Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                                                                   लेखांक १६३

                                                                                                       श्री                                                        १६१८ आश्विन वद्य १                                                                              

                                                                                                                      30

आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य ताहा मोकदमानी मौजे इडमिडे सा। निब सुहूर सन सबा तिसैन अलफ मौजे मजकूर हा गाव श्री सदानंद समाधिस्थल कसबा निंब याचे पूजा नैवेद्य उत्सावानिमित्य पेशजी इनाम दिल्हा आहे त्याप्रमाणे करार आहे त्याचे शिष्य भवानीगिरी गोसावी आहत त्याचे रजा तलब वर्तोन मौजे मजकूरची कीर्द मामुरी करून उसूल त्याकडे देणे दुसरीयाकडे न देणे कोणेविशी चिंता न करणे रहदारी सरदारास ताकीद दिल्ही असे तुह्मी खुशबाल असत जाणे छ १४ रबिलोवल निदेश समक्ष

                                                                                                    163

                                                                  बार सुरू सुद बार

                                                                   

श्री.

स्मरण. शके १६७० विभवनामसंवछरे, माघ वद्य १३ शुक्रवार, ते दिवशीं असोजी बिन गंगाजी पा। झांजे मोकदम व ढोर व समस्त दाहीजण, मौजे वहिरे, ता माडोंगण, प्रा। कडेवळित, सरकार अहमदनगर, यांसी खंडोजी बिन हणवंतराऊ मोरे पाटील, मोकदम, मौजे शिंदेगव्हाण, ता। खेड, सा। जुनर, सु॥ तिसा अर्बैन मया अलफ, सन हजार ११५८, फारखती लेहून दिल्ही आहे कीं:–आमच्या वडिलाचें कर्ज तुमच्या वडिलाकडे रु॥ १००० एक हजार होतें. त्याचा तगादा श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांच्या विद्यमानें केला. त्याजवरून लिगाड वारलें. मारफत राजश्री जानबा निंबाळकर यांचे कारकून राजश्री गोविंदराऊ मलार खिजमतराऊ यांणीं चुकविलें. सबब कीं, वाहीरे जानबाची जाहागीर त्यांणीं वारले. फारखती मेरियापासून सदरहू वाहिरेयाच्या पाटिलाच्या नांवें घेतली. त्याजवर साक्ष देशमुखांची उभयतांची घातली. खंडोजी मेरियास पुसोन घातली. चैत्र शुद्ध १५ बुधवार शके १६७१.

श्री.

स्मरण. इ॥ चैत्र शुद्ध १ मंदवार शके १६७० विभवनामसंवछरे, सन हजार ११५७, सु॥ समान अर्बैन मया व अलफ. रोजमजकुरीं प्रतिपदा प्रातः काळीं दोन घटका होती.

शुद्ध २ रविवारीं साखराबाई वागचवरी लाडूबाई यांची मातुश्री कोरेगांउ भिवर येथें वारली असे, अवशीचे रात्रीं प्रहर सवाप्रहर रात्र ज़ाली होती. १

शुद्ध ३ सह चतोर्थी सोमवारी बाजीभट शाळग्राम पुणियांत वारले. पावणेदोन प्रहर रात्र उरली तेसमईं वारले. दिवस उगवला. सोमवार. त्यांची मातुश्री व भाऊ वगैरे महायात्रेस गेलीं होतीं तीं रविवारीं आलीं. रात्री बाजीबावा वारले. १

श्री.

यादी, हकीकत, सन ११५१.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान माघ                             फाल्गुण शुद्ध १० शुक्रवारी
वद्य १४ सोमवारीं मंडळियास                            पहांटेचें मंडळे शहर घेतलें आणि
रात्रीं आले आणि वेढा घातला.                           किल्ल्यास मोर्चे दिल्हे. १
दुसरे दिवशीं अमावस्येस मोर्चे
लाविले. १

