Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२० सोनवडकर चौगुलियाचा शिरपाव आपणच घेत. ह्मणून बाबाजी पंवार याजला गुन्हेगारी घेतली.
५०० लोणीकाळभर येथील अंबरोजी थेऊरकर चौ। याजला घेतले. सबब कीं, चोभे थळ वाहत आहे. पथाजी थेऊरकरहि ही निमें वाहत होता. परंतु पथाजीस पोहचतच नाहीं, अजीं सबब.
जुवे खेळत होते ते धरून आणिले. मार दिल्हे. गुन्हेगारी घेतली. त्यांत गोविंद विश्वनाथ देशपांडे याचा मूल नाना होता, तो पळोन गेला असे.
आषाढ वद्य ११ रविवारीं गोविंदराऊ देशमुख यांचे मूळव्याधीचे मोड काहाडले. शस्त्रवैदानीं अगोधर ओखद दिल्हें होतें. त्याणेंच मूत गुंतले होते. शेवटीं मोड काहाडिले असेत.
चिरंजीव लक्षमण वद्य १२ सोमवारीं गांवास सोनगडाकडून आले असेत. १
वद्य १४ मंगळवारीं राजश्री पंतप्रधान याचा वल्हे घोडा बोररतन उगाच वारला असे. १
आषाढ शुद्ध १३ राजश्री स्वामीनीं दादोबा पुरंधरे यास पालखी दिल्ही.
रघोजी भोंसले, फत्तेसिंग भोंसले सातारियास आले. वद्य दशमी मंदवारीं राजश्रीची त्यांची भेटी जाली असे. १
अधिक श्रावण शुद्ध ३ मंदवारीं राजश्री बाळाजीपंत नाना पेशवे मुलूखगिरीहून बारा घटका दिवसां मुहुर्तेकरून घरास आले. पहिली मुलूखगिरी. येचवेळेस सवाई जैसिंगाची यांची भेटी फिरतेसमई जाली. जातेसमईं नवाब निजामनमुलुख यांची भेट जाली होती. १
यांचा बोलबाला जाला. चांगली मुलूखगिरी जाली. देवरी घेतली. गौर झोंबराचें राज्य लुटलें असे. १
अधिक श्रावण शुद्ध ५ सोमवारी छ ४ जमादिलावली रामाजी शिवदेव एकबोटे यास कर्हेपठारच्या गुमास्तगिरीची ताजी सनद शिक्कियानिशीं नारो अनंत याच्या दस्तुरें लेहून दिल्ही. तिची नकल घेतली असे. १
अधिक श्रावण शुद्ध १ गुरुवारी खंडोजी पाटील कोलता पिसावेकर मृत्य पावला. १
शुद्ध नवमी मंदवारीं वर्तमान आलें की, तिमाजी पाटील कटका भिंवरीकर वारला. तीन चार रोज जाले. चांबळीच्या चौगुलकीचें भांडण भांडावयास पुणियास आला होता, दुखण्या पडला तैसाच गांवास नेला, वारला. १
शुद्ध दशमी रविवारी संध्याकाळीं येशवंतराऊ बिन गोविंदराऊ शितोळे, देशमुख, राजश्री फत्तेसिंग भोंसले यांजकडून आले. हत्ती आणिला असे. १
रोजमजकुरी पेशवियांनी, बकरे बेरड जाला होता, तो कुणब्याच्या बायकोशीं गेला होता, त्याची गरदन मारिली असे. १
अधिक श्रावण शुद्ध १३ बुधवारीं दोप्रहरांउपरि राजश्री बाळाजी बाजीराऊ प्रधान व सदाशिव चिमणाजी राजदर्शनास सातारियास गेले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
पंढरपुरची यात्रा आली. नीरेमधें पडवीकर शितोळे यांची तिघें मुलें बुडालीं. दोघी कन्या व एक पुत्र. नगवण होते. भेंडी तुटली आणि बुडालीं. सुभानरायाचा पुत्र व सेटियाजीच्या दोघी लेकी अशी बाजी शितोळे त्याचेथील बुडालीं. १
आषाढ वद्य षष्ठी मंगळवारीं गोविंदराऊ देशमुख यांचे मूत गुंतलें होते. वाखा जाला होता. बरें जालें असें.
