Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८७ ]
श्री.
शक १६४२ भाद्रपद वद्य ६
राजश्री राव नंदलाल मंडलोई पा। इंदूर् गोसावी यासि.
छ अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्नो। मलारराउ होळकर व दसोजी वाघ दंडवत. सु॥ इहिदे अशरीन मया व अलफ. आह्माकारणे डेरा तयार करून पाठवून देणे. नारोपंत सांगतील त्याप्रमाणें सिवून पाठवून देणें. हयगयी न करणे. जाणिजे. छ १९ जिल्काद. हे विनंति.
मोर्तबसुद
श्री मार्तंड-
चरणीं तत्पर
बारगळ निरंतर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८६ ]
श्री.
दंडवत विनंति उपरि. तुह्मी पत्र पाठविलें, लिहिलें कीं, तळावर प्रहरभर मुकाम करणें, ह्मणौन लिहिलें. त्यावरून, प्रहर सा घटका सडे तळावर राहातों तों तुह्मी ताबडतोब येणें. छ १८ जिल्हेज. हे विनंति.
मंडलोईकारणें तळावरि राहणें ह्मणोन लिहिलें होतें. यास्तव पाहारभर राहिलों आहों. तरी तुह्मी लवकर येणें. पुढें सांगोन आह्मास निरोप पाठवणें. हे विनंति. लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८५ ]
श्री. शक १६४२ वैशाख शु॥ १३
राजश्री राऊ नंदालाल मंडलोई पा। इंदूर गोसावी यांसि.
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहाकित मल्हारराऊ होळकर रामराम येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे. परगणे बडवाई येथील राजियाचा आणि आमचा बदसलूख जाला. तो कुल प्रसंग तुह्मास ठावका आहे. त्याचें पारपत्य जें कर्तव्य तें उत्तम प्रकारें करून. परंतु तुह्मीहि मातबर आणि त्यासंनिध आहात. एक वेळ त्यास बरवे प्रकारे माकुल करून कांहीं विचारास येत असतील तर पाहाणे. नाहींतर आपण तों पारपत्यास चुकत नाही. इतकियाउपरि त्यांणीं आपला परिणाम उत्तम लागेल तो अर्थ अर्थिल्यांत उत्तम. बहुत काय लिहिणे ? छ ११ माहे रजब.
ॅ मोर्तबसुद
श्रीमार्तंडचरणी
तत्पर । बारगळ
रघोजी नीरंतर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८४ ]
हु.
शके १६४० आषाढ
शाहा आलम
बादशाः गाजी फीदवी
जमाबेगखां ११२२
मुत्सदीयानमुहीमातेहाल व इस्तिकबाल परगणा कंपेल सरकार उज्जेन मुजाफ व सुबा मालवा बीदानंद दरी वीला बजहुर पेवस्तमे नंदलाल चोघंरी परगणे मजकुर दौलतख्वाहा व मालगुजार व सरबराहाकार सरकारस्त लीहाजा मौजे सीवनी वगैरह. अमला परगणे मरकुम बशर्ते दौलतखाही व मालगुजारी दरवजेह ईनआम चौधरी मजबुर मैयफरजंदान अज इयतिदाय फसली खरीफ सन १११९ फ़सली हस्बु जीमन मुकरर नमुदाशुद वायदकी देहमजकुरा बमोमी इलेह वा गुजारंनदके हासीलामे आंरा फसल बफसल व सालबसाल सरफे मयाहुताजे खुद नमुदा दरदैलतखाही सरकार मुकइयद व सरगर्म बाशद दरी बाब ताकीद तमाम दानीस्ता रुस्तुह मस्तुर अमल नुमायन्द बतारीख गुर्रा शाबान सन ५ जुलुसवाला कलमी शुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८३ ]
श्रीरामजी
श्रावण वद्य १२ शके १६१६
(त्रिशूळ आहे.)
सिधिश्री महाराजाधिराज महाराजा श्रीसवाई जैस्यंघजी देव वचनात. नंदलाल दिसेसु प्रसाद वंच्या. अप्रंच, पंडितराम नैदिषण भेज्यौ छै. सो जाता आवता लारे वदरमो देयानै आपणी हद ताँई पौहचाय दीज्यौ. मिती भादवा वदी १२, सवंत १७५०. नकल लिषी वतसाल नरायणदास दिवाण.