चैत्र वद्य ३ रविवारी पहांटेस                             फाल्गुण वद्य ८ गुरुवारीं पहा-
हल्ला केली. दहा बारा सुरुंग                           टेस मंडळियावर हल्ला केली. तीन
उडविले. त्याणें कुसूं उडविलें,                         सुरुंग उडविले; परंतु मंडळाच्या
मग चालोन घेतलें. १                                      राजानें हल्ला मारून काहाडली.
लोक चढोन कुसावर निशाणें                          चैत्र वद्य ९ रविवारीं मंडळि-
नेलीं. राजा महाराजशाहानें आ-                       याहून कुच केलें, १
पल्या वाडियांत आपले कबिले
मारून मग हतियार धरिलें. त्या-
जला उरांत गोळी लागली, आणि
मृत्य पावला. श्रीमंत राजश्री पंत-
प्रधान यांची फत्ते जाली ! त्याचा
एक पुत्र कत्तल जाली तेथें मेला.
तिघे पुत्र यांजला सांपडले. त्यांत
दोघे जखमी होते. दोघे त्यांत
एक मेला. दोघे राहिले, व रा-
जाचा भाऊ एकूण तिघे राहिले.
वरकडे मृत्य पावले. राज्याचा
विध्वंस जाला. कलम १

श्रावण शुद्ध १ बुधवारीं श्रीमत् राजश्री नानाकडील पत्रें आलीं कीं, माळवियांत छावण्या जाल्या असेत, सुरंजे आसपास. १

श्रावण शुद्ध २ गुरुवारीं संध्याकाळीं श्रीमत् राजश्री नानास पहिला पुत्र जाला. ( पुढें गहाळ. )

पौष वद्य ७ बुधवारीं जिवबा चिटणीस, खंड परभूचे पुत्र, यास देवआज्ञा जाली, मा। सातारा. १

अष्टमीस गुरुवारीं चिंतो गणेश देशपांडे यांची स्त्री सौ। मथुरा इजला देवआज्ञा जाली असे, पुणियांत.

श्री.

यादी स्मरणार्थ. श्री शके १६६४, दुदभीनामसंवछरे, चैत्र शु॥ १ प्रतिपदा, शुक्रवासर, सन हजार ११५१, सु॥ इसन्ने अर्बैन मया व अलफ.

शंकरभट गोडबोले कोंकणस्थ चितपावन यांणीं पुणियांत शनवारपेठ उर्फ मुर्तजाबाद येथें सोमयाग करावयास आरंभ केला. बाबूजी नाईक जोशी यांणीं वाडा बांधला आहे त्यांत हत्ती बांधत होते तेथें केला असे.

राजश्री सदाशिव चिमणाजी यांस फोड्या निघाल्या, आजी फुगों लागल्या.

शुद्ध बीजेस शंभु लड़कज व वाघोजी लडकज माळी पुणेंकर यांणीं येऊन सांगितले की, यादोपंत कुलकर्णी गांवांत घर बांधत आहेत, श्रीबहिरवाच्या देवळास जावयाची गल्ली थोर गाडेबगाडे जावयाची आहे ते मोड़ितात, तीन हात गल्ली टाकूं ह्मणतात. असे सांगावयास आले होते,

                                                                                   लेखांक १६२

                                                                                                       श्री                                                        १६१८ माघ वद्य १३                                                                              

श्रीमत् तपोनिधी राजश्री भवानगिरी बावा गोसावी यासि स्नेहाकित परशराम त्र्यंबक नमो नारायण उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे यानंतर तुह्मी पत्र पाठविले ते पावले लि॥ वृत्त कळो आले गावाचे विशी राजश्री स्वामीचे पत्र पाठविले पाहिजे ह्मणून लि॥ व त्रिंबकपंताबा। जबान सांगोन पाठविले ते त्याणी सांगितले त्यावरून पत्र राजश्रीचे पाठविले आहे तें घेतलें पाहिजे आपल्या कार्यास आह्मापासून अतर पडणार नाही कळले पाहिजे छ २६ रजब

                                                                                 162

                                                                   

रोजमजकुरीं मोरगांवींहून अर्जदास्त आली कीं मोरोजी बिन विठोजी तावरी याचा लेक वेडो, त्यानें आपली बायको जिवें मारून मूठमाती देऊन पळोन गेला असे. १

रोजमजकुरीं पाऊस रात्रौ बरा पडिला. बहुत दिवस पडिला नव्हता. १

आश्विन शुद्ध चतुर्थी शुक्रधारीं +++ भोसले व +++ भोंसले याणी श्री देव चिंचवड यास पत्र पाठविलें कीं, भोसरीची पाटिलकी मान्याने आह्मांस विकत दिल्ही आहे, तेथील मुतालकीस नारो विश्वनाथ पा। आहेत, तर मौजे मजकूरचें पाटिलकीचें कामकाज यांच्या हातें घेतलें पाहिजे, मानपान, टिळाविडा, तसरीफइनाम यास देववणें. ह्मणून पाठविलें असे. १

पौष शुद्ध ४ चतोर्थीस बुधवारीं संक्रांत.

