला. त्याचा धर्मगुरु रामानंद यांस जेव्हा समजलें की, संन्यासआश्रम घेण्यास त्याच्या बायकोची परवानगी नव्हती, तेव्हां त्यानें ज्ञानदेवाच्या बापास आपल्या-- गांवी जाऊन बायकोजवळ राहणेस आज्ञा केली. अशा प्रकारें त्या संन्याशास झालेल्या मुलांस त्या जातींतील सर्व लोक अगदीं हलक्या जातींतील समजून त्यांचा तिरस्कार करीत व ब्राह्मणांनीं तर योग्य कालीं त्यांचें मौंजीबंधनसुद्धां करण्याचें नाकारिलें. अशा अज्ञात स्थितींत तीं मुलें जन्मभर राहिलीं; पण लोक त्यांच्या ज्ञातिहीनत्वाकडे लक्ष न देतां उलट त्यांचा मानच करूं लागले. दुसरा साधु मालोपंत याचा एका नीच जातींतील मुलीशीं विवाह झाला होता. तिची जात लग्न होईपर्येत कोणासही कळली नाहीं; पण नव-यानें तिचा त्याग न करितां फक्त तिच्याशीं व्यवहार करण्याचें वर्ज केलें. आणि ती मेल्यानंतर जनरूढीस अनुसरून तिची उत्तरक्रिया करूं लागला. त्या वेळीं एक अद्भुत चमत्कार दृष्टीस पडला. त्यायोगें त्याचे जे कट्टे शत्रू होते त्यांचीसुद्धां खात्री झाली कीं हे दोघेही जन्मतःच परमपवित्र होते. त्याचप्रमाणें जयरामस्वामीचा गुरु कृष्णदास याचा एका नापीत कन्येशीं विवाह झाला व नंतर तिचें हीनजातीत्व कळून आलें, तथापि त्या मनुष्याच्या पवित्र आचरणाचा असा परिणाम झाला कीं, त्याचा पुष्कळ छळ होऊनही त्या वेळच्या श्रीजगद्गुरु शंकराचार्यांनींही त्याच्या विरुद्ध ब्र देखील काढला नाहीं. एकनाथ जातिभेदास अगदीं कमी महत्व देत होता ही गोष्ट महशूर आहेच. त्यानें एका बुभुक्षित महारास भोजन घातलें आणि नंतर जेव्हां त्यास वाळींत टाकिलें आणि प्रायश्चित्त घेण्याकरितां ह्मणून तो नदीवर गेला, तोंच एक चमत्कार झाला. त्याच्या योगानें असे सिद्ध झालें की, एका बुभुक्षित महारास अन्न देण्याचें पुण्य सहस्र ब्राह्मणांस भोजन घालून मिळणा-या पुण्यापेक्षां जास्त आहे. कारण कीं पहिल्या पुण्यानें एका महारोग्याचा रोग बरा झाला व दुस-याने कांहींच परिणाम झाला नाहीं. त्याच प्रकारचा एक चमत्कार पुष्कळ साधुसंतांनी केलेला विशेषेंकरून ज्ञानदेव, एकनाथ ह्यांनीं केलेला सर्वास महशूर आहेच. तो असा–ज्ञातिनियम मोडल्याबद्दल आह्मीं तुमच्या घरीं श्राद्धास बसत नाही असें ज्यावेळेस ब्राह्मणांनी म्हटलें, त्यावेळेस या साधूंनीं त्या हट्टी ब्राह्मणांच्या मृत वाडवडिलांस स्वर्गातून पृथ्वीवर आणलें व तुमचा पोकळ जात्यभिमान अगदीं निरुपयोगी आहे अशी त्यांच्या धर्मलंड पुत्रांची खात्री करून त्यांस लाजविलें. नामदेवाच्या चरित्रांत त्याच्या पंढरपुरच्या देवानें ब्राह्मणांस भोजनास बोलावण्यास नामदेवास सांगितलें व स्वतः त्या साधूबरोबर त्यानें भोजन केलें. तेव्हां त्यांस लोकांनीं वाळींत टाकिलें. त्यावेळेस ज्ञानदेव साक्षात् हजर असून त्यानें त्या दुष्ट ब्राह्मणांस खालील उपदेश केला.

