Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

सहावे. ह्याप्रमाणें दक्षिणेंत हिंदु व मुसलमान या दोन जातींमध्यें राजसत्ता विभागून गेल्यानें, उत्तरेप्रमाणें. इकडे मुसलमानांचा विशेष नक्षा वाढला नाहीं. ते बेफिकीर झाले नाहींत. हिंदु लोकही स्वराज्याचा थोडासा अनुभव घेत असल्यामुळें, उत्तरेकडील हिंदूंप्रमाणें परकीयांच्या पूर्णपणें आधीन होऊन, शुद्ध गोगलगाई बनले नाहीत. मुसलमानी फौज स्वराज्याशीं नाखुष झाली ह्मणने विजयानगरची नोकरी पतकरी व मराठे शिलेदार वारगीर प्रसंगवशात् मुसलमानाकडे जात. दुस-या ब्राह्मणी रानाचे २०९ शिलेदार शरीरसंरक्षक होते. वारंवार लढाईचे प्रसंग आल्यामुळें, लोकांस युद्धशिक्षण व संपत्ति पुष्कळ मिळे. १६ व्या शतकांत घाडगे, घोरपडे, जाधव, निंबाळकर, मोरे, शिंदे, डफळे, माने वगैरे मोठमोठ्या मराठे सरदारांकडे दहा दहा विस विस हजार पथकांचे सेनापतित्व होतें, व त्या मानानें त्यांस लहानमोठ्या जहागिरीही होत्या. मुसलमानी राजांस तुर्की, इराणी, पठाण, मोगल वगैरे लोकांपासून उपयोग न होतां त्रास मात्र होत असे. ह्मणून ते राजे त्या लोकांस सैन्यांत बहुश: न ठेवता मराठ्यांसच ठेवीत. मराठे शिलेदार व बारगीर यांच्यावरच त्यांची सारी भिस्त असे. |

सातवें. दक्षिणेंतील मुसलमानी राजे हिंदु मुलीबरोबर लग्नें करूं लागले. विजयानगरच्या राजकन्येशीं ७ व्या ब्राह्मणी राजानें लग्न केलें होतें. तसेंच सोनखेडच्या राजाच्या मुलीशीं ९ व्या ब्राह्मणी राजाचें लग्न झालें. विजापुरचा पहिला राजा युसफ अदिलशहा यानें मुकुंदराव नावाच्या एका ब्राह्मणाच्या मुलीशीं लग्न करून तीस आपली पट्टराणी केलें. इला --- ग्वानम असें ह्मणत, व युसफच्या मरणानंतर इच्याच मुलास विजापूरचें राज्य मिळालें. वेदरच्या बरीद घराण्यांतील पहिल्या राजानेंही आपल्या मुलाचें लग्न साबाजी मराठ्याच्या मुलीशीं लावलें होतें. अशी या भिन्न जातींत लग्न झाल्यानें. हिंदू चालीरीतीची मुसलमानांवर बरीच छाप बसली.

आठवें. मुसलमानी धर्म स्वीकारलेल्या कांहीं हिंदूनी आपल्या मूळच्या हिंदू चाली न सोडल्यानें त्या सहाजिकच मुसलमानांत शिरल्या. अहमदनगरचा पहिला राजा वहाडांतील पत्रिगांवच्या मुसलमान झालेल्या एका ब्राह्मण कुलकर्ण्याचा मुलगा होता. या ब्राह्मणाचें आडनांव भैरव असें होतें व त्यामुळेंच या राजास ‘ बहिरी राजे' असें ह्मणत. या राजांना आपल्या पूर्वजांचा इतका अभिमान होता की, यांनीं व-हाडांतील राजा वर स्वारी करून पत्रि गांव काबीज केलें व ते तेथील ब्राम्हण कुलकर्ण्यास इनाम दिलें. व-हाडांतील इमादशाई घराण्याचा मूळपुरुषही विजयानगराच्या पदरीं असलेल्या एका ब्राह्मणाचा मुलगा होता. वरीद घराण्याच्या पहिल्या रानावर त्याच्या सैन्याचें इतकें प्रेम होते कीं, ४०० मराठे शिपाई त्याच्या बरोबर मुसलमान झाले व या लोकांवर त्याचा पूर्ण विश्वास वसला.

