Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
ब्रिटिश साम्राज्यसत्तेशीं सामना देण्याच्या पूर्वीपासून मराठी राज्यास जी निर्बलता व उतरती कळा प्राप्त झाली होती, तिचें बीज, शिवाजीच्या राज्यपद्धतीचें त्याच्या वंशजांनीं अनुकरण केलें नाहीं यांतच आहे, असें येथपर्यंत केलेल्या विवेचनावरून दिसून येईल. महाराष्ट्रांत ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनीं त्यावेळी चालू असलेली राज्यपद्धति चालू न ठेवितां मोठ्या शहाणपणानें व विचारानें शिवाजीची पद्धति पसंत केली. त्यांनी लष्करी खातें व इतर खातीं एकमेकांपासून अलग ठेऊन लष्करी खात्याचें महत्व इतर खात्यांइतकें ठेविलेलें नाहीं. लष्करी अगर दुस-या कसल्याही कामगिरीबद्दल जमीन इनाम देण्याची चाल न ठेवितां सर्व अधिकारी व नोकर लोकांस रोख पगार देण्याची त्यांची वहिवाट आहे. लहान मोठ्या सरकारी नोक-यांवर वंशपरंपरेचा हक्क ते मानत नाहींत. सर्व राज्यव्यवस्था एकाच व्यक्तीच्या मर्जीप्रमाणें न चालवितां ती मंत्रिमंडळांकडून चालविली जात आहे. जमिनदार अगर शेतकरी यांजकडून केव्हांही जमीनधारा मक्त्यानें न घेतां ते सरकारी अधिका-यांकडून वसूल केला जात आहे. प्रजेपैकीं साधारणपणें सर्व जातींच्या लोकांत योग्यतेप्रमाणें सरकारी नोक-या वांटून देण्याची तजवीज केलेली आहे. वर सांगितलेल्या ह्या राजकीय धोरणाच्या तत्वांचा ब्रिटिशसरकारनें स्वीकार केल्यामुळें, मूठभर इंग्रज लोक आज हिंदुस्थानसारख्या अफाट राष्ट्राची राज्यव्यवस्था इतक्या सुयंत्रितपणें चालवीत आहेत कीं त्यांच्या राज्यव्यवस्थेचें निरीक्षण करणारे एतद्देशीय व परकीय लोक त्यांच्या अलौकिक राज्यकर्तृत्वशक्तीचें कौतुक करीत राहिले आहेत. अशा प्रकारें शिवाजीनें योजिलेल्या राज्यपद्धतीची, उपयुक्तता केवळ त्यास मिळालेल्या यशःप्राप्तीवरूनच नव्हे, तर ज्या राष्ट्रास एकजीव करण्यास त्यानें खटपट केली, व जें, त्यानें घालून दिलेले राज्यपद्धतीचें वळण त्याच्या वंशजांनीं न गिरविल्यामुळें, अखेर मोडकळीस आलें, त्यावर आपली सत्ता स्थापण्याचा प्रयत्न करणारांस प्राप्त झालेल्या यशावरूनही सिद्ध होत आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
जिल्ह्याच्या व गांवच्या जमीनदारांच्या मदतीवांचून खुद्द सरकारतर्फे जमिनीचा महसूल वसूल करण्याची शिवाजीची पद्धत त्याच्या वंशजांनीं अगदीं पूर्णपणें चालविली होती व पेशव्यांच्या भर अमदानींत ह्मणजे नाना फडणीस यांच्या मृत्यूपर्यंत मक्त्यानें वसूल घेण्याच्या पद्धतीना अवलंब करण्यांत आला नाहीं. फक्त शेवटच्या राव बाजींच्या कारकीर्दीत मात्र खुद्द महाराष्ट्रांतही मक्त्यानें वसूल घेण्याची चाल पडली. माळवा, गुजराथ व उत्तर हिंदुस्थानांतील मराठ्यांच्या ताब्यांतील इतर प्रांत यांत मात्र ही मक्त्याची चाल ब-याच मोठ्या प्रमाणांत चालू होती. कारण तिकडे मराठी सत्तेची स्थापना ह्मणण्यासारखी स्थिर झालेली नव्हती. ह्या वसुलाच्या पद्धतींत मात्र शिवाजीच्या वंशजांनी त्याचें उत्तम प्रकारें अनुकरण केलें; पण मराठे, ब्राह्मण व प्रभु या तीन जातींत राज्यांतील अधिकार वांटून देण्यांत त्यानें जी दक्षता ठेविली होती, तिकडे त्याच्या वंशजांचे लक्ष गेल्याचें दिसत नाहीं. शिवाजीच्या कारकीर्दीत ज्या प्रभु जातीच्या लोकांनीं अलौकिक कृत्यें केलीं, त्यांचे वंशज बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीपासून अगदीं मागें पडत चालले. फक्त सखाराम हरि ह्मणून एक प्रभु गृहस्थ रघुनाथराव पेशव्याच्या हाताखाली लप्करांत एक बडा अम्मलदार होता, व त्याचें नांव मात्र ह्या वेळच्या इतिहासांत ऐकूं येतें. तथापि बडोदा व नागपूर या संस्थानांत ह्या जातींतील लोकांकडे मुत्सद्यांची व सेनापतीचीं कामें देण्यांत आलेलीं होतीं. ब्राह्मणांसंबंधानें पहातां कोंकणस्थ ब्राह्मणांस शिवाजीच्या वेळी बिलकुल थारा नव्हता, अशी एक समज आहे. पण ब्राह्मणांतील तिन्ही वर्णीतील लोकांस शिवाजीने सुभेदार अगर किल्ल्यावरील सेनापति नेमिलें होतें असें बखरकारांनी लिहून ठेवलें आहे. शिवाजी व त्याचे दोन पुत्र संभाजी व राजाराम यांच्या कारकीर्दीमध्ये देशस्थ ब्राह्मण साहजिकच पुढें आलेले होते. शाहूच्या कारकीर्दीत पेशवे स्वकर्तबगारीनें महत्वास चढले आणि तेव्हांपासून हे पारडें फिरलें. पुढे रघुनाथरावदादा व माधवराव पेशवे यांच्यामध्यें आपसांत तंटे सुरू झालें, तेव्हां मुख्य मुख्य देशस्थ जहागिरदारांनी राघोबाची तरफदारी केली. तेव्हांपासून तर पेशवाई राज्यांत देशस्थांचें वजन अगदींच कमी झालें.
