Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६७
श्री १५६७ चैत्र शुध्द १३
(सिका) (नकल)
इजतअसार दादाजी नरस प्रभु देशपांडे कुलकर्णी ता। रोहिडखोरे व वेलवडखोरे यासि सु।। खमस अर्बैन अलफ वजारतमाहब सीवाजीराजे फरजद शाहाजीराजे याणे शाहाजीसी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिरेश्वरचे डोगराचे असराण पुडावेयाने मावले वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्यावरील ठाणे उठऊन आपण किल्यात सिरला हाली राजगड किला नाव करून बलकावला तो हि बेलवडखोर्यालगत त्यास लोकाचा वगैरे जमाव तू सामील असून फिसात करून रसिद राजे मजकूरनिल्हेस देतोस व ठाणे सिरवली आमिनासी रुजु राहत नाहीस व जमाव बितरजुमा करीत नाहीस व तनखा हि हरदु तपियाचा दिवाणात देत नाहीस मगरुरीचे जबाब ठाणगे व नाइकवाडियासि देतोस हे जाहिरात आले त्यास हे नामाकुल गोष्ट तुझे जमेदारीचे इजतीस आहे तरी ठाणेमजकुरी आमिनासी रुजू राहणे आणि तनखा साह करोन देणे हे न जालियास खुदावत शाह तुजला विजापुरी नेऊन गरदन मारतील व जमेदारी हककानु चालणार नाही हे मनी समजणे आणि याउपरी दिवाणात रुजू राहणे छ ११ सफर (मोर्तब पारसी सपैल कलम लि॥ आहे सदरहू पत्र पादशाही वजिराचे पारसी सिका मोर्तबसहित दफतरी आहेत)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ पौष वद्य ९
राजश्री नारो महादेव कमाविसदार प्रा। कखर गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो मल्हारजी होळकर दंडवत सु॥ इसन्ने खमसैन मया अलफ. राजश्री यशवंतराऊ पंवार यांनी आपले तर्फेची प्रा। मजकुराची कमाविस राजश्री दामोधर माहादेव यांसी सांगितली आहे. यांनी आपले तर्फेनें प्रा। मजकुरास राजश्री रामाजी मल्हार यांसी पाठविले आहे. तरी, ज्याप्रमाणें पेशजी वांटणी देत होता त्या प्रमाणें हालीं सालमजकूरच्या ऐवजी वांटणी हिश्शाप्रमाणें देणें. जाणिजे. छ २२ सफर. * बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री
शके १६७३ पौष वद्य ९
राजश्री पांडुरंग कृष्ण कमाविसदार प्रा। सौदर गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर दंडवत सु॥ इसन्ने खमसैन मया अलफ. राजश्री येशवंतराऊ पवार यानीं आपल्या तर्फेची कमाविस प्रा। मजकूरची राजश्री दामोधर महादेव यांसी सांगितली आहे. यानीं आपल्या तर्फेनें रामाजी मल्हार पाठविले आहेत. त्यास ज्याप्रमाणें पेशजी वाटणी देत होता त्याप्रमाणें हाली साल मजकूरच्या ऐवजी वाटणी हिशाप्रमाणें देणें. जाणिजे. छ २२ सफर. बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ पौष वद्य ९
राजश्री दामोधर महादेव व पुरुषोत्तम महादेव कमाविसदार महाला. निहाय गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर व जयाजी शिंदे दंडवत सु॥ इसन्ने खमसैन मया अलफ. प्रा हवेली कनोज येथील मजमू व फडणिशी हुजूरून + + + + (पुढें पत्र फाटलें आहे.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ पौष शुद्ध १५
पो। छ १४ मोहरम पांच घटका रात्र.