पहिले. इकडे दक्षिणेंत जे मुसलमान आले, ते आपला देश फार दूरवर सोडून आल्यामुळें त्यांस हिंदूतच मिसळावें लागलें. दिल्लीस अफगान, गिलजी, तुर्क, युझवेग, मोंगल इत्यादि निरनिराळ्या जातींचे मुसलमान लोक उत्तरेकडून बरेच वर आल्याकारणानें मुसलमानी धर्म व चालीरीति यांस एकप्रकारचें कायमचें स्वरूप आलें. दक्षिणेंतील मुसलमानांत असे लोक न आल्यामुळें, मुसलमानी सुधारणा चोहोंकडे पसरली नाहीं.

दुसरें. दक्षिणेंत ब्राह्मणीराज्य स्थापन करणारा जो हसन, हा दिल्लीस राहणा-या गांगो नामक ब्राह्मणाचा गुलाम होता. हा गुलाम पुढे मोठा दैवशाली होईल असें याणें भविष्य वर्तविलें होतें. हसन याणें गांगोचे पूर्व उपकार स्मरून आपण सत्ताधीश झाल्यानंतर आपल्या राज्यास ब्राह्मणी राज्य असे नांव दिले स्वत : स, हसन गांगो ब्राह्मणी असें ह्मणवूं लागला. हिंदूंस उत्तरेंत असा मान कधींच मिळाला नाहीं. दक्षिणेंत मुसलमानांनी अशाप्रकारें या हिंदू ब्राह्मणास पूज्य मानल्यानें, हिंदूचा वरपगडा झाला व पुढें हसननें गांगोस दिल्लीहून आणवून त्याचे हातीं सर्व वसुलाचें काम दिल्यावर तर हिंदूंचें वर्चस्व फारच वाढले.
तिसरें. गांगोकडून ही वसुलाची व खजिन्याची व्यवस्था हळू हळू दक्षिणी ब्राह्मण व प्रभू यांच्या हाती आली. ।चवथे. हिंदुच्या हातीं ही हिशेबाची सत्ता आल्यानें, ब्राह्मणी राज्य नष्ट होऊन त्यांची पुढे विनापूर, वहाड, अहमदनगर, बेदर आणि गोवळकोंडा अशी पांच स्वतंत्र राज्यें झालीं, तरी गांवच्या हिशेबी जमाखर्चात फारशी अगर उरदू या परकीय भाषांचा प्रवेश आला नाहीं. हे हिशेब अवलीपासून अखेरपर्यंत देशी भाषेंतच होत गेले.

पांचवें. दुस-या एका तहेनेंही हिंदूंचा मुसलमानी राज्यावर पगडा बसला. १३४७ त मुसलमानांनी बंड करून महमद तघलक बादशहावर जी सरशी केली, ती तेलंगण व विजयानगर येथील हिंदू राज्यांच्या साहाय्यामुळेंच केली. तेलंगण राज्य ब्राह्मणी राज्यानें बुडविलें; पण विज यानगरची सत्ता पुढें दोन शतकांपर्यंत कायम राहून एकसारखी वाढत गेली. पांच मुसलमानी राज्यांनीं एक होऊन या राज्याचा १५६४ सालीं। तालिकोट येथें मोड केला. या हिंदू राज्याचा मुसलमानी राजांवर फारच जबर परिणाम घडला. हें राज्य एके वेळीं इतकें बलाढ्य होतें कीं, अहमदनगर व गोवळकोंडा हीं दोन्हीं राज्यें एक झालीं, तरी त्यास त्यानें दाद दिली नाहीं. लढाई संपल्यानंतर बिन हत्यारी लोकांची विनाकारण कत्तल करूं नये असा तह करण्यास या राष्ट्रानें एका मुसलमानी राजास भाग पाडलें. या तहाप्रमाणें सरासरी १०० वर्षेपर्यंत हिंदु व मुसलमान हे। दोन्ही राजे विनतक्रार वागत गेले.

