Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
केव्हांही पहा हिंदुस्थानांत परकीयांचा शिरकाव हिंदुलोकांच्या आपसांतील दुही मुळेंच झालेला आहे. व्यवस्थितपणा कसा ते हिंदू लोकास मुळींच माहीत नाहीं. जुटीनें काम करण्याची त्यांस कधींच सवय नाहीं. कांहीं विवक्षित नियम ठरवून त्याप्रमाणें बिनबोभाट चालण्याचा त्यांस मनापासून तिटकारा. जात्याच असे दुर्गुण हिंदूलोकांच्या अंगीं असल्यामुळें व्यवस्थित रीतीनें तयार केलेल्या सैन्यापुढें हिंदूची सत्ता टिकली नाही, यांत नवल नाहीं. हिंदूलोकांतील हे दोष नाहींसे करून लहान सहान गोष्टीपासून ते तहत मोठमोठ्या राजकारस्थानापर्यंत प्रत्येक बाबींत समाजाचें हित तें व्यक्तीचें हित, समाजाचा उत्कर्ष तोच व्यक्तीचा उत्कर्ष, समाजाचा अपमान ते व्यक्तीचा अपमान, असें प्रत्येक मनुष्यास वाटूं लागावें, म्हणून शिवाजीची सारखी खटपट चालू होती.
घाटगे, मोरे, घोरपडे वगैरे मराठे सरदारांस स्वहितावांचून कांहीं दिसत नव्हतें. समाजहिताची त्यांस बिलकुल पर्वा नव्हती. कांहीं तरी युक्तिप्रयुक्तीनें या लोकांस हतवीर्य केल्याशिवाय शिवाजीचा इष्टहेतु कधींच साधला नसता. या लोकांचे जेव्हां शिवाजीनें पूर्ण पारिपत्य केंल तेव्हांच इतर मराठे सरदार समाजहिताकरितां स्वहिताची आहुति देण्यास तयार झाले. एका मुसलमानी राज्यास दुस-या मुसलमानी राज्याशीं झुजविण्यांत तरी शिवाजीचा हाच हेतु होता. जरी प्रसंगी कमजोर झाल्यामुळें शिवाजीस हार खावी लागली, तरी महाराष्ट्रमंडळांत एकी करून त्यांच्या मनांत साम्राज्याची कल्पना पक्केपणीं बिंबविण्याचा आपला हेतु त्यानें कधींच सोडला नाहीं. हा हेतु साधतांना कांहीं ठिकाणी शिवाजीसही अपयश आलें, हें खरें; परिणामीं शिवाजीनें लावलेल्या वृक्षास त्याच्या इच्छेनुरूप गोड फळें आली नाहींत यांत शंका नाहीं ; पण त्याणें जी इमारत चढविली, ती इतकी वळकट बांधलेली होती की बराच काळपर्यत तीस अगदी धक्का लागला नाहीं. मोंगल बादशाही सारखी बलाढ्य राज्यें परचक्रापुढें लयास गेलीं; पण शिवाजीनें स्थापलेल्या ' साम्राज्यानें ' मात्र परकीयांस दोन हात दाखविले.
तीन शतकें कष्ट काम करून तयार केलेल्या जमिनीत स्वराज्यरूपी वृक्षाचें बीं कसें पेरलें, या गोष्टीचा विचार संपविण्यापूर्वी आणखी एका गोष्टीचा उल्लेख केल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. ही गोष्ट म्हणजे शिवाजीच्या अंगीं आढळून येणारी विलक्षण आकर्षणशक्ति. मानवी जातीच्या ख-या पुरस्कर्त्यांतच ही शाक्ति आढळते; केवळ लुटारू धर्मवेड्या लोकांत ती कधींच दिसून येत नाही. ज्यांना ज्यांना भावी सुखाची आशा व इच्छा होती, त्या सर्वांची मनें शिवानीनें आपल्याकडे ओढून घेतली होतीं. ज्या जातीवर देशाची सारी भिस्त अशा प्रमुख प्रमुख जातीमधून शिवानीनें आपले प्रधानमंडळ निवडून काढले होतें. शिवाजीची दृष्टभेट होतांच यःकश्चित् मनुष्यही स्वदेशभिमानानें वेडावून जाई. मावळे, हेटकरी वगैरे लोक केवळ लुटीकरितां शिवाजीच्या प्राणास प्राण देण्यास तयार झाले नव्हते. कांही प्रसंगी तर शिवाजीनें मुसलमनांकडूनही आपला कार्यभाग करून घेतला आहे. तानाजी व सूर्याजी मालुसरे, बाजी फसलकर, नेताजी पालकर वगैरे मावळे ; बाजी देशपांडे, बाळाजी आवजी वगैरे प्रभू; मोरोपंत, आबाजी सोनदेव, अण्णाजी दत्तो, रघुनाथ नारायण, जनार्दनपंत हणमंते वगैरे ब्राह्मण; प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे धनाजी जाधव व परसोजी भोसले, उदाजी पोवार खंडेराव दाभाडे यांचे पूर्वज वगैरे मराठे शिवाजीच्या सैन्यांत होते. यापैकी एकानेंही शिवाजीशीं निमकहरामपणा केला नाहीं. हा कशाचा परिणाम ? शिवाजीच्या अंगी असलेल्या अलौकिक गुणांचा व शक्तीचा नव्हे काय ? शिवाजी दिल्लीस मोंगलांच्या कैदेंत होता, तरी इमानास जागून या लोकांनी आपआपली कामें योग्य प्रकारे बजाविली व ते सुटून परत स्वदेशास आल्यावरही त्याची सत्ता पुन : स्थापण्यास त्यास त्यांणी साहाय्य केले. शिवानीच्या मरणानंतर त्याचा दुष्ट व कुमार्गी मुलगा संभाजी याप्त मारून, रायगडाहून शाहूस में गलांनीं कैद करून नेले, तरीही हे वे यांचे मागून आलेले दुसरे लोक मोंगलांशी मोठ्या हिमतीने व निकराने लढले. जरी त्यास दक्षिणेकडे मागे हटावे लागले, तरी जसा एखादा वाघ भक्ष्यावर उडी घालण्यापूर्वी थोडासा मागें सरतो, त्याप्रमाणें त्यांणीं मागें सरून पुन : अधिक त्वेषानें औरंगजेबावर चाल केली व त्याचा पूर्णपणें पाडाव करून, दक्षिण जिंकण्याच्या त्याच्या सर्व आशा समूळ नाहीशा केल्या. शिवानीचें शौर्य, सर्वांवर छाप ठेवण्याची त्याची शैली जशी अलौकिक होती तसेंच त्याचें आत्मसंयमन हे अलौकिकच होतें. त्या वेळच्या लोकसमाजाची नीतिबंधने शिथिल अमतांही शिवाजीच्या अंगीं हो स्वसंयमन शक्ति होती, हे केवढें आश्चर्य. लढाईच्या सोईसाठी किंवा