Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[७५] शके १६४९ प्लवंगनाम संवत्सरे तेरीख ११ माहे सौवाल
श्रीशाहूभूपतिनिष्टस्य गिर्माजीतनुजन्मन: ।
कान्होजी भोसलस्येयं भाति मुद्रा यशस्करी ॥
यासी साक्ष.
अंबूराव अमात्य. मालोजी भोसले.
[७६] श्री.
राजश्री रंगो हणजी गोसावी यासी.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजन्य. स्ने॥ रायाजी भोसले रामराम. उपरी भाईअजम शेखमिराजी यासी आह्मीं करार केला आहे. पन्नास स्वारांनशी तुह्मास आह्मापाशी पाठऊन देतों. त्यास एक परगणा सरंजाम लाऊन देऊन सेवा घेऊं. तरी तुह्मीं सदरहू स्वारांनशी आह्मापाशीं येऊन पोहोंचणें. तुमचे आपले विचारे त्यास सरंजाम लाऊन देऊं. तर आह्मीं त्या प्रांतास आलियावर तुह्मीं सत्वर येऊन पोहोंचणें. बहुत काय लिहिणें. छ १ माहे रमजान. तुमचे आमचे विचारें ठीक जालियावर ज्या भल्या माणसास ठेवाल, त्यास ठेवणें. बहुत काय लिहिणें. लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[७४] श्रीशंकर. २१ मे १७२७
श्रीहनुमान
अजम शेखमिरा बई मोहबतहू
छ मोहिबान पन्हाही मुखलिसान दस्तगाहा
अजी कान्होजी भोसले सेनासाहेब सुभा. सुहुरसन सबा अशरीन मया अलफ. तुमचें कर्ज आह्मी देणें होतें. मुद्दल रुपये २१९५० एकवीस हजार नवशे पन्नास रुपये देणें होतें. त्याचा करार साताराचे मुक्कामीं जेष्ट शु ॥ त्रयोदशीस केला. रुपये ३०००१ तीस हजार एक सदरहू तुमचे रुपये द्यावयाचे वायदे केले रुपये.
१५००० खरिफाचे हंगामीं अखेर पौष सी द्यावे रु.॥
१५००० रबीचे हंगामीं अखेर जेष्ट मासीं द्यावे रु.॥.
-----------------
३००००
येकूण तीस हजार रुपये रास वायद्याप्रमाणें तुह्मी आपला भला माणूस आह्माजवळ पाठवणें. त्याचे गुजारतीनें मौजे कासवदें प॥ येरंडोल सुभा- खानदेश येथें गढींत पावतें करून. जरी रुपये पावतें करावयास अंतर करूं तरी आह्मांस आमचे आराध्य श्री ची शपथ असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[७२] श्री. ११ मार्च १७५१
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणीं अजम फरीदखान यासी आज्ञा केली ऐसीजे :- तुचेविशी राजश्री बऱ्हाणजी मोहिते यांणीं विनंति केली त्यावरून हें आज्ञापत्र सादर केलें असे. तरी तुह्मी हुजूर दर्शनास येणें. येथें आलियावर आज्ञा करणें ती केली जाईल. जाणिजे. छ २३ रविलाखर ज्यादा काय लिहिणें.
[७३] श्री. २० सप्टेंबर १७५०
अजम शेखमिरा यासी आज्ञा केली ऐसीजे:- आज गुरुवारी कळंबीनजीक आऊंद येथून कुच करून सावळी क॥ आऊंद येथें येऊन मुक्काम केला. तुह्मांस कळावें ह्मणून लिहिलें असे. लोकांस ताकीद करून वाडियांत रात्रंदिवस चौकीपारा करून खबरदार राहाणें. जाणिजे. २९ सवाल सु॥ खमसेन मया अलफ. बहुत काय लिहिणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६९] श्री. १३ मार्च १७५१
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणीं त॥ मोकदम मौजें माहागांव प्र॥ वांई इहिदे खमसेन मया अलफ. सरकारचीं भांडीं शहरांत आहेत. ती गडावर न्यावी लागतात. तरी गोणी वीस पाठवून देणें. या कामास लोक दि॥ हुजरे प॥ यांस रुपये एक देणें जाणिजे. छ २५ माहे रविलाखर. लेखनावधि.