अशा प्रकारचें देशाचें नैसर्गिक स्वरूप. लोकांचा स्वभाव व संस्था असल्यावर तेथें परकीयांचा अम्मल फार दिवस कसा टिकावा ? महाराप्ट्रीयांच्या इतिहासावरून वरील नियमाची यथार्थता तेव्हांच व्यक्त होते. हे लोक नात्याच स्वातंत्र्यप्रिय असल्यानें, जरी कांही प्रसंगी त्यांस परकीयांची गुलामगिरी करावी लागली, तरी पुनः त्यांनी आपलें स्वातंत्र्य स्थापित करण्यास कधींही सोडले नाहीं. महाराष्ट्रावर कोणत्याही एका राजसत्तेचा अंमल फार वेळ कधींच टिकला नाहीं. हिंदुस्थानचे इतर भागांत बरीच एकछत्री राज्ये अस्तित्वांत असल्याचें आढळतें. महाराष्ट्रांत मात्र तशी स्थिति नाहीं. तेथें लहान लहान स्वतंत्र संस्थानिकांचाच अंमल फार दिसतो. एकछत्री अंमल चालू न देण्याबद्दल त्यांची सतत खटपट चाललेली दिसते. व्यक्तिस्वातंत्र्य या लोकांस जरी विशेष आवडे, तरी उत्तरकडून आलेल्या शत्रूस पादाक्रांत करण्यास एक जुटीनें ते नेहमीं तयार असत. ख्रिस्तीशकाच्या आरंभीं शातवाहन किंवा शालिवाहन राजानें सिथियन लोकांचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. पुढें ६ ० ० वर्षानी चालुक्यवंशीय पूलकेशी राजानें त्यांचा पुनः पराभव केला. महाराष्ट्रांत लहान लहान राज्यें व संस्थानिक फार होते. शिलालेख, नाणीं, ताम्रपट वगैरेवरून जी माहिती मिळते. त्यावरून या देशांत राजसत्ता वरचेवर पालटत गेल्याचें दिसतें. नगर, पैठण, बदामी, मालखेड, गोवें, कोल्हापूर, कल्याणी, देवगिरी, दौलताबाद हीं एकामागून एक चालुक्य, राष्ट्रगुप्त व यादव राजांची राजधानीचीं शहरें झालीं. चाणुक्य, नलवडे, कदम, मोरे, शेल्लार, अहिर आणि यादव यांमध्यें स्वतःचें वर्चस्व स्थापण्याबद्दल सारखे तंटे सुरु होतें. मुसलमानांचे हातीं हा देश जाईपर्यंत अशी स्थिति चालली होती. सुमारें १४ व्या शतकाच्या प्रारंभास मुसलमानांनीं या देशावर स्वा-या करण्यास सुरवात केली

यापूर्वी २०० वर्षे उत्तराहिंदुस्थानांत मुसलमानांनी आपली सत्ता बसविली होती. मुसलमानांस सर्व देश जिंकण्यास ३० वर्षे लागलीं. पश्चिम महाराष्ट्र व कोकणांत तर त्यांची सत्ता बहुतेक कधींच कायम झाली नाहीं. पंधराव्या शतकाच्या शेवटी कोंकण त्यांच्या हातीं गेले. परंतु मावळ किंवा घांटमाथा त्यांनी कधींच जिंकला नाहीं.

मुसलमानी अमलामुळें ह्या प्रदेशांतील लोकांच्या रीतीभातींत किंवा भाषेंत मुळींच अंतर पडलें नाहीं. हा प्रदेश बहुतेक हिंदुकिल्लेदारांच्या हातीं होता. येथील लोकसंख्येंतही फारसा फरक झाला नाहीं. फारच थोडे मुसलमान इकडे कायमचे येऊन राहिले. हल्लींही लोकसंख्येंत मुसलमानांचें प्रमाण फारच कमी आहे. महराष्ट्रांत मुसलमानी राजसत्तेस कायमचें स्वरूप कधींच आलें नाहीं. उत्तर व पूर्व हिंदुस्थानांत मशीदी व थडगी यांचे प्राबल्य फार वाढलें. हिंदुदेवालयें नाश पावली व हिंदूंस उघडपणें पूजाअर्चा करण्यासही पंचाईत पडूं लागली. लोक नेहमीच्या घरच्या व्यवहारांतही मुसलमानी भाषा वापरूं लागले. उडदू भाषाही तेव्हां पासूनच अस्तित्वात आली. उत्तरेकडे जरी अशी स्थिति झाली, तरी महाराष्ट्रांत हा अनुभव मुळीच आली नाही. मुसलमानी अमदानींतही हिंदु धर्म आणि भाषा यांची सररहा येथें प्रगतीच होत गेली. महाराष्ट्रांतच अशी स्थिति कां झाली व मुसलमानी सत्ता झुगारून देऊन हिंदूनी आपला अमल हळू हळू कसा बसविला, याचा आतां आपण विचार करूं.

