Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[१००]                                                                         श्री.                                                                १ आगस्ट १७१८                                                                                                 

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४५ विलंबीनाम संवत्सरे श्रावण बहुल द्वितीया भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणीं मोकदमानीं देहाय स॥ निंब प्रा वाई यास आज्ञा केली ऐसीजे :- स्वामीचें स्वराज्यदेखील ठाणीं पातशहांनीं स्वामीस बहाल केलें आहे. त्याच्या सनदा अमीरुलउमराऊ यांणीं दिल्या आहेत. ऐशीयास मोंगलाई तर्फेचा ऐवज मोंगलाकडे अगर दुसरियाकडे वसूल न देणें. स॥ मजकूरचा जमेचा आकारदेखील नक्त बाब व जकाती होईल त्यापैकीं निम्में ऐवज मोंगलाईकडील हुजूर वसूल देणें. लेखानालंकार. मर्यादेयं राजते
                                                                              रुजू सं॥ मंत्री.

                                                                 बारसूद सुरु रुद्र बार बार.

श्री ०                                                                      ० श्री
राजा शाहू छत्रपति हर्षनि-                                          श्री आई आदिपुरुष श्री राजा
धान बाळाजी विश्वनाथ प्रधान.                                    शाहू छत्रपति कृपा निधि
                                                                            तस्य श्रीनिवास परशराम प्रतिनिधि.

[९९]                                                                         श्री.                                                                १ आगस्ट १७१८                                                                                                 

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४५ विलंबीनाम संवत्सरे श्रावण बहुल द्वितीया भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणीं मोकदमानीं देहायसंत कोरेगांव प्र॥ वांई यास आज्ञा केली ऐसीजे :- स्वामीचें स्वराज्य देखील आणि पातशहांनी बहाल केलें आहे त्याच्या सनदा नवाब अमीरुलउमराऊ यासही दिल्ह्या आहेत. ऐशीयाशी मोंगलाई तर्फेचा ऐवज मोंगलाकडे अगर दुसरियाकडे वसूल न देणें. स॥ मजकूरचा जमेचा आकारदेखील नक्तबाब व जकाती होईल त्यापैकी निम्में ऐवज मोंगलाईकडील हुजूर वसूल देणें. जाणिजे लेखनालंकार. मर्यादेयं राजते.
                                                                              रुजू सं॥ मंत्री.

                                                                 बारसूद सुरु रुद्र बार बार.

श्री ०                                                                      ० श्री
राजा शाहू छत्रपति हर्षनि-                                          श्री आई आदिपुरुष श्री राजा
धान बाळाजी विश्वनाथ प्रधान.                                    शाहू छत्रपति स्वामी कृपा निधि
                                                                            तस्य श्रीनिवास परशराम प्रतिनिधि.

[९८]                                                                         श्री.                                                                                                      

राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री मोरोपंत स्वामीचे सेवेशी. पे॥ बाबूराव कृष्ण स॥ नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. प्रांत वांई येथील गांवगन्ना कारसाईचे रोखे श्रीमंत महाराज छत्रपती स्वामीची स्वारी खाली आली ह्मणून खाशा घोडयास कडबा झाडून गांवगन्नापैकीं आणावयाचे रोखे जाहले. केवळ वांई सुभाचे गांवची कारसाई घेतल्यावर पैका गांवास मजुरा द्यावा लागेल, ह्मणोन सरकारांत समजाऊन सनद पाठविली. परंतु त्यांत इतर गांवची कारसाई किल्याकडील रोखे करण्याची चाल नाहीं, असें लिहिलें आहे. त्यास हे कारसाई लोकांची नव्हे, महाराजाकडील आहे असें समजोन सनद आली नाहीं. असो. गांवगन्ना मसाले केले नाहीं. रोखे जाहले होते. त्यास हल्लीं राऊतही उठोन आले. तुह्माकडील गांव असतील त्यास तुह्मी लि॥वरून हाती चिट्या देविल्या. कारसाईचा पैका गांवास मजुरा द्यावयाजोगी कारसाई नाहीं. कुंभारकाम, पत्रावळी, कडब्याचे रोखे जाहले होते. त्यांपैकीं चवथाई तिजाई सामान आलें. शहरांत कडबा विकत न मिळे तेव्हां पाटलाचे समाधानें थोडा घेतला. मसाल्याची वार्ताच नाहीं. तुह्मी कल्पून लि॥ असो. सनद तुह्मीं पाठवावी असा अर्थ नव्हता. तुमचे पत्रानेंच बंदोबस्त होता. तत्राप तुह्मी उपर दाखविला असो. सनद शिरसा वंदिली. त॥ छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें. लोभ कीजे. हे विनंति.

