Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६३] श्री. २० जून १७०९
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३६ विरोधीनाम संवत्सरे आषाढ बहुल अष्टमी इंदुवासरे, क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणीं शिक्का शिक्का मोकदजी मौजे वोझर्डे संमत हवेली प्र॥ वांई यांस आज्ञा केली ऐसीजे :* त्यास मौजे म॥ पेशजी सूर्याजी पिसाळ याजला इनाम होते, तें मध्यें दूर केल्यामुळे याकडून दूर करून किल्ले वैराटगडाकडे दिल्हा होता. तो हल्ली किल्लेम॥कडून दूर करून सूर्याजी पिसाळ यांस इनाम करार करून दिल्हा असे. तर तुह्मी याशी रुजू होऊन वसूल याकडे देत जाणें. जाणिजे. लेखनालंकार मुद्रा.
रुजू
बार सुरू रुद्र बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६२] श्री. २० जून १७०९
शिक्का शिक्का
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी नाम संवत्सरे आषाढ बहुल अष्टमी इंदुवासरे, क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणी र॥ पिलाजी गोळे पदात सेनाधर याशी आज्ञा केली ऐसीजे : प्र॥ वांई येथील देशमुखीचें वतन दत्ताजी केशवजी नाईक व सूर्याजी बिन फिरंगोजी नाईक पि॥ याचे हरदूजणांनी निम्में निम्में प्रो अनुभवावें, असें असतां दत्ताजी केशवजी कथळा करूं लागला. त्यांस पूर्वी स्वामीनीं वर्तमान मनास आणून निम्में वतन सूर्याजी पि॥ याणें खावें, निम्में दत्ताजी पि॥ याणें खावें, ऐसें करून सूर्याजी पि॥ यांस पत्रें करून दिल्ही. त्याउपर अलीकडे दत्ताजी केशवजी याणें पुरंधरचे मु॥ हुजूर येऊन गैरवाका विदित करून सारे देशमुखीचीं पत्रें घेतलीं. ऐशियास प्रस्तुत सूर्यात्री पि॥ हुजूर आले. आपला करीना सांगितला. तो मनास आणून प्रांत मजकूरचे देशमुखीचें वतन निम्में यांस करार करून देऊन पत्रें दिल्ही आहेत. दत्ताजी केशवजी याणें सारे देशमुखीची पत्रें करून घेतली आहेत ती रद्द केली असत. आणि हल्ली सूर्याजी पिसाळ याचे दुमालें निम्में देशमुखीचें वतन केलें असे. तेणें प्रो हरदूजणें निम्में निम्में वतन अनुभवतील. तर जोरखोरें व जांबूळखोरें येथील मोकदस ताकीद करून हक्क लाजिमा निम्में वांटणी बरहुकूम बिलाकसूर देविलें आणि याचा अम्मल सुरळीत चाले ऐसें करणें. मौजे बोरगांव बु॥ तर्फ जोरखोरें, हा गांव सूर्याजी नाईक पि॥ यांस इनाम आहे तेणें प्रो करार करून देऊन सनद अलाहिदा सादर आहे, तेरें प्रो बिलाकसूर चालविणें दत्ताजी केशवजी यांस यांचे तक्षिमेस कथळा करूं न देणें. सदरहू बमोजीब महालीचे देहायकदीम वांईच्या देशमुखीखाली चालत असतील, तेथील हक्क, लाजिमा सालाबाद प्रो सालगु॥ प्रो चालविणें. इनाम गांव पेशजी चालला असेल, त्या प्रो दुमाला करणें. लेखनालंकार मुद्रा.
रुजू.
बार सुरू रुद्र बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६१] श्री. २० जून १७०९
शिक्का शिक्का
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी संवत्सरे आषाढ बहुल अष्टमी इंदुवासरे, क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी यांणी राजश्री अण्णाजी जनार्दन देशाधिकारी व कारकून प्र॥ वाई यांस आज्ञा केली ऐसीजे :- सूर्याजी बिन फिरंगोजी नाईक पि॥ यांस प्रांत मजकूरचे निम्मे देशमुखीचें वतन करार करून देऊन आज्ञापत्रें अलाहिदा सादर केली असे. ऐशीयास मौजे वोझर्डे संमत हवेली प्र॥ वाई हा गांव पेशजी यांजकडे इनाम होता तो मध्यें दूर करून वैराटगडाकडे दिला होता. हल्ली सूर्याजी पि॥ यास इनाम करार करून दिल्हा असे. तर तुह्मी मौजें म॥ सूर्याजी पि॥ यांस इनाम चालविणें, जाणिजे. लेखनालंकार मुद्रा.