आषाढ वद्य षष्ठी मंगळवारी जगोबा फुरसंगीस फिरंगाईच्या दर्शनास गेले होते. १
कुरकुंबीचे फिरंगाईची भक्त गंगाजी हरपळा पंवार फुरसंगीकर याजला होती. त्याजला द्रष्टांत जाला कीं, मी तुझ्याच राणांत तुजसाठी आलें. दुसरे रोजी ओढियाखालतीं जाली होती. स्वप्नांत देखिली होती. तेथे गेला तों पंचरंगी दगड तांदळा पडला आहे. त्याची सेवा करूं लागला. शेंदूर भोगविला. चार पांच वरसे तेथेच पूजा करीत होता. त्यास तें राण फुरसंगीच्या व लोणीच्या शिवेमुळें द्वाहीखालें पडिलें आहे. लोणकर गंगाजीसी पुजापत्रीसाठी कटकट करूं लागले. मग याणे आपल्या शेतांत ओढियाअलीकडे आणून स्थापना केली. कुरकुंबाची फिरंगाई येथेंहि चार पांच वरसें पुजा केली. दोन तीन वरसें जालीं. बरी भराभर जालीं. रोगे येऊन बैसलीं. बरीं जालीं. नवस पुरों लागले. दोनतीनशे माणूस मिळों लागले. कुरकुंबच्यावरीचे येथें गेल्यानें यात्रा घडों लागली. नवें देवस्थान निर्माण जालें. गंगाजी हरपळा पूजा करितो आणि श्रीपुढे येतें तें घेतों. तूर्त गुरव तेथें येत नाहीं. गंगाजीने देवीपाशीं आपल्या शेतांत घर बांधिले आहे, तेथेहि राहतो. तेव्हडियानें गांवांत तो घरच आहे. तेथें देवापुढें ओढियांत पाणीहि लागलें आहे. डव्हरा आहे. विहीरहि केलियाने होईशी आहे. १
वासुदेव जोशी याणी खासगीच्या गांवीं कमावीस केली.
२२०० वरवंडकर पा। चौगुलियाचा शिरपाव आपणच घेऊन आपले घरीं ठेवीत. ह्मणून पाटिलास गुन्हेगारी रु॥ १२०० बाराशें करार केली. जुन्या पाटलाच्या वेळेचा चौगुला शेळका होता. त्याजला हे पाटील मानपान घेऊं देत नव्हते. त्यांचा त्याणीं मानपान घ्यावा ऐसें दिवाणांतून करार करून दिल्हें. त्याजला हरकी रु॥ १००० एक हजार करार केली. एकूण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
यादी. स्मरण. सुहूरसन इसन्ने अर्बैन मया अलफ, सन हजार ११५१, छ १९ रा।वल, जेष्ठ वा। ६, रविवार, रोज गुदस्तीं, मध्यरात्रीं म्रुग निघाला, शके १६६३, दुर्मतनामसंवछरे, अव्वल साल. करीने.
आषाढ शुद्ध १६ बुधवारीं रा। रामचंद्र मल्हार शेणवई यांनीं मौजे दौंड ता। पाटस येथील निमे पाटिलकीचें वतन घेतलें. त्याच्या महजरावर शिक्का करावयास गोपाळ शंकर शेणवई, नि॥ मा।र, महजर घेऊन येथें आले. महजरांत मनमाने तैसे मानपान अधिक लिहिले आहेत. हक्क चांभारगोंदियांत राणोजी शिंदियानीं मनास मानेसे करून घेतले आहेत, त्याप्रमाणें या मसुदांत लिहिले आहेत. पंचवीस बंद महजर लांब आहे. दिक्कत घेतलियानें चालेना ऐसें जाणून शिक्के करून दिल्हे. शेटेपण व महाजनकीहि आपल्या व राणोजी पाटील जगदळे यांच्या नांवें लेहून घेऊन त्याजवरहि शिक्का करून घेतला. तूर्त तो त्याणीं कांहीं दिल्हें नाहीं. पुढेंपाठीं काय देशमुखास देतील तें पहावें. महजराची नकल घेतलीसी असे.
