Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४।४।१७९४
विनती विज्ञापना ऐसीजे. दौला बोलिलें की ** राव सिंदे यास दौस्ती संपादन केली याविशीं कोणास काय संशय असेल तो असे. परंतु माझे मनांतील हेत फार आहे की हिंदुस्थानांत येक साहेबजाद्यास घेऊन जाव आणि राव पंत प्रघात यांजबरोबर शरीक राहावे. याजकरितां किती वर्षापासुन राव ३८ यांचे साधनास लागलों श्रीमंतांचे आज्ञेशिवाय शिंदे ही गोष्ट कशा करतील हा संशय, त्यास श्रीमंताचे घरचे मातबर सरदार त्यांनी भीड घालुन श्रीमंतांस विनंती केली असतां अमान्य न करते या भरंवसियावा राव शिंदे यांस शिलशिला राखिला, त्यास राव शिंदे तर गेले परंतु माझे मनांतील उटउट गेली नाही. ही गोष्ट नबाबाचे पसंदी
( ती ) स येत नाहीं. कारण हिंदुस्थानांत पातशाईत दर्क करावा यास खुद पातषाहा बहोष आणि कायम मिजाज येकसुत्राने चाल असावी तर शौभा. तो प्रकार नाहीं. तेव्हां बखडा, पातषीहा बखेडे करू लागल्यावर नजरबंद करुन दौलत चालवावी. हैं। करणें प्रात्पत्वास गाजूर्दीखान हाल आहेत त्याजवर बदनामी आली त्याच फे-यांत अद्याप फिरत आहेत. याजकरिता इतके खोल पाण्यात शिरणें नको म्हणोन नवाबास इच्छा नाही. परंतु माझी हाउस आहे. या विषई येक वेळ, दोन वेळा च्यार वेळ श्रीमंतांस विनंती करीन असे करतां येखादें वेळेस तरी मनांत येईल, हा सिलसिला माझा चाललाच आहे. राहणार नाही असे बोलिलें. छ रमजान हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४।४।१७९४
विनंती विज्ञापना ऐसीजे. दौला बोलिलें कीं "दोही दौलतीची दौलत खाबी कृष्णराव भिकाजी यांनी आज परियंत केली. आतां जबाब सालांत तुह्मी आहां. त्यास इश्वरनकरी व कदाचित जर दोहों दौलतीचा बिघाड झाला तर तह्मांवर शब्द आहे की कृष्णराव यांचे पाठीमागे तुह्मीं या कामांत असत अशी गोष्ट जाली असे न घडावे.'' याचे उत्तर मी त्यास दिलें कीं *आमचे काम आणखी कोणते ? श्रीमंतांचे तर नौकर आणि नबाबाचे दौलत खांब. त्यास दोहीं दौलतीची बेहबुदी आणि यगायनगतीची मज. बुती तेच आम्ही करीत असावे, ही गोष्ट श्रीमंतांस आणि नवावास रोषन आहे. पर यासी आणि आमचे घरांसी जी चाल आहे त्याची व काफियत ही मला ठाऊक आहे जे वेळेस आपण अश्यात होते ते समई आपल्या कडील दोघे कारकून आपलं १ व इमान घेऊन कृष्णरावजीकडे आले. ती पत्रे रावजींस मच वचन दाखविले. त्या मानावर रावजींनी मदारुल माहाला यासी बोलुन त्यांची पत्रे आपणांस पाठविलीं, ईश्वरकृपें करुन हा दर्जा आपणांस प्राप्त जाला यापक्षी आपले ममतेचे दृष्टीत आम्हीं असावें. आमचा हक आपल्यावर आहे. ह्या सर्व गोष्टी मी विसरलों नाही. आप खातेत हे कांहींच न येतां श्रीमंतांकडील राजदारीच्या गोष्टी आपण फायाषांत आणिल्या. मदारुमहाला याची मर्जी तुम्हांवर ठीक नाही हा उगीच आरोप आम्हांकडे ठेऊन जसे दौलत खांब आपण केले अशी आपली चाल दिसू लागली. जर मदारुमहाला यांची मर्जी आम्हांवर नाही तर . आम्हांस आपत्याकडे कशास पाठविते ? हे देखील आपले मनांत न आलें ! ..