[९७]                                                                        श्रीभार्गवराम.                                                            १७२५.                                               

श्रीसकलतीर्थस्वरूप बावा स्वामीचे सेवेशी.

चरणरज जिवबानें दोनीकर जोडून चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार. विज्ञापना ऐसीजे. स्वामीचें आज्ञापत्र आलें तेथें आज्ञा जे :- गांव मोठा, जमीन उदंड भरल्यास दोन हजार रुपये देई ऐसा, लिहोन पाठवणें. व स्वामीनें लिहिलें कीं माळशिरस आमच्या चित्तास येतें ह्मणऊन लिहिलें. तरी माळशिरस गांव मोठा आहे. वरकड गांव मोठे आहेत. हल्लीं दस्तास भारी आहेत. स्वामीचे आज्ञेवरून माळशिरसचे पाटील बोलावून आणिले होते. त्यांस चौकशी करून पुसलें. त्याणीं सांगितलें कीं, आमचे गांवची जमीन साठ पाउणशें चाहूर आहे. व मालकाचे वेळेचा दस्त तीन हजार रुपये आहेत. गांव बरा आहे. भरल्यास दो हजार रुपये देईसा आहे. गांव वाटे वेगळा आहे. गांवचा हल्लीं दस्त गुदस्ता साशें रुपये होते. सालमजकुरीं खंडणीस न्यावयास शिपाई आले होते. त्यांस आपला विचार कळलियावर एक खंडणी सात आठशें होते, ऐसें आहे. तर गुदस्ताची खंडणी हलकी आहे, हीच दिवाणांत सांगोन द्यावी, याकरितां स्वामीची आज्ञा येई, तवपावेतों पाटलांनीं तोंडे चुकाविली आहेत. स्वामीच्या चित्तांत घ्यावयाचा असिला तरी माळशिरसच्या पाटलास अभयपत्र पाठवणें कीं, आह्मीं गांव खामखा घेतो. असें अभयपत्र आलियानंतर चार दिवस खंडणीला दिरिंग लावितील व वसूलही हात राखून देतील. काय आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत, माळशिरसची पांढरी जबरदस्त आहे. त्याच्या तोलास जमिनीविशी कोण्ही गांव येत नाहीं. त्वरा जाहली तरी वसूल आपल्या हातास येईल. आठ पंधरा दिवस अवकाश असला तरी पाटिलास अभयपत्रें आलियानें वसुलास व खंडणीस आठ पांच दिवस हाताचे पायावर नेतील. वरकड स्वामीनीं शेरींत विहीर पाडावयाची आज्ञा केली. आज्ञेवरून विहीर पाडितों. इटा पाडावयास कुंभार आणिले आहेत, ते ह्मणतात जे : चवदा बोटें ईट लांब व रुंद बारा बोटें. तुह्मी आपले सामान द्याल तरी रुपयांनीं हजार देऊं. आणि आह्मास आपले सामान व दोन आयित्या इटाचें मान द्याल तरी हजारी रुपये पांच घेऊन. त्यास आपलें सामान द्यावें तरी त्याच्या हाताखाली माणसें द्यावी लागतात. व या प्रांतें फाटेही मिळत नाहीं. परंतु स्वामी ज्याप्रो। आज्ञा करितील त्याप्रो। वर्तणूक करीन. काय आज्ञा ते केली पाहिजे. यानंतर राजकी वर्तमान :- तरी राजश्री पंतप्रधान व नबाब यांच्या भेटी विसावे तारखेस वांजरेच्या कांठी जाल्ह्या. पहिले भेटीचे समई नबाबांनी रायास एक हत्ती व एक मोत्याची जोडी व घोडे दोन, सात परोचे वस्त्रें व एक पंजाब ह्मणऊन मुसलनी भाषेनें काय आहे तेंही दिल्हें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

[९५]                                                                        श्रीभार्गवराम.                                                      ६ जून १७२८.                                               

श्रीस्वामीचे सेवेशी.