लोकसंख्येंतील या दोन जातींच्या या प्रमाणसंमेलनामुळें महाराष्ट्रांतील धर्म व संस्था ह्यांत जी समता आढळून येते, तशी हिंदुस्थानांत कोठेही आढळून येत नाही. या संस्थांत विशेष लक्षांत ठेवण्यासारखी संस्था ह्मणने ग्रामव्यवस्था होय. परचक्रापुढें हजारों संस्था लयास गेल्या; पण वरील संस्था इतक्या दृढतर पायावर रचलेली आहे की, तिचें स्वरूप अद्यापि कायम आहे. इंग्लिश लोकांनींही ग्रामसंस्था व पंचायत या दोन संस्थांचा आपल्या राज्यपद्धतींत उपयोग केला आहे. या संस्थांप्रमाणेंच दुसरी उपयुक्त संस्था म्हणजे मिरासदारांची होय. हे मिरासदार लोक म्हणजे लहान लहान शेतकरी होत. हे प्रत्यक्ष सरकाराशीं धान्याचा करार करितात. जोंपर्येत नियमितपणें त्यांनकडून जमीन महसूल सरकारास पोंचतो, तोंपर्येत सरकार त्यांच्या हक्कांत हात घालूं शकत नाहीं. ज्या जमिनी त्यांजकडे असतात, त्यांचे ते पूर्ण मालक असतात. ह्या पद्धतीच्या योगानें महाराष्ट्रांतील रयत लोकांत स्वातंत्र्यस्फूर्ति उत्पन्न झालेली आहे. हिंदुस्थानांत दुसरीकडे अशी स्थिति नाहीं. ही मिराशी पद्धति सुरळीत चालली आहे; पण सरकारसारा वसूल करणारे वरिष्ठ दर्ज्याचे वंशपरंपरेचे वतनदार नोकर देशमुख व देशपांडे हे मात्र, त्यांची आतां जरूर नल्यानें, लुप्तप्राय झाले आहेत. इतर ठिकाणचे देशमुख देसाई यांचा पेशा बदलून ते जमीनदार व तालुकदार बनले आहेत. उत्तर हिंदुस्थान व वायव्येकडील प्रांत यांतील ग्रामव्यवस्थेंत व महाराष्ट्रांतील ग्रामव्यवस्थेंन बराच फरक आहे. तिकडे जमीन लोकांच्या समाईक मालकीची असून, सा-याबद्दल वगैरे जवाबदारीही समाईकच आहे. महाराष्ट्रांत असा समाईकपणा आढळून येत नाहीं. व्यक्तिवातंत्र्याचें प्राबल्य तेथें फार आहे. या महत्वाच्या फरकामुळें महाराष्ट्रांतील लोकांत स्वातंत्र्यप्रियता व परस्परात मदत करण्याची इच्छा हे गुण साहजिकच उत्पन्न झाले. अद्यपिही हे गुण त्या लोकांत दिसतात व याच गुणांचा स्वराज्य उभारण्याच्या कामीं त्याम फार उपयोग झाला आहे.

धर्माचें आग्रही स्वरूप महाराष्ट्रांत आढळून येत नाहीं. तुंगभद्रा ओलांडली ह्मणने स्मार्त आणि वैष्णव वगैरे निरनिराळ्या धर्मपंथीयांत जी दुही मानलेली दृष्टोत्पत्तीम येते, तशी महाराष्ट्रांत कोठें दिसत नाहीं. महाराष्ट्रांत हे पंथ जरी एक झाले नाहींत, तरी ते परम्परांचा हेवा न करतां उदासीन अमतात. धर्मबाबींत उदासीनपणा हा या देशाचा विशेष गुण आहे. येथें ब्राह्मण अणि शूद्र एकमेकांत मिळून मिसळून ब-याच प्रेमानें वागतात. गुरु, गोसावी, महंत वगैरे लोकांचे येथें स्तोम दिसत नाहीं. वस्तुतः येथील मूळचे हीन जातीचे शूद्र लोक वैष्णव साधुसंतांचें मत स्वीकारून क्षत्रिय किंवा वैष्णव बनले आहेत. शूद्र, महार वगैरे नीच जातींतही प्रसिद्ध कवी व साधू निर्माण झाले आहेत. ब्राह्मण लोकही या साधूंन भजतात. सर्व देशभर त्यांस मान मिळतो. अशा या उदासीन वातावरणांत रहाणा-या मुमलमान लोकांचाही धर्मवेडेपणा पुष्कळच कमी झाला आहे. हिंदू व मुसलमान एकमेकांच्या उत्सवांत मोठ्या आनंदानें मिसळतात. हिंदु साधुसंतांत मुसलमान फकीरांचीही गणना केली आहे व कांहीं साधुसंतांस तर दोनही जाती सारख्याच प्रेमानें भजतात. अशा प्रकारें स्वमताहून भिन्न धर्मपंथीयांचा छल न करतां, ज्यास जो पंथ आवडेल त्याचा त्यास आनंदानें स्वीकार करुं देण्याचा महाराष्ट्रीयांस जो अनादिकालापासून गुण लागला आहे. त्यामुळें त्यांच्यांत नेहमीं फुट असते. कधींही तंटे बखेडे फारसे मानत नाहींत. तसेंच त्यांस कोणतीही गोष्ट विकोपास न नेतां तिचा शांतपणानें विचार करण्याची फारच उतम संवय लागलेली आहे. लोकांच्या हाडीमांसीं भिनलेले हे गुण त्यांच्या प्रगतीस बरेच कारणीभूत झालेले आहेत यांत शंका नाही.