रुजू
बार सुरू रुद्र बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६०] श्री. १३ अक्टोबर १७६१
चिरंजीव राजश्री महिपतराव त्रिंबक यांशी.
माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. पीरखान यानें हुजूर विदित केलें की मौजे वोझर्डे आपल्यास व आपले भावाबंदास इनाम जमीन कुलबाब कुलकानू देखील मुकादमी व जमीन चावर बि॥
कित्ता कित्ता
१६ पदमसिंग ५ इमामखान.
१०॥२० मालोजी पिसाळ ४ फरीदखान
२।१० पीरखान.
२ छटूखान.
--------------- -------------------
२६॥२० १३॥१०
येकूण चाळीस चावर जमीन व मुकादमीचा काईदा वांटणी करून घेऊन भोगवटियास कैलासवासी महाराजांनी इनामपत्रें करून दिल्ही. त्याप्रमाणें भोगवटा वांटणीचा चालत आला असता हल्लीं दोन वर्षे पदमसिंग व मालोजी पिसाळ सदरहू जमीन व मुकादमीचा काइदा खतांत आपल्यास व आपले भावबंदास काही देत नाहीं. याजकरितां ताकीद झाली पाहिजे, ह्मणोन त्यावरून हे पत्र लिहिलें असे. तरी सुदामत चालत आले असेल व कैलासवासी महाराजांनी वांटणीची पत्रें करून दिल्ही असतील ती मनास आणून त्याप्रमाणें चालवणें. पदमसिंग व मालोजी पिसाळ धटाई करीत असले तरी निक्षून ताकीद करून गैरवाजवी करूं न देणें. जाणिजे. छ १४ रबिलावल सु॥ इसने सितेन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.
शिक्का.
केशवजी नाईक बिन दत्ताजी नाईक देसाई.
कानोजी पिसाळ.
तानाजी लिंगोजी व गिरजी झिंगो देशपांडे
कृष्णाशेट शेटीया क॥ वाई.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५९] श्री. २३ अक्टोबर १७१०
श्री शके १६३२ विकृतीनाम संवत्सरे मार्गशीर्ष शु॥ १ प्रतिपदा राजश्री सूर्याजी फिरंगोजी नाईक पिसाळ देशमुख प्रांत वाई सु॥ सन इहिदे अशर मया अलफ सन ११२० लिहून दिल्हें इनामपत्र ऐसाजे. प्रांत मजकुरची देशमुखी तुमच्या व आमच्या वडिलांची मिराशी तुह्मी आह्मी खात असतां दरम्यान न्याहारखान गोरीनें वतनांत खलेल केलें. मग तुह्मी वतनाकरितां कष्ट मेहनती करून वतन सोडविले. मग तुह्माआह्मामध्ये कथळा लागला होता. तो तुह्मी आह्मी बसोन तोडून तुह्मास निमे देशमुखीची महजर व वांटणी करून दिल्ही. त्याप्रमाणें आह्मी चाल चालवावी ती चालविली नाहीं. आह्मापासोन अंतर पडिलें व खाजेखानाचे कारकीर्दीमध्ये तुह्मापासोन बेदाव्याचा कागद लिहून बूधच्या मुक्कामास आणविला. ऐशी बहुत कांही अंतरें पडली. मग तुह्मी रागें भरून निंबाळकर व थोरात व राजश्री परसोजी भोसले आपल्यास सामील करून आह्माशीं कटकट केली. शेवटीं महाराज राजश्री राजा शाहू छत्रपती साहेबास देशमुखी दिल्ही. तुह्मी आह्मी वतनास तुटलों. महाराज साहेबांचे मुतालिक येऊन वतनावरी बैसोन वतन खाऊं लागले. वतन गेलें ऐसें जाहले. मग तुह्मी आह्मी बैसोन विचार केला जे :- तुह्मी येक होऊन वतन सोडून निमें निमें खावें. ऐसा विचार करून निमें देशमुखीचा महजर तुह्मास पेशजी करून दिल्हा होता. परंतु गोवी साक्षी कोणाची नव्हती मग महजर वांटणीच्या माहिती यावरी साक्षीही करून दिल्या. आणि हा कागद इन करून तुह्मास लिहून दिला आहे. याउपरी तुह्माशीं बेइमानी करणार नाहीं जो बेइमानी करील त्याचें श्री निसंतान करील. तुह्मी निमी देशमुखी खाऊन सुखरूप असणें. तुमचे निमेस आह्मी खलेल न करावें. आमचे निमेस तुह्मी खलेल न करावें. खाजेखानाचे कारकीर्दीस तुह्मापासोन कागद बेदाव्याचा लिहून घेतला होता तो कागद रद्द असे. हे सही.