लष्करी अधिकारासंबंधानें पाहतां ते सर्वस्वी मराठ्यांनीच व्यापून टाकिला होता असें नाहीं, मात्र सेनेंतील बहुतेक अम्मलदार व शिपाई मराठा जातीचे होते. मराठा सरदारांप्रमाणेंच शिवाजीचे ब्राह्मण सरदारही मोठे पराक्रमी होते व हीच स्थिति पहिल्या पहिल्या पेशव्यांच्या कारकीर्दीपर्यंत चालू होती. मराठ्यांचे अति बलाढ्य असे सेनापति पहिल्या बाजीरावाच्या तालमींत तयार झालेले होते. बाजीरावाच्या हाताखालीं लढणा-या मोठमोठ्या मराठ्या सरदारांनीं दूरदूरच्या प्रदेशांत स्वतंत्र राज्यें स्थापिलीं, व जेव्हां खुद्द सातारच्या गादीसही दहशत बसेल इतकी त्यांची सत्ता वाढत चालली, तेव्हां त्यांच्याशीं सामना देण्यास पेशव्यांनीं दक्षिणेंत ब्राह्मण सरदार तयार करण्याचें राजकीय धोरण बांधिलें. आणि तेव्हांपासून पटवर्धन, फडके, रास्ते, गोखले ह्या घराण्यातील ब्राह्मणवीर पुढें सरसावले; पण लढाऊ कामांत तरबेज झालेल्या शिंदे व होळकर ह्यांच्या सैन्यापुढें त्यांच्यानें कधीही टिकाव धरवला नाहीं. मराठ्यांमध्यें अशा त-हेनें वैमनस्य माजून गेलें तें इतर गोष्टींबरोबर सर्व महाराष्ट्रराज्याच्या नाशास कारण झालें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
शिवाजीनें घातलेलें व चांगल्या रीतीनें चालविलेलें वळण सोडून राज्यांतील बडे बडे हुद्दे वतनाप्रमाणें वंशपरंपरेनें चालविण्याची पद्धत सुरू करण्यांत त्याच्या वंशजाकडून दुसरी मोठी चूक झाली आहे. खुद्द पेशव्यांचें पद जर वंशपरंपरेने चालू लागलें, तर इतर अधिका-यांचीही तशीच स्थिति झाली यांत आश्चर्य नाहीं. बापाची नैसर्गिक कर्तृत्वशक्ति व बुद्धिमत्ता ही मुलाच्या अंगीं परंपरेनें येतेच असा नियम नसल्यामुळें, पुष्कळ अधिकार कर्तत्वशून्य व अयोग्य अशा लोकांच्या हातीं जाऊन सहजच राज्यास हळू हळू उतरती कळा लागत चालली. पेशव्यांच्या चार पुरुषांस वंशपरंपरेच्या हक्कानें पेशवेपद प्राप्त झालें; पण इतर मुत्सद्यांस आपआपले अधिकार आपल्या कुटुंबांत चालवून घेण्याचा तो हक्क नव्हता. अगदीं लहान हुद्यावरील लोकसुद्धां स्वतःच्या कर्तबगारीनें मोठ्या योग्यतेस चढले; पण त्यांचा प्रधानमंडळांत प्रवेशच होत नसे. उदाहरणार्थ, नाना फडणीस हा निव्वळ फडणिशीचें काम करणारा कारकून, पण त्याची मुख्य प्रधान होण्याची महत्वाकांक्षा होती. तसेंच महादजी शिंदे म्हणजे दुस-या प्रतीचा सरदार ; पण स्वतःच्या शौर्यानें आपल्या वेळच्या लोकांत अत्यंत बलाढ्य होऊन बसला. ह्या दोघां व यांच्याच योग्यतेच्या इतर लोकांचा मुत्सद्दीमंडळांत प्रवेश झाला नाहीं. आणि एकजण दुस-यास अधिकारानें अगर कपटानें खालीं पाड.. ण्याची खटपट करूं लागला. लष्करावरील बलाढ्य सेनापतीनीं आपआपल्या प्रांतांत स्वतंत्र राज्यें स्थापन करण्यास सुरुवात केली. आपल्या मर्जीस येईल त्याप्रमाणें ते इतरांशीं युद्ध अगर तह करूं लागले. अष्टप्रधानांकडून राज्यकारभार चालविण्याची व्यवस्था तींत काल व परिस्थिति यांस अनुरूप थोडा बदल करून चालू ठेविली असती व शिवाजीच्या पश्चात् दोन पिढ्यांच्या कारकीर्दीत वंशपरंपरेनें अधिकार देण्याच्या चालीस थारा दिला नसता, तर वर सांगितलेला अनिष्ट प्रकार बहुतेक टाळतां आला असता.
आपल्या पराक्रमानें मोठमोठे प्रांत जिंकणारांस तेच प्रांत जहागिरीदाखल बक्षीस द्यावयाचे नाहींत, ह्या शिवाजीच्या तत्वाचें उल्लंघन ही सर्वात मोठी चूक झालीं. शाहू राज्यावर येण्याच्या पूर्वी ज्या गोष्टी घडून आल्या, त्यामुळें शाहूस त्या तत्वाचें उल्लंघन करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतें. संभाजीच्या मृत्यूनंतर बहुतेक महाराष्ट्रप्रांत पुनः मोंगलांच्या ताब्यांत गेला, आणि त्याचा भाऊ राजाराम व त्याचें साहाय्यकारी मंत्रिमंडळ ह्या सर्वांस दक्षिणेचा मार्ग सुधारणें भाग पडलें. त्यांस राज्य स्थापण्याचें सर्व काम पुनः आरंभापासून सुरूं करावे लागलें व त्यावेळी जे लोक स्वपराक्रमानें पुढें आले, त्यांस त्यांच्या मर्जीप्रमाणें वागू देणेंच इष्ट होतें. अर्थात् या बाबतींत राजारामास अगर त्याच्या मंत्र्यांस दोष देणें वाजवी होणार नाहीं. राजारामाच्या वेळचा आणीबाणीचा प्रसंग शाहूच्या कारकीर्दीच्या आरंभापर्यंत जोरांत होताच. पण पुढें महाराष्ट्राच्या गादीवर शाहूची कायमपणें स्थापना होऊन, सर्वत्र स्थिरस्थावर झाल्यानंतर, ज्यावेळीं राज्य वाढविण्यासाठी मराठ्यांच्या मोहिमा सुरूं झाल्या, त्यावेळेस ही जहागिरी देण्याची पद्धत बंद करण्यास चांगली संधि होती. पण ह्याच वेळीं प्रत्येक शूर सरदारास स्वतःच्या मर्दुमकीवर प्रांत काबीज करून जहागीर मिळविण्याची मुभा देण्यात आली, व खरी -चूक ह्याच वेळीं झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. पिलाजी व दमाजी गायकवाड हे गुजराथ प्रांताचे राजे बनले. नागपूरकर भोसले आपल्या प्रांतांत प्रबळ झाले, व शिंदे, होळकर आणि पवार यांनीं माळवा प्रांतांत व उत्तर हिंदुस्थानांत आपआपलीं राज्यें स्थापिलीं. हे सर्व सरदार आपआपल्या जहागिरीपैकीं कांहीं भाग खंडणीदाखल महाराष्ट्रांतले प्रमुख अधिकारी जे पेशवे यांस देत व एवढ्यापुरतेंच ते सातारच्या गादीचें वर्चस्व फक्त नांवास मात्र कबूल करीत. ह्या वर सांगितलेल्या महागिरी जेव्हां वंशपरंपरेनें चालूं लागल्या, तेव्हां महाराष्ट्राच्या व्यवस्थित सत्तेंत पूर्ण अव्यवस्था होऊन गेली. ज्यांनीं ह्या जहागिरी प्रथम मिळविल्या, त्यांच्या ठायीं स्वामिभक्ति वास करीत होती; परंतु आपल्या खासगी जहागिरींत पेशव्यांनीं अगर सातारच्या राजांनीं हात घालणें ही गोष्ट, त्यांच्या वंशजांस आवडेनाशी झाली. अशाप्रकारें शिवाजीच्या ह्या महत्वाच्या तत्वाचें उल्लंघन सर्व महाराष्ट्राच्या नाशास कारणीभूत झालें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