पैशाच्या लालुचीनें शिवाजाच्या सैन्यानें बरीच अति निंद्य कृत्यें केलीं; पण गाई, अबला व गरीब रयत यांस त्यांणीं कधीच त्रास दिला नाहीं. स्त्रियांस तर ते फार अदबीनें वागवीत. एखादेवेळी लढाईत त्या सांपडल्या, तर त्यांस बहुमानानें त्यांच्या नव-याकडे पोंचविण्यांत येत असे. जिंकलेला प्रदेश त्याणें कोणास कधींच जहागीर करून दिला नाहीं. अशा जहागिरी दिल्या , तर हे जहागीरदार सर्व सत्ता बळकावून बलाढ्य होतील व पुनः आपसांत कलह उत्पन्न होऊन स्वराज्यास धक्का पोंचेल असें शिवाजीस ठाम वाटत होते. वेळोवेळी अशा जहागिरी देण्याबद्दल त्याचे प्रधानांनी त्यास सुचविलें; पण तिकडे त्याणें बिलकुल लक्ष दिलें नाहीं. शिवाजीनें । घालून दिलेला हा कित्ता जर शिवानीनंतरच्या राज्यचालकांनी अक्षरशः गिरविला असता, तर ज्या राष्ट्ररूपी इमारतीचा पाया शिवाजीनें मोठ्या अकलेनें घातला, त्या इमारतीचा एक एक भाग निराळा होऊन ती इमारत इतक्या लवकर कोसळली नसती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
अशा प्रकारची त्यावेळीं महाराष्ट्राची परिस्थिति होती. चोहीकडे धर्मजागृति होऊन आर्य धर्माच्या शुद्धतत्वाप्रमाणें चालण्याचा लोकांचा निर्धार झाल्यानें जुन्या वेडगळ समजुतीस पूर्णपणें फाटा मिळत चालला होता. ह्या नवीन तत्वांनीं लोकांची मनें प्रकाशित झाल्यानें, कोणतीही गोष्ट त्यांच्यावर जुलुमानें लादणें दुरापास्त झालें होतें. पूर्वीप्रमाणें कोणतीही गोष्ट निमुटपणें कबूल करण्यास लोक आतां तयार नसल्यामुळें, मुसलमानांनी चालविलेला धर्मछले त्यांस अधिकचे असह्य वाटूं लागला होता. मुसलमानांस पुन: असा छल महाराष्ट्रांत करूं द्यावयाचा नाहीं असा लोकांचा दृढ निश्चय झाला होता. कोल्हापूर व तुळजापूर येथील भवानी देवीच्या उपासकांनीं तर, या कामी कंबरच बांधली होती. त्यांच्यापैकीं भाट, गोंधळी वगैरे लोक या बाबतींत लोकांस सारखे चेतवित होते.
| रामदास तुकाराम वगैरे सत्पुरुषांच्या सहवासांत नेहमीं असल्यानें शिवाजीच्या अंगीं तर हा नवीन आवेश पूर्णपणे भरला होता. ह्या आवेशामुळेंच त्याच्या अंगीं विलक्षण शौर्य आलें. या आवेशामुळेंच लोकांची मनें त्यानें पूर्णपणें आपल्या स्वाधीन करून घेतली. केवळ मुत्सद्दीपणाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना त्याचे हातून कधीच झाली नसती.
शिवाय शिवानीची बालंबाल खात्री झाली होती की, महाराष्ट्र मंडळांत एकी झाल्याशिवाय मुसलमानांनीं आणलेल्या संकटापासून म्वदेशाची सुटका होणें कठीण. ही गोष्ट शहाजी किंवा दादोजी कोंडदेव यांच्या लक्षांत कशी आली नाहीं नकळे. शिवाजीचा दुर्दैवी मुलगा संभाजी यांस उपदेश ह्मणून ज्या कविता रामदासांनी लिहिल्या आहेत, त्यांत शिवानीचे या बाबतींतील विचार उत्तमरीतीनें व्यक्त केले आहेत. मराठ्यांत एकोपा करून स्वदेश, स्वधर्म या कल्पनांची त्यांस बरोबर ओळख करून देण्याकरतांच शिवाजीनें अविश्रांत परिश्रम केले. महाराष्ट्रास राष्ट्रीय स्वरूप देण्याकरतांच तो झटत होता. शिवानीचा हा हेतु लक्षांत ठेवला ह्मणने त्याचे हातून जी कांहीं आक्षेप घेण्यास योग्य अशीं कृत्यें घडली, त्यांचा बरोबर उलगडा होतो. मराठे सरदारच स्वहिताकडे लक्ष देऊन स्वतःची लहानशी जहागीर किंवा वतन बचावण्याकरितां किंवा वाढविण्याकरितां आपआपसांत भांडूं लागले तर ४०० वर्षांपूर्वी जसें अफगाण लोकांनी महाराष्ट्रास पादाक्रांत केलें तसे मोंगलही करावयास चुकणार नाहींत हें शिवाजीस पक्कें कळून चुकलें होतें. वेळ अशी येऊन ठेपली होती कीं, सर्वांनीं । स्वदेशसंरक्षणाकरतां एक दिलानें झटावयास पाहिजे होतें; ह्मणूनच हिंदु, मुसलमान ; शत्रु मित्र; स्वकीय परकीय; वगैरे भेद बिलकूल मनांत न आणतां ज्याणें ज्याणें या आवश्यक एकोप्यास अडथळा आणला. त्याचे शासन करण्यास शिवाजीनें अगदीं मागें पुढें पाहिलें नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
शिवाजीच्या स्वभावाचा हा भाग परदेशस्थ इतिहासकारांस मुळींच समजला नाहीं. शिवाजीस त्याच्या कालच्या लोकांचा आदर्श मानलें आहे तें केवळ त्याच्या आंगच्या काटकपणामुळें किंवा धाडशी स्वभावामुळें नव्हे, तर त्याच्या या मानसिक प्रवृत्तीमुळेंच होय. महाराष्ट्रांतील लोकसमाज नेहमी शांत असतो. त्याच्या धर्मकल्पना जेव्हां जागृत काराव्या तेव्हांच लोकसमाजांत चेतना उत्पन्न होते; गेल्या तीनशें वर्षांत मुसलमानी धर्माच्या सहवासामुळें महाराष्ट्रांत धर्माच्या बाबतींत बरीच चळवळ झाली होती. नवीन नवीन धर्ममतांचा सर्वत्र प्रसार होत चालला होता; रामानुज, रामानंद वगैरे प्रसिद्ध वैष्णवाचार्यांनी प्रतिपादन केलेल्या धर्मतत्वांचा लोक भराभर स्वीकार करू लागले होते. सर्व जातीस मोक्षप्राप्ति करून घेतां येईल, परमेश्वराच्या घरीं उच्च नीच हा भेद बिलकुल नाहीं, वगैरे उदात्त धर्मतत्वें लोकांच्या मनांत बिंबूं