रोजमजकूरीं बाळाजी बाजीराऊ प्रधान यांचीं पत्रें चमणनदीवरून आलीं कीं, सवाईची भेटी घेतली, याउपरि मजल दरमजल येऊं देशास. १
रोज मजकुरीं बहिरो कृष्ण, समेत घोडी, गायकवाडीच्या लश्करांतून घरास आले.
आषाढ वद्य चतोर्थी रविवारी महिमाजी बिन जेबाजी पा। घुले, मौजे मांजरी बु॥, ता। हवेली, यास मसाला रु॥ २५, व साखराई कौला, सटवोजी घुला, अनसोजीचा भाऊ, इजला मसाला रु॥ ५ पांच करून, बदअमलाच्या वासपुसीसाठीं राजश्री बापूजीपंत नाना याणीं आणविली. मसाला रदबदली करून निमे करार केला. ते दिवशीं महिमाजीस खोडियांत खातलें. दुसरे रोजीं सोमवारी खंड केला. महिमाजीस गुन्हेगारी, साखरीसी गेला ह्मणून, रु॥ २५० अडीचशें व साखरीस रु॥ ३५ पसतीस, ऐसे खंडिले. महिमाजीस पांचा महिन्यांची मुदत दिल्ही. बायकोसहि दिल्ही. महिमाजीस जमान दिढोश्या रुपयांस तुकोजी बिन्न जैतजी पा। कवडा, घोरपडकर व मांजरीकर भाऊ शंभरांस जामीन जाले. भावांनी पन्नास बुडते देऊं केले. एणेंप्रमाणें निकाल जाला. बायकोस जामीन कृष्णाजी बिन्न बापूजी पा। घुला जाला. तिचें शेत, घर लेहून घेतलें आहे. एणेंप्रमाणें जालें असे. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
माघ शुद्ध १३ मंदवारीं रामाजी घोडे व गंगाधर घोडे यांचा इनामाचा, खर्चाबा। देवघेवेचा कजिया होता. इनामाच्या सनदा नव्या केल्या. त्याच्या खर्चाबा। कजिया होता. राजश्री बापूजीपंतनानाचेथें मजकूर पडिला होता. तेथून श्रीमत् सदाशिवपंताकडे गेला. त्यांणीं पांचांस मनास आणावयास सांगितलें. हरी सदाशिव सुरनिसाकडील, व बाळाजी दादाजी वैद्य व माणको बहिरव दाते व देशमुख देशपांडे यांजवर टाकिला. त्यांणीं विल्हेस लाविला. चतुर्भुज जोशियाच्या मारअतीने चुकविला. परस्परें एकामेकाचे कागद एकामेकास देविले आहेत. व दिवाणचे पत्र उभयतांस कीं, एकामेकास पत्रे एकामेकांनी लिहून दिल्हीं आहेत त्याप्रा वर्तणें, न वर्ता तरी मुलाहिजा होणार नाहीं. सारांश, चतुर्भुज जोशियाणीं गंगाधराची पाठी राखोन केलें असे. रामाजीपाशील सनदांच्या नकला अवघ्या गंगाधरापाशीं दिल्ह्या असेत. आमची साक्ष घातली आहेत. बितपशीलः----
२ उभयतांनी आपआपल्यास कागद लेहून दिल्हे आहेत त्याजवरी.
२ घराचे वांटणचे एकामेकाचे एकामेकास कागद त्याजवरी.
