Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९२ ]
श्री शके १६८० आश्विन शुद्ध १.
राजश्रियाविराजत राजमान्य राजश्री पुरुषोत्तम माहादेव गोसावी यांसीः--
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी विनंतीपत्र छ १५ मोहरमचें पाठविलें तें छ २५ मिनहूस पावलें. गाजुद्दीखान यांचे सांगितल्यावरून च्यार पाच प्रकारचे मनसबे लिहिले ते कळले. रोहिले पठाणाचा मजकूर अवगत जाहला. ऐसियास, गाजुद्दीखान हुजूर येऊन पठाणाचा दार मदार केला ह्मणून तुह्मांस पाठविलें. नाहीं तरी त्यास पदरीं घ्यावयाचें फारसें अगत्य नव्हतें. असो. तुह्मी हुजूर यावयाची उतावळी न करणें. मनसब्याचे दिवसही पुढेंच आहेत. त्यास, रोहिले पठाणांनी आमचे मर्जीप्रमाणें वर्तणूक करून कृपा संपादून घेतली तर उत्तमच जाहलें. नाहींतरी पुढें तुह्मांस बोलाऊन घेतलें जाईल. जाणिजे. छ २९ मोहरम.
लेखना
वधि.
पौ छ ८ सफर
बुधवार तिसरा प्रहर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८५
श्री १६१५ मार्गशीर्ष शुध्द ७
नकल
राजश्री मलार येसाजी सुभेदार व कारकून ता। मावल
प्रात राजगड गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य सेवक संकराजी नारायण नमस्कार सु॥ अर्बा तिसैन अलफ मो। बाजी सर्जाराव जेधे देशमुख ता। भोर ता। रोहिडखोरे याणी विदित केले की आपण राज्यामधी कष्ट मशागती केली ताबराची फिशात जाली त्या प्रसगामधी आपण एकनिष्टपणे राहून सेवा केली आहे विलाइत खराब पडली होती त्यास रयतेस धीर भरवसा देऊन वसाहात केली आहे त्यास आपले ता। मा।री इनाम गाव पुर्वीपासून चालले आहेत
मौजे अंबवडे १ मौजे नाटंबी १
मौजे चिखलगाव १ मौजे करी १
एणेप्रमाणे देहे च्यार पुर्वीपासून इनाम चालिले आहे त्यास आपण चदीचे मुकामी जाऊन राजश्री छत्रपतिस्वामीसन्निध विनती केली की आपले गाव इनाम आहेत ते दुमाला केले पाहिजेत त्यावरून राजश्री स्वामी कृपाळु होऊन ईनाम गाव सदराहू दुमाला करून पत्रे दिल्ही ऐशास सदरहू गाव आपणास दस्तमाफक दुमाला केले आहेत तरी तेणेकरून आपली अवकत चालत नाही तरी आपले गाव कुलबाब कुलकानु दुमाला केले पाहिजे तेथे कीर्द माहामुरी करून सुखरूप राहू ह्मणोन विदित केले त्यावरून मनास आणिता याणी राज्यामधी कष्ट मशागत केली आहे राजश्री छत्रपतिस्वामी कर्नाटक प्रातास गेले त्यासमई मोगलाची फिशात बहुत च जाली होती मा।रनिले एकनिष्ठेने राहून लोकाचा जमाव करून किले विचित्रगड गनिमापासून हस्तगत केला त्यावरी विलाइती कुल खराब पडली होती त्याची लावणी सचणी केली त्याउपरी चदीस जान राजश्री स्वामिसन्निध विनती करून सदरहू गावची दुमालपत्रे आणिली देशमुख मजकुर स्वामीकार्याचे एकनिष्ट याकरिता सदरहू याचे गाव कुलबाब कुलकानु याचे हवाला करण्याची तुह्मास आज्ञा केली आहे तरी सदरहू देह च्यार पूर्वीपासून चालले आहेत त्याप्रमाणे कुलबाब कुलकानु गाव दुमाला करणे दर साल ताजे सनदेचा उजूर न करणे सालमजकुरी दस्तमाफक (सिका) चालवणे पेस्तर सालापासून गाव कुलबाब कुलकानु दुमाला करणे सनदेची तालिक लेहून घेऊन असल सनद देशमुखापासी परतोन देणे छ ५ रबिलाखर निदेश समक्ष मोर्तब
सुरुसुद बार
पा। छ ११ जिल्हेज
सन खमस
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९१ ]
शके १६८० भाद्रपद
