Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
फुकट गोष्टी सांगावयास मिळतात. कार्य करणें बहुत मुश्कील आहे. तुह्मी ह्मणाल तुह्मास इतके काय पडिले आहे, तरी तुमची दोनशे रुपयाची असामी तेथें कारकून न ठेविता, रुपया खर्च न होतां तुह्मास खर्चास रुपये आल्याने आह्मांस संतोष आहे. त्यामध्यें जे आपण तजवीज केली असेल ते उत्तमच केली असेल. मुख्य गोष्ट आपले दोनशे रुपये आपल्या घरास आले ह्मणजे आह्मांस हजाराची जोड जाहली. जे तजवीज अगर कारभार करणें तो आपल्या बुध्दीने करणें. शंभराचे गोष्टीनें शेवट लागत नाहीं. आपल्यास सीतज्वरं बहुत दिवस येतो. फारसें बेजार केले ह्मणून आइकिलें त्याजवरून फारशी चिंता लागली आहे. देवडीचे वर्तमान ऐसे व्हावयास आपला वशिला गेला आणि लिहिण्यानें बहुत हैरान केले. राजश्रीपाशीं तरी अहोरात्र सेवा घडावी तेहीं अंतर पडिलें. याजमुळें व आपल्याही शरीरांत शक्त तीळभर नाहीं. ऐशा तीन गोष्टीची फिकीर आह्मांस फारशी लागली आहे तें पत्री काय ल्याहावें. हल्लीं कांही वैदी व अनुष्ठान दोन गोष्टीचा उपाय करणें. ईश्वर कृपा करील. कांही फिकीर न करणें. तुह्मी थोडक्यांत दोन तीन दु:खें पाहिलीत. पुढें आश्रय कोणाचा दिसत नाहीं, या गोष्टीची काळजी चिंता धरलीत असाल, तर हा मृत्युलोक आहे. तुह्मांस काही फिकीर नव्हती. परंतु ईश्वरगतीस उपाय काय आहे ? सर्व काळजी सोडून देणें. आणि वडिलांचे पुण्य समर्थ आहे, व श्रीचेंही पुण्य बलवंत आहे. ईश्वरावर भार सर्व गोष्टींचा घालणें. ईश्वर परिणामास नेईल. कांही फिकीर नाहीं. आपण काळजी मात्र करावी. कर्ता समर्थ तोच आहे. तो ठेवील जैसें, चालवील तैसें चालूं. पुढें कैसें चालेल हेही फिकीर तुह्मांस लागलीच आहे, तेही दूर करणें. सर्व गोष्टी ईश्वर चालवील. तीळभर काळजी न करणें. शरीरास आरोग्य करून राजश्रीची सेवा करून तेथेंच राहून कृपा संपादून घेणें. आपणापाशीं दुसराही कोणी कर्ता माणूस नाहीं. जे अहोरात्र छत्रपतीपाशीं तुमचे तर्फेने राहोन दया संपादून राहे ऐसा नाहीं. कोणी शाहाणा माणूस आणि मेहनती ऐसा मिळेल... आपल्या बुध्दीनें जे होईल ते केलियास उत्तम गोष्ट होत्ये ऐशी प्रचीत आह्मास आहे, ह्मणून सूचनार्थ लिहिले आहे. बहुत ल्याहावें तरी सूज्ञ आहां. आह्मी माळव्यांत धार मांडवगड येथें छावणीस श्रीमंतांनी ठेविले तेथें राहिलों. पुढें दरबारी कोणी नाहीं. आणि छावणीमुळें सरदारीस कर्ज वीस हजार रुपये जाहलें. व दरमहा रुपये किल्ल्याचे बेगमीस पंचवीस हजार रुपये पाहिजेत. व चार मामलती पदरीं आहेत. त्याचे हिसेबाच्या वगैरे गोष्टीविशी अडथळा आह्माकरितां जाहला, तेव्हां तेथून यावें लागलें. श्रीमंतास पत्र लिहिलें होतें त्यांणी आज्ञा केली जे :- तुह्मी येणें करा. तैसेंच उठोन आलों. पुणियास आलियावर आह्मास सीतज्वर लागला तो अद्याप येतच आहे, आठ रोजाचा निरोप घेऊन घरास आलो आहों. शरीरास आरोग्य नाहीं. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४६] श्री २ जानेवारी १७४९
पे॥ छ ११ सफ्फर सनातिसा.