शिवाजीच्या पश्चात् मराठी राज्याचा विस्तार ‘ स्वराज्या' च्या मर्यादेच्या बाहेर इतका वाढला की, पूर्वेकडे कटकपर्यंतचा मुलूख, पश्चिमेकडे काठेवाडपर्यंतचा मुलूख, उत्तरेकडे दिल्लीपर्यंतचा मुलूख व दक्षिणेकडे तंजावरपर्यंतचा मुलूख यांचा त्यांत समावेश झाला. अशावेळीं शिवाजीनें घालून दिलेल्या पद्धतीपैकीं काहीं गोष्टी पूर्णपणें चालू ठेवणें शक्य नव्हतें हे खरें आहे. शिवाजीच्या राज्यांत ह्मणने खुद्द महाराष्ट्रांत राजा, प्रजा, सैन्यांतील लोक व अधिकारी हे सर्व एकाच जातिधर्माचे असून शिवाय राजभक्तीच्या सर्वसाधारण भावानें त्या सर्वांचा अगदीं एकजीव झालेला होता. ही स्थिति पुढें तशीच टिकणें शक्य नव्हतें. कारण राज्याचा विस्तार हिंदुस्थानाच्या दूरदूरच्या प्रदेशांत होत गेल्यामुळें जेथील जित लोक जेत्यापासून सर्व बाबीमध्यें अगदीं भिन्न होते व पुष्कळवेळां लप्करांतही पोटभरू लोकांचा भरणा झाल्यामुळें लष्करी अम्मलदारांविषयीं अगर राजाच्या प्रतिनिधीविषयीं त्यांच्या मनांत पूज्य बुद्धि व प्रेमभाव वसत नसे. यास्तव शिवाजीची वर सांगितलेली पद्धति हिंदुस्थानांतील सर्व ठिकाणच्या प्रदेशास लागू करतां येण्याजोगी नव्हती यांत आश्चर्य नाहीं. डोंगरी किल्ले व त्यांच्या आसपासचा सपाट प्रदेश यांच्यासंबंधाचें महत्त्व फक्त महाराष्ट्रापुरतेंच होतें व गुजराथ अगर माळवा प्रांताच्या सपाट प्रदेशांत व खुद्द महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांत राज्यपद्धतीचा पाया या नात्यानें त्याचें विशेषसें महत्व वाटण्याजोगें नव्हतें. तसेंच जमिनीचा महसूल करण्याचें काम खुद्द सरकारतर्फे करणें व रयत आणि जमीनदार ह्यांचे हक्क काढून घेणें ही पद्धतही ह्या दूरदूरच्या प्रांतांस लागू पडण्याजोगी नव्हती. कारण ती चाल त्या प्रांतांतील पूर्वीच्या राज्यपद्धतीस अगदीं विरुद्ध होती. करितां ह्या व ह्याच प्रकारच्या दुस-या कांहीं बाबींत शिवाजीच्या वंशजांनीं शिवाजीच्या पद्धतीचें उलंघन केलें ह्यावद्दल त्यांस दोष देतां येणार नाहीं. तथापि वरील बाबीखेरीज इतर गोष्टींत त्यांनीं त्या पद्धतीचा अवलंब केला नाहीं ही त्यांची मोठी चूक झाली यांत संशय नाहीं. वे ह्या चुकीचें कारण दुसरें कोणचेंही नसून, त्यांच्या वंशनापैकीं कोणासही शिवाजीच्या पद्धतीची उपयुक्तता कळून आली नाहीं व ज्यानें त्यानें आपआपल्या वेळेच्या सोईप्रमाणें हवेतसे राज्यकारभारांत फेरफार केले, आणि त्यायोगानें एक जीव झालेल्या राष्ट्रांत अव्यवस्था व गोंधळ होऊन सर्वत्र अव्यवस्था माजून राहिली व राष्ट्रावर येणा-या पहिल्याच अरिष्टाबरोबर नष्ट होईल इतकें तें डळमळींत झालें.
अष्टप्रधानांच्या मंडळाकडून राज्यकारभार चालविण्याची चाल शाहूच्या पहिल्या अमदानींत चालू होती, परंतु इतर मुत्सद्यांस मागें टाकून जसजसे पेशवे बळावत चालले तसतशी ती हळू कमी होत चालली व अखेरीस पुणे येथें पेशव्यांनीं आपली गादी स्थापिल्यावर तर ती अगदींच नाहींशी झाली. पेशव्याच्या खालच्या प्रतीचे पंतअमात्य व पंतसचिव ह्या मुत्सद्यांच्या शाहूराजाच्या पश्चात् कोठें मागमूसही लागत नाहीं; ते मराठी दरबाराचे निव्वळ जहागीरदार होउन बसले. त्यांच्या जागेवर दुसरे लोक नेमण्याची पेशव्यांनीं काळजी घेतली नाहीं व तसें करण्यास त्यांस धैर्यही झाले नाहीं. तर सर्व अधिकार त्यांनींच बळकाविला. पेशवे हे स्वतःच सेनापति, जमाखर्ची प्रधान व परराष्ट्रीय प्रधानांची कामें पाहूं लागले. अशाप्रकारें सर्व राज्यसत्ता एकाच अधिका-याच्या ताब्यांत गेल्यामुळें, शिवाजीच्या पद्धतीप्रमाणें राज्यकारभार चालविला असतां राष्ट्रांत जो जोम राहिला असता, तो नाहींसा झाला यांत नवल नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
फक्त देवस्थान व धर्मादाय यांच्या खर्चाकरितां देणगीदाखल शिवाजीनें कांहीं जमिनींचीं उत्पन्नें दिलेलीं असत. हीं इनामें सार्वजनिक मालमत्ता अमून ती धारण करणा-या लोकांकडे लष्करी पेशाचा अधिकार नसत्यामुळें, मुख्य राज्यास त्यांच्यापासून साधारणपणें अपाय होण्याचा फारसा संभव नव्हता. धर्मादायाच्या बाबींत, विद्येस उत्तेजन देण्यास्तव दक्षिणा देण्याची चाल शिवाजीस फार पसंत होती. हल्लीं विद्वत्तेची परीक्षा घेऊन संभावना देण्याची जी चाल आहे, तिचीच ही जुनी आवृत्ति । होती. संपादन केलेल्या विद्येच्या महत्वाच्या व बाहुल्याच्या प्रमाणावर दक्षिणा देण्याचें मान ठरविण्यांत येत असे. त्यावेळीं विद्या पढविण्याकरितां सार्वजनिक शाळागृहें नव्हतीं. परंतु खासगी गुरु आपआपल्या घरांमध्यें शिष्यांस पढवीत असत व गुरु आणि शिष्ये ह्यांस । सरकारांतून वार्षिक उत्पन्न योग्य प्रमाणांत मिळून त्यावर त्यांचा निर्वाह होई. शिवाजीच्या अमदानींत संस्कृत भाषेचें अध्ययन अगदीं लुप्तप्राय झालें होतें. परंतु शिकण्यास उत्तेजन देण्याची जी त्याची पद्धति होती तीमुळें, दक्षिणेंतील पुष्कळ विद्यार्थी काशीकडे अध्ययनास जात व सुविद्य होऊन लोकांकडून सन्मान व राजाकडून धन मिळवून स्वदेशीं परत येत. ह्यामुळें विद्यानैपुण्याबद्दल महाराष्ट्राची सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. संभाजीस मुसलमानांनीं धरून नेल्यानंतर हे दक्षिणा देण्याचें काम तळेगांवच्या दाभाड्यांनीं हातीं घेतलें. पुढें पेशव्यांच्या कारकीर्दीत दाभाड्याच्या घराण्यास जेव्हां उतरती कळा लागली, तेव्हां तें काम खुद्द पेशवे यांनी चालविलें व दक्षिणेची रक्कमही सालोसाल वाढत चालली, ती इतकी कीं, पेशव्यांच्या हातांतून राज्यसत्ता इंग्रजांच्या हातीं आली त्यावेळीं ही रक्कम ५ लाखांपर्यंत गेली होती.