हिशेबाप्रो। रुपयांत मुजरा देऊं. यावर राजश्री अंताजी माणकेश्वः याजकडोन श्रीमंत स्वामीच्या सरकारांत लाख रुपये देविले होते. त्यासी वायदा होऊन चुकला. श्रीमंत स्वामींनीं अंताजीपंतास तगादा केला त्यांनी आह्मांस केला. त्यासी, आह्मीं विचार केला होता कीं, बाळाजी सामराज याजपासून लाख रुपये घेऊन वारावे. त्यासी, बाळाजीपंत कनोजी प्रांतीं आहेत; त्यांचे पुत्र नारोपंत; त्यांचा हिया होईना. बाळाजीपंतांस एकदोन पत्रे पा।, परंतु त्यांणीं टाळाटाळ केली. येथें कर्ज मिळेना ! आणि व्याजही देवेना ! जरूर संकट जाणून राजश्री अंताजीपंतीं श्रीमंत स्वामीसच आह्माकडोन लक्ष रुपये देविले. खाविंदांनी कृपा करून मान्य केले. त्यासी श्रीमंत स्वामींनी लक्षा रुपयाची वरात तुह्मावर राजश्री गंगाधर बाजीरायाच्या पथकाची केली आहे. मिती श्रावण वद्य १३ त्रयोदशीस रु॥ मितीची केली आहे. त्यासी, वरातेबरोबर आह्मीही आपलें पत्र तुह्मास दिधलें आहे. त्यासी, वरात व आमचें पत्र आलि-(या)-वर सकारून रुपये देणें. रुपये द्यावयाच्या तजविजीसाठीं हें आलाहिदा पत्र लिहिलें असे. त्यासी, राजश्री यादोपंत व तुह्मी एकत्र होऊन, वस्तभाव मोडून, रुपयाचा सरंजाम करून, रुपयाच्या संरंजामास तुह्मांस आठ च्यार दिवस लागतील. यास्तव राजश्री धोंडाजीनाईकी पत्र रघुनाथनाइकास लिहिलें आहे; ते रुपयाची सरंजामी करून देतील. हरएक उपायेंकरून त्या वरातेचे रुपये देऊन कबज घेऊन आह्मांकडे पा। देणें. रुपयाच्या सरंजामानिमित्तें राजश्री हरबाजीनाइकांसही पत्र लिहिलें आहे. धोंडाजीनाइकीं श्रीमंत स्वामी पुण्यास आहेत, त्यांची ममता आपल्याकडे कैसी आहे ? हें हृद्गगत वर्तमान मनास आणून आह्मांस वरचेवर लिहीत जाणें. यानंतर राजश्री यादोपंतांस सांगून गुजरातचा हिशेब वरशाचा वरशास व्याज, मुद्दल, व मुशारा, ऐसा एकत्र करून तयार करून ठेवणें. व्याज चकरवाडीचें करून ठेवणें. त्याचे दस्ताऐवज व संदा लावून ठेवणें. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३९० ]
श्री
शके १६८० श्रावण.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री चिंतामण दीक्षित पटवर्धन स्वामीचे सो।:--
सेवक बापूजी माहादेव, व पुरुषोत्तम माहादेव, व देवराऊ माहादेव सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पा।. विशेष. रा। धोंडाजी नाईकांनी एक लाख चौसष्टीच तकलुक तुह्मांस देविला. त्यास, त्यांचा आमचा हिसेब किती हा होणें हिसेबी वाजिवी आमचा रु॥ निघेल, तो यो रुपयांतून व्याजसुद्धां मुजर घेऊन, बाकी राहील तें सरकारचा लाझ्या वारल्या वर्षांत देऊ. यासी व्याज दरशेकडा अडचोत्र्या प्रमाणें देऊं. मिती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८९ ]
श्री शके १६८० श्रावण शुद्ध ३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजी महादेव गोसावी यांसिः--
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मांकडे सरकारचा ऐवज करार केला आहे. त्यापैकी राजश्री अंताजी माणकेश्वर यांनी एक लाख रुपयांचा हवाला घेऊन श्रावणअखेर द्यावयाचा करार केला. ते हालीं मा।रनिलेनीं तुह्मांकडून देविले आहेत. तेबा। देणें, पथक दिंमत गंगाधर बाजीराव यास रुपये १००००० एक लक्ष रुपये देविले असते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस पावते करून पावल्याचें कबज घेणें. रा। छ २ जिल्हेज. सु॥ तिसा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? लेखन सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८८ ]
श्री शके १६८० श्रावण शुद्ध १.