[७०] श्री. ११ मार्च १७५१
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब यांणीं अजम. शेखमिरा व लोक हुजरात यांशी आज्ञा केली ऐसीजे :-
राजेश्री नारोजी शिंदे यास कारखानियाचे देखरेख करून कारखाने उघडोन ऐवज व वस्तभाव व कापड व गला हरजिन्नस किल्यावरी हुजूर आणावयास पाठविले आहेत. तर ज्याचे जिम्मेस जो कारखाना आहे तो उघडोन म॥ निल्हे जे वस्तभाव आणितील ती आणून देणें. येविशी उजूर न करणें. जाणिजे छ २३ हे रविलाखर, सु॥ इहिदे खमसेन मयाव अलफ. ज्यादा काय लिहिणें.
[७१] श्री. १५ सप्टेंबर १७५०
अजम शेखमिरा यासी आज्ञा केली ऐसीजे. राजजी पाटिलाच्या स्वाधीन आहे, तें लोकास वांटून द्यावयास मागता ह्मणून विदित जाहलें. ऐशियास कामकाज लागलें, तरी, मण दोनमण दारू लागली तरी घेऊन वांटून देणें. वावगी खर्च न करणें. आगत्य जरूर लागलिया घेणें. छ २४ सवाल, सु॥ इहिदे खमसेन मया अलफ. बहुत काय लिहिणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६७] श्री. ९ मार्च १७५१
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेब याणीं अजम शेखमिराजी यासी आज्ञा केली ऐसीजे :- तुह्मी एकनिष्ठ आहां. तरी तमाम हुजरातचे सरदार एक टोळी करून राजश्री दमाजी गायकवाड यास सामील होऊन कामकाज केलियानें मनोदयानुरूप साहेब ऊर्जित करितील जाणिजे. छ २१ र॥ खर. ज्यादा काय लिहिणें.
मोर्तबसूद
[६८] श्रीभवानी प्र॥ ९ मार्च १७५१
श्रियासह चिरंजीव राजश्री गमाजी बावा या प्रती.
यमाजी शिवदेऊ आशीर्वाद. उपरी येथील कुशल त॥ छ ७ जमादिलावल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेले पाहिजे. विशेष शेखखान महमद सेखजीचे होवे यांशीं श्रीमंतांनीं पूर्ववतप्रमाणें त्यांचा सरंजाम त्यांस करार करून दिल्हा असे. ऐशियासी तुह्माकडून गांवखेडेयास उपद्रव होतो ह्मणोन त्यांणीं सांगितलें. तरी शेखजीचा आमचा स्नेह. त्याचे लेक याचे याठाईं दुसरा विचार नाहीं. तरी गांवखेडेयासी उपद्रव न लागे तें करावें. हल्लीं जलखान त्यांचे तर्फेनें आले आहेत, हे सांगतील. त्याप्र॥ सर्व साहित्य करणें. लोभ असो दीजे.
आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६६] श्री. २५ मार्च १७३०
राजश्री बाळगोळी४३दि॥ गोंसावीबावा गोसावी यास.
सेवक हबाजी मो-या वस्ती मौजें केतकी सु॥ सलासीन मया व अलफ. आपण पांच वर्षे तुजकडे चाकरीस कबूल केली होती. त्यास साडेतीन वर्षे चाकरी केली. बाकी दीड वर्षे राहिलें. ते आपण तुझी चाकरी भरून दीडवर्ष देईन. दीडवर्ष भरून दिलियावरि तुझें आपण कांही देणें नाही. आपलें तुजकडे येंणें नाहीं. हें लिहिलें सही. छ १६ रमजान सु॥ रमजान सु॥ सलासीन मीया अलफ. चैत्र वदि ३ साधारण संवत्सरे. यास अंतर पडिलें, तर तुझा लेखना लेख घ्यावा.
ग्वाही
धास्कर पाध्यें व॥ आंबडस. मोरभट थत्ते व॥ आंबडस.
भिम जोशी संगमेश्वकर. बाळकृष्ण भट पुजारे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६५] श्रीभार्गवराम.
