Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७४.
१७०१ माघ व॥ १४ श्री. ६ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. इंग्रजाकडील च्यार कुमसेलवाले पट्टणास यावयास निघाले ह्मणोन लिहिलें. त्यास, इंग्रज .... .... याचा ता। पेशजीं लिहिलाच आहे. आणि नवाबबहादुर यांसही त्यांविशीं नक्ष आहे. जात मकरी ह्मणोन त्यांचेच लिहिण्यांत आहे. इकडून ल्याहावें ऐसें नाहीं. टोपीवाले यांची जात फार .... यास्तव त्यांस येऊंच न द्यावें. तालुकियांत आले असलिया नवाबांनीं साफ सांगून पाठवावें कीं, तुमचें प्रयोजन नाहीं. न येणें. याचें कारण ह्मणाल तरी उगीच बातनी तरी घेऊन जातील. त्यांस बातनी देखील पोहचूं न द्यावी. त्यांचे येणें नीट नाहीं, जाणून साफ जाब द्यावा. कलकत्त्याचीं पत्रें सरकारांत येत होतीं, त्यास जाब देणेंच मना केलें. सिलसिला तोडला. तसेंच नवाबबहादर यांणीं करून, येतात त्यांस साफ जाब द्यावा. बलकी वकील चेनापट्टणास आहे, त्यांस इंग्रजांनीं रुकसत दिल्यास त्यांणीं ही निघोन यावें. सर्व दरजे नवाबबहादर यांचे ध्यानांत आहेत. * सिलसिला तोडावा हेंच चांगलें. नाहींतर ही बातमी चोहूंकडे कळून अंदेशे पडतील. मसलत नासेल. सर्व बोलून सिलसिला राखूं नये. र॥ छ २९ सफर. हे विनंति.
पै॥ छ १९ रबिलावल, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७३.
१७०१ माघ व॥ १४ श्री. ५ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. मुसा लाली फरासीस नवाबनिजामअल्लीखां बहादूर यांजकडून कांहीं खतरा आला ह्मणोन, नवाबबहादर यांजकडे पट्टणास आले, मानसन्मान करून ठेविले, जमावही सांगणार, ह्मणोन लिहिलें. एसियास, मुसा लाली माणूस फार चांगला, जवांमर्द, इंग्रजाचे लढाईचे कामावर फार पडेल. त्याची ही उमेद आहे. सरकारांतही त्यास नौकर ठेवावें ऐसें होतें. हालीं नवाबबहादूर यांपासीं गेले, फार चांगलें आहे. जमाव देऊन, इंग्रजाचे कामावर घालवावें. चांगलें कामकाज करील. नवाबबहादूर यांचा तोफखाना बेंगरूळाकडे गेला. मीर रजा जमावसुद्धा पिलरीवर आहेत ह्मणोन लिहिलें, तें कळलें. हालीं मीर यांणीं घांट उतरून अर्काटावर जावें. नवाबबहादर यांणीं चेनापट्टणाकडे जलद जावें. दिवस केवळ थोडे राहिले. निघण्याची त्वरा व्हावी. र॥ छ २८ सफर. हे विनंति.
पै।। छ १९ रबिलावल, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ ७ रबिलावल, लेखांक ७२. १७०१ माघ व।। ८.
