Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२११] श्री.
राजश्री कोनेरराम मजमदार गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा. दंडवत विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. राजश्री बाबूराव प्रविष्ट जालेवरचे वृत्त लेखन करून पत्रें जासुदासमागमें पाठविली, ती प्रविष्ट होऊन लेखनार्थ सविस्तर श्रवण जाहाला. कर्नाटकचे मामलेयाचा अद्याप एकही निर्णय जाला नाही. त्यास हा काळ यन्नास अंतर जालें नाहीं. पुढे यत्नांत राहून कार्य करून घेत असो. ह्मणोन तपशिले लिहिले, कळो आले. व वेदमूर्ति श्री रघुनाथभट पटवर्धन राजश्री स्वामीचे सन्निध येऊन कितेक गोष्टीचे उपक्रम करणार होते. परंतु स्वामींची अनास्था देखोन भटजींचा हर्ष मंद जाहाला. कदाचित पुढे उपक्रम करावयाचा भटजींचे चित्तांत असिला तरी प्रसंगी परिमार्जन करावयासी अंतर होणार नाहीं. ह्मणोन लिहिले. ऐशियासी, भटजी कांही आपले यत्नास चुकणार नाही. येविशीचा अर्थ सविस्तर पूर्वी लिहिला आहे. घडी घडी ल्याहावें ऐसे नाही. प्रसंगी सावधच राहणें. सूचनार्थ लिहिले.
[२१२] श्री. ६ मार्च १७६१.
राजश्रियाविराजितराजन्यराजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. नवरी चिरंजीव राजश्री नानांनी तुह्माकडे झांशीस पाठविली आहे. ते तुह्मी हुजूर याल तेव्हा बरोबर घेऊन येणें. किंवा बदरका देऊन हुजूर पाऊन देणे. जाणिजे. छ २८ रजब, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२१०] श्री. २१ दिसेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यासी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. चिरंजीव राजश्री भाऊसाहेबांचे पत्र छ ५ रबिलाखर पानपतच्या मुक्कामीचे आले की, आपली व अबदालीची सन्निधता जाली. दोकोसांची तफावत राहिली आहे. रोज लहान लहान झुंजे होतात. ऐशियास, फौज मातब्बर, समीपता जाली असता खबर न यावयास कारण काय ? युध्द जाहाले किंवा सलूख जाहाला, काय मजकूर जाहाला ? अलीकडे वर्तमान तहकीक आले असिले तर पत्रदर्शनी लिहिणे. राजश्री नारोशंकर यांस पत्र पाठविले असे. ते दिलीस रवाना करून उत्तर पाठवणें. खासा स्वारी हिंदुस्थानास येते. राक्षसभुवनावर मुक्काम आहे. दरमजल हिंदुस्थानास येतों. चिरंजीव राजश्री दादा निजामअल्लीस आणावयास गेले आहेत. दिल्लीकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. जाणिजे. छ १२ जमादिलावल. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२०९] श्री.
राजश्री कोनेर पंतदादा गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ राणोजी भोसले दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. तुह्माकडील वर्तमान बहुत दिवस कळत नाहीं. तेणेकरून चित्त उदास आहे. तर आपणांकडील सविस्तर वृत्त, आलिया जासुदाबरोबर पत्रीं परामृष करीत गेले पाहिजे. यानंतर आह्माकडील वर्तमान तर पेशजी घेस घे कळो आले असेल. सांप्रत आमचे सरंजामात तीर्थस्वरूप राजश्री रघोजीबाबांनी अमलात खलल करून आह्मावर मोगलांची फौज ऐसे आह्मावरी रवाना केली असे कळले पाहिजे. तेथे दरबारी आपण आहेत. याजउपरी आपण चित्तावरी घेतल्याखेरीज याचे पारपत्य होत नाहीं. तीर्थरूप राजश्री बाबासाहेब तेथे गेले आहेत. ते व आपण मिळोन पेशजीप्रमाणे सरंजाम वाजवीप्रमाणे ठीक करून राजपत्रें घ्यावी. सर्व भरवसा तुमचा आहे. तुह्मी वित्त पुरविल्याखेरीज होत नाही. या कामकाजात आपण चित्त घातले ह्मणजे आमचे बरे होईल. हा भरवसा पूर्ण आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२०८] श्री. ३ सप्टेंबर १७४२.