मुसलमानी
शिका आहे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८२ ]
श्री. शके १६४८ ज्येष्ठ बहुल ८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५३ पराभव संवत्सरे ज्येष्ठ बहुल अष्टमी मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहूछत्रपति स्वामी यांणी राजश्री सिदोजी पोळ यासि आज्ञा केली ऐसी जेः- वेदमूर्ति त्रिंबकाचार्य पंढरपुरकर गलगलेयास गेले होते. तिकडून पंढरपुरास येतां मार्गी बसापा गौडा मौजे मळाबाद याणें लुटिलें, वस्तभाव घेतली, ब्राह्मण यास श्रमी केलें. तरी तुह्मी त्यास वरजोर ताकीद करून वेदमूर्तिपासीं वस्तभावेची यादी आहे त्याप्रमाणें जराबजरा यांचे पदरी घालवणें. एविसी गै न करणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें.
मर्या
देयं रा
जते
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८१ ]
श्री.
पु॥ राजश्री बापूजी माहादेव व दामोधर माहादेव गोसावी यांसीः--
विनंति उपरि. राजेईश्वरसिंग बाहेर निघोन दोन कोस मुक्काम जाला. राजश्री गंगाधरपंत फौजेसहित भोवताले होतेच. आह्मीही मौजे बगरापासून तीन कोस लष्करचा मुकाम करवून सेनासहवर्तमान दुसरे दिवसी तयार होऊन गेलों. त्यास कछवियाचेंही कूच जालें. रवदडोन अदकोस चमळा. तेथें त्यांचा आमचा मुकाबला जाला. सरळ पडून चालत होता तो अराब भोवताले देऊन उभा राहिला, चालावयास हिमत नसून. ते समई उजवे बाजूस आपली फौज उठोन सेखावत नरोके होते तेथें घाव उत्तम जाला. सिवसिंगेसे खावत याजला जखमा लागल्या. नवलसिंग याचा घोडा पडला. पाय उतारे निघाला. आपले लोक राजियाच्या हातीपावेतों मारीत गेले. रजपूत पळों लागले. ऐसें च्यार पांच घटिका युध बहुत उत्तम होऊन रजपूत सिकंदे करून थंडे केले. त्याजकडील सेदडिसे ठार चांगले चांगले लोक जाले. च्यार पाचसे जखमी जाले. खत पडले. तेथून संध्याकाळपावेतों मुडदे नेऊ दिल्हे नाहींत. संध्याकाळी सांगून पाठवून मुडदे त्याजकडून नेविले. रजपूत जुंज पाहून बेहिमत जाले. त्याच्या लष्करांत रुपयाचे सरे पीठ. वैरण फाटेतो बहुत दुरभिक्ष. ऐसा चहूकडून आपल्या फौजा त्याजला जकड़ून उभे केले. रोज त्याचें कूच होऊन अदकोस अगाडीची पछाडी होणें संकट त्याजला जालें. सावे सातवे रोजी मौजे बगरास येऊन गावाच्या आसरियानें राजियाचा मुकाम जाला. भोंवताले आपली चौफेरें फौज रात्रंदिवस राहून रसद वैरण फाटे याजविण बहुत त्यांजला संकट जालें. परजन्य, चिखोल, भक्षावयास नाहीं. नित्य त्याची घोडी, उंटें, माणसें बहुत मरो लागली. फिरून युध करावें तरी आपणास दउडवितात, याजपुढें निभाव होत नाही, ऐसी सिकस्त खाऊन रा॥ रायकेशोराम सलुखाबदल आह्माकडे पाठविले. बहुत रदबदल करून ठराव केला. बुंदीचें राज्य सोडून उमेदसिंगास घ्यावें. एकूण बुंदी सोडून खालीं करोन घ्यावी. रा॥ माधोसिंग याचे च्यारी परगणे निखालस करोन ठाणीं खाली करून घ्यावी. ऐसा करार राजेईश्वरसिंग यांनी कबूल केला. काबूंत बहुत आले होते. जें करतो ते होते. परंतु राज्य राखावें ऐसे जाणून दोन्ही कामें कबूल करवून आजी श्रावण वद्य द्वादसीस त्याच्या आमच्या भेटी जाल्या. याउपरि कराराप्रमाणें कार्य निर्गम करून कूच दो चौ रोजांनीं होईल. येथील
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३०८
श्री
यादि बापूजी रामचंद्र कुळकर्णी देहाय ता। भोर तपे रोहिडखोरे सु॥ सलास सलासीन मया तैन व अलफ शके १७५४ नंदननाम संवत्सरे फाल्गुन वद्य ६
१ आमचे तीर्थरूप रामाजी कृष्ण व चुलते चिटको यशंवत हे पेशवे याजबरोबर पाणपतास गेले तेथे तीर्थरूप गर्दीत गेले व चुलते तिकडेच होते मागे आह्मी लाहान आपले अजीचे मोर मौजे मुगाव ता। मोसेखोरे तेथे होतो गावी आमचा जानु सुर्वा व खंडु सिद गुरेसुधा होता इनामाची व दुमाल्याची चाकरीसुधा वहिवाट करीत होता त्याजला गावकरी यानी दाबून इनामाचे व दुमाल्याचे बाद पडावले राहू दिल्हे नाहीत पुढे काही वर्षानी हिंदुस्तानातून चुलते परत घरी आले वगैर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५८० ]
श्री.
