Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                    लेखांक ३०१

                                                श्री                                                       
                                                                                                                                                                       

यादी कारकिर्दी

सीवाजीमाहाराज                संभाजी माहाराज याचे कारकीर्दीत जाला
                                      मजकूर
                                      राजारामसाहेब मंचकारूढ जाले शके १६०२ वैशाख वद्य ३
                                      संभाजीराजे यास राज्याभिषेक शके १६०२ दुर्मतीनाम संवत्सरे माघ शु॥ १० 
                                      भागानगर औरंगजेब याणी घेतले शके १६०५ 
                                      औरंगजेब पातशाहानी संभाजी माहाराजास तुळापुरी मारले शके १६१० विभवनाम संवत्सरे
                                      औरंगजेब याणी 
विजापूर घेतले शके १६११ शुक्लनाम संवत्सरे 
                                      शाहुमाहाराज याची कारकिर्दीत जन्म शके १६०२ 
                                      माहाराजास औरंगजेब याजपासी नेले शके १६११ 
                                      राजारामसाहेब सिंहगडी वारले शके १६२१ 
                                      औरंगजेब नगर मुकामी वारला शके १६२८ 
                                      राज्याभिषेक शके १६२९ 
                                      आईसाहेबाचे पुत्र सीवाजीराजे वारले शके १६३३ 
                                      रामराजे याचा जन्म शके १६३४ 
                                      शंकराजी नारायण वारले शके १६३४ 
                                      नंदननाम संवत्सरे सचिवीची वस्त्रे नारो शंकर यास जाली शके मजकुरी 
                                      परशराम प्रतिनिधि माहाराजानी कैद केले बेडी घातली शके १६३३ 
                                      बाळाजी विश्वनाथ यास पद जाले प्रधान शके १६३५ 
                                      माहाराजाची मातुश्री दिल्लीहून देसी आली शके १६४० 
                                      परशराम प्रतिनिधि वारले शके १६४० 
                                      खंडेराव दाभाडे वारले शके १६५० 
                                      प्रधान व सेनापति लढले शके १६५२ 
                                      शाहू व संभाजीराजे याच्या भेटी कराड मुकामी जाल्या शके १६५२ 
                                      राजगड हपसी याजपासून परत घेतला शके १६५५ 
                                      फिरंगी याची लढाई प्रधानासी जाली शके १६५८ 
                                      वसई फिरंगी याजपासून घेतली शके १६६१ 
                                      बाळाजी विश्वनाथ वारले शके १६६२ 
                                      किलीजखान निजामलमुलुक वारले शके १६६९ 
                                      जिवाजी खंडेराव चिटनीस वारले शके १६६४ 
                                      धाकटी धनीन वारली १६७० 
                                      शाहूमहाराज वारले शके १६७१

 

[ ४९४ ]

श्रीवरद.

श्रीमंत राजश्री सुबेदार साहेब गोसावी यासीः--

छ स्नो। पुरुषोत्तम महादेव कृतानेक आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल ता। छ २७ माहे जिल्हेज मुक्काम नजिक जैपूर तीस कोस लष्कर पातशाहा जाणोन स्वानंदलेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. विशेष. इकडील सविस्वर वृत्त, पूर्वी लिहिली त्यांवरून श्रुत जालें असेल. हालीं नजबखान अलवरेस मोर्चे लावायास दोन कोसांवर अलवरेहून आहेत. राजश्री बापूजी होळकर यास पूवी जागीर व नगदी देणें करार करून अनुपगीर गोसावीयाचे विचारें प्रतापसिंगास बुडविलें. त्या नगदीचे दोन लाखांपैकी दीड बाकी राहिले. ते जैपुरावर वरात देऊन, गोसावी मजकुरासमागमें देऊन, रवाना केले ते उभयतां सरदार जैपुराहून तिसा कोसांवर पावले. ज्यागीर नगदी नजबखान देईल तेव्हां लिहूं. पातशाहहि जैपुरास जातात, राजे सर्व एकत्र करून पातशाहीचा बंदोबस्त करावा मनांत. आपण जलदीनें यावें व आमची चाकरी पहावी. तूर्त बापूजी होळकर यांस पातशाहाचे तैनातीस करावें करावें - कीं आपली बाजी शेर राहे. आह्मांस येथें पाठवून आमची कुमक पत्रापत्रींही न केली. ऐसें न करावें. तूर्त इकडे फौज आहे हेंहि लगामी नाहीं. कृपा करून, रविसंक्रमणाचे तिलशर्करा पाठविले आहेत, हे स्वीकारून पत्रामृतीं जीवनोपाय करणार
आपण समर्थ आहेत. * आतांच वृत्त आलें कीं, नजबखानानें अलवरेस फौज ठेऊन, दरकुच जैपुरास येतो. पुढें होईल ते विनंति लिहूं, कृपा केली पाहिजे. हे विनंति.