आशीर्वाद. उपरी येथील कुशल त॥ श्रावण, शुध्द त्रयोदशी जाणून स्वकीय कुशल लिहावें. तुह्मी दोन तीन पत्रें पाठविली ती पावली. उत्तर सविस्तर लि॥ सांगितलें आहे. त्या प्र॥ दरबारचें कामकाज घ्यावें. चिरंजीव राजश्री जगंनाथपंतास बराबर नेऊन व राजश्री कृष्णाजीपंतदादा याचे हातून कामकाज करून फडशा करावा. मागील हिशेब सर्व आहेच. र॥ नारोपंत काल परवाच प॥ असेत. परंतु पाऊस फार यामुळें राहिले. प्रतिपदेस पाठऊन देतों. श्रीची पुण्यतीथ बहुत उत्तमसांग नवदिवस नवरात्र जाहलें. संतर्पण, कीर्तन, वार्षिकाहून विशेष जाहलें. नागपंचमीचें दिवशी चमत्कार जाहला. रात्रौ धुपारतीचे समई समाधीचें वस्त्र कापून गती गती वस्त्र काषायमान हा चमत्कार सर्वांही पाहिला. कळावें. श्री साक्षात आहेत. दृष्टांतही जाहले. हें वर्तमान र॥ लक्ष्मणपंतास सांगावें व राजश्री विष्णुपंतास सांगावें. श्रीचे संस्थानाची नेमणूक सर्व उत्तम करून घ्यावी. ह्मणून र॥ शिदभट व चिंतोपंत, सोनोपंत यांशी सांगावें. नागपंचमीचें वर्तमान शिदभट, वेंकाजीपंत, सोनोपंत, चिंतोपंतास सांगावें, चमत्कार जाहला. ईश्वरइच्छा प्रमाण. अधिकोत्तर लि॥ वेसें नाहीं. हे आशीर्वाद.
बेहेडा सन सितैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
ते गोष्टी सूर्याराव यांनी ऐकून हुजूर महाराजापाशी उभे राहिले की, आपण येथें जवळ आहोत. महाराज बोलिले जें :- आह्मास नजर देणें. तुमचें वतन तुह्मांस निम्मेच्या सनदा करून देतों, आणि निम्मेच्या सनदा दत्ताजी नाईक याशीही देशमुखीच्या करून देतों. त्याजवरून सूर्याराव याणी राजश्री राजजी थोरात व सुलतांजी थोरात व दमाजी थोरात यांजकडे जाऊन त्याजपासून कर्ज घेऊन सोनें, रुपें १५,००० पंधरा हजाराचे व नक्त रुपये १५,००० येकूण तीस हजार रुपये नजर, महाराज स्वामीस देऊन व दत्ताजी नाईक यानींही धनाजी जाधवराव याचे गुजारतीनें नजर स्वामीस देणें ती दिल्ही. त्याजवरील रांगणाचे मुक्कामी राजश्री दत्ताजी नाईक याशी निम्मे देशमुखीचीं पत्रें करून दिल्ही. व सूर्याराव पिसाळ यासही निम्में देशमुखीचीं पत्रें करून दिल्ही. शिक्याचा मजकूर उभयतांनी महाराज स्वामीस पुशिला. त्याजवरही महाराज स्वामी बोलिले जे :- वांई देशाची लावणी करणें. आह्मीही त्या प्रांते आलियावरी शिक्याचा मजकूर विल्हेस लाऊं. त्याजवरी उभयता देशास आले. महाराज स्वामीची छावणी जाहली. मग दुसरे वर्षी महाराज स्वामी या प्रांते आले. किल्ले वंदनगडावरी छावण्या करून राहिले. मग वंदनचे मुक्कामी गंगाजी नाईक व दत्ताजी नाईक व त्यांचे भाऊ कुळ पिसाळ मिळाले. तेथून कूच होऊन मरढियावरी राजश्री स्वामीचा मुक्काम जाहला. तेथें तमाम अष्टप्रधान व चंद्रसेन जाधवराव असे होते. ते समई सारे पिसाळ उभे करून महाराज स्वामीनीं गंगाजी नाईक याशीं विचारिलें जें :- सूर्याराव तुह्मांस काय होते. ते बोलिले जे :- माझा पुतण्या होय. त्यावरी दत्ताजी नाईक याशी विचारले. त्यास दत्ताजी नाईक बोलिले जें :- गंगाजी नाईक आपले बाप. व आपले भाऊबंद सारे सूर्याराव याशी मिळाले. मग दत्ताजी नाईक बोलिला जे :- सूर्याराव आपला भाऊ नव्हे. त्याजवरून महाराज स्वामीस राग आला. मोंगलाईतील न्याहारखानानें देशमुखी घेतली होती ती सूर्याराव यानेंच सोडविली असें महाराज स्वामीस विदित होतें. आणि हल्लीही येथील मजकूर कित्येक लोकांनी निवेदन सूर्याराव यांजविशीं केला होता. त्याजवरून देशमुखीचें वतन अमानत करून जोत्याजी केसरकर सरदेशमुख यांचे हवाली देशमुखीचें वतन केले असें. सूर्यारावही यांच्या हाताखाली देशमुखीचा कारभारी करीत होते. त्याजवरी महादाजी गणेश यांच्या हाताखाली सूर्याराव कारभार करीत होते. त्याजवरी मोरो जिवाजी देशपांडे यांच्या हवालीं देशमुखीची मुतालकी करून सूर्याराव याशीं महाराज छत्रपति बोलिले :- मौजे वोझर्डे हा गांव कुलबाब कुलकानूदेखील, हक्कदारदेखील दरोबस्त खाऊन सुखरूप राहणें. असे असतां जनाई जाधवीण भुईंजकर इनें महाराज स्वामीस अर्ज करून राणोजी नाईक पिसाळ याशीं वोझर्डेपैकीं दोन चाव्हर जमीन बरोबर चोपदार देऊन मोजून पदरी घातली. दोन चाव्हर खात होते. याशी साक्ष देशाधिकारी व देशक.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