शिक्का.
केशवजी नाईक बिन दत्ताजी नाईक देसाई.
कानोजी पिसाळ.
तानाजी लिंगोजी व गिरजी झिंगो देशपांडे
कृष्णाशेट शेटीया क॥ वाई.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
कर्ज तुह्मावरी घातले. तुह्मी फरीख करून निमे देशमुखी खाणें. कर्जाचा दावा तुमचा आह्माशी कांही नाहीं. कर्जाचा तुमचा बेदावा केला असे. तरी प्रांतमजकुरचे देशमुखी बराबरी दोठाई घालून सुखी असावें. शिका पानमान नाट तश्रीफ तहरह जमाबंदी हक्क लाजिमा इनाम जमीन व इनामगाऊ, शेव, धार, उकाळा बाजार, घाट, मेठ, जकाती, विस्वा, पत्र लोणी व बाजें उत्पन्न होईल तें येणेंप्रमाणें खाऊं. बितपशील
कलम.
किता येक १ कलम शिक्का दोठाई, आधी आमचा, मग तुमचा येकूण शिके दोन करावे. व दस्तकें दोन, आधीं आमचें मग तुचें नांव लिहीत जावें. कलम १ |
पानें तुह्मी आह्मीं बरोबरी घेत जावें कलम १. |
तश्रीफ बरोबरी कलम १ हाक लाजिमा व इनामगाऊ व इनाम जमीन तपशिलाप्रणें बरहु॥ जमीन तपशिलाप्रणें बरहु॥ वांटणी जाबता निमेचा निमेचा आहे. त्याप्रमाणें खावें. कलम १. |
तहरम जमाबंदी व कारभार तुह्मी आह्मी मिळून करावा. कलम १. |
पैदागिरी व मागणी जें मिळेल ते निमेंनिमें वांटून खावें. कलम १. |
शेव, धार, उकाळा, घाटमेट, जकाती, विस्वा व पत्र, लोणी व बाजें उत्पन्न होईल ते निमें निमें खावें. कलम १. |
सदरहू कलमाचे लिहिलेंप्रमाणें तुह्मी आह्मी लेंकराचे लेंकरी खाऊन सुखी असावें. लिहिलेप्रमाणें बिला कुसूर चालो. यास आह्मी तुह्माशीं बेइमानी करूं, तरी कृष्णेमध्यें मात्रागमनाची आण असे व कुलस्वामी श्री पद्मावती व सोनेश्वर व महाबळेश्वर व धोमेश्वरव सिध्देश्वर व भद्रेशर व रामेशर यांची आण. व आपले वडील बेताळिसांची आण असे. व गाई ब्राह्मणाची आण असे. हा लिहून दिल्हा महजर४२ सहीं.
