Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३७] श्री.
राजमान्य राजश्री अप्पाजी सोमवंशी सरलष्कर यांसी
आज्ञा केली ऐसीजे :- सुपें प्रांतीची कमावीस भिकाजी बल्लाळ यास सांगितली होती. तेणेंप्रमाणें करार करून चालवणें. अगर तुमचे चित्ती दुसरियास सांगणें असेल तरी सुखरूप सांगणें. या मामल्यामुळें यास कर्ज जाहालें आहे त्याचा निकाल करून रोखा पाठवून देणें. नाही तरी याच्या कर्जाचा ऐवज पावे तवपावेतों याचा मामला यास करार करणें. यास मामला सांगितला असतां करारांत तफावत करणें हे गोष्ट उचित नव्हे. मामला आणिक सांगावा असेंच असेल तरी याच्या ऐवजाचा निकाल होऊन आला पाहिजे. त्याचा तूर्त निकाल करून पाठवणें. अथवा लिहिल्याप्रमाणें हप्तेबंदी पावेतों करारांत तफावत न करितां याकडे मामला करार करणें. + यास सुपे प्रांतीची कमाई सांगितली व्हती. ते चालवन. जर दुसऱ्या(स) देन अस(ल) तर देन. याचा कर्जाचा ऐवज यास रोख पाठवन. नाहींतर कर्ज फिटे तों राखन. मामला हफतेबंदीपावेतो करारांत तफावत करन हें उचि(त) नव्ह. सुदन असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३६] श्री. ८ फेब्रुआरी १७२३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम संवत्सरे फाल्गुन बहुल सप्तमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभूछत्रपति स्वामी यांनी मुकादमानी मौजे बाहे त॥ वाळवें यांसी आज्ञा केली ऐसीजे :- राजश्री त्रिंबकराव सुंदर यांकडे मौजे मजकूर पहिलेपासून इनाम आहे त्याप्रमाणें करार आहे. ऐसें असोन मौजे मजकूरचा ऐवज यांकडे सुरळीतपणें देत नाहीं ह्मणोन विदित जालें. तर मौजे मार यांकडे इनाम स्वामीनी दिला असतां ऐवजास खलेल करावयास गरज काय ? याउपरि मशारनिलेशीं रुजुवात वर्तोन, गांवचा ऐवज सुरळीतपणें देत जाणें. याउपरि खलेल केलीया तुमचा मुलाहिजा होणार नाहीं. लेखनालंकार. मर्यादेयं विराजते. रुजू सुरूनिविस. सुरू सूद बार.
श्री श्री आई.
राजा शंभू छत्रपति आदि पुरुष शंभु छत्रपति
हर्षनिधान रघुनाथ कृपानिधि तस्य कृष्णाजी
सुत तिजी मुख्य परशराम प्रतिनिधि
प्रधान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३५] श्री.
उलूककल्प.