राजश्रिया विराजीत राजन्य राजश्री जगंनाथपंत स्वामीचे सेवेशी.
पे॥ कृष्णाजी अनंत मु॥ माळशिरस सा॥ नमस्कार विनंति. त॥ पौष वद्य नवमीपर्यंत सुखरूप असो विशेष. येथील कुशल जाणून, स्वामीकडील अलीकडेस पत्रिका येऊन संतोषवीत नाहीं. तरी ऐसे न कीजे. सदैव आलिया माणुसाबरोबर पत्रिका प्रेशून संतोषवीत असिले पाहिजे. स्वामीनीं धारेच्या मुक्कामी पत्रें पाठविली ती पावोन संतोष जाहला. लिहिला मजकूर कळो आला. राजश्री यशवंतराव पवार यास पत्रें आपण पाठविलीं ती आह्मी मुजरत आह्माकडील शिलेदाराचा कारकून राजी मल्हार तळेगांवकर कुलकर्णी, हेजीब आह्मांपाशीं आहेत, त्यास पाठविला होता. त्यास यशवंतराव पवार कांही देहावर नाहींत. त्याचे किल्ले व परगणे श्रीमंतानी घेतले. वीतरागी होऊन रांडामध्ये आहों. रात्र असतां तेथें कागदपत्र अगर कोणी माणूस गेला, त्यास जाबसाल होत नाहीं, ह्मणून कारकून शहाणा पाठविला. त्याणें जाबसाल दिल्हा, जे आपणास सात लक्ष रुपये कर्ज आहे, ते आमचे पेशवे यांनी वारावें, तेव्हां तुमचे रुपये देऊं. नाहीं तर वरकड कर्जदारियांचे रुपये वारतील तैसे तुमचे देऊं. सातारे याजकडील आह्मांस भय दाखवाल तर आजच काय करणें असेल तें करणें. आपणापाशी रुपये नाहीत. श्रीमंत पंतप्रधान कर्जदारीयाची वाट करितील, तेव्हा तुमची होईल, ऐसा त्याचा जाबसाल जाहला. तुह्मांस कळावें ह्मणून लिहिलें असे. राजश्री लक्ष्मण शंकर याजकडेस असामी तुमची गुदस्ता सनद दिली ते असामी तुमची त्याजकडेस करार केली. राजश्री लक्ष्मणपंत याची आमची भेट तो जाहली नाहीं. आमची स्वारी जयनगर प्रांते जाहली, आणि राजश्री लक्ष्मणपंत नवा मुलूक यमुनातिरीं सोडविला, तिकडे गुदस्ता ते गेले ते अद्यापि तिकडेसच राहिले आहेत. त्याजवर आजी दोन भुमेयांचा दंगाच आहे, ह्मणून तिकडेसच राहिले आहेत. त्याजवर आह्मीं सुरंजेवर एक साल छावणी केली होती, त्याजपासून त्याचा आमचा स्नेह फारसा चालत आहे. वर्षाध्ये आमचे मनुष्याबरोबर त्यांची पत्रें आह्मांस येतच आहेत. आह्मी तुची सनद तेव्हाच पाठविली होती, व हल्ली आपली पत्रें लिहून दिली आणि जासूद जोडी १ मुजरद कालपीस यमुनातीरास त्याजकडेस ज्येष्ठ शुध्द प्रतिपदेस पाठविली. त्याच जोडीबरोबर गुदस्ताचे रुपये २०० दोनशे हिंदुस्थानी बिनदिकती श्रावणसीं धारेच्या मुक्कामी आणविले. हल्ली सालचे त्यास आह्मीं लिहिले. त्यांणी आह्मांस लिहिले जें :- हल्लीसालचे रुपये वैशाखमासी सुरंजेस आह्मी येऊं तेथें देऊं. श्रीची असामी आहे. श्रीच्या मागें आह्मांस त्यांचे सर्व साहित्य करणें लागते. ऐसे कितेक उपरोधिक गोष्टी त्यास आह्मी लिहिल्या. त्यांणी उत्तर पाठविलें जे :- लक्षप्रकारें श्रीचेमागें तुह्मांस साहित्य करणें लागतें त्याची फिकीर आह्मांस आहे. आह्मी अंतर करणार नाहीं. यंदाचेही सालचे रुपये येतील. फिकीर नाहीं; परंतु आह्मी घरास आलियावर आइकितों जे :- यंदाचें ताकीदपत्र तुह्मी श्रीमंतापासून घेऊन दुस-याचे स्वाधीन केलेत, ह्मणून आइकिलें. त्यास बहुत उत्तम गोष्ट केलीत; परंतु तुमची निशा असली ह्मणजे बरी. नाहीं तरी रुपया येणार नाहीं. अडीच महिने दोन जासूद मुजरद त्याजकडेस यमुना तीरास पाठविले आणि रुपये आणावे लागतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४५] श्री ७ मे १७३४
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य विराजित भृगुनंदन स्वरूप बावा स्वामीचे सेवेशी. विनंति.