तो म्हणाला, “ देवाला कोणी उच्च व नीच असा नाहीं; त्याला सर्व सारखेच आहेत. मी उच्च कुलांतील, माझा शेजारी नीच कुलांतील, असा विचार कधींही मनांत आणूं नका. नीच व उच्च हे दोघेही गंगेत स्नान करितात म्हणून गंगानदी कधीं अपवित्र होत नाहीं; किंव श्वासोच्छवास करतात म्हणून हवा बिघडत नाहीं ; किंवा दोघेही पृथ्वीवर हिंडतात ह्मणून पृथ्वी कांहीं स्पर्श करण्यास अयोग्य होत नाही.”

संतांचीं सर्व चरित्रें पाहिलीं तर असें दिसतें कीं, त्यांच्या अंगी, मेलेल्यास जिवंत करणें, आजारी मनुष्यास बरें करणें, क्षुधार्तास अन्न देऊन संतुष्ट करणें, इत्यादि अघटित कृत्यें करण्याचें अद्वितीय व अद्भुत सामर्थ्य असतें अशी लोकांची कल्पना असते. त्याप्रमाणें महाराष्ट्रांतील संतचरित्राविषयींहि गोष्ट आहे. परोपकार हें जें त्यांचे व्रत तें पाळण्यांत त्यांना अमानुष किंवा दैविक शक्तीपासून साहाय्य मिळतें, अशा ज्या । गोष्टी सांगतात, त्या सध्यांच्या काळीं म्हणने, तर्कशास्त्राच्या कसोटीस ( उतरल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर भरंवसा ठेवावयाचा नाहीं, अशा प्रवृत्तीच्या कालांत कोणास संमत असोत वा नसोत. : की। साहेबांनीं ह्मटल्याप्रमाणें ज्यावेळेस लोक कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यास सहज तत्पर असतात, त्यावेळेस असे अद्भुत चमत्कार नेहमीं होतात असें ह्मणण्याकडे व प्रतिपादण्याकडे लोकांची प्रवृत्ति होण्यास अनुकूल असें एक लोकमताचें वातावरण तयार होत असतें. साधुसंतांकडे खुद्द पाहिलें तर आपल्या अंगांत अद्भुत शक्ति आहेत असा ते कधीं बाणा बाळगीत नाहींत. ते ह्मणजे अगदीं लीन, सहनशील व ईश्वरावर सर्वस्वी भरंवसा ठेऊन राहिलेले पुरुष होत. हा त्यांचा दृढविश्वास खरोखर अस्थानीं नमून , सर्वथा यथार्थ आहे असें पुष्कळ वेळां त्यांचे प्रत्ययास आलें. ह्या परमेश्वरश्रद्धेच्या फलद्रूपतेबद्दल त्यांचा त्यांसही अचंबा वाटे. नैतिक दृष्ट्या या सर्व संतचरित्रांचें महत्व त्यांच्या या अचाट कृत्यावर नाहीं, तर नीतितत्वांचा खरेपणा व मनुष्याच्या उदात्त पारमार्थिक जीविताची सत्यता सिद्ध करून देण्यास त्यांच्या चरित्रांचा जो उपयोग झाला त्यांवर आहे. त्यांच्या चरित्राच्या या स्मरणीय स्वरूपाशींच पुढील इतिहासभागाचा संबंध आहे, आणि त्यांनी जें कार्य केलें तें केवळ अमूल्य व सर्वतोपरि उदात्त होतें हे आह्मीं दाखविणार आहों.