लागलीं होती. रामानंद, रामदास, रोहिदास, सुरदास, नानक, चैतन्य वगैरे प्रसिद्ध सत्पुरुषही ह्याच कल्पना लोकांच्या मनांत ठसवीत होते. मुसलमानी धर्माच्या सान्निध्यानें ' तीन कोटी तेत्तीस हजार ' देवांची कल्पना मागें पडत चालली होती. ‘एको देवः केशवो वा शिवो वा' ह्या तत्वाचा लोकसमाजावर पगडा बसूं लागला होता. महाराष्ट्रांत तर ही धर्मसुधारणा । नारीने चालली होती; * राम रहिम एक मानून सोवळें आवळें जातिभेद वगैरे वेडगळ समजुती मोडून एका परमेश्वरावर विश्वास ठेऊन बंधुप्रेमानें वागा' असा उपदेश करीत साधुसंत चोहोकडे फिरत होते. शिवाजीनें महाराष्ट्रीयांचा राजकीय बाबींत पुढारीपणा पतकरला त्याचवेळीं तुकाराम, रामदास, एकनाथस्वामी, जयरामस्वामी वगैरे सत्पुरुषानीं लोकांचे धर्मगुरुत्व स्वीकारलें. या धर्मोपदेशकांनी स्थापन केलेल्या या नवीन धर्मपंथांत ब्राह्मण, शूद्र वगैरे उच्च नीच सर्व जातींचा समावेश झाला होता. पंढरपूर तर विठ्ठलभक्तांचे प्रतिवैकुंठ बनलें होते. हजारो । लोक लांबलांबून पंढरीच्या यात्रेस दरवर्षी जात. शहरांत, खेडेगांवांत कथापुराणें नेहमीं चालत. अकबर बादशहानें मोडून टाकलेला जिजिया कर औरंगजेबनें जेव्हां पुनः हिंदू लोकावर बसविला, त्यावेळीं राजा सवाई जयसिंगानें त्यास केलेल्या उपदेशावरून या कथापुराणांचा लोकसमाजावर कोणत्या प्रकारचा परिणाम घडला , हें बरोबर व्यक्त होतें. राजा जयसिंगानें औरंगजेबास सांगितले कीं, ‘ अल्ला पैगंबर हा फक्त मुसलमानांचाच देव नाहीं. परमेश्वर ही एक आहे व तो सर्व प्राणिमात्राचा नियंता आहे. मुसलमान असो किंवा मूर्तिपूजक हिंदू असो, सर्व त्याचीच लेकरें आहेत. मुसलमानांनी हिंदू , धर्माचा छल करणें ह्मणने परमेश्वराच्या इच्छेचा अनादर करणें होय.' ह्या जयसिंगाच्या उपदेशांत किती गहन धर्मतत्वें गोविलीं आहेत! ही धर्मतत्वें जरी त्यावेळीं नवीन जागरूक झाली होती, तरी लोकांच्या मनांत ती पूर्णपणें विंबल्यानें महाराष्ट्रीयांच्या आचारविचारांत फारच बदल झाला होता. कित्येक मुसलमानासही ह्या तत्वांचा जोर करूं लागला होता. ह्या तत्वानें मन संस्कृत झाल्यामुळेंच, अबुलफाजल व फैजी यांणीं महाभारत व रामायण यांचें भाषांतर केलें. अकबर बादशहानें हिंदु व मुसलमान या दोनही धर्मातील सत्य तेवढा भाग घेऊन एक नवीन धर्मपंथ स्थापून धर्मवाद मिटवण्याचा मनापासून प्रयत्न केला. शहाजहानचा वडील मुलगा दाराशहा यानें उपनिषत् व गीता यांची भाषांतरे करविलीं. अशाप्रकारें या नवीन कल्पनांचा फैलावा होत चालला होता. कबीर व महमद या साधूफकीरांनीही याच तत्वांचा उपदेश चालविला होता. आजमित्तीस या साधुद्वयांस दोन्ही हिंदुमुसलमान जाति सारख्याच प्रेमानें भजतात. पण त्याकाळी दोन्ही पंथांतील पक्षांध लोकांनीं त्यांचा फार छल केला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
मुसलमान इतिहासकार शिवाजीस गलीम लुटारू ह्मणतात. मराठी बखरकारांनी तर शिवाजीस प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतारच मानलें आहे. यवनांच्या जाचानें गांजून जाऊन पृथ्वीनें गाईचें रूप धरून ईश्वराचा धांवा केला, तेव्हां त्या दीन दयाळ परमेश्वराम करुणा येऊन त्यानें अवतार धारण करून आपल्या भक्तांचें रक्षण करण्याचें आश्वासन दिलें व पुढें शिवछत्रपतीच्या रूपानें अवतारून गोब्राह्मणास पररेश्वरांनी मुसलमानांच्या जुलुमांतून सोडविलें असे पुष्कळ बखरींतून लिहिल्याचें आढळतें, अशाच दुस-या वेडगळ समजुतीनें शिवाजीचा उदेपूरच्या राजघराण्याशीं संबंध जुळविण्यांत येते. वस्तुतः शिवाजी केवळ यःकश्चित् लुटारूही नव्हता किंवा परमेश्वराचा अवतारही नव्हता. रजपूत घराण्याशीं जोडलेल्या काल्पनिक संबंधावर त्यास थोरवी मिळाली नाहीं. आईकडून व बायकोकडून त्याचा थोर, शूर, कुलीन घराण्याशी संबंध होता खरा. त्याची आई लखनी जाधवरावाची मुलगी होती व त्याची बायको प्रसिद्ध जगदेवरावनाईक निंबाळकर यांची कन्या होती. पण शिवाजीने जी कीर्ति मिळविली ती खरोखर शहानी व जिनिबाई यांच्या पोटी जन्म घेतल्यामुळेंच मिळविली. अशा आईबापांच्या पोटीं जन्मास येणें हें सामान्य भाग्य नव्हे. या भाग्यापुढें शिवाजीस अवतारी पुरुष ह्मणणें किंवा रजपूत घराण्याशी त्याचा संबंध जोडणें यांत मुळींच महत्व नाहीं. शिवाजीच्या आंगीं त्या काळच्या लोकांच्या सर्व आशा व जोम एकवटला होता. शिवाजी जो पुढें इतका नांवारूपास आला त्याचें खरें इंगित तरी हेंच होय. शिवाजीसारखे पुरुष अकाळीं जन्मास येत नाहींत. राष्ट्रांत एक प्रकारची अनुकूल परिस्थिति येते तेव्हां अशी नररत्नें पैदा होतात. ही परिस्थिति आणण्यास बरीच शतकें प्रयत्न करावे लागतात. ज्या देशांत थोर पुरुषांची योग्यता ओळखून त्यांस मनोभावानें मदत करण्यासारखी लोकांची मनें सुशिक्षित झाली नाहीत, तेथें शिवाजीसारख्या विभूति कधींच निपजावयाच्या नाहींत.