वर दिलेल्या हकीकतीवरून असे दिसून येईल कीं, शिवानीची राज्यपद्धति, त्याच्या पूर्वीच्या व त्याच्यानंतरच्या राज्यपद्धतीपासून कित्येक महत्वाच्या बाबींत अगदीं भिन्न होती. त्या बाबी पुढें दिल्याप्रमाणें :--
(१) डोंगरी किल्ले ज्यावर त्याच्या राज्यपद्धतीची इमारत रचलेली होती त्यांस त्यानें दिलेलें महत्व.
(२) एकाच घराण्यांत वंशपरंपरेनें राज्यांतील बडा अधिकार ठेवण्याच्या पूर्वापार चालीचें उल्लंघन.
(३) लष्करी अगर मुलकी कामगारास कामगिरीबद्दल जमिनी जहागिरी देण्याची बंदी.
(४) जमिनीच्या महसुलाचें काम जिल्ह्यांतील अगर गांवांतील जमिनदाराकडून काढून खुद्द सरकारी नोकराकडे सोपविण्याची चाल.
(५) मक्तयानें वसूल घेण्याची बंदी.
(६) अष्टप्रधानांची स्थापना व त्यांच्यामध्यें राज्यकारभारांतील कामांची केलेली वांटणी व प्रत्येकाचा खुद्द राजाशीं ठेविलेला संबंध.
(७) राज्यकारभारांत लष्करी खात्यापेक्षां इतर खात्यांस दिलेलें वर्चस्व.
(८) ब्राह्मण, प्रभु व मराठे या तिन्ही जातींतील लोकांकडे राज्यांतील लहान मोठीं कामें सोंपवून एकमेकांचा एकमेकांवर दाब राहण्याची कलेली व्यवस्था.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
त्या काळीं अष्टप्रधानांपैकी पंडितराव व न्यायाधीश यांखेरीज सर्वास सेनापतीच्या कामाची माहिती असणें अवश्य असे. आणि त्यामुळें सैन्यांतील अत्यंत पराक्रमी लोकांच्या हातांत राज्यकारभारांतील बडा अधिकार असे. या गोष्टीमध्येंच मराठी राज्याच्या नाशाचें बीज सांपडण्याजोगें आहे. शिवाजीम ही गोष्ट आधींच कळून आली असल्यामुळें त्यानें अष्टप्रधानांपैकी कोणचाही अधिकार वशपरंपरा चालू द्यावयाचा नाहीं अशी तजवीज ठेविली होती. शिवाजीनें स्वतःच्या कारकीर्दीत माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आणि हंबीरराव मोहिते असे चार निरनिराळे सेनाध्यक्ष नेमिले. त्यानें पहिल्या पेशव्याचा अधिकार काढून घेऊन तो मोरोपंत पिंगळे यांस दिला. पंत अमात्य यांच्या अधिकाराचीही अशीच गोष्ट आहे, व इतर अधिकारही कांहीं विवक्षित कुटुंबांतच वंशपरंपरेनें राहूं न देण्याबद्दल त्यानें खबरदारी घेतली होती. शाहू राजाच्या पहिल्या अमदानींत अशीच सावधगिरी ठेवण्यांत आली होती; परंतु त्याच्या कारकी- र्दीच्या अखेरीस पहिले तीन पेशवे-बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव यांच्या-अंगच्या बुद्धिमत्तेमुळें व कर्तबगारीमुळें पेशव्यांचें पद त्यांच्या घराण्याकडे वंशपरंपरेनें चालू राहिलें. आणि त्यानंतरचे इतर मुत्सद्दी बहुशः कर्तृत्वशून्य असल्यामुळें एकामागून एक मागें पडत चालले व राज्यांतील अधिकाराची वांटणी सारखी न होऊन सत्तेचा समतोलपणा नष्ट झाला. पेशव्यांच्या अमदानीमध्यें अष्टप्रधानांचे अधिकार नामशेष झाले आणि एकंदर राज्य शिवाजीनें घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणें सुव्यवस्थितपणें न चालतां सर्वत्र अव्यवस्था व गोंधळ होऊन राष्ट्राचें जीवित मुख्य अधिका-याच्या कर्त्तबगारीवर अवलंबून राहिलें. या अनिष्ट परिणामाचा दोष शिवाजीच्या राज्यपद्धतीस बिलकुल देतां येणार नाहीं. तर तिचें उल्लंघन केल्या. मुळेंच शिवाजीचे सर्व बेत ढांसळले असें ह्मणणें भाग पडतें.