राजश्री कोनेर राम मजमदार गोसावी यांसी :-अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. तुह्माकडून बहुत दिवस वर्तमान कळत नाहीं. राजश्री बाबूराव यांणीं मनुष्य आह्माकडे पाठविले ते प्रविष्ट जाहलें. आह्मी पत्र पाठविलें व कितेक कार्यभाग सांगितले, त्यांचा विचार कोणेप्रकारचा हें कांहीच कळों येत नाहीं. तरी सविस्तर लेहून पाठविणें. वरकड इकडील वृत्त तुह्मास वरचेवर पत्री लिहून पाठविलें आहे. राजश्री भास्करपंताकडोन मागाहून दुसरी पत्रें आली ती बजिनस तुह्माकडे जासुदासमागमें रवाना केली आहेत. त्यावरून सविस्तर अर्थ कळो येईल. सारांश गोष्ट, आह्मास फौजेसहवर्तमान मशारनिलेकडे जाणें जरूर. येविशीचा अर्थ साद्यंत पेशजी तुह्मास लिहिला आहे. व नेणुकप्रमाणें ऐवज लोकांचे पदरी घालून सत्वर आह्माकडे रवाना करावें ह्मणोन दोन चार पत्रीं लिहिलें आहे. त्याप्रमाणें जो विचार करणें तो तुह्मीं केलाच असेल. परंतु तुह्माकडोन पत्र येऊन वर्तमान कळो येत नाहीं, यास्तव वारंवार लिहिणे जरूर होतें. दुसरी गोष्ट, दिवसहि कांही बाकी राहिले नाहीत आणि आह्मास तो सत्वर जाऊन पोहोचले पाहिजे, यास्तव तुह्मी लोकांस पत्रें पाठवून नालबंदीचा ऐवज पदरी घालून दुसरेयाकारणे आह्माकडे रवाना करणें. वरकड, येथून रवानगीचा विचार तुह्मावर आहे, जे गोष्टीने दिवस गत न लागे तो अर्थ करणें. प्रस्तुत राजश्री सुलतानजी राव पालकर यांजकडून राजश्री निंबाजी यमाजी वीर व विठ्ठल मैराळ येथें आले होते. त्यांचे बोलीचालीचा प्रसंग ठीक करून एक लक्ष रुपये नालबंदी देविली आहे आणि राजश्री बाबूराव रघुनाथ यांसमागमें देऊन तुह्माकडे पाठविले आहेत. तरी, नालबंदीची व कापडाची अलाहिदा याद पाठविली असे त्याप्रमाणें सत्वर ऐवज यांसी देऊन रवाना करणें. तैसेंच राजश्री भिवजी वीर यांसीहि एक लक्ष नालबंदी देविली आहे. तरी आर्धी या उभयतांचे पदरी ऐवज पडलियानें, ही फौज सनिधची आहे, यांचा प्रमाणिकतेचा विचार आहे, दसरेयाकारणें सर्वांचे अगोदर आह्माजवळ येऊन पोंहचतील. याजकरितां सदर्हू ऐवज आधीं देऊन यांची रवानगी करणें. व राजश्री मानाजी पवार वगैरे पथकें यांसीहि पत्रावर पत्रें पाठवून, ऐवज प्रविष्ट करून, आह्माकडे रवाना करणें. वरकड, कितेक वर्तमान राजश्री बाबूराव रघुनाथ यासी सांगितले आहे. हे मुखोत्तरे सविस्तर तुह्मास सांगतील, त्याजवरून कळून येईल. जाणिजे. छ १४ हे रजब + देखतपत्र ऐवज यांचे पदरी घालून यांची रवानगी सत्वर करणें. ज्या ऐवजास बट्टा धरणेंपारणें पडे नेमणुकेप्रमाणें देऊन यांची रवानगी सत्वर करणें. आमचे कुच दसऱ्यास हितून आहे. नाजूक काम जानून बाबूराव रघुनाथ यास पाठविलें आहे. तर देखतपत्र यांची लिहिल्याप्रमाणें रवानगी करणें. अन् वाडा बेगी तयार करणें. कितेक वर्तमान बाबूराव सांगतां कळू येईल. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभ असू देणें. हे विनंति.
मोर्तबसूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२०७] श्री.
पु॥ राजश्री बाबूराव स्वामी गो॥:-
विनंति उपरी. या फौजेबरोबर तोफा कांही असाव्या असें आमचे व सुभेदार यांचे विचारें आहे. त्यावरून राजश्री महिपतराऊ पाठविले आहेत. तरी झांशीतील तोफा चार, येथें उपयोगी पडत ऐशा, महिपतराऊ पाहतील, त्या देऊन तोफांचे साहित्य बैल, गाडे, दोर, दारूगोळे, संदुखा जें सामान लागेल ते देऊन, ताबडतोब तयार करून, मशारनिलेची रवानगी करणें. फार त्वरेने सामान देऊन तोफांची रवानगी करणें. येथे भिंडेजवळ राहून गव्हारांचे पारपत्य केले पाहिजे. मजकूर काय आहे ? होईल. आपण आपले सावधतेनें बहुत रवरदार असावें. वरकड सविस्तर महिपतराऊ सांगतील त्याजवरून कळेल. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२०५] श्री.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर यांसी :-
पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. चिरंजीव राजश्री भाऊकडील लढाई बिघडली. हे खबर येऊन रांगडे लबाडी करावयास चुकणार नाहींत. तरी तुह्मी किल्ले झांशी वगैरे जागांची खबरदार मजबुदीनें उत्तम प्रकारें करणें. वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. खासा स्वारी सिहोरास आली.