असे तथापि आम्ही आपली चाल सोडिली नाही आपल्याशी कांहीं बोलावे त र भरंवसा असा यईना की गौष्ट आपले रुचीस पडेल. लाच्यार उगच बसुन राहिलों. नूतन दौलतखांब याचा अनुभव येऊन द्यावा, आम्हीं शिलकी दौल उखब आहोंच. जे वेळेस ममतेची दृष्टी इकडे फिरेल ते वेळेस जवळच आहो असे मनांत आणुन स्वस्थ आहों. श्रीमंतांकडील वाजबी जाबसाल स्नेहाने करावे असे मनांत येईल तेव्हां आमचे काम, हैं। उमेद ठेऊन आहों. त्या अर्थी बिगाडाची सुरत जाली याचा शब्द आम्हांकडे काय ? आपण ज्या मार्गे चालवाले तसेच चालू. आपले शिवाय नाही. या प्रो बोरिल्यावर लाजतः लाजत कांही उत्तर द्यावे म्हणोन दिल्लें. समर्पक नाही. शेवटीं बोलिलें कीं श्रीमंतांस व मदारुलमहाला यांस जे लिहिणे ते लिहावे आणि ज्यांत दही दौलतीची बेहबुद से करावें.'' या दोन च्यार घाटका लणें जालें तें
शेवटी लिहिलें असे. रा छ माहे रमजान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र वद्य ९ शके १७६६,
ता. २४।४।१७९४
विनंती विज्ञापना होसीजे. बेदरचे राहण्याचे प्रसंगावरून दौला बोलिले की "श्रीमंत व नबाब उभयतांची ऐक्यताचे आहे. मदारुलमहाला यांची माझी चित्तशुद्ध नाही. याविस त्याचे चित्तांना सफाई करावी असे आलें तर यास उशीर लागणार नाही आणि सफाई न होतां जिदीवर आले तर इतकी जिदी करावी असे त्याचे की काही केलेही नाही. मगर जुजवियात यास फारनीकसी केली तर आदवनी आणि च्याहारुमचा पैका मागतील त्यास पंतप्रधान व नवाव दोन्ही दौलती वाहीद मदारुमहाला याचे माझे येक अंतःकर्ण असल्यास करोडो रुपयांची किफायत करून दाखवीन. नबाबाची किफायत याचे दौलतीतील यका रुपयाची केली तर पंत प्रधान यांची किफायत आठ आण्याची करीन. पंतप्रधान याचे दौलतीतील किफायत येका रुपया केली तर तेथे नबाबाची किफायत आठ आण्याची करून दाखवीन, येक वेळ अनुभव तरी पहावा. याचे दोन प्रकार दोही सरकारचे जुजवियातचा लढा उलगडून टाकावा. नंतर येकवर्ष होऊन द्यावे. त्यांत माझी परीक्षा पाहावी. अथवा जुजावयात इतके दिवस राहिली तशी आणखी येक वर्ष अशीच राहुं छावी, मदारुलमहाला यांण सफाई अंतःकरणपूर्वक करावी. माझी चाल कशी
ही येक वर्ष पाहून अनुभव घ्यावा. जर सचोटीस उतरलो तर उत्तम जालें, नाहींतर आपण आपले ठिकाणी मुखत्यार आहां. दोहींतून जसे मजस येईल तसा अनुभव पहावा. मध्ये उगीच खलष आहे हा ठेवणे मुनासीब नाहीं.'' ह्मणेन बहुत विस्तारै करून बोलिले, आणि लिहावयास सांगितले. त्याजवरून लिहिले आहे. आज्ञा येईल त्याप्रमाणे यासी बोलण्यात येईल. छि रमजान
हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसवी.