दुस-या एका बाबीमध्येंही शिवाजी त्या वेळच्या लोकांच्या फार पुढें होता. आपल्या ताब्यांतील बड्या अधिका-याच्या कर्तबगारीबद्दल अगर लष्करी अम्मलदाराच्या पराक्रमाबद्दल जहागिरीदाखल त्यांस त्यानें कधींही जमीन इनाम करून दिली नाहीं. पेशवे, सेनाध्यक्ष वगैरे उच्च दरजाच्या अम्मलदारापासून कारकून अगर शिपाई वगैरे कमी प्रतीच्या नोकरापर्यंत प्रत्येकानें आपापलें वेतन, मग तें द्रव्याच्या रूपानें अगर अन्य रूपानें देण्याचें असो, सरकारी खजिन्यांतून अगर कोठारांतून घ्यावें अशी शिवाजीची ताकीद होती. नोकरांचे पगार। ठरलेले असून ते नेमलेल्या वेळीं मिळत असत. जमीन इनाम देण्याची पद्धति शिवाजीस पसंत नव्हती. याचे कारण, तीपासून इनामदारास जे अधिकार प्राप्त होत त्यांचा त्याच्याकडून सुस्थितींत व सदहेतूनें कां होईना दुरुपयोग होत असे. जहागीरदारास आपआपल्या जहागिरींत वर्चस्व स्थापण्याची साहजिकपणेंच इच्छा होते व त्या जहागिरीशीं त्याच्या घराण्याचा वंशपरंपरेनें संबंध घडून आल्यामुळें, त्याच्या घराण्याची सत्ता त्याच्या जहागिरींत बळाविली जाऊन पुढें ती जहागीर . त्याच्या घराण्यांतून काढून घ्यावयाची झाल्यास मोठे प्रयास पडत. मुख्य राज्यसत्तेपासून विभक्त होऊन स्वतंत्र सत्ता बळकाविण्याकडे हिंदुस्थानच्या लोकांची नेहमींची प्रवृत्तीच आहे. जहागिरी देणें व जहागीरदाराम स्वतःच्या खर्चातून सैन्य ठेवण्यास परवानगी देणें या पद्धतीनें ह्या प्रवृत्तीची मर्यादा इतकी वाढे कीं, त्यामुळें राज्यकारभार सुयंत्रितपणें चालविणें अगदीं अशक्य होत असे. शिवाजीनें जिल्ह्यांतील जमीनदारांसही स्वसंरक्षणार्थ किल्ले बांधू दिले नाहींत. तर त्यांस तो इतर रयत लोकांप्रमाणें साध्या घरांत रहाण्यास लावी. शिवाजीच्या वेळीं स्वपराक्रमानें प्रसिद्धीस आलेल्या कोणत्याही मोठ्या मनुष्यास आपल्या वंशनाम जमीनजुमला मिळवून ठेवितां आला नाहीं. शाहू राजाच्या मंत्र्यांनी ज्याप्रमाणें १८ व्या शतकाच्या आरंभी प्राचीन घराणीं स्थापन केलीं, तशीं मोरोपंत पिंगळे, अबाजी सोनदेव, राघो बल्लाळ, दत्तो अण्णाजी, निराजी रावजी हे ब्राह्मण सरदार, मालुसरे व कंक या घराण्यांतील मावळे बहादर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते इत्यादि मराठे सरदार यांपैकी एकासही स्थापितां आलीं नाहींत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
नोकर लोकांस रोख पगार देणें आणि खुद्द सरकारी नोकरांनी जमीन महसूल वसूल करणें या दोन गोष्टी शिवाजीने आपल्या राज्यांत अमलांत आणिल्या होत्या. या दोन बाबीसंबंधानें जुन्या राज्यपद्धतींत शिवाजीनें जो फेरफार केला त्याचा विशेष निर्देश बखरकारांनीं केला आहे. कारण ह्या दोन गोष्टी अमलांत आणण्याचा शिवाजीचा अगदीं निश्चय झाला होता असें दिसतें. शिवाजीच्या पूर्वी राज्यकारभारांत जो घोटाळा उडून जात असे तो पुष्कळ अंशीं गांवच्या व जिल्ह्याच्या जमीनदाराकडे वसुलाचें काम सोंपविल्यामुळें होत असे अशी शिवाजीची बालंबाल खात्री झाली होती. हे जमीनदार लोक रयतापासून वाजवीपेक्षा अधिक पैसा वसूल करीत ; पण सरकारी खनिन्यांत भरणा करितांना कमी रकम भरीत. शिवाय संधि साधून लोकांत तंटे बखेडे उत्पन्न करण्यास व कधीं कधीं वरिष्ठ सरकारच्या हुकुमाची अवज्ञा करण्यास चुकत नसत. शिवाजीच्या पूर्वी जमीनदाराकडे जीं कामें असत ती करण्यास त्यानें पगारी नोकर-कमाविसदार, महालकरी आणि सुभेदार-नेमिले होते. शेतामध्यें पीक उभें असतां धान्याचा व रोख पैशाचा वसूल करणें हें कमाविसदाराचें काम असे. शेतांतील जमिनीची योग्य प्रकारें मोजणी करून खातेदाराच्या नांवासह सरकारी दप्तरांत नोंदिली जात असे व दरसाल खातेदाराकडून सरकारी देण्याबद्दल कबुलायत घेतली जात असे. वसूल धान्याच्या रूपानें घ्यावयाचा झाल्यास सरकारी सारा उप्तन्नाच्या दोनपंचमांशाहून अधिक केव्हांही वसूल केला जात नसे. बाकीचें उत्पन्न खातेदारास मिळे. कडसरीच्या दिवसांत अगर कांहीं आकस्मिक कारण घडून आल्यास तगाईदाखल शेतक-यांस मोठमोठ्या रकमा मिळत. आणि त्यांची फेड चार पांच वर्षांच्या मुदतींत हप्त्याहप्त्यानीं करून घेतली जात असे. प्रत्येक सुभेदाराकडे मुलकी व फौजदारी हे दोन्ही अधिकार असत. दिवाणी कज्जाच्या कामास त्यावेळी विशेषसें महत्व नव्हतें, आणि तशा प्रकारचे तंटे उप्तन्न झाल्यास सुभेदार गांवांतील पंचांच्या मार्फत व विशेष भानगडीचा कब्जा असल्यास इतर ठिकाणच्या पंचांच्या मार्फत त्याचा निकाल करून तो अमलांत आणीत असे.
जिह्यांतील दिवाणी बाबींची व्यवस्था राजधानीच्या मुख्य शहरीं असणान्या बड्या अधिका-यांच्या ताब्यांत असे. ह्या अधिका-यांपैकीं दोघां- पंत अमात्य व पंत सचीव --कडे अनुक्रमें हल्लींच्या राज्यव्यवस्थेंत जीं कामें जमाखर्ची प्रधान व दप्तरदार व हिशेबतपासनीस यांजकडे आहेत तीं असत असें ह्मणण्यास हरकत नाहीं. जिल्ह्यांतील सर्व हिशेब या दोघांकडे पाठविले जात व तेथें एकंदर राज्याच्या हिशेबाची तोंडगिळवणी करणें, हिशेबाची तपासणी करून चुका दुरुस्त करणें व चुकी करणा-यास दंड करणे हीं कामें होत. जिल्हाकामगारांच्या कामाची तपासणी करण्याकरितां आपल्या तैनातींतील माणसें पाठविण्याचा या बड्या अम्मलदारांस अधिकार असे. पंत अमात्य व पंत सचीव हे राज्यामध्यें पेशव्यांच्या खालोखालचे उच्च दरजाचे अधिकारी होत, व त्यांच्याकडे मुलकी कामाखेरीज लष्करी अधिकारही सोंपविलेले असंत. आठ खात्यांवरील मुख्य अधिकारी ज्यांस अष्टप्रधान ह्मणत, त्यांच्यामध्ये हे वरील दोन अधिकारी मोठ्या महत्वाचे मानले जात. खुद्द राजाच्या खालच्या दरजाचा अधिकारी ह्मणजे मुख्य प्रधान यास पेशवा असें