शिवाजीच्या वेळीं भावी सुखाच्या आशेनें लोकांत जो उत्साह उप्तन्न झाला होता, तो त्यांच्यात आढळून येणा-या स्वकार्यदक्षतेचाच केवळ परिणाम नव्हे. शिवाजी गुरु दादोजीकोंडदेव याच्या अंगीं हा वरील गुण पूर्णपणें वास करीत होता. शिवाजीचा आजा लखजी जाधवराव व बाप शहानी हे फार दूरदर्शी होते. त्याणीं आपलें ऐहिक हित चांगले साधलें. वेळ पडेल तशी निरनिराळ्या राजांची नोकरी करून त्यांणी आपला फायदा करून घेतला. परंतु स्वहितावांचून अन्य उदात्त कल्पना त्यांच्या मनांत कधीच आल्या नाहींत. आमच्या बाळ शिवाजीचें मन मात्र आगामी मुखकर काळाच्या आशेनें उचंबळून गेलें होते. शिवाजीस लहानपणापासृन भारत रामायण ऐकण्याचा फार नाद असे. कोठें कथा किंवा एखाद्या प्रसिद्ध पुराणिकाचे पुराण असलें की, तें ऐकण्या करतां तो १०,१० मैल चालत जाई. शिवाजी फार भाविक होता व त्याचा हा भाविकपणा कधींच कमी झाला नाहीं. केवळ स्वहित साधून जन्मसाफल्य होत नाही, आपल्या देशासाठी, आपल्या लोकबाधवांसाठी कांहीं महत्वाचें कृत्य करणें अवश्य आहे, असें जें शिवाजीस वाटे त्यास कारण तरी त्याचा हा भाविक स्वभावच होय. स्वहितास न जुमानतां परहित साधण्याकरितांच आपला अवतार आहे असें शिवाजी नेहमीं ह्मणे. ईश्वरावर पूर्ण विश्वास व धर्मावर निस्सीम श्रद्धा असल्यावांचून अशा उदात्त कल्पनांची मनुष्याच्या मनांत प्रेरणा व्हावयाची नाही. शिवाजीच्या भाविक स्वभावामुळें त्याच्या अंगी विशेष उत्साह उत्पन्न झाला होता. ह्या उत्साहाचे महत्व शिवाजीस बालपणीं बरोबर समजलें नाहीं. लहानपणीं शिवाजीनें जी कृत्यें केलीं, त्यांत बराच विसंगतपणा आढळतो. पण तो जसजसा मोठा होत गेला तसतसे ' ‘आपल्यास कांहीं विशेष कामाकरितां परमेश्वरानें जन्मास घातलें आहे व ती कामगिरी आपण बजाविली पाहिजे' असे विचार त्याचे मनांत खेळूं लागले. तीन सर्वश्रुत प्रसंगीं मिळविलेल्या सर्व संपत्तीवर लाथ मारून मोक्षप्राप्तीकरितां शिवाजीनें अरण्यवास स्वीकारला होता. पण या तिन्ही प्रसंगी त्याचे गुरु व मंत्रिमंडळ यांणी त्यास त्याच्या इतिकर्तव्यतेची बरोबर समजूत करून देऊन, मोठ्या प्रयासानें त्याचें मन पुनः संसाराकडे वळविलें. शिवाजीच्या एकंदर आयुष्यक्रमांत त्याच्यावर पुष्कळच आणीबाणीचे प्रसंग आले. त्यावेळीं त्याच्या हातून लहानशी ही चूक होती तर त्याच्या भावी सर्व आशा निष्फळ झाल्या असत्या. ह्या सर्व प्रसंगी एक परमेश्वरावांचून दुसरा वाटाड्या नाहीं असें समजून त्याणें परमेश्वराचीच करुणा भाकली. परमेश्वर आपल्या अंत:करणांत प्रेरणा करून, आलेल्या संकटांतून निसटून जाण्यास कांहीं तरी मार्ग दाखवील असा त्याचा पूर्ण विश्वास होता. ईशस्तवन करीत असतां त्याच्या अंगांत येई व त्यावेळीं तो जें बोलें, तें त्याचे प्रधान टिपून ठेवीत. ह्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेऊन शिवाजी वागे. ह्या शब्दांप्रमाणें करणें कितीही धोक्याचें असलें, तरी तें करण्यास तो चुकत नसे. ह्या शब्दांवर विश्वास ठेऊनच ते औरंगजेबाच्या स्वाधीन होऊन दिल्लीस शत्रूच्या कैदेत राहिला. ह्या शब्दांवर विश्वास असल्यामुळेंच केवळ कृतांतरूपी अफझुलवानाशीं एकाकी लढण्यास ते डगमगला नाहीं. ह्या संसारत्यागाच्या व अंगांत येण्याच्या गोष्टी ऐकिल्या व वाचल्या ह्मणजे केवळ ऐहिक विचारावर नजर देऊन किंवा एखादा गुप्त हेतु साधण्याच्या हेतूनें शिवाजीनें कोणतेंच काम केलें नाहीं, असें ह्मणणें भाग पडतें. शिवाजीच्या हातून जी कृत्यें घडलीं, तीं मानवी प्राण्याच्या अति उदात्त स्वभावापासून स्फूर्ति झाल्यामुळेंच घडली यांत बिलकुल संदेह नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
वरील सर्व गोष्टींचा विचार केला म्हणजे असें दिसतें कीं, शिवाजीच्या जन्मकाळीं व त्याच्या बाळपणी मोंगलांचेंच कायतें दक्षिणेंत प्रस्थ मानलें होतें. हे मोंगल इतके प्रबल झाले होते कीं, दक्षिणेंतील कोणताही राजा त्यांचें पारिपत्य करण्यास समर्थ नव्हता. काबूल पासून बंगालच्या उपसागरापर्येत व कामूक टेकड्यापासून ते महाराष्ट्रापर्यंत चोहेकडे त्यांचे राज्य अवाढव्य पसरलें असल्यामुळें लोकांस त्यांचा फारच बाऊ वाटत होता. १२१६ त अल्लाउद्दीननें दक्षिणेवर स्वारी केली, तेव्हां महाराष्ट्रावर जो प्रसंग गुदरला, तोच प्रसंग फिरून ३०० वर्षांनी त्या देशावर पुनः आला. पण यावेळी महाराष्ट्राची स्थिति किंचित् भिन्न होती. १२ १६ त आलेल्या लाटेपुढें निमूटपणें माना लववून हिंदूनीं आपला बचाव करून घेतला. पण आतां त्यांच्या अंगी थोडीशी ताकत भाली होती. पारतंत्र्यरूपी खडतर शिक्षकानें गेल्या ३०० वर्षात त्यास बरेंच शहाणें केलें होतें. परकीय अमल त्यांणीं बराच झुगारून दिला होता व गुलामगिरींत भोगाव्या लागणा-या दुःसह यातना त्यांणीं ब-याच सह्य केल्या होत्या. न्यायमनसुब्याचें व दरबारचें बहुतेक सर्व काम त्यांच्या देशभाषेंतच चालले होते. मुलकी व्यवस्था सर्व त्यांच्या हाती होती. त्यांच्या सेनापतींनी रणांगणावर जयश्री मिळविली होती. व राजकीय मसलतींत त्यांच्याच मुत्सद्यांची सल्ला मानली जात असे. मुरारराव व शहाजी भोसले हे विजापूर दरबारचे मुख्य आधारस्तंभच होऊन बसले होते. गोवळकोंडची सर्व सत्ता मदन पंडिताच्या हातीं होती. पश्चिमघाट, डोंगरी किल्ले व मावळप्रदेश त्यांच्याच सरदारांच्या ताब्यांत होता. कृष्णेच्या उगमापासून ते थेट वारणा नदीपर्यंत सर्व घाटमाथा चंद्रराव मोन्याकडे होता. दक्षिण कोंकण सांवताकडे, फलटण निंबाळकराकडे