Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ४४३ ]

श्री शक १७२५, पौष वद्य १

पौ। छ २७ रमजान,
सन अर्बा मयातैन
पौष मास.

राजश्री त्रिंबकराव नाना गोसावी यांसीः--

छ सकलगुणालंकृत अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
फत्तेसिंग भोंसले रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयलेखन करीत असलें पाहिजेः विशेष. आपणांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नव्हतें. इतकियांत आपण पत्र पाठविलें तें सुसमयीं प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहाला. खंडणीपैकी बाकीच्या ऐवजाविशीं लि॥. त्यास, इकडील वर्तमान तर सांप्रत मलबा नगरकर, व लोखंडे, व भोसले, व घाटगे, यांच्या फौजा महाली येऊन मनस्वी दंगा केला आहे. हें सर्व राजश्री विठ्ठलराव पहातच आहेत. संस्थान बहुत पेंचांत आलें ; तो विस्तार कोठवर ल्याहावा ? या फौजेचा दंगा निवारण होवोन, स्वस्थ जाहालें ह्मणजे, थोडीबहुत ऐवजाची तरतूद करून, पाठवून देतों. आपणहि इकडील संस्थानचें अगत्य धरीत जावें. वरकड परियायें विठ्ठलराव लिहितील त्याजवरून ध्यानास येईल. निरंतर पत्र पाठवून चित्त संतोषवित जावें. रवाना छ० ११ रमजान. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती.

लेखना-
वधिमुद्रा

श्रीशिवशंभु
स्वामिनि शाहूभूपेश
पार्थिवोत्तंसे ॥ परिणत
चेतोवृत्तेःफत्तेसिंहस्य
मुद्रेयं ॥

पौ छ २७, रमजान, सन अर्बा मया तैन. पौष मास.

                                                                                 लेखांक २९३

                                                                                                      श्री                                                            १६३५ फाल्गुन शुध्द १४
                                                                                                                                                                       

                                                                                                           293

 

राजश्री खंडोजी गायकवाड हवलदार व कारकून किले यासि

l5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रीा बाळाजी विश्वनाथ प्रधान आसिर्वाद व नमस्कार सु॥ अर्बा अशर मया अलफ किले मजकुरी कारखानिसी पाहिजे याकरिता येसाजी दादाजी हुजूर उमेदवार होते त्यास कारखानिसी सांगोन पाठविले असे तरी तुह्मी एकमते राहोन स्वामिकार्य करीत जाणे यास वतनदारानी माजी करार केले असेत वजावाटाव दंडकप्रमाणे वजा करून उरले वेतन सिरस्त्याप्रमाणे पावणे यास जमान रा। रामजी बाजी देशपांडे पा। हिरडसमावळ घेतले असेत छ १२ सफर आज्ञाप्रमाण

                                                                   22 2

बार सुरुसुद बार

[ ४४२ ]

श्री शके १७२२ पौष शुद्ध १.

श्री ०
जीवाजी प्रभु पुत्रस्य
रामरायस्य धीमतः मुद्रा
सर्वगुणोपेता राजसम्रा-
ज वर्धिनी.

आज्ञापत्र राजश्री रामराव जिवाजी चिटनिवीस ता। मोकदमानि मौजे धामणेरें सां। कोरेगांव. सु॥ इहिदे मयातैन व अलफ. मौजे मजकूर दरोबस्त पा। चिरंजीव राजश्री रघुनाथराव याचा हिसा. त्यापैकी चिरंजीव राजश्री नारायणराव यास चौथाई वसूल देत जाणें. जाणजे. छ० २९ रजब. प॥ हुजूर.

लेखन
सीमा.