उलूक दिवाळीचे रात्रीस, अथवा चतुर्दशीस, अथवा अष्टमीस, धरावा; पोटांतील नसा काढून तेल करावें; त्याचें काजळ धरावें; आपल्या डोळ्यांत अंजन करावें; तेणे अदृश्य होय ॥१॥ गोमुत्रें डोळे धुवावे; प्रगट होय. उलुकाचे मुखीं पारा टाक येक घालून तीन दिवस ठेवणें; मग तुपाशी सेविजे; दिवस एकवीस, मग गमन बहुत करी ॥२॥ आणि कंदर्प बहुत होय ॥३॥ त्या उलुकाच्या मासाचा टिळा लाविजे; भलत्या प्रकारें लाभ होय ॥४॥ त्याची हाड अन्नाशी भक्षिजे; जो देरवे तो दास्यत्व करी ॥५॥ त्याची चोच व पाय व कान जाळून राख करावी; राखेचें पाणी करून पायी लाविजे; त्वरीत कोस गमन करी ॥६॥ त्याचा डोळा काढून, हरताळ व मनशीळ, तिन्ही वस्ता एकत्र करून, डोळया अंजन कीजे; तरी पाताळीचें धन दिसे ॥७॥ त्याची जीभ व गोरोचन एकत्र करून, तांब्याच्या ताइतांत घालून मुखीं धरी; तरी तो अदृश्य होय ॥८॥ उलूकाचे पंख शत्रूचे घरीं बुजून ठेवणें, वेळा सत्तावीस; अनेन मंत्रेण बळी बधन बधे मित्तीष्टी बळिस्वाहा; शत्रू मरे ॥९॥ उलुकाची राख व बेलपत्राची राख ताइतांत घालून ठेवणें; गमन सिध्दी होय ॥१०॥ काळजांतील हाड, मासोळीचें तेल, शत्रूचें द्वारी ठेवणें; उच्चाटण होय ॥११॥ मस्तकीचे पंख, उंदराची लेंडी, त्याचे धुणें भूतप्रेत पळे ॥१२॥ नेत्र व गायीचे तुपे टिळक करणें; राजा वश्य होय ॥१३॥ काळजाचें व डोळ्याचें रक्त, तेणें अंतन कीजे; अदृश्य होय॥ १४॥ डाव्या पायाची नळी व पारा टोक एक, टाळूचें हाड, मस्तकी ठेवणें; संग्राम जिंकी ॥१५॥ जीभ धोत्र्याचे रसें टिळक करणें; राजा वश्य होय ॥१६॥ चोचीपाशील चिन् आपल्या तळव्या लावणे; गमन बहुत होय ॥१७॥ मस्तकीचा मगज व पुच्छ व पंख व तळहाड एकत्र करून ठेवणें; अंजन कीजे; निधी दिसे ॥१८॥ जीभ तायितीं घालून ठेवणें; सर्व वश्य होय॥१९॥ छ॥ छ॥ छ॥ मंत्र: ॐ श्रीं व्हीं क्लीं ऐ यं सोहं माहालक्ष्मी मम सर्वा सिध्दि करू २ स्वाहा ॥२०॥ अष्टोत्तरशत जप करणें, मग जें करणें तें कीजे. सिध्दि होय ॥२१॥ छ॥ छ॥ जगदंबार्पणमस्तु ॥१॥ छ॥ छ॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३४] श्री. २२ मार्च १७०८.
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ३४ सर्वधारीनाम संवत्सरे चैत्र शुध्द दशमी मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहूछत्रपति यांणीं राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी, सुभा प्रांत राजापूर, यांसी आज्ञा केली ऐसीजे :- रामाजी नारायण कोलटकर वास्तव्य कसबें नेवरें यांणी स्वामीसंनिध कसबें पाटगांवचे मुक्कामीं येऊन विनंति केली कीं, आपण स्वामींच्या राज्यांत राहोन, स्नानसंध्या व श्रींचे भजन करून, स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चिंतून आहों. संसाराचा योगक्षेम चालिला पाहिजे ह्मणून पूर्वी राजश्री शिवाजीराजे यांणीं आपणांस नूतन इनाम कुलबाब कुलकानू देखील हालीपट्टी व पेस्तरपट्टि, खेरीज हक्कदार करून पूर्वी राजश्री अनाजी दत्तो यांचे वेळेस जमिनीस धारा व गलियास निरख होता, त्याप्रमाणें जिराईत व बागाईत जमीन, वाडा, कासारवली, मौजे पुसाळ, त॥ नेवरें, या गावांपैकी वृत्ती करी दाभोळी ३०० तीनशें तपशील :-
हालीकीदींपैकीं करी दाभोळी ७५ । पडपैकी करी दाभोळी २२५
एकूण करी तीनशें इनाम करून दिल्हा आहे. येणेंप्रमाणें स्वामींनी करार करून दिल्हा पाहिजे, ह्मणून विदित केलें. त्यावरून मनास आणितां, रामाजी नारायण भले, हरिभक्तपरायण, स्वामीचें कल्याण व्हावें ये गोष्टीची अपेक्षा विशेष धरितात. याकरितां, यांचे लेकराचे लेकरी चालवणें अगत्य. यानिमित्य स्वामी यांवरी कृपाळू होऊन पूर्वपत्र चिरंजीव राजश्री शिवाजी राजे यांचे मनास आणून इनाम वृत्ती करी दाभोळी ३०० तीनशें करार करून दिली असे. सदरहूचीं ठिकाणें जिराईत व बागाईत, शेत व अगर, चतु:सीमा नेमून देऊन करून, यांचे दुमाला करून, यांसी इनाम वंशपरंपरेनें चालविणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची तालीक लिहून घेऊन मुख्य पत्र भोगवटियास परतोन देणें. निदेश समक्ष.
