Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या चरित्रांत एक गोष्ट आहे. सध्यां आमचेजवळ जे अस्सल कागदपत्र आहेत त्यांत ह्या गोष्टीचा उल्लेख नाहीं. तरीपण ही गोष्ट सांगण्यासारखी आहे म्हणून सांगतो. महाराष्ट्रांतील सर्व लोकांस ही गोष्ट माहीत आहे, पण रा. निगुडकर यांनी जें परशुरामभाऊचें चरित्र प्रसिद्ध केलें आहे, त्यांत जशी हकीकत दिली आहे तशी येथें सांगतों. ती हकीकत अशीः--परशुरामभाऊंची ज्येष्ठ कन्या बयाबाई नांवाची होती. तिला बारामतीचे जोशी यांचे घरी दिलें होतें. लग्नाचे वेळेस ती अवघी सात किंवा आठ वर्षांची असेल. लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आंतच, तिच्या पतीचा अंत झाला. तेव्हां जगरूढीप्रमाणें ती बालविधवा झाली. नंतर कांहीं दिवसांनी परशुरामभाऊंनी आपल्या हतभागी कन्येची सर्व हकीकत रामशास्त्रयापुढें मांडली. ती हकीकत ऐकूनः शास्त्रीबोवांस त्या मुलीबद्दल कळवळा आला व ते म्हणाले कीं, “ या मुलींना पुनर्विवाह करण्यास कोणतीही हरकत नाहीं.” परशुरामभाऊंनीं हें। सर्व वर्तमान काशीक्षेत्रांतील विद्वान् ब्राह्मणांस कळवून त्यांजकडून पुनर्विवाहाबद्दल संमति मिळविली. परंतु इतकी मजल मारिल्यानंतर भाऊंनीं आपल्या मुलीचा पुनर्विवाह करण्याबद्दलचा उद्देश सोडून दिला; कारण त्यांचे इष्टमित्र त्यांस ह्मणाले कीं, पुनर्विवाह आजपर्यंत चालत आलेल्या जनरूढीस अगदीं विरुद्ध आहे, तेव्हां ही जनरूढी सोडून देऊन समाजाचीं मनें बिघडून टाकण्याचें धाडस न करणें हें श्रेयस्कर होय. सबब भाऊंनीं आपला विचार अजीबात टाकून दिला. तरी पण ही गोष्ट ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाची आहे. परशुरामभाऊ पटवर्धन ह्मणजे पेशवाई दरबारांतील कांहीं लहानसहान सरदार नव्हेत. शिवाय पूर्वजांच्या धर्मावर पूर्ण निष्ठा बाळगणारे अशा मनुष्याने, खोलपर्यंत रुजलेल्या जनरूढीस झुगारून देण्याचा अगदीं मनापासून प्रयत्न चालवावा, हें त्यावेळच्या पिढीचीं मनें जनरूढीनें। कशीं खच्चून आवळून टाकलीं होतीं, याचा विचार केला ह्मणजे बरेंच विलक्षण दिसतें. तशांत रामशास्त्रयांसारख्या परमपूज्य व श्रेष्ठ पंडिताची–ज्याची उज्वल कीर्ति सर्व महाराष्ट्रसाम्राज्यामध्यें एकसारखी दुमदुमून आहे अशा पंडिताच्या संमतीची, जनरूढीस झुगारून देण्याच्या कामीं भर पडावी हें त्याहूनही विलक्षण आहे. आणि काशीक्षेत्रस्थ पंडितांनीं यास आपल्या ऐकमत्याचें पाठबळ द्यावें हें तर सर्वांत विलक्षण होय. उलटपक्षीं त्यावेळीं हिंदुसमाजाची स्थिति अशी होती हेंसुद्धां चांगल्या त-हेनें दिसून येतें. रामशास्त्र्यासारख्या विद्वान् पंडिताचें पूर्ण पाठबळ असतां व पुनर्विवाहासारख्या सुधारणेविरुद्ध असलेलीं लोकांचीं मतें अगदीं निराधार आहेत अशाबद्दल ढळढळीत शास्त्रीय प्रमाण असतां परशुरामभाऊसारख्या मनुष्याला अंतःकरणांत पाझर फुटून जी गोष्ट करण्यास तो तयार झाला ती गोष्ट तडीस नेण्यास धीर होऊं नये, यापरतें तत्कालीन हिंदुसमाजस्थितिसूचक दुसरें उदाहरण तें कोणतें ?

याच प्रकारची आणखी एक गोष्ट येथें सांगणें इष्ट आहे, व त्यासही कागदपत्रांत कांहीं पुरावा नाहीं. सध्यां ब-याच हिंदुलोकांचें ज्या विषयाकडे लक्ष लागत चाललें आहे अशा विषयासंबंधीं ही गोष्ट आहे. याविषयीं आह्मांस जी माहिती आहे, ती फॉर्ब्स साहेबांच्या प्रख्यात “ पूर्वेकडील लोकांच्या इतिहासा " वरून (Orientel memoirs-of Forbes ) मिळालेली आहे. फॉर्ब्स साहेब इ. स. १७६६ सालीं व त्यानंतर कांहीं वर्षे पश्चिम हिंदुस्थानांत राहिले होते. हें साहेब लिहितातः-“ त्यांनीं ( राघोबादादांनीं ) दोन ब्राह्मण विलायतेस पाठविले होते. ते हिंदुस्थानांत परत आल्यावर, एक उत्तम सुवर्णाचें स्त्रीलिंग करून त्यांतून त्यांना जावें लागलें. हा विधि झाल्यानंतर व ब्राह्मणांना दानधर्म केल्यानंतर, त्यांना पूर्वीप्रमाणें ब्राह्मणजातींत घेण्यांत आले, व त्या जातीचे त्यांना सर्व हक्क परत मिळाले. परत म्हणण्याचें कारण, इतक्या अपवित्र देशांतून प्रवास केल्यामुळें मलिनता उत्पन्न होऊन हे त्यांचे हक्क नष्ट झाले होते. ह्यावरून इतकें सिद्ध होतें कीं, हिंदुस्थानदेश एकछत्री ब्राह्मणी साम्राज्याखालीं होता, अशा प्राचीनकाळीं “ काळा पाणी " ओलांडून जाण्याचें महत्पातक प्रायश्चित्तानेंही क्षालन न होण्याजोगें नव्हतें, व आतां जो एक नवीन सिद्धांत निघाला आहे कीं, द्विजानें समुद्रपर्यटण केल्यास प्रायश्चित्त घेऊनही त्याला जातिधर्मात घेतां येत नाहीं हा सिद्धांत त्यावेळच्या लोकांना संमत नसून राज्यकर्ते पेशवे यांचेंसुद्धा त्या सिद्धांतास अनुमोदन नव्हतें.

प्रतापसिंह राज्यावर बसल्यानंतर थोड्याच दिवसांत नागपूरचे रघुजी-- भोंसले यांनीं सातारच्या राजाचें सैन्य घेऊन दक्षिण हिंदुस्थानांत दुस-- स्वारी केली. सातारकरांनीं या वेळपर्यंत ज्या मोठमोठ्या मोहिमा केल्या- त्यापैकींच ही एक होय. तंजावर येथील मराठे परस्पर मत्सरभा-- विसरले असते व त्रिचनापल्ली येथें जय मिळाल्यानंतर लढाईचें काम रघोजी भोंसल्यानें तसेंच पुढें चालविलें असतें, तर या मराठा सैन्यानें जो जय मिळविला तो शाश्वत झाला असता. परंतु त्रिचनापल्ली येथें एक सैन्याची तुकडी ठेवून व चंदासाहेबास पकडून रघूजी भोंसले साता-यास परतले. याच सुमारास उत्तर हिंदुस्थानांतील मोंगलांच्या सत्तारूपी वृक्षाच्या मुळाशीं कुहाडीचा घांव घालून तो वृक्ष उलथून टाकावा याबद्दल पेशव्यांची खटपट चालूं होती. इकडे उत्तरहिंदुस्थान तसेंच सोडून दक्षिणहिंदुस्थान कायमचें काबीन करावें, अशी मसलत कित्येक मराठा सरदारांनीं शाहूस दिलीं, व या मसलतीस अनुसरूनच रघोजी भोंसल्यानें दक्षिणेंत स्वारी केली होती. या स्वारीहून परत आल्यानंतर बंगाल्यांत व पूर्व हिंदुस्थानांत रघोजी भोंसला गुंतला, व दक्षिणेकडे हैदरअलीचा उदय होईपर्यंत मराठ्यांची सत्ता अगदीं नाहींशी झाली. पाँडेचरी येथील फ्रेंच गव्हरनर डुप्ले याचे सांगण्यावरून शाहूनें चंदासाहेबास अटकेंतून मुक्त केलें. यामुळें इंग्लिश व फ्रेंच यांमध्यें लढाई सुरू होऊन ती इ. स. १७५० पासून इ. स. १७६० पर्यंत चालली. तंजावरचे राजांनीं इंग्लिशांचा आश्रित महमदअल्ली याचा पक्ष धरिला. म्हणून फ्रेंचांचा स्नेही मुरारराव घोरपडे यानें त्यांचें फार नुकसान केलें. इंग्लिशांना तंजावरच्या राजास मदत करितां येणें शक्य नाहीं अशी संधि गांठून मुराररावानें तंजावर शहर लुटून फस्त केलें. पुढें फ्रेंच जनरल लाली यानें तंजावर लुटण्यास सुरुवात केली; परंतु या प्रसंगीं इंग्लिशांनीं मदत पाठविली. या कर्नाटकांतील लढायांत माणकोजीच्या हाताखालील तंजावर येथील फौजेनें इंग्लिशांचीं बाजू धरून फ्रेंचाविरुद्ध लढाई चालविली व मोठें नांव गाजविलें.

