Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४६ ]
श्रीवरद शके १६७७ पौष शुद्ध १०.
राजश्री यशवंतराउ गोसावी यांसिः--
उपरि. तुळाराम व साहेब रायवाणी यांच्या मामलतीपैकी गुलाम मुस्तफाखां याचे तलवे पो। रु॥ २३०० तेवीसें तुह्माकडून देविले असेत. तर सदरहू रुपयांपैकी दोन रु॥ दाहा आणें कसूर वजा करून रु॥ देऊन कबज घेणें. जाणिजे. रा॥ छ ९ माहे रबिलाखर, सु॥ खमसैन मया अलफ. बहुत काय लिहिणें ?
मोर्तब
सुद
* बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४५ ]
श्रीवरद शके १६७७ मार्गशीर्ष शुद्ध ११
सिधीश्रीराव बालमुकुंदजी जोग्यलीषीतां। पुरुषोत्तम व महादेव देवराव महादेवकेन आसीर्वाद बाचजो. अठाका स्माचार भला छे. थांका भला चाहीजे अपरंच. श्रीकेदारनाथके पूजकने रुपया २०० दोनसोकी तनषाथां. उपरकरी दोनसो रुपया महमदशाही हरसनशामलीके एवजी दीजो और कबज लीजो. जाणिजे छ. १० माहे रा।लावल, सु॥ सित खमसैन मया अलफ. बा। काय लिहिणें. *
मोर्तब
सुद.
बार.
फिरली वरात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४४ ]
श्रीवरद शके १६७७ आश्विन वद्य ७.
राजश्रियाविराजित राजश्री बाबूराऊ गोपाळ गोसावी यांसिः--
सेवक पुरुषोत्तम महादेव व देवराऊ महादेव नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष प्रा। सरावा व ता। भोजपूर वगैरेची कमाविश सालगु॥ तुह्मांस सांगितली होती. तेथला हिशेब कितेब भरून पावलों. कांहीं लांझ्या हिशेबाचा राहिला नाहीं. रा। छ २० माहे मोहरम, सु॥ सित खमसैन मया अलफ. सन ११६३. बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४३ ]
श्रीशंकर शके १६७७ भाद्रपद वा। ९.
श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक गंगाधर शिवराम कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ. २२ जिल्हेज मुक्काम लष्कर नजीक श्रीमथुरा जाणून स्वानंदलेखन. आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींनी कृपा करून जासुदाबरोबर पत्र पाठविलें तें पावून सनाथ जालों. पत्रीं मजकूर कीं, ति॥ सो।ची पत्रें देशीं येण्याविशीं बहुत जलदीचीं आलीं, व लष्करांत आल्यानें मिश्रजीचा तंटा पडेल, यास्तव सर्व सरदारांचें अभय पक्केपणीं घेऊन लिहावें, ह्मणजे त्याप्रमाणें केलें जाईल. ह्मणून पत्रीं विस्तारें आज्ञा. त्यास, राजश्री राजारामपंत भाऊस पत्र होतें तें मशारनिल्हेस पावतें केलें. त्यावरून सर्वांस आश्चर्य झालें. सरकारची आबादानी होती. असो. तेथील विचार झाला तो सारा सेवकानें वरचेवर आजूरदार करून तपशिलें विनंतिपत्रें पाठविलें कीं, लौकर स्वारी आल्यानें दसर्या दिपवाळीपावेतों येथें राहून, स्वसंतोषें सरदारांचा निरोप घेऊन, देशी जावें. याअर्थी वरचेवर सेवेसी लिहीत गेलों, तें स्वामीचे विच्यारास न आलें. मिश्रजीचा संशय जाणून तिकडे दिवस लांबणीखालीं गेले. स्वामीनी पत्रें सर्वांस लिहिली. त्यास, तें पत्रें दिधल्यानें सध्या लौकिक होता. यास्तव रा। भाऊचे विचारें ठरलें कीं, येक वेळां येथें होऊन निरोप घेऊन गेलियानें ठीक आहे; नाहींतर येथें कारकूनासदेखील राहावयाचें ठिकाण राहणार नाहीं. त्यास, निर्विकल्प स्वामींनीं यावें. मिश्रजींनी कार्य करणें येविशीं खातरजमा राखून सत्वर आलें पाहिजे. परभारें गेल्यानें आह्मांसही येथें ठेवणें ठीक नाहीं. दोन खेडीं इकडील आहेत तेंही राहणें संकट. त्या अर्थी जे सलाह तेथील मंडळीचे विचारें ठरेल तें करावें. राजश्री भाऊचें पत्र घेऊन पाठविलें आहे, त्यावरून सविस्तर श्रुत होईल. राजकी वर्तमान पेशजी सेवेसी विनंति लिहिली आहे त्यावरून साकल्यार्थ ध्यानारूढ होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.