मर्यादेयं
विराजतें.
श्री राजा शाहूनरपति
हर्षनिधान मोरेश्वर
सुत भैरव मुख्य प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३२] श्री. २ मे १७०७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३३ सर्वजित् संवत्सरे वैशाख बहुल चतुर्दशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री कृष्णाजी परशराम यांसी आज्ञा केली ऐसीजे :- (पुढील मजकूर २३१ प्रमाणेंच आहे.)
[२३३] श्री. २९ डिसेंबर १७५९.
पै॥ छ ११ जमादिलावल, सितैन,
पौष, कात्राबाज, मांडवगण.
सेवेसी विज्ञापना. र॥ बापूजी महादेव हिंगणे यांजकडील कारभाराचा फडशा जाला. सनदापत्रा व पातशाहास वस्त्रें वगैरे द्यावयाविशी स्वामीस पेशजी लिहिलें होते; परंतु अद्याप त्यांची कामकाजें निर्गमांत येऊन जात नाहीं. त्यास, र॥ अंताजी माणकेश्वर आले, यामुळें सावकारांस व त्यांस संशय उत्पन्न जाला आहे. कागदपत्र पुणियांत राजश्री बाबूराव फडणीस यांणी करून द्यावे तेहि दिल्हे नाही, व पातशाहास वस्त्रें, जवाहीर वगैरे स्वामीनीं पुणियास नेमणूक करून पाठवावी तेहि पाठविली नाहीं. बाबूराव दीक्षित यांणी साता लाखांची निशा केली. ते संदेहांत पडले. दहा लक्ष रुपये सहा महिन्यांअलीकडे सावकाराच्या वराता कराव्या, त्यास द्यावे, ऐसा करार आहे. त्यास बाबूराव दीक्षित संशयांत पडले. तेव्हा दुसरा सावकार कोण उभा रहातो ? अंताजीपंत आले, यामुळें लोकांनी नानाप्रकारचे तर्क वितर्क केले आहेत. यास्तव स्वामीस लिहिले आहे. तरी आपले विचारें वकिलाचा करार केला तो प्रमाणच आहे. त्यांत कांही घालमेल नाहीं, असें असल्यास र॥ बाबूराव फडणीस यांस निकडीनें लिहून कागदपत्र सर्व करून देवावे. पातशाहास वस्त्रें, जवाहीर वगैरे नेमणूक करून हत्तीसुध्दां कुल कामेंकाजें उरकून देवावीं. ह्मणजे ज्या सावकारानें सरकारची निशा केली आहे त्यास भरंवसा पुरेल व पुढील दहा लाखांचे कामास कोणी उभा राहील. कदाचित् अंताजीपंत आले यामुळें चार दिवस लांबणीवर टाकून, कोण काय बोलतो, अंताजीपंत कोठवर येतात, हा भाव काढणें असेल तर तैसेंच लेहून पाठवावें. र॥ छ ८ जमादिलावल. + वकील व दीक्षिताची पत्रें आली, ह्मणून लिहिलें. सत्वर पुण्याहून ताकीद होऊन सत्वर निर्गम व्हावा. अगर जशी मर्जी असेल तशी आज्ञा यावी. लेहून पाठवूं. अंताजीपंत कोणेप्रकारे आले आहेत तें विदित आहे. असो. आज्ञा होईल त्याप्रमाणें त्यांस लेहून पाठवूं. तेथूनही लिहिलें जावें. र॥ एकादशी मंदवार हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३१] श्री. २ मे १७०७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३३ सर्वजित् नाम संवत्सरे वैशाख बहुल चतुर्दशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांनी समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री परशराम पंडित प्रतिनिधि यांसी आज्ञा केली ऐसीजे :- रामाजी नारायण कोलटकर व॥ कसबे नेवरें यांनीं हुजूर येऊन विदित केलें कीं, वाडा चिंचवणें कर्यात नेवरें येथील नूतन देवालय बांधोन श्रीची स्थापना करावी ऐशी आपली इच्छा आहे. ऐशास, स्वामी धर्मपरायण आहेत. याकरितां श्रीचा उत्सव व आपला योगक्षेम चाले ऐशी स्वामीनीं वृत्ती करून दिल्ही पाहिजे ह्मणोन विनंति केली. त्यावरून स्वामी कृपाळू होऊन नूतन वृत्ती करून दिली आहे, करी दाभोळी :-