तंजावरच्या राजांनीं इंग्लिशांची बाजू घेतल्यामुळें आपलें इतकें नुकसान विरून घेतलें तरी, त्यास आलेला शह अजून नाहींसा झाला नाहीं. तंजा--र येथें संपत्ति फार आहे अशी ख्याति असल्यामुळें, नवाब महमदअल्ली --चा तंजावरावर डोळा होता. तो कांहीं तरी निमित्त काढून तंजावरच्या राजाबरोबर तंटा उपस्थित करी. शेवटी इ० स० १७६२ मध्यें इंग्लिशांच्या मध्यस्थीनें तंटा मिटला. त्यांत तंजावरचा राजा नावाबाचा मांडलीक आहे, त्यानें नावाबास चार लाख रुपये खंडणी द्यावी व इंग्लिशांनीं जामीन रहावें असें ठरलें. पुढें इ० स० १७७१ मध्यें - नवाबानें मद्रासेंतील इंग्लिशांची मदत घेऊन प्रतापसिंहाचा मुलगा तुळसाजी याजवर हल्ला केला. तुळसाजीस तह करणें भाग पडलें. या तहानें तुळसाजीला व त्याच्या संस्थानालाही अत्यंत कर्ज होऊन तंजावरच्या उत्पन्नाच्या पुष्कळ बाबीही कमी झाल्या. ह्या दुस-या तहांत तंजावरच्या राजाचे सर्व हितसंबंधांचा महमदअल्ली व त्याचे इंग्लिश सावकार यांच्या लोभास बळी द्यावे लागले. हे सावकार सांगतील त्याप्रमाणें मद्राससरकार चालत असे. इंग्रजांनी दिलेलीं वचनें पाळलीं पाहिजेत असा निर्बंध राहिला नाहीं. तंजावरचें राज्य तेथील राजाकडेच चालावें अशाबद्दल इंग्लिशांनीं जी हमी घेतली होती तीस त्यांनीं धाब्यावर बसविलें. इ० स० १७७३ त इंग्लिशांची मदत घेऊन महमदअल्लीनें पुनः लुटालूट करण्यास आरंभ के-- राजास कैद केलें, त्याचें शहर काबीज करून घेतलें व सर्व प्रांत नवाब-- खालसा करून आपल्या राज्यास जोडिला. हे लुटालुटीचे व विश्वासघाताचे-- प्रकार मद्रास सरकारानें आपल्या जबाबदारीवर व महमदल्लीच्या इंग्रि--- सावकारांचे फायद्यासाठीं सुरू केले होते. कोर्ट ऑफ् डायरेक्टर यांना या गोष्टीची मुळींच बातमी नव्हती. परंतु त्यांना जेव्हां वरील अन्यायाची सर्व हकीकत समजली, तेव्हां त्यांनीं मद्रास सरकारचा असल्या वर्तणुकीबद्दल फार निषेध केला. मद्रासच्या गव्हरनरास परत बोलाविलें व तुळसाजीस गादीवर बसविण्याचा त्यांनीं निश्चय केला; व तसे हुकूम सोडिले. त्या हुकुमांचा अंमल इ० स० १७७६ त झाला. तंजावर संस्थान नवाबाकडे तीनच वर्षे होतें, परंतु या तीन वर्षांत त्याने 'त्या प्रांतांची इतकी धुळधाण करून टाकली कीं, पुर्वीचें वैभव अल्पांशा--- प्राप्त होण्यास पुरीं दहा वर्षे लागलीं. याच सुमारास इंग्लिश व है---अल्ली यांच्यामध्यें लढाई सुरूं झाली, व इ० स० १७८२ आपल्या लुटारू फौजेकरवीं ह्या हतभागी तंजावर संस्थानचा उ-- करून हैदरानें आपला सूड उगविला. हीं सर्व संकटें अ-- असतांच, अकरा वर्षें राज्य करून तुळसाजी मृत्यु पावला. तंजा-- बालकाचा महाराष्ट्रमातेपासून वियोग झालाच होता. इंग्लिश व है--- अल्ली यांच्या कचाट्यांत तंजावर सापडलें होतेंच. त्याला मराठ्यांच--- स्वा-यापासून किंवा हैदरावर मिळविलेल्या जयापासून कांहींच म-- झाली नाही. ह्या वीस वर्षांत त्याची भयंकर दुर्दशा उडाली व --- लढाईत पडल्यानंतर दक्षिण हिंदुस्थानांत जरी शांतता झाली, तरी तंजाव-- कुदशा कधीं संपली नाहीं. बुडत्याचा पाय खोलांत म्हणतात त्याप्-- एक चकमक झडली. त्यांत धोंडोपंतास धोंडीनें ठार केलें. त्यावेळेस तेथें बापू गोखले ही होते. बापूससुद्धां थोडीशी दुखापत झाली. तेव्हां चुलत्याचा बचाव बापूंना करितां आला नाहीं. धोंडोपंत ठार झाल्यावर त्याच ठिकाणीं बापू गोखल्यानें त्यांचें दहन केलें, व पुढील क्रियाकर्मांतर जातिधर्मनियमाप्रमाणें पुण्यास येऊन करावें ह्मणून ते घरीं आले. परंतु धोंडपंताची चुलती त्याला घरांत येऊं देईना. तिनें बापूची अतिशय निर्भर्त्सना केली व आपल्या यजमानास ज्यानें ठार केलें, त्या धोंडी वाघावर सूड उगवेपर्येंत कोणतेंही और्ध्वदेहिक कृत्य करावयाचें नाहीं अशी बापूस ( आपल्या पुतण्यास ) तिनें ताकीद केली. अर्थात्च उत्तरक्रिया करण्याचें बंद झालें. पुढें लवकरच प्रसंग साधून बापू गोखल्यानें धोंडी वाघास गांवून त्यास ठार मारिलें व त्याचें शिर आपल्या भाल्यास लटकाऊन तें लक्ष्मीबाईस ( म्हणजे धोंडोपंताचे पत्नीस ) दाखविलें. तेव्हा त्या बाईचा क्रोधाग्नि शांत झाला व नंतर बंद केलेली उत्तरक्रिया संपविण्यांत आली.