सेवक तानाजी नाईक चाळके नामजाद किले ससाळगड. कृतानेक विज्ञापना. त॥ छ १४ जिल्हेज सु॥ अर्बा सलासीन मया व अलफ पावेतों स्वामीचे कृपादृष्टीकरून किल्ल्याचें व सेवकाचें वर्तमान यथास्थित असें. याजवर स्वामीचें आज्ञापत्र सादर. तेथें आज्ञा कीं, संभाजी शिंदे याणी एकनिष्ठपणें सेवा केली. परंतु अल्पायु जाहले. तुह्मी ते जागी आला आहा. तर बहुत निष्ठा धरून आमचे काज काम करीत जाणें. ह्मणोन लिहिलें. तरी आह्मी सेवक एकनिष्ठ आहो. जैसे आह्मीं श्रीमंत राजश्री सरखेल साहेबाचे सेवक, तैसेच स्वामीचे सेवक. स्वामीविना आह्मास अन्य दैवत नसे. सर्व जोड स्वामीचे चरणाची जाहली ह्मणजे सार्थक आहे. जे स्वामी आज्ञा करितील ते शिरसा आहे. विशेष गोविंदपंत याजबरोबर पत्र आलें त्यामध्यें आज्ञा कीं, श्रीचा ऐवज कंदी रुपये मोहरा पुतळया होन सोनें व रुप्याचे दागिने जे असेल ते रवाना करणें ह्मणोन आज्ञा केली. आज्ञेप्रमाणें स्वामीचा ठेव होता, तो रवाना केला आहे.
नगद रुपये मोहरा होन पुतळ्या
६६१५ १५६ २१ १ सं
५६ नि
_________
५७
सोनें कडे वजन ।. एकूण तोळे सहा.
रुपये दागिने पेशजी कागदाप्रणें आहेत. ते निगेनशी ठेविले आहेत. जेव्हां स्वामीची आज्ञा होईल तेव्हां पाठवूं.
एकूण नगद रुपये साहजार साशेपंधरा व एकशे छपन्न मोहरा एकवीस होन, पुतळया सत्तावन सोनें कडें वजन पावशेर येणेंप्रमाणें स्वामीचा ठेव पाठविला आहे. स्वामीनीं लिहिलें कीं, खर्चास पाहिजे. याजकरितां रवानगी केली आहे. वरकड निगादास्त होणें तें स्वामीचे आज्ञेप्रणें होतच आहे. आह्मीं एकनिष्ठ सेवक आहों. स्वामीचे सेवेशी अंतर पडणार नाहीं. ऐवजाबराबर शाहाणें माणूस देऊन रवाना करणें ह्मणोन आज्ञा केली. आज्ञेप्रमाणें तानाजी यादव व बाबाजी जाधव देऊन पाठविले आहेत. सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना. स्वामीचे तांदूळ तीन खंडी आहेत. त्याजविशी दोन वेळां लिहिलें की, पर्जन्य समीप आला. पर्जन्यकाळी तांदूळ जाया होतात. जागा सर्दीची. स्वामीस विदित आहे. उघाडी आहे तों तांदूळ न्यावयाची आज्ञा केली पाहिजे. बैल आले ह्मणजे रवाना करून. सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना. नगदी ऐवजास घागर तांब्याची १ व पितळी कासांडी १ तांबे पितळी २ एकूण चार दागिने होते. यापैकीं घागर तांब्याची हल्ली घेऊन आले आहेत. पितळी कासांडी व तांबे पितळी दोनी येकूण तीन दागिने राहिले आहेत. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४] श्री
श्रीमंत महाराजश्री परमहंस भार्गवराम बावा स्वामीचे सेवेशी.