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेबाचे सेवेसी :-
विनंति सेवक बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना. ता। छ १३ मोहरम मु॥ हागेपळवे, पर्यंत साहेबाचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. विनंति. साहेबीं आज्ञापत्र सादर केलें तेथें आज्ञा जे: मोगलाची दाटी जाली, याजकरितां तुह्मीं मोगलांवरी गेला. राजश्री जगजीवन पंडित प्रतिनिधी यांस इकडे रवाना केलें. हें वर्तमान राजश्री मोरो शिवदेव व विठ्ठल बयाजी यांणीं लि॥. त्याजवरून पंडित मशारनिल्हे तुह्मांबरोबर राहण्याची आज्ञा केली असे. व वरकड सरदारांस आज्ञापत्रें सादर केलीं आहेत. तुह्मांस सामील होतील. अविंधाचा पराजय करून तुह्मीं हुजूर येणें. तुह्मांवरी साहेबाची कृपा पूर्ण आहे ह्मणोन आज्ञा. त्यांस, प्रतिनिधीबरोबर फौज नाहीं व साहेबासंनिधही या समयांत मातबर मनुष्य असले पाहिजेत. यांजकरितां प्रतिनिधीस हुजूर नेऊन तेथील बंदोबस्त करावा. सरदार सर्वांस सामील सेवकास व्हावें ह्मणोन पत्रें पाठविलीं ती उत्तम आहेत. सरदार जलदीनें फौजेनसी सेवकास सामील होत ते करणार साहेब धणी आहेत. साहेबाचा पुण्यप्रताप सेवकाचे मस्तकी असतां कोणेविसी मोगलाचा ठर धरीत नाहीं. जे होणे ते धन्याचे प्रतापेंकरून होईल. सेवेशीं श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ पौष शुद्ध १२
राजश्री बळवंतराव व गणपतराव स्वामी गोसावी यासी :-
विनंति. सदाशिव चिमणाजी नमस्कार. नानाची पत्रें पाठविली ती पावलीं. सर्व कळलें. तुह्मी लिहिलें तेंहि कळलें. ऐशियास, याचें उत्तरें सविस्तर लिहिली आहेत, त्याप्रों। नानांनी करावें. गोविंदरायांनी सुखरुप राहून करावें. लौकर हरएक काम फेंदी न पाडतां केलें असें करणें. तरच नानाचें दरबारी वजन. वरकड तेथें नाना राहिले ह्मणोन बाबाचे मनापासून पेच नाही. तरी सुखरूप राहून करणें. एकूण फेंदी पडलिया येथें नानाजवळहि हजार प्रकारचे संदेह पडतील यास्तव लौकर करावें. सविस्तर तेथील भाव नानापासून मला लिहून पाठवित जाणें. बाबाचा रंग पडे असा करून पाहतों. रा। छ १० सफर दोनप्रहर हे विनंति. यांच्यानें राजे खालीं किती रोजांत उतरतात ? किंवा आह्मी लिहितों याची नानास लबाडीच वाटून उगेंच राहतां ते हें लिहिणें, ताराबाईने बंड उभे केलें, तें मोडून उतरावें; व हरएक मनसुबा एक होऊन बाबांनीं नानांनी करावा, असें होते, बोलेला. वरकड खावंद आहेत. चित्तास येईल तें करतात ! नानांनी माझा संदेह बाळगूं नये. गोविंदरायाचें समाधान करून याप्रों। लौकर निदर्शनास आणून उतरणें हें उत्तम आहे. आमचा संदेहच पडत असला, तरी उत्तम आहे. तसेंच लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ मार्गशीर्ष वद्य ९
श्रियासह चिरंजीव राजश्री तात्यास. प्रती पुरुषोत्तम माहादेव आशीर्वाद उपरि येथील कुशल मार्गेश्वर वद्य ९ मु॥ गंगातीर अंतरवेद जाणून स्वक्षेम लिहिणें. विशेष. येथील वर्तनान पूर्वी तीर्थरूप राजश्री दादाहीं मुजरद जोडी पाठविली, लिहिलें आहे, त्यावरून विदित होईल. सांप्रतचें वर्तमान पठाण रोहिले आपले मुलकांतून पळाले. फौजा वजिराच्या व आपले सरदारांच्या त्याचे मुलकांत गेल्या. तमाम मुलुख पळाला. आपली ठाणी बसवितील. ईश्वरें महद्यश यांस दिले. आपणा उभयेतासमागमेंच लस्कराबराबर आलों. दादा वजिराबा।र, आह्मीं सरदारांबा।र आहो. एके जागाही सत्वरीच होतील. तीर्थरूप राजश्री बापू दिल्लीस सुखरूप असेत. तुह्मीं त्या प्रांतीचे सविस्तर वर्तमान वरचेवर लिहून पाठवावें. गुजराथचें काय जालें ? रुपये गुंतोन पडले. अमल बसतां दिसत नाहीं. श्रीमंतांचे प्रतापें सर्व उत्तमच होईलच. सावकाराचे रुपये घेऊन दिले हे चिंता लागली आहे. सविस्तर लिहून पाठवावें. विशेष. रा॥ राघोबा हिंगणे याचे रुपये १६५० सोळासे पनास येथें दिल्हे आहेत. तुह्मीं ती॥ राजश्री चिंतामण बापूस देऊन पावल्याचें उत्तर पाठवावें. राघोबा आह्मांजवळ सुखरूप आहेत. त्यांहीं पत्र लिहिलें त्याजवरून कळों येईल. बहुत काय लिहिणें ? तुह्मीं सदैव कुशल वृत्त लिहीत जाणें. भेट होईल तो सुदिन. हे आशीर्वाद. हे रुपये लिहिल्याप्रों। ती॥ बापूस प्रविष्ट करणें. कर्जाचे रुपये चिरंजीव राघोबाकडे आपले पहिले रु॥ आहेत. कदाचित् या ऐवजांत हेच घ्याल तर न घेणें. ते रुपये पुढें देतील. यास्तव हे रु॥ जरूर खर्चास बापूचे हवाला करून रसीद पाठवणें. हे आशीर्वाद.