नूतन देवालय वाडा चिंचवणे येथील बांधोन श्रीची स्थापना करणार, याकरितां श्रीचे उत्सवास वाडा चिंचवणेंपैकी जमीन करी २०० |
रामाजी नारायण यांचा योगक्षेम चालिला पाहिजे, यांकरिता यांस वाडा कासारवली मौजे पुसाळ देखील जमीन करी ३०० |
येणेप्रमाणे पाचशें करीची वृत्ती देऊन सनदा अलाहिदा सादर केल्या असत. त्याप्रमाणें जमीन यांचे स्वाधीन करून इनाम वंशपरंपरेनें चाले ऐशी गोष्टी करणें. जाणिजे. बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा. मर्यादेयं विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३०] श्री. १३ जून १७०७.
श्रीशिव - श्री आई -
नरपति हर्षनिदान आदिपुरुष श्रीराजा
मोरेश्वरसुत नीलकंठ शिवछत्रपति स्वामी कृपा
प्रधान निधि तस्य परशराम त्र्यंबक
प्रतिनिधि.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३३ सर्वजित् नाम संवत्सरे ज्येष्ठ बहुल एकादशी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांनी राजश्री देशाधिकारी व कारकून वर्तमान व भावी सु॥ प्रांत राजापूर यांसी आज्ञा केली ऐसीजे : रामाजी नारायण उपनाम कोलटकर वास्तव्य कसबे नेवरें यांनी स्वामीसन्निध येऊन विनंति केली कीं, आपण आजीवरी स्वामीच्या राज्यांत वास्तव्य केलें. सांप्रत आपली वासना आहे कीं, एक स्थळी रहावें आणि श्रीभजन करून स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण इच्छून असावें ऐशी इच्छा आहे. तरी आपली थोडीबहुत अन्नाची अनुकूलता करून दिधली पाहिजे. ह्मणून त्यावरून मनास आणितां रामाजी नारायण भले, हरिभक्तिपरायण, स्वामीचें कल्याण व्हावें ये गोष्टीची अपेक्षा विशेष करतात. याकरितां यांचे लेकराचे लेकरी चालवणें स्वामीस अगत्य जाणून, स्वामी याजवर कृपाळू होऊन, यांसी नूतन इनाम, कुलबाब, कुलकानू देखील हल्लीपट्टी व पेस्तरपट्टी खेरीज हक्कदार करून पूर्वी र॥ अनाजी दत्तो यांचे वेळेस जमिनीस धारा व गलियाप्त निरख होते त्याप्र॥ बागायत व जिरायत मिळून वाडा कासारवली मौजे पुसाळें ता॥ नेवरें या गांवपैकी करी दाभोळी ३०० तपशील :-
हालीकर्दीपैकी करी दाभोळ ७५. । पडीपैकीं करी दाभोळी २२५.
एकूण करी तीनशें इनाम अजरामऱ्हामत करून दिला आहे. तरी तुह्मीं सदरहू बेरजेचीं ठिकाणें जिरायत व बागायत अगर नेमून देऊन चतु:सीमा करून, याचे दुमाले करून, यांसी इनाम वंशपरंपरेनें चालवणें. सालदरसाल ताजा सनदेचा उजूर न करणें. या सनदेची तालीक लेहून घेऊन असल सनद भोगवटियासी याजपाशी परतोन देणें. जाणिजे. लेखनालंकार. मर्यादेयं विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२२९] ॥१ १६ डिसेंबर १७६१.