व सातारचा पूर्वमाग डफळे व माने यांजकडे होता. पुणें प्रांतांतील मावळापासून पूर्वेस बारामती इंदापूरपर्यंत सर्व मुलूख भोसल्याकडे जहागीर होता. घोरपडे, घाटगे, महाडिक, मोहिते, मामुळकर वगैरे मराठे सरदारांच्या पदरी बरेंच घोडेस्वार पायदळ वगैरे सैन्य होतें. गोवळकोंडा, विजापूर, अहमदनगर या दरबारांत खरे शूर व खरे लढवय्ये काय ते मराठेच होते. या मराठे बहाद्दरांनी नखशिखांत हत्यारांनी संरक्षण केलेल्या मोगल शिपायांशी टक्कर देऊन त्यांचें बलाबल पूर्णपणें समजून घेतलें होतें. अशा प्रकारची महाराष्ट्राची यावेळी स्थिति असल्यामुळें, मुसलमानांनी दक्षिणेवर ही दुस-यानें स्वारी केली तेव्हां लोकांच्या मनांत नव्या नव्या कल्पना विकास पावूं लागल्या. गेल्या ३०० वर्षांत मुसलमानांनी केलेल्या धर्मछलाचें व जुलमाचें भयंकर चित्र लोकांच्या डोळ्यापुढें मूर्तिमंत उमें राहून भावी येणा-या संकटाची त्यांस भीति वाटूं लागली. जो तो या संकटाचे परिमार्जन कसें करावे या विचारास लागला. अल्लाउद्दीननें स्वारी केली तेव्हां असें विचार लोकांच्या मनांत घोळत नव्हते. त्यावेळीं मुसलमान लोक प्रथम दक्षिणेंत आल्यामुळें त्यापासून होणान्या जुलुमाची लोकांस कल्पना नव्हती. गेल्या ३०० वर्षांत लोकांना हा अनुभव पूर्णपणें आल्यानें पुनः मुसलमानास दक्षिणेंत थारा देण्यास लोक अगदीं राजी नव्हते. शिवाय गेल्या ३०० वर्षांत जसजसा मुसलमानांनी धर्मछल आरंभला, तसतसा हिंदू लोकांचा धर्माभिमान जागृत होत चालला. स्वधर्मरक्षणार्थ लोक देह खर्ची घालण्यास तयार झाले होते. विल्क्स् साहेबांनीं म्हेसूरचा इतिहास लिहिला आहे, त्यांत त्यांनी एक चमत्कारिक हकीकत दिली आहे. ते म्हणतात की, आपणास मॅकन्झी साहेबांनी जमविलेल्या हस्तलिखितांत, १६ ४६ त लिहिलेले एक हस्तलिखित सांपडले होते. या हस्तलिखितांत धर्माचा व नीतीचा होत असलेला -हास व मोठमोठ्या थोर पुरुषास भोगावी लागणारी संकटे यांचें फार मनोवेधक वर्णन केलें होतें व शेवटीं असें भाकित केलें होतें की, ईशकृपेनें हा दुःखद काळ जाऊन, व पारतंत्र्यापासून या देशाची लौकरच सुटका होईल. त्यावेळी सर्वत्र आनंदीआनंद होऊन कुमारिका गाणीं गातील. व आकाशांतून पुष्पवृष्टि होईल’. शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिबलानें व बाहुबलानें दक्षिणेची परकीयांच्या गुलामगिरींतून जी सुटका केली तीस अनुलक्षूनच हें भाकित होतें असा सार्वत्रिक समज असल्याचें विल्क्स् साहेब लिहितात. हे ह्मणणें कितपत खरें असेल, हें सांगवत नाहीं. १६ ४६ त म्हैसूराकडे हें वरील भाकित लिहिलें गेलें, त्यावेळीं पुणें प्रांताच्या बाहेर शिवाजीचे नांवही कोणास माहीत नव्हतें. तेव्हां शिवाजीस उद्देशून हें भाकित झालें होतें असें कसें ह्मणावें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
अशा रीतीनें निझामशाहीचा शेवट झाला. अहमदनगरचा सर्व मुलूख दिल्ली व विनापूर बादशहांनीं वांटून घेतला. या वांटणींत नाशिकचा कांहीं भाग, खानदेश, व-हाड व उत्तर कोंकण इतका प्रदेश मोंगलांकडे गेला. त्यांणी या प्रदेशाची व्यवस्था पाहण्याकरतां एक सुभेदार नेमून या प्रदेशास औरंगाबादचा सुभा हें नांव दिलें. बाकी राहिलेला प्रदेश व मुख्यत्वेंकरून भीमा व नीरा या दोन नद्यांमधील प्रदेश विजापूरच्या अदिलशाही राजघराण्याच्या वांट्यास आला. अहमदनगरचा पाडाव करण्याकरतां मोगलांनीं विजापूर बादशहाशीं सख्य केलें होतें. १६०१त या दोन बादशाहानध्यें प्रथम तह झाला. पुढें परस्परांत बेटी व्यवहार होऊन दोनही राजांचें प्रेम अधिकच वाढत गेलें; पण ही दोस्ती फार वेळ टिकला नाहीं. अहमदनगरचें राज्य मिळविल्यानंतर विनापूरचा प्रदेश घेण्याची मोंगलास हाव सुटली व पूर्वापर संबंध मनांत न आणतां ते त्या उद्योगास लागले. विनापूरचा प्रसिद्ध राजा इब्राहिम आदिलशहा १६२६ त मेला व त्यानंतर पांचच वर्षांनीं मोंगल फौजेनें विजापुरास वेढा दिला. ह्या वेळीं इब्राहिमचा मुलगा महमद आदिलशहा राज्य करीत होता, त्याणें हा वेढा उठविला; पण मोंगलांनीं पुन : १६३६ त विजापुरावर हल्ला केला तेव्हां महमदास मोंगलांबरोबर तह करणें भाग पडलें. त्याणें दिल्लीच्या बादशहास २० लक्ष रुपये खंडणी देण्याचें कबूल केलें व शहाजीस मोंगलांच्या हवाली केलें. निजामशाई राज्याची पुनः उभारणी करण्यासाठी शहाजी झटत होता असां मोंगले बादशहास पूर्ण संशय आला होता. ह्मणूनच महमदशहाकडून त्याणीं त्यास आपल्या स्वाधीन करून घेतलें. शहानीनें पुन: पुढें विनापूर दरबारची नोकरी पतकरली. त्या दरबारनें शहाजीची कर्नाटक प्रांताकडे नेमणूक केली. तेथें त्याणें आपल्या शौर्यानें पुष्कळ मुलूख जिंकून आपल्या मुलाबाळाकरतां कावेरीच्या कांठी एक लहानसे राज्य संपादन केलें. व-हाड व बेदरशाही हीं राज्ये पूर्वीच विजापूर व अहमदनगर राज्यांत सामील झाली होतीं. गोवळकोंडचें राज्य मात्र अद्यापि थोडेंसे स्वतंत्र होतें; मोंगलांनी आतां इकडे आपली वक्रदृष्टि फिरविली. गोवळकोंडच्या राजानें हें वर्तमान समजतांच निमूटपणें मोंगलास खंडणी देण्याचें कबूल करून आपला बचाव करून घेतला. मोंगलांनीं या राजावर लढाईखर्चाचा जबर बोजा बसविला. एवढी मोठी रकम देण्याची त्या राजाची कुवत नव्हती. पण शहाजहानचा मुलगा औरंगजेब याणें गोवळकोंडच्या राज्याचें राजधानीचें शहर - हैदराबाद यावर एकदम हल्ला केला व तेथील राजास गोवळकोंडच्या किल्ल्यांत कोंडून टाकलें त्यामुळें, नाइलाज होऊन त्याणें हा जबर कर देण्याचें कबूल केलें.