व्यंकोजीच्या मागून त्याचे तीन मुलगे शहाजी, सरफोजी व तुकोजी हे एकामागून एक तंजावरच्या गादीवर बसले. त्या सर्वांनीं मिळून अजमासें पन्नास वर्षेंपर्यंत राज्य केलें. (इ. स. १६८७---१७३५ ) शहाजीच्या कारकीर्दींतील मुख्य गोष्ट म्हटली ह्मणने मोंगलांचा सुभेदार झुलपिकारखान याची तंजावरावर स्वारी होय. संभाजीस ठार मारून त्याचा मुलगा शाहू यास बादशहानें कैद करून नेल्यानंतर महाराष्ट्रांत राहून औरंगजेबाच्या फौजेशीं झुंजणें अगदीं अशक्य, असें सर्व मराठा सरदार मंडळास वाटलें. तेव्हां राजाराम आपल्याबरोबर अजून भगव्या झेंड्याचा अभिमान बाळगणारे कित्येक मराठा सरदार व मुत्सद्दी होते त्यांना घेऊन दक्षिणेंत आला व पाँडिचरीजवळ जिंजी येथें त्यानें आपलें ठाणें दिलें. तेव्हां मोंगल सैन्यानें दक्षिणेंत चाल करून जिंजीस वेढा दिला. एकदां या पक्षास जय तर दुस-या वेळेस उलट बाजूस, याप्रमाणें हा वेढा पुष्कळ वर्षें चालला होता. त्या अवधींत मोंगलांच्या सेनापतीनें तंजावरच्या राजापासून खंडणी वसूल केली व त्रिचनापल्ली प्रांतांतील तंजावरचा कांहीं भाग घेतला. शहाजीनंतर सरफोजी व तुकोजी हे तंजावरच्या गादीवर बसले. त्यांचे वेळीं तंजावर येथील मराठ्यांनी रामेश्वराच्या आसपास सर्व प्रदेशावर आपली सत्ता वाढविली. शिवगंगा व रामनाथ येथील जमीनदारांस इ. स. १७३० च्या सुमारास मराठ्यांनीं जिंकून आपल्या ताब्यांत आणिलें. हे जमीनदार ह्मणने छोटे जहागीरदार असत. तंजावर येथील गादीवर पराक्रमी राजा असे तेव्हां हे त्याला खंडणी देत; पण तोच जर दुर्बळ असला तर त्याची सत्ता हे जमीनदार पार झुगारून देत.

इ० स० १७६३ व १७७१ या सालीं मराठा सेनापति सिधोजी व माणकोजी यांनीं हा प्रांत पूर्णपणें जिंकून ते बरेच प्रसिद्धीस आले. व माणकोजीनें तर इ० स० १७४२ पासून १७६३ पर्यंत चाललेल्या युद्धांतही बरीच कामगिरी बजाविली.

व्यंकोजीच्या तीन पुत्रांच्या कारकीर्दीनंतर तंजावर येथील गादीवर इ० स० १७३६ पासून १७४० पर्यंत पुष्कळ राजे बसले. कारण कीं, कांहीं राने अकालीं मेले व कांहींना गादीवरून काढून त्यांच्या ठिकाणीं मोंगल सेनापतींनीं आपल्या हुकमतींत असणा-या राजांत गादीवर बसविलें. सरतेशेवटीं तंजावर दरबारांतील मराठा अधिकारिवर्गानें खटपट करून तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह यास इ० स० १७४० त गादीवर बसविलें. प्रतापसिंहानें २३ वर्षे राज्य केलें.

वर थोडक्यांत लिहिलेल्या हकीकतीवरून दिसून येईल कीं, मुसलमानी राज्याचा मोड झाल्यानंतर हिंदुस्थानांत जो धामधुमीचा काळ प्राप्त झाला, त्याचवेळेस मूठभर मराठ्यांनीं--फार झाले तर एक लाख पर्येंत असतील--जहागिरी मिळविल्या व नवीन राज्यें स्थापिलीं, इतकेंच नव्हे, तर त्यांची इभ्रत अजून पूर्वीसारखीच कायम असून अद्यापि त्या इलाख्यांतील लोकसंख्येमध्यें हेच लोक कायते प्रमुख आहेत. परंतु किती झाले तरी त्यांच्या प्राबल्याप्त खास ओहटी लागली आहे, इतकें आपणांस कबूल करणें भाग आहे. ह्मणूनच मराठा मंडळांतील संयुक्त राज्य कर्त्यांपेक्षां मराठे लोकांच्याच सद्दीच्या काळाचें वर्णन करण्याच्या बाण्यानें जो इतिहास लिहिला आहे, त्या इतिहासांत तंजावरच्या राज्याची हकीकत असणें जरूर आहे.

दक्षिण हिंदुस्थानांत मराठ्यांचा प्रथम प्रवेश, इ. स. १६३८ मध्यें शिवाजीचा बाप शहाजी हा आला, त्यावेळेस झाला. त्यासमयीं शहाजी विजापूर येथील अदिलशाही बादशहाच्या पदरीं असून ते सैन्य घेऊन दक्षिणेंत आला होता. या कर्नाटकांतील लढायांमध्यें शहाजी व त्याचे ' सैन्य तीस वर्षेंपर्यंत गुंतलें होतें. शहाजीनें म्हैसूर, वेल्लूर, व जिंजी हे प्रांत जिंकून घेतले. या कामगिरीबद्दल बक्षीस ह्मणून बंगळूर, कोल्लार, सीरा उर्फ कत्ता व म्हैसूर प्रांतांतील आणखी कांहीं भाग इतकी जहागीर इ. स. १६ ४८ ते त्याला मिळाली. या लढायांतच मदुरा ' तंजावर येथील पुरातन ‘ नाइक' संस्थानिकांना विजापूरच्या बादशहास शरण येऊन खंडणी देण्यास शहाजीनें भाग पाडलें. शहाजीनें पुष्कळ वर्षें बादशहाची चाकरी केली व त्याजवर बरे वाईट पुष्कळ प्रसंग आले. पण इ. स. १६६ ४ त तो निवर्तला, तोंपर्यंत म्हैसूर प्रांतांतील जहागीर त्याजकडेच चालली. बंगळूर येथें शहानीचें मुख्य ठाणें असून, दक्षिणेंत आलेल्या मराठा सैन्याचा तळही बंगळूरासच होता. शहाजी मेल्यानंतर त्याचा मुलगा व्यंकोजी याकडे ही जहागीर आली. त्यावेळेस तंजावर व मदुरा येथील ‘नाईक ' राजांमध्यें प्राणघातक तंटे सुरू होऊन त्यांत तंजावरच्या राजाचा पराभव झाला, तेव्हां तो विजापूरच्या दरबाराकडे आश्रयासाठी गेला. त्या दरबारानें, राजास गादीवर बसवावें, अशी व्यंकोजीला आज्ञा दिली. तेव्हां बारा हजार सैन्य बरोबर घेऊन व्यंकोजीनें चाल केली व त्या शरणागत राजास गादीवर बसविलें. तथापि त्या राजाच्या पक्षांतील लोकांचे आपआपसांत कलह होऊन एका बाजूच्या लोकांनी व्यंकेजीस बोलावणें पाठविलें, तुह्मीं तंजावरचा प्रांत काबीन करा अशी त्याला विनंति केली. मराठ्यांचे सैन्य येतांच । तंजावरचा राजा पळून गेला. तेव्हां व्यंकोजीनें तंजावर घेतलें (इ. स. १६७४) व बंगळूर येथील ठाणें उठवून तंजावर मुक्कामीं नेलें. (इ. स. १६७५. )

तंजावर येथें व्यंकोजी राज्य करीत असतांना, एक विशेष लक्ष्यांत ठेवण्याजोगी गोष्ट झाली. ती इ. स. १६७६ मध्यें शिवाजीनें त्या प्रांतांवर स्वारी केली ही होय. व्यंकोजीचा निभाव न लागून ही कर्नाटकांतील वडिलोपार्जित जहागीर अनायासें शिवाजीच्या हस्तगत झाली. तंजावर व त्रिचनापल्ली येथील या जहागिरीवर शिवाजीचाच हक्क आहे असें विजापूर सरकारानेंही कबूल केलें. आपल्या सावत्र भावास जय मिळाला ह्मणून व्यंकोजीची अगदीं निराशा झाली, तेव्हां - बैरागी होऊन संसारत्याग करण्याचा त्यानें निश्चय केला; परंतु शिवाजीनें त्यास एक खरमरीत पत्र लिहून त्यांत “ तुझें कर्तव्य काय ? व तूं करितोस काय " अशा प्रकारें त्याची नीट कानउघाडणी केली. तेव्हां व्यंकोजीचें मन वळून बैरागी होण्याचा त्यानें हट्ट सोडला. यावेळेस आपल्या भावाचें समाधान व्हावें ह्मणून शिवाजीनें अत्यंत उदारपणानें वडिलोपार्जित उत्पन्नावरील सर्व हक्क व्यंकोजीस दिला. ह्या औदार्याचा परिणाम पाहिजे होता तसाच झाला. व्यंकोजी पूर्वींप्रमाणेच संस्थानचा उपभोग घेऊं लागला. तो इ. स. १६ ८७ त मरण पावला. या प्रसंगीं आपल्या कर्नाटकांतील जहागिरीचा विशेष बंदोबस्त शिवानीनें केला असता तर मराठा संघाचा एक प्रकारें फायदा झाला असता; परंतु या राज्याची व्यवस्था व्यंकोजीकडे सोपविल्यामुळें, संयुक्त मराठाराज्या, पासून तें संस्थान अगदीं अलग राहिलें. अर्थात्च तंजावरचें अत्यंत नुकसान झालें. व्यंकोजी कांहीं शूर नव्हता. तेव्हां म्हैसुराकडील दूरचीं ठाणीं आपल्या ताब्यांत ठेवण्याचें त्यास अवसान नसल्यामुळें त्यानें म्हैसूरच्या राज्यास बंगळूर देऊन टाकिलें व त्याच्या मोबदला अवघे तीन लाख रुपये व्यंकोजीस मिळाले. याप्रमाणें तंजावरच्या राज्याचे विभाग होऊन तें परकीय राजांच्या हातांत गेल्यामुळें, महाराष्ट्र-साम्राज्य मातेपासून या तंजावर बालकाचा कायमचा वियोग झाला. नंतर लवकरच, एका बाजूनें इंग्लिश व दुस-या बाजूनें म्हैसूरचे राजे हैदरअल्ली व त्याचा मुलगा टिपू , यांनीं या छोटेखानी राज्यास घेरून त्याची दुर्दशा करून सोडिली.

