Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
सालमजकुरीं हरी मोरेश्वर राजआज्ञा वारले होते. त्याचें पद त्याचा भाऊ भवानीशंकर यांस मागेंच दिल्हें असे. १
आषाढ शुद्ध ८ मंदवारीं सालगुदस्ताचे खंडणीची वस्त्रें पाटस तर्फेच्या पाटिलास दिल्हीं. नवीं वस्त्रे जालीं.
१ रेखाजी प॥ शितोळे कुरकुंबकर यास रायांनीं पटिसीं वस्त्र घ्यावेसें केलें. त्याच्या वडिला पुतण्याचे जांवयाचा करभार व . शिरपाव ऐसें केलें, ह्मणून रखोजीच्या मुलास रायांनी मागें
वस्त्र दिल्हें.
२ दउंडचे जठार चौगुले याची मनसुबी रायांनी पाटसीं केली. मायाजी व जठार ऐसे दोन चौगुले केले. त्यांस वस्त्रें दिलीं.
३ आषाढ शुद्ध १० सोमवारीं बाजी शेट्या पुणेंकर याची बायको अक्काई वारली असे.
शुद्ध एकादशी मंगळवारीं विनाजी धर्माजी खाडे, जोशी कुलकर्णी साकुर्डे व जेजुरी वगैरे, हे आपाजी बाबाजी खाडे यासीं भांडतात की, तूं आमचा भाऊ नव्हेस, आडनांवचा खाड्या, गुमास्तगिरीस लिहिणार, तुझे वडील ठेविले ह्मणून तूं भाऊ जाला नाहीस. ऐसें भांडण जालें. अप्पाजीपंत बापूजीपंतनानापाशीं फिर्याद जाले, माघमाशीं अखेरी. त्याजवरून बापूजीपंतीं दाहा रु॥ मसाला करून विनाजी व धोंडोबा आणिले. त्यांणीं राजश्री रायाचें पत्र नानास आणिलें कीं, तुह्मी याची मनसुबी न करणें, खासा स्वारी पुणियास जालियावरी मनसुबी केली जाईल. असें पत्र आणिलें. परंतु बापूजीपंतीं तकरीरा जमानाचे तगादे लाविले. धोंडोबा भावबंदास पुसावयास जेजूरीस गेला. मागें आपाजी व विनाजी आपल्यांत आपण समजले. दोन वाटे विनाजी खात आहे, एक वाटा आपाजी खात आहे, त्याप्रों। खावें, भाडूं नव्हे, ह्मणूं नये, ऐसें बापूजीपंताचेथें एकांतीं समजलें. त्यांणींहि एकांतींच उभयतांचे दिवाणांत कुतबे घेतले. व एका बारीस समजाविशींचे कागद घेतले. दिवाणांत नजरचे कतबे घेतले; विनाजी रु॥ च्यारशें व आपाजी दोनशें, ऐसे साहाशे. याखेरीज अप्पानीं आणीख तीनशें ऐसे घेतले. शेवटीं विनाजी फिरला, ह्मणों लागला कीं, मजला अप्पाजीनें रहाविलें व दिवाणानें दबाविलें आणि कागद लेहून घेतले. ऐसें ह्मणों लागला. मग विनाजीस अटकेस बसविलें. शेवटी त्याची वडीलभाऊ महिपती आला. त्याजपासून च्यारशें रु॥ घेऊन विनाजीनें तीन कागद लेहून दिल्हे होते ते त्याचे माघारे दिल्हे. विनाजी अटकेंत होता तो अजी मोकळा केला. याउपारि मागती हरदोजणीं भांडावें, तकरीरा जमान न घ्यावे. गांऊ अमानत केलेच आहेत. याप्रा। आहेत. एसें आजि जालें असे. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
यादी स्मरण. सुहूरसन इहिदे अर्बैन मया अलफ, सन हजार ११५०, छ ८ रा।वल, जेष्ठ शुद्ध नवमीसहदशमी, मंदवार. रोज गुदस्तीं रात्रीं अवशींच म्रुग निघाला. शके १६६२ रौद्र नाम संवछरे. अवल साल, करीने.