चरणरज अंतशेट कुडाळकर वाणी प्र॥ चिपळूण सेवेशी विज्ञापना. सु॥ समान इशरीन मिया अलफ. स्वामीपासून आपल्या कामाबद्दल कोठीचें भात वरंगळी घाटीं घेतले. -।- येकूण कि॥ रुपये ५ देणें. देणें ते आजिपासून दोन महिनियांनीं सदरहू रुपये आणून देईन. मु॥ अंतर पडिलें, व्याज दर रु॥ icon 1icon 1६ प्र॥ देईन. हें लिहिलें सही छ ८ जिलकाद.
                                  ग्वाही.

महादेवभट पुजारी                         महादजीपंत



[९६]                                                                             श्री.                                                            ११ मे १७२९.       

शके १६५१ सौम्य संवत्सरे वैशाख वदि दशमी तद्दिनी श्रीमत् बावा यांचे सेवेशी. हरभट्ट गणपुले यांही भात देणें तें आह्मास द्यायास अनुकूल नसे. तर सेवेशी कतबा लिहोन दिल्हा ऐसाजे. आह्मीं भात देणें सात कुडव ०icon 4 1 ते सराईंस सवाईप्रणें देऊं. कतबा लिहोन दिल्हास सही.    

[९४]                                                                        श्रीभार्गवराम.                                                        १३ सप्टेंबर १७४५                                               

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नाना स्वामीचे सेवेशी.

विनंति. पो॥ रामाजी गणेश मु॥ इमारत राजूर गणपति. कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील कुशल त॥ छ २७ माहे शाबान शुक्रवारपावेतों सकल वर्तमान कुशलरूप असे. विशेष. अंबाजी शंका याजब॥ पत्र पाठविलें तें पावोन लिहिलें वर्तमान कळों आलें. देऊंगाव अगर जालनापूर येथें सावकार मनास आणून ऐवज घेऊन पत्र पाठवणें, येथें ऐवज देऊं, ह्मणून लिहिलें. त्यास, सावकार लोक दोन चार हजार रुपये आमचे मातवरीवर नेदीत. त्याहीमध्यें श्रीचें वर्तमान या प्रांतीं बहुतांस कळलें. त्यामुळें लोक आह्मांस ह्मणतात कीं, तुमचा धनीं नाहीं, आणि आतां रुपये तुह्मांस द्यावें, मग मागावें कोणास? असें ह्मणतात. दोन चार हजार रुपये नेदीत. फार आमचे वोळखीनें तरी दोन चारशें मिळतील, त्याणें काय होणें आहे. हल्लीं वांटणी येत्ये ह्मणून लोक वाट पाहत होते. त्यास रुपये पाठविलेंत नाहीं, यामुळें लोक बहुत रंजीस आहेत. तजावजा होत होते; परंतु कांहीं उधार आणून थोडेंबहुत लोकांस देऊन काम चालवीत असो. हल्लीं सुलतानभाई पाठविलें आहेत. तरी याजब॥ चार माहीची वांटणी पाठविली पाहिजे. येथील काम कांहीं लौकर होत नाहीं. टाकून जावें तरी बदनक्ष होईल. या प्रांतीं कीर्ति जाहली आहे ते जात्ये. याजकरितां जाहलेंसे करणें लागतें. तरी काय स्वामीचे चित्तीं गोष्ट असेल ते जिव्हाळयाची सुलतानभाईजवळ सांगोन पाठवावी. तेणेप्रों वर्तणूक करून काम येथें कोण्या विचाराचें आहे तें सुलतानभाई विदित करील. तें आइकोन तेणेंप्रमाणें सरंजाम एकच वेळां दिल्हा ह्मणजे काम लौकर करून येतों. ध्वजेस इटा पाहिजेत. चुना कोळसे वाळू पाहिजे. त्यास हजार पावेतों रुपये लोणारियास पाहिजेत. त्याची ही तरतूद करून वांटणी बरोबर पाठवावें. इटा तयार जाहल्या पाहिजेत. संगीचें काम जाहलें ह्मणजे ईटबंदी काम चालवितों. उचापतिदार सावकार येथें केला आहे. पांचशे रुपयेपावेतों जिन्नस देतो. बट व लोखंड, गूळ, डिंक, काथ, ताग, ऐसे दोनशें रुपयाची उच्यापति आणून इमारतीचें कामें चालविलें. आजिपावेतों कोणे गोष्टीस अंतर पडो दिलें नाहीं. आतां वांटणीस स॥ जिन्नस, लोणारी व गाडेकरी याची बेगमी देणें. फाजिलावरून सत्वर पाठवावी. भक्षावयाकरितां लोकांहीं अवसान सोडिलें आहे. पाथरवट जात होते. त्यांस दीडशे रु॥ गांवचे वाणी याजपासून घेऊन असामीस दोन दोन रु॥ देऊन कामावर ठेविले आहेत. सत्वर वांटणी येत्ये तरी उत्तम आहे. नाहीं तरी आमचे विपत्य लोक करितील ह्मणून सुलतानभाई पाठविला आहे. तरी आधी तों रु॥ हुंडीनें पाठवावे. नाहीं तर धावडशीचीं पांच माणसें बरोबर देऊन थैल्या शिऊन वर लाखोटे करून राजुरा वेघें लखोटयास दरकार नाहीं अशी खरपूस ताकीद करून आपलीं तेथील माणसें पांच दि॥ देऊन रु॥ पाठविले पाहिजे. वरकड कापडापैकीं रु॥ पाठविलेत, त्यास साडेएकावन मात्र रोख प॥ ते आले. छत्तीस आले नाहींत. त्यास ताकीद करून पाठवावें. वरकड वर्तमान सुलतानभाई सांगतां विदित होईल. विशेष काय लिहिणें हें वि॥. ४७

