Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४२ ]
श्री.
पौ। छ २६ रा॥खर.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा व नाना याप्रति बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वक्षेम लिहिणें. विशेष. मोतीलाल साहुकार याचें द्रव्य सुरजमलजीकडे, येविशी तीर्थरूप बावांनीं तुह्मांस रोबरो सांगितलेंच आहे. ऐसें असतां सांप्रत सर्व त्रिकुट एकत्र जालें आहे. ऐसा योग पुनरोक्त घडणें कळतच आहे. या समयांत याचें द्रव्य प्राप्त होय ऐसा विचार करावा. पुढें सुरजमलजी देतील हें कळतच आहे ! याजकरितां मशारनिले तुह्मांपासी पाठविले आहेत. उभयतां सुभेदाराचे रोबरो याविसीं ताकीद करून यास रुपये प्राप्त होय, तें करावें. येविसी विशेष ल्याहावेंसें काय आहे ? याचें काम होवून तीर्थरूपांजवळीं सुरुखुरु होय तें लिहिणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४१ ]
श्री. पौ छ १८ माहे जा।खर.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ १५ माहे जमादिलावर मुकाम इंद्रप्रस्थ जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. राजश्री अंताजीपंती अकबर महमूद यासी व पातशाहासी कलह लाऊन गेले. सांप्रत्य जुमामहजदीजवळ लडाई वख्तारखानासी व अकबत महमूदखानासी लढाई मोठी जाली. वख्तावरखानाचा मोर्चा जुमामहजदीजवळ बसला आहे. बादकची याचा मोर्चा खाले बसला आहे. प्रागदास याच्या कचेरीस अगबद महमदास लाख रुपये शिक्का पाडून कड लाविली. तोफ सुटलियावरून अकबत महमद सरकला. महाटेहि सरकले. अंताजीपंतांनी मराठ्यांसही जिवाळा धरावा कीं + ++ धरले. अतःपर श्रीवाराणशीस धरलें. अंताजीपंतापासून प्रांत उचलावा. बक्षीस विदित जेः अकबत महमदापासून प्रांत उचलावा. शुके खास लाविले. अलमचा आला तो पाठविला असे, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४० ]
श्री.
याचें उत्तर गावावर हल्ला चढोन लोक गावांत उतरले. तेव्हां त्याजकडील लोक उपलाणी घोड्यावर बसोन, हत्यार- धरून, गल्या रोखोन, उभे राहिले. व देवूळवाड्यांतील लोक गोळ्या मारूं लागले. ते समयीं आह्मांकडील लोकांनी गोळ्यांनीं सडकलें. तेव्हां देवडी सोडून देऊन, वाड्यांत जाऊन, गोळ्या मारूं लागले. तेथें आह्मांकडील लोक जखमी व ठार जाहले. उपरांत, रोहिले वगैरे लोकांनी निकड करून वाड्यांत शिरले. तेथें तरवार चालोन दोहकडील माणसे ठार न जखमी जाली. त्याच घालमेलींत मशारनिला * देवळांत मारला गेला. बाहेर आणून अथवा वळखून मारिला, ऐसें जालें नाहीं. हत्यार सोडून देवळांत लपाला किंवा लढत होता ही माहीतगारी आपणांस नाहीं, व कोणी मारला हें ठिकाण आजपर्यंत लागलें नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५३८ ]
श्री.
छ २३ रबिलाखर.
मौजे गुरवली पा। तालगांव तेथ फौज आहे. त्यास, आपले देसवारीचे गाव कोसांवर आहेत तेथील रबी पाचा साता गावींची तर एकंदर कापून नेली. वरकड गावींची सतेंपोतें रोज नेत आहेत. या फौजेनें पांचा सात हजारांची खराबी केली. तुह्मी हजुरचीं पत्रें पाठविली ते त्यांस दिधली; परंतु, तेथ त्यांचे लोक मानीत नाहींत. रोज रबी चारतात. कितीक रोज मुक्काम होईल न कळे. दुसरेः–वजीराच्या नावा येऊन बाईपूर पा। कनोज तेथ येऊन राहिल्या आहेत. पूल बांधू ऐसें ह्मणत आहेत. याजकरितां तमाम परगना बेदील झाला आहे. रबी रानांमध्ये आहे. जर लष्कर वजिराचें इकडे उतरलें तर पैसा बुडाला. यांजकरितां, सेवेसी विनंति लिहिली जाती की, वजीरास सांगून, नावा बाईपुरीहून पुढे जाय ऐसें केलें पाहिजे, ह्मणजे उत्तम आहे. तर, आपण खामखाय वजीराचें पत्र नावडियासी पाठविलें पाहिजे. रा॥ शिवरामपंत लग्नास येथ आले आहेत. त्यांजला आपण सांगितले की, स्वार माहदूबापासी आहेत, ते आह्माजवळ ठीवनं. त्यांनी सांगितले की, स्वार सात आठ आहेत; त्यास, आपणांपासीही पाहिजेत. कासीपंत वगैरे तिघे त्यांनी ठीऊन घेतले. सा स्वार आमच्या येथ ठीवीले आहेत. येथही स्वारांवेगळी तहसील तलब होत नाही. आपण लिहिलें की मामाकडे पाठवनें. त्यास, पांचा साता येत खात आहे. बद्दल, अगोधर याच(ची) काय तजवीज करणें ते केली पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५३७ ]
श्री.