सा। समानीन, फाल्गुन मास. श्री. २७ फेब्रुवारी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मीं छ २४ व छ २७ छ व ३० माहे मोहरमचीं पत्रें पाठविलीं तें पावलीं. सविस्तर म।। सरकारच्या पत्रावरून कळों आला. पेशजीं पट्टणाहून राजश्री नरसिंगराव यांचे विद्यमानें याद ठराव होऊन आली, त्या बमोजीब करारनामा ठराऊन सरकारांतून दिल्ही. एक अदवानीचें कलम अधीक होतें. त्यास, सांप्रत नवे मसुदे आले. पहिल्या करारनाम्यास व हल्लींच्या मसुद्यास तफावत फार आहे, एविसीं राजश्री नानांनीं आह्मांस व राजश्री लक्ष्मणराव आणा रास्ते यांस कायल केलें. तेव्हां समजाविलें कीं, नवाबबहादूर यांसीं दोस्ती जाली, याचा लौकिक फार जाला. हालीं तफावतीच्या कल. मांवरून दिक्कत आणावी हें योग्य नाहीं. ऐसें समजाविल्यावरून त्यांणीं ही हाच विचार ध्यानांत आणोन, नवाबबहादूर यांचे मसुदे आले, त्याप्रों। करारनामा व निभावणीचीं पत्रें पाठविलीं आहेत. तफावतीच्या कलमांची यख्त्यारी सरकारांतून नवाबबहादूर यांजवरच ठेविली आहे. त्यांचे उमदेपणास योग्य आहे त्याप्रमाणें तेंच करतील. राजश्री माहादजीराव सिंदे गुजराथ प्रांतीं गेलेत्यांजकडील निभावणीचें पत्र आणावयाविषीं सांडणीस्वार जोडी पा। आहे, तें लौकरच येईल. उपरांतीक मागाहून रवाना होईल. तुह्मीं कराराप्रमाणें गुंते उगवोन सत्वर यावें. नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टणाकडे जलद व्हावें. दिवस राहिले नाहींत. मिरजकर वगैरे मंडळी व जरूरीचीं सरकारी एक दोन कामें करून घ्यावयाचीं आहेत ते नवाबबाहदूर यांसी बोलून करून घ्यावीं. नवाबाचे मर्जीप्रमाणें सरकारांत विनंति करून त्यांचे मनोदयानरूप कामें जालीं, हें लक्ष नवाबबहादूर यांणीं समजून, इकडील सरकारचे अगत्यांतील कार्यें करून द्यावीं. त्याप्रमाणें करून देतील. गुंता पडावयाचा नाहीं. सविस्तर राजश्री नानांचे पत्रावरून कळेल. * रा। छ २१ सफर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७१.
१७०१ माघ वद्य ८. श्री. २७ फेब्रुवारी १७८२.
यादी लाखोटे रवाना पट्टणासः
३ | नवाब बहादूर यांस थैल्या |
१ नानांची | |
१ हरीपंत | |
१ कृष्णराव | |
------ | |
३ | |
३ | कृष्णराव नारायण |
३ | नरसिंगराव |
२ | गोविंदराव नारायण |
१ | त्रिंबकराव आपाजी |
----- | |
१२ | |
१ | तहनामा सरकारचा निभावणीचे पत्राचा लाखोटा, कृष्णराव नारायण यांचे नांवाचा. |
------ | |
१३ | |
२ | कित्ता कृष्णराव नारायण |
२ | गोविंदराव नारायण रास्ते यांचे लाखोटे धारे. |
------ | |
१७ | |
*सतरा लाखोटे छ २१ सफर. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७०.
१७०१ माघ वद्य ७. श्री. २६ फे. १७८०.
राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. तुह्मीं खर्चाविसीं लिहिलें होतेंत, त्याजवरून दोन हजारांचे एकेरी होन वली म।। व सेखअहमद सांडणीस्वार दिमत पागा हुजूर यांबराबर नाणें ४९४
दर ४ प्रमाणें तुमचे तसलमातीस लिहून, दोन हजार पावणेसात रु।। चवल पाठविले आहेत. घेऊन पावल्याचें उत्तर पाठवावें. रा।। छ २० सफर. हे विनंति.
पै।। छ ७ रा।।वल सनसमानीन, फा. मास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६९.