यूरोप खंडांतील धर्मसंशोधनाची चळवळ आणि तत्कालीन आमच्या या महाराष्ट्रांत झालेल्या साधुसंतांचे लेख व शिक्षणपद्धति यांनीं प्रतिबिंबित झालेला झगडा या दोहोंत एक प्रकारचें विशेष साम्य दिसून येतें. सोळाव्या शतकांतील युरोपस्थ सुधारणेच्छु, पाद्री लोक व त्यांचा मुख्य गुरु जो रोमचा धर्माध्यक्ष ( पोप ), यांचा अधिकार तुच्छ करूं लागले. या पाद्यास व त्यांच्या पोपास जो अधिकार प्राप्त झाला होता तो केवळ प्राचीन कालापासून चालत आला आहे; आणि या अधिकारापासूनच रोमन देशाची धुळधाण करणा-या रानटी लोकांच्या समूहाची सुधारणा होऊन त्यांना माणूसपणा आला असें ते पाद्री ह्मणत. कालांतरानें आपण चाकर आहोंत हें विसरून, धनी आपण, राज्यकर्ते आपण, ऐहिक पारमार्थिक सर्व शक्ति आपल्या ठायीं आहेत, आणि ईश्वर व मनुष्य यांच्यामधील मध्यस्थही आपणच असें ते ह्मणूं लागले. या मध्यस्थपणास त्यांनी अनेक धर्मविधि व संस्कारांचे कुंपण घातलें. त्याचा परिणाम असा झाला कीं, कालांतरानें पुष्कळ दुष्ट आचार प्रचारांत येऊन त्यायोगें लेकांचें त्यांचेवरील प्रेम नाहीसें झालें. कपटपटु पोप व त्यांचे व्यसनासक्त कार्डिनल्स (मार्गोपदेशक) यांची ऐहिक सत्ता राखण्या- करितां कराच्या रूपानें, धर्मादाय ह्मणून नव्हे,' पिटरस्पेन्स' नांवाचा कर ज्या अधिकारी वर्गानीं सुरू केला व ‘इंडलजन्सीस ' प्रसिद्ध केले त्या अधिकारीवर्गाविरुद्ध ल्यूथर जेव्हां भांडूं लागला त्यावेळेस या दुष्ट आचारांचा कळस झाला होता. पश्चिम हिंदुस्थानांतील धर्मसुधारणेंचें साम्य याच गोष्टींत दिसून येतें. प्राचीन अधिकार व प्राचीन संप्रदाय हिंदुस्थानांत, महत्वाकांक्षी बिशप व क्लर्जी यांच्या ठिकाणीं नव्हे, तर ब्राह्मण जातींमध्यें इतर खिळून गेले होते. व या ब्राह्मण जातीच्या प्रभुत्वाविरुद्ध साधुसंत मोठ्या धैर्यानें झगडत होते. मनुष्याच्या आत्म्याचें उच्चत्व, त्याचा जन्म अगर त्याची समाजांतील स्थिति यांजवर अवलंबून नाहीं असें ते प्रतिपादन करीत. असा सिद्धांत काढण्यास धर्मोपदेशकांस त्यांचा आयुष्यक्रम व त्यांचें शिक्षण सहज कारणीभूत झालें.

हा गैरसमज दूर करावा हाणून मराठ्यांच्या धार्मिक जागृतीचा इतिहास त्रोटक रीतीनें देण्याचें आह्मीं योजिलें आहे. ही माहिती मिळण्याचें मुख्य ठिकाण ह्मणजे, गेल्या शतकाच्या शेवटीं या भागास ब्रिटिश सत्तेचें वारेंसुद्धां लागलें नव्हतें, अशावेळीं आमच्याच कविमालिकेपैकी कविवर्य महिपतीनें महाष्ट्रांतील साधुसंतांचीं लिहून ठेविलेलीं विस्तृत चरित्रेंच होत. महाराष्ट्रीयांस राजकीय स्वातंत्र्य जसें एका मनुष्याचे हातून किंवा एका शतकांत प्राप्त झालेलें नाहीं, तसेंच मराठ्यांची धर्मोन्नति होण्यास बराच काळ लागून पुष्कळ साधुसंताचे उपदेश खर्ची पडले आहेत. मुसलमानांनी दक्षिण जिंकण्यापूर्वीच ह्या धर्मसुधारणेस सुरुवात झालेली आहे. देवगिरीस यादव राजे राज्य करीत होते, तेव्हांच साधु ज्ञानेश्वरानें भगवद्गीतेवरील आपली प्रसिद्ध 'ज्ञानेश्वरी' टीका मराठींत लिहिली. बल्लाळराजांचे वेळीं मुकुंदराज प्रसिद्धीस आला. त्याचवेळीं त्याणें