शिक्का
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
यावरी सनदा हजीर नव्हत्या. त्या आणावयास माळेस पाठविलें. इतकियांत लश्कर कुच करून हजरत बेदरास चालिले. त्यावरी कदीम सनदा ही आणिले. सनदा बमोजीब हातांनी सनद करून घ्यावी. त्यास लश्कर मजल दरमजल चालिले. अकोळजेच्या मुक्कास लश्करें गेलिया दुसरे रोजीं मातोश्री पिलाबाईस वर्तमान देसकास वाईस जावयास रजा दिल्हे. तेथून लश्करा बराबरी तुह्मांस व देशपांडियास वतनाचें सनदपत्र करून आणावयास कदीम सनदा बरोबरी देऊन पाठविलें. त्यावरी तुह्मीं दरबारी वरीस दीडवरीस राहून पातशाही परवाना देशमुखीचा करून घेतला. दामोहस्जबदूलमुलूक नबाब असतखान दिवाणसाहेब त्यावरी दरबारी टक्का मोबलगा खर्च जाहला. साउकाराचे टकियाचे फरीखत जालिया वेगळे सनदा हातास न येत, याबद्दल पैका आणावयास माळेस वाईस मातोश्री पिलाबाईजवळी पाठविली. त्यास तेही परगणेमजकूरपैकी शिस्त करून रुपये २५०० अडीच हजार पाठविले. ते दरबारीं चोपदार वगैरे किरकोळ खर्च जाहला. त्यास ही पुरलें नाहीं. फिराऊन मागती माळेस टकिया पाठविली तों वाटेस खबर जाहीर जाहली कीं, गनिमानें वाइचें ठाणें उठविलें. मग तुह्मास साउकारांनीं टकियाबद्दल जेर जप्तकरून तगादा लाविला. मग तुह्मीं साउकाराचे घरीं गुंतोन राहिलेती त्यावरी कितेक दिवसांनीं तुह्मी वाईस आलेती. मग आह्मास बोललेत साउकाराचे टकियाचें काय करिता? तुह्मी उपराळा केला नाहीं. त्यामुळें आमची खराबी जाली. सत्यानास जाला. आह्मी साउकाराचे घरी बंदीस पडिलों. असें कितेक तुह्मी आपली मेहेनती सांगितली त्यावरी तुमची आमची बोलाचालीहीं बहुत जाली. शेवट मनास आणितां साउकाराचा टक्का मोबलग खेरीज, जाली टक्का तो साउकाराचें देणें जरूर. आण नातवानगीचा वक्त आपला व मुलुकाचा ऐवज कोठें दिसोन नये. यामुळें तुमचे व आमचे कुसूर वाडोन वतन तिसरियाचे हातास जावें ऐसा पदार्थ दिसोन आला मग तुह्मी बसोन विचार पाहतां वतनाचे खर्चाचे टक्का हस्तकबिन तगाईत तगीरी न्याहारखान गोरी येकूण रुपये १२२७०० येक लक्ष बावीस हजार सातशे रुपये दरबारी मुद्दल खर्च जाहला. त्यास व्याजवर्ताळा साउकारी हिशेब चौरात्रा पंचोत्रा प्रे॥ हिशेब करून पाहिला. तो बेरीज बोबलगा जाली. मग तुह्मी आह्मी बापभाऊ; वतन तुमचे आमचे वडिलाचे भाकरी ही राज्याचे हातास गेली होती ते सोडऊन आपले घरास आणिली. तुह्मास परमेशरें फुरसती दिला ह्मणून वतनाचा उध्दार केला तरी तुह्मी भाऊच आहा बिराजी असतेस तरी टाकियापैकियाचा हिशेब मानतेस. तरी तुह्मा आह्मांत बिराजपण नाहीं. तुमचा आमचा वंश एकच आहे. याकरितां आह्मी आपले संतोषें प्रांत मजकूरची देशमुखीपैकी निमे देशमुखी तुह्मास दिली असे. त्याचे वाटणी जाबिता आलाहिदा करून दिल्हा असे. त्याप्रमाणें निमे देशमुखीं तुह्मी लेकराचे लेकरीस खाऊन सुखी असणें. सदरहू टक्का तुमचे गुजरातीनें साउकाराचे कर्ज वतनवारी जाले, त्याशी आह्मास निसबती नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