जेष्ठ शुद्ध ११ एकादशी सोमवासरीं संध्याकाळी आवशीचे रात्री श्रीमंत राजश्री अप्पा व राजश्री नाना पुणियास आले. दुसरे रोजीं रायांचे मासश्राद्ध. अप्पा, नाना, कुलाबियास आंगरियावर गेले होते
ते आले असेत. १
जेष्ठ शुद्ध १३ बुधवारीं श्रीमंत राजश्री नानास राजश्री रायाच्या दुखवटियाचें वस्त्र देशमुख देशपांडियांनी मिळोन खसखशी शेला दिल्हा असे.
जेष्ठ वद्य ५ मंगळवारी मातुश्री काशीबाई रायांचे लष्करसहवर्तमान दोघटका रात्रीं घरास आली. दुसरे रोजी बुधवारी अप्पा-नानानीं सातारियास जाण्यास प्रस्थान केलें. वासुदेव जोशी याचेथें जाऊन राहिले. राजश्रीकडून रावबा मंत्री व जिवबा चिटणीस यांचा धाकटा भाऊ, यांस हुजूर राजदर्शनास न्यावयास आले. त्याजबराबर जाणार आहेत. गुरुवारी स्वार होऊन गराडियावारून गेले असेत. १
आषाढ शुद्ध १ प्रतिपदेस खबर आलीं कीं, रघोजी भोंसले व फत्तेसिंगबावा यांणी अरकाटची सुभा बुडविला. शहरापासून खंडणी घेणार. शंभर हत्ती व तीन हजार घोडे पाडाव जालीं. सुभा जिवें मारला. माणूसही फार मारलें. कडपियापासून अडीच लक्ष रु॥ खंडणी घेतली होती अगोधर. मग अरकाटावर गेले. १
आषाढ शुद्ध ३ संभाजी बिन कान्होजी घुला वडील मोकदम व मोरोजी बिन कान्होजी घुला, यांची समजाविष जाली. पाटिलकी दोठांई जाली. मानपान, पुळा, हक, उत्पन्न, दोठाई निमेनिम. वडिलपण अघाड, संभाजीकडे. धाकुटपण माघाड, संताजी बिन महादोजीकडे. शिरपाव दोन, पोळ्या दोन, अवघें दोन दोन केलें असे. संभाजीस शंभर रु॥ व संताजीस साशें रु॥ हरकी पडली. राजश्री बापूजीपंत याखेरीज चार वसरी यांचे आहेत. दोघांस दोन वस्त्रें शुद्ध ५ मंगळवारीं बांधून गांवास जावयास निरोप दिल्हा असे. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शुद्ध २ बुधबारी परशुराम शितोळे पडवीकर यास पेशवियांनी पालखी दिल्ही असे.
मार्गेस्वर शुद्ध ५ मंदवारीं रात्री मस्तानी, राजश्री रायांची कलवंतीण, आपले हवेलींतून निघोन पाटसास रायाकडे गेली. तिचा व रायाचा अति सहवास जाला, याजमुळें रोऊ विलासी फार जाले.
याजकरितां मातुश्रीनीं व अप्पानी रायास सांगितले कीं, इचा वियोग चार दिवस करावा. ऐसें ह्मणेन तिजला हवेलींत ठेविलें. बाहेर जाईल रायाकडे, ह्मणून चौक्या ठेविल्या. राऊ रागेंच कुरकुंबास श्रीच्या दर्शनास गेले. पाटसीं येऊन राहिले. इजला त्याखेरीज खमेना. त्याजलाही खमेना. याजकरितां युक्तीनें हवेलींतून निघून गेली असे.