नक्कल.
[९३]                                                                         श्रीरामचंद्र.                                                        ११ जून १७३४                                                

अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री सुभेदार व कारकून
                                                   प्र॥ सुपें गोसावी याशी.

सेवक नारो शंकर सचिव, नमस्कार. सु॥ खमस सलासीन मया अलफ. मौजे माळशिरस येथील बाबती श्रीपरमहंस यांस दिल्या आहेत. तर मौजे मजकुरास तुह्मीं एकंदर बाबती व सावोत्रा व किरकोळ वेटबेगार उपसर्ग न देणें. रोखापत्र एकंदर न करणें. मागील पुढील कतबे लाजिमा घेतले असतील ते घारें मोकदमास देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. व किरकोळ खंड, गुन्हेगारीदेखील दिल्ही आहे. तर सदरहूप्रमाणें गांव श्रीकडे चालविणें. बहुत काय लिहिणें. छ २० मोहरम. हे विनंति.

 [९२]                                                                         श्री.                                                           

राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री जगंनाथपंत दादा स्वामीचे सेवेशी.

पोष्य बच्याजी बापूजी कृतानेक स॥ नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे, विशेष. बहुत दिवस आपल्याकडील पत्र येऊन कुशलोत्तर लेखन होत नाहीं, ऐसें नसावें. पत्रीं सांभाळ केला पाहिजे. यानंतर विशालगडीं श्रीमत् राजश्री आबाजीराव यापाशीं कारभारास विश्वासू कोणी पाहिजेत. त्यास आपले ममतेचे गृहस्थ कोणी असावे ह्मणून श्रीमत् कवडीचे मुक्कामीं योजना करावयाशी लागले. त्यावरून श्रीमंतांस विनंति केली कीं, आपलें नांव घेतलें याचे पुत्र घरीं रिकामें आहेत. बरे ठेवावया योग्य आहेत. त्यावरून श्रीमंतांनी आज्ञा केली कीं, पत्र लेहून त्यास आणवावें. ऐशास तेथें पर्वतावरी श्रीमंतापाशीं राहून कुलमुलकी कारभार करावा. दहा वीस हजार रुपयेपर्यंत रु॥ खर्चावयास लागतील ते द्यावे. त्यास सालमजकुरीं मुलुकचा ऐवज जमा होईल, त्यास खर्चवेंच लागेल तो करून बाकी ऐवज राहील तो रद्दकर्जास घेत जावें. दोन चार हजार कदाचित् बाकी अखेर सालीं राहिली तरी व्याजसुध्दां हिशेब करून पुढें उगवून घ्यावें. याप्रमाणें करार केला आहे. वेतन आपल्या स्वरूपानेंच करितील. आमचे विचारें उत्तम आहे. श्रीमंतांचे पदरीं आणि तेथील संस्थानाचा कारभार. श्रीमंतास आपली प्रामाणिकता निवेदन करून हें पत्र लिहिलें आहे. आपण कराडच्या मुक्कामीं यावें. बहुत काय लिहिणें लोभ असो द्यावा. हे विनंति.

 [९१]                                                                         श्री.                                                           

श्रीमत् महाराजश्री परमहंस बावा स्वामीचे सेवेशी.