जमीन कशी तयार केली.
प्रकरण २ रें.

“मराठ्यांचा अभ्युदय केवळ आकस्मिक गोष्टी घडून आल्यामुळेंच झाला, त्यांचा उत्कर्ष व्हावा असा त्यांच्या अंगीं मुळींच जोम नव्हता, दैवगति अनुकूळ नसती तर, त्यांचें नांवसुद्धां ऐकूं आलें नसतें,'' अशा प्रकारचीं विधानें बहुशः सर्व इतिहासकारांनीं केलेलीं आहेत. ग्रँट डफ साहेबांनीं तर, मराठ्यांच्या भरभराटीस सह्याद्रीवरील वणव्याचीच उपमा । दिली आहे. ज्याप्रमाणें अरण्यास एकाएकीं वणवा लागतो व तो आपोआप शांत होतो, तद्वतच मराठ्यांचा पराक्रमाग्नि पेटला व शांत झाला, असें ते म्हणतात; परंतु केवळ अलंकाराच्याहौसेमुळेंच या उपमेचा त्यांनीं उपयोग केला असावा असें वाटतें. कारण, पूर्ण विचारांतीं जर त्यांचें असें मत बनलें असतें तर, १७ व्या शतकापासून मराठ्यांच्या उत्कर्षाचा पाया कसा बसत चालला, हें व्यक्त करून दाखविण्यास, आपल्या इतिहासाचे पहिले तीन भाग त्यांणी मुळीच खर्च केले नसते. वस्तुत: नीट विचार केला तर, आकस्मिक गोष्टींवर मराठ्यांचा उदय बिलकुल अवलंबून नाहीं. मुसलमानांनी महाराष्ट्र काबीज करण्यापूर्वी, कितीएक शतकांपासून मराठ्यांच्या प्रगतीस प्रारंभ झालेला आहे. ह्या प्रगतीचीं सर्व कारणें नीट समजून घेणें असल्यास डाक्तर भांडारकरांनी गोळा केलेले ताम्रपट व शिलालेख यांचें नीट मनन केलें पाहिजे. या अमूल्य सामग्रीचा उपयोग केला ह्मणने मुसलमान लोकांची सत्ता झुगारून देण्याचा प्रयत्न प्रथमतः महाराष्ट्रांतच कां झाला व मराठ्यांच्या देशस्थितींत व संस्थांत असा काय गुण होता, कीं त्यामुळें त्यांच्या वरील प्रयत्नास यश आलें, या दोन गोष्टींचा उलगडा तेव्हांच होतो. |महाराष्ट्राची स्वभावतःच ठेवण अशी आहे कीं, त्यांत रहाणा-या लोकांचा उत्कर्ष झालाच पाहिजे. ह्या देशाच्या पश्चिमेस मह्याद्रि पर्वत आहे व उत्तरेस विंध्याद्रि व सातपुडा हे पर्वत आहेत. ह्या पर्वतांच्या लहान लहान शाखा देशांत चोंहीकडे पसरल्यामुळें व या शाखांच्या द-याखो-यांतून उगम पावणान्या लाखों लहानसहान नद्यांचें सर्वत्र एक नाळेंच बनल्यामुळें, देश बराच डोंगराळ, उग्र व ओबडधोबड झालेला आहे. भूगोलदृष्ट्या कोंकणाचा--समुद्र आणि सह्याद्रि यांमधील पट्टीचा ---महाराष्ट्रांत समावेश होतो. पर्वताच्या शिखरावरील प्रदेशास। घांटमाथा ह्मणतात व खालील प्रदेशास देश अशी संज्ञा आहे. बहुतेक टेकड्यांवरून किल्ले बांधलेले आहेत व त्यामुळें देशाचा बचाव स्वभावत:च होतो. मराठ्यांच्या राजकीय