आपला प्रसिद्ध ग्रंथ ' विवेकसिंधु ' लिहिला. बाराव्या शतकांत मराठींत जे जे ग्रंथ प्रसिद्ध झाले, त्यांत ह्या मुकुंदराजाचे ग्रंथांस अग्रस्थान दिलें पाहिजे. पुढें मुसलमानांच्या स्वा-यांस सुरवात झाली, तेव्हां हा प्रगतिप्रवाह थोडासा मंदावला; पण कांहीं काळानें महाराष्ट्रीयांच्या बुद्धिचातुर्यानें पुनः उचल खाल्ली. मराठी सत्तेच्या उदयकाळीं तर एक साधु| संतपरंपराच महाराष्ट्रांत चोंहींकडे पसरली होती. अशाप्रमाणें हा प्रगतिप्रवाह सरासरी २०० वर्षे मोठ्या जोरानें फोंफावत चालला होता; पण पुढें त्यास हळू हळू ओहटी लागली, व त्याच्या अंताबरोबर मराठ्यांचे राजकीय स्वातंत्र्यही नष्ट झालें. साधारणपणें हें धर्मजागृतीनें काम ५०० वर्षेपर्यंत चाललें होतें असें ह्मणण्यास हरकत नाहीं. इतक्या मुदतींत सुमारें ५० साधुपुरुष निर्माण झाले, व त्यांनी सर्व महाराष्ट्रभर आपली छाप पूर्णपणें बसवून सोडली. असा ज्या साधुसंतांचा प्रभाव त्यांचीं चरित्रें लिहिण्यास महीपतीस स्फूर्ति झाली यांत नवल काय ? या साधुसंतमेळ्यांत कांही स्त्रिया, कांहीं हिंदुधर्म स्वीकारलेले मुसलमान, कांहीं मराठे, कुणबी, शिंपी, माळी, कासार, सोनार पश्चात्तापानें शुद्ध जाहलेल्या वेश्या, दासी व अति शूद्र, महार व निम्मेशिम्मे ब्राह्मण अशी मंडळी होती. यावरून असे आढळून येईल की, या आध्यात्मिक उन्नतीचा केवळ परिणाम एकाच जातीवर घडला नसून लहानापासून थोरापर्यंत सर्व समाज तिणें अगदी वेडा करून टाकला होता. उच्चनीच, अज्ञ सुजाण स्त्रियापुरुष, हिंदु मुसलमान एकसह सर्व लोक धर्मानंदांत 'नाचूं लागले होते. अशाप्रकारची धर्मजागृति इतर देशांचे इतिहासांत क्वचित् सांपडेल. याच सुमारास उत्तर व पूर्व हिंदुस्थानांतही धर्मजागृति होण्यास सुरवात झाली होती. नानकानें सर्व पंजाब हलवून हिंदु मुसलमान धर्माचें ऐक्य करण्याचा प्रयत्न केला. पूर्वेकडे चैतन्यानें शाक्तधर्माचें बंड मोडून भागवत धर्माचा प्रसार करण्याचा प्रारंभ केला. रामानंद, कबीर, तुळशीदास, सुरदास, जयदेव, रोहिदास वगैरे आपआपल्यापरी लोकांस अध्यात्मिक ज्ञानामृत पाजण्याचें कार्य करीत होते. यांचा परिणाम मोठा झाला व तो चिरस्थायीही झाला ; परंतु महाराष्ट्रांतील साधुसंतांच्या कार्याच्या पासंगालाही तो येणार नाहीं. ‘चांगदेव व ज्ञानदेव, निवृत्ति व सोपान, मुक्ताबाई व जनी, अकाबाई व वेणुबाई, नामदेव व एकनाथ, रामदास व तुकाराम, शेख महंमद व शांति बहामनी, दामाजी व उद्धव, भानुदास व कूर्मदास, बोधलेबाबा व संतोबा पवार, केशवस्वामी व जयरामस्वामी, नरसिंह सरस्वती व रघुनाथस्वामी, चोखामेळा व दोवेही कुंभार, नरहरि सोनार व सावत्या माळी, बहिरामभट व गणेशनाथ, जनार्दनपंत व मुधोपंत; ही नांवे आणि अशीं किती तरी घ्यावींत? हा सर्व तांडा पुढें आला ह्मणजे महाराष्ट्रांतील चळवळीच्या विशेष कर्तबगारीविषयीं बालंबाल खात्री होऊन जाते. इकडच्या भागांत साधुसंतांच्या वर्गात ब्राह्मणांचा भरणा विशेष आहे. तेच हिंदुस्थानच्या इतर भागांत ब्राह्मणसाधूंच्या संख्येपेक्षां क्षत्रिय व वैश्य साधूंचीच संख्या अधिक आहे.