                                                                                 लेखांक २९२

                                                                                                      श्री                                                            १६३४ भाद्रपद वद्य ५
                                                                                                                                                                       
नकल

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३८ खरनाम संवत्सरे भाद्रपद बहुल पंचमी गुरुवासरे क्षत्रियकुलवतंस श्री राजा शाहु छत्रपतिस्वामी (सिका)        याणी रा। मताजी सर्जाराऊ जेधे देशमुख भोर तपे (सिका)            रोहिडखोरे यासी आज्ञा केली ऐसी जे तुह्मी विनतीपत्र पाठविलेत प्रविष्ट जाले लिहिले वर्तमान विदित जाले हारामखोराचे लस्करानी धामधुम बहुत च केली मुलुक वैरान जाला हारामखोराचे लोकामधे आपणामधे जुझ जाले च्यार पाच आपणाकडील पडिले त्याकडिल च्यार पाच पडिले सात पाच जखमी स्वामीचे पुण्ये फते जाली आमची निष्ठा स्वामीचे पायापासी आहे त्याचा हिसाब धरितो ऐसे नाही ह्मणोन लिहिले हारामखोरास नतीजा दिल्हा उत्तम जाले पुढे हि त्याचा हिसाब न धरिता वरचेवरी ठेचगा देत जाणे आपले निष्ठेचे वृत्त लिहिले तरी तुह्मी वतनदार एकनिष्ट सेवक आहा तुह्मास स्वामीचे पायावेगले दुसरा अवलब नाही हा स्वामीस व तुला भरवसा आहे असे असता स्वामिकार्यास अतर करो नये कार्य धडो पाहते हारामखोराचे मही माहाडा करून आपले सेवेचा मजुरा करून घेणे स्वामी तुमची सर्फराजी करितील लेखनालंकार मोर्तब

सुरु सूद

[ ४४२ ]

श्री शके १७२२ पौष शुद्ध १.

श्री ०
जीवाजी प्रभु पुत्रस्य
रामरायस्य धीमतः मुद्रा
सर्वगुणोपेता राजसम्रा-
ज वर्धिनी.

आज्ञापत्र राजश्री रामराव जिवाजी चिटनिवीस ता। मोकदमानि मौजे धामणेरें सां। कोरेगांव. सु॥ इहिदे मयातैन व अलफ. मौजे मजकूर दरोबस्त पा। चिरंजीव राजश्री रघुनाथराव याचा हिसा. त्यापैकी चिरंजीव राजश्री नारायणराव यास चौथाई वसूल देत जाणें. जाणजे. छ० २९ रजब. प॥ हुजूर.

लेखन
सीमा.

[ ४४१ ]

श्री. शके १७२० आषाढ शु॥ १०.