विनंती विज्ञापना ऐसजे. नबाबाचे कुच्याची घोहरत फार. या विषई दौलाचे माझे भाषण होते समई यो विषई संकटांत पडून बयान करून बोलू लागले. याचा तपसील बहुत आहे. ते वेळेस असे समजलें कीं षोहरत मुकामाची प्रगट केली, परंतु आंतील निश्चय कुच करण्याचा. तेव्हां स्वामीचे आज्ञेचे स्मरण होऊने दौलासी बोलिलों की “नवाब हैदराबादेहून बेदरास आले हेच ठीक नाही. तथापि येऊन एक वर्ष राहिले. आतां मावारे चालले. यांत लोक काय ह्मणतील? येवढे रईस यांची हरकत व्यर्थ होणे चांगलें नाहीं. त्यास ज्यापक्षी येथपर्यंत आले तेव्हां आतां हेच लाजम आहे की श्रीमंत पंडित प्रधान यांजकडील जुजवियातचे फैसले होऊन परभारें खुलासा करून भेटी व्हाव्या. नंतर नबाबांनी हैदराबादेस जावे. यांत शोभा. नाहीं तर कांहींच नाही. जर नबाबाचा आग्रह कुच करण्यांचा आहे तर याविशीं अर्ज करावा. येसे माझे मनांत' हे शब्द बोलताच दौलाचे मनास संतोष होऊन बोलिले की "माझे मनांतील गोष्ट सांगितली. वास्तविक नबाबाचे येणे येथे प्रकृतीकरितां हे खरे, परंतु येथून माघारे जाणे व्यर्थ होऊ नये तेव्हां त्यांस ह्मटलें कीं ' तुह्म प्रकृतीकरित असें ह्मणतां परंतु सर्व दुनिया बात असे कोणी ह्मणत नाहीं, अणिकचे काहीं बालतात. तेव्हां बोलिले कीं नानाप्रकारचे तर्क निघतात खरे. कोणी म्हणतात भोंसल्यावर दृष्टी आहे. कोणाचे ह्मणे राव शिंदे या साख्त आहे. याजकरितां येथे आले. मुरापुरकर यांजवर मोहीम इतकें. आणि याजपेक्षाही अधिक जे मनांत आणाल ते प्रकार यांत निघतात. आणि घाहरतही आहे. परंतु येक प्रकृति कारतां येणें जालें हे खरे. दुसरे कांही नाहीं त्यास आतां व्यर्थ षहरास जाणे हे माझे मनास प्रशस्त वाटत नाही. श्रीमंताकडील फडचे ठरून सफाई व भेटी होऊन उपरांत जावे अथवा श्रीमंताकडील गोडी संपादन करून त्याचे विचारे भोसले याजकडील कार्यावर असावे' या प्रों, बहुत विस्तारें बोलिले याचा तपशील अलाहिदा लिहिला आहे त्याजवरून ध्यानात येईल. रा।छ रमजान हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६५ ] श्री.
° ˜
श्रीशंभूराजचरणीं तत्पर
दत्ताजीसुत येसोजी नलगे
निरतर.
राजश्री पंत अमात्य स्वामीचे सेवेसीः- श्रीमच सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नेll येसोजी नलगे नामजाद व कारकून किल्ले पावनगड दंडवत व अनुक्रमें सा। नमस्कार विनंति येथील क्षेम जाणोन स्वकीय लेखन करावया आज्ञा केली पाहिजे विशेष. सरजकातीचे व मौजे पुसेरे येथील दिवाणच्या सनदा पाठविल्या त्यावरून गांवचें व सरजकातीचें ताकीदपत्र पाठविणें ह्मणून लिहिलें त्यावरून सरजकातीस व मौजे पुसेरे ता। बोरगाव यास ताकीदरोखे पाठविले आहेत. तरी सनद पैवस्तापासून ऐवज जो होईल तोच घेणें ह्मणून आपणाकडील कमाविसदारांस ताकीद करून गावांस व सरजकातीस पाठविले पाहिजे लटकाच कजिया कमाविसदार करितील त्यास ताकीद करून पाठविले पाहिजे बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे हे विनति.
मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १७।४।१७९४
विनंती विज्ञापना. छ १७ रमजानी दौलांनी रात्री आह्मांकडे रुका पाठ विला की हजरतीकडून षादीचे मुकदम्यांत खरीता राव पंतप्रधान व मदा' रुल माहाला व हरी पंडतजी यांचे नांवें पत्रे गेली होती. त्याचे जबाब रघेत्तमराव यांचे विद्यमाने आले आहेत. ते हजरतीनी मुलाहिजा करून कि. त्येक माार तुझांसी बोलावयाकरितां ईद केला, त्यास मी अर्ज केला की यविषीचा रुका लेहुने रावजीकडे पाठवितो. ईषद जाने की ** रुका न लि. हितां त्यांजला आपले येथे बोलाउन ईषद बमोजीब त्यांसी मार बोलण्यांत आणुन त्यांजकडोन राव पंत प्रधान यांस व मदारुलमाहाला यांजला पत्रे लिहवुन व तुम्हीही पत्रे त्याहावी. याजकरितां उदईक आपण यावें " म्हणोन लिहीले. त्यावरून आम्ही छ १८ रोजी दीडप्रहर दिवसां दौलांकडे गेले. ते मार्गप्रतीक्षा करीत होते. सर्वत्र मुत्सद्दी मंडळी वगैरेस जबाब दिल्हाच होता. आम्हीं जातांच खिजमतगार वगैरेस दुर करून दौलांनी माार केला की ६ षादीचे मुकदम्यांत राव पंतप्रधान यांस व मदारुलमाहाला आदिकरून पत्रे षादीस रौनक अफजा देण्याविषयी लिहून रघत्तमराव यांचे मारफत पाठविली होती. त्याचे जबाब हाल झाले त्याप्रमाणे दान पत्रे येक मदारु लमहाला यांचे में येक गोविंदराव भगवंत यांचे यकृग दोन मत्रे वाचून पाहिली त्यास याचे मसविदे पेशजी तुमचे विद्यमाने आले होते त्यांवरून मजकूर समजलाच होता. तथापि दोन्ही पत्रे वांचून भाव समजला की षादीस येण्याविषय टाळा देऊन अस्ताचा बहाणा करून लिहिले आहे की राव पंतप्रधान प्रथम स्वारीस निघणार तेव्हां *साअतनेक पाहिजे. ते नाही. तेव्हां शुक्राचा अस्त व मंगल वक्री. तेव्हां येणे कसे होईल ? असे भाव लिहिले आहेत. याजकरितां हाजरतास संतोष वाटला नाही व मजला ईषद केला की रावजीस बोलावून तुह्मीं व ते येऊन याचेवर जबाबाची तजवीज ठराऊन त्याजकडोन विस्तारें पत्रे लिहवावीं की आमचे येथे नजुम विशेष करून जाचून । पाहण्याचा संप्रदाय नाहीं. लग्नाची तारीखही मुकरर केली नाहीं. राव पंत प्रधान याचे येण्याची अमद पाहून मग तारीख करार करावी. त्यास प्रस्तुत तिकडील उत्तरांत अस्ताचा साब लाउन लिहिले आहे त्यास तेथे नजुमी व गणक वगैरे ब्राह्मण चांगले आहेत, त्यांस विचारून पादाची तारीख व रात्र पंतप्रधान यास बाहेर स्वारीस निघण्याचा साअतनेक पाहून आह्मांस इतला करावा ह्मणजे त्या प्रमाणेच वादीचा निश्चय करण्यांत येईल. सारांप शादीची खुषी व राव पंतप्रधान याचे भेटीचा हेत फार आहे व यांचे येण्यांत रौनक अधिक होईल. जेब बजावत येईल. याजकरितां रावजा कडून राव पैसे प्रधान यांस व मदारुलमहाला यांस पत्रे लिहवावी व आमचे तर्फेनही ल्याहावें ह्मणोन ईद केला. त्यास तुह्मी विस्तारयुक्त ल्याहावे व हजरतीचीही पत्रे तयार करवितों. हजरतीस राव पंतप्रधान यांचे भेटीचा इषनियाक फार आहे हे गोष्ट जरूर घडावी ह्मणोन दौलाचे बोलण्यात आले. आणि अन्वये सरकारचे खरीत्याचा जबाब नबावाकडून थैली दिल्ही ती पाठविली आहे, राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसी प्रविष्ट करतील त्याजवरून ध्यानात येईल. रा।छ रमजान हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६.
तप्रिल ता. १७९४ इ.