मातुश्री पिलाबाई देशमुख हेही आपणास बराबरी घेऊन दर मोकाम तुळापुरास गेली. आह्माबरोबर देशकही होता. एक दोन वेळां फिरादिही केली. परंतु दरबारीं टकियावेगळें काम निघोन येत नाहीं, व न्याहारखान गोरीही जबरदस्त, आपणांसही वशिला कोणी नाहीं. कितेक दिवस दरबारीं होता. त्यावरी तुह्मी वतनाची खबर ऐकोन वतनाकरितां गळा कफणी घालून दरबारास गेलेती जुलपुकारखान बाहादूर याची भेटी घेऊन आपले वतनाचे कुल हकीगत जाहीर करून त्यास वशिला करून त्याचे हातें हजरतजील सुभांजीचे मुलाजमत केली. वतनाचे बाबें अर्जी पोहोंचविली. त्यावरी जुलपुकारखान किले रायरीस फत्ते करावयास रवाना केले. ते स्वार होऊन गेले. त्याबराबरी हजरत पातशहानिले बराबरी दिल्हे, की पातशाही काम याचे हाते घेणें. त्यावरी कितेका रोजानीं रायरी फत्ते केली. ते प्रसंगी तुह्मीं बहुत खस्त खाऊन पातशाही काम केलें. वतनाबद्दलही टक्का खर्च केला. त्यावरी जुलपुकारखान बहाद्दूर रायरीस फत्ते करून राजे अजमाचे कबिले व राजा शाहू याशी घेऊन तुळापुरास आले. तुमची आमची भेटीही जाहली. तुह्मी आपली हकीगत आह्मांस सांगितली. आह्मी जे जे मेहेनती केली तेही तुह्मास सांगितलें. ऐशियास टक्का असलिया वेगळे वशिला होऊन दरबारीहून काम निघोन येत नाहीं. आमचा जो विचार आहे तो तुह्मांस दाखल आहे. तरी तुह्मी खानबहाद्दूराबराबरी मेहेनती करून आला आहा. तरी वतन तुह्मा भावाचें आहे. न्याहारखान गोरी जबरदस्त आहे. त्यापासून वतन सोडिलें पाहिजे. जो टक्का लागेल तो साहूकाराचा काढून दरबारी खर्च करून एकवेळ वतन सोडवणें. वतन बहाल जाहलियावरी तुह्मी आह्मीं वतन सामीलपणें खाऊन. तुह्मी दौलतेवरी नजर देऊन वतनाची सांडी कराल तरी दौलत दो दिवसाची आहे. वतन तुमचे आमचे वडिलांचे आहे, तें सोडविलें पाहिजे. आतां तुह्मी पातशहाचे मुलाजमतीस जाल ते प्रसंगीं आधी वतन बहाल करून घेणें. मग दौलत मनसबा जे होईल ते हो. त्यावरी तुह्मी मातुश्री पिलाबाई व गंगाजी नाईक याचा निरोप घेऊन गेलेती. खानबहाद्दराचे मारफतीनें हजरतजील सुभांजीचे मुलाजमत जाली. खान बहादूरांनी तुमचा मजुरा केला. ते वक्तीं हजरत बहुत मेहेरबान होऊन जालेखान बहाद्दुरानें अर्ज केला कीं, न्याहारखान गोरी फोउजदार याणें गैरवाका मालूम करून वतनास दाखल जाहला आहे. तो कांही वतनास पोहोंचत नाहीं. तर त्यास तगीर करून याचे वतन यास बहाल करून दिल्हे पाहिजे. त्यावरून न्याहारखान फौजदार यास तगी करून दुसरा फौजदार पाठवून दिल्हा. वतन आमचे आह्मांस बहाल केले. व साहा हजारी मनसब ही दिल्हे. त्यास तुह्मी हजरतीस अर्ज केला कीं, माझें वतन मज बहाल केले हेच माझी मनसब. ऐसा अर्ज करून वतन बहाल करून घेतलें. मनसब कबूल केली नाहीं. मग हजरत बहुत मेहेरबान होऊन वतनाचे बहालीस हुकूमही दिल्हे. व देशकास ही शिरपाव घ्यावयाचा हुकूम सजावाल दिल्हा. तेथून तुह्मीं डेरियास येऊन आह्मांस वर्तनाम सदरहू सांगितलें. त्यावरून खुशालीचे शक्कर वांटली. दुसरे रोजीं आह्मांस व देशपांडियास व देशकयास शिरपाऊ पातशाई कचेरीस दिल्हे. यावरी बाहालीचे परवाना कदीम सनद सनदेचे पुरसीस केली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५८] श्री. १८ फेब्रुवारी १७०२
शिक्का.
