Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६८
श्री १५६७ वैशाख शुध्द १
(सिका) (नकल)
राजश्री दादाजी नरस प्रभु देशपांडे व कुलकर्णी ता। रोहिरखोरे व वेलवडखोरे यासि प्रति सीवाजीराजे सु॥ खमस अर्बैन अलफ तुह्मास मेहरबान वजिराचा विजापुराहून हुकूम आला तो ठाणे सिरवलाहून अमिनानी तुह्माकडे पाठविला त्याजवरून तुमचे बाप नरसिबावा हवालदिल जाले वगैरे कितेक बहुतेक लि॥ त्यास शाहासी बेमानगिरी तुह्मी व आह्मी करीत नाही श्रीरोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोगरमाथा पठारावर शेद्रीलगत स्वयभू आहे त्याणी आह्मास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे त्यास बावास हवाल होऊ नये खामाखा सागावा आणि तुह्मी तो कागद घेऊन सिताब हुजूर येणे राजश्री श्रीदादापताचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इनाम जाले ते कायम वज्रप्राय आहे त्यात आतर आह्मी व आमचे वशज लेकराचे लेकरी वतन वगैरे चालविण्याविसी कमतर करणार नाही हे राज्य व्हावे हे श्रीचे मनात फार आहे त्याप्रमाणे बावाचे मनाची खातरी करून तुह्मी येणे रा। छ २९ सफर बहुत काय लिहिणे (मोहोर)
रुजू सुरनीस माहे सफर बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४९ ]
श्री शके १६७४ चैत्र वद्य १४.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री देवराव महादेव गोसावी यांसिः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. मामलतीचा मजकूर कितेक विस्तारें लिहिला तो सविस्तर विदित जाहला. ऐसियास, चिरंजीव राजश्री दादा येतील तेव्हां तुह्मीही येणें. तदोत्तर जें सांगणें तें सांगितलें जाईल. आपलें समाधान असों देणें. जाणिजे. छ. २७ जमादिलावल. सु॥ इसन्ने खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४८ ]
श्री
शके १६७४ चैत्र वद्य ९.
राजश्री दामोधर महादेव व पुरुषोत्तम महादेव गोसावी यांसी :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मलारजी होळकर व जयाजी शिंदे दंडवत विनंती सु॥ इसन्ने खमसैन मया अलफ. नवाब अहमदखान बंगस याच्या वाटणीस महाल बि॥
१ पा। सिधपूर
१ पा। मार्होडा जागीरदार साठीं हाजाराचे वजा करून बाकी.
-----
२
दोन माहाल दिल्हे असेत. त्यांचे तरफेनें येईल त्यास प्रा। मजकूरचा अमल जागीरदाराचे वजा करून लिहिल्याप्रमाणें देणें. छ. २२ जावल. बहुत काय लिहिणें ! ही विनंती.
लेखनसीमा.
श्री
राजा शाहू नर-
पति हर्षनिधान
बाळाजी बाजीरा-
व प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४७ ]
श्री शके १६७४ चैत्र वद्य ९.
श्री
राजा शाहू
नरपति हर्षनि-
धान बाळाजी
बाजीराव प्र
धान.
राजश्री दामोदर महादेव व राजश्री पुरुषोत्तम महादेव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥
मलारराव होळकर व जयाजी शिंदे दंडवत विनंती सु॥ इसन्ने खमसैन मया अलफ. पो। मार्होडीयांत सैद अमद सैदखान वगैरे यास जागीर असे. ५८,७८० अठावन हजार सातसें ऐशीची आहे. तेणेंप्रमाणें करार होऊन मशारनिलेकडे दिल्ही असे. सदरहूप्रमाणें जागीर प्रा। मजकुरी देणें. छ. २२ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ! ही विनंती.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४६ ]
श्री शके १६७४ चैत्र वद्य ९.
श्री
राजा शाहू
नरपति हर्षनि-
धान बाळाजी बाजी-
राव प्रधान.
राजश्री दामोदर महादेव व राजश्री पुरुषोत्तम महादेव गोसावी यांसि:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो.