पौष शुद्ध ५ पंचमीस खेडकर कुसमट जोशी याजला पेशवियांनीं कागद करून दिल्हे की, तुमची वाट व मोरी, शामजी हरी खेडकर कुलकर्णी यांच्या वाडियांतून असे. त्यांणीं मोडिली असे. ते पाडणें. पूर्ववतप्रमाणें राहणें. मल्हारजी होळकर याचे भिडेनें इमारतींतून वाट देविली. भटापासून नवशें रु॥ घेतले. शामजीपंतापासून पांचशें रुपये घेतले. भटास पूर्वेस दरवाजा आहे व मोरी काढून द्यावयास जागा आहे. परंतु अट घेऊन बसला. डोये वाढविली. आतत्यायीस आला. मग येणेंप्रमाणें केलें असे. १

शुद्ध ७ शुक्रवारीं राजश्री बाळाजी बाजीराऊ येर्हवडियाच्गा राणांतून कुच करून लोहगांवचे हरणिलियावरी गेले. पुणेदेशचा तहरह, पिलाजी जाधवराऊ याजकडे पाटील गेले होते, त्यांणी मधें होऊन करार करून देविला. गुदस्तास साडे बावीस हजार रुपये सोड दिल्ही. पाऊसपाणी गेलें, याजकरितां मिरासपट्टी श्रावण भाद्रपदमासीं घ्यावी असें केलें असे. १
बणेरांची खंडणी करून जिवाजीपंताकडे वसुलास लाविलें. पुढें जातां जातां केंदूरच्या पाटिलकीचा मजकूर पाडिला होता. गांवडे ह्मणतात आपली पाटिलकी. त्याचा सुरत महजर केला. शेलारें अगोधर दमटली याजकरितां.

कसबे पुणें येथीलही खंडणी जातजातां केली. मुळखडीपावेतों गांवकरी गेले होते. कसब्याच्या महाजनाचें पागोटें दिल्हें नाहीं, पांडूचे कटकटेबद्दल.

पौष वद्य रुजू. शुद्ध १३ गुरुवारीं राणोजी उंदरा वारली, बावाजी पाटील सस्ता, मोसीकर रखमाजीचा लेक, आप्पाजीस दिल्हा होता. तोहि सोनगडाहून आला, पाणी लागोन मेला.

पौष वद्य १ रविवारी कल्याणराऊ पेशवियाच्या लष्कराबराबर अवंघास गेले.

वद्य ६ शुक्रवारीं भगवंतभट्ट धर्माधिकारी मेला.

पंधरा गुदस्ता दिल्ही होती. डव्हळियाची, हजीर होत नव्हते, ह्मणून दिल्ही नव्हती. पैबस्ता सदरहूप्रा। सत्रा दिल्हीं होती, त्याप्रा। दफ्तरी पाहून यंदा दिल्हीं. डव्हळियाची रयाती चाकरी पडती, याजमुळें दिल्ही. महाजनकीचें वस्त्र वडील मल्हार जोशी याणें घ्यावें. त्यास, पांडू दाहा पांच वरसें कारभार करीत होता, तोच घेत होता. या सालांत पांडोबा लश्करास गेले. मल्हार जोशी याचा भाऊ त्रिंबक जोशी याणें कारभार केला. तो वस्त्रास आला. पांडोबा ह्मणों लागला, मी घेत आलों आहे त्याप्रा। घेईन. त्रिंबक जोशी ह्मणों लागला, मी वडील आणि कारभार म्या केला आहे, मी घेईन. जोशीबावा ह्मणों लागले कीं, आह्मीं पांडूच्या हातें काम घेत आलों आहों, यास देत आलो आहों, याजला देऊं. ऐसें ह्मणोन वासुदेव जोशी व अंताजीपंत फडणीस यांणीं पांडोबास देविलें. त्रिंबकभट ह्मणों लागला, मी वडील, त्यास कां दिल्हे ? ह्मणून रघुनाथजी परभु व अमृतराऊ परभु चिटणीस यांणीं पांडोबास न द्यावें, ऐसे ह्मटलें. त्याजवरून जोशीबावांनी अमानत आपल्याशीं सरकारांत ठेविलें. परंतु वडील मल्हारभट त्यास महाजनकीचें वस्त्र द्यावें. पांडोबानें वस्त्राचे वेळेस उभें रहावयाचें नव्हतें.