१७०१ माघ व।। ७. श्री. २६ फेब्रुआरी १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः–तुह्मीं छ २४ छ २७ छ ३० माहे मोहरमचीं पत्रें पाठविलीं तें पावलीं. 'पट्टणास पोहचून नवाबबहादूर यांची मुलाजमत जाली. सर्व मजकूर आह्मीं व राजश्री नरसिंगराव व गोविंदराव यांणीं समजाविला. करारनामा दाखविला. बोलणें ही परस्परें जालें. करारनाम्यांतील एक दोन कलमें यांचे युक्तीस न आलीं ह्मणोन नवाबांनीं करारनाम्याचा व खातरजमेच्या पत्राचा मसविदा ठराऊन दिल्हा, तो पाठविला आहे. त्याप्रमाणें करारनामा व पत्रें यावीं', ह्मणोन विस्तारें लिहिलें. तें सर्व समजण्यांत आलें. ऐसियास, राजश्री नरसिंगराव वकील नवाबबहादुरांकडील सलुखाचें बोलणें सरकारांत बोलूं लागले, निश्चयांत गोष्ट आली. ते समईं सरकारांतून कलमवार याद करून दिल्ही कीं, हे याद तुह्मीं पट्टणास नवाबबहादुरांकडे पाठवावी. त्यावरून मशारनिले यांणीं याद पट्टणास पाठविली. त्या कलमांपैकीं नवाबबहादूर यांणीं बंगाल्यास फौज पाठविण्याचीं वगैरे एक दोन कलमें गाळून, बाकी कबूल करून, त्यांणीं आपले तर्फेची याद पाठविली, त्याप्रमाणें सरकारांतून करारनामा करून दिल्हा. अदवानी वगैरेस उपद्रव न द्यावा इतकें मात्र अधिक आहे. ऐसें असतां हालीं नवाबबहादूर यांजकडून मसविदा आला, त्यांत दोन कलमें मोठींच काहडलीं. तेव्हां, करार राहून नवें बोलणें जालें. सरकारची तों चाल कीं, एक वेळ बोलणें व वचन जालें, ह्मणजे त्यांत फिरोन अंतर यावयाचें नाहीं. दौलतींत अहाद शर्त आणि वचन हा खजाना. ऐसी इकडील समज. श्रीमंत राव पंतप्रधान व नवाबबहादूर यांची दोस्ती व पक्का सलूख जाला. याचा लौकिक बहुत जाला. त्यांत, तकरारी कलमाची दिक्कत आणोन, होय नव्हे ह्मणणें हे ठीक नाहीं, ऐसें समनजोन नवाबबहादूर यांणीं मसविदे पाठविले, त्याप्रमाणेंच करारनामा व निभावणीचीं पत्रें पाठविलीं आहेत. पोहचतील. करार जाला याप्रमाणें आपलाले कार्यावर जावें. नाहींतरी नवाबबहादूर आगोधर चेनापट्टणाकडे चाल करतील आणि आह्मांवर हार्फ ठेवतील. यास्तव, आपण आधीं नमूद व्हावें ह्मणोन, राजश्री माहादजीराव सिंदे व होळकर मातबर फौज बमय तोफखाना व बाण वगैरे पोख्त सरंजामनसीं दरकूच गुजराथ प्रांतीं गेले. हालीं नवाबबहादूर यांजकडून मसविदे आले, त्याप्रमाणें सिंदे यांजकडील निभावणीचें पत्र आलें पाहिजे. याजकरितां मसुदा सांडणीस्वाराबराबर देऊन त्यांजकडे रवाना केला. पत्र सत्वरच येईल. उपरांतीक रवानगी होईल. वरकड निभावणीचीं पत्रें व करारनामा पाठविला आहे. पहिले करारास व हल्लींचे करारास अंतर फार पडतें. खंडणीचें दरोबस्त एकसाल व नवा मुलूक सुटेल तो, पट्टणास लगता, सबब बहादरांनीं घेऊन, सरकारचे लगता मुलूक असेल तो द्यावा, वगैरे नुकसानी आहे. सरकारांत ही पांच साहा वर्षांचा खिसारा आहे. नवाबबहादूर यांसीं दोस्ती जाली. दोहींकडील सलाह तदबीर एक. तेव्हां इकडील खिसारियाची त्यांस फिकीर आहेच. ऐसें जाणून तकरारी कलमांची अख्त्यारी सरकारांतून नवाबबहादरांकडे आहे. त्यांचे उमदेपणास योग्य तेंच करतील. त्यांणीं मसुदे पाठविले त्याप्रों।च इकडून करून पाठविले. लढा ठेविला नाही. * श्रीमंतांचे तर्फेनें थोरपणास उचित तेचं केलें. याउपर नवाबबहादर यांचे थोरपणास योग्य तें करतील. र॥ छ २० सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हें विनंति. पै॥ छ ७ रबिलावल, स॥ समानीन मया व अलफ, फाल्गुन मास, मु।। पट्टण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ ७ रबिलावल, लेखांक ६८. १७०१ माघ व।। ७.