उलाढालींत ह्या किल्यांनीं फारच महत्वाची कामगिरी बजावली आहे. देशाचें स्वरूप असें असल्यामुळें, तेथील हवा फारच चांगली असून उत्साहजनक आहे. गंगा व सिंधु ह्या नद्यांच्या सपाटीवरील प्रदेशासारखी महाराष्ट्राची हवा निस्सत्व नाहीं प्रदेश डोंगराळ आहे, त्यामुळें जमीन असावी तशी सुपीक नाहीं. पण लोक सशक्त, काटक व काटेकोर आहेत. महाराष्ट्राचें एकंदर क्षेत्रफळ एक लक्ष चौरस मैल असून लोकसंख्या तीन कोटी आहे. महाराष्ट्राचा आकार एका काटकोनत्रिकोणासारखा आहे. दमणपासून कारवार पर्यंत सह्याद्रि पर्वत व समुद्र हा ह्या त्रिकोणाचा पाया. सातपुड्याच्या आरंभापासून ते तहत गोदावरी नदीच्या मुखापर्यंतचा प्रदेश ह्याची लांब बाजू. व गोदावरीच्या मुखापासून ते कारवारपर्यंत मराठी भाषा प्रचलित असणारा प्रदेश या त्रिकोणाचा कर्ण. अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्र देश उत्तर हिंदुस्थान व दक्षिण द्वीपकल्प यांच्या अगदी नाक्यावर असल्यामुळें, यास इतिहासांत फारच महत्व आलें आहे. म्हैसूर व माळव्याकडील प्रदेशाची स्थिति कांहींशी महाराष्ट्रासारखी आहे. पण ते प्रदेश एका बाजूस असल्यामुळें, महाराष्ट्राइतकें त्यास महत्व नाहीं. देशाच्या या स्वाभाविक स्वरूपापेक्षां तेथें रहाणा-या लोकांच्या स्वभावाचाच ह्या देशाच्या इतिहासावर फार परिणाम झालेला दिसतो. उत्तर हिंदुस्थानांत आर्य लोकांचा प्रसार अधिक झाल्यामुळें, तेथील मूळ रहिवासी लोक बहुधा नामशेष झाले आहेत. द-याखो-यांतून हे लोक क्वचित् सांपडतात. दक्षिण द्वीपकल्पांत तर मूळच्या द्राविड लोकांनी आपलें वर्चस्व सोडलें नाहीं. आर्य लोकांना आपला पगडा तेथें बसवितां आला नाहीं. महाराष्ट्रांतील लोकसंख्येंत या दोन्ही जाती सारख्या प्रमाणांत मिसळल्यामुळें, दोन्ही जातींतील अवगुण नाहींसे होऊन, गुण मात्र तेथील लोकांत उतरले आहेत. या गोष्टीचें उत्तम दर्शक ह्मणने मराठी भाषा होय. मराठी भाषेचें मूळ रूप द्राविड आहे; पण आर्य लोकांनीं तिच्या रचनेंत बदल करून तीस पूर्णत्वास आणलें आहे. उत्तरिहिंदुस्थानांतील लोकांप्रमाणें महाराष्ट्रांतील लोक गोरे, नाजूक व बांधेसूद नाहींत ; परंतु दक्षिणेंतील द्राविड लोकांप्रमाणें ते काळे व कुरूपही नाहींत. महाराष्ट्रांतील हल्लींच्या आर्य लोकांत, मूळचे आर्य व नंतर आलेले सिथिअन यः। दोन जातींचें मिश्रण आहे. अनार्य लोकांत मूळचे रहिवासी भिल्ल, कोळी, रामोशी व उच्च द्राविड या दोन जातींचें मिश्रण आहे.