पु॥ राजश्री दादा स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि. राजश्री बहिरजी बावा वगैरेस खिलत वस्त्रें देऊन शिष्टाचार केलियावर कितेक भाषणें स्नेहाचे दृढतेचीं समयोचित केली व सर्वीस रुकसत केलें. तेथून बाहिर आल्यावर अनुपगीराने वजिरास सांगितले की, एकले बाळाजी गोविंद अर्ज करू इच्छितात. तेव्हां त्यासच बोलावून घेतले. ते आमच्या मार्गे च्यार घटका होते. त्याचा तपसील पंत मा।रानें लिहिलाच असेल. ये गोष्टीनें नवाबास व जनांतइतकेंच भासलें की सरदारांतच चित्तशुध्धता नाहीं, एकोपा येथेंच दिसतो, हे हिंदुस्थानी आहेत, विपर्यास इच्छितात. सेवकास तर कांहीं दुसरा विचार नाहीं, मुख्य धन्याचे कामावर चित्त आहे. आह्मीं आपल्याकडून दुसरा प्रकार न केला व न करूं. जर ते आह्मास सलाहमध्यें ठेवितील तर दरबारास जातेसमयीं बोलावितील तर जाऊं. आह्मी जावें व त्यांनी तेथच्याच प्रकारें जाणविल्यास योग्य नाहीं. आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. हा मजकूर न लिहावा. परंतु रांगड्याचे चित्तांत दुसरा भाव होतो यास्तव सूचनार्थ लिहिलें असे. मुख्य हेंच की रोहिलियाचें परिपत्य करावें. एका सरदारांनी इकडून श्रीगंगा उतरून यावें व दोघा सरदारांनी तिकडून श्रीगंगा उतरून शत्रुचें पारपत्य करावें. वजिराचे बोलण्यांत हे भासलें कीं, पहिलें तर कोणास उपद्रव न करावा, केल्यास क्रोड रुपयेही मिळाले तर न घ्यावे, व त्यांस खारीजच करावे, कामास प्रवर्तल्यावर क... टाकून गेल्यास जिवासी गांठ पडेल. याप्रों। वजीरांनी भाषणे केली. पुढें होईल तें लिहूं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५७९ ]
श्री.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत स्वामीचे सेवेसीः--
पोष्य गोविंद बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल, ता। श्रावण सुध ११ मु॥ नदी वेत्रवती जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. यानंतर आपण कृपा करून पत्र पाठवलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. त्यास, श्रीमंत स्वामींनी तुह्मांस लिहिलें की, वसूल गोविंदपंतांनीं तुह्मांकडे काय दिल्हा तो लेहून पाठवणें. तर आह्मी जो ऐवज दिल्हा तो तुह्माकडेच भरणा केला. परभारें आह्मी वजिराकडे केला नाही. श्रीमंत राजश्री दादा स्वामीकडे व तुह्माकडे केला. त्याचा तपसीलवार हिसेब उतरून पाठविला आहे. व प्रगणे भुगाव येथील भरणा लाख रुपये तुह्माकडे केला. त्याचाही तपसील पाठविला आहे. हिसोबावरून सर्व ध्यानात येईल. वरकड आपण लिहितात कीं, वजीर रु॥ मागतो. तर श्रीमंत स्वामीनीं जागा आपले सरकारी ठेविली तर आह्मी काय करावें ? श्रीमंत राजश्री दादासाहेब व वजीर व तुह्मी एकत्र दिल्लीस वरसेभर होता. श्रीमंत राजश्री दादा स्वामीस विनंति करून बाकी अगर जागा सोडविली असती तर न होतें ? आह्मांस आपण लिहितात तर हे दरबदली श्रीमंत राजश्री दादा स्वामीजवळच करावी. त्यांचेप्रमाणे सर्व होईल. आह्मी आपले असो. सर्वदा पत्रीं सांभाळ करीत जावा. हिसोब पाठविला आहे याप्रमाणें रुजू पाहावा आणि उत्तर पाठवावें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री त्रिंबकपंत स्वामीस सां। नमस्कार. लि॥ परिसीजे. हिसोब पाठविला आहे. सर्व तुह्मी माहित आहा. रुजु पाहावें. उत्तर सविस्तर लिहिणें. बहुत काय लिहिणें लोभ असों दीजे हे विनंति.