ह्मणत व त्याजकडे लप्करी अमलासुद्धां इतर सर्व राज्यव्यवस्थेचा कारभार असे. व सिंहासनाच्या खालीं उजवे बाजूस पहिल्या जाग्यावर बसण्याचा त्याचा मान असे. सेनापति यांनकडे फक्त लष्करची सर्व व्यवस्था असून त्याची जागा तक्ताच्या डाव्या बाजूची पहिली होती. अमात्य व सचीव हे पेशव्यांच्या उजव्या बाजूस अनुक्रमें बसत व त्यांच्या खाली मंत्री ह्मणजे राजाचा खासगी कारभारी बसत असे. परराष्ट्रीय प्रधान ज्यास सुमंत ही संज्ञा होती, तो सेनापतीच्या डाव्या बाजूस बसत असून त्यानंतर धर्माध्यक्ष पंडितराव व मुख्य न्यायाधीश हे अनुक्रमें बसत. येथवर दिलेल्या हकीगतीवरून असें दिसून येईल कीं, हिंदुस्थानचा राज्यकारभार चालविण्याची हल्लींची ब्रिटिश सरकारची पद्धति शिवाजीच्या अष्टप्रधानांच्या पद्धतीचीच छाया होय. त्यावेळचे पेशवे ह्मणने हल्लीचे गव्हरनर जनरल ज्यांस व्हाईसराय (प्रतिनिधि) असेंही ह्मणतात ते होत. सेनाध्यक्ष-जमाखर्ची प्रधान व परराष्ट्रीय प्रधान या हुद्यांचे अधिकारी हल्लींही आहेत. फरक इतकाच कीं, हल्लींच्या विधायक मंत्रिमंडलांत धर्माध्यक्ष, न्यायाधीश व खासगी कामगार यांचा समावेश होत नाहीं, तथापि त्यांच्या ऐवजीं त्यांत होम खात्याचे सभासद, कायदे कानू करणारा सभासद व पब्लिक वर्कसचा मुख्य अधिकारी हे असतात. हा फेरफार परिस्थितीच्या बदलामुळें झालेला आहे. तरी राजास राजकीय कामाचा भार योग्य प्रकारें संभाळण्याचे कामीं मदत करण्याकरितां राज्यांतील निरनिराळ्या खात्यांचे वरिष्ठ अधिका-यांचे एक मंडल असावें ह्या तत्वाच्या पायावर ह्या दोन्हीं पद्धतींची रचना झालेली आहे. शिवाजीनें स्थापिलेल्या व अमलांत आणिलेल्या ह्या पद्धतीवरहुकूम जर त्याच्या वंशजांनी राज्यकारभार चालविला असता, तर सुव्यवस्थित व बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेशीं गांठ पडण्यापूर्वीच मराठी राज्यावर जीं अनेक संकटें आली व ज्यांच्यामुळें अखेर तें राज्य नष्टप्राय झालें, त्यांपैकीं बरीच संकटें सहज टाळतां आलीं असतीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
येथपर्यंत डोंगरी किल्ले व त्यांच्या आसपासचा प्रांत याची व्यवस्था झाली. आतां राज्यांतील सपाट प्रदेशाची व्यवस्था कशी होती ती पाहूं. हल्ली ब्रिटिश राज्यव्यवस्थेंत जी तालुक्याची पद्धति आहे त्याच प्रमाणें त्यावेळीं सपाट प्रदेशाचे महाल व प्रांत केलेले होते. अशा एका महालाची सर सालची जमाबंदी सरसरीनें पाऊण लाखापासून सवालाखापर्यंत असे. दोन अगर तीन महाल मिळून एक सुभा होई व त्यावरील अम्मलदारास सुभेदार ह्मणत. त्याचा पगार दरसाल चारशें होन ह्मणने सरासरीने दरमहा शंभर रुपये असे. मोंगलाई राज्यपद्धतींत जमाबंदीचें काम गांवचे पाटील कुलकरणी अगर जिल्ह्याचे देशमुख देशपांडे यांच्या ताब्यांत पूर्णपणें दिले असे. ही पद्धति शिवाजीनें चालू ठेविली नाहीं. गांवच्या व जिल्ह्याच्या ह्या वतनदारांचीं वतनें पूर्वीप्रमाणेंच त्यांजकडे चालू ठेवण्यांत आलीं होतीं. पण जमाबंदीच्या व्यवस्थेचें सर्व काम त्यांचेकडून काढून घेऊन सुभेदारानें आपल्या सुभ्याचें व महालक-यानें आपले महालाचें स्वतः करावें असें ठरविण्यांत आलें होतें. शिवाय दोन दोन अगर तीन तीन खेड्यांवर मिळून एक एक कमाविसदार ह्मणून कारकून नेमिला असून तो जमाबंदी करीत असे. महाल अथवा गांव यांचा वसूल मक्त्यानें घेण्याची पद्धत शिवाजीस बिलकुल पसंत नव्हती.
पायदळ व स्वार यांच्या पलटणीतील अम्मलदारांच्या व लोकांच्या अधिकारांची व्यवस्था ज्या पद्धतीनें शिवाजीनें अमलांत आणिली होती, त्याच पद्धतीच्या धोरणावर किल्ल्यावरील लष्करी अमलदारांचे व लोकांचे लहान मोठे दर्जे ठरविण्यांत आले होते. प्रत्येक दहा शिपायांच्या टोळीवर एक नाईक व अशा पांच टोळ्यांवर एक हवलदार, अशा दोन हवलदारांवर एक जमादार, व अशा दहा जमादारांच्या हाताखालीं मिळून एक हजार सैन्य असून त्यावर हजारी या नांवचा एक अम्मलदार असे. असे. सात हजारे मिळून एका सरनोबताच्या हाताखालील एक मावळी पायदळ पलटण होत असे. स्वारामध्यें बारगीर व शिलेदार असे दोन वर्ग असत व पंचवीस बारगीर अगर शिलेदार एका हवलदाराच्या ताब्यांत असत. पांच हवलदारावर एक जुमाला, दहा जुमाच्यावर एक हजारी, व पांच हजा-यावर एक पंचहजारी असून या सर्वावर स्वारांच्या सरनोबताना अम्मल असे. पंचवीस स्वारांच्या टोळीच्या दिमतीस एक भिस्ती व एक नालबंद दिलेला असे. पायदळ व स्वार यांच्या पलटणीवरील प्रत्येक मराठा अम्मलदाराच्या हाताखालीं एक ब्राह्मण जातीचा सबनीस अगर, मुजुमदार व प्रभु नातीचा कारखानीस अगर जमिनीस असे. बारगीरांच्या घोड्यांस पावसाळ्यांत छावणीमध्यें ठाणबंद ठेवीत व त्या ठिकाणीं त्यांच्या चंदी वैरणीची वगैरे चोख व्यवस्था असून, लोकांस राहण्याकरितां निवा-याच्या खोल्या बांधून दिलेल्या असत. लष्करांतील अम्मलदार शिपाई यांस ठराविक वेतन मिळे. पागाहजारीचा पगार १००० होन व पागापंचहजारीचा पगार २००० होन असे. पायदळांतील हजारीचा पगार ५०० होन असे. पायदळांतील शिपायाचा पगार नऊपासून तीन रुपयांपर्यंत व स्वारांतील बारगीरांचा पगार वीसपासून सहा रुपयापर्यंत जाच्या त्याच्या इभ्रतीप्रमाणें असे. सैन्यांतील लोकांस सालापैकीं आठ महिने मुलुखगिरीवर ह्मणजे मोंगलांच्या ताब्यांतील प्रांतांतून चौथाई व सरदेशमुखी या बाबींचा वसूल करून आपापला निर्वाह करावा लागे. मुलुखगिरीवर जातांना बरोबर बायका मुलें वागविण्याची सक्त मनाई असे. एखादें शहर लुटलें ह्मणजे प्रत्येक स्वारास अगर शिपायास मिळविलेल्या लुटीचा हिशेब द्यावा लागत असे. नवीन स्वारास अगर शिपायास सैन्यांत सामील होण्यापूर्वी चांगल्या वर्तणुकीबद्दल आपल्या दोस्त शिपायाची अगर स्वाराची हमी द्यावी लागत असे. लष्करी अम्मलदारास चौथ व सरदेशमुखी या बाबींच्या वसुलाचा हिशेब द्यावा लागत असल्यामुळें त्यास मात्र आगाऊ पगार मिळत असे. त्यावेळीं नोकरीबद्दल जमिनीचे उत्पन्न अगर जमीन तोडून देण्यांत येत नसे. शिवाजीचे लष्करी नियम इतके कडक असतांही त्याच्या सैन्यांत लोकांची भरती होण्यास कधींही अडचण पडली नाहीं व विजयादशमीच्या मुहूर्तावर सैन्याची जमवाजमव सुरू झाली ह्मणजे घाटमाथ्यावरील मावळे, कोंकणांतील हेटकरी, महाराष्ट्रांतील बारगीर व शिलेदार यास शिवाजीच्या बाहुट्याकडे धांव मारून त्याच्या हाताखालीं शत्रूशीं लढण्यापेक्षां दुसरी कोणतीही नोकरी करणें आवडत नसे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