पोर्तुगीन लोकांची सत्ताही यावेळी हळू हळू कमी होत चालली होती. १६ व्या शतकाइतका आतां पोर्तुगीज लोकांचा दरारा नव्हता. कोकणचा किनारा मात्र त्यांच्या हातीं होता. एवढाच प्रदेश बचावून ते स्वस्थ होते. इंग्लिश लोकांस तर या वेळच्या राज्यकारस्थानांत मुळींच महत्व नव्हतें. त्यांणी नुकती कोठें सुरत येथें एक लहानशी वखार स्थापली होती. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
बीं कसें पेरलें ?
प्रकरण ३ रें.
------ सतराव्या शतकाच्या आरंभापासूनच स्वराज्यसुखाची आशा महाराष्ट्रीयांच्या मनांत उप्तन्न झाली होती. १६ व्या शतकापासून सरासरी । सुमारें तीन शतकें महाराष्ट्रीयांनी या कामीं फार खस्त खाल्ली असल्यानें, वरील प्रकारची आशा त्यांच्या मनांत उत्पन्न व्हावी, हें। साहजिकच होतें. स्वराज्यवृक्ष लावण्याकरितां महाराष्ट्रीयांनीं जी जीवापाड जमिनीची मशागत केली, तिचें वर्णन गेल्या भागांत केलेंच आहे. शिवाजी महाराजांचा उदय होऊन, स्वराज्याची स्थापना कशी झाली, याचा आतां विचार करावयाचा आहे. पण हा विचार करण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या जन्मकालीं आढळून येणा-या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचें चित्र वाचकांपुढे ठेवणें अत्यंत जरूर आहे. शिवनेर येथें शिवाजीचा जन्म होण्यापूर्वीच अहमदनगरचे निजामशाही राज्य लुप्तप्राय झालें होतें. हे राज्य बुडवण्याकरतां मोंगल बादशहांनी सारखे प्रयत्न चालविले होते. १५९६ त चांदबिबीनें मोठ्या शौर्यानें, अहमदनगर झुजवून शहराचें रक्षण केलें व मोंगल सैन्यास कांहीं काळपर्यंत माघार खावयास लाविली. पण पुनः त्या राज्यांत दुही मानून आपसांत तंटे बखेडे होऊं लागले. १५९९ त कोणा नीच मनुष्यानें चांदबिबीचा खून केला. पुढें लवकरच मोंगल फौजेनें अहमदनगर हस्तगत करून घेतलें व तेथील राजास कैद करून ब-हाणपुरास पाठविलें. इतकी दुर्दशा झाली तरी या निजामशाही राज्याच्या पुढा-यांनीं एकदम हार खाल्ली नाहीं. परांड्याच्या दक्षिणेस त्यांनी नवीन राजधानीचें शहर वसविलें. मलिकंबरनें जुन्नर येथें ही राजधानी नेऊन, जुन्या निजामशाही घराण्यांतील एका मनुष्यास गादीवर बसवून त्याच्या नांवाने राज्यकारभार पहाण्यास आरंभ केला. हा मलिकंबर मोठा मुत्सद्दी असून शूर होता. याणें पुनः अहमदनगर घेतलें व मोंगल व त्यांचे अनुयायी विनापूरचे अदिलशाही राजे यास न जुमानतां अहमदनगरचें राज्य मोठ्या नेटानें २० वर्षे चालविलें.
मोंगलसत्तेपासून निजामशाही राज्याचा बचाव करण्याच्या कामीं मलिकंवरास शिवाजीचा बाप शहाजी, फलटनच निंबाळकर नाईक व प्रसिद्ध वीर लखजी जाधवराव यांची मदत होती. १६ २० त जरी निजामशाही राज्याचा पराभव झाला तरी, या पराभवास मुख्यत्वेंकरून मुसलमान सरदारांची नामर्दुमकीच कारण झाली. या राज्याच्या बचावाकरतां मराठे सरदार मोठ्या शौर्यानें व शिकस्तीनें, लढले. लखजी जाधवराव मात्र मोंगलांस जाऊन मिळाला. या कामगारीबद्दल मोंगलांनी १६२१ त जाधवरावास १५००० घोडेस्वार व २००० पायदळाचे सेनापति नेमलें. मुसलमान सरदारांच्या बेबंदशाईमुळें, मलिकंबराचे नाइलाज होऊन त्यास अहमदनगर शहर व तक्तावर बसविलेला नवीन राजा या दोघांसही शत्रूच्या हवालीं करणें शेवटीं भाग पडलें; तथापि त्याणें धीर सोडला नाहीं. सैन्याची जमवाजमव करण्याच्या प्रयत्नास तो पुनः लागला. परंतु १६२५ त मृत्यूचा अकालिक घाला त्याच्यावर पडल्यामुळें, त्याचे सर्व प्रयत्न जागच्याजागीं राहिले. निजामशाहींतील सर्व शक्ति एकत्र करून तिजवर आलेले संकट दूर करण्यास त्या राज्यांत काय तो एवढाच मनुष्य समर्थ होता. याच्या अकालिक मरणानें निजामशाहीचा एक भक्कम आधारस्तंभ नाहींसा होऊन ते राज्य डळमळं लागले. शहाजी भोसल्यानेंही अशा वेळीं या राज्यास सोडलें व मोंगलांकडून ५००० हजार स्वारांचे आधिपत्य मिळविलें. १५३१ त तर मलिकंबराच्या मुलानें निजामाचा खून केला. अशा रीतीनें निजामशाहीचा पूर्ण नाश होण्याची चिन्हें चोहोंकडे दिसूं लागलीं, तेव्हां पृर्व उपकार स्मरून शहाजी आपल्या जुन्या धन्याच्या मदतीस आला व निझामशाहीच्या तक्तावर एका इसमास बसवून त्याणें राज्यनौका हांकारली. नीरानदीपासून चंदोर किल्लयापर्यंत सर्व प्रदेश मोठ्या शौर्याने जिंकून त्याणें तो पुन: अहमदनगरच्या राज्यास जोडला. शहाजीनें इतकी छाप बसविली कीं, त्याचा मोड करण्यास मोंगलास २५००० सैन्य पाठवावें लागलें. सरासरी चार वर्षे पंर्यत ह्मणने १६३२ पासून १६३६ पर्यंत शहानीनें मोंगलास दाद दिली नाहीं; पण शत्रु फार बलाढ्य असल्यामुळें त्याचा निभाव लागेना. शेवटीं शहाजहानच्या अफाट सैन्यापुढें त्याणें हात टेकले व मोंगल बादशाहच्या संमतीने १६३७ ते अहमदनगरची नोकरी सोडून त्यानें विजापूर दरबारची नोकरी पतकरली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