मार्गेस्वर शुद्ध ९ बुधवारीं गोही देशमुखाची खरीदखतांवर घातली असे. शिंदखेडचे ब्राह्मण गृहस्थ लोचट. त्याणीं कोंकणस्थ कर्हाडे ब्राह्मण पुणियांत रहात होते त्यांजपासून शंभर रुपये घेतले. ते द्यावयास मिळेनात, ह्मणून शिंदखेडची घरें खालीं लेहून दिल्हीं. त्याजवर घातली असे साक्ष. दोघांसही रुबरु पुसिलें असे. १
मार्गेस्वर वद्य ९ गुरुवारीं कृष्णाजी बांडे यांस प्राश्चित दिल्हें. संगमी नेऊन क्षौर केलें. दुसरे दिवशीं दशमीस शुक्रवारीं गोतपत जाली. हवेलीचें गोत अवघें मिळालें होतें व परगण्याचे देशमुखहि मिळाले होते. त्यांची यादी अलाहिदा असे. कृष्णाजी बांडियास राजश्रीनीं राजपत्र दिल्हें होते की, या गोतांत घेणे. तें राजपत्र देशमुखदेशपांडे, कसबे पुणें, यांस होतें. ते कृष्णाजी + + + + च आहे. पेशवियांचींहि पत्रें घेतलीं आहेत. नकला आहेत. राजपत्रांत देशपांडियाचें नांव रामभट चांदाखाले लिहिलें आहे. परंतु मर्हाटियाच्या गोताईचा कागद देशमुखाच्याच नांवचा पाहिजे. याजकरितां पेशवियांनी उभयतां देशमुखाच्या नांवें पत्र दिल्हें. मग गोताई जाली. मकोजी पाटील झांबरे याचेथें केलीं असे.
सु॥ अर्बैन मया अलफ, रुद्रनाम संवत्सरे, शके १६६२, सन १ १ ४९.
करीने स्मरणार्थ.
चैत्र शुद्ध १ सोमवारी नवसंवत्सर.
चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी मुंजी नी लग्ने लागलीं.
१ निळो विठ्ठल देशपांडे याचा पुत्राचा व्रतबंध जाला.
१ देवजी त्रिंबक याचा पुत्र, दुसरा द्वितीय समंधाचा, नाम राघोबा, याचा व्रतबंध जाला.
-----
२
चैत्र शुद्ध १० बुधवारीं राजश्री बाजीराऊ पंतप्रधान यांचा तिसरा पुत्र जनार्दन याचा व्रतबंध जाला. राजश्री बाळाजी बाजीराऊ याणींच लग्न केलें. ती घटकांचे लग्न लागलें असे. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५८
श्री १६१२ ज्येष्ठ वद्य ३०
राजश्री येसाजी मल्हार देशाधिकारी व देशलेखक
प्रांत वाई गोसावी यासि
॥ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र नीलकंठ नमस्कार सु॥ इहिदे तिसैन अलफ श्री सदानंद गोसावी याचा मठ का। निंब प्रात मजकूर ए जागा आहे ते स्थली आनंदगिरी गोसावी राहत आहेत याचे शिष्य भोवनगिरी हुजूर आले याणी विदित केले की अदलशाहाचे कारकीर्दीस इनाम मठास चावर २ दोनी चालत होता त्याउपरी हिगलागिरी व जोगिंद्रगिरी हे दोघे गुरुबधु मठी होते त्यामध्ये कथळा लागोन यदलशाहाचे कारकीर्दीस दिवाणात भाडत गेले तेव्हा त्याणीं एक चावर इनाम हिंगलागिरी भांडतो यानिमित्य दूर केला आणि एक चावर इनाम का। मजकुरी करार केला होता तेणेप्रमाणे राजश्री कैलासवासी छत्रपतीचे वेळेस चालिला अलीकडे हा कालवरी चालतो ऐसीयासि गोसावी याचा मठ थोर आहे ते स्थली तडीतापडी वरकड अतीत अभ्यागत येताती त्यास अन्न द्यावे लागते त्यास एक चावर इनाम आहे त्याणे पुरवल्यास येत नाही तरी पहिले दोनी चावर इनाम चालत होते तैसेच चालविले पाहिजे सदानद गोसावी बहुत थोर होते त्याचे इनाम चालविलीयाने या राज्याची अभिवृध्दी होईल ह्मणोन कितेक तपसील विदित केले त्यावरून हे पत्र तुह्मास सादर केले असे