सहस्रायु चिरंजीव राजश्री तात्या यासीः--
प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। २९ जिल्काद जाणून तुह्मी आपलें क्षेम लिहित जाणें. विशेष. तुह्मी झाशीहून मातुश्री सहवर्तमान स्वार झालियावर नाशकास पोहचलियाचें वर्तमान कांहीं कळत नाहीं. श्रीमंत स्वामीचे पांचलक्ष रुपये देणें. त्यासी रा। माणकोपंतास समागमें घेऊन गेलात. त्याशी, झाशीमधें व नाशकांत त्यासी काय रुपये दिधले ? त्याची निशा कोणें प्रों। केली ! हे कळत नाही. कारण कीं, त्याचाहि वायदा चुकोन गलो. येथें दीक्षित तागा करितात, यास्तव, सविस्तर वर्तमान लिहिणें. यानंतरः-- मौजे चांदोरीची जप्ती उठोन गांव बाळजोशाचे स्वाधीन केला किंवा नाहीं ? राजश्री बाळाजीपंत मांडोगणे नाशीक येथील घराच्या जप्तीस आले होते. त्यासी, घरांतून काय काय वस्ता घेऊन गेले, हें तपशीलवार लिहून पा। कीं, श्रीमंत राजश्री दादासाहेबांसमागमें आहे. श्रीमंतांनी आज्ञा केली आहे कीं, पुण्यास गेलियावरहि निमितें कीं श्रीमंत स्वामीचे भेटीस येतो. हे रुपये मुजरा घ्यावे लागतात. श्रीमंत स्वामीस सा लक्ष रुपये साहुकाराचे काढून दिधले. त्यासी, साहुकारास हरएक उपायेंकरून द्यावे लागतात. दीक्षिताना घरें, वस्तभाव, लेहून घेतलीं हें सर्व तुह्मांस विदितच आहे. पुढें आह्मीं दरबारास येतों. श्रीमंत स्वामींनी कृपा करून कामाकाजाचा बंदोबस्त करून देतील ह्मणजे त्यासी सुराखुरा होऊं. चिरंजीव राजश्री नाना शिंद्याच्या लष्करांत आहेत. चिरंजीव गणपतराऊ व राजश्री त्रिंबकपंत दिल्लीस पाठविले आहेत. त्यांचेंहि पत्रें आली. सुखरूप आहेत. स्वामीचें वोझें डोईवर आहे तोपरियंत खर्च बहुत विचारानें करणें. जोपरियंत त्यांची कृपा होऊन कामकाजाचा बंदोबस्त होय तोपरियंत प्राप्ततीचा विचार नाहीं, आणि साहुकाराचा पैसा देणें, असें संकट आहे. तुह्मांसहि सर्व विदितच आहे; परंतु सुचनार्थ लिहिलें आहे. हरएक तजवीज करून लाख रुपये देऊन कबज घेणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. पौ। छ २३ जिल्हेज.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८७ ]
श्री शके १६८० श्रावण शुद्ध १.
पौ छ २२ माहे जिल्हेज.
राजश्रियाविराजित राजश्री यादो रंगनाथ स्वामी गोसावी यासीः--
सो। बापूजी महादेव नमस्कार विनंति उपरि येथील कुशळ छ २९ जिल्काद जाणून तुह्मी आपलें कुशळ लिहीत जाणें. विशेष. मातुश्री व चिरंजीव तात्या त्या प्रांतास आले, त्यांणी वर्तमान निवेदन केलेंच असेल. यावर, बहुत दिवस जाले ; तुमचें पत्र येऊन वर्तमान न लिहिलें; तर तेथील सविस्तर वर्तमान लिहिणें. श्रीमंत स्वामीस सा लक्ष रुपये देणें लागले. त्यापैकीं अंताजी माणकेस्वरांनी लक्ष रुपयांचा हवाला घेतला. चिंतामण दीक्षित यांनी पाचा लक्षांचा घेतला. दीक्षितांच्या तर्फेनें माणकोपंत आले होते, त्यांचा निकाल कैसा केला, त्यांच्या पदरीं वस्ता काय मोडून घातल्या हें तपसीलवार लिहून पा।. हली, अंताजी माणकेस्वराच्या लक्षा रुपयांच्या हवाल्या बाबद वरात, श्रीमंत स्वामींनी गंगाधर बाजीरायाच्या पथकाची केली आहे. त्यासी, तात्या, तुह्मी, एकत्र होऊन वस्तभाव मोडून त्यांच्या पदरीं ऐवज घालणें. दीक्षितांचे लाख पन्नास हजार बाकी राहिले, तर आह्मी येऊन निकाल करून देऊं. सारांष गोष्ट, सा लक्षा रुपयांचा साहुकारांचा निकाल करून दिधला पाहिजे. गुजरातच्या हिसेबाचा मजकूर तात्याच्या पत्रीं लिहिला आहे, त्याप्रों। व्याजमुद्दल वरशाच्या वरशास चकरवाडीचा हिसेब तय करून ठेवणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
गिरधर व लक्ष्मण यास आशीर्वाद.