                                                                                  लेखांक १४५

                                                                                                श्रीसदानंद                                                            १६०४ आश्विन वद्य २                                                                                 


                                                                                             145 1

रो। मोकदमानी मौजे उझर्डे सा। हवेली ता। वाई सु॥ सलास समानीन अलफ तीर्थस्वरुप राजश्री अनतगिरी गोसावी मठ श्री मु॥ नीब यास पेसजी तुह्मी काय देत होतेस ते काही दिवाणातून नाही आता हि जे दणे असेल ते देत जाण त्यास काही दिवाणातून आइला होणार नाही गाउ गु।।चा मामला आहे जैसी समजावीस करणे ते करी(त) जाणे दुसरियाने फिर्यादी येऊ न दणे छ १५ माहे सौवाल

                                                                                                             
                                                                                                            145 2

                                                                                            

 

                                                                                  लेखांक १४४

                                                                                                श्रीसदानंद                                                            १६०३ कार्तिक वद्य १३                                                                                 


144

5 मा। अनाम कारकुनानीं व मोकदमानी मोजे तुसरवीरे इनाम का। मळेवाडी यासि राजश्री साबाजी राजे घाटिगे देसाई का। मजकूर सु॥ इसन्ने समानीन अलफ दरीविला गोसावी आखाडा श्रीमोकाम मौजे निंब पा। वाई यासि इनाम आजरा मर्‍हामत बा। ठिकाण पेशजी गोसावी याचे मळा देवपुल व बाजे जमीन जे काय सालाबाद असेल ते सदरहू मलादेखील झाडे व बाजे जमीन असेल ते निंबकर गोसावी यास देविले असे याचे दिमती करणे मळा व बाजे जमीन असेल ते कीर्दी करितील हदमहदूद असेल ते दाखऊन देऊन हर दरसाला ताजा खुर्दखताचे उजूर न करणें मा। पा। हुजूर

                                                                                               137

                                                                                        (फारसी)

तेरीख २६ माहे जिलकाद

 

 

                                                                                  लेखांक १४३

                                                                                                श्रीसदानंद                                                              १६०३ श्रावण शुक्ल १३                                                                                 

वृत्तीपत्र शके १६०३ वरुषे दुर्मती नाम संवत्छेरे श्रावण मासे सुकलपक्षे त्रियोदसी वार          तदीनि श्री              गोसावी मठ सो। नीब पा। वाई यासि धर्मात कारणे वरसासन करून दिल्हे का। मलेवाडी पा। माण सु॥ इसने समानीन अलफ बिहुजूर हाजीरून मजालसी 

→ पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

                                                                                  लेखांक १४२

                                                                                                      श्री                                                              १६०० कार्तिक वद्य १४                                                                                 

मशहुरल हर्जरती राजमान्य राजश्री अनाजीपंत सचीव यासी प्रती राजश्री संभाजी राजे दंडवत उपरी रा। सदानंद गोसावी यास निंबमधे इनाम होता तो साप्रत मना केला आहे त्यावरून गोसावी यानी आह्मास सागोन पाठविले की आमचा इनाम जैसा चालत होता तैसा चालता केला पाहिजे ऐसीयास हा मामला काही आह्मास दखल नाही याकरिता तुह्मास लिहिले असे तुह्मास कळेल ते यांचे पारपत्य केले पाहिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा छ २७ रमाजान सु॥ तिसा सबैन अलफ सही*

                                                                                  लेखांक १४१

                                                                                                      श्री                                                              १५९९ ज्येष्ट वद्य १३                                                                                 

राजश्री तुकाजी प्रभु हवालदार व कारकून ता।
सातारा गोसावी यासी

.ll 5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित महादाजी अनंत सुभेदार व कारकून सुभा ता। सातारा आसीर्वाद अनुक्रमे नमस्कार सु॥ सबा सबैन अलफ ता। मा। सदानंद स्वामीचा इनाम गावगना आहे बिघे

68१५ निगडी पवाराची
68१० देगाव
68 ५ वरये
-------
 ..

एकूण पाव चावर आहे तो कुल रा। पंतांनी दुमाले करविला आहे तरी तुह्मी कुल इनाम दुमाले करणे दर हर साला ताजे सनदेचा उजूर न करणे तालिक लेहोन घेऊन असल कागद फिराऊन देणे रा। छ २६ रबिलाखर

(शिक्का)                                  (शिक्का)