पौ। छ. २८ जिल्हेज, मु॥ झांशी, रविवार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४२ ]
श्री शके १६७७ आषाढ वद्य १३
अस्सल ब॥ नक्कल.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री अप्पाजी हरी गोसावी यांसिः-
सेवक रघुनाथ बाजीराउ नमस्कार सु॥ सित खमसैन मया व अलफ. किले रामसेज येथील सबनिसी व सुभेदारी राजश्री दामोधर महादेव याज कडे आहे. त्याच्या सनदा पेशनी मा।रनिलेचे नांवे सादर आहेत. त्याप्रमाणें सबनिसी व सुभेदारी करार असे, तरी मशारनिलेचें तर्फेनें कारकून येतील त्यांचे हातें किले मजकुरी सबनिसी व सुभेदारीचें कामकाज घेऊन वेतन पेशजीचे सनदेप्रमाणें पावीत जाणें. दिक्कत न करणें. सालमजकुरापासून सबनिसी व सुभेदारी यांची चालवणें, ह्मणोन तुह्मांस रुबरु आज्ञा केलीच आहे. त्याप्रमाणें याजकडे चालवणें पेशजीच्या सनदा हवालदार व कारकून किल्ले मजकूर यांचे नावे सादर आहेत. त्याप्रमाणें यांजकडील कारकुनाचे हातें सेवा घेऊन वेतन पावीत जाणें. जाणिजे. छ. २६ सवाल आज्ञा प्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४१ ]
श्रीमोरया शके १६७७ ज्येष्ठ शुद्ध २.
श्रियाविराजित राजश्री बापूजी व राजश्री दामोदरजी स्वामीचे सेवेसीं :-
सेवक गंगाधर यशवंत व रामाजी यादव सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. इकडील वृत्त राजश्री सुबेदारानीं लि॥ आहे त्यावरोन कळो येईल. मुख्य गोष्टी राजश्री सुभेदार यशस्वी. खावंदाच्या प्रतापें अमित्र हतवीर्य करोन, कार्यभाग संपादून, बहुत यश संपादलें. रजपूत बहुत मत्त होते. परंतु बहुत थंडे जाले. हुरूप त्याजमध्यें राहिला नाहीं. सदैव पत्र पाठऊन परामृष करीत जाणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
पै॥ छ ३० साबान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४० ]
श्री १६७७ शके ज्येष्ठ अधिक वद्य.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री दामोधरपंत स्वामी गोसावी यांसीः--
पोष्य महिपतराव आवजी दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. पत्रें दोन पाठविलीं ती पावली. ममतेचा व स्नेहाचा अर्थ लिहिला तो कळला. ऐसियास, तुमचा आमचा स्नेह परमेश्वर कृपेनें घडला तो कांहीं लोकजनिक होता ऐसें नाहीं. त्याच प्रकारें ममतायुक्त चालला. परंतु कालपरत्वें आपलेजवळ ह्या गोष्टीची भ्रांत पडली. ऐसें आमच्या दृष्टीस, पडल्यासही जें आपलें हित चि स्नेहाचे रीतीनें गतवर्षी सांगत गेलों. व बाळाजीपंत व हरिचंद्रपंत पांजबरोबर सांगोन लेहुन पाठविलें होतें, त्याचा प्रत्ययतुह्मांस आलाच असेल. आह्मांस तो आला. असो ! तुह्मीं सर्व जाणता आणि वकील अहां. ज्यांत आपलें कल्याण व मेळविल्या दौलतीचें रक्षण राखोन राहाणें हेंच शहाणपण. कोठेंही खुशाल असावें हेंच खबर आह्मांस पाहिजे. पुढें मनसुबा विचार कर्तव्यता काय कशी तो अर्थ कोणी वराड आलिया स्पष्ट लिहून पाठवावा. सारांश, श्रीमंत तुमचे मूळद्रव्य, त्यास येथून दादाबज्या हेच. ऐसें असतां त्याजसी नाखुषी जाहाली. तेव्हां येथील अर्थ व परिणाम कसा काय त्याचा स्पष्टार्थ श्रीमंताचे पुरवणींत आहेच. येथून ल्याहावासा नाहीं. येथील लक्ष तुटल्यानीं उत्तमांत नाहीं. तुह्मी जो विचार करणें तो पुरताच केला असेल. विशेष काय लिहिणें ? हे विनंति.