तरी अदलशाहाचे कारकीर्दीस दोनी चावर इनाम चालत होता की नाही हे दस्तामली रुजू पाहणे देशमुख देश-कुलकर्णी वतनदार आहेत त्याजवेळी मनास आणणे जरी पहिले दोनी चावर इनाम चालत असतील ऐसे असिले हे खरे असेल आणि हिगलागिरी याचे कथलीयाकरिता येदीलशाहाचे कारकीर्दीस एक चावर दूर जाला त्यास हिगलागिरीचे निसबतीचा कोण्ही कथला करणार नसेल ऐसे पुर्ते मनास आणून जरी त्याचे कोण्ही नसली तरी पहिले दोनी चावर चालत होते हे खरे असिले तरी दोनी चावर हालीही इनाम चालवणे ये गोष्टीची बरी चौकसी करून दस्तामली वतनदाराजवेळी दोनी चावर चालवणे ताजा सनदेचा उजूर न करणे छ २८ रमजान पा। हुजूर
बार सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
कार्तिक वद्य २ मंगळवारी राजश्री राऊ दिव्याकडून जेजुरीस, कुरकुंबेस गेले. कृष्णाजीपंत कामथे चांबळीकर येथें येऊन महिना दीडमहिना बैसले होते. पेशवियांस कांहीं एकांती पैका देऊं केला असेंही ऐकतों, आणि कागदही घेणार असें वर्तमान आहे. परंतु आजी निरोप घेऊन आपल्या गांवास गेले असेत. पाटस कानगांवे येथील शिंवेचा कजिया विल्हेस लावावयास गुणाजी कृष्ण पेशवियांनी पाठविले होते. दाखले, मुकाबले, भोगवटे, वरवंडकर यांची गोही जशी कानगांवकर ह्मणतात ते खरें जालें. परंतु पाटसकर ऐकत नाहींत. येथें येऊन दिव्य करितों आपण, ऐसें कतबें दिल्हे. तूर्त दिव्य घ्यावें तरी अस्त आहे. माघमासीं घ्यावें ऐसें नेमउत्तरें लेहून घेऊन उभयतांस निरोप दिल्हा असे. खंडो आपाजी तट्टू यांणीं पाटसकरांकडून धटाई करवली आहे. परंतु वहितजमीन कानगांवकरांची तीन चार वरसें पाडिली आहे. पाटसकरांचे कानगांवकरांचे कागद,
२ पहिल्या तकरीरा शिंवेची निशाणें लेहून दिल्ही असेत.
२ जमीनत कानगांवकरांस पेरावयास राव सांगत होते ते तूर्त तकूब राखावी, मनसुबीमुळें जमीन त्याची होईल त्याजकडे लागेल, हा डाग ज्याजकडे लागेल त्यानें जाब करावा.
२ दिव्ये पाटसकर पाटलांनीं करावें. ये गोष्टीचे कतबे.
२ दिव्यास माघमासीं हजीर व्हावें. अशीं नेम उत्तरें गोपाळरायापाशीं असेत.
-----
८
यणेप्रमाणें कागद घेतले असेत. १
कार्तिक वद्य ४ गुरुवारीं अवशीचे रात्री चिमाजी अप्पा मुहूर्ते पलीकडे डेरियांत जाऊन राहिले असेत.
कार्तिक वद्य १४ रविवारीं कल्याणराऊ मिरजेहून गांवास आले. जेजुरीकर गुरव यानें मल्हारी मार्तंडाच्या जामदारखान्यांतल्या वस्तभावासाठीं भांडत होते. एकजण गुरव (कोरी जागा) याचपाशीं वस्ता होत्या त्या त्याणेंचखादल्या. त्यासी वरकड भांडत होते. तो ह्मणे, मजकडे वस्ता राहिल्या नाहींत. वरकड ह्मणत आहेत. जेजूरीस विठ्ठलरायापाशीं कजिया पडिला, देशमुख देशपांडे जाऊन इनसाफ केला, याजकडे वस्ता होत्या त्याजकडे आहेतसें जालें, मग हुजूर जाऊन एकजण आपल्याकडे वस्ता नाहींत ह्मणत होता तो खोटा जाला होता, त्याप्रमाणें जाला. त्याजला देवाच्या वस्ताचे दीडहजार रुपये व गुन्हेगारीचे दोहजार रुपये खंडले. वरकडांस हरकीचे हजार रुपये खंडले. यणेंप्रमाणे जालें असे. जेजुरीकर पाटील कुलकर्णी खोटियाची पाठ राखत होते. परंतु परिणाम जाला नाहीं. ऐसें जालें असे.