आपल्या स्वातंत्र्यावर मुसलमानांनी आणलेल्या पहिल्या संकटाशीं मोठ्या धैर्यानें टक्कर देऊन महाराष्ट्रीयांनीं आपली सुटका करून घेतली. सरासरी ३०० वर्षे त्यांना या खटपटींत घालवावीं लागलीं; पण इतक्या अवधींत आपल्या अंगीं कांही अलौकिक गुण आहेत असें त्यांणीं दाखविलें. त्यांनीं कांहीं दिवस प्रसंगास पाठच दिली. पुढें मुसलमान जसजसे चैनी, खातर होत गेले, तसतसे त्यांस जेरीस आणून व त्यांची सत्ता हिरावून घेऊन महाराष्ट्रीयांनीं आपली मुक्तता केली. परंतु हल्लींचा प्रसंग फारच भयंकर होता. पूर्वी उपयोगीं पडलेल्या उपायांनी या नवीन । आलेल्या मंकटांतून मुळींच पार पडतां आलें नसतें. या कामीं नवीन उपायांचीच योजना करणें जरूर होतें. मराठ्यांत स्वदेश आणि स्वधर्म यांचें नवीन वारें भरून, चोहींकडे पांगापांग झालेल्या त्यांच्या शक्तीम एकवटून देशकार्याकडे तिचा उपयोग करून घेणें अत्यंत अवश्य होतें. शिवाजीच्या अंगचा विलक्षण गुण हाच होता कीं, त्याणें ह्या नवीन आलेल्या संकटाचें खरें स्वरूप जाणून स्वदेश आणि स्वधर्म या कामाकरतां आपल्या प्राणाचेही बळी देण्यास महाराष्ट्रीयांनीं - मागें पुढें पाहूं नये असा अलौकिक आवेश त्यांच्या अंगांत आणून सोडला. शिवाजीनें मराठ्यांच्या अंगी नवीन जोम किंवा शक्ति उत्पन्न केली असें नाहीं. त्यांच्या अंगीं ती मूळची होतीच; पण ती एकवटावयाचीच कायती जरूर होती. शिवाजीनें ती एकवटून तिचा महत्कार्याकडे उपयोग केला. त्याणें जी देशसेवा बनाविली, त्याबद्दल महाराष्ट्रीयांम त्याचे उतराई कधींच होतां येणार नाहीं. ही मोठी कामगिरी त्याणें बनाविली ह्मणूनच त्यास महाराष्ट्रीयांनी पूज्य मानलें पाहिजे. शिवाजीच्या चरित्रावरून तत्कालीन मराठ्यांच्या शक्तीचीच केवळ नव्हे, तर देशाभिमान, स्वधर्मप्रीति, समाजहित वगैरे बाबतींत ज्या उदात्त कल्पना लोकांच्या मनांत खेळूं लागल्या होत्या. त्यांचीही बरोबर अटकळ करतां येते. लोक शिवाजीस ईश्वरीअंश मानीत होते तें वृथा नव्हे. त्याच्यावर लोकांचा विश्वास विनाकारण नव्हता. स्वदेशाची पारतंत्र्यांतून सुटका करण्याकरितांच आपला अवतार आहे, अशी खरोखर त्याच्या मनांत प्रेरणा झाल्यामुळें, त्याच्या चेह-यावर एकप्रकारचें विलक्षण तेज चमकत असे. त्यास पाहिल्यावरोवर ज्या सत्कार्यार्थ हा झटत आहे, त्या सत्कार्यास कायावाचामनेंकरून साहाय्य करावें अशी प्रत्येकाच्या मनांत म्फूर्ति उत्पन्न झाल्याविना रहात नसे. या महानुभावाचा प्रभाव असा कांहीं चमत्कारिक होता कीं, त्याणें उत्पन्न केलेल्या स्वदेशस्वधर्माभिमानरूपी जादूनें केवळ त्याचीच पिढी भारली गेली नाहीं तर पुढील पिढ्यांतही या नवीन वा-याचा संचार दृष्टीस पडत होता. सर्व हिंदुस्थानभर जेथें जेथें मराठे होते, तेथें तेथें स्वराज्य उभारण्याचे बेत चालू झाले. अशाप्रकारें कांहीं अंशीं देशाच्या पूर्व इतिहासानें, कांहीं अंशीं देशांत सर्वत्र प्रचलित झालेल्या नवीन धर्मकल्पनांनीं व विशेषतः ३०० वर्षेपर्यंत मुसलमानी अमलांत मिळालेल्या लष्करी शिक्षणानें पुढें उत्पन्न होणा-या स्वराज्यरूपी महावृक्षाचें बीं रुजविण्याकरितां जमीन तयार केली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
शिवाजीचा आजा मालोनी हा उदयास येण्यापूर्वीच ८ मराठ्यांची घराणीं प्रसिद्धीस आलीं होती, असें ग्रँट डफ साहेब लिहितात. ह्यांत. सिंदखेडच्या जाधवांचें तर प्रस्थ फारच मोठें होतें. अल्लाउद्दीननें पराजित केलेल्या देवगिरीच्या जाधवांशी यांचा संबंध होता. ह्या जाधवांपैकीं लखोजी जाधव तर इतका शिरजोर झाला होता कीं, मोंगल बादशहानींही दक्षिणेवर जेव्हां प्रथम स्वारी केली, तेव्हां याची मदत मागितली. फलटणचे निंबाळकरही असेच प्रसिद्ध होते. मालौडीच्या झुंजारराव घाटग्यासही विनापूरचे दरबारांत फार मानीत. मोरे, कोंकणांतील व घांटमाथ्यावरील शिरके, गुजर, दक्षिणमावळांतील मोहिते हे मोठे योद्धे असून प्रसिद्ध सेनानी होते. ह्यांच्या प्रत्येकाच्या हाताखाली दहा वीस हजार घोडेस्वार असत. भोसल्यांचें घराणे १७ व्या शतकाच्या आरंभी प्रसिद्धीस आलें. हे भोसले जाधव व निंबाळकर यांचे नातेवाईक होते. शहाजीची आई ही जाधवांची मुलगी व त्याची बायको ही निंबाळकरांची मुलगी. मालोजी भोसले हा या घराण्याचा मूळपुरुष. या मालोजीचा मुलगा शहानी हा त्यावेळी पहिल्या दर्जाच्या सरदारांत मोडत असे. राजाचा राव व रावाचा रंक करण्यासारखी त्याची शक्ति होती. अहमदनगरच्या निजामशाईच्या वतीनें हा मोंगल सैन्याशीं फार लढला.