तंजावर येथें जेवढे राजे झाले, तेवढे सर्व विद्येचे मोठे पुरस्कर्ते होते. त्यांच्यापैकीं कांहीं तर प्रसिद्ध कवि व पंडितही होते. त्यांचें औदार्य पाहून मन अगदीं थक्क होऊन जातें. तंजावर येथें पुस्तकालय आहे, तसलें मोठें पुस्तकालय हिंदुस्थानांतील दुस-या कोणत्याही संस्थानांत नाहीं. गायन, वादन इत्यादि कलांचा उत्कर्ष होऊन त्या अगदीं पूर्णत्वास पावल्या होत्या. त्यावेळेस दक्षिणेमध्यें अतिशय सुधारलेला व उच्चत्वास पावलेला असा प्रांत ह्मणने तंजावर, अशी त्याची कीर्ति होती, व तशी अजूनही आहेच. तंजावरचें राज्य मोडल्यानंतर तेथील कलापंडित त्रावणकोरास गेले. त्रावणकोर संध्यां इतकें प्रसिद्ध आहे तें यामुळेंच. कुंभकोण नांवाच्या बड्या शहरांत प्रसिद्ध मराठा घराण्यांचा चांगलाच शिरकाव झालेला आहे, व त्याच घराण्यांतील सर. टी. माधवराव, दिवाण बहादुर रघुनाथराव, वेंका स्वामीराव, गोपाळराव इत्यादि थोर पुरुष आपआपल्या धंद्यांत मोठे यश संपादून कीर्तिमान झाले आहेत. काहींकांहींचा तर राजकार्यधुरंधरत्व, विद्वत्ता व परोपकारबुद्धि इत्यादि गुणांबद्दल हिंदुस्थानांत मोठा लौकिक झाला आहे. त्रावणकोर व म्हैसूर येथील हिंदु राजांनीं गेल्या व चालू शतकांतही ह्या मराठा मुत्सद्यांस उदार आश्रय देऊन त्यांच्या अंगच्या गुणांचा पूर्ण विकास होण्यास चांगल्याच ---- दिल्या आहेत. त्रावणकोरचे दिवाण, ‘ इंग्लिश सु-- " यांनीं केलेली कामगिरी सर्वांस माहीत आहेच त्यांच्यानं-- पुष्कळ दिवाण झाले, त्यांत सर. टी. माधवरावांनी राज्यांतील अव्यवस्था व त्याचा कर्जबाजारीपणा नाहींसा करून सर्वांनीं कित्ता घेण्याजोगें संस्थान केलें. दिवाण बहादूर रघुनाथरावांच्या वडिलांनींही म्हैसुर संस्थानांत अशीच कीर्ति मिळविली.

उत्तर अर्काटमध्यें एक 'अर्नी'ची छोटी जहागीर आहे. ती अजूनपर्यत एका ब्राह्मण संस्थानिकाकडेच चालत आहे. ह्या संस्थानिकाच्या पूर्वजांनीं दोनशें वर्षापूर्वी विजापुरकरांच्या पदरीं लढाईत कामगिरी बजावली म्हणून त्यांना ही देणगी मिळाली होती. त्यावेळीं अर्काटच्या नावाबाच्या पदरीं दुसरेही ब्राह्मण असून ते प्रसिद्धीस आले होते. त्यांना ‘ निजामशाही ब्राह्मण' म्हणत असत. तसेंच पदुकोटचें लहानसें मांडलिक संस्थान अजून चांगल्या स्थितींत आहे. त्यांत मराठ्यांची बरीच वस्ती आहे. या संस्थानची व्यवस्था ब्राह्मण दिवाणांनींच चालविली व ह्यापैकीं अतिप्रसिद्ध ब्राह्मण, दक्षिणेंत आलेल्या मराठा वसाहतवाल्यांच्या कुटुंबांतीलच होते. कोचीन संस्थानांत पुष्कळ मराठा लोक आहेत. पैकीं बरेच निरनिराळ्या जातीचें ब्राह्मण आहेत व त्यांनीं व्यापारधंदा चालविला आहे. बल्लारीप्रांतांत सोंदा नांवाचें एक लहानसें मराठा संस्थान आहे. दक्षिणेंतील मराठ्यांची सत्ता नाहींशी झाली तरी हें। संस्थान अजून हयात आहे. या संस्थानाचा संस्थापक प्रसिद्ध संताजी घोरपडे यांच्या वंशांतीलच होता. संतानीचा नातू मुरारराव घोरपडे यानें इ० स० १७५० च्या सुमारास कर्नाटकच्या लढाईत बरेंच शौर्य दाखविलें व गुत्ती येथील छोटें संस्थान हैदरअल्लीच्या ताब्यांत जाईपर्यंत त्यावर मुराररावानें राज्य केलें. औरंगजेबानें महाराष्ट्रावर स्वारी करून मराठ्यांना पेंचांत पाडलें, तेव्हां शिवाजीचा दुसरा मुलगा राजाराम जिंजी येथें शहाजीचा किल्ला होता तेथें पळून गेला. ह्याच किल्ल्यास सतराव्या शतकाच्या अखेरीस मोंगलांनी वेढा दिला, पण सात वर्षेंपर्यंत ह्या किल्यानें शत्रूंशीं झुंझून मराठ्यांचे रक्षण केलें. येवढ्या मुदतींत आपली थावराथावर करून मराठ्यांना मोगलांशीं लढण्यास चांगलीच फुरसत मिळाली.

दक्षिण हिंदुस्थानांतील मराठे.
प्रकरण १२ वें.

हिंदुस्थानच्या अगदीं दक्षिणेस तंजावर हें एक मराठा संस्थान आहे. तेथील राजघराणें हिंदुस्थानांतील इतर ठिकाणच्या घराण्यांपेक्षां फार पुरातन असून सुमारें दोनशें वर्षेंपर्यंत (इ. स. १६७५-१८५५ ) त्या घराण्याचा पश्चिम हिंदुस्थानांतील ‘ मराठा साम्राज्या' च्या संस्थापकांशीं अगदीं जवळचा संबंध होता. असें असूनही ग्रांट इफ साहेबानें किंवा एतद्देशीय मराठी बखरकारांपैकी एकानेंही या दक्षिणेकडील मराठावसाहतीची विशेष हकीकत कोठेंच दिलेली आढळत नाहीं. या दूरच्या हतभागी संस्थानाची चमत्कारिक हकीकत वाचली ह्मणने मराठा साम्राज्याची शक्ति, मराठी संस्थानांचा संघ होऊन जी एकी झाली त्यांतच आहे, असें जें आमचें मत आहे त्यास विशेष बळकटी येते. आपलें हित निराळें, आपली कर्तव्याची दिशा निराळी, अशा समजुतीनें जे या मराठा संघापासून अलग राहिले त्यांचा, परकीय किंवा एतद्देशीय इतिहासकारांनींही मराठ्यांच्या इतिहासांत, कोठेंच उल्लेख केलेला नाहीं. अलग राहण्याची ही प्रवृत्ति सृष्टिक्रमाविरुद्ध आहे व ती पासून खेदकारक क होईना पण बोध घेण्या जोगा आहे; तो ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. कावेरी नदीच्या तीरांवरील ही दूरची मराठ्यांची लष्करी वसाहत होती. या वसाहतीपासून तिकडे जो एक शाश्वत परिणाम घडून आला त्याचें महत्व इ० स० १९८१ च्या सानेसुमारीवरून चांगलें लक्षांत येतें. या खानेसुमारींत मद्रास इलाख्यांत मराठे लोकांची संख्या सुमारें २,३०,००० होती. यांत म्हैसूर, कोचीन व त्रावणकोर येथील मराठे लोकांची संख्या (२०,००० ) मिळविली तर एकंदर बेरीन २,५०,००० पर्यंत होते. त्यांची वाटणी खाली लिहिल्या प्रमाणें झाली होती.