निम्में रोटी अर्धी सूर्याराव पिसाळ याचे पुत्र पदमसिंगराव याचे हाती निम्में दिली. त्याजवरी तेच प्रसंगीं निम्में देशमुखीचें वतन निम्मेचें पत्र सूर्याराव याशीं करून दिलें. वांई देशांतील गांव निम्में निम्में तारोतार व इसाफती व इनाम तारोतार निम्में वांटून दिलें असे. दत्ताजी नाईक यांणी सूर्याराव याशी शिक्यानिशी आपल्या हातें कागद करून दिला. त्यावर दत्ताजी नाईक बोलिले जें :- एक शिक्का असूं देणें. त्यांस सूर्याराव बोलिले जें :- तुह्मी निम्में देशमुखीचा शिक्का करणें आह्मी निमें देशमुखीचा शिक्का करूं. त्याजवरून उभयतांचे भांडण लागलें. त्याजवरी महाराज छत्रपति स्वामी मोंगलाईहून या प्रांती आले. त्यांस तुळापुरी मुक्कामी दत्ताजी नाईक जाऊन स्वामीस गैरवाका विदित करून सारे देशमुखीची पत्रें करून घेतली. धनाजी जाधवराव यांचे विद्यमानें पत्रें घेतली. हें वर्तमान सूर्याजीराव याशी विदित नव्हतें. हें वर्तमान सूर्याराव याशी कळिल्यावरी सूर्याराव याणीं थोराताचे हातें राजे बुवा थोरात यांचे हातें महाराज छत्रपति स्वामीचें दर्शन घेतलें. सदरहू देशमुखीची हकीगत सदरहू प्रो सांगितली. आणि मोगलाईत असता ही महाराज छत्रपती स्वामीसही वर्तमान दाखल होतें. त्यास स्वामी बोलिले जें :- तुमचे निम्में देशमुखीचें वतन तुमचे तुह्मास देऊं. निमें दत्ताजी नाईक यास देऊं. ऐसा करार होऊन मजल दरमजल सातारियाशी आले. तेथून पुढें मजल दरमजल पन्हाळियाशी गेले. तेथून पंचगंगेवर गेले. तेथें धनाजी जाधवराव याणीं स्वामीस अर्ज केला जे :- वाई देश खराब झाला आहे. अवघे देशक बरोबर आहे. याशी कौलें, वस्त्रें, घेऊन रवाना करणें, ह्मणोन अर्ज केला. त्याजवरून दिवटयाच्या सलामाच्या समई वस्त्रें सदरेस आणविली. ते समई धनाजी जाधवराव सेनापति याणी स्वामीस अर्ज केला जे :- दत्ताजी नाईक देशमुख याशी वस्त्रें देणें. त्याजवरून महाराज स्वामीनीं मंदिलाचा पदर घेऊन हात वर केला. ते समई सूर्याराव याणीं महाराज स्वामीस थोरले महाराज स्वामीनीं द्वाही दिली कीं, दोही हातीं दोन मंदिले घेऊन दोघांचे हातीं दोन पदर देणें. त्यास धनाजी जाधवराव बोलिले जे :- दत्ताजी नाईकास वस्त्रें देणें. मग सूर्याराव याणी धनाजी जाधवराव याशी जाब दिला जे :- मी कांही जाधव यादव नव्हे! तुह्मी कऱ्हाडची देशमुखी दहा हजार रुपयाची घेतली! ऐसा कांही आपण नव्हें! आपण आहे तो दत्ताजी नाईकाचा तुरा आहे! तुरुकहांडीस देशमुखी पडली होती. त्यास दरबारखर्च लाखोलाख रुपये खर्च करून एक जातीच्या दोन जाती पाहोन देशमुखी सोडविली. त्याजवरून महाराज छत्रपति यांचा मंदिलाचा हात वरता होता तो मांडीवर ठेविला. त्याजवरी गती धनाजी जाधवराव महाराज स्वामीस बोलिलें जे :- दत्ताजी नाईक याशी वस्त्रें देणें. त्यास महाराज स्वामी बोलिले जे :- दोही देत असतां बळजोरीनें वस्त कसें द्यावें. आधीं वाद्याची समजावणी करणें. तोवर वस्त राहूं देणें. मग तमाम कचेरी गेली. त्याजबरोबर सूर्यारावही गेले, आणि कचेरीचे बाहेर बसले. मग महाराज स्वामीनीं सूर्याराव याची याद केली. जगंनाथ चोपदार याशीं आज्ञा केली की, सूर्याराव कोठें आहेत, त्यास बोलाऊन आणणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६४] श्री.