[ ४९३ ]

श्री.

पौ। छ ३० रजब

० श्री ँ
ह्माळसाकांत चरणी तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी होळकर

राजश्री पुरुषोत्तम महादेव गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. दुदेखान वगैरे रोहिले निघाले. पारीहून कूच करून, गणमुक्तेश्वराचे रोखें जाऊन, शेरपूरचे घाटास पूल बांधोन, अलीकडे उतरून, परीक्षतगडास यावें; तेथून मेरट जवळ आहे; ह्मणून लिहिलें तें सर्व विदित जालें. ऐसियासी, त्यांची बातनी पक्की राखून, तुह्मी आपले जागां सावध राहून, आह्मांस लिहून पाठवणें. त्यासारिखें कुमकेची तजवीज केली जाईल. खरी बातमी राखून वरचेवर पैदरपै लिहित जाणे. * र॥ छ २६ रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति

श्री
मोर्तब
सुद

 

[ ४९२ ]

श्री.

पौ छ ३ रबिलावल.

राजश्री बापूजी माहादेव गोसावी यासीः--

दंडवत विनंति उपरि. गुलाबी अत्तर, आगराई, बहुत उत्तम, जखमास लावावयाचें, त्याचें प्रयोजन जरूर आहे. तरी, उत्तम अत्तर आगराई अगत्य पाठवून देणें. रा। छ ३ रबिलावल. हे विनंति.
मोर्तबसुद.

गुलाबी अत्तर जीवनपुरी आगराई अत्तर.

[ ४९१ ]

श्री.

राजश्री दामोदरपंत गोसावी यासीः--
स्नो जयाजी सिंदे दंडवत विनंति उपरि. राजश्री बाजीराव राजे घोरपडे यांस नबाबाचे दोन इनायतनोम तुह्मीच घेऊन दिल्हे; त्याजवरून राजे मजकूर जमावसुद्धां आले. त्यांच्या आमच्या भेटी छ ३० जिल्कादी जाहाल्या. सामान उत्तम आहे; व मागाहूनही लोक यावयाचे राहिले आहेत तेहि येत आहेत. तरी, तुह्मी नवाबास सांगून, एक भला माणूस पालखीनिवास पुढें पाठवून राजे मजकूर यांसी घेऊन जाणें; आणि नवाबाची भेट उत्तम प्रकारें करवावी, बहुमान करवावा, व ज्यागिरा बाहाल करव्याव्या. हे अगत्यरूप करावें लागतें. याजकरितां राजश्री नागोराम पाठविले आहेत. हे सविस्तर सांगतील. सारांश गोष्ट की, हें काम चित्तावर धरून अगत्यरूप केलें पाहिजे. तुमच्या भरोशावर आह्मी बेफिकीर आहों. वरकड श्रीमंतांकडील पत्रें आलीं तीच बजिन्नस तुह्मांकडे पाठविलीं आहेत. त्याप्रमाणें कागद वगैरे कितेक कामें आहेत ती करून पाठविणें. तुह्मी पुढें आलां असिलां तरी राजश्री त्रिंबकपंतास चिट्ठी लेहून देणें. हे विनंति.