पौ चैत्र वद्य ८.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ मार्गशीर्ष वद्य ५
पौ। छ० २२ मोहरम
श्रीमत् माहाराज मातुश्री आईसाहेबांचे सेवेसी :-
विनंति सेवक बाळाजी बाजीराज प्रधान कृतानेक विज्ञापना. सेवकाचें वर्तमान ता। छ० १८ मोहरम मु॥ घोडनदीनजीक मलठणपर्यंत साहेबांचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असें, विनंति. साहेबीं कृपा करून आज्ञापत्र सादर केलें. तेथें आज्ञा जे, राजश्री यशवंतराव दाभाडे सेनापति व सेनाखासखेल येथें आले नाहीं. तुह्मीं किमपी संशय न धरणें. तुह्मांस निमे गुजराथ दिल्ही ते दिल्ही. शत्रु आला, त्याच्या पराभवास्तव व सरदारांस सामील व्हावयाविशीं पत्रें हुजरे पाठविलीं आहेत. ह्मणोन आज्ञा. ऐसियासी, साहेब धणी कृपापुरःसर आज्ञा केली असतां, सेनापतीचा संशय छोट्या सरकारास होईल. सेनापति हुजूर जाते, तर्ही साहेब ताकीदच करितील. निशा आहे. मोगल जवळ्यापुढें गुणोरियावर कुकर्डाचे कडेस मुकामास आला. सेवकाच्या फौजा मोंगलाभवत्या लागल्या आहेत. नित्य झीटपीट होते. दहावीस घोडीं, शेंपन्नास बैल, आणितात. मोगल दोन कोस चालतो. साहेबाचा पुण्यप्रताप समर्थ आहे. तद्योगें शत्रूचा पराभव होणें तो होईल. सेवकास सामील व्हावयाविशीं सरदारांस साहेबी आज्ञापत्रें सादर केलीं, उत्तम आहे ! जलदीनें सामील होत तें करावें. तर साहेब धणी आहेत. एकाएकी मोगलानें दगाबाजीचा प्रसंग केला. हा समय सेवकाचे केवळ अबरूवर आहे. सेवकाची अबरू गेलिया मग राज्याची अबरू राहणार नाही, हा अर्थ सर्व साहेब जाणतात. तथापि अमर्यादा करून लिहिलें, याची क्षमा करून सर्व प्रकारें साहित्य केलें पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ कार्तिक वद्य १४
पो। छ १०
माहे मोहरम
तीर्थरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी.
आपत्यें पुरुषोत्तमाने कृतानेक सा। नमस्कार विनंति. येथील क्षेम ता। छ २७ जिल्हेज वडिलांचे आशीर्वादें करून यथास्थित असे. विशेष. येथील साद्यंत वृत्त पेशजी सरकारचे जाबी जोडीबा।र लेहून पाठविलें आहे, त्याजवरून विदित जालें असेल. सांप्रतचें वर्तमान तरी, खानखानाचे व बक्षीचे दुईमुळें उभयतांनीं परस्परें सफदरजंगासी सख्याचा पैगाम केला. त्याजला तों याजमध्यें हरकैसें फूट पाडणेंच होतें. यास्तव, खानखानांनी जें पत्र शुक्यासहवर्तमान पाठविलें, तें सफदरजंगानें बकशीस दाखविल्यावरी बकमीनें नजीबखान रोहिल्याचे हातें सलुका करून पातशाहास अर्जी केली कीं, सफदरजंगाची तकसीर माफ करणें, त्याजवरून पातशाहा बहूत दिलगीर जाले. खानखानानें बकसीस मारावयाची तदबीर केली ; यास्तव, बकशीनेंच त्यांची पैरवीं केली. कैसी ह्मटल्यास, आपण खुद्द विजारत घ्यावी. सफदरजंगाचे लेंकास बकशीगिरी, व सफदरजंगास मुतालक, वकालत, व अयुधेचा सुभा देऊन सुबे मजकुरी रवाना करावें, ऐसा रोहिलियांनी व बकसींनी जाटासी व सफदरजंगासी इत्यर्थ ठरविला. आणि अर्जी केली. त्या अर्जीचा जाब काय देतील ते पाहावे. मुख्य भयभीत होऊन बक्षी सफदरजंगासी एक जाले. अतःपर पातशाहाचे मातुश्रीस किल्याबाहेर ठेवणार ; व खानखानाजीची पुजा करणार, हा इत्यर्थ जाला आहे. पातशाहाची मर्जी सफदरजंगासी