राजश्री बंदूजी सुतार यास आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८६ ]
श्री शके १६८० आषाढ वद्य १४.
चिरंजीव साहेबास अनेक आशीर्वाद उपर येथील क्षेम ता। छ २७ जिल्काद मु॥ नदी वासन नजिक उदेपूर तीस कोस जाणून स्वक्षेम लिहिणें. विशेष. इकडील वृत्त सविस्तर अलाहिदे पुर्वणीवरून कळेल. विशेष. रा। अंताजीपंतास सा महिनिया लाख रुपये द्यावेसे करार केला. व बाळाजी शामराजाकडून लाख रुपये घेऊन द्यावे. त्यांनी आजवर देतों देतों केलें. शेवटीं अंताजीपंताचा तगादा सख्त लागला; माणसें बसलीं; कष्टाचा पार लिहावासा नाहीं ! मुख्य बाळाजी पंताकडून पन्नास हजार रुपये येतील यांत संदेह नाहीं. जोवर तो रुपया ये, तोंवर यांचा तगादा कोठवर सोसावा ? यास्तव रा।. धोंडाजी नाइकाचे विचारें हे गोष्ट ठैराविली की, बाळाजीपंताकडील ऐवज तुह्मांकडे पोहचावून द्यावा. श्रीमंताचे तनखेदारास जेंवर हा रुपया पोहचे तोंवर कर्जवाम करून, रा। रघुनाथनायकाचे विचारें लाख रुपये द्यावे. विना दिधल्या जीव न सुटे; हें जाणून श्रीमंताचे तरफेनें रा। गंगाधर बाजीरायाचे पथकासी एक महिनियाचे वायदियानें लाख रुपयाची तनखा घेतली, व अंताजीपासून सुटलों. त्यांचे रुपये दिधले पाहिजेत. वायदियास आठरोज अधिक लागले तर, गम खाऊं, हा करार करून घेऊन तुह्मांवर चिठ्ठी दिधली. हे संकट पार पाडलें पाहिजे; यास्तव, राजश्री रघुनाथनाइकास रा॥ धोंडाजीनाइकाचें पत्रें -परमारें व तुमचेहि पत्रांत-- पाठविलें आहे. जसे बनेल तसें कर्जवाम करून हें झट वारावें. व बाळाजीपंताचा ऐवज पाठवूं तो कर्जदारास देणें. याप्रों। ठैराविलें आहे. पत्र तुह्मांस अगाऊं पाठविलें असे कीं, रुपये देणें आले; दिधल्याविना गत्य नाही. येथें ऐवज नाहीं. बाळाजीपंताकडून यावयास दोन दिवस अधिक लागतील, यास्तव हें कर्म केलें. तें पार पडून पत व जीव राहे तें करणें. विशेष खोलून लिहावें तर, तुह्मी सर्व जाणत आहां; लिहावेंसे नाही. जर या गोष्टीस आगेंमागें देईन ह्मणतो तर प्राण तो गेलाच, मुखावर फासण्या होत्या. यास्तव हिमत धरून हें काम करणें. आशाढ वा। १३ पासून श्रावण वा। १३स लाख रुपये देणें करार ठैरला असे. त्याप्रों। देऊन रसीद घेऊन पाठवणें कीं, अंताजीपंतापासून खत घेऊं तें करणें. हरतजविजीनें रुपये देणें. यादोपंतास व लक्ष्मण गिरधरास फारच समाधानानें ठिवणें. कांकी, पुरातन चाकर कामाचे आहेत. त्यास सरफराज केलेंच असेल. मायेंत ठिवणें. मुख्य हरतजविजीनें हे रुपये देणें. फिरोन लिहावयासी अवकाश राहिला नाहीं. यास्तव अजुरदार जोडी पाठविली असे. तर लाइलाजी खेद करून सार्थक नाहीं. पुढें श्रीमंत कृपा करून यथास्थित करितील तर, बाकीचे रुपये वसूल करून देऊं. नाहीं तर जें होणार तें होईल. श्री कृपा करणार समर्थ आहे ! चिंता नकरणें. अतःपर आह्मी रा। जनकोजी शिंदे याजबराबर जातों. श्रीकृपेनें तेहि मायेंत आहेत. तुह्मी आह्मी सर्वांनी देशासच गेल्यानें सार्थक काय ? यास्तव एकजण राहिलों. श्रीकृपा करणार समर्थ आहे. चिंता न करणें. गिरधर लक्ष्मण तीर्थरूपाचे वेळेचीं मनुष्यें आहेत. त्याजवर कृपा करीत जाणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. मूळ याची तनखा आहे. त्याची रा। रघुनाथ नाईक यांचे विचारें श्रावण वा। १३स रुपये पावेत तें करणें. हे आशीर्वाद. मातुश्री आईस सा। नमस्कार. चिरंजीव बचाबाईस आशीर्वाद. पै॥ छ २६ माहे जिल्हेज.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८५ ]
श्रीवरद शके १६८० आषाढ वद्य १३.