महजर व तारीख छ १ हे सौवाल बहजूर हजीर मज्यालशी प्रांत वाई सरकार नहीसादुर्ग उरूफ पन्हाळा सुभे दारूलजफर विजापूर सुरू सन हजार अकराशें अकरा इसने मया व अलफ.
मर्तबात पना इस. माईलखान जागीरदार प्र॥ वाई. |
राजश्री दत्ताजी केशवजी नाईक पिसाळ देशमुख प्रांत वाई याणी राजश्री सूर्याजी फिरंगोजी नाईक पिसाळ देशमुख प्रांत मजकूर यास लिहून दिल्हा. महजर सहीं. |
शिक्का. | |
साक्षी निसबत दत्ताजी नाईक. | |
सौभाग्यवती काशीबाई व भागीरथीबाई देशमुख प्रांत मजकूर व केशवजी नाईक देसाई. नागाजी काळभर सरनोबत. |
माहादजी पिसाळ बिरादार दत्ताजी नाईक. लाडूबाई व त्यांचे पुत्र पिराजी. |
गोत. ... ... ... |
शामजी लिंगोजी व गिरमाजी झिंगो देशपांडे प्रांत वाई.
हे मुख्य करून समस्त स्वस्ति श्री शालिवाहन शके १६२३ वृषानाम संवत्सरे फाल्गुन शु॥ ३ बुधवारते दिने राजश्री सूर्याजी फिरंगोजी नाईक पिसाळ देशमुख प्रांत वाई याशी दत्ताजी केशवजी नाईक पिसाळ देशमुख प्रांत मजकूर याणीं लिहून दिल्हा महजर ऐसाजे. परगणे मजकूरची देशमुखी तुमच्या आमच्या वडीलवडिलांची मिराशी पिढी दरपिढी वतन खात असेत. तुमचा आमचा मूळ पुरुष एक. वडिलांची भाकरी एक चालत असतां हजरतजीलसुभांजी दक्षिणेस चाली करून आले. तेही विजापूर व भागानगर दोन्ही पातशाही फत्ते केली. या आण प्रांत मजकुरास ठाणें बैसावयास अमारतपन्हा न्याहारखान गोरी फौजदार पाठविले. तेही प्रांत मजकुरास येऊन ठाणें बैसवून अम्मल पातशाही करूं लागले. तेवक्तीं आह्मांस कमजोर देखोन हुजूर गैर वाका मालूम करून देशमुखीचा परवाना करून घेतला, आण आमच्या वतनास दाखल होऊन वतनाचा अम्मल चालवूं लागले. तेच प्रसंगीं आपण नेणते होता.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५७] श्री.
श्रीमंत माहाराज मातुश्री आईसा ॥ याणीं.
दौलतराव बिन पदमसिंग पिसाल यास दिल्हे इनामपत्र ऐसाजे. तुह्मी साहेबाचे राज्यांत सेवा करीत आला. प्रस्तुत दिनकर महादेव नि॥ राजश्री पंतप्रधान याजवर पिलाजी चतुर हुजरातीस चाकर होता. त्यानी टोणपी याचा वार केला ते समईं तुह्मीं त्याचें रक्षण केलें. तेव्हां सरकार चाकरीचे उपयोगी पडला ऐसें जाणून शाहू नगरनजीक किले सातारा येथील मु ॥ साहेब तुह्मावर कृपाळू होऊन मौजे वोझरडें प्रांत वाई येथील सरकारचे शेरीची जमीन चावर -॥- निमें आहे ते कोरडवाव व पाठस्थळसुध्दां पूर्वील डाग शेरीचा स्वराज्य व मोंगलाई येते दुतर्फ कुलबाब कुलकानू हालीपट्टी व पेस्तरपट्टी देईन. इनाम तिजाईखेरीज हक्कदार करून हल्ली तुह्मांस नूतन इनाम दिल्हें असे. तरी सदरहू जमीन शेरीची निम्मे चावर आपले दुमाला करून घेऊन आपले वंशपरंपरेनें अनभऊन सुखरूप राहणें. जाणिजे छ ५ मोहोरम सु॥ सबा खमसैन मया व अलफ, लेखनावधि.