वरील कोष्टकावरून असें दिसतें कीं, मद्रास इलाख्यांत, मराठे कायमचें ठाणें देऊन अमुक प्रांतांत राहिले नाहींत असा एकही प्रांत नाहीं. दक्षिण कानडा, मलबार, कोचीन व त्रावणकोर या --- णीं मराठ्यांची अडीच लक्ष वस्ती आहे, पण ती वसाहत समुद्रकिना-याच्या बाजूकडून झालीं आहे, व तिचा आणि इ. स. १६५० च्या सुमारास शहाजी व त्याचा मुलगा व्यंकोजी, शिवाजीचा सावत्र भाऊ, यांच्या सैन्यानें जें राज्य स्थापिलें, त्याचा कांही संबंध नाहीं. शहाजी व शिवाजी यांच्याबरोबर दक्षिणेंत पुष्कळ मराठे आले होते. तेव्हां त्यांचे वंशज, तंजावर शहर व त्याच्या भोंवतालचा प्रदेश, उत्तर अर्काट, सालेम व मद्रास शहर, या ठिकाणीं पुष्कळ आहेत. त्रावणकोरच्या महाराजांनीं तंजावरला, “ मराठ्यांचें दक्षिणेकडचे घर " असें मोठें छानदार नांव दिलें आहे. तेथील राज्य, कोणी वारस नाहीं म्हणून, खालसा होऊन जरी पन्नासांहून अधिक वर्षें झाली, तरी तेथील राण्या त्या शहरांतच राहत असून त्यांना ब्रिटिशसरकारांकडून कांहीं नेमणूक आहे. शिवाय त्यांचीं खाजगी जिनगीही बरीच आहे. इ. स. १६६६-१६७५ पर्येंतच्या काळांत हें राज्य स्थापिलें, तेव्हां या तंजावर प्रांतांत, दक्षिण अर्काट व त्रिचनापल्लीचा संपूर्ण प्रांत यांचा समावेश होत होता. ह्या लष्करी वसाहतवाल्यांमध्यें मराठे व ब्राह्मण दोघेही होते. व दोघेही आपल्या देशापासून लांब असल्यामुळें महाराष्ट्रांत त्यांच्या उपशाखा होऊन ने जातिभेद झाले होते ते येथें विसरून सर्वजण देशस्थ या नांवानें परस्परांशीं बांधिले गेले.

दक्षिण हिंदुस्थानांतील मराठे.
प्रकरण १२ वें.

हिंदुस्थानच्या अगदीं दक्षिणेस तंजावर हें एक मराठा संस्थान आहे. तेथील राजघराणें हिंदुस्थानांतील इतर ठिकाणच्या घराण्यांपेक्षां फार पुरातन असून सुमारें दोनशें वर्षेंपर्यंत (इ. स. १६७५-१८५५ ) त्या घराण्याचा पश्चिम हिंदुस्थानांतील ‘ मराठा साम्राज्या' च्या संस्थापकांशीं अगदीं जवळचा संबंध होता. असें असूनही ग्रांट इफ साहेबानें किंवा एतद्देशीय मराठी बखरकारांपैकी एकानेंही या दक्षिणेकडील मराठावसाहतीची विशेष हकीकत कोठेंच दिलेली आढळत नाहीं. या दूरच्या हतभागी संस्थानाची चमत्कारिक हकीकत वाचली ह्मणने मराठा साम्राज्याची शक्ति, मराठी संस्थानांचा संघ होऊन जी एकी झाली त्यांतच आहे, असें जें आमचें मत आहे त्यास विशेष बळकटी येते. आपलें हित निराळें, आपली कर्तव्याची दिशा निराळी, अशा समजुतीनें जे या मराठा संघापासून अलग राहिले त्यांचा, परकीय किंवा एतद्देशीय इतिहासकारांनींही मराठ्यांच्या इतिहासांत, कोठेंच उल्लेख केलेला नाहीं. अलग राहण्याची ही प्रवृत्ति सृष्टिक्रमाविरुद्ध आहे व ती पासून खेदकारक क होईना पण बोध घेण्या जोगा आहे; तो ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. कावेरी नदीच्या तीरांवरील ही दूरची मराठ्यांची लष्करी वसाहत होती. या वसाहतीपासून तिकडे जो एक शाश्वत परिणाम घडून आला त्याचें महत्व इ० स० १९८१ च्या सानेसुमारीवरून चांगलें लक्षांत येतें. या खानेसुमारींत मद्रास इलाख्यांत मराठे लोकांची संख्या सुमारें २,३०,००० होती. यांत म्हैसूर, कोचीन व त्रावणकोर येथील मराठे लोकांची संख्या (२०,००० ) मिळविली तर एकंदर बेरीन २,५०,००० पर्यंत होते. त्यांची वाटणी खाली लिहिल्या प्रमाणें झाली होती.
वाटणी तक्ता

वरील कोष्टकावरून असें दिसतें कीं, मद्रास इलाख्यांत, मराठे कायमचें ठाणें देऊन अमुक प्रांतांत राहिले नाहींत असा एकही प्रांत नाहीं. दक्षिण कानडा, मलबार, कोचीन व त्रावणकोर या --- णीं मराठ्यांची अडीच लक्ष वस्ती आहे, पण ती वसाहत समुद्रकिना-याच्या बाजूकडून झालीं आहे, व तिचा आणि इ. स. १६५० च्या सुमारास शहाजी व त्याचा मुलगा व्यंकोजी, शिवाजीचा सावत्र भाऊ, यांच्या सैन्यानें जें राज्य स्थापिलें, त्याचा कांही संबंध नाहीं. शहाजी व शिवाजी यांच्याबरोबर दक्षिणेंत पुष्कळ मराठे आले होते. तेव्हां त्यांचे वंशज, तंजावर शहर व त्याच्या भोंवतालचा प्रदेश, उत्तर अर्काट, सालेम व मद्रास शहर, या ठिकाणीं पुष्कळ आहेत. त्रावणकोरच्या महाराजांनीं तंजावरला, “ मराठ्यांचें दक्षिणेकडचे घर " असें मोठें छानदार नांव दिलें आहे. तेथील राज्य, कोणी वारस नाहीं म्हणून, खालसा होऊन जरी पन्नासांहून अधिक वर्षें झाली, तरी तेथील राण्या त्या शहरांतच राहत असून त्यांना ब्रिटिशसरकारांकडून कांहीं नेमणूक आहे. शिवाय त्यांचीं खाजगी जिनगीही बरीच आहे. इ. स. १६६६-१६७५ पर्येंतच्या काळांत हें राज्य स्थापिलें, तेव्हां या तंजावर प्रांतांत, दक्षिण अर्काट व त्रिचनापल्लीचा संपूर्ण प्रांत यांचा समावेश होत होता. ह्या लष्करी वसाहतवाल्यांमध्यें मराठे व ब्राह्मण दोघेही होते. व दोघेही आपल्या देशापासून लांब असल्यामुळें महाराष्ट्रांत त्यांच्या उपशाखा होऊन ने जातिभेद झाले होते ते येथें विसरून सर्वजण देशस्थ या नांवानें परस्परांशीं बांधिले गेले.