[२०६] श्री. २४ फेब्रुवारी १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर यांसी :-
पे॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष. तुह्मी वर्तमान विस्तारें लिहिलें तें कळलें. तपशीलवार मजकूर लिहिला तो यथार्थ. परंतु प्रस्तुत फौजांनी गिलज्यांवर जाऊन जोर करणें कळतच आहे! आपले जागे मुलूख राखावें, जमीदारांचे पारिपत्य करावें, याजकरितां ग्वालेरीस राजश्री बाबूजी नाईक व शहाजी सुपेकर व सदाशिव रामचंद्र व त्र्यंबकराव शिवदेव पाठविले आहेत. पावले असतील. सरदार सर्व बंदोबस्त करितील. तुह्मी तिकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. जाणिजे. छ १८ रजब, सु॥ इहिदे सितैन मया अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२०३] श्री. ४ मार्च १७६१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोनेर यांसी :-
पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष संत्यापसा व विसाजी गोविंद तुह्माजवळ आहेत, त्यांस पत्रदर्शनी हुजूर पाठवून देणें. विलंब न लावणें. जाणिजे. छ २६ रज्जब, सु॥ इहिदे सितैन मया अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
[२०४] श्री. २० जानेवारी १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर यांसी :-
पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष दिल्लीकडील राजश्री भाऊसाहेब यांजकडून पत्र आलें असलें तर जासुदासमागमें जलद पाठवून देणें. राजश्री नारोशंकर यांस पत्र पाठविलें असे. ते दिल्लीस रवाना करून, उत्तर आणून, जलद पाठविणें. खासा स्वारी हिंदुस्थानास येते. राक्षसभुवनावर मुक्काम आहे. दरमजल हिंदुस्थानास येतों. चिरंजीव राजश्री दादा निजामअल्लीखानास आणावयास गेले आहेत तेही दरकुच अविलंबे येतील. तुह्मी वर्तमान वरचेवर लिहून पाठवीत जाणें. जाणिजे. छ १२ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२०२] श्री. २६ जून १७३४.
आज्ञापत्र राजश्री रघोजी भोसले त॥ मोकदमानी मौजे वऱ्हें प॥ कुरें, सुहुरसन खमस सलासैन मया अलफ. मौजे मजकूरची पाटिलकी आमची होती. त्यास, आह्मी आपलें तर्फेने पाटिलकी राजश्री कोनेरराम यास दिल्ही आहे. तरी तुह्मी यासी रुजू होऊन मौजे मजकूरच्या पाटिलकीचा कारभार यांचे विद्यमानें करीत जाणें. हक्कलाजिमा यांस देणें. जाणिजे. छ १५ सफर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२०१] श्री. २३ फेब्रुवारी १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्मी चंद्र ७ रज्जबेचें विनंतिपत्र पाठविले ते चंद्र १७ मिनहूस पावलें. श्रीमत् राजश्री भाऊसाहेब यांची व गिलजांची लढाई जाली. आपल्या फौजा निघाल्या. श्रीमत् भाऊ व जनकोजी शिंदे अजमरीकडे आहेत व मल्हारजी होळकर व नाना पुरंदरे व आणीक सरदार भिंडेवरी आहेत. या प्रांतात रांगड्यांनी मोठी धुंद मांडिली आहे. लोकांनी धीर सोडिले. ठाणींठुणीं रहावयाचें संकट आहे. जागाजागा ठाणियांस रांगड्यांनी मोर्चे लाविले आहेत. याजकरितां स्वामीचें आगमन होऊन बंदोबस्त जाहला तरी ठाणीं राहतील, नक्ष होईल, यवनहि बहुत हलाकेंत आला आहे, ह्मणून लिहिले. ऐशियास, आह्मी जलद येतच आहोत. ठाणीठुणीं राखणें. जाणिजे. छ १७ रज्जब. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९९] श्री. १८ जानेवारी १७६१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि. राजश्री भाऊसाहेब यांजकडील वर्तमान आलें असेल ते सत्वर लिहून पाठविणें. चंद्र १० जदिलाखर, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. + स्वारी माळव्यांत येतांच राजेसुध्दा भेटीस येणें. काम विशेष असेल तर तुह्मीं खासा न येणें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
[२००] श्री. ३ एप्रिल १७३९.
राजेश्री त्रिंबक विश्वनाथ सुभेदार गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ राणोजी भोसले राम राम सु॥ तिसा सलासीन मया अलफ. राजश्री नारोपंत दी॥ डबीर यांसी ज्येष्ठ मासचे हप्त्याचे ऐवजी रु॥ ५० देविले आहेत. आदा करून पावलियाचे कबज घेणें. जाणिजे. छ ५ माहे सफर. बहुत काय लिहिणे.