१ रामाजीचें पत्र गंगाधरास कीं तुझे नांव सनदेंत दो चौंत नाहीं, आपलेंच आहे, तरी समाईक पत्रें, त्यांजवरी.
-----
५
१ गंगाधरानें साडे चौश्यांचें खत चतुर्भुज जोशियास लेहून दिल्हें आहे की, पहिले साडे तीनशें तुमचे घेतले व हल्लीं रामाजीपंतास इनामाच्या खर्चाबा। देविले रु॥ शंभर ते द्यावयास घेतले, एकूण साडे चौश्यांश इनामें गहाण ठेविलीं असेत, व्याज मुद्दल पावेल त्याउपरि इनामें गंगाधराचीं वांटणीचीं सुटतील. ऐसें आहे. बाळाजी दादाजी वैद्य यांचे हातचें दस्तुर.
-------
६
येणेंप्रमाणें साक्षी पत्रावरी आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६०
श्री १६१७ अधिक आषाढ शुध्द १४
छत्रपती
अज सरसुभा राजमान्य राजश्री मुरारजी घोरपडे वजारतमाब ता। मोकदमानी मौजे इडिमडे समत हवेली सुभा वाई सु॥ सीत तिसैन अलफ राजश्री आनदगिरीबावा गोसावी यासि राजश्री छत्रपती स्वामीनी अनछत्राकारणे गाऊ दिला आहे ऐसेयासि तुह्मावर सरदेशमुखीचे कारकून तुह्मावर रोखा करितात नसता अजार नेता ह्मणउनु वर्तमान कळो आले तर त्यास सरदेशमुखीच्या कारकुनास मना रोखा लिहिला आहे तुह्मी एक रुका न देणे जो वसूल देणे तो गोसावीबावाकडे देणे रोखा केला तर हाच कागद त्यास दाखवणे एक रुका न देणे जाणिजे छ १२ जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
आश्विन वद्य ९ शुक्रवार छ २२ रजब राजजी पा। बहिरट मौजे भांबेडें याचा व जावजी शिरवळा थळकरी मोजे मा।र याचा वाडियाचा कजिया होता. दोघेजण भांडत रा। त्रिंबकराऊ विश्वनाथ मोकाशी याजपाशीं आले. जमीन दिल्हे. कतबे व राजीनामे मागितले. त्यास, रोजजी बोलिला की, पहिले विसाजीपंतीं कतबा घेतला आहे तोच खरा करून देईन, दुसरा कतबा कशास पा। ? त्यास त्रिंबकराऊ बोलिले की, ते कतबे सांपडत नाहींत, दुसरा कतबा देणे. राजजी बोलिला की, माझे वडील भाऊ सवाजी पा। व खंडोजी शिरवळा दोघे गांवीं नाहींत, ते आलियावर कतबा देईन. त्यास, ते गोष्ट त्रिंबकरायानीं ऐकिली नाहीं. ह्मणों लागले की, कतबा देणें, नाहीतर बैदा मेळवून देणें. रायाजीचा जाबसाल, राणोजी पा। ह्मणों लागला की, मी करीन. त्यास, राजजी ह्मणों लागला कीं, अवघा गांव एकसरला आहे व भाऊहि एकसरले, मी एकलाच भांडलियानें शेवट होत नाहीं, भांडत नाहीं ह्मणून कतबा देतों, परंतु राणोजी पा। व शिवजी दोघांस पुसावें. त्यास, राणोजीस पुसिलें. त्याणें सांगितले की, आपला व शिरोळियांचा घरचा कजिया नाहीं, व शिवजीच्या वाडियाचे उत्तरेस आपला वाडा नाहीं. ऐसें सांगितले. शिरोळियास पुरशीस फारशी केली नाहीं. राजजीनें कतबा लेहून दिल्हा की, आपलें भांडण शिरां चढत नाहीं. शिवजीचे उत्तरेस वाडा रुंद हात तीस, व लांब अवघ्या वाडियाप्रों। आहे, तो शिरोळियास देणें. ऐसा कतबा लेहून दिल्ही तो त्रिंबकरावांनी ठेविला आणि शिरोळियास सांगितले की, तूं घर बांधणें. कागदपत्र दिल्हा नाहीं. कतबियाची नक्कल देशपांडियापाशीं आहे. दस्तकें केली नाहींत. कतबा लेहून दिल्हा तेवेळेस लक्षुमण चिंतामण आ। देशमुख, रामाजी गोपाळ देशपांडे, व राणोजी पा। बहिरट, व शिवजी व राजजी महिमाजी पा। बहिरट यांचे गुजारतीनें दिल्हा असे.