विनंति. चरणरज संभाजी जाधव कृतानेक दंडवत. विनंति. त॥ आषाढ शु॥ ११ पर्यंत स्वामीचे कृपावलोकनेकडून समस्त सुखरूप असो. विशेष. सेवेशी ल्याहावयाकारणें प्रार्थना ऐसीजे. आज्ञापत्र सादर जाहलें. तेथें आज्ञाजे. उदकदत्त पैकी रुपये दोन हजार येणें ते पाठवणे३१. त्यावरून प्रस्तुत ऐवज नव्हता. परंतु स्वामीचा कोप होईल यास्तव कर्ज घेऊन रुपये २००० दोन हजार सेवेशी रवाना केले असेत. पावलियाचें उत्तर पाठवावयास लेखकास आज्ञा केली पाहिजे. वरकड विस्तारें ल्याहावें तरी महाराज आह्मास सर्वस्वें वडील आहोत. आह्मी एकनिष्ठ सेवक स्वामीचे स्थापित आहों. श्रुत जाहलें पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४३] श्री
श्रीमंत परमहंसबावा स्वामीचे सेवेशी.
चरणरज आनंदराऊ पोवार. दंडवत. विनंति. येथील क्षेम महाराजाचे आशीर्वादें श्रावण बहुल त्रयोदशी मु॥ कविठें यथास्थित जाणोन स्वानंदवैभव लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामीचे सेवेशी तुलसीच्या मुद्रा चार पाठविल्या आहेत. आणि वस्त्र एक चांदणी पाठविली आहे. ते प्रविष्ट जालियाचें उत्तर पाठविलें पाहिजे. विशेष. र॥ जिउबा येथें शिवाजीपंताकडे पैकिया निमित्य आले हैत. त्यांनी आमचा प्रसंग पाहिला. ते सेवेशी विनंति करितील ते मान्य करून आमची साहैता केली पाहिजे. आह्मांस आपण पद्री घेतलें आहे. आमची सर्व प्रकारें साहेता करावी. विशेष ल्याहावें तरी आमचा अंगीकारच आपणाकडे आहे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४२] श्री ३ नोव्हेंबर १७५०
भार्गवरावस्वामी.
राजश्री तानाजीराव दरेकर हवालदार व कारकून के॥ महिपतगड गोसावी यासी. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ सदाशिव चिमणाजी आशीर्वाद व नमस्कार. सुहुर सन इहदे खमसेन मयाव अलफ मौजें आंबडस ते॥ खेड हा गांव श्री यांकडे इनाम आहे. ऐसें असतां तुह्मी तेथील वसूल सालगुदस्ता व सालमजकुरीं कांही घेतला आहे, ह्मणून विदित जालें. तरी पेशजीपासून इनाम चालत आहे. तेथील उसूल घ्यावयास प्रयोजन नाहीं. या उपरी तेथील जो वसूल घेतला असेल तो फिराऊन देणें. फिरोन त्या गांवचे वांटेस नच जाणें. जाणिजे. छ १४ जिल्हेज. आज्ञाप्रण.
श्री.
राजा शाहू नरपति
हर्ष निधान
बाळाजी बाजीराव प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४१] श्रीभार्गव
श्रीमत् भृगुनंदनस्वरूप श्रीपाद स्वामीचे सेवेशी.