आपत्य आलीबहादुर चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना तागाईत छ ९ जिल्हेज पावेत मुक्काम नदीकनेनजीक कालीजर येथें साहेबाचे प्रतापेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. धारकर पंवार याचें पथक येथें सरकार चाकरीवर होतें. तें झाडून उठोन देशी गेले. वेत्रवती उतरून येथून पस्तीस कोसांवर पोंहचले. पथकें उठतील हें समजोन आपणांस वारंवार विनंति लिहिली. परंतु सरंजामी यास ताकीद जाली. आह्मी तर सरकारचाकरी जीवादारभ्य करितों. एक दोन लढाया दरम्यान बिघडल्या. तेव्हां कस्त मेहनत करून सरकारचा मुलूख राखिला व यशवंतराव नाईक निंबाळकर सरकारकामास आल्यापासून तर आजपर्यंत बुंदेले यांचे दुंडीमुळें व लोकांचे खायापियाचे वखवखीनें रात्रंदिवस चैन नाहीं. तत्राप सरकारचा नक्ष व दाब राखून मुलूक सांभाळिला आहे. हल्ली धारकर पंवार उठोन गेले आहेत. तरी पंवार यांचा सरंजाम जप्त करावयाची आज्ञा व्हावी व कांहीं गुन्हेगारी घ्यावी की बिना आज्ञा कसे उठोन गेले ? व पथक इकडे सरकारचे हुज़र जाऊन रवाना कराविलें पाहिजे. पहिले एक हुजरे आठ वर्षे जाऊन बसले आहेत. तसे आतांही जाऊन न बसे. ते बेमुरवत निकड करून पथक इकडे काढून पाठवित तें जालें पाहिजे. नाहीं तर येथील झाडून पथकें उठोन जातील. मग आमचें राहणेंही व्यर्थ आहे. याउपर धन्याची मर्जी असेल तसी आज्ञा व्हावी. आजपर्यंत चाकरी जातीनें मेहनत करून केली की, सरकारची सर्फराजी होईल. ते दूर राहोन आबरूस खाकी यावी असा समय येऊन बान खाला आहे. त्यास सेवकाकडून तर कांहीं अंतर पडलें नाही. सरकारची सेवाच जाणून आहों. तर लिहिल्या अन्वयें पंवार यांचा बंदोबस्त होऊन पथक चांगले सरंजामानसी इकडे रवाना करावयाची आज्ञा जाली पाहिजे. अथवा जसी आज्ञा आह्मांस येईल तसें करूं. इतकें अमर्यादा करून न ल्याहावें. परंतु येथें पथकें उठोन जाऊं लागल्यामुळें बहुत लौकिकांत अफवा जाली आहे की, पथके सरकारचे मर्जीशिवाय कसी उठोन जातील ? त्यास, आजपर्यंत वोढताड तर होतीच परंतु सारी फौज जमा न होती. ह्मणून येथें निभाव जाला. आतां पथकें जाऊं लागल्यास पेंच आवघड पडेल. यास्तव नाविलाज होऊन विनंति लिहिणें प्राप्त आली. त्यास येथे आह्मांस ठेवणें असल्यास सदरहूअन्वयें बंदोबस्त होऊन यावयाची आज्ञा व्हावी. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.

पौ। छ ८ मोहरम सन तिसा तिसैन. आषाढ मास.

[ ४४० ]

श्री शके १७१८ कार्तिक वा। १३.

पौ। छ. ४ जमादिलाखर सबा तिसैन मार्गशीर्ष शु॥ ६.