माघ शुद्ध १ बुधवारीं श्रीधरणीधरदेव मोरेश्वरास माघी चतुर्थीस प्रथम यात्रेस गेले. वाघोलीवरून गेले. १
रोज मजकुरी दाहा घटका रात्रीं खंडभट शाळेग्राम याची स्त्री वारली असे. १
रोजमजकुरी निजामनमुलुखाची व रा। बाळाजी बाजीराऊ प्रधान यांची येतलाबादेपासीं पूर्णा नदीचे तीरीं भेट जाली. नबाबानें यांचा फारसा बहुमान केला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
यादी स्मरण सन ११५० छ ११ जमादिलोवल मा चिंचवड, बोली, तुकाराम रामजी पा। जांबूळकर शिवई बा। करार. रु॥,
१० खासगत तूर्तचे घ्यावे.
१० देशमुखा बा।. शेवट होईल मग रामजी देणार.
-------
२०
येणेंप्रों। रामजीनें करार केला होता. वर हात मारला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५९
१६१३ ज्येष्ठ शुध्द १०
सदानंद
राजश्री आनंदगिरी गोसावी महंत मठ
(शिक्का) समापत्रे मोकाम मठ श्रीगुरु राजश्री
या विदमाने लेहून दिल्हे समापत्रे
तुलाजी पा। सबजी तुकोजी पा। बहिरोजी नागोजी
(निशाणी नांगर) (निशाणी नांगर) (निशाणी नांगर)
या विदमाने लेहून दिल्हे मौजे नींब पा। वाई सु॥ इसने तिसैन अलफ कारणे लेहून दिल्हे कागद ऐसा जे तुह्मी मौजे कुडालीचे पटलगीस जावयास एक जण जाईल त्या जे पैका पडल ते तीघानी द्यावा आपण वाटारियाबराबरी जावे जे कोण भाऊ जाईल त्यास तीघानी जो काय खरचेस लागेल ते द्यावे जो काय तेथे पडिला ते तकसीमप्रमाणे ती ठाई देणे बरोवाइटास आहे त्यास पाठी राखावी हे लिहिले समापत्रे सही हेबदल वडिलाचे इमान असेती श्रीकृष्णाची आण असे हे विनंति
तेरीख ८
रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
आषाढवद्य नवमी रविवारी, विसाजीपंत नि॥ फडणीस स्वारींतून आले. दुसरे रोजी सोमवारी दशमीस राजश्री पिलाजी जाधवराऊ स्वारींतून आले. मातुश्री राधाबाई पेशवे यांची भेट घेऊन वरचेवर वाघोलीस गेले असेत. दतियावोडसें येथील वगैरे सवस्थानें येथील पैको वसूल करून आले. अंतरेवदींत आवजी कवडे पुढे पाठविले होते. स्वारी बरी केली असे. १
आषाढ वद्य दशमी सोमवारी संध्याकाळी मातुश्री चांदूबाई शितोळे देशमुख, गोविंदरायाची स्त्री, यांस पाटसीं देवआज्ञा जाली. रोटीस बरें वाटत नव्हते. मग हरजीबावा बकरा याचे पुत्र याणी डोलींत घालून पाटसास आणिली. तेथें वारली असेत. जवळ हरबा व संतबा, बाळारायाचे पुत्र, मात्र होते. पुण्यांतून कोण्ही गेली नव्हती. अगोदर पुणियास गुरुवारी प्रातःकाळीं वर्तमान आलें. मग सतबा, गोविंदराऊ, दौलतराउ, येशवंतराउ, व मोरोपंत अप्पा, समेत येसूबाई, बाजी कान्हो वगैरे ऐसे पाटसास दिवस घालावयास गेले असेत.