कार्तिक वद्य ३० अमावास्या सोमवारी दोन घटका दिवस उरला ते समईं कल्याणराऊ निलकंठ याची स्त्री सौ। काशीबाई जुन्या घरांत प्रसूत जाली. पुत्र जाला असे.
मार्गेस्वर शुद्ध १ प्रतिपदेस मंगळवारीची तीन प्रहर रात्र जाली, ते समईं बाजी हरी सुभेदार सुपेकर याची बायको, अंतोबा नाईक भिडे याची कन्या, वारली असे. पुणियांत गोपाळराम देशपांडे याचेथें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
कार्तिक शुद्ध ८ अष्टमी रविवारी रामभट धर्माधिकारी श्रीकाशीस वास करावयास गेले. त्याची विहिण टुल्लीण इचें घर मल्हारभट ढेंकणें याजपाशीं कर्जांत लेहिलें गुंतलें होतें. त्याचे शंभर रुपये रामभटजी ढेंकणियास देऊन घर सोडवून टुल्लिणीसहि महायात्रेस नेलें असे. आपला नातू नरसिंह हा विद्याआभ्यासास बरोबर घेऊन गेले असेत. राघोराम देशपांडेहि माहायात्रेस गेले. १ राणोजी शिंदे कार्तिक शुद्ध दशमी मंगळवारी औंधास गेले. वरकड सरदार आपलाले ठिकाणास गेले. रामचंद्रजी पाटसास गेले. राणबांनीं कार्तिक शुद्ध १२ गुरुवारी पासणाच्या जमिनींत वोहळियापाशीं आउतें पेशवियाचे हिमायतीनें धरलींत आणि दुसरे रोजी शुक्रवारी पाटसास गेले. आउतास अडथळा पासणेकरांनी करावा, तरी पेशवे येथें रागास येणार ! याकरितां, तृर्त काळावर नजर देऊन बैसले असेत. गांऊ तो वोस पडिलें आहे !
कार्तिक शुद्ध १२ गुरुवार संध्याकाळीं राजश्री पंतप्रधान नदीपलीकडे जाऊन भांबोडियाच्या रानांत कोथळियाचे उत्तरेस डेरियांत जाऊन राहिले असेत. मुहूर्ते गेले असेत. वद्य २ मंगळवारी राऊ जेजूरीकडे गेले.
कार्तिक शुद्ध १५ रविवारी संध्याकाळीं राजश्री बाळाजीपंत नाना मिरजेहून राजश्रीपासून पुणियास आले. माहादोबा सासवडास आले.
एका दो रोजा येणार. सटवाजी संभाजी जगदळे गाऊकर याजलाही राजश्रीपासून घेऊन आले. तूर्त कीं, यांची त्यांची समजाविष करूं.