मराठ्यांच्या हातांत सत्ता आली ती कांहीं सुखानें आली नाहीं; ती येण्यास फार त्रास सोसावा लागला. बादशहानें सनदा दिया ख-या, परंतु बादशहाच्या हुकुमाप्रमाणें करण्यास त्याच्या सुभेदारास भाग पाडणें, इतकें सोपें नव्हतें. सय्यद बंधूस अधिकारावरून काढून टाकल्यानंतर निजामउल्मुलुक हा दक्षिणचा सुभेदार झाला. बादशहानें केवळ निरुपाय ह्मणून ज्या सवलती मराठ्यांना दिल्या, त्या निजामास पसंत नव्हत्या. सबब वीस वर्षेपर्यंत निजामाशीं मराठ्यांना एकसारखें झगडावें लागलें. या लढाईत दुसरा पेशवा बाजीराव, बाळाजी विश्वनाथाचा मुलगा, हा फार प्रसिद्धीस आला. अखेरीस बादशहानें दिलेल्या सनदा आपणांस मान्य आहेत असें निजामानें कबूल केलें. पण सय्यद बंधू अधिकारभ्रष्ट झाल्यानंतर निजामानें कोल्हापूरच्या राजास आपला आश्रय दिला. त्याच्या बाजूचे आपण, असा तो बाणा बाळगूं लागला, व शाहूनें चौथाई व सरदेशमुखीबद्दल वसूल गोळा करण्यास अधिकारी पाठविले, तेव्हां कोल्हापूरच्या राजाचेही तेच हक्क आहेत, अशी निजामानें तक्रार केली. बाजीरावानें हा तंटा मिटविला व नवीन ‘फरमन’ करून घेतली. पुढें कांहीं काळानें निजामानें दुसरेंच भांडण उपस्थित केलें. महाराष्ट्रांत शांतता राखणें हें शाहूचें कर्तव्य होतें, "ते त्यानें बजाविलें नाहीं; तेव्हां चौथाई व सरदेशमुखीचा हक्कही शाहूस नाहीं असें निजाम ह्मणूं लागला. अर्थातच देघांमध्यें तंटा उत्पन्न झाला, व हा गधला कांटा काढून टाकण्यास दपटशहा देणें भाग पडलें. शेवटीं दोघांच्या सोईप्रमाणें कांहीं मुलखानी अदलाबदल करून व हैदराबादच्या अगदीं लगतच्या मुलखांत चौथाई व सरदेशमुखी घेणार नाहीं इतकी सवलत त्यास देऊन, बादशहानें दिलेल्या देणग्या रास्त व मान्य आहेत असें बाजीरावानें निजामास कबूल करावयास लाविलें. इ० स० १७३० च्या सुमारास कोल्हापूरच्या राजाशीं संगनमत करून निजामानें पुनः भांडण काढलें. चौथाई व सरदेशमुखी या हक्कांत आपला एक हिस्सा आहे अशी सबब पुढें आणली. परंतु पेशव्याच्या अजब युक्तीमुळें निजामास यश न मिळून त्याचा सर्व बेत फसला, व कोल्हापूरच्या राजास जी मदत तो देई ती त्याला बंद करणें भाग पडलें. शाहूचा सेनापति, प्रतिनिधि यानें खुद्द कोल्हापूर राजांचा पराभव केला. नंतर कोल्हापूर व सातारा येथील दोन राजाचा तह झाला. या तहांत असें ठरलें की, चौथाई, सरदेशमुखी, व स्वराज्य या बादशाही देणग्यांत कोणाचा हिस्सा नसून त्या शाहूनेंच उपभोगावयाच्या व कोल्हापूरच्या राजानें वारणेच्या दक्षिणेस तुंगभद्रेपर्येत जो मुलूख आहे तेवढा घेऊन संतुष्ट राहणेचें. याप्रमाणें तीन लढाया होऊन व दोनदा मंजुरी मिळून इ. स. १७३२ च्या सुमारास या बादशाही देणग्यास कायद्याचें रूप प्राप्त झालें व आतां मात्र सर्व लोकांस ते कायदा पाळावा लागला. इतकें झालें तरी तंट्याचीं कारणें समूळ नाहींशी झालीं नाहींत, पण यानंतर निजाम व मराठे सरदार यांच्यामध्यें ज्या लढाया झाल्या. त्यांत बादशहानें दिलेले हक्क कायदेशीर आहेत किंवा नाहींत हा प्रश्न नव्हता. इ. स. १७५३त मराठे व त्यावेळचा निजाम सलाबतजंग ह्या दोघांची लढाई होऊन निजामाचा पराभव झाला, व तह होऊन खानदेश आणि नाशीक ह्या प्रांतांतील सर्व मुलूख मराठ्यांच्या राज्यांत सामील झाला. इ. स. १७६०त पुनः लढाई होऊन मराठ्यांच्या सैन्यासच जय' मिळाला. आणि अहमदनगराकडील मुलूख व अहमदनगरचा किल्ला पेशव्यांच्या मुलखास जोडण्यांत आला. इ. स. १७९० च्या सुमारास असेच तंटे होऊन सोलापूर व विजापूर या प्रांतांपैकीं पुष्कळ भाग खालसा होऊन पेशव्यांच्या राज्यास जोडला गेला. कर्नाटकांत मराठ्याची लढाई निजामाशीं नव्हे, तर सावनूरच्या नावाबाशीं चालूं झाली वे बाजीराव पेशवे व त्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी तीन लढाया मारून विजापूर, बेळगांव व धारवाड हे प्रांत मराठीराज्यास जोडिले. सावनूरच्या नावाबाची सत्ता नाहींशी झाल्यावर हैदर व टिप्पू हे म्हैसूर प्रांतांत इ. स. १७६० ते १७९० पावेतों फार बलाढ्य झाले होते, व त्यांच्याशींच कर्नाटकांतील लढाया चालवाव्या लागल्या. ह्या लढायांनीं म्हैसूरकरांचा मोड झाला व मराठ्यांचें राज्य तुंगभद्रेपर्येत वाढलें. ह्याचप्रमाणें बाजीराव पेशव्याचा भाऊ चिमणाजीआप्पा व तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव यांनीं पोर्तुगीज लोकांबरोबर व जंजि-याच्या शिद्दीबरोबर लढाई करून तींत जय मिळविला. याप्रमाणें एका शतकाच्या अवधींत जवळजवळ सर्व महाराष्ट्र देश इतक्या निरनिराळ्या उपायांनीं मराठा मंडळाच्या हातांत आला. हा राज्याचा विस्तार लढाईमुळें झाला हें खरें; तरी त्याचें मूळ कारण चौथाई व सरदेंशमुखी देणग्यांनीं प्राप्त झालेले हक्क, हेंच दोय. हा विस्तार झाल्यामुळे “ स्वराज्य " या नांवाखालीं आतां फारच मोठा मुलूख मोडूं लागला. चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क सनदेंत लिहिल्याप्रमाणें पूर्वी तापी नदीच्या दक्षिणेस जे सहा सुभे आहेत त्यांवरच फक्त होता. परंतु पुढें वीस वर्षांनंतर सर्व बादशाही साम्राच्यावर तो हक्क लागू झाला. ह्मणने यांत उत्तरेकडील सर्व मुलूख-गुजराथ, काठेवाड, माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, दुआब, निमच, गोंडवण, संबळपूर, ओरिसा, आग्रादिल्ली, अयोध्या आणि बंगाल यांचासुद्धां समावेश होतो. हा राज्यविस्तार व अधिकारविस्तार याविषयीं आह्मीं पुढील एका भागांत लिहिणार आहोंत, परंतु त्याचें ठोकळ स्वरूप वर लिहिल्याप्रमाणेंच आहे. गेल्या शतकांत ज्याप्रमाणें पैका घेऊन सैन्य पुरविण्याचें, करून व लढाया मारून ब्रिटिश सरकारनें आपला अधिकार वाढवून त्यास कायदेशीरपणा आणला, त्याप्रमाणें मराठ्यांना चौथाई व सरशमुखी हे हक्क मिळाल्यामुळें त्यांची सत्ता वाढून ती कायदेशीर झाली. मराठा सरदारानीं हे ने जय मिळविले ते एकएकटेराहून नव्हे, तर सर्वांची जूट झाल्यामुळें ते मिळाले, यांतच या राज्यविस्ताराच्या इतिहासाचें महत्व आहे. यावरून अलग राहिल्यापासून काय परिणाम होतो हें चांगलें कळून येतें. कोल्हापूर व तंजावर येथील राजे एकलकोंडे राहिले ह्मणून, ज्याप्रमाणें चौथाई व सरदेशमुखी हक्क प्राप्त होऊन - पेशवे, गायकवाड, शिंदे, होळकर, भोंसले, विंचूरकर, बुंदेले, पटवर्धन, व इतर मराठे सरदार महत्वाचीं कामें बजावून प्रसिद्धीस आले, तसे वरील दोन राजांना येतां आलें नाहीं. बाजीराव पेशव्याचें राज्यविस्ताराचें धोरण अमलांत आणावें, की प्रतिनिधि यांचे सल्याप्रमाणें आहे तेंच रक्षण करून बसावें, या प्रश्नासंबंधानें एका मोठ्या प्रसंगी शाहूच्या मंत्रिमंडळांत बराच वादविवाद झाला. पेशव्यांच्या वक्तृत्वानें शाहूच्या अंगांत स्फुरण येऊन त्यानें, जुटीनें पाऊल पुढें टाकण्याचें धोरण आपणास संमत आहे असें सांगितलें. ह्या जुटीपासून कोणकोणतीं महत्कृत्यें साधलीं हें इतिहासांत महशूर आहेच. उलटपक्षीं अलग राहिल्यापासून नेहमीं नुकसान होतें हें दक्षिण हिंदुस्थानामध्यें मराठ्यांनीं प्रथम जिंकलेल्या मुलुखांच्या स्थितीवरून चांगलें व्यक्त होतें. ह्मणून जुटीमुळें झालेला वरील मराठी राज्याचा विस्तार, व अलग राहिल्यामुळें तंजावरच्या गादीवर बसलेल्या शिवाजीच्या भावाच्या वंशजांची झालेली क्षुद्र स्थिति, या दोहोंतील अंतर पुढील भागांत दाखविण्याचें आह्मीं योजिलें आहे.