श्रावण शुद्ध १ बुधवारी श्रीमत् राजश्री नानाकडील पत्रें आलीं कीं, माळवियांत छावण्या जाल्या असेत, सुरंजे आसपास. १
श्रावण शुद्ध २ गुरुवारी संध्याकाळीं श्रीमंत राजश्री नानास पहिला पुत्र जाला.
श्रावण शुद्ध नवमी सोमवारी पदाजी पा। जगथाप, चौधरी मौजे बढाणें, ता। कर्हेपठार, याजवर आरोप आला होता कीं, मोही चांभारीण कोम चांभार मौजे मजकूर याची बायको इजसीं कर्म केलें ह्मणून आला होता. त्याबद्दल दोघांस येथें हकीमांनी आणिलें. पुरसीस केली. चांभारीण बोलली कीं मी दिव्य करीन. दिवीं खरी निघालें तर उत्तमच जालें. खरी न निघालें तर साहेबांच्या चित्तास येईल तें करावें. त्याजवरून दिव्य तिजपासून घ्यावें, ऐसा निश्चय जाला. मग राजश्री बापूजी श्रीपत यांणी पेशवियांच्या वाडियांत मातुश्री राधाबाईकडे आज्ञा घ्यावयास बाळाजी महादेव मांडवगणे पाठविले. त्यांनी मातुश्रीस वर्तमान सांगितले. त्यांनी दिव्य घ्यावयास आज्ञा दिल्ही. मग चांभारीण नदीसे स्नान करावयास पाठवून स्नान करून आणिली. हातास साबण लावून हात धुतले. हातची चिन्हें लेहून ठेविलीं. दोन भाते लावून पहार ताविली. सदरहू करिन्याचें भाळपत्र मोही चांभारणीचे कपाळीं बांधिलें. हातास लोणी लावून पहार वरपविली. साहावेळां पहार तिने वरपली. दिव्यीं खरी निघाली. सदरहू दिव्य राजश्री बापूजीपंतनानाचे कचेरीस जालें. दिव्यीं उतरलियाउपर साड़ी-चोळी तिजला नेसविली. आणि कसबाच्या चांभाराच्या हवाली केली. पदाजीचा आरोप वारीला. दुसरे दिवशीं मातुश्री राधाबाईनीं चांभारीण वाडियांत हात पाहावयास नेली. हात पाहिले. मग लुगडें व चोळी तिला दिल्ही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शुद्ध १२ बुधवारीं राजश्री येशवंतराऊ दाभाडे सेनापती राजश्रीकडून आले. तळेगांवास गेले असेत. १
शुद्ध १३ गुरुवार संध्याकाळचा च्यार घटका दिवस राहिला ते समई श्रीमंत राजश्री चिमाजी आप्पाचे पत्र मातुश्रीस आले की, शुद्ध १२ बुधवारीं प्रातःकाळचा दाहा घटका दिवस आला ते समई राजश्री
स्वामीनीं वस्त्रें दिल्हीं बितपशील:-
श्रीमंत राजश्री बाळाजी बाजी- राजश्री चिमाजी अप्पास बहु-
राऊ यांस पेशवाईची वस्त्रें दिल्हीं. मान वस्त्रें
१ चिरा बादली, १ चिरा बादली,
१ बादली जामेवार, १ बादली जामेवार,
१ बादली चादर, १ बादली चादर,
१ पटका, १ पटका,
१ तरवार, १ मोत्यांचा तुरा,
१ कटार, --------
१ मोत्यांचा तुरा, ५
१ हस्ती, माहादाजी अंबाजी पुरंदरे,
----- १ बादली चिरा,
