Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५०१ ]
असिलें तरी लिहून पाठवा. नाहीं तरी तैसेंच लिहां. मुख्य गोष्ट बक्षी दारमाहेब महल अलकुज काजीस पाठवाल तरी, दुमरेच दिवशीं. तुह्मांस व बक्षीस तगीर करतील. जर पक्षवाडा सर्वांसवें लावायाचा द्याल, आणि अलकुज काजीकडून लिहवीत जाल, तरी पका सलुख, होतो. व अलकुज काजीस इश्वाचे + + + आणून जितके मर्तब अंबावेचे आहेत ते करावें. गहना त्यांचा त्यांचे हवाला करावा. चबुत्रे करावयास लावा. दोन लागतील. निवडीचे सवंग घेतलें तरी पाटाऊच फाडावा लागते. त्यासी, उत्तम असेल तेंच करा. बहुत काय लि॥ ? हे आशीर्वाद.
रा॥ त्र्यंबकपंतास नमस्कार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५५० ]
श्रीवरद.
श्रीमंत राजश्री महाराजे बापूसो। व ता। रा॥ राजेराव दादासाहेब स्वामीचे सेवेसी:--
विनंति सेवक. बाबूराव गोपाळ कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना येथील कुशल माहाराजांचे कृपावलोकनेंकरून ता। छ ३ रजब सोम्यवासर पावेतों किले फतेनगर येथें यथास्थित असे. विशेष. कृपाळू होऊन स्वहस्ताक्षरीं आज्ञापत्री गौरविलें; तेणेंकरून परमाल्हाद होउन चित्तास लक्षगुणी दृढता जाली. महाराजांचे प्रताप शादलखानाची कथा काय ? अंतरवेदींतून मारून बाहेर काढून देतों. इसलियाखानांस अविलंबे रवाना करावें. दिवस हंगामाचे. जातात. त्याजपाशींहि जमाव भारी आहे. आणखीहि ठेवीत होता. सांप्रत शादलखान दीड हजार स्वारप्यादे जमावानिसी शिकंदरियांत दाखच जाला. दुंदेखान व जमालखान वगैरे सिदोनियांत आहेत. विनाझुंज ठाणीं सिदानें जखेडें वगैरे सोडून कवाविसदार निघोन गेले. एक दिवस दम धरून राहाते तर सेवकहि जाऊन पोहोचला असता. अतःपरहि मारून काढणें बादडामध्यें माझेंच ठाणें मजबुत. एक हजार प्यादा व च्यारसे स्वार कंपकसरे आहेत; हरकारे लावून ठेविले आहेत. शिकंदरियाहून शादल निघाला ह्मणजे मार्गीच गाठून हरवजेनें शिक्षा करितों. जिजाला व बाण अविलंबे पावत तें करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४९ ]
तनखा होता त्यांचा अंमल मुरळीत चालोन पैका वसूल व्हावा याकरितां केशोरामाबराबरी येथून राऊत दिल्हे. येरव्ही पेरो जाब देत धामधूम करावी, या विचारें राऊत दिल्हे, व केशोराव आमचा आहे असा अर्थ नाही. प्रस्तुत तेथून राऊत आणविले असेत. केशोरामास बरतरफ करून दुसरा अमील पाठवयाची नवाबाची मर्जी असिल्यास बेहत्तर असे. येविसी आमचा आग्रह नाहीं तुह्मी जाबसाल केलाच आहे. पुढेंही प्रसंगोचित् या अन्वये + + + + करणें. परगणे कोळ अंबोळी याचा मजकुर तरी :-- परगणे मजकुर खालशाची जागा तेथें उपसर्ग करावा, फतेअल्लीस बाहेर काढून घ्यावेसें काय होते ? यथार्थच आहे त्याप्रमाणें आह्माकडे कोळेविशी कांहीं अंतर आहे ऐसें नाहीं. बाहादरसिंग घसेडेवाले यास हरदू परगणियाची सनद व खलत नवाबबहादर याजकडून आली, त्याचा अमल बसवावा यास्तव येथून फौज कांहीं देऊन, मशारनिलेचा अंमल चालता केला. त्यांत कांहीं आह्मी लाभलोभ धरून स्वकार्य साधिलें, असा अर्थ नाहीं. प्रस्तुत इकडील फौज बलाविली आहे, लौकरच यईल. नवाबकुदसियाचे जागिरीचा मजकूर पूर्वी तुह्मी लिहिल्यावरून, पेशजीच कृष्णाजीपंत निसबत् राजश्री नरनिंगराव यांस सांगणें तें सांगितलेंच आहे. रा। छ १५ जिल्काद, हे विनंति.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४८ ]
श्री.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ २९ मु॥ इंद्रप्रस्थ जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान विदित जालें. ईश्वरें पुनर्जन्म केला. याचा शुक्र कोठपर्यंत करावा ? औषध उपायास तेथें च्यार दिवस चलवावें. सत्वरसत्वर येथेंच यावें. ते जागा उत्तम नाहीं. ज्यांणी तिसा वर्षाचे वयांत ज्यानचा कैफ टाकिला, तेथें सहसा न रहातां येथेंच येणें. न याल तरी मजला मारून टाकाल याची शफत असे. मातुश्रीसहि बोलाविलें असे. सत्वरीच येतील. लौकर लौकर येऊन श्रीकृपेनें आरोग्यता करणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
वेदमूर्ती रा॥ रा॥ नानाभटजी व रा॥ जनार्दन बाबादेव यासी नमस्कार विनंति उपरि. अभ्रकाचे म्यान्यांत स्वार करून चिरंजीवास रात्रीस कूच करून लौकर येथें येत तें करणें. हे विनंति.