साहेबाचे सेवेसीः- आज्ञाधारक जावजी पाटील गवळी रामराम विज्ञापना येथील क्षेम ता। छ. २६ जमादिलोवल पावेतों सेवकाचें वर्तमान यथास्थित असें. विशेष. पूर्वी सेवेसी जोडी रवाना केली आहे ती सेवेसी पावेल. त्यावरून ध्यानास येईल. श्रीमंताच्या व सर्व सरदार मंडळी व मानकरी व राजश्री नानाच्या भेटी कार्तिक वद्य १२ स नवसें त्रितीय प्रहरीं जाहल्या. प्रथम भेटी वडिलाच्या जाहल्या. मग राजश्री मालोजी राजे घोरपडे, व मग मषरुलमुलुख, मग राजश्री रघोजी भोसले, नंतर राजश्री दौलतराव बाबा शिंदे, व होळकर, याप्रमाणें मोठ्या समारंभांनी जाहल्या. आह्मास नानांनी बोलाऊन घेऊन गेले. आपल्या समागमें भेटी केली. तोफा पांचशेपरयंत बार जाहले. नंतर स्वारी फिरली. तेसमई श्रीमंताचे खवासखान्यांत श्रीमंत पंत प्रधान बाजीराव साहेब, यांचे खवासखान्यांत राजश्री अप्पा बळवंत, श्रीमंत पंत प्रधान अप्पासाहेब यांचे खवासखान्यांत राजश्री आबाजी कृष्ण सेलुकर श्रीमंत राजश्री अमृतराव साहेब यांचे खवासखान्यांत राजश्री गोविंदराव मामा याअन्वयें समारंभानें मग डेर्यास स्वारी गेली. भेटीसमई वडिलांनीं व सरदार मंडळी यांणीं कांहीं भेटी ठेविल्या नाहीत. व श्रीमंतांनीं कांहीं सरदार मंडळींसही भेटी. भंडारे मुंडवे येथे आहेत. अस्तमान पर्यंत जाहाले. वडिलांचे लष्कर विठ्ठलवाडीकडील कुच करून होऊन पुलाकडे कोथरुडाकडे आले. भोसले यांचा मुकाम पुणें नजीक संगमाआलीकडे आहे. शिंदे व होळकर व मषरुलमुलुक यांचे मुकाम प्रथम ठिकाणींच आहेत. सर्व एकचित्त आहेत. कारभार व परवानगी वगैरे कामें सर्व वडिलाचे आज्ञेप्रमाणें चालत आहेत. अद्याप शहरांत यावयाचा निश्चय नाहीं. पुढे सर्व एके ठिकाणी मसलत होऊन काय ठरेल तें ठरेल. वाडिलांस विनंती फौजेविशीं केली, की जलद येत आहे. त्यास, वडिलांनी सांगितले की, तुर्त नड आली आहे. तेथेच असावे. आह्मी सांगूतेव्हां यावे. आणि तिकडे सरकारी महाली उपद्रव देऊ नये, तिकडे कोण्ही मवासी वगैरे उपद्रव महालीं देतील. त्यांचे पारिपत्य करावे. फौजेविशई तर वडिलांनी असे सांगितले. मंगाराम काशिद जोडी महाडाचे मुकामास पाठविली. ती तेथें ना गेली, तों स्वारी निघाली. जलद पुण्यास पावली. पत्रें काशीद जोडीनीं पावती केली. त्याची उत्तरें तयार जाहली होती. परंतु फिरली. पुन्हां सेलुकराम लिहावयास सांगितलीं आहेत. फौजेचा विचार करून लिहून देतों ह्मणोन महाराजांस पूर्वीचे पत्रीं याच अन्वयें फौजेविशई विनंती लिहिली. राजश्री बाबाकडून वडिलांनी दोन हजार सामाननिशीं यावें ह्मणून लेहविलें. मजपासीं आतां याप्रमाणें सांगितलें. विनंती ही करितों - साहेबाचे ठिकाणीं ममता पूर्ववतप्रमाणेंच आहे. श्रीमंत राजश्री बाबासाहेब सुस्वरूप आहेत. खारखान्याची खर्चाची पेरवी केली इतक्यानें ठिक जाहलें. हुंड्या पुण्यास आझुन अल्या नाहीत. राजश्री रखमाजीराव देशमुख घरी गेले आहेत. ते कोलास येथें आल्यावर मग येणार आहेत. राजश्री बाबा फडके याचे डेरे गारपिरावर आहेत. प्रथम प्रथम सर्व जथून राहिले आहेत. फौजा भारी मिळाले आहेत. पुढील निश्चय काय होईल तो पहावा. राजश्री आबा चिटणीस अद्याप आले नाहींत. राजश्री राजाराम विठ्ठल पुण्यास आले आहेत. परगणे ग्वाल्हेरची सोडचिठ्ठी पाटीलबावांनी दिली. ती नानाकडे गेली. नानाचे जे माहोल जप्त होते ते दरोबस्त सोडिले. वडिलाचा आमल चोंकडे गेला. सेवकांनी साधनें धोंकडील ठेविली आहेत. पाटीलबावांकडील साधन राजश्री रायाजी पाटील याचे विद्यमानें राहिलें असें. राजश्री सदाशिव मल्हार कारभारी आहेत. याजकडील साधन ठेविलें असें. रा. खुशालचंद सेट याजकडून आणून साधन ठेविलें आहे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

[ ४३९ ]

श्री.

शके १७१७.