चरणरज बापूजी गणेश चरणावर मस्तक ठेऊन शिर स॥ नमस्कार विनंति. येथील वर्तमान अश्विन वद्य तृतीया परियंत स्वामीचे आशीर्वादेकरून यथास्थित असे. विशेष. स्वामीच्या दर्शनास राजश्री सदाशिव नाईक रास्ते आले आहेत. याजपासून पत्र घेऊन याशी चिट्टी दिली पाहिजे. याचा हेत स्वामीनें आज्ञा केली आहे, त्याहीपेक्षां दोहोचा अधिक आहे. तेव्हां पाहिजे तेव्हां सेवेशी हजीर होऊं ह्मणून नेम करितात. पाहतां, अंतर पडणार नाहीं, ऐसें दिसतें. चित्तास आलें तर दिल्हे पाहिजेत. दीडप्रमाणें हे मान्य आहेत. एकाची रदबदल्याची आहे, ह्मणून सेवेशी आले आहेत. तर याचें समाधान स्वामीनें राखोन चिट्टी दिली पाहिजे. सेवेशी श्रुत होणें. हे विज्ञापना.

 [९०]                                                                         श्री.                                                           

विनंति. चरणरज भांबोजीसाळवी मु॥ विहीर अहिरें सेवेशी

विज्ञापना एसीजे. लोकांचें देणें फाजील तेरीज एकादर प॥ आहे. त्याजवरून विदित होईल. बाकी कोणावर आहे. कोणावर नाहीं ते मागावयास लागले. याजकरितां देणें फाजील पाठविलें आहे. वांटणी काय द्यावयाची ती पाठवून दिली पाहिजे. यानंतर निंबाजी लोणारी याजब॥ आलें तेथें आज्ञा जे :- तुह्मी माप न घेणें. तरी आह्मी मागें घेत नव्हतो. च्यार पांच पत्रें मापारी यास लि॥. परंतु मापारी आला नाहीं. आज्ञापत्र आलें जे :- तुजवर मक्त्यार आहे, तु घेणें ह्मणोन आज्ञेवरून माप घेतलें. कांहीं दिवस चुन्याचें माप राणोजी निकमानें घेतलें. स्वामीचे आज्ञेप्र॥ वर्तणूक करीत असतां मजला शब्द लावावा ऐसें नाहीं. हल्लीं माझा विश्वास नाहीं तरी मापारी कोण तो पाठवून द्यावा. चुना मुस्तदे लोणारी यानें केला आहे. मापारी सत्वर पाठविला पाहिजे. चुना, कोळसे, माती, वाळू रोज देतो. त्यास आह्मास मापारी येथें नेहमींच द्यावा. माप घेऊन जाईल तर आमचा तट होईल. मापारी नेहमीं पाठवून द्यावा. व वाळू बिगर हुकूम कां घेतली ह्मणोन आज्ञा :- तर मी वाळू कोणास नेऊन दिली नाहीं. इमारतीस पाहिजे ह्मणोन घेतली. कारखान्याचे लोक लाविले होते. अठाजणास खंडीभर रोजास न ये याजकरितां घेतली आणि मागें पत्र आलें तेथें आज्ञा आहे जे : लोणारी याजपासून जिन्नस लागेल तो घेणें, काम बळकट करणें, ह्मणोन कामानिमित्य घ्यावयास जाली. एक वेळ आज्ञा होती ह्मणोन लिहिलें नाहीं, इतका अन्याय जाला. हल्लीं वाळूचे रुपये लोणारी याचे द्यावे. व वरकड जिन्नस लोणारी याजपासून पारी पाठवून दिले पाहिजेत. पंचावन रुपये लोणारी यास पावले. आणखी द्यायाचे असिले तरी द्यावें. विदित झालें पाहिजे. लोकांस भांग, व तूप व तंबाकू व तेल ऐसें पाठवून द्यावें. वरकड पेशजीचे वांटणी अलीकडे तेथें आदा जाला असेल तो लिहोन पाठविणें. सुभाना मोऱ्या व हरी असगणकर यांचे रोज गवतावरील अद्याप लिहोन आले नाहींत. हिशेब सुध्दां होत नाहीं. तर त्यांचे रोज लिहोन पाठविले पाहिजे. कागद कोरे अगदीं नाहींत. तरी दोन दस्ते पाठवावें. नाहीं तर पैका पाठविला पाहिजे. हे विज्ञापना. छ ४ मोरम.