अपत्यें हरजी नाईक नामजाद प्रांत सुवर्णदुर्ग चरणावरी मस्तक ठेऊन शिरसाष्टांग दंडवत. विनंति. त॥ छ १५ मोहरम पावेतों अपत्याचें व प्रांत मजकुरचे वर्तमान स्वामीचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. स्वामीनें बाबाजी हरकार याज ब॥ आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन दर्शनतुल्य वंदून समाधान पावलों. तेथें आज्ञा कीं, पक्व अननसे जरूर पाठवून देणें. ऐशियास स्वामीचे आशीर्वाद पत्र आलें नव्हतें. तों अगोदरच राजश्री केसो बल्लाळ कुलकर्णी अंजरलेकर यांणींही स्मरण केले. त्यावरून वेठेदेखील जमा करून हल्लीं जिन्नस पाठविला. याच प्र॥ छ ९ रोजीं रवानगी करावयाची तयारी केली. इतकियांत हुजूरून गलबत आलें. त्यावरी वर्तमान आलें कीं स्वामीची स्वारी विजेदुर्गी जाहली आहे. त्यावरून रवानगी खोटी जाली. हें वर्तमान स्वामीस कळावें ह्मणोन लिहिलें असे. हल्ली बाबाजी हरकार वगैरे माणूस या ब॥ वेठे ५ एकूण जिन्नस रवाना केले असे. बितपशील :-
मध दमगर १, आंबे ओझें १ फणस कापे २ अननासे १० सु॥ १० एकूण वजन १.
_________________
सु॥ १००
शाळी मव्हेयाची सु॥ ५ पान येलीची सु॥ ५०००
येणें प्र॥ जिन्नस रवाना केला असे. मध अकढी असे. कढून गाळून पाठवावा. तो उन्हामध्यें फुटला. याकरितां अकढीच पाठविला असे. तेथें कढून गाळवावा. या खेरीज केसोपंती वेठया खुद्द आपणांकडील सामान देऊन सेवेशी पाठविला असे. पावलियाचे उत्तर पाठवावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. मी स्वामीचा स्थापित येथें आहे. सर्व प्रकारें आशीर्वाद देऊन सनाथ करणार स्वामी समर्थ आहेत. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४०] श्री
श्रीमत् महाराज राजश्री परमहंस बावा स्वामी सेवेशी.
चरणरज त्रिंबक राऊ विश्वनाथ३०. कृतानेक साष्टांग नमस्कार. विज्ञापना. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. सेवेशी पालखीची दांडी व पिवळी सकलाद हात सुमार ६ सायाशी खिजमतदार याजब॥ आज्ञे प्र॥ पाठविली असे. प्रविष्ट होईल आशीर्वादपत्रीं उत्तर पाठवावयास आज्ञा केली पाहिजे. मी केवळ चरणरज आहे. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३९] श्रीभार्गवराम
पु॥ नारोराम मु॥ इरती पूर्णगड यासी आज्ञा केली ऐसिजे.
तूं संभा पवार याजबरोबर पत्र पाठविलें तें पावले. त्याचें उत्तर. सरदेशमुखीचे वरातदार डोरले महाळुंगे या गांवावर आले आहेत त्याचे काय आज्ञा तरी :- तुह्मी कारकून शहाणे लिहिणार आणि सरदेशमुखीकडील वरातदार शाहू राजे याचे तरफेचे कीं संभाजी राजाकडील हें कागदीं लिहिलें नाहीं. हल्लीं वरातदार संभाजी राज्याकडील असले तर अर्धा वसूल विशाळगडीं पावला, त्याजकडील काय खंडणी गांवकरांहीं सालमजकुरीं केली असेल, त्याजवर अर्धी सरदेशमुखी रिवाजाप्रणें गांवकर देतील. शाहूजी राजेकडील आह्माकडे पावेल. आणि शाहूजी राजाकडील वरातदार असले तर तोंडावर मारून वांटेस लावणें. पैका न देणें. येथें याचे निजबत कळतें तरी मनारोखा पाठविला असतां.
पूर्णगड इमारतीकडेस तुजकडेस आजि तागायत नगद रुपये गोठणें यातून काय पावलें. गल्ला वजनी सुमारीं जिन्नस काय पावले. डोरले महाळुंगे येथील काय पावलें, तें तपशीलवार जमा व आजि तागायत खर्च काय बाकी शिलक काय आहें तें लिहोन हिशेब पाठवणें. नगद ऐन जिन्नस हिशेब पाठविणें. अडीच रुपये आह्मी पाठविले ते आमचे जतन ठेवणें. खर्चास नगद लागेल तें त्रिंबकपंत देतील. त्याजवळ गणें. गोठणे, डोरले, महाळुंगे याचे रुपये वसूल वरातदार करतील तूजवळ आणून देतील. ते जतन ठेवून अमके पावले ते चिटी लिहोन पाठवणें. डोरले महाळुंगेचे कुळगत हिशेब करून बाकी बेमुलाहिदा घेणें.