८ १ पासोडी पैठणी,
येणेंप्रों। राजश्रीनीं वस्त्रें दिल्हीं. आपणांस कळावें ह्मणोन लिहिलें असे, असें पत्र आलें. नौबत तेच वेळेस सुरूं जाली. तोफांचे आवाज केले. जिलीबदार आला. त्यास रुपियाचे कडें व तिवट लाल दिल्हें असे. १
रोजमजकुरीं मातुश्री लाडूबाई देशमुखीण केळाहून येत होती. करंदीपाशीं गोविंदरायांनी वाट कुडली होती ती काट्या उपटून आली. वाट कुडावयास गरज नाहीं, ऐसें सांगितले. अंतबा चिंचवड़ाहून पासणियास आले होते. त्यांस वर्तमान कळलें. तेव्हां बाईकडे गेले. रंगोपंत बराबर होते. त्यांस वेडेंवांकडें बोलिले. कलह जाला. दिवाणपावेतों गेला आहे. मातुश्री लाडूबाईनी साडीचोळीस द्वाही दिल्ही कीं, इसाफतीचा गांऊ, येथें जें असेल तें दोघांचे, ऐसें असतां तुह्मी कां शेत वाहतां ? वाट तुह्मास मोडावयास काय गरज ? त्याजवरून शेतास द्वाही पडिली. दिवाणचीं माणसें जाऊन वाट पूर्ववतप्रा। केली. सखोजी काट्या, सरीक गोविंदरायाचा, यास आणावयास माणसें दिवाणची गेली. तो पळाला. चौकी घरीं बैसली होती. दुसरे रोजी येथें हजीर करूं ह्मणून करार केलियावरी चौकी उठविली. त्याजवर सातबा व गोविंदराऊ यांस बोलावून नेलें. ब्राह्मणावर हात काय समजोन टाकिले ऐसें नशहतेचें भाषण करणें तें केलें. दुसरे रोजी मोरोपंतास घेऊन येणें, जाबसाल करणें, ह्मणून आज्ञा केली. मोरोपंतीं जाऊन सालसाल काय करावें, लाडूबाईचे पासणियांत कांहीं नाहीं, ऐसे मल्हाटे बोलले. परंतु मोरोपंतीं कैसें ह्मणावें ? कतबा मागितला तरी कैसा द्यावा ? याजकरितां मोरोपंत अप्पानी बाबदेवभट धर्माधिकारी लाडूबाईकडे पाठविले. मधेस्तीस घातले, कीं, बाई ! तुझें निमें पासणें, जे आहे ते तुझे, तू लांबवू नको. ऐसें कितेक प्रकारे सांगितले. देवजी त्रिंबक मोंढवेंकर कुलकर्णी, अप्पाचे भाचे, यांसहि मधेस्तीस घातलें. शेवटीं मोरोपंत नवे रोजीं शुक्रवारीं लाडूबाईकडे गेले. दोन नमस्कार केले की, लांबवूं नको, जे पासणियांत आहे तें तुह्मां दोघाचें, साडीचोळीचा मजकूर पुसतां तरी देशमुखीकडे आहे. सहा खंडी रिठे, मळई पांच मण, चोळी व खंडी साडी ऐसें आहे, वरकड शेतें वाहत आहेत, ती त्यांस पोंहचत नाहींत, तुमचीं निमें त्याची निमें त्या गांवांत, ऐसें सांगितलें. याची वाट मी करितों, ऐसें ह्मटलें. तेसमई बाबदेवभट, देवजीपंत, यादोपंत, जगोबा, व नाना ऐसे जवळ होते. साडीचोळीसाठीं लाडूबाई बोळ घालणार मोरोपंतावर. मग काय खरे सांगतील ते पाहावें. ऐसें वर्तमान जालें असे.