मलारजी होळकर व जयाजी सिंदे दंडवत विनंती सु॥ ईसन्ने खमसैन मया अलफ. नवाब अहमदखान बंगस याच्या वाटणीस परगणे बीलराम दिल्हा असे. परगणे मजकुरांस अमील त्याचे तरफेनें येईल. त्यास अमल देऊन तुह्मी उठोन येणें. छ २२ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४५ ]
श्री शके १६७४ चैत्र वद्य ४.
राजश्री कोंडो निलकंठ सुभेदार दिमत सरदेशमुखी पा। जावळी व्याघ्रगड गोसावी यांसि :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।. हैबतराव केसरकर अजाहत सरदेशमुख रामराम. सु॥ इसनें खमसैन मया अलफ. तुह्मांकडे हप्त्याचा ऐवज फालगुण मासपर्यंत येणें आहे. तो अद्याप पाठविला नाही. तरी हालीं ऐवज आणविला असे. तरी सिताबी पाठवून देणें. वांसे सुमार ५०० पांचशें, व सर २५ पंचवीस, व कणसें १० दहा, व पानभारे १०० शंभर, ऐशी वळवण, शाखेस आंबे पाहिजेत. तरी आंबे पाठवून देणें. व चिंचाही रवाना करून देणें. या कामासी जोती जासूद, जथें नरोजी नाईक पा।, यासि मसाला रुपये दोन देणें. रा। छ ० १७ माहे जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
लेखना
वधि
स्वस्ति श्री सुखदामुद्राप्रतापो-
त्कर्षवर्धिनी सरदेशमुखस्यैषा
रामराजस्य राजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४४ ]
श्री शके १६७४ चैत्र शुद्ध २.
तिर्थस्वरूप राजश्री दादासाहेब वडिलांचे सेवेसी :--
बालकें दिवाकरानें चरणांवर मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार. विनंति. येथील क्षेम तागाईत छ रबिलाखर मुक्काम इंद्रप्रस्त वडिलाचें आशीर्वादेंकरून यथास्थित असे. यानंतर :- नवें वर्तमान, गांवाचा कजिया जाला होता, व अंताजीपंताची ठाणीं उठविलीं होती, तें सर्व वर्तमान पहिले सेवेसीं लिहिलें आहे, त्याजवरून कळलें असेल. आतां नवें वर्तमान जालें: छ १२ वें, राजश्री अंताजी माणकेश्वर आपले येथें आले होते. तीर्थस्वरूप बापू साहेबांसी वचन प्रमाण जालें. अंताजीपंतांनी सांगितले; जें तुह्मी सांगाल तें आह्मांस प्रमाणे आहे. ऐसें वचन प्रमाण बापूसी जालें. अंताजीपंत उठून घरास गेले. बापू पायीं बागांत जातांच अंताजीपंतास रुका पाठविला जे :--
रा॥ त्रिंबोपंत सुबेदारास दूर करणें व कल्याणसिंगास दूर कराल तर * तुमचें आमचें इष्टत्व जा.... .... .... इष्टत्व नाहीं.... .... वर्षां आहेत, तुह्मांसी गरज आहे, माझ्या घरचा कारभार यासी गरज काय ? ऐसें साफ उत्तर दिल्हें, व सांगितलें जें:– येथे इतकी लढाई जाली; माझे चारसे घो(डे) पडले, त्यांत एक दाहा घोडी आणखी पडलीं ऐसे जाणे ; नाहीं तर, माझी सोहाळची सराई घेतली आहे ती सोडून देणें. ऐसे साफ उत्तर दिल्हें. सेवेसी श्रुत होय. व आज शंकरचा रुका आला होता जेः- दोन हजार रुपये खर्चास पाठवणें. त्याजवरून तीर्थस्वरूप बापूसाहेबीं आज्ञा केली जेः-- हजार रुपये तर्ही पाठवणें. त्याजवरून म्यां विनंती केली जे, रुपये कोठून घ्यावे ? मग आज्ञा केली जे, दाजीरायाबाबत रुपये आहेत त्यांतून घेणें. मग म्यां विनंती केली की, खर्चावयास तितकेच रुपये आहेत. तर आज्ञा केली जे, त्याजकरितां इतके खर्च जाले. त्यांत हे एक हजार रुपये जाणावे. ऐसें ह्मणतात. सेवसी श्रुत होय. गिरदचे फौजदारीच्या नकला पाठविल्या आहेत. ह्या तगलिफी पहिल्यानें माझेपासी पाठविल्या होत्या की तेथें पाठवणें. त्या म्यां दोन ........ त्म्या होत्या; आतां बजिन्नस सेवेसी पाठवि............त
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४३ ]
श्री
शके १६७३.