राजश्री मोरो मल्हार मेंडजोगी यांणी दत्तपुत्र खंडोबा घेतला असे. त्याजला पत्र लेहून दिल्हें कीं, तुह्मास आपण दत्तविधान करून घेतलें आहे. त्याजवर आणीख पुत्र आपणास जाले, आपली वृत्ति जे आहे ते ते तुह्मीं यथाविभागें खाणे. त्याजवरी जगोबाची साक्ष लेहून घेतली आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
आश्विन वद्य २ रविवारीं जानोजी बिन सेकोजी सोनवणी, पा। मौजे न्हावी, प्रा। सिरवळ, यानें विठ्ठल निळकंठ देशपांडे शिरवळकर यांस फारखती लेहून दिल्ही कीं :—तुमच्या बापाचा रोखा आमच्या बापानें हरी नारायेणाच्या चाकरीबद्दल घेतला होता. वरकडा सिलेदारांनींहि निळोपंताचे राखे घेतले होते. ते राजश्री बाळाजीपंतनानांनी माघारे देविले. आमच्या बापापाशीं राहिला होता, तो तुमचा तुह्मास असिला तर देऊं, ह्मणून फारखती लेहून दिल्ही असे. गोही एक लिहिली असे. १
आश्विन वद्य ३ सोमवारी वितीपात. ते दिवशीं शिवरामभट्ट चित्राव व कृष्णाजी अनंत शाळेग्राम यांचा गपचुपांच्या उत्तरेस व शिवरामभट्ट शाळेग्राम याच्या दक्षणेस जागा आहे. तिजबद्दल भांडण होतें तें मनास आणावयास वोंकाराच्या देऊळास गेले होते. बि॥ ता।
केसो सखदेऊ जगन्नाथ अनंत शामजीराम
कमावीसदार पुणें. आ। देशमुख. देशपांडे.
१ १ १
गोपाळराम व त्या- त्रिंबक बापोजी.
चा लेक बगाजी. १ बाबदेवभट व
१ बाबूशेट्या व पांडुरंग रामभट धा।.
वेंकाजी पा। व महाजन, मल्हारी १
चांदजी पा। झांबरे. ठकार.
१ १
यांच्या विद्यमानें मजकूर जाला. पहिले बारा वरसें कोटामथें रा। रायांनीं गोही पुसली होती. गो।दार बि॥ ता।.
चिंतो गिरमाजी शंभुलिंग जंगम शिवरामभट शाळे-
गपचुप. १ ग्राम.
१ १
रामभट व बाबदेवभट
धर्माधिकारी. मोरभट कानडे.
१ १
याणीं गोही दिल्ही होती कीं:- चित्रावाची जागा. त्यापैकीं रामभट धा हजीर होते. त्यांस पुसिलें त्यांणीं सांगितले की, चित्रावाची जागा, ऐसी आपण पहिले गोही दिल्ही होती. तेव्हां कृष्णाजी अनंत याचा लेक अंतोबा व खंडभटाचे नातू बाजी बाबदेव ह्मणों लागले कीं, चित्रावाची जागा. कितीक ऐसें रामभटांनी सांगितले. तेव्हां शिवरामभट चित्राव ह्मणों लागले कीं, गोहीदाराच्या गळां कशास पडतोस, तुझी जागा असली तर देवाचा बेल घेणें, अगर आह्मीं घेतों. त्याजवरून अंतोबा आपल्या बापास व खंडभटास पुसावयास गेले. ते फिरोन आले कीं, आमच्यानें सत्य घेवत नाहीं. त्याजवरून नानाबा व बापोजी चित्राव वैद्य यांची जागाशी झाली. शाळेग्राम यांची गोही पुरेना. दुसरे क्रिया आपली जागाशी करवेना. अवधी जागा आटोपून नाहक भांडत बसले होते. शेवटीं पंधरा हात जागा आपली शिवरामभट शाळेग्राम याच्या शेजारीं, ऐसें ह्मणों लागले. ती गोष्ट खरी असली तर तिचीच क्रिया करा ह्मटलें. तेव्हांहि माघे सरले. दुसरें शिवरामभटाशेजारीं याचें घर होतें, ऐसें यांस ठावकें होतें तर, नवें घर हालीं बांधत होते तें गपचुपाच्याशेजारीं कां बांधिलें. याची जागा असती तर आपल्याच जागियावर बांधते. त्यावरून चित्रवांची जागाशी जाली. परंतु अवघ्यांनी मिळोन शिवरामभटास सांगितले की, आह्मीं सांगो ते ऐका आणि निमे जागा शाळेग्रामाशेजारील कृष्णाजी अनंतास द्या. रामभटानीं पदर पसरिला. शिवरामभटांनी अवघियांची गोष्ट ऐकिली. खंडभटावर नजर दिल्ही. निमे जागा द्यावीशी केली. राजीनामे दिल्हे. गांवांत येऊन जागा पाहिली. बत्तीस हात तेहतीस हात भरली. निमेनिम केली असे. गपचुपाशेजारीं चित्राव. त्याला पुढें वाटेस जागा आहे. पूर्वेस शिवरामभट. शाळेग्रामाशेजारीं कृष्णाजी अनंतास जागा दिल्ही. त्याजलाही वाट पूर्वेस आहे. दोघांचे पूर्वेस शंभू जंगमाचें घर व माहादेवाचें देऊळ आहे. शिवरामभट शाळेग्राम याच्या भिंतीशेजारीं वाट कृष्णाजी अनंताची, गपचुपाच्या भिंतीशेजारीं शिवरामभट चित्राव यांची वाट असे. येणेप्रमाणें केलें असे. १
आश्विन वद्य ४ मंगळवारीं खबर आली कीं, रा। नारो शंकर साचिव यांची कन्या सौ। सिऊबाई रा। देवाजी कचेस्वर ब्रह्मे याच्या लेकास दिल्ही होती. ती गरोदर होती. प्रसूतसमईं मूल आडवें आलें, तेणेंकरून देवआज्ञा जाली. त्यास आठ रोज आले. सातारियांत मेली असे.