श्री
मोर्तब
सुद

[ ४९० ]

श्री.

राजश्री बापूजी महादेव व दामोदर महादेव गोसावी यासीः--

स्नो। जयाजी सिंदे दंडवत विनंति उपर. परगणे चांभारगोंदे येथील गांव सरकार अलीची ज्यागीर आहे; ते गांव आपले वतनी आहेत; व आपल्या लोकांच्या पाटिलक्या आहेत. ते खराब पडले आहेत, आह्मांकडे जाल्यानंतर आह्मांस उपयोगी आहेत. यास्तव राजश्री बाबूराव चिंतामण तुह्मांपाशी पाठविले आहेत. याजपाशीं गांवची याददास्त आहे. मशारनिल्हे गांवचे तनख्यास वाकफ आहेत, सदरहू गांव यादीप्रमाणें आह्मांकडे ज्यागीर करून घेऊन सनदा मशारनिलेबराबर पाठवून देणें. जरूर जाणून लिहिले असे. तर, अगत्यरूप यादीप्रमाणें गांव ज्यागीर करून घेऊन सनदा पाठविणें, छ २० साबान, हे विनंति.

श्री
मोर्तब
सुद.

[ ४८९ ]

श्री.

पौ। छ ८ मोहरम.

राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य-- स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावोन वृत्तांत कळों आला. नवाब वजीर यांणी पुसिलें की, बाहिरमृद्धां कोठपावेतों जावें ? अथवा बाहिर कोठें ठिकाणीं ठेवावीं ? वरकड इसमालखान, राय रामनारायण वगैरे पुढें पाठविले ते पोचले असतील. भेटी कोणे दिवशी व्हावी याचा विचार मनास आणून उत्तर पाठवावें ह्मणून लिहिलें. त्यासि, नबाबांहीं बाहिरसुद्धां पुलापरियंत यावें. राजश्री जयाजी आपा, व चिरंजीव राजश्री खंडेराव, राजश्री गंगाधरपंत, फौजसुद्धां पुलापासून समीपच आहेत. पठाण तो रामगंगेच्या पार आहेत; त्यांचा कांहीं वसवास न धरावा. उत्तम प्रकारें थंडा केला आहे, त्याचा हिसाब नाहीं. पुलापुढें आपल्या फौजा आहेत. याउपर दिवसगत लागली तरी पठाण तेथूनहि निघोन जाईल. ऐसा त्याचा मतलब दिसतो. याकरितां नवाबास सांगून कूच करून बाहिरसुद्धां जलदीनें पुलापरियंत येत. येथें आलिया त्यांच्या आमच्या भेटीनंतर जो विचार कर्तव्य तो करून. रामगंगेस पायावा सापडला तरी उतरोन, अगर पूल बांधोन, रामगंगा उतरोन पठाणांस उत्तमप्रकारें नतिजा पाविला जाईल. याकामास दिसगत लावायासी कार्याचें नाहीं. नवाब जलदीनें आलें ह्मणून जो विचार करणें तो शीघ्र करून शत्रूस नतिजा होईल. येविसी आपांनीं व चिरंजीवांनी उत्तरें लिहिली असत. नवाबास शीघ्र घेऊन येणें. छ ७ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबसुद )

श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर, खंडोजीसुत
मल्हारजी होळकर.

[ ४८८ ]

श्री.

राजश्री दामोदर महादेव गोसांवी यांसी :-

छ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. ईश्वरनाथ शुक्ल हे बहुत थोर विद्वान आहेत. आह्मांस सर्व प्रकारें याचें आगत्य आहे. त्यासी, यांचे कार्यप्रयोजन साहित्याविसी उदेराज हरकारे, पातशाही, हे तुह्मांस सांगतील तर तुह्मी आपले तरफेनें हरएक प्रकारें साहित्यास अंतर न करणें. जरूर जाणून साहित्य करीत जाणें. छ १८ सवाल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

मोर्तबसुद.