देशमुखी प्रांत वांई राजश्री नागोजीराव नाईक पिसाळ मूळ पुरुष याशी नऊ गांव खात होते. त्यांनी आपले पुत्रांस गांव वाटून दिल्हे असेत.
याशी तपशील :- | |
थोरले बायकोचे पुत्र ५ पांच. त्यापे॥ दोघांचे नक्कल झाले. बाकी तिघे पुत्र राहिले. यांशी गांव दिल्हे ४॥ याशी तपशील. |
धाकटे बायकोचे पुत्र तीन यांशी गांव ४॥. याशी तपशील. |
२ राजश्री सूर्याजीराव पिसाळ. | .॥. मौजें वोझर्डे निमें. |
१ चांदक संमत हवेली. | ३ संमत कोरेगांव. |
१ तडवळें संमत कोरेगांव मोकदम तेथील धुमाळ व झांजुरणें. |
१ कटापूर. |
-------- | १ किन्हई भोसल्याची. |
२ | १ पाडळी फाळक्याची. |
१ राजश्री रामोजी नाईक याशी ल्ह्यासुरणें संत कोरेगांव. |
---------------- |
१ राजश्री अंतूजी नाईक पिसाळ याशी मरटें संमत निंब. |
३ |
.॥. मौजे वोझर्डे निम्में निम्में तिघांशे देशमुखीचा हक्कदारी हिशास रुपये ५ पांच प्रो. |
१ सोनकें संत वाघोली धुमाळाची. |
------------ | ------------------ |
४॥ | ॥४ |
सदरहू येणेंप्रो वांटणी आपले आपली खात होते. कोणाचा तंटा भांडण हा कालपर्यंत नाहीं. सदरहू न्याहारखान गोरी यानें मातुश्री पिलाऊ यांजपासून देशमुखी घेतली. आणि फिरोन कोणीं पिसाळाची देशमुखी ह्मणेल त्यास पायलीभर मीठ चारावें. असें झालें यावर राजश्री सूर्याजीराव पिसाळ याणीं पातशहापाशीं जाऊन गळा कफणी घालून दिवा दिवटया लाऊन फिर्याद केली. मग पातशहापाशीं अर्ज करून मग न्याहारखान तागीर केला. ते समयीं वतनास खर्च सावकाराचें कर्ज घेऊन दोन लक्ष रुपये खर्च केला. पादशाहास व दरबार खर्च करून वतन बहाल करून घेतलें. मग सूर्याराव वांईस आले. ऐशियास पिलाऊ पिसाळ याशीं पुत्र नव्हता. त्यांणी आपले दीर गंगाजी नाईक यांचा पुत्र दत्ताजी नाईक आपले ओटियांत पुत्र ह्मणून घेतलें. ते व सूर्याराव एक होऊन पातशाहापाशी वतनाचा मजकूर जो झाला, तो सूर्याराव याणीं दत्ताजी नाईक याशीं निवेदन केला. त्यावरून दत्ताजी नाईक समाधान पावलें. दत्ताजी नाईक सूर्याराव यास बोलिले जे :- पिसाळाचे वंशी तुह्मी खस्त करून गेले होते, त्यास दोन लक्ष रुपये खर्च करून वतन सोडविलें, त्यास जो खर्च पडला तो तुह्मी सांभाळणें, आणि देशमुखीचें वतन निम्में तुह्मी खावें, निमें आपण खावें. ऐसा करार होऊन श्रीकृष्णातिरीं रवीधोडीजवळी देशपांडिये व देशक व कसबें मजकूरचे पाटील व चापशेट व ह्माजण समस्त मिळऊन गंभीर सागर गोसावी याचे मठीचा एक रोटी आणून दत्ताजी नाईक याणीं आपले हाती घेऊन श्रीकृष्णेत उभे राहून रोटी निम्में बरोबर करून अर्धी रोटी आपले लेंकाचे हाती केशवजी नाईक याचे हाती दिली.