अशाप्रकारें चोहींकडे हिंदूंचेंच वर्चस्व असल्यामुळें गोवळकोंडे, विजापूर, नगर व बेदर या चार मुसलमानी राज्यांतील सर्व सत्ता प्रायः मराठे मुत्सद्दी व मराठे योद्धे यांचेच हातीं होती. सर्व कोट, किल्ले नांवानें मात्र मुसलमानांचे अंकित ; पण वस्तुतः स्वतंत्र अशा मराठे जहागिरदारांच्या ताब्यांत होते. अशा रीतीनें देशाची पारतंत्र्यांतून मुक्तता करण्याची हळू हळू तयारी चालली असतां, दुसरे एक मोठेंच संकट ओढवलें. नर्मदा व तापी या नद्यांच्या दक्षिणेस आपली सत्ता वादविण्याचा दिल्लीचे मोंगल बादशहा पुनः प्रयत्न करूं लागले. अकबर बादशहाच्या कारकीर्दीपासून ते अवरंगजेबाच्या कारकीर्दीपर्यंत त्यांचे हे प्रयत्न सतत चालू होते. एकदां गेलेले स्वातंत्र्य स्थापित करण्यास हिंदूंस ३०० वर्षे लागली. दिल्लीच्या बादशहांच्या दक्षिण जिंकण्याच्या प्रयत्नास यश आलें असते, तर हिंदूस आणखी ३०० वर्षे पारतंत्र्यांत कंठावी लागलीं असती; पण परमेश्वराची इच्छा तशी नव्हती. हें नवीन संकट फारच भयंकर होतें. या कामी आपल्या अवाढव्य राष्ट्राची सर्व शक्ति खर्च करण्याचा मोंगल बादशहाचा दृढनिश्चय झाला होता. दक्षिणेंतील मुमलमान राजे व त्यांचे मराठे मरदार या दोघांमही या मंकटाची मारखीच भीति होती. मराठ्यांचा एकमेकाम फटकून वागण्याचा नेमर्गिक स्वभावच बनला असल्यामुळें, मैदानांत उभे राहून मोंगलाच्या तोंडाशीं तोंड देण्याइतकी त्यांची कुवत नव्हती, यामुळें लपून छपून छापे घालण्याच्या पद्धतीचा त्यास अवलंब करावा लागला. ही युद्धकला त्यांच्या अगदी आंगवळणी पडली होती त तींत ने इतके पटाईत झाले होते कीं, ते कोणासच हार जात नसत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
नववे. या अशा परिस्थितीमुळें दक्षिणी मुसलमानांचें धर्मवेड बरेंच कमी झालें व त्यामुळें हिंदूंचा धर्मच्छलही फारसा आला नाहीं. जरी केव्हां केव्हां मुसलमानांच्या अंगीं पिसें येई, तरी त्यांणीं हिंदुधर्माची एकंदरींत फारशी अवहेलना केली नाहीं. त्यांच्या कारकीर्दीत हिंदूंस बरेंच धर्मस्वातंत्र्य होतें. लष्करी व दिवाणी अधिकारही हिंदूलोकांकडे मुसलमानी राजांनी बरेच सोंपविले होते. हिंदु देवस्थानांस ब-याच जमिनी इनाम दिल्या. हिंदु वैद्यांस दवाखान्यांतून जागा दिल्या व कित्येक ब्राह्मणसमाजास वंशपरंपरेच्या देणग्याही त्यांणीं दिल्या होत्या. तसेंच बरीच हिंदु कुटुंबें या मुसलमानी अमलांत नांवालैकिकास आलीं होतीं. १६ व्या शतकांत मुरारराव नांवाचा एक मनुष्य गोवळकोंडच्या राजाचा मुख्य प्रधान होता. गोवळकोंडच्या शेवटच्या राजाचा प्रधान मदन पंडित याचें इतकें वजन होतें कीं, याणें शिवाजी व गोवळकोंडचा राजा यांची दोस्ती करून देऊन मोंगलाबरोबर लढाई करण्यास त्यांस प्रवृत्त केलें. रामराय कुटुंबा चेंही गोवळकोंड च्या दरबारांत फारच चांगलें वजन होतें. प्रांताचा वसूल करण्याचें कामहो बहुधा या राजांच्या कारकीर्दीत ब्राह्मण देशपांडे व मराठे देसाई अगर. देशमुख यांनकडे असे. दादोपंत, नरसू काळे, एसू पंडित वगैरे ब्राह्मण त्यावेळीं फार नांवाजलेले होते. यांनीं विजापूरच्या मुलकी व्यवस्थेंत फार सुधारणा केली. गुजराथ व माळवा येथील राजांच्या दरबारीं अहमदनगरनें पाठविलेले वकील बहुधा ब्राह्मणच असत. पहिल्या बुराणशहाचे वेळीं तर सर्व सत्ता कमालसेन नांवाच्या एका ब्राह्मण प्रधानाचे हातीं होती. याच वेळीं विजापुरास एसू पंडित हा मुस्ताफ झाला होता. गोवळकोंड्यास अकाण्णामकाण्णा ह्या बंधुद्वयाचें इतकें वजन वाढलें होतें कीं, मोगलांनीं स्वारी केली, तेव्हां विनापूर दरबारनें यांची मदत मागितली.
दहावे. हळू हळू लप्करी खात्यांतही हिंदूंचें वर्चस्व वाढत गेलें. ब्राह्मणी राज्याचे वेळीं कामरान घाटगे, हरनाईक वगैरे हिंदु मनसबदार होते असें फेरिस्ता इतिहासकार म्हणतो. दुस-या ब्राह्मणी राजाचे शरीरसंरक्षक २०० शिलेदार होते. १६ व्या शतकाच्या आरंभीं वाघोज़ी जाधवराव नाईक नांवाचा एक मराठा सरदार व-हाड, विजापूर व विनयानगर या दरबारांत फारच प्रसिद्धीस आला होता. याणें कितीएक राजे पदच्युत केले व कितीएकांस राज्यपद प्राप्त करून दिलें. कर्नाटकांती : सर्व नाईकवाडी हिंदु फौजेचा हा मुख्य होता. वस्तुतः त्या काळीं है। एक बलाढ्य राजाच होता. त्याणें ते नांव मात्र धारण केलें नाहीं. प्रसिद्ध मुरारराव जाधव यानें १७ व्या शतकांत विजापूरची फारच उत्तम नोकरी बजाविली. विजापुरावर चालून आलेल्या मोगल लोकांचा याणें पराभव केला. हा व शाहानी भोसले हे विजापूर व अहमदनगर ह्या राज्यांचे आधारस्तंभच होते. मुराररावाचा -हास करण्याच्या कारस्थानांतही राघोपंत भोसले, घाटगे वगैरे हिंदूच अग्रणी होते. तसेच चंद्रराव मोरे व राजेराव या दोन मुराररावाच्या हाताखालील सरदारांनी कोंकण प्रांतांतील लढायांत फारच कीर्ति मिळविली होती. ह्यावेळीं ह्मसवाडचे माने, वाडीचे सावंत, डफळे व घोरपडे हे लोकही फार प्रसिद्धीस आले होते.