[ ५०१ ]
असिलें तरी लिहून पाठवा. नाहीं तरी तैसेंच लिहां. मुख्य गोष्ट बक्षी दारमाहेब महल अलकुज काजीस पाठवाल तरी, दुमरेच दिवशीं. तुह्मांस व बक्षीस तगीर करतील. जर पक्षवाडा सर्वांसवें लावायाचा द्याल, आणि अलकुज काजीकडून लिहवीत जाल, तरी पका सलुख, होतो. व अलकुज काजीस इश्वाचे + + + आणून जितके मर्तब अंबावेचे आहेत ते करावें. गहना त्यांचा त्यांचे हवाला करावा. चबुत्रे करावयास लावा. दोन लागतील. निवडीचे सवंग घेतलें तरी पाटाऊच फाडावा लागते. त्यासी, उत्तम असेल तेंच करा. बहुत काय लि॥ ? हे आशीर्वाद.
रा॥ त्र्यंबकपंतास नमस्कार.