श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडोजी
सुत मल्हारजी
होळकर.
पौ। छ १८ जिलकाद.

[ ४८७ ]

श्री

राजश्री दामोधर माहादेव गोसावी यांसिः--

स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि बाबू न्याहालचंद यांचा गुमास्ता जवाहिरमल्ल त्याजपासून खासगत ऐवज येणें. त्यास या धामधुमेमुळें शहरांतून ऐवज येऊं पावत नाही. याजकरितां हे पत्र तुह्मांस लिहिलें आहे. तरी जवाहिरमल्ल ऐवज रवाना करतील. त्यासमागमें तुह्मी आपली माणसे व स्वार विश्वासूक देऊन तुह्मी आपलें. नांवे करून ऐवज काढून आणून सुरक्षित आह्मांपासीं पोहचतें करणें. येथें. खर्चाची वोढ बहुत आहे. याजकीरतां निकटीनें लिहिलें असे. रा। छ॥ १२ सफर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

मोर्तबसुद.

पै॥ छ १२ सफर.

[ ४८६ ]

श्री.

पौ। छ २ शाबान

श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी. बापूजी महादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ १० माहे रमजान मुकाम इंद्रप्रस्थ जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. तुमचीं पत्रें जबाबी कासदासमागमें. जरवचे मुकामचें + ++ व कालाबागेचे छ २१ शाबानचें आले, तें छ ९ + + मजकुरी पावोन लिहिलें वर्तमान कळों आलें. लिहिलें की, सरदारास दक्षणचें काम भारी; फौज किमपि न पाठवावी. शंढाचे वचनीं गुंतलों तें सत्य केलें पा।. याजकरितां बहुतां प्रकारें समजाऊन अंताजी माणकेश्वर व भगवंत अनंत यांस तैनात करून घेऊन रोजमरा व समजाविशीच्या वराता आपल्यावरून घेतल्या. गाजुद्दीखानाचा ऐवज, व अंतरवेद, व जाटाकडील बाकी वसूल करून रोजमरा देत जाणें; हे सू (ज्ञ ) मनुष्य आहेत; यांजला बहुत सावधपणें वर्तवीत जाणें ; ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐसियासी, जाट व रजपुत यांणी एकी करून बख्तसिंगाचे कुमकेस फौज पाच सात हजार पाठविली आहे. रामसिंगाचे नेस्तनाबूद करून दक्षिणीयांही पुढें शोखीच्या गोष्टी सांगितल्या तर, सन्मुखही व्हावें ऐसें ज्यांचे मानस ते जाट कशी मामलत आपल्यासी करितील ? दो अड्चा हजार + + + अंताजीपंत आले ह्मणून केव्हां दबणार ? जसा जसा रंग पडेल तसे करावयाचे ते करूं. सांप्रत अमीरुल उमराव बहादुर यांणी इमादुनमुलूक बहादुरास लिहिलें जेः-- अंताजी माणकेश्वर मजला येऊन भेटले. त्यांणी येऊन सांगितलें जें, रामचंद्रपंत दामेदरपंतावर बापूजीपंतावर नाखूष आहेत. याकरितां सरदारांनी मजला रवाना केलें. त्यासी मजला जसे मल्हारराव आहेत, तैसें करावें. आमचे कामांत बापुजीपंतास दखल न द्यावा. त्यावरून म्यां त्यांजला कौलअहद दिधला. व पांचसे अशरफी मेहयानी व खिलाअत, व जवाहीर, व घोडा वगैरे दिधलें. त्यासी तुह्मीं जाऊन नवाब बहादुरास सांगावे जें, जसें