श्री
श्रीरघुवीरचरणीं तत्पर
बाबूराव कोनेर निरंतर.
* सनधि करि दई, श्रीमंत राजश्री मुख्यप्रधानजीके सिरकारतै हजूर राजश्री राव बाबूराई कोनेर नामजाद प्रांत झांशीकेनैं. एते श्रीमहाराज कौमार श्री भैया मुसाहेब आछरजू देवकौ आपर परगन ऐरछको मौजे षूजापरा तुको दयो है. सो पाये जाऊं. गाऊंएकू तुमसा कोऊ मुजाहिम हूहै. मिति पुष बदि ६ संमत् १८१८. मौजे खुजापरा गांव एक सरकारांतून तुह्मांस कासा दिल्हा असे. सेवा करीत जाणें. जाणिजे. र॥ छ १८ हे जमादिलावल, सु॥ इसने सितैन मया व अलफ.
मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२२७] श्री. १६ नोव्हेंबर १७६०.
... ... ... खासा स्वारीसमागमें नबाब निजामअल्लीखानसहवर्तमान नर्मदातीरास सत्वर येऊन पोहोचणार. तर बैल लौकर लि॥ पो खरीदी करणें. मजलदरमजल निजामअल्ली व जानोजी भोसले सेनासाहेबसुभा, पन्नास हजार फौजसुद्धां, खासा स्वारी मार्गशीर्षात येते. तुह्मी र॥ गोविंद बल्लाळ यांस व तमाम राजेरजवाडे यांस लेहून सारे जमा होऊन सामील होणें. र॥ छ ७ रबिलाखर. मु॥ गंगा उत्तरतीर. हे विनंति.
[२२८] श्री. २२ नोव्हेंबर १७४९.
राजश्री कोनेरपंत गोसावी यांसी :-अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष. आह्मी नांदेडानजीक गंगा उतरोन आलों. पुढें तुळजापूरसंन्निध अविलंबेच येत असों. राजश्री विसाजी रघुनाथ व विसाजी गोविंद यांसी रवाना केले आहेत. सविस्तर अर्थ उभयतां सांगतील त्याप्रमाणें ध्यानास आणून राजश्री फत्तेसिंगबावा यांसी फौजेसह तुळजापूरप्रांतें शीघ्र घेऊन आलें पाहिजे. तुमच्या आमच्या भेटी अंतीं योजिला मनसबा होऊन येईल. र॥ छ २२ हे जिल्हेज. + बहुत काय लिहिणे. हे विनंति. सत्वर येणें. कुणे गोष्टीचा दुसरा विचार चित्तांत ण अनता सत्वर येणें. हे विनंति.
मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२२५] श्रीलक्ष्मीकांत. २ जून १७५७.
*
श्रीशाहूराजपदांभोजभ्रमरायित
चेतस: बिंबात्मजस्य मुद्रेशा
राघवस्य विराजते
आज्ञापत्र सेनाधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री जानोजी भोसले सेनासाहेब सुभा त॥ देशमुख मोकदम क॥ सिरसगांव प॥ रीधपूर सु॥ सबा खमसैन मया अलफ. सालमजकूरणे मोगलाई चुकोतीबद्दल हुजूर येणें. या कामास स्वार पाठविले आहेत. यांसी मसाला मोकरर रुपये आदा करणें. जाणिजे. छ १४ हे रमजान. मोर्तबसूद.
[२२६] श्री. ३ जुलै १७६०.
... ... ... विशेष. कमाणाचे प्रयोजन आहे तरी कमाणा सुमार २५ बाळाबोटी, सदर्हू कमाणापैकी निमे निरम व निमे सख्त, याप्रमाणें पाठवून देणें जाणिजे. छ १२ जिलकाद सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.