राजश्री गोविंदराव गोसावी यांसिः-
आशीर्वाद उपरी. जिउबारायाजी एकनिष्ट होते त्या आलीकडे सर्व दरबारचें मुदसदी एकप्रकारचे जाणून सर्वप्रकारे तुह्मासच हातीं धरून बरा वाईट सवालजाब तुमचे हातून केला. तुह्मी यथाशक्ती आमचें कार्यास न चुकलेस. गत वर्षी यमाजीपंतांनीं भर देऊन सकवारबाई तुमचे केवल पाठीसच लाविली, ते प्रसंगी तुमचें दरवारीं कांहीं चालेना. तथापि तुह्मामुळें सकवारबाईचा दावा. सर्व ब्राह्मणांचा पेच कबूल करून तुमचीं मुलेंमाणसें पुण्यांत आणून ठेविलीं. तुह्मा रक्षावयास फौज दिली. तुह्मामुळें आह्मावर सकवारबाईनीं इतराजी, त्याचा काळ होय तों, कशी केली, हें तुह्मांस स्मरण असेलच. तुह्मी यमाजीपंताचें पेचामुळें, सकवारबाईचे पेचामुळें गडकरी सर्वप्रकारें आपले विचारांत घेऊन आमचा आश्रय केलात. आह्मीही तोच विचार शेवटपोवतों निभावला. तोंपावेतों आमचे चित्तांत तुमचेठाई ममतेस अंतर नव्हते. ज्याप्रमाणें बाबांचे चित्तांत तुमचा पक्ष त्याचप्रकारें आमचें चित्तांत. कां कीं तुमची बाबांचे ठाई निष्ठा तशीच आमचे ठाई. तदोत्तर राजश्री स्वामींनीं की तुह्मास लिहून त्यांस लिहून जवा बसे तें करावें, तेंही न करतां उफराटें राज्यभारास युक्त आह्मांस समत, तुमचें हित, ऐसा विचार अवलंबिला असतां ठाकून लांबणीवर घालून बसलेत. तुह्मास काय ह्मणावें ? एक, बाबूजी नाईक, देवराव यांचा दरबारी आह्मी अभिमान धरला, वेडेपणें अथवा शहाणपणें. तेवढेच तुह्मी व बाबांनी तटी लाऊन राज्य बुडविलेंत, व आमचें घर बुडविलेंत, या शहाणपणास काय ह्मणावें ? कलयुगांत खावंद तो वेडेच असतात. परंतु कार्यकर्ते शाहणे असतात, ऐसें ऐकत होतों, तेही येथे विपरीत दिसोन आलें. अद्यापही दुराग्रह टोकाल, विचारावर घ्याल, तर आमचा लौकिक राहील, राज्य वाचेल. येणेंप्रमाणें केलीया तुमचेही बरें होईल. याउपरी मनापासून आईसाहेबांस समजाऊन, भरंवसा पुरऊन, खालीं आणावी. नानांनीं तुह्मी मिळोन राजकार्य चालवावें. आज नासरजंग मेला. अशा प्रसंगांत तो मोठासा मनसबा केला पाहिजे. बाबा रागीट उठोन गेले. त्यास आमचा लौकिक मात्र जाहाला. परंतु थोडक्याच मजकुरावर आज एक वर्ष दुराग्रह वाढऊन या थरास आणिलें. आतां तरी विचार करून, समयसूचकता कराल तर सर्व कुशल होईल, नाहीं तर ईश्वर प्रमाण ! आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४२ ]
श्री.