मिरजेचा मोंगल कौलास आला. आश्विन शुद्ध १२स निशाणें चढलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
चतोर्थी मंगळवारी आवजी कवडे आले. १
पंचमी बुधवारीं मल्हारजी होळकर व पंवार अवघेच आले असेत.
रोजमजकुरीं संतमाळी ढोले वारले असेत. चाकळीचे पाटिलकीस सडेकर भांडतात. त्यास रायापाशीं मजकूर पडिला. कृष्णाजी कामथे यांणी मातुश्री राधाबाईकडे सलग करून, तूर्त मनसुबी तकूब करून, आश्विन शुद्ध ६ गुरुवारीं सडेकर जनकोजीस रायांनीं निरोप दिल्हा. पुढें मनास आणूं ह्मणून आज्ञा केली असे. कामथियापासून कांहीं पैका घेतला. कामथे कागदही घेणार होते. १
आश्विन शुद्ध सप्तमी शुक्रवासरीं बोली पेशवियांनी घातली कीं, समाईक माहाल माळवियांतील होळकर, शिंदे, पंवार, यांच्या निसबतीस आहेत, ते हुजूर ठेवावे. दसरा जालियावर माहाल हुजूर ठेविले असेत. १
आश्विन शुद्ध अष्टमी मंदवारीं मिरजेहून खबर आली कीं, उदाजी पंवार याचा पुत्र मनाजी पंवार मिरजेवर पडिलो. गोळी लागून वारला. ऐसें वर्तमान आलें असे.
आश्विन शुद्ध अष्टमी सह नवमी रविवारीं दसरियाचे दिवशीं थेउरी रा। फत्तेसिंग बावाचा झेंडा आला असे. निमे पाटिलकीस गुमास्ता आला असे. १
आश्विन वद्य १ प्रतिपदेस खंड़ोजी पा। कोलता, मौजे पिसार्वे, यासी गोमाजी कोलता पाटिलकीबद्दल भांडतो. पेशवियाचेथें तकरीरा जाल्या असेत. त्याचा १ नकला गोपाळराम देशपांडे याजपाशीं असेत. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
पिलाजी दरेकर याजवर सयाजी दरेकर याच्या पुत्रानीं राजश्रीपासून दोनशें रुपये मसाला करवून हुजरे पाठविले. पिलाजी पळोन पेशवियापाशीं आला. यांचा निरोप घेऊन गांवांतून बाहेर गेला. मुले माणसें काढिलीं. हुजुरियांनी बायकोपाशीं मसाला सदरहूप्रों। घेतला असे. गराडकरांसही मसाला राजश्री स्वामीचा शंभर रु॥ होता त्याणीं मसाला देऊन पेशवियांकडे आले. पेशवियांनी पेशजी मनसुबी केली आहे ते कागदपत्र देऊन सटवोजी संभाजी जगदाळे हुजुर पाठविले. तेथें बाळोजी बहिरजी आहेत. पेशवियांनीं निमे रु॥ कदमी घेतली आहे. हुजूर काय मजकूर होईल तो पाहावा.