शिवाजीच्या ताब्यांत सुमारे २८० किल्ले होते असा बखरीमधून उल्लेख सांपडतो. एका अर्थी असें ह्मणण्यास हरकत नाहीं कीं, डोंगरी। किल्ला व त्याच्या पायथ्याचा सभोंवारचा आसपासचा प्रदेश हा राज्याचा एक तुकडा मानणें हे शिवाजाच्या राज्यपद्धतीचें तत्व होतें. नवे किल्ले बांधण्याकडे व जुन्यांची दागदुगी करण्याकडे पैसा खर्च करण्यास तो बिलकुल मागें पुढें पहात नसे. त्याच्या किल्ल्यावर विपुल लष्कर व सामुग्री ठेविलेली असे. ज्या मर्दुमकीच्या कृत्यामुळें, शत्रूंच्या हल्ल्यास दाद न देणारे व आंत सुरक्षितपणें राहून बाहेरील शत्रूवर यथास्थित मारा करण्यास योग्य ह्मणून ह्या किल्यांची प्रसिद्धी झाली आहे, तींच कृत्यें ह्मणने मराठ्यांनी अगदीं प्रथम प्रथम ज्या लढाया मारिल्या त्यांतील मनोहर भाग होय. ह्या किल्लेरूपी दुव्यांनी महाराष्ट्र प्रांत अगदीं एकत्र सांधून सोडला होता व अगदीं आणीबाणीच्या प्रसंगीं त्यांनींच त्याचें रक्षण केलें. सातारा प्रांतांत खुद्द सातारा किल्यानें, अवरंगजेबाच्या अफाट सैन्यानें वेढा दिला असतांही कित्येक महिन्यापावेतों टिकाव धरिला होता; व अखेरीस त्या किल्ल्याचा पाडाव होऊन जरी तो शत्रूच्या ताब्यांत गेला तरी राजारामाच्या वेळीं हल्लींच्या औंधकरांच्या पूर्वजांनी तो किल्ला अगदीं प्रथम शत्रूकडून परत मिळविला. तोरणा व रायगड हे किल्ले शिवाजीच्या बाल्यावस्थेंतील पराक्रमाचीं फलें होत. शिवनेरी किल्ला तर त्याचें जन्मस्थानच. बाजी प्रभूच्या मर्दुमकीनें पुरंदर किल्ला प्रसिद्धीस आला व रोहिडा ? आणि सिंहगड हे किल्ले अद्वितीय योद्धा तानाजी मालुसरा याच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. शिद्दी जोहाराच्या प्रचंड सेनेनें घातलेल्या वेढ्याशीं टक्कर दिल्याबद्दल पन्हाळा किल्याची ख्याति आहे. आणि रणशूर बाजी प्रभू यानें स्वतः च्या प्राणाची आहुति देऊन रांगणा किल्ल्याच्या नजीकच्या खिंडींतील रस्ता मोठ्या हिमतीनें रोखून धरिल्यामुळें तो किल्ला इतिहासप्रसिद्ध होऊन बसला आहे. मालवणचा किल्ला व कुलाबा हीं ठाणीं समुद्रावर लढाई करण्यास सज्ज अशा मराठी आरमाराचीं ठिकाणें होत. प्रसिद्ध अफझलखान याच्या वधाबद्दल प्रतापगड विख्यात असून माहुली आणि सालेरी येथें मावळे गड्यांनीं मोगल सेनापतीशीं झुंजून त्यांस हतवीर्य केल्याबद्दल ती स्थळें प्रसिद्धीस आलीं आहेत. शिवाजीच्या ताब्यांतील या किल्ल्यांच्या अगदीं पूर्वबाजूची सरहद्द कल्याण, भिवंडी, वांई, क-हाड, सुपें, खटाव, बारामती, चांकण, शिरवल, मिरज, तासगांव, व कोल्हापूर या किल्ल्यांनीं मर्यादित आहे.
या किल्ल्यांनीं शिवाजीची ऐन वेळीं जी महत्वाची कामगिरी बजाविली आहे तीवरून त्यांची व्यवस्था ठेवण्यांत व त्यांच्या संरक्षणांत शिवाजीनें जे श्रम घेतले होते त्यांचें चांगलें चीज झाल्याचें दिसून येतें. प्रत्येक किल्यावर एक हवलदार असून त्याच्या हाताखालीं त्याच्याच जातीचे कांहीं मदतगार असत व त्यांच्याकडे किल्ल्याभोवतालच्या निरनिराळ्या तटाचें संरक्षण करण्याचें काम असे. तसेच देशस्थ, कोंकणस्थ अगर क-हाडे या तीन ब्राह्मणवर्गांपैकीं सुभेदार अथवा सबनीस या हुयाचा एक ब्राह्मण अम्मलदार असे, व कारखानी ह्मणून एक प्रभू जातीचा हुद्देदार असे. ह्या दोघांही अम्मलदारांस किल्ल्यावरील हवलदाराचे मदतनीस ह्मणून कामें करावीं लागत. हवलदार व त्याचे हाताखालील मराठे कामगार यांच्याकडे किल्यावरील शिबंदीचा ताबा असे. ब्राह्मण सुभेदार दिवाणी व मुलकी कामें पाहत असे व किल्ल्याच्या आसपासच्या खेड्यांवर त्याचा अम्मल असे, आणि प्रभू कारखाननीस याचे ताब्यांत लष्करचा दाणागोटा, चंदीवैरण व दारूगोळा वगैरे लढाऊ सामान असून किल्ल्याच्या दागदुजीचें काम त्यासच पहावें लागे. अशा प्रकारें ह्या तिन्ही जातींच्या लोकांस एकाच ठिकाणीं पण निरनिराळीं कामें करावयास लागत आणि त्यामुळें त्यांच्यामध्यें परस्परांविषयी विश्वास उत्पन्न होऊन एकमेकांत मत्सर वाढण्यास बिलकुल जागा राहत नसे. डोंगर किना-याच्या बाजूनें मोठ्या दक्षतेनें संरक्षण केलें जात असे व किल्ल्याच्या पायथ्याकडील रानाचें रक्षण प्रजेपैकीं रामोशी व इतर हलक्या जातींच्या लोकांकडे सोंपविलें होतें. दिवसा व रात्रीं पाहण्याचें व रक्षणाचें काम कसें करावें याबद्दल प्रत्येक शिपायास फार काळजीपूर्वक समज दिली जात असे. किल्ल्याचा लहानमोठेपणा व त्याचें महत्व यांच्या मानानें किल्ल्यावरील लष्कराची संख्या कमी जास्त असे. प्रत्येक नऊ शिपायांवर एक नाईक असून त्यांच्या जवळ बंदुका, तरवारी, लहान मोठे भाले व पट्टे हीं हत्यारें दिलेलीं असत. नोकरीबद्दल प्रत्येक शिपायास त्याच्या हुद्याप्रमाणें रोख अगर अन्य रूपानें ठरीव असें वेतन मिळे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
शिवाजीची राज्यव्यवस्था.