चिरंजीव सौ। रेणुका व सौ। तुळजास आशीर्वाद उपरि. चिरंजीवास घेऊन सत्वर येणें हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४७ ]
श्री.
श्रियासह चिरंजीव रा॥ राजेराव दामोदर माहादेव यासी प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. या दिवसांत हसंनाचा करोड तगीर होते. त्यासी, येविसी वजिरास अर्जी व जलालुद्दीखानास व मल्हप अशक यांजला रुके लिहिले आहेत. त्यासी, त्यांची मरजी अशी आहे. येथें निशा पक्का करून तुह्मांस लिहून पाठवूं. त्यासी, हें काम वजीर जर पाहाडखाच्या हातानें करतात असें असलें, तरी पक्कें करून, पक्कें केलियावरी नाव घ्यावें. पहिलें नाव न घ्यावें. जे हसंन देत असिले त्याहून अधिक इजाफा ठरेल तो कबूल करावा. जर वजीर कबूल करितील तर दुनिया आपल्यास दुआ देईल. बहुत काय लिहिणें ! हे आशीर्वाद.
रा। त्र्यंबकपंत यास नमस्कार विनंति उपरि हें काम जरूर करणें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४६ ]
श्री.
खान वजिराकडील तेथें आहेत . त्यास प्रसंगोचित पुसावें ह्मणिजे, खरें असेल तें ते श्रुत करितील. हें पत्र कोणासहि न दाखवावें. उत्तर सत्वर पाठवावें. मार्ग लक्षितों. सदैव कृपा केली पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४५ ]
श्री.
आशीर्वाद उपरि. तुह्मी लिहिलें जे, ज्यानअन्वरखानाचे रुपयाची वाट काय ? व त्याजवर ज्याजती होय तें करणें. त्यासी, सुरतसिंगास वाट करणें असतें तर, आह्मी काशास माणसें पाठवितों ? ऐसें असतां दिलवाडसिंग त्याचाच पक्ष करूं ह्मणत असतील तरी, पांच साता हजाराचा मुकदमा अगरवालास दिलवाडसिंगास देणें अशक्य आहे ऐसें नाही. त्यांणी द्यावे अथवा त्यांचे शिफारशीवांचून हात उचलावा. तुह्मी विना वाटेवांचून गोष्ट सहसा ऐकूं नका. ह्मणिजे झक् मारून बाट करील. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४५ ]
श्री.
पौ। छ ८ सफर.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा व नाना यांसीः--
बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. तुह्मां उभयतांची पत्रें, जबाबी कासीदासमागमें, व अजुरदाराबरोबर, पैदरपै आलीं तें पावून वाचोन, चित्त हर्षयुक्त होवून, लिहिलें वर्तमान कळो आलें. हजुररांत वजीर अजमाही लिहिलें जे, हा मुलुख तमाम पातशाही सोडविला आहे; याकडे थोडेसे हजरत जिलसुभाजी गुंतवनें होतील. तर, या मुलुकांत तमाम पातशाही अमल होईल. मल्हारराव तर सर्व प्रकारें पातशाही बंदा जाहाला आहे. जयाजी तर मुतलखनामुराद आहे. त्यास, पठाणास तर खारीज केलें आहे. अतः पर मुलुक हात करावा इत्का मात्र बाकी आहे. हाहि मुलुक हातास येऊन अबदालियाचे पारपत्यास त्यांस पुढें करून आह्मीं चालूं, ह्मणजे, हजरतनी शहरदाखल व्हावें. त्यावरून यांणीं उत्तर लिहिलें जे, पठाणरोहिले अद्यापि नेस्तनाबूत जाले नाहीत, त्यांस नेस्तनाबूत करावें ; आपल्या सुब्याचा बंदोबस्त उत्तमप्रकारें करावा; अबदालियाकडे आह्मीं सांगून पाठविलें; तो माघारें फिरून जाईल तर उत्तम ; नाहीं तर, एक मोईनुन्मुलुक पारपात्य करील; आह्मी त्याचें साहित्य करूं; व तुह्मी त्याची तिलतुल्य चिंता न करावी. यारीतीनें त्यांस लिहिलें. व आह्मांस एकांती