सहस्रायु चिरंजीव राजश्री तात्यासः--
प्रति बापूजी माहादेव व पुरुषोत्तम महादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल छ २६ जिल्काद जाणून, तुह्मी आपलें क्षेम हरघडीं लिहीत असलें पाहिजे. विशेष. तुह्मी गेलियाता। कांहीं वर्तमान कळत नाहीं; याजकरितां चित्त उदास आहे. तर आलिया माणसासमागमें पत्र पा। संतोषवीत जाणें. यावरी आमचें वर्तमानः आह्मी श्रीमंत राजश्री दादासमागमें आहों. चिरंजीव राजश्री नानाची रवानगी राजश्री जनकोजी सिंदे याजसमागमें केली, व चिरंजीव गणपतराऊ व राजश्री त्रिंबकपंत यांसी दिल्लीस रा। केलें. सांप्रतें श्रीमंतांची कृपा आहे. जनकोजी सिंदे शाहापुरियापासून रुखसत जाले. हिंदुस्थानचे मुखत्यार आहेत. पुढें सविस्तर मागून लिहूं. श्री कृपा करो ! हे विनंति.
पौ। छ २६ माहे जिल्हेज.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८४ ]
श्री शके १६८० वैशाख.
पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी.
विज्ञप्ती ऐसीजेः-- लाहोरीहून तीर्थस्वरूप राजश्री बापूजी महादेव यांची विनंतिपत्रें स्वामींस आली, ती सेवेसीं पाठविली आहेत, त्यांजवरून श्रुत होय. ते स्थलीचें वर्तमान याप्रमाणेः--
राजे रणजितदेव, जंबूचे, यांणीं शाहाची मुलाजमत केली. याजवर शाहाची बहुत मेहरबानगी, ह्मणोन पूर्वी सेवेसी विनंति लिहिली होती. हालीं राजेमजकुरास शाहांनी रुसकत करून कश्मीरच्या प्रांतास पाठविलें. आणि याजसमागमें शाहांनीही आपली तीन च्यार हजार फौज देऊन पाठविलें. तो कश्मीरचे जमीदारांनी घाटरस्ता फौजेचा येयाजायाचा मार्ग बंद केला. कश्मीरचा सुभा सुखजीवनराम याचे पारपत्यास्तव रणजितदेव गेले आहेत. आणि शाहांनीही पाठविलें आहे. परंतु, त्याणें अगोधरच घाटाचें नाकें बंद केलें; यास्तव राजेमजकूरही माघारा जंबूस जाणार; व शाहाची फौज माघारा याजपासी येणार; ह्मणोन नवें वर्तमान येथें ऐकिलें. पुढे होईल ते विनंति लिहूं.
सिखांनी सरहंदच्या प्रांतांत गलबा केला, ह्मणोन पूर्वी सेवेसी विनंतिं लिहिली होती. आलिकडे, जेनखान फौजहार, महालमजकूरचा, यांणीं पन्नास हजार रुकडही देऊं करून सलूख केला. सिखांनी कूच करून दहाबारा कोस गेले, तों जेनखानांनीं दगा करून सिखाची बाहिर लुटली. यास्तव सिखांनी माघारा फिरून जेनखानाची बाहिर लुटून, लछमी नारायेण याचा दिवाण याजला लुटून, लढाईस मागती सिध्ध जाले. हरनुलगढ सरहंदेपासून पंधरा कोस तेथें उभयतांची लढाई लागली आहे ह्मणोन वर्तमान आले. मागाहून वर्तमान आलिया सविस्तर लिहून पाठवू.
सेवेसी श्रुत होय.