ते दिवशीं जमीदार हजीर होते.

३ नि॥ देशमुख, जगन्नाथ अनंत व यादो मोरदेऊ व रामाजी शिवदेऊ.
३ देशपांडे, खंडो विसाजी, व गुंडोपंत, व बहिरो गोपाळ.
----

आश्विन शुद्ध १ मंगळवारी राणोजी शिंदे व रामचंद्रबावा चांभारगोंद्याहून आलेत. रोजमजकुरीं उरळी काउळ्यांची येथील कान्होजी झांबरा यास रात्री धोंडा घालून जिवें मारिला असे. खून जाला असे. १

आश्विन शुद्ध द्वितियेस पिलाजी जाधवराऊ वाघोलीहून आले असेत. मल्हारजी होळकर अमावाशेपूर्वीच आले असेत. १
शुद्ध ३ गुरुवारी आवजी कवडे आले असेत. १

                                                                                   लेखांक १६१

                                                                                                       श्री                                                        १६१८ श्रावण शुध्द १४                                                                              

                                                                                                   

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २३ धात्रुनाम संवत्सरे श्रावण शुध चतुर्दशी रविवासरे क्षत्रिय कुलावतस श्रीराजाराम छत्रपती याणी समस्त राजकार्यधुरधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री शंकराजी पंडित सचीव मदारुलमाहाम यासि आज्ञा केली ऐसी जे सदानद समाधिस्थल कसबा निंब याचे पूजा नै(वे)द्य उत्सवानिमित्य स्वामीने मौजे इडमिडे सा। निंब पा। वाई हा गाऊ पेशजी इनाम दिल्हा आहे तो तुह्मी त्याचे शिष्य भवानगिरी गोसावी याचे स्वाधीन केला तेथे त्याणी कीर्द मामुरी केली ऐसे असता राजश्री परशराम त्र्यबक याणी त्या गावास उपद्रव देऊन तेथील गुरे नेली ह्मणून विदित जाले त्यावरून तुह्मास हे पत्र लिहिले आहे व त्यासही आज्ञापत्र पाठविले तरी तुह्मी येविशीं रा। परशरामपतास सागणे व त्याकडील लस्करच्या लोकांस ताकीद करून त्या गावास उपसर्ग नव्हे इनाम सुरक्षित चाले आणि त्या समाधिस्थली पूजानैवेद्य उत्सव साग चाले ऐसे करणे जाणिजे बहुत काय लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा

                                                                                 14

                                                                    बार

श्री.

यादी. पुण्याची जमाबंदी सन ११५० पन्नासाची केली. त्याचीं वस्त्रें गांवकरियांस दिली. सन ११५१, छ २५ जमादिलावल, अधिक श्रावण वद्य द्वादशी, मंगळवारी दिल्हीं. काम कसबे मजकूर. राजश्री रघुनाथराऊ, राजश्री पंतप्रधानाचे बंधू, व राजश्री वासुदेव जोशी कारभारी यांणी दिल्हीं.
बिता।.

५ नि॥ मुजेरी
२ वाकोजी व महादजी पा। झोंबरे
बराबर एके हातें दिल्हीं. महादजी-
कडील चाऊजी पाटील होते.
१ मल्हार विश्वनाथ राजरुसी कुलकर्णी.
२ चौगुले
१ शेळको
१ बिबवा
-----

----

५ नि॥ मोहतर्फा.

२ बाबू शेटे व लक्षुमण शेटे.
लक्षुमणाकडील गंगाजी शेटे
होते बराबर.
१ महाजन वेव्हारे.
१ मल्हार जिवाजी ठकार कुलकर्णी.
१ राणोजी शिंदा डव्हळा रयातीचाकरीबद्दल.
---------

पैकीं अमानत महाजनाचे चार.
३ नि॥ माळी मेहत्रे ता। कुलकर्णी कान्हो माधव.
१ मेहत्रे
१ कुलकर्णी मजकूर
१ डव्हळियाचे ह्मणून
----

४ पेठ शहापूर
१ रामशेट शेटे.
१ कळवडा महाजन अवबा नाईक.
१ गोपाळ मोरेश्वर कुलकर्णी.
१ तुकोजी गोळक डव्हळा, रयाती चाकरीबद्दल.
-----

----

१७