मोर्तब
मुद.
श्रीमंत राजश्री राजेराव दादासाहेब व ता। राजश्री तात्यासाहेब स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक बाबूराव गोपाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. महाराज कृपाळू होऊन प्रांत अंतरवेदींत जितके माहाल सरकारचे तालुक्याचे मोगलाईंतून आहेत त्या महालांची जिल्हेदारी व फौजदारी सेवकास सांगितली. ते आपण आपले रजावंदीनें कबूल करून सेवेसी विनंती पत्र लिहून दिल्हें ऐसे जेः- माहालचे बंदोबस्तास दोन हजार स्वार व दोन हजार बरकंदान ठेवून करारवाके जफरफ्त करूं. प्रा। फत्तेनगर व सियानेपुट व जलालाबाद व मेरेट व सिरधना वगैरे महालांत जैता वगैरे गुजराचा तसरुख आहे तो सोडवून, आपली ठाणी बसवून, आपली मुलुख करून, माली मामलतीचाआकार होईल तो व वनजारा, राहादारी, जैता खातो, तो व जाहागिरी रेजाबस्तनापूर वगैरे फौजदारी याकुल सोडऊन पैसा सिबंदीचे खर्चास देऊं. सिबंदी सरकारांत एकदाम महाल सेवकाचे सुपुर्द आहेत त्या माहालांत सिबंदी त्यासिवाय मागणार नाहीं. रात्रंदिवस सारे माहालांत गस्त करून गुजर अगर मवास इतराचा उपद्रव लागेल; त्यास सजा देऊन. निरोपद्रव माहाल आहेत, चोरी डाका मुसाफरास उपद्रव होईल, त्याची तदबीर करून, मालिक रजाचंद राखून, हरामजादियासी तंबी करूं. माहालकरीयांसी एक दाम मागणार नाहीं. फौजेचें पोट परभारें भरून सरकारचा दिवाण बकसी पौतदार राहील, त्यासी माली मामलतीचा इतला करार वाकै देऊं. माहालची तसदीस माहाराज चुकवितील तो पैसा कमाविसदारास ताकीद करून हजूर पावता होय तें करूं. माहालोमाहाली पायमाली अगर नुकसान न करूं. घास दाना न मागूं. फौजदारी माहाराज नेमून देतील ते घेऊं. कोणाची नालीस हजूर येऊं देणार नाही. सरकारचा नक्ष उत्तम प्रकारां राखूं. सेवेसी श्रुत होय कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३०४
श्री
यादी विजापुरी बादशाही जाहली शके १३२२ विक्रमनाम संवत्सरे सु॥ इहिदे समान मया सालात जाली त्याचा तपसील
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५३६ ]
श्रीवरदमूर्तिर्जयति.
याद कलमें :- राजश्री चिंतामण दिक्षीत यास बापूजी माहादेव, व पुरुषोत्तम माहादेव, व देवराव माहादेव, सरकारांत ऐवज द्यावा. त्यांपैकी पांचालक्षास आह्मांस हमी सरकारांत दिल्हे आहे. त्यास दिक्षिताकडील कलमें :-
खतें करून घ्यावी. सदरहू ऐवजास गाहाण नासिक
------ रुपये। ची घरें व मौजे चांदोरी दरो-
५००००० बस्त गांव आह्मांजवळ गहाण
किता सरकारांत श्रीमंत राजश्री ठेविला असे. कराराप्रा। आमचा
रघुनाथरावदादासाहेब यांस ऐवज ऐवज मुदतीस द्यावा न दिला
द्यावा लागतो. याचें खत सरका- तरी घरें व गांव आह्मी आपले
रांतून मुदत होईल त्याचे अगो- जिमेस करून घेऊं. कलम
घर एक महिना पैका द्यावा. १
न दिल्हा तरी, व्याज दुवोत्रा करार.
प्रों। द्यावे. सदरहू ऐवजास मनौति, यासिवाय सोनें, रुपें, जवा-
दरसदे रुपये अडीच प्रा। द्यावी. हिर मिळोन दोन लक्षांचा ऐवज
गाहाण झासी व येथें द्यावा.
१६४ १०३ कलम. १
दुसरें खत पुरुषोत्तम माहादेव करार.
व देवराव महादेव यांजकडे जफतीच्या सोडचिठ्या सदरहू
धोंडाजीनाईक नवाळे यांचे कर्ज गहाण दोलक्षाचे आमचे खताम
रुपये एक लक्ष चवसष्ट हजार आलिया तुमचे हवाली करूं.
एकसे तीन रुपये. याचें खत कलम. १
आमचे नावें करून द्यावें. सर- करार.