शके १६७३.
राजश्री सखो माहादेव स्वामीस :-
विनंति उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पाऊन संतोष जाहाला. तुमचा समज आजच असा आहे असें नाहीं; पूर्वीपासून आहे. वरकड जें करितां ते बरेंच. त्याचा विषय फार थोडा. परंतु मातुश्री बोलवीत नाहींत, कामकाज सांगत नाही, हें लिहिलें, हें तरी फारच चांगलें. असें यामागें कधीं जाहालें नाहीं. मुख्य, मातुश्रीचे आज्ञेप्रमाणें वर्तणुक करावी; त्यांचे मर्जीस विरुध न पडे, असें असावें; तें तुह्मीं आज लिहिलेवरून कळलें. याउपर काय ह्मणावें ? खर्चवेंच जसा मातुश्री आज्ञा करितील तो करावा. भिडेनें मातुश्रीस एखादा घालतो, आपण समजून सांगावें. आज्ञेप्रों। वर्तणूक करावी. मातुश्रीस संवसार अगर सर्वत्र विषय कळतो. तो तुह्मांस कळावयासी बहुत जन्म पाहिजेत ! सारांउष, मातुश्रीची आज्ञेचा प्रकार, अगर मातुश्रीनीं खर्चवेंच केला तरी उत्तम आहे. ते जें करितात तें समजून करितात. तुह्मांस मात्र समजत नाहीं, इतकाच अर्थ. जसें मातुश्री सांगतील तसें करीत जाणें, ह्मणजे लक्षजोड आह्मांस तुह्मीं दिल्ही ! वरकड संवसार तुह्मीं आपले तर्फेनें अधिक उणें समजोन करणें, हें आह्मांसच धारजिणें नाहीं ; तुह्मांस तरी हें प्राप्त कसें असावें ? तें श्रुत नाहीं. जें चालतें तें बरेंच आहे. मातुश्री बोलावीत नाहीं. हे मात्र सर्वार्थी वाईट समजून, त्यांचे आज्ञेचा अर्थ समजोन, वर्तणूक करणें. वरकड समजलें आहे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री
शके १६७३
सेवेसी कृतानेक विज्ञापना. वरकड वर्तमान थोरल्या पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून कळेल. मातुश्री आईसाहेबाची भेटी उदईक होईल. आमचें येणें जालें. त्यास, इकडील मजकूर मनास आणतां बातमी ब्राह्मणमुखें ऐकिली. यशवंतरायाचें राजकारण येथें आहे. येथें स्वयाती लोक त्याचे आहेत, त्यांकडून आहे, ऐसें एका गृहस्थानें सांगितलें. अठल्याबद्दल कजिया पडला आहे. राजश्री फारसे प्रतिपक्ष बाबद भटाचा धरितात. बाईकडून अगत्यवाद फार आहे. दुसरें वर्तमान ऐसें ऐकिलें:--श्रीमंत राजश्री नानासाहेब राजश्रीस आपल्या लस्करास न्यावें, या निमित्य नारो व्यंकटेश नामें कोणी आहे, तो पाठविला आहे. तो राजश्रीसी निराळेंच बोलतो. ऐसें वर्तमान बोलतो. श्रीमंताकडून आमचे नांवे येथें राजश्रीस पत्र आलें ह्मणजे ग्रास पुर्ताच हाती लागेल. कळावें. भगतीबाद श्रीमंत भाऊसाहेबाचे ठाई आहे, ऐसें भाषणांतच दिसलें कीं, आह्मांस दर्शन जालें व एकांतीहि पुसिलें कीं, सदाशिवपंत खुशाल आहेत कीं ? आह्मी विनंति केली, स्वामीच्या प्रतापें खुशाल आहेत. राजश्री भाऊकडून राजकारणाचा जिवाळा राजश्री तात्याकडील येथें आहे. कळावें. पत्र वाचून फाडून टाकावें. आह्मांसहि जे काय आज्ञा होईल, ती लिहिली पाहिजे. हे विनंति.