प्रकरण ७वें.
शिवाजीच्या शिपाईगिरीच्या मर्दुमकीच्या इतिहासावरून, त्याच्या श्रेष्ठतम बुद्धिमत्तेच्या केवळ एका अंगाचा आह्मांस बोध होतो, व राज्यव्यवस्था सुयंत्रितपणें चालविण्यास लागणारे त्याच्या अंगी जे इतर गुण होते, व ज्यामुळें त्याच्याबद्दल अधिक पूज्यभाव उत्पन्न होतो, ते आमच्या लक्षांतून अजीबात जाण्याचा फार संभव आहे. प्रसिद्ध पहिल्या नेपोलियनप्रमाणें, शिवाजी हा आपल्या वेळच्या राजकीय संस्थांचा उत्पादक व रचयिता होता. आणि विशेषतः ह्याच संस्थांच्यायोगानें, त्यानें हाती घेतलेल्या कार्यांत त्यास यश मिळत गेलें, आणि त्याच्या पश्चात् फारच थोड्या अवकाशांत, महाराष्ट्रावर जी भयंकर संकटें कोसळलीं, त्यांतून सुरक्षितपणें पार पडून व मोंगलसत्तेशीं एकसारखीं वीस वर्षे झुंजून, महाराष्ट्रास पुनः आपलें स्वातंत्र्य स्थापितां आलें. शिवाजीनें स्थापिलेल्या ह्या राजकीय संस्था त्याच्यापूर्वी प्रचलित असलेल्या हिंदी अगर मुसलमानी राज्यपद्धतीहून अगदीं भिन्न असल्यामुळें त्यावरून त्याच्या अंगची विलक्षण कल्पकता व अमूप ग्राहकशक्ति हीं चांगला व्यक्त होतात, आणि ह्मणूनच त्या संस्थांचें आह्मांस लक्षपूर्वक निरीक्षण केलें पाहिजे. शिवाय, आपण आरंभिलेल्या व संपादिलेल्या कार्यात कधींही फाटाफूट व बेबंदशाई यांचा शिरकाव होऊं द्यावयाचा नाहीं असा शिवाजीचा बाणा होता, पण त्याच्याच वंशजांनी त्याच्या पश्चात् महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याप्रीत्यर्थ झगडुन पुनः स्वराज्य स्थापन केल्यानंतर, शिवाजीनें घालून दिलेलें राज्यपद्धतीचें वळण गिरविण्याचें सोडून देऊन जुन्या राज्यपद्धतीचा स्वीकार केला, व त्यामुळें, आपसांत फाटाफूट व बेबंदशाही यांचें त्यांनी बीजारोपण केलें. ही गोष्ट विशेष लक्षांत घेण्यासाखी आहे. सर्व हिंदुस्थानावर व खुद्द स्वतःच्या अमलाखालीं एकछत्री राज्य स्थापण्याची शिवाजीनें कधींही हांव धरिली नाहीं, हें पूर्वीच सांगण्यांत आलें आहे. आपल्या लोकांस राजकीय स्वातंत्र्य मिळवून द्यावें, स्वसंरक्षण व स्वत्वस्थापन करण्यास त्यांस समर्थ करावें, आणि राष्ट्र या नात्यानें त्यांच्यामध्यें ऐक्यभाव उत्पन्न करावा, एवढ्याचकरितां त्यांची सारी खटपट होती. इतर राष्ट्रांचा उच्छेद करावा, ह्या कल्पनेचा त्यास गंधही नव्हता. गोवळकोंडा, बिदनूर, फार तर काय, पण विजापूर येथील बादशहांशीही त्याचें सख्य होतें, व त्यांच्या ताब्यांतील अनुक्रमें, तेलंगण, म्हैसूर व कर्नाटक ह्या प्रांतांत त्यानें कधींही ढवळाढवळ केली नाहीं. द्राविड देशांतील वडिलोपार्जित जहागिरीचा उपभोग त्यानें आपला सावत्र भाऊ जो व्यंकोजी यास एकट्यासच घेऊं दिला. मोंगलांच्या ताब्यांतील प्रांतांमधून चौथाई व सरदेशमुखी ह्या दोन बाबी वसूल करून तो स्वस्थ बसे. स्वराज्य ( खुद्द स्वतःच्या अमलाखालींल मुलूख ) व मोंगलाई ( स्वराज्याच्या बाहेरील परकीयांच्या अमलाखालील मुलूख ) हीं दोन परस्परापासून अगदीं भिन्न आहेत असें तो समजे. त्यानें ज्या राजकीय संस्था स्थापिल्या होत्या, त्या केवळ महाराष्ट्र देशाच्या राज्यकारभारापुरत्याच होत्या, तथापि महाराष्ट्र देशाच्या अगदीं दक्षिणेकडच्या प्रदेशांत, त्याच्या ताब्यांतील जे लढाऊ किल्ले होते, त्यांची व्यवस्था करण्याकडे, त्यांचा त्यानें अंशतः उपयोग केला होता. आपल्या अमलाखालील प्रदेशाचे त्यानें प्रांत (जिल्हा) म्हणून अनेक भाग केले होते. पुण्याजवळील वडिलोपार्जित जहागिरी शिवाय त्याच्या ताब्यांत पुढील प्रांत होते. १ मावळाप्रांत---हलींचे मावळा, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके --व त्याच्या सभोंवतींचे १८ डोंगरी किल्ले; २ वांई, सातारा आणि क-हाड हे प्रांत-हल्लींचा सातारा जिल्ह्याचा पश्चिमेचा भाग-व त्यांच्या भोंवतींचे १५ डोंगरी किले; ३ पन्हाळा प्रांत -हल्लींचा कोल्हापूर इलाख्याचा पश्चिमेचा भाग व १३ डोंगरी किल्ले; ४ दक्षिण कोंकणप्रांत-हल्लींचा रत्नागिरी जिल्हा व ५८ डोंगरी किल्ले आणि जलदुर्ग; ५ ठाणेंप्रांत-हल्लींचा उत्तर कोंकणभाग व १२ किल्ले; ६, ७ त्रिंबक आणि बागलाण प्रांत-हल्लींचा नाशिक जिल्ह्याचा पश्चिमभाग व ६२ डोंगरी किल्ले. या प्रांताखेरीज त्याच्या शिबंदी लष्कराची ठाणीं पुढील प्रांतांत होतीं. ८ वनगड प्रांत-हल्लींचा धारवाड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग व २२ किल्ले; ९,१०,११ बिदनूर, कोल्हार व श्रीरंगपट्टण-हल्लींचा म्हैसूरप्रांत व १८ किल्ले; १२ कर्नाटक प्रांत -हल्लींच्या मद्रास इलाख्यांत सामील केलेला कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील प्रांत व १८ किल्ले; १३ वेलोरप्रांत-हल्लींचा अर्काट जिल्हा । व २५ किल्ले; आणि १४ तंजावर प्रांत व ६ किल्ले. सह्याद्रीच्या सर्व रांगेवर लहान मोठे किल्ले मधून मधून चमकत असत व पश्चिमेस समुद्रकिना-यापर्यंत व ह्या किल्लयांच्या पूर्व प्रदेशापर्यंत मधील प्रदेशाची रुंदी ५० मैलांपासून फार तर १०० मैलांपर्यंत होती.