सुमासमानीन, फाल्गुन मास, श्रीशंकर प्रसन्न. २६ फे. १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावोन संतोष जाहला. ऐसेंच सदैव पत्र पाठऊन संतोषवीत असावें. इकडील वर्तमान, राजश्री गोविंदराव गणपतराव यांचे पत्रावरून कळेल ह्मणोन लिहिलें, तें कळलें. आपलीं पत्रें सरकारांत आलीं व राजश्री गोविंदराव नारायण व गणपतराव केशव यांनी पत्रीं मजकूर लिहिला त्याजवरून सविस्तर कळों आलें. इकडील सविस्तर म॥ राजश्री गोविंदराव व गणपतराव यांचे पत्रीं लिहिला आहे, त्यावरून कळों येईल. निरंतरीं पत्रीं आनंदवीत जावें. रवाना, छ २० सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंति. पोष्य लक्ष्मणराव भिकाजी कृतानेक नमस्कार. निरंतर पत्रीं आनंदवीत जावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा, हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६७.
१७०१ माघ व।। ७. श्री. २६ फे. १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. शागीर्दपेशाचे लोक यांचे रोजमरे देणें वगैरे खर्चाविशींचा मजकूर लिहिला, तो कळला. ऐसीयास दोन हजार रुपयांची पट्टणची हुंडी अलाहिदा पाठविली आहे ते पावेल. हुंडीप्रमाणें ऐवज घेऊन खर्च करावा.
र॥ छ २० सफर हे विनंति.
पो। छ ७ रबिलोवल, सन समानीन. फ॥ मास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ ७ रबिलावल, लेखांक ६६. १७०१ माघ वद्य ७.
स।। समानीन, फाल्गुन मास श्री. २६ फे. १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं: -
पो। हरी बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मीं दोन तीन पत्रें पाठविलीं तें पावलीं. सविस्तर मजकूर श्रीमंतांचे पत्रांवरून समजला. पहिला करारनामा पटणाहून याद आली त्या बमोजीब करून दिल्हा. एक अदवानीचें कलम मात्र अधिक. ऐसें असतां हालीं नवे मसुदे जाले, हें काय ? पहिले करारनाम्यास व हालीचे मसुद्यास अंतर फार. नुकसानी बहुत. परंतु नवाबबहादूर यांसीं दोस्ती जाली याचा लौकीक फार जाला. हालीं आतां दिक्कत घेणें हें योग्य नाहीं. ऐसें श्रीमंतांनीं चित्तांत आणून, त्यांचे मर्जीनुरुप मसुद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें पाठविलीं आहेत. तकरारी कलमांत नुकसानी. त्याची यख्त्यारी सरकारांतून नवाबबहादूर यांजवरच ठेविली. त्यांचे थोरपणास योग्य तेंच ते करतील. राजश्री माहादजीराव सिंदे गुजराथप्रांतीं गेले. त्यांजकडील निभावणीचें पत्र आणवण्याविसीं सांडणीस्वार पाठविले आहेत. लौकरच पत्र येईल. तें मागाहून रवाना होईल. कराराप्रमाणें गुंते उगऊन तुह्मीं सत्वर यावें. नवाबबहादूर यांचें जाणें चेनापटणाकडे व्हावें. दिवस फारच थोडे राहिले. मिरजकर वगैरे मंडळी व एक दोन सरकारी जरूर कामें करून घेणें, त्याविशीं श्रीमंत नानांनीं लिहिलें. त्याप्र।। नवाबबहादूर यांसीं बोलोन करून घ्यावीं. नवाबाचे मर्जीप्रमाणें सरकारांतून कामें जालीं. त्यापक्षीं नवाबबहादूर ही समजोन, सरकारचीं कार्यें करून देतील. गुंता पडणार नाहीं. सर्व दरजी त्यांचे ध्यानांत आहेत. सविस्तर श्रीमंतांनीं लिहिल्यावरून कळेल. *र॥ छ २० सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति. राजश्री गोविंदराव व गणेश-पंत स्वामींस सं॥ नमस्कार. लिहिलें परिसोन, श्रीमंतांचे लिहिल्याप्र॥ कामें अमलांत यावीं. लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६५.
१७०१ माघ व॥ ७ श्री. २६ फे. १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. नवाबबहादूर यांणीं मसविदे पाठविले त्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें पाठविलीं आहेत. याअन्वयें नवाबबहादूर यांचा करारनामा शफत लिहून सिक्यानसीं करून घ्यावा. मग इकडील द्यावा. निभावणीचीं पत्रें सर्वांचीं पाठविलीं. त्याप्रमाणें त्यांचीं पत्रें सर्व मंडळीस घ्यावीं. त्याची याद अलाहिदा पाठविली, त्याप्रमाणें पत्रें घ्यावीं. र॥ छ २० सफर. हे विनंति.