चिमाई वहिली ईस तीस मेंढरें व रु॥ वीस देऊन येसोजी घुला मांजरीकर याजकडून लिगाड वारिले असे. १
थेऊरकर खंडोजी कुंजर याचा प्रतिपक्ष राजश्री संतबा देशमुख याणीं फारसा केला. ऍलनाक महार त्याणेंही केला. श्रीकडून खंडोजीस वस्त्र बांधविलें. शेवटीं सकोजी कुंजरहि श्रीकडे गेला. तेव्हां गोत घ्यावेसें केलें. ते गोष्टी सतबाच्या विचारास न आली. मग याणीं खंडोजी कुंजर व एलनाक महार राजश्री फत्तेसिंग भोंसले यांजकडे पाठविला आणि पाटिलकी त्यास दे ह्मणून सांगितले. त्याणीं तेथें जाऊन पाटिलकी फत्तेसिंगबावास दिल्ही. निभे वडीलपण अववें. संतबाहि तेथें गेले. जेजुरीच्या गुरवाच्या कजियामित्य आपले हातेंच पाटिलकी दिल्ही. संताजीबावांनी फटकाळ केलें. पाटिलकी बावापासून आपण मागोन घेणार, ऐसें दिसत असे. १
भोंसरीकर फुगे पाटिलकीसी नाहक गतवर्षापासून संताजी बावाच्या बोलें भांडूं लागले. पेशवियापाशीं मजकूर पडिला. तेव्हां फुगे थळकरीसे जालें. मागती हुजूर गेले. तेथेंही खंडोजी लाडा गेला. राजश्रीपाशीं मजकूर पडिला. तेथें हिकडे गव्हाणे पाटील जाले. फुगा थळकरी ऐसें जालें असे. परंतु संतबा काय करतील तें पाहावे. १
आश्विन शुद्ध १ मंदवार खडकीकर टुल्लू कुळकर्णास खोटा जाला आहे. तो मागती पेशवियासी उभा राहिला आहे. मागती मनसुबी करणार. १
द्वितीया रविवारीं चांबळीकर कामथेयासी जनकोजी सडेकर पाटिलकीसाठीं भांडतो. बोली पेशवियाशीं पडली होती. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५७
श्रीशंकर १६११ फाल्गुन वद्य १२
श्रीकृष्ण नकल
(शिक्का)
॥ सौजन्ये समस्त मोकदमानी देहाय व शेट महाजन प्रात गुजण मावळ प्रती सताजी हैबतराव व हैबतराव नागोजी नाइक देशमुख व मल्हार गोमाजी देशपाडिये प्रात मजकूर सु॥ हजार १०९९ तिसैन व अलफ बदल भडारा व नदादीप श्री सदानद गोसावी स्वामी याचा मठ व समाधीथाल मु॥ मौजे निंब प्रात वाई श्री तीरी आहे ते थली महिमा पाहाता अगाध अनुपम्य व ते थली त्याचे शिष्य परपरागत आहेत व गोसावी अतीत अभ्यागत येऊन वास्तव्य करितात प्रतिदिनी मोहछाव होतो ते जाणोन वृत्ती समाधान जाली यास्तव मनोदये करून आपली वशपरपरा भडारा व नदादीप चालवावा ऐसा नियेत करून प्रात मा।रीहून दर गावास मोईन करून दिल्ही असे बितपसील
→ बितपसील पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
एकूण नख्त खुर्दा बतीस टके बारा रुके व गला कैली यहर जिनसी बारुले दसेरी मापे दोन खडी साडे तेरा मण रास देविले असेत आदा करणे हर दरसाल लेकराचे लेकरी धर्मार्थ बुध्दीने द्यावयाचा नियेत केला आहे कोण्ही अनमान न करिता सदरहूप्रमाणे आदा करीत जाणे ताज्या पत्राचा उजूर न करणे रा। छ २५ जा।वल मोर्तबसुद