विनंती विज्ञापना, बेदराहुन कुच करून हैदराबादेकडे जाण्याचा बेत नबाबांनीं योजिला होता. यास सलाह बेगमा आदि करून सर्वांचे संमत. फारासखाना वगैरे कुल तयारीतही डौल जाला, बाजारांत तमाम साहुकार लोक वगैरे हैदराबादेकडे नबाब जातात हे खबर गरम जाली. दौलास समजल्यानंतर त्यांनी खिलवर्तीत नबाबांस अर्ज केला की हैदराबादेकैडे सवारी मुबारक मुतवजे होण्याची दाट गुलबाग जाला आहे. हे गोष्ट कुलयातीस दुरुस्त नाहीं. लोकांतही हा गुलबाग होणे खुषनुमानारी. याप्रमाणे तीनच्यार घटका नवाबाचे व दौलाचे बोलणे होऊन ताकीद सर्वास जाली की हैदराबादेकडे कुच असे कोणी आणेल त्याचे पारिपत्य होईल. हे ताकीद जाल्यावरून तुर्त हैदराबादेस जाण्याची चर्चा राहिली बेदरची छावणी हेच बोलवा जाली आहे. इतक्यावर जे पाहण्यांत. ऐकण्यात येईल त्याची विनंती लिहि• ण्यात येईल, नवाबानीं यकदोन वेळ दौलास झिडकारुन सांगितले की माझी कुलियात मी संभाळून घेईन, बिगडावयाची नाहीं, तुह्मासाठी मी आपली कुलियात बिगडु (२) की काय ? तुमचे आणि मदारुल माहाला यांचे ठीक नाहीं. तुह्मीं येथे रहावे. तेव्हां यांच्याने पुढे बोलवेना. त्यास येक दोन दिवस जाउ दिल्हे नंतर जाऊन अर्ज केला की हजरतीस जेव्हां जाणे असेल तेव्हां जावें, सरंजाम लांब नाहीं जवळपासच आहे. परंतु आजपासोन जा' ण्याचा पुकारा आणि शोहरत बेतन्हा होणें हें खुषनुमा नाहीं. ' त्याजवरुन सर्वांस ताकीद जाली. चैकीचे लोकांची छपरबंदी करावयास हुकुम जाला, षोहरत जाली होती ते मोडली. पुढे शहरांत जावत न जावोत. वैशाखाचे महिन्याची संधि आहे. त्या महिन्यांत गेले तर जातील नाहींतर जात नाहींत. छावणी करतीलसे वाटते. र॥ छ १३ रमजान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६१ १६१४ कार्तिक वद्य १३
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १९ अंगिरा नाम संवत्छर कार्तीक बहुल त्रयोदसी मंदवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणि राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रांत वाई यासि आज्ञा केली ऐसी जे भवानीगिरी गोसावी याणि चंदीचे मुकामी स्वामि समीप येऊन विदित केले की श्री गोसावी स्थल कसबे नींब प्रा। मजकूर येथे यांची समाधी आहे आनादि बहुत पुण्यथल जागृत जगप्रख्यात आहे त्याचे परंपरेचे आपण सिष्यवर्ग या स्थली राहोन श्री स्वामिची समाधीची सेवा करून आहो ऐसीयासि समाधिस्थानी धूप दीप पूजा नैवेद्य पुण्यतिथीउत्छह चालावयास अवकास नाही स्वामी धर्मप्रभु आहेत तरी एक गाव इनाम करून दीधलीया श्री चे समाधिस्थानी पूजा नैवेद्य उत्छह व अतीतअभ्यागतास आन्न देऊन स्वामिस व स्वामीच्या राज्यास कल्याणाभिवृध्दी चितून समाधानरूप असोन ह्मणौन शृत केले त्याजवरून मनास आणिता श्री ची समाधी बहुता काळांची प्रख्यात स्थल आहे ऐसे जाणोन पूजा नैवेद्य उत्छह अतीतास आन्न चालावयास निमित्य नूतन इनाम मौजे इडमीडे सा। नीब प्रा। मजकूर देह १ एक रास कुलबाब कुलकानु देखील हालीपटी व पेस्तरपटी झाडझाडोरा पडिले पानसहित खेरीज हकदार व इनामती करून गाव इनाम दिल्हा आसे तरी चतुसीमा भूमीसहित गाव याचे दुमाल करणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र समाधीचे आधिपत्यकर्ता गोसावीयास परतोन देणे निदेश समक्ष
तेरीख २७ माहे रबिलोवल
रबिलोवल सु॥ सलास तिसैन अलफ
बार सूद सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसवी.
विनंती विज्ञापना, घासी मिया याची तबियत बहुत कसलमंद. नित्य दहा, बारा पंधरा दस्त होतात. नबाबांनी चंपाअसील नेहेमीं मियापास जवळ बैसऊन हकीमाकडुन दवा देवितात. दोन दोन घटिकेस घासीमयाचे तबियतीची खबर आणवितात. येक दिवस हुशार येक दिवस बेआराम याप्रमाणे मियाचें तबियतीचा अहवाल आहे. रा छ, १७ रमजान हे विज्ञापना.
सदर तारखेच्या डांकेवर व्यंकटराम दीक यांजकडून चेनापटणाहुन आलेली अखबार गोविंदराव भगवंत यांचे मार्फत रवाना केल्याचे पत्र.