याप्रमाणें, सत्तर वर्षेंपर्यंत सतत परिश्रम केल्यानंतर, इ. स. १६५० मध्यें आपले हक्काची मागणी करितांना शिवाजीच्या मनांत ने उद्देश होते, ते शाहूच्या मंत्रिमंडळानें सिद्धीस नेलें. मराठ्यांना त्यांचें पुरातन ‘स्वराज्य' पुन: मिळालें, इतकेंच नव्हें, तर या स्वराज्याची सीमा , वाढून, त्यामध्यें त्यावेळेस जेवढा मुलूख मराठ्यांनीं जिंकिला होता त्या सर्वांचा समावेश होऊं लागला व पुढेंही जो मुलूख मिळेल तोसुद्धा " त्यांतच घालण्यास जागा झाली. 'स्वराज्या' बद्दल जी सनद दिली होती तींत, घाटावरील प्रदेश, दक्षिणेंत हिरण्यकेशी नदी व उत्तरेस इंद्रायणी नदी यांच्यामधील शिवाजीनें जिंकिलेला मुलूख, पुण्याचे पश्चिमेकडील मावळ, सातारा व कोल्हापूर, म्हणजे पुणें, सुपें, बारामती, मावळ, इंदापूर, जुन्नर, वाई, सातारा, क-हाड, खटाव, मांड, [ माण ?] फलटण, तारळा, मलकापूर, आजरें, पन्हाळा व कोल्हापूर हीं येतात. पूर्वेकडे भीमा व नीरा या नद्यांमधील प्रदेशांतच बराच मुलूख होता. ‘ स्वराज्याचा ‘ घांटाखालील मुलूख म्हटला ह्मणने उत्तर व दक्षिण कोंकण, रामनगर, जव्हार, चौल, भिवंडी, कल्याण, राजापूर, दाभोळ, राजापुरी, फोंडा व उत्तरकानडा, अकोला व कुडाळ यांपैकीं कांहीं भाग हा होय. अगदीं दक्षिणेकडे गदग, हल्याळ, बल्लारी व कोपल हे प्रांत, शिवाजीनें तंजावर व जिंजी येथील ठाण्यांशी दळणवळण ठेवण्याकरितां आपल्या ताब्यांत ठेविले होते. ईशान्येस संगमनेर, बागलाण, खानदेश व व-हाड या प्रांतांत शिवाजीची कांहीं ठाणीं होतीं. हा जो अरुंद व उंचसखल पट्टा ह्यास ' स्वराज्य' म्हणत व हेंच “ स्वराज्य' शाहूस परत मिळालें. फक्त खानदेश प्रांत मात्र मिळाला नाहीं. पण त्याच्या मोबदला भीमानदीवर पंढरपूरच्या बाजूस आपली हद्द वादविण्यास त्याला परवानगी मिळाली. वहाड, खानदेश, औरंगाबाद, बेदर, हैदराबाद व विजापूर ह्या सहा सुभ्यांत चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला. बादशहाच्या दप्तरांत या सहा सुम्यांचें एकंदर उत्पन्न अठरा कोटी नमूद होतें. या उत्पन्नावर सरदेशमुखीबद्दल एक दशांश व चौथाईबद्दल एकचतुर्थांश इतका बोजा होता. या हक्कासंबंधीं बादशहाचीं मंजुरी मिळविणें अगदीं आवश्यक आहे, असें बाळाजी विश्वनाथास वाटण्याचें कारण, दुस-या कोणत्याही उपायानें देशांत स्वस्थता झाली नसती हेंच होय. दक्षिणेंतील निरनिराळ्या प्रांतांमध्यें कित्येक सरदारांनीं आपली सत्ता स्थापन केली होती; पण त्यांच्या व्यवस्थेंत शाश्वतपणा मुळींच नव्हता. जुनी परिस्थिति व नवी परिस्थिति, जुने मोंगलांचे सुभेदार, फौजदार व इतर मुलकी अधिकारी, व त्यांचे ठिकाणीं सत्ता स्थापन करणारे मराठे अधिकारी या दोघांमध्यें एकीचें बंधन असेल तरच सर्वांचें हित होईल अशी प्रत्येक बड्या अधिका-याची खात्री होऊन चुकली होती. चौथाईबद्दल जी सनद दिली होती, तींत असें एक कलम होतें कीं, शाहूनें बादशःहाच्या उपयोगी पडावे ह्मणून पंधरा हजार घोडेस्वार ठेवावेत. मोंगल सुभेदार सांगतील तसें निरनिराळ्या ठिकाणीं ते ठेवावयाचे. सरदेशमुखी जसें वतन, तसें चौथाई ह्मणजे वतन नव्हे तर देशांत शांतता ठेवणें व परचक्राचा प्रतिबंध करणें या कामगिरीबद्दल दिलेलें वेतन होय. सनदेंत लिहिल्याप्रमाणें सहा सुभ्यांचा जर भरपूर वसूल आला असता, तर मराठ्यांना साडेचार कोटी रुपये उत्पन्न आलें असतें. परंतु औरंगजेबाच्या लढायांनीं व स्वा-यानीं देशाची फार धुळधाण होऊन गेल्यामुळें वरील रकमेचा एकचतुर्थांशदेखी पदरात पडत नसे. मोंगल बादशाहींत सरकारचा स्थानिक खर्च एकंदर उत्पन्नाच्या एकचतुर्थाशाइतका असे व याच हिशेबावर चौथाई हक्क ह्मणजे शेंकडा २५ प्रमाणें मराठ्यांना दिला होता. ही चौथाई गोळा करण्याचें काम मराठ्यांकडेच सोंपविलें होतें. कारण कीं, एकंदर जमाबंदीपैकीं शेंकडा ७५ दिल्ली येथील खजिन्यांत भरणा होत असल्यामुळें, निव्वळ उत्पनांत कांहीं तूट पडत नसे. परंतु देशाची अगदीं दुर्दशा उडाल्यामुळें जितका वसूल भरणा होइ तितका बहुतेक चौथाई व सरदेशमुखीकडेच खर्च हाई व बादशाहाच्या खजिन्यांत त्यांतून कांहींच पोंच होईना. तेव्हां चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा दिल्या होत्या, तरी असंतोषाचें कारण राहिलेंच. सरदेशमुखी व चौथाई यास “ राजबावती ' असें नांव देऊन जेथें तेथें मराठ्यांचा पगडा बसला तेथून तेथून त्यांनी आपले पैसे उकळलेच. सरासरी वसुलाचा तीन चतुर्थांश भाग जमा करण्याचें काम पूर्वीच्या मोंगल सरदाराकडे होते; परंतु त्यांना वसून होईना, तेव्हां आस्ते आस्ते सर्व सत्ता मराठ्यांच्याच हातांत आली.