पै॥ छ १८ रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८०
श्री १६०७ ज्येष्ट शुध्द ७
किंवा
१६०८ ज्येष्ट शुध्द ७
नकल
राजमान्य राजश्री कृष्णाजी दादाजी प्रभु देशपांडे सबनीस व जामनीस नि॥ लोक हशम दि॥ हुजरात मोजे कारी वडतुबी कोरळ चौकी कोरळखिंड ता। रोहिडखोरे गोसावी यासि
श्रीा शंकराजी नारायण आसिर्वाद उपरी मावळ प्रा। गनिमानी चाल केली आहे ह्मणोन समजले त्यास कोरळखिंड व ढवला घाट व माडरदेवचा सडा येथील जागा जागा चौक्या घालून गनीमाची खबर ठेऊन कमकसूर खास बातमी पावती करणे राजगडी कळविला च तुमची कुमक रोहिड वगैरे जागाहून होईल तुह्मी सिरवली मर्दमु चागली केली हे खबर येथे समजली या वेळी गनीम नामोहरम सर्वांनी करावा तुह्मी जमेदार व सरचाकर माहाराजाचे वेळचे +++ करोन दाखवतील हा भरवसा आहे रा। छ ५ रजब सु॥ सीत समानीन अलफ बहुत काय लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३९ ]
श्री शके १६७७ अधिक ज्येष्ठ शुद्ध ९.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजी माहादेव व दामोधर महादेव स्वामी गोसावी यांसिः--
पोष्य रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मी सरकार कामें करावी, इतबार, वाढऊन घ्यावा, तो न घेतां इतबार गमाविला. त्याची कलमें :--
बंगाल्यास सरकारच्या पैकियाचा यादी तुह्माजवळ दिल्ह्या होत्या. त्या
तनखा जाहला. तो आणावयास यादीप्रों। कामें गया वगैरे करून
राघो नीळकंठ यास पाठविलें. पाठवावीं ते अद्यापि कांहीं नाहीं. हें
त्यास, राघो नीळकंठ यांणीं पुढें एक अंतर.
पत्रें पाठविली होती. त्यांचें
उत्तर बंगालियाचे सुभियाचें
आलें कीं, दोन तीन पत्रें हुजूरचीं
आलीं की, पैका हुजूर पाठवणें, खासा स्वारी देशी येतेसमयीं रुबरु
त्याजवरूनं हुजूर रवाना केला, करार केला कीं, दो महिन्यानें
त्यास पैका पावणें तो हुजूरचे मागून दर्शनास येतों. त्यास अद्यापि
मुतसद्दियांचे विद्यमानें वकिला- येत नाहीं. हे बेकैदेची गोष्ट.
जवळ पावेल, तुह्मी न येणें,
माघारें जाणें. त्या पत्राचा मजकूर
येथें लिहिला आला. याजवरून रामचंद्र लक्षुमण याच्या बराता
दिसणियांत आलें की परभारें केल्या असतां रुपये न दिल्हे. त्याचा
पैका राघो नीलकंठ याजपासीं गुमास्ताही उठवून लाविला. याप्रों।
न द्यावा. तेथें जाऊन तुह्मांपाशीं केलें.
घ्यावा. हे गोष्ट तुमच्या केल्याचीच
आहे. हे सरकारचे मर्जीस अंतर
असे.
येणेंप्रो। च्यार कलमें केलींत. यांत एकाही ठाईं येथील लक्ष राखून न वर्तला. यामुळें तुमचे प्रामाणिकपणाची व सचोटी शर्त जाहली ! तुह्मी हींच कामें करीत आला. तेव्हां याची चिंता कशास कराल ? परंतु तुह्मासी बोलणियांत आलें की निष्ठेनें वर्तल्यास तुमचें कल्याण करूं. त्यास, निष्ठेचा प्रकार तो हो जाहला ! याउपरि येथील वचन बोलणियांत आलें तें उगवलें. गुंता कांहीं राहिला नाहीं. तुह्मी जैसी वर्तणूक कराल तैसें फल पावाल ! जाणिजे. छ. ७ साबान. बंगालियाचे रुपयास अडथळा केला हे गोष्ट आपले स्वरुपास हानिकारक केली. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
पै॥ छ. २९ रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३८ ]
श्री
शके १६७७ चैत्र वद्य ६.
राजश्री चिमणराजा संस्थान पेठ गोसावी यांसीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
रघुनाथ बाजीराव आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. राजश्री दामोधर माहादेव यांचे हवेलीचे कामाची लांकडे ननासी महाजे येथून गठडे सुमार १०० संभर भरोन नासिकास आणितील. त्यास दस्तकाप्रमाणें आणूं देणें. जकातीचा तगादा न लागे तें करणें. जाणिजे. छ. १९ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें.
श्री
लेखन
सीमा
राजा शाहू नरप-
ति हर्षनिधान
बाळाजी बाजीरा-
व प्रधान.