कारच्या हवाली या घ॥ रुपयाचा वाइदियाप्रा। ऐवज आह्मांस
झाडा जालियावर या रुपयाचा न पावलिया सरकारांत अर्ज
झाडा करावा. व्याजसुधां ऐवज करून दुसरा वकील पाठऊं.
घ्यावा. मागें जालें व्याज खतांत कलम. १
लेहून घ्यावें. पुढें व्याज दरसदे करार.
रु॥ एक प्रों। करार लेहून द्यावे. आह्मास पुर्वेल तेथें ऐवज दिल्लीस
ॅ ------------ अगर देशीं औरंगाबादेस
६६४१०३ द्यावा. कलम. १
सदरहू सा लक्ष चवसष्ट हजार करार.
एकसे तीन रुपये यांचीं खतें दोन या कामास माणें व कारकून
करून घ्यावीं. -------------कलम. १ तुह्मांजवळ राहतील. निर्गम होये
करार. तोंपरयंत खर्चास द्यावें. कलम १.
करार.
सदरहू कलमें सात बापूजी महादेव, दामोधर माहादेव, व पुरुषोत्तम माहादेव, व देवराव माहादेव, सदरहूप्रमाणें मान्य असेत. याप्रा। निभाऊन देऊं. छ रा॥खर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५३५ ]
श्री.
पौ छ ३० रबिलाखर.
श्रीमंत राजश्री दामोधरपंतदादा व राजश्री पुरुशोत्तमपंतनाना - स्वामीचे सेवेसी:---
सेवक धोंडो दत्तात्रेय कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ २९ माहे रबिलाखर मु॥ शिंगी रामपूर सुस्वरूप जाणून स्वानंद लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आपण बहुतां दिवसीं पत्र पाठविलें तें उत्तम समईं प्रविष्ट होऊन परम संतोष जाहले. ऐसेंच निरंतर पत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. यानंतर आपण स्वारांविसीं लिहिलें. त्यास, राजश्री गोविंद बल्लाळ यमुनापारीहून अंतरवेदींत येणार. यास्तव त्यांकडे आमचे स्वार पांचसातें गेले आहेत. त्यास मशारनिल्हेचे यांचे आगमन कितीकां दिवसां होईल तें पाहावें. नाहीतरी स्वार पाठविले असते. जें आपलें कार्य तें आमचेंच आहे. आह्मी आपले आज्ञवितरित नाहीं. विशेष काय लिहावें ? राजश्री गोविंदपंत आल्यानंतर स्वार पाठवून देऊं. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५३४ ]
श्री.
पौ छ २३ रबिलाखर.
श्रीमंत महाराज राजश्री दादावता। राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः--
सो। नरहर शामराज सा। नमस्कार विनंति उपार येथील क्षेम ता। छ २० माहे रविलावर पावेतों स्वामींच्या कृपेकरून प्रा। कनोनांत सुखरुप असो. विशेष. तुह्मीं पत्न. पाठविलें तें छ १८ रोजी पाऊन परम समाधान जालें. लिहिलें की पार ठाणें बसविलें. त्यास कदीमी कनोजचे गांव असतील तर उत्तम, नाही तर नाहक, खटखट आहे. ऐशियांस, आपण कानगोहे, याजपासी तहकीक केलें आहे की, गांव कनोजचे आहेत; पेशजी अमल केला आहे; दरमीयान दहापांच वरश जाला नाही. आपले वाजवी गांव आहेत हें जाणोन ठाणें वसविलें आहे. पूर्वीही आपली आज्ञा होती. याजकरितां केलें आहे. तेथील जमीदार दोघेजण आपणापासीं येऊन ठाणें घेऊन गेले आहेत. कानगाहे यांनी हकीकत लिहिली आहे त्याजवरून विदित होईल. उपर रा। गोविंदपंत याची फौज तीरावावलोहे मढईवर एक माहना होती. तेथें राहून बाहद बारा गांवींची रबी कापून नेली. आतां ( पुढें गहाळ ).
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५३३ ]
श्री.
छ ३० रबिलाखर.
महाराजांचे सेवेसी नरहर शामराज साष्टांग नमस्कार विनंति उपरि. तरकारी वांगी शेर ॥- व भाजी पंधरा शेर, व गुलाबांची फुलें १००० हजार एक, ऐशी सेवेसी पाठविलीं असेत. दुसरें ; सरंजामाची याद पाठविली त्यांत लि॥ की, दोन जीन तयार करून पाठविणें. त्यासी, जीन कैसें करावे ? दक्षिणी करावें किंवा टांकण घोड्यास मोगली करावे ? हे तपशील लिहला पाहिजे. वरकड सरंजाम तयार होत आहे. दुसरें आपले येणें इकडे कधीं होणार ? तें लिहिलें पाहिजे. नावा तयार राजघाटीं आणून ठेवल्या आहेत. आह्मी भेटास यावें हा हेत आहे तर आज्ञापत्री लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? दुमच्या व गाशे वगैरे टांकट घोड्यास पाहिजे. त्याचा तपसील लहान मोठे कसें करावें तें लि॥ पाहिजे.A