छ. ११ ते छ, १७ पावेतों मामुल रोजनामे अखबार ( पृष्टांक ३८७ ३८८)
छ २३ रोजी डांकेवर. श्रीमंत रावसाहेब यांस मामुल हवाल्याचे पत्र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६.
ता. १४ एप्रील १७९५ ईसवी.
विनंती विज्ञापना, पो. उमरखेड पासीन शहा मिज याने यैवज घेतला, तो सरकारांत नबाबाकडून येणे, त्यास दौलाचे ह्मणे की येहंतषामजंग जफ रुदौला यांनी चाळीस हजारचा तमसुम लेहुन घेऊन फारखती आपाजी कों बाजी कारकुनी श्रीमंताचे सरकार तर्फेने याजाबसालास जफरुदौलापाशी आला ते समयीं घेतली, ते बजानस आहे, त्या बमोजीब चाळीस हजाराची तनखा प्रों, वसमतेवर यांनी दो घायद्याची तयार केली. त्या पैकी पहिले वायद्या बाा, वीस हजार रुपये परगणे माार चे अमोल बाजीराव व सैद मुनवरखान यांना मजे कडे यैवज दिला तोघे ऊन रसद अमलाचे नावे मी दिल्ही की “शहामिर्जा यानें उमरखेडापासोन यैवज घेतला ता नबाबा कडून श्रीमंताचे सरकारांत येणे त्या यैवजी चालीस हजारांची तनखा तुम्ह वर जाली त्या पैकी पहिले वायद्याचे वीस हजार राों आम्हांस पावलें " या प्रों रसीद मोहगम देऊन यैवज घेतला. पुढे दुसरे वायद्याचे वीस हजार घेऊन रसीद सालिनात खानाचा यैवज पावल्याची द्या यैसे वसमतकर अमीलाचे बोलणे पडलें. ते समई हा मार राजश्री गोविंदराव भगवंत यांस लिहिला. त्यांनी राजश्री नानांस विनंति केली त्याची आज्ञा ज ली. पत्रही मला आले की शाहा मिर्जा याने उमरखेडोपासेन यैवज बहुत घेतला यैसे असत चाळीस हजारावर फैसला होणार नाहीं, आपाजी कोडाजी पासून जबरदस्तीने जफरुदौलांनी फारखत घेतली. ते सरकारांत कबूल नाही, यास्तव पहिली वीस हजारांची मोहगम रसीद दिल्ही. त्या प्री रसीद देऊन यैवज येत असल्यास घ्यावा. सालिना रसीदीचा आग्रहच करू लागल्यास पहिले वीस हजार घेतले आहेत ते फिरोन द्यावे, या प्रों आज्ञा जाल तेव्हां बीस हजार दुसरे वायद्याचे वीस हजार अमीलांनी आणिले ते रसीदाचे दिकती करिता घेतले नाही. सांप्रत हा जाबसाल दौलाशी बोलण्यात आणिला की शाहामिर्जा बाबत आपल्याकडे सरकारचा यैवज येणे आपण वसमते कडून चाळीस हजार देविले त्या पैकी वीस हजार पेशजी घेऊन रसीद अमीलाचे नावे दिली. दुसरे घायद्याचे वीस हजार रुपये अमोल आम्हांस द्या म्हणतात त्यास सरकारांत में विषईची विनंति लिहिली. आज्ञा जाली की शाहामिर्जा बाबत मुबलक येथे आपाजी कोंडाजी पासोन जबरदस्तीने जफरुदौलांनी चाळीस हजाराचा तकसुम देऊन फारखत घेतली ते सरकारांत मंजुर नाहीं जो यैवज उमरखोडापासोन घेतला त्याचा फडशा जाला पाहिजे. याप्रों आज्ञा आहे. याचे उत्तर दौलांनीं केले की हे जाबसाल आहेत. तर्फेने सरकारने विध्यारे पुढे जसा निर्णय ठरेल तसा ठरो. तुर्त यैवज आला तो घेण्याची तुह्मापासीं अमानत असो द्यावा. त्यास पेशजी वीस हजार घेक्ले आहेत. बाकी वीस हजाराच्या हुंड्या आल्यात्या सावकारांचे दिवाळे । निघालें, याज करितां त्या हुंड्या फिरोन दिल्या. त्यास मोघम रसीद घेऊन वीस हजार दिले तर यैवज घेतो. नाहीं तरी घेत नाहीं, राा. छ. १७ रमजान है विज्ञापना,