यादीः बापूजी महादेव व पुरुषोत्तम महादेव व देवराव महादेव हिंगणे वकील यांजकडे दिल्ली व जैनगर व सुजातद्दौला व बुंदी व रोहिल व पठाण वगैरे संस्थानच्या वकालती, व सरंजाम पा। कोंच गांव, व इनामगांव चांदोरी व धागूर व इनामजमिनी, व माहादजी सिंदे यांजकडे रोजमरा, व राउताची बोली बमोजिब सनद व असाम्या, बुंधेलखंडची मजमू व पा। अवटे येथील दप्तरदारी, व रामसेज किल्याच्या असाम्या, सुभा व सबनविसी, वगैरे सरकारांतून करार करून दिल्हा त्याप्रमाणें चालतात. अलीकडे बाळाजी लक्षमण जोसी संगमेश्वरकर चांदोरीस राहतो. त्यानें सरकारांत गैरवाका समजावून खोटी तकरार केली की सन समानखमसैनांत वीस लक्ष रु॥ मा।रानिलेकडे नजर करार केले ह्मणोन वकालती वगैरे सदरहूप्रमाणें याजकडे सांगितल्या. त्यांस वीस लक्ष रु॥ नजरपैकीं बाकी राहिली असतां मा।रनिलेकडे सदरहू चालते त्याजवरून पंचाईत नेमून दिली. पंचाईतमतें जोसीमजकुरांनीं तकरीर वगैरे केली ते सर्व खोटी जाली. नदारदची याद दप्तरची मरण्याची सरकारचे मोर्तबानसी होती ते मा।रनिलेनीं दाखविली. त्याजवरून हिंगणेमजकूर यांजकडे बाकी वगैरे सरकारचा लढा राहिला नाहीं. जोसी मजकूर बोलिला, तकरीर केली, ती पंचाईतमतें सर्व खेटी जाली. त्याजवरून मारनिलेकडील सदरहू कलमें पेशजीचे कदार बमोजीब मोकळीक करून घ्यावेंसी जाली. त्यास वीस लक्षाची वगैरे तकरीर समंध याजकडील जप्ती केली आहे ते कुलपूर्ववतप्रमाणें चालवणें ह्मणोन सनदा व पत्रें देणार स्वामी समर्थ आहेत. व गांवचा व जमिनीचा वसूल घेतला असेल तो माघारे देणें ह्मणोन पत्रें देणार स्वामी समर्थ आहेत.

श्रीह्माळसाकांत

[ ४३८ ]

शके १७१६ मार्गशीर्ष वद्य १०

राजश्री देवराव महादेव गोसावी यांसः---

दंडवत विनंति उपरि. तुह्मी पत्र पाठविलें तें पाऊन लेखनार्थ अवगत जाहला. बुधवारचे मुहूर्ताचा निश्चय होऊन उत्तर यावें ह्मणोन लिहिलें व राजश्री दामोधर देवराव यांचे सांगितल्यावरून सविस्तरें कळलें. ऐसियासी, येविषईचें बोलणें राजश्री यशवंतराव गंगाधर यांसी होऊन रवानगी जाली आहे. याउपरि राजश्री बाळाजीपंत नाना यांचे विचारें निश्चय होऊन लेख येईल त्याप्रमाणें इकडून घडेल. वरकड सविस्तरें मशारनिले लिहितील. रा। छ २२ जा।वल सु॥ खमस तिसैन मया व अलफ. बहुत  + काय लिहिणें ? हे विनंति.

मोर्तब
सुद

[ ४३७ ]

श्री शके १७०६ श्रावण वद्य १२.

दस्तकमरकार राजेश्री पंतप्रधान ता। कमाविसदारान् व चौकीदारान् व बाजेलोकान् व मोकदमान देहाय व नावाडी ठोकरेकरी, सु॥ खमस सामनिन मया व अलफ. सरकारचा खिजमतगार माणकोजी कदम यास हुजुरून पुण्याहून का। नासीक येथें कामगारीस पाठविलें असे. तरी जातां येतां मार्गी कोन्हीं मुजाहिम न होणें. नदीनाले पार करणें. ज्या गांवीं राहतील तेथें चौकी पाहरा करीत जाणें. जाणिजे. छ २५ रमजान. आज्ञा प्रमाण. मोर्तब मुद.