बोलावून सांगितले जे, आह्मांस उभयती सरदारांचा बहुत भरंवसा होता. त्यांत जयाप्पाचा तर विशेष होता जे, हे कौलाचे सत्य असतील. दक्षणचे नीच मनुष्यांतहि कौलाचे सत्य असतात. यांचे घरीं पठाणाचा लेक आला असतां व यांणीं गंगाजल दरमियान दिल्हें असतां, यांनी नवालरायाहून विशेष केली. बल्की, पंतप्रधानावर हर्फ आणिला. आह्मांस वजिराचेच हातून कामें घेणी असतील तर जे समयीं हे वजीर जाले में सलाबतखां मीरबक्षी जाले, ते समयीं हे माझे यतशखानियांत यांणी येऊन यांणी ह्मटलें जे, दुरानियाचे दौलतीचे तीन हिसे करावे. एक तुमचा ह्मणजे नवाब बाहादुराचा, एक माझा, व सलाबतखानाचा, ऐसे तीन हिसे करून यास बरतफ करावें. तेव्हां म्यां ह्मटलें जे, तुह्मी शिवाय पंतप्रधानाचें काम कोण्हीही न करावें. पंतप्रधानांहीं काय नासरजंग, व माहाबतजंग, ईश्वरसिंग, अभयसिंग, मोईनुन्मुलुक, इतनामुदौले, फेरोजंग यांचे विचाराखेरीज कांहींच न करावे. जे गोष्ट करावी ते पातशाहाचे दौलतखाहीसाठी करावी; त्यांतच तुमची आमची सर्वांची खैरत असे; व तुमची वजारत कायम असे. त्यास, वजीर तो थोडासा शाहाणा, तो उगाच राहिला. सादखा बोलिले जे, आह्मी तर उद्याच चढून जाऊं. आह्मी उत्तर दिल्हें जे, बिसमिला पातशाहाचे मस्तक दुरानियाबराबर आहे. हें सलाबतखानास सांगितले, व वजीर अजमास सांगितले जे, तुह्मी उद्या दरबारास येऊं नका. त्यावरून ते दरबारास आले नाहीत. सलाबतखा खपीप जाले. सफदरजंग आपले घरी बसून ह्मणों लागले जे, आह्मी अबदालियास बोलावितों. आह्मी ह्मटलें जे, ते वेळेस एक्या अबदालियास मारिलें होतें ; आतां तुह्मी व अबदाली एक होणें ; उभयथांसहि मारिलें जाईल. त्यावरून स्तब्ध राहून, कमरूदिखानाच्या व असफज्याहाच्या जागिरा वाटून घेतल्या. त्यावरून पातशाहाचे चित्तामध्ये किंतु येऊन जुलफुकारजंगासहि खराब केलें, व यांसहि एक्या फौजदारीसाठीं खराब केलें. याकरितां मल्हारबांहीं येऊन त्यांचे साहित्य केलें; ह्मणून पातशाहाजवळ पंत प्रधानाकडील लटिकवाद आला; ह्मणून पंतप्रधानासी दक्षणेत खटखट लागली. त्यास सलाबतजंग सिफला त्यासी बराबरी करणें लागली. या गोष्टी सरदारांसी करून, पातशाहासी कौल अहद यांचे विद्यमानें पंतप्रधानासी करीन ह्मटल्यास कौल अहद हे करतील. ह्मणजे जाणावें जे, हे बैमानीस आलेसें जाणावें. याकरितां यांचा तो आह्मांस किमपि विश्वास नाही. वजिराची प्रमाणिकता ह्मणावी तर, ज्यांणी यासाठी इतका प्रेत्न केला, त्यांजवरहि हात पडला तर चुकणार नाही. त्यास, आह्मी पाठ ठोकूं तर, हात हाकावयासी चुकणार नाहींत. परंतु, आह्मासी व पंतप्रधानासी कौल अहद आहे. याकरितां, आह्मांस दुसरी गोष्ट करणें नाहीं; व आमचा दिल्हेला, मुलुक यास मिळतो. यास पराक्रम केलासा वाटत असेल तर, बाविसां. सुभियांमधें एक अकबराबादची सुभेदारी; त्यांत एक लाभोजची फौजदारी; तेथें एक्या रांडेस मारिलें, तर काय झांट उखडली ? त्यास सरदारांहीं आपले काम करून वाराणसी घ्यावी, बैमानीचा मार्ग न धरावा. जेणेंकडून बेहबुद होय तेच गोष्ट करावी. अशा कितेका प्रकारें गोष्टी सांगितल्या व येथें तजविजा अनेका प्रकारें करितात. हें कांहींच ध्यानास न येतां, वजीर अजम जाणतात जे, खोज्या मजकडे जाला हेंच मोठें