मल्हाररायास जाणतां, ऐसेच अंताजीपंतास जाणावें. आणि तुह्मीं वालाशाही वगैरे वगैरे तमाम एकत्र करून दाहा कोसांवरी जाऊन, घेऊन येणें. आणि राजे फलाणीयांस दजाल न देणें. हें वर्तमान नवाबबहादुरांस अकबतमहमूद यांणी सांगतां त्याजवर कोप केला. आणि हें ह्मटले जें : ज्या + + नी तुह्मांस केलें, त्यांजला अंताजीपंताबरोबर केले. ज्या वकिलांनीं तुह्मांस असफजाहाचे पुत्र करून दाखविले, त्याजला दखल देऊ नका ह्मटलें, तेव्हां तुमच्यानें काम होणें कळतच आहे. बिलफैल, डासणा कुरजा वगैरे जे दामोधरपंतांनीं फर्द लिहून दिधली, त्या ऐवजांत देणें ह्मणून सांगितलें. आह्मीं नवाबास ह्मटलें जेः- नवाब अमीरुल उमराव आह्मांस श्रीमंतासारखे, सरदारासारखे. इमामुन्मुलुक आमचा साहेबजादा, आपला लडका. आह्मांतें ज्याप्रों। लिहिलें त्याप्रों। करावें; आणि काम पातशाही करावें. त्यासी, तुह्मी नवाबास सांगा जे, आह्मी गुन्हेगार आहों, तरी तुमचेच
आहों ! तुह्मांस कामें बहुत थोर करणें; थोरथोरांशीं स्नेह ह्मटल्यास वजीर नवाब बहादुर वगैरे खैरखाहा आहेत तें कळलेंच आहेत. मगर आह्मीं बरेवाईट सरदारांचे, पंतप्रधानाचे, अथवा त्या + ++ + खुष करून आमचें बरेंच पाहिलें. त्याची तदारुख हापावेतों या रीतीनें त्यास गोष्टी सांगणे त्या सांगाव्या. नीट वाटेनें चालतील तरी उत्तम. नाहींतरी आह्मांसी अपकार करितील. त्याचा तदारुख ईश्वर करील. सरदारांस ह्मणावें जे, त्या भंडारियासी समजाऊन सांगा. नाहीं तर, शिलेदारीच्या गोष्टीनें मलत्या कोठें तोंडांत खाईल. आमचें नांव बदनाम होईल. बल्की, रंगरायासारिखा आला तरी उतम आहे. नाहीं तर यांणीं लबाडी केलियावरी आह्मांस संकट इतकेंच जे, हे पादरक्षाप्रयोग खातील, हें सांगणे. निजामन्मुलुकासी आमचा उपाय चालत नाहीं. कां ह्मटल्यास ? आपण यासाठी ईश्वरापाशीं याचे दुशमनावर मारणप्रयोग केले, जाहीरचे प्रयोग ऐसे केले जे अद्याप हैदराबादेहून उकसूं सकत नाहीं. ऐसें असतां हे + + तील तरी याजला ईश्वर समजो. खाविंदा + + + दया सरदारांची, याकरितां मात्र, मुखत धरावी ; नाहींतर, पाव घटकेंत बेमनसबा करून दुनियांत नाराज राहे तें करणें कांहीं काम नाहीं. न करावें तर, जंजाल्याचीहि मसलहत सरदारांसच पुसावी. जर आह्मांसी नीट न राहिला तरी, सरदाराशीं नीट काय राहील ? असो ! आपला केलेला विचार आहे त्याजवर आपण कायम असावें. याजला खबरशर्त करीत जावी. नवाब बहादुरांनी पत्रें पाठविली तें पावतील. बहुत काय लिहिणें ! लोभ असो दीजे. हे आशीर्वाद. रा॥ त्रिंबकपंत यासी नमस्कार विनंति उपरि. चिरंजीव बंडोबाची चिंता न करणें. हे विनंति.

सो। गिरमाजी मकुंद कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. सनदाच्या नकला काजीच्या मोहरेसी पा। आहेत. पावतील. हे विनंति.