जयगडीं गेल्याचे सनद पावलीं नाहीं. हवालदार ह्मणतात सनद पावल्यावर गल्ला पाठवून. तरी सनद आजीवर परशरामी राहिली होती. हल्लीं रवाना तेथून केली आहे. गल्ला घाटी दहा खंडी पावेल.
तिखे कोचीस नाही म्हणून त्यावरून हल्ली सभांजी पवार व सखा पवार २१ त॥ रामाजी चव्हाण ७, डोराले महाळुंगे याचे साल गुदस्ताचे हिशेब महाळुंगकर याजबराबर पाठविले आहेत म्हणून कागद लिहितात. आणि येथे हिशेब आले नाहीत कोठे राहिले ते मनास आणून आजि पाठवावे. होते ते न पाठविले साल गुदस्त त्याजवर विशालगडचा कज्जा पाडिला. अखेर बाकी काय राहिली ते कळावी. त्याजपैकीं त्याजकडे काय देणें ते देऊन उरली बाकी घेणार याजकरितां हिशेब आणविले ते तुह्मी आपले दप्तरचे हिशेब न पाठवा. तुह्मी चाकर आमचे असतेत तर पाठवितेत. व साल मजकुरी पूर्णगडीं गल्ला काय दोही गांवचा पावला. व नक्त रुपये काय पावले. हबशी पट्टीचे रुपये काय पावले, काय न पावले ते लिहोन तुह्मी उभयतांही पाठवावे ते न पाठवा. महाळुंगेचा निम्मेचा वसूल झाडून घेतला. रयत पळाली ह्मणून त्रिंबकानें लि॥ आणि आतां वसूल पावला नाहीं ह्मणता. तर निम्मेचा पावला असें का लिहावें होतें? आता वसूल राहिला तो कोणें घ्यावा? कुळें ह्मणतात झाडून वसूल दिल्हा. याजकरितां कुळावर हिशेब करून वसूल आह्मीं हिशेब पाठविला आहे. तेणें प्र॥ घेणें. वसूल लिहोन पाठविणें. चाळीस पन्नास रुपये दुमालापैकी राहिले असले तर लिहोन कुळगत बाकीं पाठविणें. रयत आल्यावर विल्हे करून. येणेंप्रमाणें वर्तणूक करणें. शहाणपणें धंदा करणें. छ ७ रमजान हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
नक्कल
[३८] श्री १२ सप्टेंबर १७३०
श्री सकल तीर्थस्वरूप श्री मत्परमहंस स्वामीचे सेवेशी.
अपत्य सन शाहूजी राजे कृतानेक दंडवत. विज्ञप्ति. येथील कुशल भाद्रपद शुध्द १२ मंदवासरे स्वामीचे आशीर्वादे यथास्थित असो. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र प्रेशिलें तेथें आज्ञा :- मौजें आनेवाडी आपण श्रीस दत्त केली. तेथें राजश्री पंडितरायाची इनाम जमीन चावर आहे. त्यास सांप्रत आपला इनाम आपणांस देणें ह्मणोन त्यांणीं ब्राह्मण पाठविला होता. त्याचा निरोपद्रव होईल तर उत्तम. नाहीतर तो गांवही लागत नाहीं, ह्मणोन कितेक विस्तार लेख केला. त्यावरून राजश्री पंडितरायास स्वामींनीं आज्ञा केलीजे. त्याचा मुबदला दुसरें जागा तुह्मांस इनाम जमीन देऊं. आनेवाडीच्या चावरास तगादा न करणें ह्मणोन त्यावरून त्यांणीं मान्य केलें. आनेवाडीच्या चावरास पंडितरायाचा उपसर्ग लागणार नाहीं. स्वामीपेक्षां दुसरें अधिकोत्तर आहे ऐसें नाहीं. श्रीप्रसाद श्रीफल पाठविलें तें पावलें. वरकड वर्तमान शिवराम सेवेशी निवेदितां श्रुत होईल. विदित होय.