स्वातंत्र्याकरितां चाललेलें युद्ध संपलें व मराठे वीर कर्नाटक, गंगथडी व-हाड, खानदेश, माळवा व गुजराथ या प्रांतांची सरहद्द, ह्या ठिकाणीं आपलीं कायमचीं ठाणीं देऊन राहिले; तेव्हां यावरील कल्पनेचा साहजिकच जास्त फैलाव ---- व मोंगल सुभेदारांबरोबर जें तहाचें बोलणें चाललें होतें त्यांत पुष्कळ फेरफार करणें जरूर आहे असें बाळाजी विश्वनाथास व शाहूराजाच्या इतर मंत्रिमंडळास दिसून आलें. लढाई चालूं असतांना चौथाई व सरदेशमुखीविषयीं बोलणें चालविणें शक्य नव्हतें, व लढाई संपल्यानंतरही नष्ट झालेलें स्वराज्य पुनः स्थापन करणें -शाहूचा आजा शिवाजी याच्या ताब्यांत त्यास रायगड मुकामीं इ० स० १६७४ त राज्याभिषेक झाला, तेव्हा जेवढा मुलूख होता तेवढा सर्व मुलूख काबीज करून शाहूस परत मिळवून देणें-हाच मराठा पुढा-यांचा मुख्य हेतु होता. राजाराम मरणपावल्यानंतर ‘--राज्या' पैकीं कांहीं मागावर शाहूचा हक्क कबूल करून स्वराज्य परत मिळवून देण्याचे कामीं औरंगजेबानें स्वतःच सुरवात केली ह्मणावयाची. सुपें व इंदापूर येथील शाहूची पुरातन जहागीर, तसेंच अक्कलकोट व नेवासें हे महाल बादशाहानें शाहूच्या विवाहसमयीं त्यास अंदण दिलें. पुढें औरंगजेबानें शाहूचें मन वळवून, त्याजकडून मराठा सरदारांस, तुह्मी लढाई बंद करून बादशहास शरण या, अशा अर्थाचीं पत्रें लिहविलीं. या कामांत बादशहानें शाहूचीच योजना केली; यावरून त्यावेळेस मोगलांशीं झगडत असलेल्या मराठा फौजेचा शाहू हा नायक आहे, असें औरंगजेबानेंही कबूल केल्यासारखें होतें. इ. सन १७०५ त ही लढाई एकदांची आटपावी म्हणून, दक्षिणेंतील सहा सुम्यांच्या वसुलापैकीं शेंकडा १० ऐवज मराठ्यांना देण्याविषयीं औरंगजेब कबूल झाला. मात्र मराठा सरदारांनी घोडेस्वार ठेवून सर्वत्र शांतता राखावी असें ठरलें. याप्रमाणें पन्नास वर्षांपूर्वी शिवाजीनें सरदेशमुखीच्या देणगीबद्दल ने हक्क पुढें केले होते, त्या हक्कांची बादशहाकडून झालेला कायदेशीर कबूली पहिली हीच. मराठ्यांनीं आपल्या मागण्या वादविल्यामुळें बादशहाच्या वरील कबूलीचा कांहीं उपयोग न होऊन लढाई शेवटपर्येत चालावयाची ती चाललीच. औरंगजेबानंतर त्याच्या मुलांमध्यें हाडवैराचे तंटे सुरू झाल्यामुळें, लढाई बंद करणें भाग पडलें व शाहूची सुटका होऊन त्यास स्वदेशांत परत येण्याची परवानगी मिळाली. शिवाय त्यास असेंही कळविलें कीं, महाराष्ट्रांत सत्ता स्थापन करण्यांत जर त्यास यश आलें, तर झुलफिकारखान व बादशहाचा मुलगा अझिमशहा हे शिवाजीनें जिंकलेले प्रांत शाहूस परत देतील, शिवाय भीमा व गोदावरी या नद्यांमधील जहागीरही मिळेल. सातारा मुक्कामीं शाहू स्वराज्य स्थापून राहिल्यानंतर, दक्षिणेंतील मोंगलांचा सुभेदार दाऊदखान यानें मराठा सरदारांशीं तह करून कांहीं प्रांतांतील चौथाईचा हक्क त्यांना दिला. ही चौथाई शाहूच्या हाताखालील अधिका-यांनींच गोळा करणेची. ही व्यवस्था इ० सन १७०९-१७१३ पर्यत म्हणजे चार वर्षे चालली. पुढें दाऊदखानास बडतर्फ करण्यांत येऊन त्याच्या जागीं निजामउन्मुलूक यास सुभेदार नेमिलें. त्यास दाऊदखानाची व्यवस्था पसंत पडली नाहीं. तेव्हां अर्थात्च लढाई सुरू झाली. ती तशीच इ० सनं १७१५ पर्यंत चालली. त्यासालीं तह होऊन शाहूस मोंगलांच्या पदरीं दहा हजार घोडेस्वारांचा अधिकार मिळाला. निजामउस्मुलुकस दक्षिणेंतून परत बोलावून आणलें व त्याच्या जागीं नवीन बादशहानें सय्यद बंधूंपैकीं एकास नेमिलें. आपल्या अधिकारास जास्त बळकटी यावी म्हणून, या सय्यदसुभेदारानें एक शंकराजी नांवाचा वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध ब्राह्मण आपल्या पदरीं ठेविला. जिंजी येथील लढाईत या ब्राह्मणानें कामगिरी बजाविली होती व तेव्हांपासून तो काशीस जाऊन राहिला होता. या ब्राह्मणास सय्यदसुभेदारानें शाहूकडे वकील म्हणून पाठविलें. तेव्हां सुभेदाराच्या बाजूचा शंकराजी व मराठ्यांच्या बाजूचा बाळाजी विश्वनाथ, या दोघांमध्यें पुष्कळ वाटाघाट होऊन शेवटीं, ‘स्वराज्य' परत शाहूस द्यावें व दक्षिणेंतील सहा सुम्यांत चौथाई व सरदेशमुखी हे हक्क मराठ्यांस असावेत, असें ठरलें. कर्नाटकांतील पुरातन जहागीरही शाहूस परत द्यावी व नागपूरकर भोसल्यांनीं व-हाडांत मिळविलेला मुलूख त्यांच्याकडेच राहूं द्यावा. उलटपक्षीं शाहूनें बादशहास --- लक्ष रुपयांची पेषकुश द्यावी, कोणीकडूनही शत्रूचा हल्ला आल्यास त्याचा प्रतिकार करून देशांत शांतता राखावी, व पंधरा हजार घोडेस्वार बादशहाच्या नोकरींत ठेऊन, सुभेदार, फौजदार, व दक्षिणेंतील बादशहाचे इतर अधिकारी यांचेकडे जरूर पडेल तसे ते स्वार मदतीकरितां पाठवावेत. शाहूच्या तर्फें बाळाजी विश्वनाथानें मागितलेल्या ह्या अटी शंकराजीच्या मार्फत सय्यदसुभेदारास कळल्या. सय्यदानें त्या सर्व अटी कबूल केल्या व तहाचा एक मसुदा तयार झाला. सय्यदानें अशी एक अट घातली कीं, दक्षिण हिंदुस्थान, म्हैसूर, त्रिचनापल्ली, व तंजावर या प्रांतांतील जो मुलूख आपल्या ताब्यांत नाहीं, तो शाहूनें आपल्या खर्चानें । व आपल्या हिंमतीवर पाहिले तर काबीज करावा. लागलेंच शाहूनें सय्यदसैन्याच्या भरीला आपले दहा हजार घोडेस्वार पाठविले. सर्व प्रसिद्ध मराठा सरदार या सैन्यांत होते. पैकीं अगदीं मुख्य म्हणजे संताजी भोंसले, सेनासाहेब सुम्यांचे आप्त, उदाजी पवार, व विश्वासराव आठवले. सय्यदानें कबूल केलेल्या अटी बादशहाकडे मंजुरीकरितां पाठविल्या. परंतु सय्यदांच्या सल्याप्रमाणें वागणें बादशहास आवडत नसल्यामुळें, बादशहानें मंजुरी दिली नाहीं. सबब सय्यदानें एकदम दिल्लीवर स्वारी केली. मराठ्यांचे पंधरा हजार बलाढ्य सैन्य सय्यदाबरोबर गेलें. खंडेराव दाभाडे, बाळाजी विश्वनाथ, महादाजी भानू व इतर बडी मंडळीही या स्वारींत हजर होती. त्यांस फारसा प्रतिबंध झाला नाहीं. या स्वारींत संताजी भोसले व महादाजी भानू हे एका रस्त्यावर चकमक झडून तींत मारले गेले. नंतर बादशहाही मारला गेला व महमदशहा त्याचे मागून गादीवर बसला. त्यानें शाहू महाराजांकरिता बाळाजी विश्वनाथाजवळ --ज्य, चौथाई, व सरदेशमुखी यांबद्दल तीन सनदा देऊन टाकिल्या.