आश्चर्य वाटतें ! जानोजी निंबाळकरांनी पत्र दिल्हें होतें, तें नवाब बहादुरांहीं, मजजवळ द्यावें ह्मणून, लछमीनारायणाजवळ दिल्हें. ते आमचे स्नेही असतां त्यांणी तेथें पत्र पाठविलें तर काय पशमं उखडलीं ? पंतप्रधानासी जाबसाल बोला बोला ह्मटलें, त्यास, नवाबबहादुरांहीं मसी बहुता प्रकारें ह्मटलें जे, सुभेदारीची नियाबत सलाबतजंगास देवा. त्यास फेरोजंग कबूल न करी. व आह्मी सुभेदार ज्यास ह्मटलें त्याखेरीज दुसर्यास सुभेदार ह्मणणार नाहीं. ऐसे ह्मटले ह्मणून, लछमीनारायण व दुसर्यांहीं शुकवा लिहिला असिला तर वीस फर्मान ज्यास ह्मणाल, त्यास देऊं. थोडक्याच गोष्टीवर फुलजी व्हावेंसें काय आहे ? आह्मी येथें बसलों तरी सरदारांकरितां वजिराचीच चाकरी केली. व पठाणांसहि कोणे फिरविले, हे इनसाफ करतील तर, आमचाच मुभा होईल. सरदारांचा भ्रम असिल्यास हजुरांत आमचें स्वरूप व खाविंदाची चाकरी याकरितां आह्मीं ईश्वराप्त शाहिद ठेवून कर्तव्यार्थ तो करितों. त्याचा तदारूक सरदारांहीं व वजिरांहीं दुसरा वकील पाठवूं ह्मणून श्रीमंतास लिहिलें. त्यास; वजिराजवळ जे वकील आहेत. त्यांचे कबिल्यास दिल्लीमध्यें राहावयास जागा नाहीं. मगर वजिरावर तफजुल होतो तो श्रीमंतांचेच खातरदास्त होतो. जर त्यांचीच *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४४ ]
श्री.
श्रीह्माळसाकांतचरणीं तत्पर,
खंडोजीसुत मल्हारजी होळकर.
राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष. वैजनाथ, व हरहंसलवचंद्रसेन इटावेकर सावकार याजकडे, नवाब वजीर याची कांहीं मामलत आहे, ह्मणून, वजिराकडील सज्यावल इटावियांत सावकार मजकुराच्या घरावर बसले आहेत. त्यास, सावकाराचे गुमास्ते -- कसराव नवाबाच्या लश्करांत मामलियाचा निर्गम करावयास आले आहेत. तर, त्याजला राहावयास तुह्मी आपल्या डेर्यापासी जागा देऊन, वजिरास अर्ज करून, सावकारमजकुराच्या मामलतीचा निर्गम करून देवणें; आणि, इटावियांत नबाबाचे सज्यावल बसले आहेत, त्यांजला उठवून नेवणें. सावकाराच्या कार्याविशई नवाब वजिरासहि पत्र लिहिलें आहे; तें तुह्मी आपल्या विद्यमानें देऊन कार्याचा निर्गम करून घेणें. सावकाराचें अगत्य धरून कार्य करणें. छ २३ शवाल. * बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तबसुद)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४३ ]
पण पातशाहाकडीलगुंता उरकून घ्यावयासी आलेत. आह्मी समयास सेवेसी असावें, निकाल पडावा, यासी उचत तें सुचवावें. त्यास येथें वजिराचें मनोधारण रक्षून सेवेसीं आलें पाहिजे यास्तव, येलचखान तेथें वजिराकडील आले आहेत, त्यांस समक्ष ताकीद करून, वजिरास लिहून, आह्मांस सेवेसी बोलावून घेणें. आपल्यापासीं पावल्यावर, सरकार कामाचा निकाल पाडावयची तदबर नेमिली आहे तें श्रुत करून, श्रीकृपेनें व श्रीमंताचे प्रतापें यश घेऊन श्रीमंतापाशी जाणें होय, आह्मींहि समागमेंच येऊं, तो विचार बनेल तो सुदिन करावा ! पत्र लिहितां नये, यास्तव समक्षच येऊन विनंति करूं. आपण तेथले प्रसंगास सर्वजाण आहां. सूचनार्थ विनंति लिहिली जाती की, आपले कानीं जे जे मजकूर श्रवण कराल. ते सत्य जाणावे. विशेष विस्तार लिहितां न ये. आमचे एकनिष्ठतेचा मजकूर * + + +