सलुक न कराक्याचे पल्यावरी पूर्वी आणिली असतां आह्मी या कामांत कैसे पडावें ? ह्मणून श्रीमंताचे आज्ञेप्रमाणें या कामांत न पडलों. बकसीसी व सफदरजंगासी आपले हातें सलुक न केला. कां कीं, रोहिले, बकशी, जाट, सफदरजंग, एक जाल्यावरी आपणासही मोठे बल याजला तोडावयास लागेल. यास्तव बक्षीपासोन षफथ घेतली की, श्रीमंत स्वामी व सरदार येथें आलियावर त्यांचे मर्जीसिवाय मी वागणार नाहीं. ते ह्मणतील तें करीन. परंतु आतां दुषमनाचे हातें वाचवावयाची फिकीर जसतसी करून, ते येत तोंवरता मकदूर मजहला पाडितों. हा कौलकरार घेऊन आह्मी पुनरोक्त दिल्लीस पातशाहासमीप आलो. मजहलियांत मजहला मोठाच पाडला. रोहिलियाची तलब पातशाहा न देत. यास्तव बकशीनें दिल्लीपासून कोळेपरयंत तमाम महाल त्याचे तलबेंत लिहून दिल्हे. यास्तव पातशाहा माधोसिंगाची व खानखानाची मिनत अतीशय करितात की, उभयतां मिळोन, सफदरजंगास, जाटास व रोहिलियासी, व बकशीसी, मारावें. ऐसियामी, ऐसा रोहिलियाचा मारा ! माधोसिंगजी व खानखानाजी आहेत, मग यांचेपुढे कोठून बाजी पेष होईल ? ईश्वरेच्छा काय आहे हे कळत नाही. जें होईल ते सो। लेहूं. कोण्ही कांहीं रयायत करील ऐसें नाहीं ? काम होय तोंवर कोरडी मिनत करितात. मनसब द्यावयासी तयार. जागीर कपर्दिकेची न देत. ऐसी कृपणसेना मिळाली आहे. तें, व घरची अवस्था कोठवर लिहावी ? श्री व वडिलाचे पुण्य लज्या रक्षीणार समर्थ आहे ! श्रीमंत स्वामीस व सरदारांस पत्रे मोघम लेहून वडिलांचे पत्रावर हवाला घातला आहे. श्रीमंतांस निवेदन करावे पूर्वी लिहिल्याप्रमाणें माझे नांवें फौजेचे नेमणुकेची सनद घेऊन, थोडी बहुत तर्ही फौज घेऊन पुढें वडिलीं सत्वर श्रीमंताची आज्ञा घेऊन यावेंकी कित्येक कामें होतील. जर फौज अति सत्वर ये प्रांतीं येत तरी उत्तम. नाहीं तरी कवडी मिळणार नाहीं. कां की, जे जागा मिळा-, वयाची, ते खालीं जालियावर कोठून मिळेल ? सत्वर फौज येत, व वडिलांचे पुढे फौज व सनद नेमणुकेची घेऊन अतिसत्वर येणें होय तें केलें पा।. येविसीं हैगै न करितां सत्वर येणार वडील समर्थ आहेत. पुढे जें होईल तें सो। लिहूं. कृपा केली पाहिजे. हे विनंति.
चिरंजीव तात्यास आसीर्वाद. सदैव कुशळव्रत लिहीत जाणें. हे आसीर्वाद. राजश्री त्रिंबकपंतास नमस्कार.
समस्तांस नमस्कार अनुकमें आसीर्वाद सांगणे. राजश्री सखारामपंतास व राजश्री गंगोबातात्यास सा। नमस्कार. तुमचे पुत्र सुखरूप आहेत. बहुत काय लिहिणे ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ भाद्रपद वद्य ५.
राजेश्री गोविंद तमाजी गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्त्रो। जयाजी सिंदे दंडवत सुहुरसन इसन्ने खमसैन मया अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. सविस्तर वर्तमान कळों आलें. रामसिंगाचा व बखतसिंगाचा कलह लागली आहे. सर्व रजपूत बखतसिंगा मिळोन रामसिंगा खारज केलें, ह्मणोन लेखन केलें. तर जें लिहिणें तें राजश्री पुरुषोत्तम महादेव लिहितील त्यावरून कळो येईल. जाणिजे. रा। छ १९ सवाल. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
श्री
मोर्तब
सुद.
श्री जोति
लिंगचरणीं तत्पर
राणोजीसुत ज-
याजी सिंदे
निरंतर.