महाराष्ट्रांतील साधुसंत.
प्रकरण ८ वें.

शिवाजीचे धर्मगुरु प्रसिद्ध रामदास यांणी एकेप्रसंगीं संभाजीस आपल्या बापाचें अनुकरण करण्यासाठीं फार मार्मिक उपदेश केलेला आहे. या उपदेशामृताचें सार अवघ्या दोनच वाक्यांत त्यांणीं दिलें आहे. संभाजीस स्वामी रामदास सांगतात.

‘ मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।'
ही कल्पना शिवाजीनें पूर्णत्वास आणून निर्विघ्नपणें सिद्धीस नेली. फार काय, प्रायः हीच कल्पना शिवाजीच्या सर्व राजकीय चळवळीचा पाया होय. ‘ महाराष्ट्र धर्म वाढवावा' या दुस-या वाक्यांत रामदासांनीं आपल्यावेळीं महाराष्ट्रांत चोहीकडे जी धर्म जागृति होत होती किंबहुना तत्कालीन राजकीय चळवळसुद्धां ज्या धर्मजागृतीचें केवळ प्रतिबिंबच होतें त्या धर्मजागृतीचें हुबेहुब चित्र आहे. वरील उपदेशांत वैदिक, पौराणिक अगर हिंदुधर्माचा प्रसार करण्यास ते सांगत नाहींत. ‘महाराष्ट्रधर्म’ वाढवावा असा ते उपदेश करतात. तेव्हां यांतील इंगित काय असावें असा प्रथमदर्शनीं प्रश्न उत्पन्न होतो. वैदिक, पौराणिक वगैरे धर्माहून महाराष्ट्र धर्माचीच स्वामींनीं महती कां गाइली, महाराष्ट्रीयांच्या धर्मकल्पनेंत असा विशेष गुण काय होता, संभाजीनें चालविलेल्या जुलुमापासून महाराष्ट्रीयांस मुक्त करण्यास महाराष्ट्रधर्मजागृति करणें एवढाच काय ते तरणोपाय, अमा रामदासाचा समज कां झाला वगैरे विचार एकामागून एक मनांत येऊं लागतात. महाराष्ट्राच्या इतिहासांत राजकीय व धार्मिक उन्नतीची एक बेमालुम सांगड बनली आहे. ह्या सांगडीचें महत्व बरोबर कळलें नाहीं, तर मराठ्यांचा अभ्युदय हें एक मोठेंच गूढ होऊन बसेल. मराठी साम्राज्याचा पाया उदात्त नैतिक तत्वावर उभारला नसून मराठ्यांने राजकीय प्रयत्न ह्मणने लुटारू लोकांची एक धामधुमीची गडबड असें वाटू लागेल. वर सांगितलेला हा राजकीय व धार्मिक सुधारणेंतील परस्परसंबंध आजपर्यंत कोणाही इतिहासकाराच्या लक्ष्यांत आला नाहीं. या सर्व इतिहासकारांनी, मराठ्यांनीं स्वातंत्र्यप्राप्तीकरितां चालविलेल्या प्रयत्नांचा एकाच बाजूनें विचार केला आहे. राजकीय प्रगती बरोबर मराठ्यांची धार्मिक उन्नति कशी होत गेली याचें त्यांणीं बिलकुल विवेचन केले नाहीं. अशा रीतीनें ही धार्मिक आणि राजकीय सुधारणेची सांगड फुटली गेल्यानें मराठ्यांबद्दल बराच गैरसमज उत्पन्न झाला आहे.